काँग्रेसशाहीचा परिणाम
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आम्हाला काय दिले नाही ? या शासनाने आम्हाला दारिद्र्य दिले, दु:ख दिले, भारतात जिहादी अतिरेक्यांना आम्हाला ठार मारण्यासाठी मोकळे रान करून दिले ! आम्ही कधी नव्हे एवढ्या भयोत्पादनाच्या सावटाखाली वावरू लागलो आहोत. आम्हाला किड्यामुंग्यांप्रमाणे वागणूक देणार्या अशा या शासनाचा पाडाव करणे आवश्यक आहे.
भारतातील दारिद्र्य घटले आहे, असे धादांत खोटे सांगणारे काँग्रेसचे शासन !
`इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टीट्युट’ या संघटनेने भारतातील १ लाख २४ सहस्र घरांची पहाणी केली व त्यांतून काही धक्कादायक माहिती जनतेसमोर आणली. `भारतातील दारिद्र्य कमी झाले आहे’, असे वक्तव्य पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी केले होते; मात्र `इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टीट्युट’ने प्रसारित केलेली आकडेवारी भयानक आहे. या आकडेवारीनुसार भारतातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली गेली आहे. २००४-२००५ साली २ लाख ७० सहस्र लोक दारिद्र्यरेषेखाली होते. आता ५ लाख ५ सहस्र लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. `संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाच्या योजना या `आम आदमी’साठी असणार’, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र शासन हे `खास आदमी’साठी होते, हे शासनाच्या एकंदरीत धोरणांवरून लक्षात आले.
तुम्हाला हे माहीत आहे का ?
पाच महिन्यांपूर्वी एक अमेरिकी डॉलर म्हणजे ३६ रुपये, असे रुपयाचे मूल्य होते. आज मात्र रुपयाचे अवमूल्यन होऊन १ अमेरिकी डॉलर म्हणजे ५० रुपये झाले आहेत. भारताचा निर्यात दर २४ टक्क्यांनी घटला आहे. भारत आर्थिक दिवाळखोरीत निघाला आहे, याचे हे द्योतक आहे.
मंदीमुळे २५ लाख तरुण बेकार होतील, असे सांगणारे नव्हे, तर समस्येवर मात करणारे अर्थमंत्री हवेत !
जागतिक मंदीमुळे भारतात २५ लाख तरुण बेकार होणार, अशी भीती अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली होती.
भारतात बेकारी वाढणार, असे सांगणारे राज्यकर्ते नव्हेत, तर बेकारीच्या समस्येवर मात करून जनतेला आश्वस्त करणार्या राज्यकर्त्यांची भारताला गरज आहे !
साम्यवाद्यांच्या बंगालमधील १८ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे दरिद्री !
बंगालवर साम्यवाद्यांनी तीन दशके राज्य केले. `इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टीट्युट’ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून भारतातील १०० दरिद्री जिल्ह्यांच्या यादीमध्ये बंगालमधील १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. बंगालमध्ये एकूण १८ जिल्हे आहेत. त्यांपैकी १४ जिल्ह्यांचा दरिद्री जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावरून साम्यवाद्यांनी बंगालचा सत्यानाश केला, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-04-05&action=fullnews&catid=9&id=18646