विधान वरुणचे आणि मो.क. गांधींचे !

`जो हिंदूंवर अत्याचार करील त्याचे हात मी तोडेन’, असे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे तरुण इच्छुक वरुण गांधी विशिष्ठ परिस्थितीच्या संदर्भात म्हणाल्याने त्यांना कडक शासन व्हावे, म्हणून काँग्रेस आणि काही गांधी-नेहरूवादी संस्था प्रयत्‍नशील आहेत. मुसलमानांनी गेली हजार वर्षे केलेले व अजूनही करत असलेले हिंदूंवरील अत्याचार पहाता हिंदु-मुसलमान संबंध बिघडवण्यासाठी वरुण गांधींच्या विधानाची आवश्यकता नाही. ते आधीच बिघडले आहेत. ते जर सुधारायचे असतील, तर `आपले अत्याचार करणारे हात वरच्यावर तोडले जातील’, अशी भीती इस्लामी आतंकवाद्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे.

 

वरुण गांधींवर कारवाई होण्यासाठी काँग्रेस प्रयत्‍नशील !
`जो हिंदूंवर अत्याचार करील त्याचे हात मी तोडीन’, असे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे तरुण इच्छुक वरुण गांधी विशिष्ठ परिस्थितीच्या संदर्भात म्हणाले, म्हणून त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून आणि भारतीय दंड संहितेखाली कारवाई व्हावी, तसेच त्यांना कडक शासन व्हावे म्हणून काँग्रेस आणि काही गांधी-नेहरूवादी संस्था प्रयत्‍नशील आहेत. भारतात हिंदु-मुस्लीम ऐक्य प्रस्थापित झाले असून सर्वत्र शांततामय आणि गोड वातावरण असतांना वरुण गांधी बेजबाबदार आणि आक्रस्ताळी विधाने करून हिंसात्मक परिस्थिती उत्पन्न करत आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु वस्तुस्थिती अगदी उलटी आहे; म्हणून (१) अशा विधानांची चिकित्सा कशी करावी ? (२) परिस्थिती आधीच स्फोटक आहेत कि ती या विधानामुळे निर्माण होणार आहे आणि (३) आतंकवाद फोफावण्याची खरी कारणे काय, याचा विचार केला पाहिजे आणि मतितार्थ काँग्रेस जनांसमोर ठेवला पाहिजे.

वरुण गांधींच्या विधानापेक्षा मोहनदास गांधींचे विधान भयंकर प्रक्षोभक !
घटना समितीसमोर राष्ट्रध्वजाचा विषय विचारार्थ होता, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे, समतानंद अनंतराव गद्रे प्रभृतींनी आंबेडकरांना भेटून परंपरागत पवित्र भगव्या ध्वजाची गणना राष्ट्रध्वज म्हणून व्हावी, अशी विनंती केली. आंबेडकरांनी सहमती दर्शवली; परंतु संभाव्य अडथळे ओलांडण्यासाठी साहाय्य लागेल, असे सांगितले. मोठा अडथळा गांधींचा होता. त्यांनी भगव्याला विरोध करून तिरंग्याचा हट्ट धरला आणि तो पुरवावा लागला. मग गांधींनी कोपराने खणता येते का, ते पाहिले. ध्वज खादीचा असला पाहिजे आणि त्यावर चरखा असला पाहिजे, असा नवा हट्ट त्यांनी धरला “असा हट्ट धरणे वेडेपणाचे आहे”, असे सांगून सावरकर आंबेडकरांना म्हणाले, “हा देश केवळ विणकरांचा नाही. तेव्हा चरख्याऐवजी धर्म चक्राची स्थापना करा.” आंबेडकरांनी तसे करवून घेतले. तेव्हा गांधी भडकले. ते म्हणाले, “जर ध्वज मी सांगतो तसा केला नाहीत, तो खादीचा नसेल आणि त्यावर चरखा नसेल, तर या ध्वजाशी आपला काडीचाडी संबंध रहाणार नाही. अशा ध्वजाला आपण वंदनही करणार नाही.” गांधींच्या या विधानाचा अर्थ असा होतो की, भारतीय संविधानाने स्वीकृत आणि अधिकृतपणे मान्य केलेला राष्ट्रध्वज ते भारताचे नागरिक असूनही मानणार नाहीत.

