म्हणे मुसलमानांनी भारताला इस्लामचा मित्र घोषित करावे !

विहिंपची गांधीगिरी (नव्हे षंढगिरी) !

नवी दिल्ली – भारत हा इस्लामचा मित्रदेश असल्याचा फतवा जारी करावा, अशी विनंती विश्‍व हिंदु परिषदेने मुसलमान संघटनांना केली आहे.

(आता काँग्रेसप्रमाणे विहिंपही मुसलमानांसमोर लोळण घालू लागली आहे. अशा विहिंपवर हिंदूंनी कसा विश्‍वास ठेवावा ? – संपादक) विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मरक्षा मंचने उलेमांना पाठवलेल्या पत्रात `हिंदू हे `काफीर’ नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध `जिहाद’चे तत्त्व अंगीकारण्यात येऊ नये’, असे आवाहन करण्यात आले आहे. (गेली हजार वर्षे हिंदूंना काफीर समजणारे मुसलमान विहिंपच्या या पत्राला भीक घालतील का ? – संपादक) `भारताबद्दल असलेले गैरसमज दूर होण्याच्या दृष्टीने मुसलमान विद्वानांनी पुढाकार घ्यावा’, असे या पत्रात म्हटले आहे. (बलाढ्य विहिंपने मुसलमानांना असे आवाहन करणे, म्हणजे समस्त हिंदूंना मुसलमानांसमोर मान खाली घालायला लावण्यासारखे आहे ! – संपादक) ज्या मुसलमान संघटनांना ही विनंती करण्यात आली आहे, ते सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा विहिंपचे नेते श्री. अशोक सिंघल यांनी व्यक्‍त केली आहे. (हिंदूंनो, आता कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेवर विसंबून न रहाता स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा अन्यथा लवकरच धर्म बदलावा लागेल ! – संपादक)

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो सावधान!

राबोडी, ठाणे येथे कुराणाची प्रत पायदळी तुडवल्याच्या गैरसमजातून तणाव

दोषी (?) पोलीस हवालदार तडकाफडकी निलंबित !

केवळ मुसलमानांच्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत संवेदनशील असलेली व हिंदूंच्या श्रद्धास्थानांबाबत सनदशीर आंदोलन करणार्‍या धर्माभिमान्यांना ठेंगा दाखवणारी काँग्रेस हिंदूंवर राज्य करण्याच्या लायकीची आहे का ?
मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवतांना कुराणाची प्रत पायदळी तुडवल्याच्या गैरसमजातून आज सकाळी राबोडी (ठाणे) परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी वार्‍यासारखी पसरल्याने या परिसरात या घटनेचा निषेध करण्यासाठी काही काळ दुकाने बंद करण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचार्‍याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

(हीच तत्परता हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्‍याविरुद्ध पोलीस का दाखवत
नाहीत ? – संपादक)
वातावरण बिघडू नये, यासाठी परिसरात राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. राबोडी येथील तपासे नगरमधील जामा मशिदीत नमाजासाठी मुसलमानांची गर्दी होती. या मशिदीपासून काही अंतरावरच फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली होती. या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवतांना एका गाड्यावर धार्मिक पुस्तके विकणार्‍या पुस्तक विक्रेत्याला पोलीस कर्मचारी आजदे यांचा जोरदार धक्का लागला. त्यातच कुराणाची एक प्रत खाली पडली. त्यावर आजरे यांचा घाईगडबडीमध्ये पाय पडल्याची बातमी पसरली. त्यामुळे काही क्षणातच मशीद परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी हळूहळू दुकानेही बंद केली. त्यानंतर पोलीस आयुक्‍त अनिल ढेरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांची समजूत काढून त्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. आता तेथील परिसरातील परिस्थिती निवळली असून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस हवालदार आजदे यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.

