भारताचे राष्ट्रपिता कोण ?

निसर्गनियमाप्रमाणे जगामध्ये अनेक राष्ट्रे निर्माण झाली. त्या राष्ट्रांच्या निर्मितीस तिथे रहिवास करणार्‍या कोणत्यातरी महापुरुषाचे प्रयत्‍न कारणीभूत असतात. त्यामुळे त्या महापुरुषाला राष्ट्रपिता म्हणण्यात येते. आपला देश भारत या पंक्‍तीत बसतो का, हे पहाणे उचित ठरेल; कारण आपल्या देशात मोहनदास गांधींना `राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली आहे. ३० जानेवारी रोजी त्यांच्या असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने याविषयाची चिकित्सा करूया !

लेखक : श्री. रामदास बिसन सोनार, बोदवड, जिल्हा जळगाव

लेखकाचा परिचय
श्री. रामदास बिसन सोनार एक प्रखर हिंदुत्ववादी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते कट्टर अनुयायी आहेत. `अभारतीय शब्दकोष’ या ग्रंथाचे ते लेखक आहेत. सनातनशी त्यांचे संबंध याच शब्दकोषाच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत.

१९४७ साली मिळवले ते स्वातंत्र्य नव्हे, तर अखंड हिंदुस्थानचे तुकडे !
भारताच्या इतिहासाप्रमाणे भारत अकराशे वर्षे मुसलमान व दीडशे वर्षे इंग्रजांशी संघर्ष करत राहिला. या संघर्षात येथील अनेक स्वाभिमानी भूमीपुत्रांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची व संसाराची राखरांगोळीही केली. अनेकांनी आत्माहुती देत हौतात्म्य स्वीकारले. शके १८६९ (सन १९४७) मध्ये या अखंड हिंदुस्थानचे हैद्राबाद, काश्मीर, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान व भारत असे पाच तुकडे करून या देशाला खंडित राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य मिळवले.

इंग्रज गेले, ते गांधींमुळे नव्हे, तर क्रांतीकारकांमुळे !
हे स्वातंत्र्य गांधींच्या अहिंसा, उपोषण व सत्याग्रह अशा चळवळींना घाबरून मिळाले, असेच चित्र आजही देशापुढे उभे करण्यात आले आहे. या अनुषंगाने हा देश सोडून जातांना हिंदुस्थानचे त्या वेळचे ब्रिटीश महाराज्यपाल (व्हाईसरॉय) लॉर्ड माऊंटबॅटन यांनी मुंबईच्या `गेटवे ऑफ इंडिया’जवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराला दिलेले उत्तर पहाणे उचित ठरेल. हा पत्रकार म्हणाला, “अखेर तुम्ही महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळीमुळे जात आहात.” त्यावर माऊंटबॅटन यांनी दिलेले उत्तर गांधींच्या अनुयायांनी जनतेसमोर कधीच येऊ दिले नाही. ते म्हणाले, `गांधींच्या अहिंसात्मक चळवळीमुळे नव्हे, तर क्रांतीकारकांमुळे हा देश सांभाळण्यास आम्ही असमर्थ आहोत. म्हणून हा देश सोडून जात आहोत.’

गांधींना आगाखान पॅलेस, तर टिळक-सावरकर यांना अंधारकोठडी !
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी एकटेच जिवाचा आटापिटा करून व सर्वस्वाचा त्याग करून लढले का ? केवळ त्यांच्याच संघर्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले का ? वीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे `हे भारतमाते, तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण ‘ अशी त्यागी वृत्ती कधी गांधीजींची होती का ? तर नन्नाचाच पाढा वाचावा लागेल. `गांधींवाचून कोणीही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्‍न केले नाहीत’, असे म्हणणे वेडेपणाचे ठरेल. गांधींनी जीवनभर संघर्ष करत असतांना शब्दांचे बुडबुडे भरपूर सोडले; पण स्वत:ला थोडेसेही खरचटून घेतले नाही. उलट त्यांच्या शब्दांच्या बुडबुड्यांपायी मुंबईला बाबू गेनू आणि नंदुरबारचा शिरीषकुमार यांसह काही बालके या स्वातंत्र्ययज्ञात बळी पडली आणि हुतात्मा झाली. गांधीपुरस्कृत आंदोलनाला इंग्रज घाबरत होते, असे कधीही दिसून आले नाही. आफ्रिकेच्या आंदोलनानंतर भारतात गांधींचे आणि इंग्रजांचे फार सख्य राहिले; म्हणून गांधींना इंग्रज लोक जेव्हा लाजेखातर अटक करत, तेव्हा त्यांना पुणे येथील शे-पाचशे सेवक असलेल्या भव्य आगाखान पॅलेसमध्ये ठेवत आणि मुदतपूर्व सोडूनही देत असत. याउलट वीर सावरकर, लोकमान्य टिळक व चाफेकर यांना इंग्रज घाबरत; म्हणूनच सावरकरांचा `१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच इंग्रजांनी त्यावर बंदी घातली होती. सावरकरांना अटक केली की, मोठे भयानक कारागृह किंवा अंदमानची काळकोठडी येथे ठेवण्यात येत असे, तसेच टिळकांना भारताबाहेरच्या कारागृहात ठेवले जात असे.