एवढेच नव्हे, तर ते त्याला वंदन करणार नाहीत. म्हणजे ते बंड करणार आहेत. ते नेते असल्यामुळे त्यांना जे अनुयायी आहेत, तेही त्यांच्यासमवेत बंड करणार आहेत. राष्ट्रध्वजाच्या विरोधात ते चळवळ करणार आहेत. वरुण गांधींच्या विधानापेक्षा मोहनदास गांधींचे विधान भयंकर प्रक्षोभक आहे. एवढेच नव्हे, तर त्यात घटनाद्रोह आणि राष्ट्रद्रोह दडलेला आहे. आपल्यामागे या प्रश्‍नात लोक नाहीत हे गांधींच्या लक्षात आल्यावर चळवळ करण्याचा विचार त्यांनी सोडून दिला असावा. उरलेल्या आयुष्यात त्यांनी वंदन केले कि नाही, हे मला माहीत नाही; पण त्यामुळे त्यांनी घटनेला धुडकावणारे विधान केले होते, ही गोष्ट पुसता येत नाही. तरी समाजाने गांधींच्या फाजील अहंकाराला आणि वेडपटपणाला शिक्षा केली नाही. अशा समाजाला वरुणला एका साध्यासरळ आणि विधायक उद्देशाच्या विधानाविषयी जाब कसा विचारता येईल ? भारतीय दंड संहिताही एखाद्याला दोषी ठरवण्यापूर्वी त्याच्या विधानामागील उद्देश, ते कृतीत आणण्याची त्याची क्षमता आणि एकंदर समाजाच्या शांततेवर आणि भवितव्यावर त्याचे होणारे बरेवाईट परिणाम लक्षात घेते. त्यामुळे वरुण गांधींनी दोषी ठरून शासन होण्याइतकी चूक केलेली नाही, असे म्हणता येईल.

मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार !
वरील विधान करून वरुण गांधी हिंदू आणि मुसलमान यांच्यात द्वेष पसरवत आहेत आणि त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध बिघडवत आहेत, असा आरोप केला जातो; म्हणून हिंदु-मुस्लीम संबंध गेल्या १०० वर्षांत कसे होते, हे पहाणे आवश्यक ठरते. गांधीयुग सुरू झाल्यापासून हिंदु-मुस्लीम ऐक्य हे राष्ट्रीय प्राथम्य ठरले. मुसलमान सदैव प्रसन्न रहावेत, म्हणून हिंदूंनी त्यागाची पराकाष्ठा करण्याचे ठरले. हिंदूंनी आपली भूमी तोडून दिली; पण त्यांनी शांतपणे घेतली नाही. मागितली तेवढी दिली नाही; म्हणून त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या. प्रत्येक गावात रक्‍ताचे पाट वाहविले. संपत्ती, घरदार लुटले. एकाही हिंदु स्त्रीला भ्रष्ट केल्यावाचून सोडले नाही. फाळणीच्या वेळी मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारात जो नीचपणा भरलेला आहे, तसा नीचपणा जगातील कोणत्याही एका समाजाने दुसर्‍या समाजावर केलेला नाही. त्याविषयी मुसलमान समाजाने गेल्या साठ वर्षांत हिंदु समाजाची एकदाही क्षमा मागितलेली नाही. पश्चात्ताप प्रदर्शित केलेला नाही. दु:ख व्यक्‍त केलेले नाही. तरीही हिंदू त्यांच्याशी चांगले वागत आहेत. हिंदूंनी सूड घेतलेला नाही. मुसलमानांच्या त्या नीचपणाने हिंदूंच्या हृदयावर केवढा मोठा घाव पडला आहे, याची जाणीव हिंदूंनी मुसलमानांना करून दिलेली नाही.

हिंदु-मुसलमान संबंध वरुण गांधींमुळे नव्हे, तर ते आधीच बिघडले आहेत !
हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी ३२ वर्षे आपण सतत आणि कठोर परिश्रम केले; पण त्यात आपणाला यश आले नाही, अशी स्पष्टोक्‍ती मोहनदास गांधींनी केली आहे. “काश्मीरमधील मुसलमान सुखी रहावेत; म्हणून भारताने त्यांच्यावर एक लाख कोटी रुपये पहिल्या चाळीस वर्षांत खर्च केले; पण त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम आम्हाला निर्माण करता आले नाही”, असे काँग्रेसनेते सी. सुब्रमण्यम म्हणाले. काश्मीरमध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी एवढे भय निर्माण केले आहे की, हिंदु स्त्रियांची मासिक पाळी ऐन तिशीत बंद होते आहे. त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया कशी आहे ? पाकिस्तानने भारतात आणि भारताने पाकिस्तानात आतंकवादी कृत्ये करायची नाहीत, असा संधी गुजराल पंतप्रधान असतांना उभय राष्ट्रांत झाला. पाकिस्तानने तो लगेच तोडला; पण भारत त्यास अजून चिकटून आहे. तात्पर्य हिंदु-मुसलमान संबंध बिघडवण्यासाठी वरुण गांधींच्या विधानाची आवश्यकता नाही. ते आधीच बिघडले आहेत. ते जर सुधारायचे असतील, तर आपले अत्याचार करणारे हात वरच्यावर तोडले जातील, अशी भीती इस्लामी आतंकवाद्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे.