`मराठी राजभाषा दिन’

`मराठी राजभाषादिना’च्या निमित्ताने मराठी भाषेच्या संदर्भातील उद्बोधक माहिती `सनातन’च्या संकेतस्थळावर उपलब्ध
 

आज २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हा दिवस `मराठी राजभाषादिन’ म्हणून महाराष्ट्रात पाळला जातो. या निमित्ताने `सनातन’च्या संकेतस्थळावर `मराठी भाषे’ची सध्याची स्थिती, त्यामागील कारणे व मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारे विविध लेख व माहिती `सनातन’च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचे वर्णन करतांना `अमृतातेही पैजा जिंके’ अशी उपमा दिली आहे; परंतु आज आपण मराठी भाषेला महाराष्ट्रातच अवकळा आलेली पाहतो. सध्या बहुतांश जणांचे मराठी संभाषण त्यांच्या प्रत्येक वाक्यात इंग्रजी शद्बांचा उल्लेख असल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. मराठीतून शिक्षण घेणे आज मागासलेपणा समजले जाते. प्रसारमाध्यमेसुद्धा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सर्रास इंग्रजी शद्बांचा उल्लेख करतांना आढळतात.


खरे पाहिले तर असुरांची तामसिक इंग्रजी भाषा, मानवांची सात्त्विक मराठी (संस्कृतोद्‌भव) भाषा व देवांची संस्कृत भाषा होय. मराठी भाषेचे मूळ संस्कृत भाषेत दडलेले असल्याने मराठी ही सर्व भाषांत सात्त्विक भाषा आहे. संगणकविश्‍वातही केलेल्या संशोधनानुसार मराठीचे माहितीमूल्य इंग्रजीहून अधिक आढळते. वर नमूद केलेल्या माहितीवर आधारीत बरेचसे लेख `सनातन’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी खालील मार्गिकेवर संपर्क साधा.

http://www.sanatan.org/marathivisheshank/marathibhasha
जेव्हा कुणी गुलामगिरी पत्करतो, तेव्हाच त्याचे निम्मे गुण त्याला सोडून जातात. स्वाभिमान हा त्या निघून जाणार्‍या गुणांचा म्होरक्या असतो. इंग्रजांना आम्ही आमचा देश, स्वाभिमान १५० वर्षांच्या गुलामगिरीत बहुतांशी विकला. देश सोडवला; पण स्वाभिमान व आमची भाषा अजूनही गहाण आहे. स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा एक पैलू आहे. आपली मायबोली मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिची अभिवृद्धी करणे, हे आपले कर्तव्य आहे, हे जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत मराठी वाढणे तर दूर, टिकणेही अशक्य आहे.

धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते शासनाला रक्‍ताने पत्रे लिहिणार

आता कायद्यासाठी दाभोलकरांनी सत्यनारायणाची पूजा घालावी !

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-02-25&action=fullnews&catid=1&id=17339

मराठी पाऊल अडते कुठे !

पक्षश्रेष्ठींच्या मर्जीसाठी तत्त्वांना तिलांजली देऊन सत्तेचे राजकारण करणारे नेते राष्ट्राचे हित काय साधणार ?

`मोडेन पण वाकणार नाही’, असा मराठी बाणा असलेला मराठी माणूस स्वाभिमान गहाण टाकून दिल्लीकरांची माफी मागतो, तेव्हा स्वाभिमानी मराठी माणसाला मान खाली घालावीशी वाटते. नारायण राणे यांनी `जय महाराष्ट्र’ व `स्वाभिमान’ या दोन शब्दांचे अर्थ बदलण्याचे महत्कार्य केले. शिवसेनेत अपमान होतो, म्हणून `स्वाभिमान’ दुखावलेले राणे काँग्रेसमध्ये म्हणजे अगदी भिन्न विचारसरणीच्या लोकांमध्ये डेरेदाखल झाले.