एके काळी हिंदुस्थान `जगद्‌गुरु’ म्हणून मान्यता पावला होता !
पिता या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाता. यावरून राष्ट्रपिता म्हणजे राष्ट्राला जन्म देणारा. `हिंदु’ या शब्दाला प्रखर विरोध असलेल्या गांधींनी खंडित केलेल्या या हिंदूंच्या हिंदुस्थानला जन्म दिला आहे का ? त्यांच्यापूर्वी हे राष्ट्र या भूतलावर अस्तित्वात नव्हते का ? या प्रश्‍नांची उत्तरे डोळसपणे पाहिल्यास हे राष्ट्र गांधींच्या आधी सहस्रावधी वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासात उदयास आलेले दिसून येते. एवढेच नव्हे, तर हे प्रगत राष्ट्र असल्यामुळे `जगद्‌गुरु’ म्हणूनही मान्यता पावलेले होते. चीन, ब्रह्मदेश इत्यादी परदेशांतील जनताही या देशातील नालंदा व तक्षशिला विद्यापिठांतून संस्कृतचे शिक्षण घेऊन जात असत. त्याच्या पूर्वीही चारही वेद, महाभारत, रामायण यांसारखे महान आणि जगन्मान्य ग्रंथांची निर्मिती येथेच झाली आहे. १० सहस्र वर्षांपूर्वीचा भूर्जपत्रावर लिहिलेला `ऋग्वेद’ लंडन येथील `इंडिया लायब्ररी’मध्ये आजही पहायला मिळतो. प्राचीन काळी या देशाला `आर्यावर्त’ म्हणत असत. नंतर भरत राजाचे साम्राज्य या संपूर्ण देशावर स्थापित झाले व या देशाला `भरतवर्ष’ व `भारत’ संबोधू लागले. त्यांपैकी भारत हे नाव आजपर्यंत अस्तित्वात आहे. तरीही त्या भरत राजाला कोणीही या देशाचा जन्मदाता म्हणजेच राष्ट्रपिता म्हणून संबोधत नाही.

आर्यावर्त हिंदुस्थान कसे झाले ?
पुढे पारसकडचे लोक या देशाशी व्यापारी आणि शैक्षणिक व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांचा प्रथम संपर्क येत असलेल्या सिंधू नदीवरून तिच्या काठावर रहाणार्‍या लोकांना त्यांच्या भाषेत `स’ नसल्यामुळे आणि `स’चे काम ते `ह’ने करून घेत असल्यामुळे (उदा. सप्‍ताहचे हप्‍ताह, सिंधूचे हिंदू) हिंदू म्हणून संबोधू लागले आणि पुढे या जीवनपद्धतीवरून या भूभागाला हिंदुस्थान म्हणण्यात येऊ लागले.

देशबांधवांना दिलेले वचन न पाळणार्‍या गांधींना सत्यवादी कसे म्हणता येईल ?
गांधींनी शके १८६४ (सन १९४२) मध्ये `भारत छोडो’ म्हणजे `क्विट इंडिया’ आंदोलन करायचे घोषित केल्याचे सावरकरांना कळले, तेव्हा त्यांनी त्वरित पुण्याच्या जाहीर सभेत सांगितले, “गांधीजी म्हणतात, एक आणि त्यातून निष्पन्न होते दुसरेच ! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेले आतापर्यंत कधीही दिसून आलेले नाही. म्हणून आता गांधीजींनी `भारत छोडो’ आंदोलन सुरू करण्याची घोषणा दिली. तेव्हा याचा विपर्यास `भारत तोडो’ म्हणजेच (`स्लिप्ट इंडिया’) `स्प्लिट इंडिया’मध्ये निष्पन्न होईल, याची जनतेने निश्चिती बाळगावी.” सावरकरांनी उच्चारलेली ही खोचक भविष्यवाणी ऐकून गांधींच्या हृदयात क्रोधाग्नी भडकला आणि त्यांनी सावरकरांच्या सभेच्या तिसर्‍या दिवशी मुंबईला आझाद मैदानावर सभा घेऊन देशातील जनतेला वचन दिले, `सावरकरांचे म्हणणे मला मान्य नाही. मी जिवंत असेपर्यंत या देशाचे विभाजन होऊन तुकडे होऊ देणार नाही. प्रसंगी आधी माझ्या देहाचे तुकडे होतील आणि नंतरच या देशाचे तुकडे होतील.’ त्यानंतरही शके १८६७ (सन १९४५) मध्ये या देशात झालेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या काँग्रेसने जनतेला आवाहन केले होते, `तुम्ही काँग्रेसला प्रचंड मतांनी निवडून द्या. आम्ही या देशाचे तुकडे होऊ देणार नाही.’ या आवाहनाला भुलून हिंदूंनी काँग्रेसला प्रचंड बहुमताने निवडून दिले. गांधींनी आणि त्यांच्या काँग्रेसने मात्र आपले वचन पाळले नाही आणि लॉर्ड माऊंटबॅटनच्या सांगण्यावरून त्यांनी काँग्रेसश्रेष्ठींची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सरदार वल्लभलाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी, डॉ. राधाकृष्णन, मदन मोहन मालवीय, जयप्रकाश नारायण, गोविंद वल्लभभाई पंत अशा चौदा मान्यवरांचा विरोध ठोकरून २९ विरुद्ध १५ अशा बहुमताने या देशाचे तुकडे करण्यास बहुमताने संमती दिली व तसा ठराव रातोरात करून सकाळी इंग्रजांच्या हातात ठेवला. अशा तर्‍हेने या देशाची चिरफाड करून त्याचे पाच तुकडे करून त्यातील एका भूभागाचे गांधी सत्ताधीश झाले.