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

विजयाची भगवी गुढी लाल किल्ल्यावर उभारा !

शिवसेर्नौंमुखांकडून हिंदूंना नववर्षारंभानिमित्त आवाहन !

 

हिंदु जागा राहिला, तर देश वाचेल !

या देशात मुसलमान, ख्रिस्ती व इतर धर्मीय निवडणूक आखाड्यात आपापल्या धर्माचे हित पहात असतांना हिंदूंनी मात्र मुर्दाडासारखे जगावे का ? निवडणुका येतील, निवडणुका जातील; पण हिंदु जागा राहिला, तर देश वाचेल. नाहीतर काँग्रेसी `कसाब’ देशावर त्या अफझलचे राज्य आणायला कमी करणार नाहीत, असे
श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – लोकहो, हा हिंदुस्थान आहे. तुमच्या-आमच्या हिंदुस्थानात हिंदु आणि केवळ हिंदु म्हणूनच जगा. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत हिंदूंनी एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवून रणांगणात उतरावे व विजयाची भगवी गुढी लाल किल्ल्यावर फडकवावी, अशा आवाहनरूपी
शुभेच्छा आज शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दैनिक `सामना’तून हिंदूंना दिल्या.

हिंदूंना बदनाम करून धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळण्याचे काम सुरूच !
श्री. ठाकरे यांनी यात पुढे म्हटले आहे, `हिंदूंना चारही बाजूंनी कोंडून मारण्याचेच कारस्थान चालले आहे. तिकडे त्या वरुण गांधीने हिंदुहितासाठी थोडे आक्रमक बोल सुनावताच देशातील धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे नुसते पेटून उठले. वरुणला निवडणुकीतून हद्दपार करून तुरुंगात टाका, असे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली. संसदेवरील हल्ला प्रकरणाचा सूत्रधार अफझलची फाशीही अद्याप लटकलेलीच आहे. तिकडे मालेगाव बाँबस्फोटांच्या निमित्तानेही हिंदूंना बदनाम करून धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळण्याचे काम सुरूच आहे.’

काँग्रेसला या देशावर इस्लामचेच राज्य आणायचे आहे !
कसाब व त्याचे हिरवे टोळके राहिले बाजूला; पण कर्नल पुरोहित, प्रज्ञा साध्वी, मेजर उपाध्याय यांना फक्‍त `हिंदु’ म्हणून फासावर लटकवण्यासाठीच सरकार सर्व शक्‍ती पणास लावत आहे. प्रज्ञावर तुरुंगात अत्याचार सुरूच आहेत. तिच्या शाकाहारी अन्नात किडे मिसळवून हिंदूंच्या नशिबी त्यांच्या या भूमीत किड्या-मुंग्यांचेच जिणे असल्याचे दाखवून दिले जात आहे. या अत्याचारांविरुद्ध कुणी ना तापत ना उठत. त्यामुळे हिंदूंची `पीछेहाट’ करून काँग्रेसला या देशावर जणू इस्लामचेच राज्य आणायचे आहे कि काय, अशी शंका येते. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळेच देतील; पण शेवटी सर्वच पक्षांनी राजकारणाची `इफ्तार पार्टी’ करून हिंदूंना भिकारी केले, हे न विसरता उद्याच्या निवडणुकीत उतरा व स्वाभिमानाची, सुरक्षेची आणि राष्ट्रहिताची गुढी
देशावर उभारा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

गुढीपाडवा असा साजरा करा !

अनुक्रमणिका

पुणे येथे मुसलमानांनी भाजपला मते न देण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली !

लाथाडणार्‍या मुसलमानांना कवटाळून आत्मघाताकडे वाटचाल करणार्‍या भाजपचे अपयश निश्चित !

पुणे, २१ मार्च – येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला मुसलमानांचा शत्रू संबोधून मते न देण्याचे आवाहन करणारी पत्रके मुसलमानांनी मुसलमानांमध्ये वाटली आहेत.

(आणि अशा मुसलमानांचे काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून भाजप लांगूलचालन करतो ! – संपादक) भाजपला हरवण्याची ताकद असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मते देण्यास या पत्रकात सांगितले आहे. (हिंदूंनो, हिंदुबहुल राष्ट्रात हिंदुत्ववादी पक्षाला हरवण्याचा विचार मुसलमान करू शकतात, ही लज्जास्पद स्थिती बदला ! – संपादक)
`तुमच्या पायांवर जग झुकेल’ असा मथळा असलेल्या या पत्रकात म्हटले आहे, `चूक करून पश्चात्ताप करण्यापेक्षा हुशारीने निर्णय घ्या. (यावरून मुसलमान देशहिताचा नव्हे, तर स्वत: सर्वसत्ताधीश कसे होऊ, याचाच विचार करतात, हे दिसते. – संपादक) पुणे जिल्ह्यात जो पक्ष मुसलमानांना एक तिकीट देऊ शकत नाही, तो मुसलमानांचे भले काय करणार ?’ (मुस्लीम लीगने कधी हिंदु उमेदवाराला तिकीट दिले आहे का ? – संपादक) मुस्लीम बँकेचे पदाधिकारी, मोती मशिदीचे ट्रस्टी व काही प्रतिष्ठित मुसलमान नागरिक यांची नावे या आवाहन पत्रकावर छापण्यात आली आहेत.