त्यांनी स्वाभिमानाचे भांडवल करून स्वबळावर ६ आमदार निवडून आणून काँग्रेसला मजबूत केले. स्वत:ला क्रमांक १ चा नेता ठरवण्यासाठी व मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी पुढे सरसावलेल्या राणे यांना काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी विरोध करायला सुरुवात केली. काँग्रेसने स्वार्थापुरते राणेंना वापरून, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांना हरवून त्यांनी केलेल्या बेताल विधानांमुळे त्यांना निलंबित केले. शिवसेनेत अपमान होतो; म्हणून दुखावलेले राणे काँग्रेसने निलंबित करूनही गप्प राहिले. अडीच महिन्यांनंतर आपण रागाच्या भरात भलतेच बरळलो, याचा साक्षात्कार त्यांना झाला व त्यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे माफीनामा देऊन टाकला. `स्वाभिमान’ या शब्दाचा अर्थही त्यामुळे बदलला.
ज्या काँग्रेसने राणे यांना निलंबित करून अपमानित केले, त्या काँग्रेसच्या विरोधात राणे दंड थोपटतील, असे वाटले; परंतु राणेंनी दाखवून दिले की, दंडाचा उपयोग थोपटण्यासाठी किंवा आव्हान देण्यासाठी नसून निष्ठेने काँग्रेसश्रेष्ठींसमोर हात जोडण्यासाठीच असतो. दिल्लीतील काँग्रेसवाल्यांची नीतीच अशी आहे की, महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना आपल्या स्वार्थापुरते वापरायचे आणि स्वार्थ साधून झाल्यावर अडचणीत टाकून द्यायचे. महाराष्ट्रातील इतर मोठे नेतेही अशा प्रसंगी दिल्लीकरांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. स्वत: मोठे न होता दिल्लीश्‍वरांची चाकरी करणार्‍या या काँग्रेसी नेत्यांना पाहून खेद होतो व वाटते, `मराठी पाऊल अडते कुठे !’
- श्री. शैलेश पारकर, मुलुंड, मुंबई.

 

  निगडीत वृत्त : वाचकांचे विचार

हिंदु जनजागृती समिती, शिवसेना व श्रीराम सेना यांची बदनामी करणारे संकेतस्थळ बंद !

मुंबई, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती, शिवसेना व श्रीराम सेना यांची बदनामी करून त्यांच्यावर बंदी घातली जाण्यासाठी काही हिंदुद्रोही तरुणांनी सुरू केलेल्या www.antihjsrs.co.in या संकेतस्थळाच्या मूळ पत्त्यावर आता हे संकेतस्थळ दिसत नाही. संबंधित गुन्हेगारांना अटक करण्यासाठी सायबर गुन्हे शाखेला समितीकडून अधिक माहिती देण्यात येणार आहे, असे समितीच्या संकेतस्थळ प्रतिनिधींनी सांगितले.

उपरोक्‍त हिंदुद्रोही संकेतस्थळ १५ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाकडून १७ फेब्रुवारी रोजी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या अधिकृत संगणकीय पत्त्यावर अज्ञात व्यक्‍तीने एक अश्लील व धमकीचे संगणकीय पत्र पाठवून सदर संकेतस्थळाबाबत कळवले होते. या पत्राची दखल घेऊन समितीचे सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी २० फेब्रुवारी रोजी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काल हे संकेतस्थळ सुरू करण्याची सुविधा देणार्‍या कोरिया येथील www.co.cc या संकेतस्थळाला समितीकडून हिंदुद्रोही संकेतस्थळ त्वरित बंद करण्याची विनंती करण्यात आली व त्याबाबत अन्य तपशीलही देण्यात आला. त्याचबरोबर कोरिया येथील समितीच्या एका हितचिंतकाला संबंधित संकेतस्थळाकडे निषेध नोंदवण्यास व हिंदुद्रोही संकेतस्थळ बंद करण्याची विनंती करण्यास समितीकडून सांगण्यात आले. त्यानंतर काही तासांतच हे संकेतस्थळ त्याच्या पत्त्यावर दिसत नसल्याचे समितीचे भारत व अमेरिका येतील प्रतिनिधी आणि कोरिया येथील हितचिंतक यांनी सांगितले. (कोरिया येथील संकेतस्थळाने हिंदूंच्या धर्मभावना जाणून काही तासांत हिंदुद्रोही संकेतस्थळ बंद केले. हिंदुबहुल भारतात हिंदूंना कधीतरी अशा तत्परतेचा सुखद अनुभव आला आहे का ? – संपादक)

हेच ते बंद पडलेले हिंदुद्रोही संकेतस्थळ !

हिंदुद्रोही संकेतस्थळाचे मुख्य केंद्र ठाणे !
समितीच्या संकेतस्थळ प्रतिनिधींनी या हिंदुद्रोही संकेतस्थळाविषयी अन्य माहितीचा शोध घेतल्यावर हे संकेतस्थळ ठाणे येथून बनवण्यात आल्याचे लक्षात आले.