वीर सावरकर, डॉ. आंबेडकर, आचार्य कृपलानी व इतर नेत्यांच्या देशहितकारक मागण्या फेटाळणारे गांधी !
या ठरावानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य कृपलानी, इतर काही नेते व देशातील जनतेच्या तीन मागण्या होत्या. मुसलमानांना पाकिस्तान दिले, तर हिंदुबहुल राष्ट्र असलेल्या भूभागाला जगभरात प्रचलित असलेले `हिंदुस्थान’ नाव राहू द्यावे, ही पहिली मागणी. हा हिंदूंचा हिंदुस्थान असल्यामुळे या देशाचा प्राचीन काळापासून असलेला भगवा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून त्याला मान्यता द्यावी, ही दुसरी; तर मुसलमानांसाठी वेगळे पाकिस्तान दिल्यामुळे पाकिस्तानातील सर्व हिंदूंना हिंदुस्थानात आणून येथील सर्व मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून द्यावे व मुसलमानांच्या सततच्या दंगे, मारठोक, जाळपोळ व लुटालूट या जाचातून हिंदूंना मुक्‍त करावे. या तीन मागण्या पदरात पाडून घेतल्यानंतर या देशाची फाळणी करावी. गांधींनी मात्र `हिंदू-मुस्लीम भाई-भाई आहेत’ म्हणून या मागण्या फेटाळून लावल्या. त्याची कारणे देतांना त्यांनी स्पष्टीकरण दिले की, `हिंदुस्थान या शब्दात केवळ हिंदु शब्द येत असल्यामुळे व या देशात २-३ कोटी का होईना, मुसलमान रहात असल्यामुळे या देशाला हिंदुस्थान न म्हणता भारत म्हणावे. भगव्या ध्वजात केवळ हिंदूंचा रंग असल्यामुळे त्याच्याऐवजी हिंदूंसाठी केशरी पट्टा, मुसलमानांसाठी हिरवा पट्टा आणि ख्रिश्‍चनांसाठी पांढरा पट्टा असलेला तिरंगाध्वज राष्ट्रध्वज राहील. तिसर्‍या मुद्याचे स्पष्टीकरण देतांना `हिंदू-मुसलमान भाई-भाई’ असल्यामुळे त्यांनी गुण्यागोविंदाने आणि आवडीप्रमाणे कुठेही रहावे आणि कुठेही जावे, म्हणून पाकिस्तानातून हिंदूंना भारतात आणा आणि येथील मुसलमानांना पाकिस्तानात पाठवा, हा प्रश्‍नच उपस्थित होत नाही, असे सांगून सावरकर, डॉ. आंबेडकर, आचार्य कृपलानी व इतर नेत्यांनी हिंदू हितासाठी सादर केलेल्या या तीनही मागण्या गांधींनी नाकारल्या आणि या देशाची फाळणी करून पाकिस्तानातील हिंदूंना लांडग्यांच्या तोंडी दिले. गांधींच्या या हट्टामुळे पाकिस्तानातील मुसलमानांनी लाखो सिंधी हिंदूंची आणि त्यांच्या बायका मुलांची हालहाल करून कत्तल केली. कित्येक हिंदूंना इस्लामपंथ स्वीकारायला लावला. अनेक हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार केलेत. एवढे अत्याचार हिंदूंवर होऊनही गांधींना त्याचे रतीभरही दु:ख झाले नाही. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी मुसलमानांच्या या दुष्कृत्याविरुद्ध साधा निषेधही व्यक्‍त केला नाही. उलट पाकिस्तानातून मार खाऊन भारतात आलेल्या हिंदूंना त्यांनी `तुम्हाला तिकडे मरण आले असते, तरी चालले असते. तुम्ही इकडे पळून यायला नको होते’, असा उपदेशाचा डोस पाजला !