 

  निगडीत वृत्त : धर्मांध मुसलमान

इमामांना चांगला पगार द्या ! – सरसंघचालक

संघवाल्यांना याबाबत काय म्हणायचे आहे ?

 

या बातमीबाबत `दैनिक सनातन प्रभात’ काहीही टीप देणार नाही. हिंदु धर्माविषयी आस्था असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीच याबाबत विचार करावा. सदर वृत्त सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले आहे, याची संघवाल्यांनी नोंद घ्यावी. – संपादक

 

नवी दिल्ली, १७ मार्च – सर्व राज्यातील सर्व वक्फ बोर्डात कायमस्वरूपी कार्यकारी अधिकार्‍याची नेमणूक करावी. इमाम, अजान देणार्‍या व्यक्‍तींना चांगला पगार द्यावा. वक्फ बोर्डाच्या संदर्भात संसदीय समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. सुदर्शन यांनी केंद्र शासनाला केली आहे.

 

  निगडीत वृत्त : संघ परिवार

संघवाल्यांनी याबाबत चिंतन करावे !

देशद्रोही कारवाया करणारे मुसलमान व देशविघातक कारवाया करणारा पाक यांच्यावर संघवाले का तुटून पडत नाहीत ?

१. संघातर्फे अधिकृत खुलासा येणे अपेक्षित होते, संघाच्या स्वयंसेवकांकडून असे खुलासे आले असते, तर आनंद झाला असता; मात्र खुलाश्यांऐवजी धमक्यांचे दूरध्वनी आले, हे दुर्दैव !

२. देशद्रोही कारवाया करणारे मुसलमान व देशविघातक कारवाया करणारा पाक यांच्यावर संघवाले का तुटून पडत नाहीत ?
संघाचे उपसरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर संघवाल्यांनी दूरध्वनी करून त्याचा निषेध नोंदवला. अशीच तत्परता संघवाले देशद्रोही मुसलमान व पाक यांच्या विरोधात दाखवली असती, तर आज भारताची दु:स्थिती झाली नसती !

३. संघवाल्यांनो, अशी नियोजनबद्धता राष्ट्र व धर्म यांसाठी वापरा !
मोहन भागवत यांच्या विरोधातील वृत्त प्रसिद्ध झाल्यावर संघवाल्यांनी एकमेकांशी संपर्क साधला व संपादकीय विभागाला दूरध्वनी केला. दूरध्वनी करणार्‍या काही संघवाल्यांनी `दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तही वाचले नव्हते; मात्र इतर संघवाल्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी सनातनला धमकावण्यासाठी दूरध्वनी केला. यावरून त्यांच्यातील नियोजनबद्धता दिसून आली. सध्या जाहिराती व प्रसारमाध्यमे यांद्वारे हिंदु धर्मावर अनेक आघात होत आहेत. असे असतांना संबंधितांना नियोजनबद्धरीत्या दूरध्वनी करून जाब विचारण्याची हिंमत संघवाले का दाखवत नाहीत ?

४. संघवाल्यांनो, छोट्याशा सनातनला धमक्या व इशारे देण्याऐवजी कम्युनिस्ट, मुसलमान व हिंदुद्वेष्टे राजकीय पक्ष यांच्यावर कायमची जरब बसेल, अशी कृती करा !
आज संघाच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर संघवाल्यांनी संपादकांना दूरध्वनी करून धमक्या व इशारे दिले. केरळमधील कन्नूरमध्ये कम्युनिस्ट संघाच्या कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्या करत आहेत, तसेच अनेक ठिकाणी संघाच्या नेत्यांची मुसलमानांकडून हत्या होत आहे. त्यांना जाब विचारणे तर सोडाच संघवाले या घटनांचा राष्ट्रीय स्तरावर साधा निषेधही करत नाहीत ! छोट्याशा सनातनसमोर `पेहेलवान’ बनणारे संघवाले कम्युनिस्ट व मुसलमान यांच्यासमोर `काडी पेहेलवान’ का होतात ?