हिंदुद्रोही `स्लमडॉग मिलीयनेर’ला ८ ऑस्कर : `स्माईल पिंकी’लाही ऑस्कर !

भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपटाला ऑस्कर म्हणजे हिंदुद्वेषाला पुरस्कार !

लॉस एंजिल्स (अमेरिका): जागतिक स्तरावरील चित्रपट समीक्षणात सर्वोच्च समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारांच्या ८१ व्या सोहळयात हिंदुद्वेष्ट्या व जगात भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या वादग्रस्त `स्लमडॉग मिलीयनेर’ला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

(`स्लमडॉग मिलीयनेर’ या हॉलीवूडपटाला ८ ऑस्कर पुरस्कार मिळाले असले, तरी या चित्रपटात हिंदूंना दंगलखोर ठरवण्यात आल्याने व भारताचे बीभत्स चित्रण करण्यात आल्याने या चित्रपटाला हिंदुत्ववादी व राष्ट्रप्रेमी यांचा विरोध कायम राहील ! अनेक शहरांत या चित्रपटाचे खेळ रद्द करण्यात आले आहेत, ही बाब जनमानसांतही या चित्रपटाबाबत नाराजी असल्याचे स्पष्ट करते. अशा हिंदु व भारत विरोधी चित्रपटाला मिळालेले विक्रमी ऑस्कर पुरस्कार नक्कीच काहीतरी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे स्पष्ट करतात ! – संपादक) त्याचबरोबर ४० मिनिटांचा उत्तरप्रदेशी लघुपट `स्माईल पिंकी’लाही सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ऑस्करने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑस्कर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ख्यातनाम संगीतदिग्दर्शक ए.आर्. रहमान यांना `सर्वोत्कृष्ट ओरीजनल स्कोर’ व `सर्वोत्कृष्ट गीत’ यांसाठी दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. एकाच वर्षी दोन बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बोएल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सायमन बिफॉय यांना `बेस्ट अँडॉप्टेड स्क्रीन प्ले’, अँथनी डॉड मँटल यांना `बेस्ट सिनेमॅटोग्राफी’, रिसूल पुकुट्टी यांना `बेस्ट साऊंड मिक्सिंग’ व क्रीस डीकन्स यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी रहमान यांनी हा पुरस्कार त्यांच्या आईला, तर रिसूल पुकुट्टी यांनी त्यांचा पुरस्कार भारताला अर्पण केला ! `स्लमडॉग मिलीयनेर’ या चित्रपटात श्रीरामाच्या नावाच्या घोषणा देत काही हिंदू मुस्लीम वस्तीत दंगल करण्यासाठी घुसत असल्याचा प्रसंग असून त्या वेळी तेथे एका श्रीरामाच्या रूपातील बहुरूप्याला दाखवण्यात आले आहे. या प्रसंगामुळे भारतातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकात भारतियांसाठी `डॉग’ हा शिवीवाचक शब्द वापरला आहे. (अन्य राष्ट्रांनी असे अपमानकारक शीर्षक खपवून घेतले असते का ? भारतात राष्ट्राभिमानी जागरूक नागरिकांचा अभाव असल्यानेच असे घडते ! – संपादक) चित्रपटात भारतातील सर्व अनैतिक व्यवसायांचे व बजबजपुरीचे दर्शन घडवण्यात आले आहे. (अन्य राष्ट्रांनी त्यांच्या देशातील अशी बजबजपुरी जागतिक स्तरावर दाखवण्याची परवानगी दिली असती का ? – संपादक) मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत मुसलमानांकडून चालणारे अनैतिक धंदे, मुसलमानांची गुन्हेगारी वृत्ती यांवर प्रकाश टाकणार्‍या प्रसंगांमुळे चित्रपट वास्तवदर्शी झाला आहे. `स्लमडॉग मिलीयनेर’ हा भारतीय कलाकार व भारतातील चित्रीकरण असलेला हॉलीवूडपट आहे, तर `स्माईल पिंकी’ हा अस्सल भारतीय चित्रपट असून तो उत्तरप्रदेशमधील दाबई गावात रहाणार्‍या व ओठांचे अपंगत्व असलेल्या एका मुलीवर बेतलेला आहे.

शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्याची पद्धत

शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्याची पद्धत

 

 

सनातनच्या साधिकेने बिल्वपत्राचे केलेले `सूक्ष्म-परीक्षण’

अनुक्रमणिका

More Details in English = http://www.hindujagruti.org/hinduism/festivals/mahashivratri/

 

;

भविष्यात प्रत्येक भारतियाच्या माथ्यावर ३० हजारांचे कर्ज !

राष्ट्र कर्जबाजारी, राज्यकर्ते मात्र कोट्यधीश !

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी – भारतातील ७७ टक्के लोकांची एका दिवसाची मिळकत जेमतेम २० रुपये एवढी आहे. देशातील ३० कोटी जनता दारिद्र्यरेषेखाली आहे. अशा गरीब भारतावर सत्ता गाजवणारे लोकप्रतिनिधी मात्र कोट्यवधी रुपयांची माया बाळगून आहेत. निम्मे राज्यसभा खासदार आणि एक तृतीयांशहून अधिक लोकसभा खासदार कोट्यधीश आहेत, अशी माहिती एका पाहणीत पुढे आल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

(असे लोकप्रतिनिधी मिळणे, हे भारतीय लोकशाहीचे अपयश आहे ! – संपादक) दुसर्‍या एका पाहणीत २०१० पर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ३० हजार रुपयांचे कर्ज असेल, असे स्पष्ट झाले आहे. (प्रचंड भ्रष्टाचार, सत्तांधता, निष्क्रीयता यांत आकंठ बुडालेले व कुठलीही समस्या सोडवण्याची धमक नसलेले षंढ काँग्रेसी राज्यकर्ते असल्यावर वेगळे काय होणार ? – संपादक) राज्यसभा आणि लोकसभा यांतील दहा खासदारांची एकूण संपत्ती १ हजार ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील हरलेल्या दहा उमेदवारांची एकूण संपत्ती ९ हजार ३२९ कोटी रुपये एवढी होती. खासदारांपेक्षाही ३० राज्यांतील विधानसभा आमदारांकडे अधिक श्रीमंती आहे. दीडशे कोट्यधीश आमदारांपैकी ५९ जण आयकरही भरत नाहीत. (लोकहो, येत्या निवडणुकीत या समस्त लोभी राज्यकर्त्यांना पराभूत करून राष्ट्राभिमान्यांचे सरकार आणा व लोभी राज्यकर्त्यांची बेहिशेबी मालमत्ता जप्‍त करण्याबरोबरच त्यांनी आजपर्यंत बुडवलेला कर त्यांच्याकडून व्याजासहित वसूल करून त्यांना कठोर शासन करा ! – संपादक)

 

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

मुसलमानांच्या विकासासाठी सच्चर आयोगाला सर्वप्रथम पाठिंबा राष्ट्रवादीचा – रा.रा. पाटील

हिंदूंनो, सच्चर आयोगाला पाठिंबा देण्यात पुढे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत हरवा !

मुसलमानधार्जिणी राष्ट्रवादी काँग्रेस !

मिरज, २० फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील मुसलमानांचा विकास होण्यासाठी त्यांना नोकरी व शिक्षण यांत आरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सच्चर आयोगाला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रा.रा. पाटील यांनी व्यक्‍त केले. गांधी चौक येथे राष्ट्रवादीच्या विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

(हिंदूंनो, निवडणुका डोळयांसमोर ठेवून सच्चर आयोगाचे समर्थन करणार्‍या व तुम्हाला कस्पटासमान लेखणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या निवडणुकीत धडा शिकवा ! – संपादक) या प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, गृहमंत्री जयंत पाटील, आमदार विलासराव शिंदे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, महापौर मैनुद्दीन बागवान, स्थायी समितीचे सभापती हरिदास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (सर्कस किंवा नाटक कंपनीप्रमाणे एकत्र फिरणारे लोकप्रतिनिधी ! विकासकामांच्या उद्घाटनासारख्या सामान्य कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहाण्याची काय आवश्यकता ? – संपादक) सदर सभा गांधी चौकातील भर रस्त्यातच घेण्यात आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. (जनतेच्या गैरसोयीचा थोडाही विचार न करणारी राष्ट्रवादी काँग्रेस जनहिताचे राज्य देईल का ? – संपादक)

 

  निगडीत वृत्त : मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे राजकारणी