फाळणीच्या वेळी हिंदु देशबांधवांना वाचवणारे फक्‍त रा.स्व. संघ व हिंदु महासभा !
फाळणीच्या वेळी गांधींच्या कृपेने पाकिस्तानात हिंदूंची अशी लांडगेतोड सुरू असतांना या खंडित भारतात सर्व गांधीवादी जनता आनंदोत्सव साजरा करत होती. केवळ सावरकरांच्या आदेशानुसार हिंदुमहासभेचे कार्यकर्ते आणि पू. गोळवलकर गुरुजींच्या आदेशावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आपल्या प्राणाची चिंता न करता आपल्या हिंदु बांधवांना वाचवून भारतात सुरक्षित पोहोचवण्यासाठी आटोकाट प्रयत्‍न करत होते.

भारतमातेची चिरफाड करून तिचे तुकडे तुकडे करणार्‍या गांधींना राष्ट्रपिता म्हणता येईल का ?
गांधींना या देशातील काँग्रेसच्या काही स्वार्थी लोकांनी या खंडित भारताचे राष्ट्रपिता म्हणून मान्यता दिली. तसा प्रचार आणि प्रसार करत हे गांधीवादी लोक त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे उभारून, गावागावांतील चौकांना त्यांचे नाव देऊन, चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र छापून त्यांचे खोटे अवडंबर माजवत आहेत. `या भारताचे निर्माते नि उद्धारकर्ते महापुरुष एकमेव गांधीच आहेत’, असा भ्रम येथील शासनकर्त्यांना झालेला दिसून येत आहे. नवलाची गोष्ट म्हणजे ज्या गांधींना त्यांच्या स्वत:च्या मुलांनीही कधी पिताजी म्हणून हाक मारली नाही, त्यांना आज भारतातील जनता राष्ट्रपिता म्हणून संबोधते ! वास्तविक जन्म न देता अवयव छाटून टाकणार्‍याला पिता म्हणून संबोधणारे लोक भारतभूमीतच आढळतात, हे या देशाचे महान दुर्भाग्य म्हणावे लागेल. इतर देशात असे होणे नाही !

या देशाचा राष्ट्रपिता कोणी होऊ शकला नाही आणि यापुढेही कोणीही होऊ शकत नाही. !
जगाच्या पाठीवर माता म्हणून संबोधण्यात येणारा भारत हाच एकमेव देश आहे. अशा वंदनीय भारत मातेला तिचे अवयव तोडून घायाळ करण्याचे षडयंत्र रचण्यात गांधीजींचीच प्रमुख भूमिका होती, याला इतिहास साक्षी आहे. निदान या देशाच्या इतिहासाची जाणीव असणार्‍या सुज्ञ नागरिकांनी `या देशाचा राष्ट्रपिता कोणी होऊ शकला नाही आणि यापुढेही कोणीही होऊ शकत नाही’, याचे भान ठेवावे हे श्रेयस्कर ! गांधींजींची निर्मिती म्हणजे पाकिस्तान. तेव्हा गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता न म्हणता पाकिस्तानचेच राष्ट्रपिता म्हणणे उचित होईल !

निगडीत वृत्त : गांधी खरोखरंच राष्ट्रपिता होते का?

`स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपट पाहून धर्मद्रोही केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम भारावले !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना पाहून सुखावणारे असुरांचे वंशज काँग्रेसवाले !

हिंदूंनो, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या धर्मद्रोहाबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या काँग्रेसवाल्यांना भेटतील तिथे जाब विचारा !

चेन्नई, २४ जानेवारी (प्रे.ट्र.) – झोपडपट्टीत राहणार्‍या युवकांकडे व्यवसायाच्या अनेक कल्पना आहेत, त्यामुळे ते द्रारिद्र्यातून श्रीमंतीकडे झेप घेऊ शकतात हे `स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटात उत्कृष्टपणे दाखवले आहे. अशा लोकांकडे आपण पोहोचून त्यांना मदत केली पाहिजे, असे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.

(या चित्रपटात दाखवलेला हिंदुद्वेष्टेपणा श्री. पी. चिदंबरम यांना दिसला नाही कि काँग्रेसी धर्मद्रोहाचा चष्मा त्यांनी घातला आहे ? – संपादक) मुंबईमधील धारावी झोपडपट्टीतील युवकांकडेही व्यवसायासंबंधी अनेक नविन कल्पना आहेत. अशा युवकांकडे सरकारी व समाजसेवी संघटनांनी पोहोचावे. (गृहमंत्र्यांना हे कळायला `स्लमडॉग मिलेनियर’ सारखा हिंदुद्वेष्टा चित्रपट पहावा लागला, हे भारताचे दुर्दैव ! – संपादक) शिक्षणातील पदव्या हा युवकांतील हुशारीचा मापदंड नसावा. झोपडपट्टीतील अनेक युवकांकडे व्यवसायाच्या कल्पना आहेत व ते व्यवसायात जोखीम घ्यायला तयार असतील, तर त्या व्यवसायाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बँकांनी त्यांना अर्थसाहाय्य करावे, असा सल्ला `स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपट पाहून प्रभावित झालेल्या भारताच्या गृहमंत्र्यांनी बँकांना दिला. `स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो सर्वांनी पहावा अशी विनंती पी. चिदंबरम यांनी शेवटी केली. (`स्लमडॉग मिलेनियर’ या हिंदुद्वेष्ट्या चित्रपटाच्या विरोधात देशभर होणारा विरोधही पी. चिदंबरम यांनी पहावा व नंतर चित्रपटाविषयी भाष्य करावे ! – संपादक)
गृहमंत्री श्री. पी. चिदंबरम एका बिगर सरकारी न्यासाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

श्रीरामाचे विडंबन असलेल्या `स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाच्या विरोधात हिंदू संतप्‍त !