५. संघवाल्यांनी मानसिकता बदलणे आवश्यक !
`आम्हाला कोणी विरोध केला, तर आम्ही त्याला प्रतिवाद करत नाही’, अशी मानसिकता संघवाल्यांनी बाळगली आहे. हिंदूंनी आतापर्यंत प्रतिकार केला नाही; म्हणूनच हिंदू सर्वत्र संपत चालले आहेत. अशा घातक मानसिकतेमुळे संघाने यापुढे त्याच्यावर होत असलेल्या टीकेचा प्रतिवाद केला नाही, तर संघ संपायला वेळ लागणार नाही, हे निश्चित !

६. `दैनिक सनातन प्रभात’ने संघाची बदनामी केली नाही, तर जगभर संकेतस्थळाच्या माध्यमातून संघ आधीच बदनाम झाला आहे,हे संघवाल्यांनी लक्षात घ्यावे !
दैनिक सनातन प्रभातमध्ये मोहन भागवत यांच्याबद्दल वृत्त प्रसिद्ध करून तुम्ही आमची बदनामी केली’, असा कांगावा संघवाले करत आहेत. `मोहन भागवत लिंक्ड विथ आय.एस्.आय.’, असो वाक्य घालून गुगल या शोध संकेतस्थळावर शोध घेतला असता याबद्दल भागवत यांचा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आशय असणारी २ सहस्र १४० पाने संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याबाबत ‘www.newkerala.com’,
‘www.littleabout.com’, ‘www.samaylive.com’,
‘www.sify.com’, ‘www.politicsparty.com’,
‘www.RSS News Archive.com’, तसेच मोहन भागवत यांचा आय.एस्.आय.शी संबंध आहे, असा जबाब देणारे स्वामी अमृतानंद यांचे वक्‍तव्य ‘ w w w . i n d i a n i n f o . c o m ’ ,
‘www.PersecutionUpdateIndia.com’,
‘www.zeenews.com’, तसे असंख्य संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाले आहे.
मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात अटकेत असलेले शंकराचार्य स्वामी अमृतानंद यांचा जबाब अनेक वृत्तसंकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये संघाचे सह सरसंघचालक मोहन भागवत व संघाच्या मुसलमान शाखेचे प्रमुख इंद्रनिल यांचे आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा जबाब सर्व वृत्तसंकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला होता. या वृत्तसंकेतस्थळांची माहिती वाचून संघाची जगभर बदनामी झाली, त्याबाबत संघाने काहीही केले नाही; मात्र हेच वृत्त `दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर संघाने डरकाळया फोडायला सुरुवात केली !

७. एका वयोवृद्ध स्वयंसेवकांच्या वक्‍तव्यांकडे काणाडोळा करणारे संघवाले !
`राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वयोवृद्ध स्वयंसेवक श्री. श्याम आपटे यांनी मोहन भागवत यांचे आय.एस्.आय.शी संबंध आहेत, अशी माहिती दिली होती, असे स्वामी अमृतानंद यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. संघामधील एक वयोवृद्ध स्वयंसेवक संघातील एका वरिष्ठ पदावर असलेल्या वक्‍तीवर राष्ट्रद्रोहाचा आरोप करतात, ही घटना संघाने गांभीर्याने घेऊन त्याची मुळापर्यंत चौकशी करणे आवश्यक होते; मात्र संघाने त्याकडे काणाडोळा केला !

 

  निगडीत वृत्त : संघ परिवार

संघवाल्यांच्या धमक्या >> दापोलीत `सनातन प्रभात’चे अंक जाळले ०००००

 

वृत्तपत्र स्वातंत्र्यावर दबाव आणणार्‍या संघवाल्यांच्या हीन मानसिकतेचा धिक्कार !

 

मोहन भागवत यांचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे संघवाल्यांचा थयथयाट !

 

दापोलीत `सनातन प्रभात’चे अंक जाळले ०००००
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – `दैनिक सनातन प्रभात’मध्ये `संघाचे मोहन भागवत यांचे आय.एस्.आय.शी साटेलोटे ?’ हे वृत्त आज प्रसिद्ध झाल्यावर माथेफिरू संघवाल्यांनी याबद्दल वैचारिक प्रतिवाद न करता दापोली (जिल्हा रत्‍नागिरी) येथे `दैनिक सनातन प्रभात’चे अंक जाळले. आज संघवाल्यांचे गोव्यातील `दैनिक सनातन प्रभात’च्या मुख्य कार्यालयात २०, तसेच मुंबई आवृत्तीच्या पनवेल येथील कार्यालयात ५, रत्‍नागिरी येथील कार्यालयात ५ व मिरज येथे १ असे एकूण ३१ आणि सनातनच्या साधकांकडे अगणित दूरध्वनी आले. पनवेल येथील कार्यालयात दूरध्वनी करून संघाच्या एका कार्यकर्त्याने `तुमचे कपडे काढून मारू’, अशा आशयाची धमकी सनातनच्या साधकाला दिली, तर संघाच्या काही कार्यर्त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. केंद्रीय संपादकीय विभागाला दूरध्वनी करून `तुम्ही दापोली येथे येऊनच दाखवा’, `तुमचे दैनिक बंद पाडू’, अशी धमकी दिली. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर संघातील एकाही वरिष्ठ पदावरील स्वयंसेवकाने त्याची प्रतिक्रिया `सनातन प्रभात’कडे व्यक्‍त केली नाही. या उलट `संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, तर तुम्ही त्याकडे का लक्ष देता’, असा फुकाचा सल्ला द्यायला मात्र ते विसरले नाहीत !

