एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
|
निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती
एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
|
निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती
मुंबई, १ जून (वार्ता.) – आजही जी मंडळी शिवरायांचे स्मारक करू इच्छित आहे, ती कुठेही शिवरायांच्या मूलभूत कार्याचा उल्लेख करू इच्छित नाही. त्यांना दादोजी कोंडदेव मान्य नाहीत. त्यांना समर्थ रामदास मान्य नाहीत. त्यांना आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही मान्य नाहीत. असा विचार करणारे जातीयवंत मराठेच शिवाजीचे व महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज `सामना’च्या संपादकीयातून केला आहे. या संपादकीयात श्री. ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे !
आम्हाला अभिप्रेत असलेले हिंदवी स्वराज्य, हे नाही !
मुंबईच्या अरबी समुद्रात शासन भव्य शिवस्मारक उभे करीत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही `मराठे’जनांनी शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध सुरू केला. श्री. पुरंदरे हे ब्राह्मण असल्यानेच त्यांना सुरू असलेला हा विरोध महाराष्ट्राच्या इभ्रतीला व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला शोभणारा नाही. स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना काढा नाहीतर शिवशाहिरांवर हल्ला वगैरे करण्याच्या धमक्या काही जातीयवादी मराठा संघटनांनी दिल्या आहेत. `स्मारक’प्रश्नी हात एकमेकांना उखडून टाकण्यासाठीच उठणार असतील, तर छत्रपती शिवरायही `मराठी माणसांचे थडगेच या जातीयतेने उभे रहाणार असेल, तर कृपा करून माझ्या नावाचा वापर करून ते बांधले जाऊ नये. आम्हाला अभिप्रेत असलेले `मराठा साम्राज्य’ व `हिंदवी स्वराज्य’ हे नाही’, असे म्हणतील.
देशावरील परचक्रांना विरोध न करता पुरंदरेंना संपवण्याची भाषा, हा षंढपणा !
शिवरायांच्या वेळी मोगल बादशहांचे परकीय राज्य चालविणार्यास अनेक स्वकीय वर्ग व घराणी मदत करीत होती. साडेतीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रात व हिंदुस्थानातही तोच इतिहास परत घडत आहे. परदेशी बाईला दिल्लीत मुजरे झडत आहेत. महाराष्ट्रातील लाचार वतनदारांनी स्वाभिमान खुंटीला टांगून पदे मिळविली आहेत. इस्लामचे अतिरेकी परचक्र धडका मारत आहे. `सिमी’च्या हातात हात घालून देशाचे इस्लामीकरण सुरू आहे. त्याविरोधात `ब्र’ न काढणारे व या परचक्राविरोधात लढण्याची भाषा न करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना संपवण्याची भाषा करतात, हा षंढपणा व नादानपणाच आहे.
काँग्रेसचे शिवप्रेम निवळ एक ढोंग !
जे लोक शिवस्मारकाचे उद्घाटन घाईघाईने उरकण्याचा डाव रचत आहेत, त्यांचे शिवप्रेम निवळ एक ढोंग आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस राजवटीने आतापर्यंत कुठच्या ऐतिहासिक स्थळांची, विशेषत: शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक स्थळांची दखल घेतली ? शिवछत्रपतींचा जिथे राज्याभिषेक झाला, त्या रायगडवरील वाड्याची छपरे उडून गेली व माळावरचा महाराजांचा पुतळा उघड्यावरच आहे. पुरातन खात्याच्या अक्षम्य दायित्वशून्यतेचा हा साक्षात नमुना आहे. मग समुद्रातील स्मारकाचा नारळ फोडण्याची व त्यानिमित्ताने जातीयवादाचे फुत्कार सोडण्याची एवढी घाई कशासाठी ?
शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकण्याचा इंग्रजांप्रमाणेनच काँग्रेजींचा प्रयत्न !
काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छत्रपतींचे स्मारक जणू निवडणुकीत प्रचारात वापरायचे एक `प्यादे’ आहे. ठीक आहे, तुमची प्यादी तुम्ही चालवा; पण त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध विखारी चळवळी राबवून महाराष्ट्रात प्रदूषण पसरवण्याची गरज काय ? जे जातीयवादी लोक `मराठे’पणाचा आव आणत आहेत, त्यांना शिवराय समजलेच नाहीत. याच काँग्रेसवाल्यांच्या `बापजाद्यांनी’ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना चोर, लुटारू व दरोडेखोर ठरवलेच होते व शिवाजी हे राष्ट्रपुरुष नसल्याची आरोळीही काँग्रेसवाल्यांनी ठोकली होती. त्या नतद्रष्टांना शिवरायांचा जो पुळका आला आहे, तो हास्यास्पदच आहे. या दोन्ही काँग्रेसवाल्यांनी खरोखरच शिवचरित्र वाचले असते, तर आज महाराष्ट्राची ही अशी दशा झाली नसती. शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकून ठेवण्याचा जसा इंग्रजांनी प्रयत्न केला, तसाच त्यांच्यानंतर आलेल्या काँग्रेजी बगलबच्च्यांनीही केला.
तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या वतीने खेडेकर, मेटे व दलवाई यांच्या पुतळयाचे दहन
तळेगाव दाभाडे, १ जून – महाराष्ट्र शासनाच्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने संतप्त झालेल्या तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर, विनायक मेटे व हुसेन दलवाई यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे नुकतेच दहन केले. या वेळी येथील शाळा चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेड व त्यांचे नेते आणि दलवाई यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.