हिंदु जागा होतोय, याची चुणूक म्हणजे जळगाव, पणजी व मुंबई येथील स्फूर्तीदायी निदर्शने !

* हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाला सुरुवात * दादर येथे समितीची निदर्शन

मुंबई, २३ जानेवारी (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेले भगवान श्रीराम व भारतीय संस्कृती यांची प्रतिमा मलीन करून गल्ला भरू पहाणार्‍या `स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटावर त्वरित बंदी आणावी, या मागणीसाठी आज हिंदु जनजागृती समिती, मुंबईतर्फे दादर (पू.) रेल्वेस्थानकानजीक निदर्शने करण्यात आली.

`स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! बहिष्कार घाला !!

या चित्रपटात एका लहान मुलाला श्रीरामाच्या वेशात दाखवण्यात आले आहे. जमाल मलिक हा चित्रपटातील नायक त्या श्रीरामाला पाहून मरणाच्या भीतीने पळत सुटतो. अशा प्रकारे जाणीवपूर्वक श्रीरामाला मुसलमानांना ठार करणारा, असे दर्शवण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे. त्यासाठी १९९२-१९९३ या मुंबईतील जातीय दंगलीचा संदर्भ देण्यात आला आहे. तसेच या प्रसंगामुळे मुंबईत हिंदू मुसलमानांना ठार करतात, असे खोटे दाखवण्यात आले आहे. या सर्व प्रकारांमुळे हिंदु व मुसलमान या दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचू शकतो, असे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे व रायगड या जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी सांगितले. यासंबंधी समितीच्या संकेतस्थळावरही दोन दिवसांपासून निषेधाची चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्यावर जगभरातील हिंदू या चित्रपटाच्या विरोधात संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत आहेत, असेही श्री. वटकर म्हणाले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनपर फलक हाती घेऊन शांततेत निदर्शने केली. निदर्शनस्थळी तब्बल २५ पोलिसांचा फौजफाटा होता.

संतप्‍त हिंदू `स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाचे नायक श्री. अनिल कपूर यांना त्यांच्या anil@anilkapoor.net इ-पत्रावर व http://www.anilkapoor.net/html/index.html# या त्यांच्या संकेतस्थळावर निषेध नोंदवत आहेत.

पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्‍त यांना तक्रार दाखल
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक व मुंबईचे पोलीस आयुक्‍त यांच्याकडे आज हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी `स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा प्रथम खेळ वडाळा येथील `आयमॅक्स’ या चित्रपटगृहात लावण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर समितीच्या सदस्यांनी हे चित्रपटगृह ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, त्या वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून हा खेळ होऊ देऊ नये, अशी मागणी केली. या वेळी येथील साहाय्यक पोलीस आयुक्‍त श्री. बाविस्कर व पोलीस उपायुक्‍त श्री. पांडुरंग शिंदे यांनी या प्रकरणी समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, शिवसेनेचे उपशाखाप्रमुख श्री. शैलेश भेस्के, सनातन संस्थेच्या कु. अरुणा घाडी आदी उपस्थित होते. या वेळी या पोलीस अधिकार्‍यांनी समितीचे निवेदन चित्रपटगृहाचे मालक व सरकार यांना देऊ, असे आश्‍वासन दिले. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या विरोधात तीन दिवसांपूर्वी हिंदु जनजागृती समितीतर्फे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मंडळाच्या विभागीय अधिकार्‍यांनी समितीचे म्हणणे मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती शर्मिला टागोर यांच्यापर्यंत पोहोचवू, असे सांगितले.

मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचे खेळ सुरू
आज मुंबईतील काही चित्रपटगृहांत हा खेळ दाखवण्यात आला. येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भोईवाडा येथील `धरती’ या छोट्या चित्रपटगृहालाही पोलिसांनी कडक सुरक्षाव्यवस्था पुरवली होती. (हिंदूंनो, हिंदुद्रोही व भारतद्वेषी चित्रपटाला संरक्षण पुरवणारे पोलीस व चित्रपटाला पाठिशी घालणारे राज्यकर्ते यांना येत्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा ! – संपादक)

`स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंमध्ये संताप; चित्रपटाला विरोध करण्याचा निर्धार !