संघवाल्यांच्या धमक्या !
* काय वेड्यासारखे छापता. दापोली येथे येऊन दाखवा. आम्ही ८ दिवसांत तिकडे येत आहोत.
* कार्यालयाची तोडफोड केली तर महाग पडेल. तुमचा एकही कार्यकर्ता शिल्लक रहाणार नाही.
* जाहीर माफी प्रसिद्ध झाली नाही तर परिणाम वाईट होतील.
* तुम्ही वळवळणारे किडे आहात.


दोडामार्ग येथील `सनातन प्रभात’चे वितरण बंद पाडण्याची धमकी !
स्वत:चे नाव अर्जुन चांदेकर व रा.स्व. संघाचे रत्‍नागिरी सहकार्यवाह,
अशी स्वत:ची ओळख सांगणार्‍या व्यक्‍तीने `दैनिक सनातन प्रभात’चे दोडामार्ग येथील वितरण बंद पाडण्याची धमकी दिली. तसेच दूरध्वनीवरून बोलणार्‍या संपादकीय विभागातील साधकाशी अश्लिल भाषेत शिव्या दिल्या.

 

  निगडीत वृत्त : संघ परिवार

क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शेवटचे पत्र !

१४ मार्च १९४५ ला बाबाराव सावरकर यांना त्यांच्या निधनापूर्वी, `आता मृत्यूला मिठी मारण्यास सिद्ध असावे’, असे सांगणारे एक विचारप्रवर्तक पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना पाठवले होते. हे पत्र `बाबाराव सावरकर चरित्र’, तसेच `अंदमानच्या अंधेरीतून’ या पुस्तकाच्या सन १९७२ मध्ये काढलेल्या आवृत्तीत परिशिष्ट म्हणून समाविष्ट केलेले आहे. या पत्रातील महत्त्वाचा भाग बाबाराव सावरकरांच्या १६ मार्चला असणार्‍या पुण्यतिथीनिमित्त येथे उद्धृत करत आहोत.

 

“बाबा, आपल्या तिघा भावांचे जीवितकार्य एकरूप, एकजीव असेच होते. आपण आपल्या पिढीत कुलाचे ऋण फेडले आहे. भारताच्या इतिहासातील एक अध्याय सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलाच पाहिजे. `सावरकर युग’ – शत्रूंनी तो शब्द रूढ केला आहे.
कर्तव्याच्या दृष्टीने कालच्या पत्रात लिहिले होते; पण फलाविषयी बोललो नव्हतो. कारण `मा फलेषु कदाचन ।’; पण सापेक्षत: बोलावयाचे तर दोन वेळा उभ्या राष्ट्राचा जीवनप्रवाह प्रतिकुलाकडून आपण आपल्या सहकार्‍यांसह उलटवून दिला आहे. `स्वातंत्र्यलक्ष्मी की जय ।’, ही पहिली क्रांतीघोषणा आपली; आणि तिलाच पूर्तता देणारी `हिंदुस्थान हिंदुओंका, नही किसीके बापका ।’, ही दुसरी क्रांतीघोषणाही आपलीच ! आपण दोन वेळा राष्ट्राची विचारक्रांती व आचारक्रांती घडवून आणली आहे.
यात जे जे योद्धे लढले, रणी पडले, त्यात काहींची नावे दोन चार दिवस लोक आठवतील, तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही; पण श्रेय दोघांचे समान. त्यातल्या त्यात पुतळा उभारावयाचा, तर तो आपल्यासारख्या कर्मविरांचाच!
पहिली गोष्ट म्हणजे आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्रासारखा भेटत आहे. आयुष्याचे सार्थक झाले. लहानपणी स्वातंत्र्ययज्ञाचे कंकण हाती बांधिले ते यावज्जीव सोडले नाही. घनघोर यातना, दु:खे ! सुखही तसेच. इकडे अंदमान, तर तिकडे लाखो स्वजनांच्या जयघोषात हिमालयाचे शिखराशिखरांवर काश्मीर, हरिद्वार ते आसामपर्यंत फडकवलेला कीर्तीध्वज ! पण घनघोर दु:खात तसेच सुखात याच कार्यी, त्यात हिंदु स्वातंत्र्याचा – क्रांतीचा ध्वज हातांतून ढळला नाही. व्यक्‍तीच्या हातून जी शक्य होती, ती सारी झुंज आयुष्यभर लढवली. तिशीच्या आतच फासाशी उभे रहावे लागले, तरी झुंजतच राहिलो. हे केवढे समाधान ! `कर्मण्येवाधिकारस्ते’ म्हणून फलांविषयी मी काहीच बोलत नाही.
जो स्वातंत्र्ययज्ञ आपण प्रथम चेतवला, तो आज राष्ट्रभर भडकलेला आहे. या आपल्यासारख्या सतत साठ वर्षे लढत असलेल्या विरांची काया, जी मानवी काया नव्हे, तर देवांच्या हाताच्या वज्राची एक महान दिव्य समिधाच होय !
यासाठी ज्यांचे परम सार्थक झाले, त्या देहाची दिव्य समिधा आज आपल्या वैयक्‍तिक जीवनाची पूर्णाहुती म्हणून त्या महान यज्ञात पडत आहे, ही केवढी समाधानाची गोष्ट आहे ! मित्र म्हणून भेटावयास आलेल्या त्या मृत्यूचे स्वागतच करूया. `योगश्चित्तवृत्तिर्निरोध:।’ हे सूत्र आहे; चित्तवृत्तीनिरोधनसमाहित आलेल्या समाधीत, `आपले मरण पाहिले म्या डोळां, तो जाहला सोहळा अनुपम !’ अशा समाधानाने आपला सारा जन्म जनताजनार्दनाच्या सेवेत झिजवलेल्या, कीर्तीनिरपेक्ष, केवळ कर्तव्यरत विराला योगनिद्रेत, सुखसमाधीत विलीन होण्याचा अधिकार आहे.
पूर्वी विशी, तिशी, चाळिशीमध्ये वारंवार मृत्यूची गाठ पडली होती, तेव्हांही आपण त्यांचे स्वागत केले; पण ते काहीसे आव्हानाच्या स्वरूपात होते.
`येतोस तर ये, कोण भितो तुला !’ असा ध्वनी त्या वेळच्या सिद्धतेचा होता. आज प्राकृत संसारात ज्यांना सुखे, सार्थकता म्हणतात, तीही सुलटलेल्या काळाने आपल्या भोवती विखुरलेली आहेत. स्वजन, आप्‍तेष्ट पुन्हा भेटले, कारागारांत जी कार्यपिपासा अपुरी राहिली होती, ती आज भारतखंडभर झालेल्या युगप्रवर्तक कार्याच्या व्यापात सिंधु, गंगा व यमुना ते दक्षिण सिंधुपर्यंत सर्व पवित्र नद्यांचे प्रत्यक्ष जल पिऊन शांत होत आहे. घरीदारी मुले हसत खेळत आहेत. आता मृत्यू आला नाही, तर आपण होऊन महाप्रस्थानाला निघायची घडी भरली. यास्तव समाधानाने, मित्राचा जसा हात धरावयाचा तसाच मृत्यूचा ! आव्हानाने नव्हे तर आनंदाने ! ज्यात मागे किंवा पुढे उरले नाही, तृषा तृप्‍त झाल्या, एक झटक्यासरशी जगाची वार्ता, लोभ, क्षेम, संबंध नाहीसे होऊन केवळ शांतता उरली, `मी देखील नाहीसा झाला, त्या अनंतात, हे कर्मविरा, आता पूर्ण समाधानाने विलीन व्हावे.’
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।
- तात्या (स्वातंत्र्यवीर सावरकर)
(संदर्भ : `प्रज्वलंत’ जानेवारी २००३)

 

  निगडीत वृत्त : स्वातंत्र्यासाठी झटलेले थोर क्रांतीकारक

संघाचे मोहन भागवत यांचे आय.एस्.आय.शी साटेलोटे ?

नवी दिल्ली, १४ मार्च (वृत्तसंस्था) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उप सरसंघचालक मोहन भागवत यांचे पाकच्या आय.एस्.आय. या गुप्‍तचर संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. (हे वृत्त खरे असेल, तर हिंदूंचा हा मोठा विश्‍वासघात आहे. – संपादक) नागपूरमध्ये २० मार्चला संघाची प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे, असे वृत्त http://politicsparty.com/rss_analysis.phphttp://www.newkerala.com/nkfullnews-1-2123.html या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाले आहे.

नागपूर येथे होणार्‍या बैठकीच्या वेळी सरसंघचालक श्री. सुदर्शन नवीन उप सरसंघचालकाची नियुक्‍ती करतील. भागवत यांना आय.एस्.आय.कडून नियमित पैसे मिळत असत, असे संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणाची चौकशी करतांना भागवत यांचा आय.एस्.आय.शी असलेला संबंध उघड झाला होता, असे वृत्तात म्हटले आहे.