`स्लमडॉग मिलेनिअर’ या धर्मद्रोही चित्रपटात हिंदूंचे आराध्यदैवत प्रभू श्रीराम व हिंदु समाजाविषयी बदनामी करणारी दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे हिंदूंमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. या चित्रपटात दंगलीमध्ये हिंदू मुसलमानांना ठार मारत असल्याचे दाखवल्यामुळे हिंदु व मुसलमान या दोन समाजांत जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे. या चित्रपटाच्या विरोधामध्ये हिंदु जनजागृती समितीतर्फे सनदशीर आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करत राज्यभरामध्ये विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करणे, निदर्शने व धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत. या चित्रपटाच्या विरोधात हिंदु धर्माभिमानी उद्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सस्नेह नमस्कार

`स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपट थांबवण्यास `सेन्सॉर’चा नकार

हिंदूंच्या भावनांचा अनादर करून हिंदुद्रोही चित्रपट थांबवण्यास नकार देणार्‍या `सेन्सॉर’ मंडळाचा धिक्कार !

मुंबई, २१ जानेवारी (वार्ता.) – प्रभु श्रीरामचंद्र व भारतीय संस्कृती यांचे विडंबन करणारा `स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला दिले होते. या निवेदनानुसार आज हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ व मंडळाचे विभागीय अधिकारी श्री. विनय आझाद यांच्यात चर्चा झाली; मात्र चित्रपटाला आधीच प्रमाणपत्र देण्यात आले असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास असमर्थ असल्याचे श्री. आझाद यांनी सांगितले.

(मुसलमानांनी अशा प्रकारची तक्रार आणली असती तर त्यांना असे उत्तर देणे शक्य झाले असते का ? हिंदूंच्या भावनांची किंमत केली जात नाही, ही वस्तूस्थिती अजून किती दिवस टिकणार आहे ? – संपादक) या चित्रपटात हिंदु-मुस्लीम दंगल घडतांना एका लहान मुलाला श्रीरामाच्या वेशात दाखवले आहे. जमाल हा चित्रपटाचा नायक त्या श्रीरामाला पाहून मरणाच्या भीतीने पळत सुटतो, असे यात दाखवले आहे. या दृश्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, तसेच हिंदू मुसलमानांवर अत्याचार करत आहेत, असे एकांगी दाखवले आहे. संपूर्ण चित्रपटात भारत म्हणजे गरीबी, दंगली, वेश्याव्यवसाय, अशा प्रकारचे बीभत्स वर्णन दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी समितीने या चर्चेदरम्यान केली. (भारताची प्रतीमा जगभरात डागाळणार्‍या चित्रपटाला प्रमाणपत्र देणार्‍या केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचा हा हिंदुद्रोह व राष्ट्रद्रोहच म्हणावा लागेल. हा चित्रपट बंद पाडण्यासाठी भारतीय राज्यकर्ते काही करतील काय ? – संपादक) श्री. आझाद यांनी सांगितले, “एका पुस्तकावर आधारलेले हे काल्पनिक कथानक आहे. हा माहितीपट (डॉक्युमेंट्री) नसल्याने दंगलीच्या दरम्यानच्या सर्वच गोष्टी दाखवलेल्या नाहीत. इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये दंगलीच्या बाबतीत चित्रण केलेले असते. रामाचा अवमान होईल, अशा स्वरूपातील हे दृश्य नाही, त्यामुळे परीक्षण मंडळाने इंग्रजी चित्रपटाला `अ’ प्रमणापत्र (फक्‍त प्रौढांसाठी) व हिंदी चित्रपटाला `यु/अ’ प्रमाणपत्र (१२ वर्षांपुढील दर्शकांसाठी व १२ वर्षांखालील मुलांना पौढांसोबत) दिलेले आहे. आता मंडळाने हे प्रमाणपत्र दिले असल्याने आम्ही चित्रपट प्रदर्शन थांबवू शकत नाही”, असे त्यांनी सांगितले. अध्यात्मशास्त्रानुसार चित्रपटातील श्रीरामाचे चित्रीकरण चुकीचे असून त्यामुळे श्रद्धेला तडा जाणार आहे, असे समितीने श्री. आझाद यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकारी मंडळात हे निवेदन चर्चेसाठी ठेवण्याचे आश्‍वासन दिले; मात्र चित्रपटाचे प्रदर्शन थांबवणे मंडळाच्या हातात नसून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय किंवा न्यायालयीन आदेशाद्वारेच हा चित्रपट थांबू शकेल, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. समितीच्या शिष्टमंडळात सर्वश्री शिवाजी वटकर, अनित पिंपळे व सौ. वर्षा ठकार यांचा समावेश होता. समितीचे सदस्य सौ. पौर्णिमा प्रभू व श्री. मोहन गौडा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने `कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स बंगळुरू’ आणि `फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड कर्नाटक’ यांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी निषेधपत्र दिले आहे. तसेच समितीच्या संकेतस्थळावरही या चित्रपटाच्या विरोधात निषेध मोहीम सुरू आहे. धर्माभिमानी पुढील पत्त्यावर निषेध नोंदवत आहेत.
पत्ता : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, भारतभुवन, ९१ इ, वाळकेश्‍वर रोड, मुंबई ६.
संपर्क : दू.क्र. : (०२२) २३६९ ९२५५, २३६२ ५७७०
फॅक्स : २३६९ ००८३
इ-मेल : aocbfcmum@rediffmail.com

`स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटात प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन व हिंदूंचा अवमान !

मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – `स्लमडॉग मिलेनिअर’ या आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटातून हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन करण्यात आले आहे.

(हिंदु त्यांच्या देवता व धर्म यांबद्दल उदासीन असल्याने कोणीही त्यांच्या देवता व धर्म यांचे सहज विडंबन करू धजावतात. मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करण्याची हिंमत कोणात आहे का ? – संपादक) या चित्रपटात प्रभु श्रीरामचंद्रांना विद्रुप स्वरूपात दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात `भारतात हिंदु मुसलमानांवर अन्याय करतात’ असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. (आंतरराष्ट्रीय पातळीवर सहिष्णू हिंदूंची प्रतीमा जाणूनबुजून खराब करण्याचे षडयंत्र यशस्वी करणार्‍यांचे पितळ उघडे पाडणारा एकही मायचा लाल अस्तित्वात नाही का ? हिंदुत्ववादी संघटना याबाबत काय करणार आहेत ? – संपादक) या संपूर्ण चित्रपटात केवळ भारतातील दारिद्र्याचेच प्रदर्शन करण्यात आले आहे. याबाबत जगभरातील धर्माभिमानी हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या चित्रपटाच्या विरोधात सर्वत्र निषेधाचे सूर उमटत आहेत व या चित्रपटाचे प्रदर्शन त्वरित थांबवावे व चित्रपट निर्मात्याने सर्व हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. हा चित्रपट भारतात २३ जानेवारी रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. (प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन करणार्‍या व हिंदूंचा अवमान करणार्‍या या चित्रपटाचा जाहीर निषेध ! – संपादक) विशेष म्हणजे या चित्रपटास आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. याबाबत हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील http://www.hindujagruti.org/news/6162.html या मार्गिकेवर विस्तृत माहिती उपलबध आहे. समितीच्या संकेतस्थळावर याबाबत निषेध व्यक्‍त करण्यात आला आहे. संकेतस्थळाला भेट देणार्‍या हिंदूंनी या चित्रपटाचे भारतात होणारे प्रदर्शन थांबवावे व चित्रपटाच्या निर्मात्यांनी समस्त हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धर्माभिमानी पुढील पत्ता व संपर्क क्रमांक यांवर निषेध नोंदवत आहेत.
फॉक्स सर्चलाईट पिक्चर्स, १०२०१ पिको ब्लव्ह्ड, लॉस एंजलिस सीए ९००३५, अमेरिका दूरध्वनी : ३१०-३६९-२४३१

हिंदु जनजागृती समितीचे चित्रपट परीनिरीक्षण मंडळास निवेदन
मुंबई – लाखो हिंदूंच्या व भारतियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने `स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाला भारतामध्ये दाखवण्यास प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला केली. हिंदु जनजागृती समितीतर्फे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला याबाबतचे निषेधपत्र देण्यात आले. समितीच्या महिला आघाडी प्रमुख सौ. वर्षा ठकार, संकेतस्थळ प्रतिनिधी श्री. अनित पिंपळे व समितीचे मुंबई समन्वय श्री. शिवाजी वटकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या सचिव श्रीमती विजया यांच्याबरोबर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आज चर्चा केली. उद्या या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी विभागीय अधिकारी श्री. विनय आझाद यांनी शिष्टमंडळास बोलावले आहे. या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मिला टागोर यांनाही हे निवेदन दाखवून उद्या या संदर्भात शिष्टमंडळाला माहिती देण्यात येईल. हिंदु जनजागृती समितीतर्फे हिंदु धर्माभिमान्यांना व राष्ट्राभिमान्यांना त्यांनी या चित्रपटाला विरोध करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

धर्माभिमानी पुढील पत्ता व संपर्क क्रमांक यांवर निषेध नोंदवत आहेत.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, भारतभुवन, ९१ इ, वाळकेश्‍वर रोड, मुंबई ६.
दू.क्र. व फॅक्स : (०२२) २३६२ ५७७०, २३६९ ९२५५