पहिला बाजीराव आणि शरद पवार

 
 

गुरुवारी शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ या मूळगावी लोकसभा निवडणुकीतील आपल्या स्वत:च्या मतदारसंघातील प्रचाराचा नारळ फोडला. पवार १९६७ पासून पुणे जिल्ह्यातील बारामती गावातून विधानसभा आणि लोकसभा यांची निवडणूक प्रचंड मताधिक्याने आणि सातत्याने जिंकीत आले आहेत. यंदा बारामतीतून त्यांची सुकन्या उभी रहात असल्याने त्यांनी स्वत:साठी सोलापूर जिल्ह्यातील माढा हा मतदारसंघ स्वीकारला आहे. सातारा जिल्ह्याचा काही भाग विशेषत: पवारांचे मूळ गाव नांदवळ माढ्याचा भाग झाले आहे.

पवारांच्या स्वागतासाठी गावकर्‍यांनी जागोजागी सडासंमार्जन केले होते, रांगोळया काढल्या होत्या, गुढ्या उभारल्या होत्या, झांजांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. ग्रामदैवत म्हातोबा आणि जोगूबाई यांचे दर्शन त्यांनी घेतले. सोयीनुसार हिंदूंच्या धार्मिक प्रथांचा आदर आपण राखतो, हे पवारांनी दाखविले; परंतु तेवढे पुरेसे नाही. काँग्रेस संस्कृतीच्या लहानमोठ्या सरदार आणि दरकदार यांनी १८८५ मध्ये काँग्रेसच्या पहिल्याच अधिवेशनात आम्ही राजकीयदृष्ट्या हिंदु राहिलो नसून हिंदी झालो आहोत, असे घोषित केल्यामुळे आणि त्या वेळेपासून आजपर्यंत भोळसटपणे वागत राहिल्यामुळे इस्लामी आतंकवाद डोक्यावर चढून बसला आहे. म्हणून राजकीयदृष्ट्या या देशात इस्लामचे हिंदूंवर चारबाजूंनी जे आक्रमण होत आहे, त्याविषयी पवारांची भूमिका काय आहे, ते कळले पाहिजे. नांदवळच्या प्रचारसभेत रामराजे नाईक निंबाळकरांनी यापुढे पवार आमच्या जिल्ह्याचे आहेत, असे आपण म्हणू शकतो, असे अभिमानाने सांगितले. पवारांचे नेतृत्व सगळया भारताला जवळचे वाटले पाहिजे. ते एकदोन जिल्ह्यापुरते मर्यादित असता कामा नये. सातार्‍याचे प्रतिनिधित्व करणे सोपे नाही. कारण धर्मवीर संभाजीपूत्र शाहूने येथून भारतावर राज्य केले आहे. आपला पंतप्रधान पहिला बाजीराव याचेविषयी शाहूस प्रचंड विश्‍वास आणि प्रेम होते. “राऊस्वामींची मर्जी अवघियांनी पाळावी : त्यांच्या चित्तास क्षोभ करू नये. राऊ `खटे’ होत असे कोणीही काही करू नये”, असे शाहूने बजावले आहे. बाजीराव म्हणजे हिंदुत्व. बाजीरावाचे स्मरण होताच कर्नाटकापासून दिल्लीपर्यंत आणि द्वारकेपासून काशीपर्यंत सर्वांचा थरकाप होई. मुसलमान राज्यकर्ते शहामत पनाह म्हणून त्यास मुजरा करीत. बाजीरावाच्या आईने फौजफाटा न घेता एकटीने उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा मुक्‍तपणे केली. कारण ती बाजीरावाची आई असल्यामुळे तिचा शब्द झेलूनच आपला जीव वाचविता येईल, हे सर्व मुसलमान राज्यकर्त्यांना माहीत होते. नांदवळच्या सभेत शेवटच्या सामान्य माणसाचे कल्याण झाले पाहिजे, असे पवारांनी सांगितले. त्यांचे आदर्श शिवाजी, बाजीराव, टिळक, सावरकर आहेत कि गांधी-नेहरू आहेत ? सामान्य माणसाचे कल्याण सोडा, त्याची फसवणूक गांधी-नेहरूंनी केली. फाळणी ही फसवणूक आहे. १९६२ चा चीनकडून पराभव, चिघळलेला काश्मीर प्रश्‍न, ही फसवणूक आहे. हे प्रश्‍न सोडविण्याचे सामर्थ्य शिवाजी कुळात आहे. आपण शिवाजी कुळाचे सदस्य आहोत, आपल्याकडून हिंदुहितविरोधी काही होणार नाही, असे वचन सातार्‍याच्या गादीवर हात ठेवून शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी दिले पाहिजे.
- सुघोष

 

  निगडीत वृत्त : शरसंधान