`स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील आक्षेपार्ह प्रसंग व दृश्ये
या चित्रपटातील कथानकात जमाल मलिक हा मुंबईतील झोपडपट्टीत रहाणारा तरुण मुलगा या खेळामध्ये विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन कोट्याधीश होतो, असे दाखवण्यात आले आहे. त्यात `प्रभु श्रीरामाने उजव्या हातात काय पकडले आहे ? असा एक प्रश्‍न सूत्रसंचालक असलेला अनिल कपूर जमालला विचारतो. त्या वेळी जमालला त्याच्या बालपणी झालेली दंगल आठवते त्यात हिंदु मुसलमानबहुल भागात हल्ला करतात व `ते पहा मुसलमान, त्यांना पकडा’, अशा घोषणा देत ते मुसलमानांवर हल्ला करतात व मुसलमान सैरभैर होऊन पळतात. एक हिंदु जमालच्या आईच्या डोक्यावर लोखंडी दांडा मारतो व तिची हत्या करतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तेथून पळ काढतात. पळतांना ते एका छोट्याशा बोळात शिरतात. तेथे त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेला एक लहान मुलगा दिसतो. जमाल त्याला बारकाईने न्याहाळतो. तेव्हा त्याला त्या मुलाच्या उजव्या हातात धनुष्य दिसतो. नंतर ते मार्ग बदलतात, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. (हिंदूंनो, या चित्रपटाच्या विरोधात जोरदार आवाज उठवा व हिंदु मुसलमानांवर नव्हे, तर मुसलमान हिंदूंवर अन्याय करतात, हे सिद्ध करून दाखवा ! – संपादक) प्रभु श्रीरामचंद्रांसारखी वेशभूषा केलेला तो मुलगा अतिशय भयानक दाखवण्यात आलेला आहे. चित्रपटात त्याच्या चेहर्‍यावर दाखवण्यात आलेले हावभाव व स्थिती अत्यंत विद्रुप आहे. प्रभू श्रीराम उजव्या हातात लोकांना मारण्यासाठीच धनुष्य घेऊन उभे आहेत, असे या दृश्यातून प्रतीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात भारत हा चोरट्यांचा व अमेरिका हा मानवतावाद्यांचा देश आहे, असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

बेळगावचे राजकारण !

स्वत:च्या सोयीप्रमाणे न्यायालयाचा दाखला देणारे शरद पवार मराठी जनतेला न्याय काय मिळवून देणार ?

विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेदामुळे राजकीय वातावरण तापले असतांनाच परवा शिवसेनेने भाजपबरोबर असलेली युती तोडण्याचा इशारा दिला आहे, तर भाजपने हा निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेनेला असल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे हा वाद अधिकच ताणला गेला आहे. या नव्या वादाचे कारण आहे, बेळगावमधील मराठीजनांवर कर्नाटकमधील भाजपच्या येड्डीयुरप्पा सरकारकडून होणारा अन्याय !

बेळगाव प्रश्‍नावर काँग्रेसची निष्क्रीयता
बेळगाव प्रश्‍नाबाबत लिहितांना प्रथम महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात डोकावून पहाणे क्रमप्राप्‍त ठरते महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी मराठी जनतेला मोठा लढा द्यावा लागला. सुमारे साडेतीन कोटी जनतेने त्यासाठी जिवाची बाजी लावून `मुंबईसह कारवार, बेळगाव-निपाणीसह संयुक्‍त महाराष्ट्र झाला पाहिजे’, अशी मागणी लावून धरली. जनतेच्या या प्रयत्‍नातून बेळगाव व कारवार महाराष्ट्राला मिळाले नसले, तरी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या प्रश्‍नाकडे तितक्या पोटतिडकीने न पाहिल्याने राज्याच्या निर्मितीनंतर गेली ४८ वर्षे हा प्रश्‍न खितपत पडला आहे. महाराष्ट्रनिर्मितीच्या वेळी यशवंतराव चव्हाणांनी `आपण देवाणघेवाण केली पाहिजे’, असे मत मांडून या वेळी डांग, बेळगाव, कारवार निपाणी हे भाग अन्य राज्यांना देऊन टाकले; मात्र मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच घेतले नाही. उलट ते म्हणाले, `धाकट्या भावाची सोय मोठ्या भावाने पाहिली पाहिजे.’ या प्रश्‍नावर विधिमंडळात आवाज उठवतांना तत्कालीन आमदार प्र.के. अत्रे म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांची भूमिका आपल्याला तत्त्वत: मान्य आहे; मात्र ही सोय केव्हा केली पाहिजे ? बाप मेला असेल, तर धाकट्या भावाची सोय मोठ्या भावाने पाहिली पाहिजे; परंतु आपला दिल्लीचा बाप जिवंत आहे. तेव्हा त्याला आपण सांगितले पाहिजे की, तुम्ही जिवंत आहात.”
महाराष्ट्राने राष्ट्रहित साधतांना नेहमीच स्वत:ला मोठा भाऊ समजून लहान भावाचा विचार केला आहे; मात्र मोठ्या भावाचा हा त्याग लहान भाऊ केव्हा समजणार ? उलट लहान भाऊ महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय करून आपला कृतघ्नपणा दाखवत आला आहे. त्याचे परिणामही मराठी जनता भोगत आहे. ४९ वर्षांनंतरही बेळगाव प्रश्‍न भिजत घातलेल्या घोंगड्याप्रमाणे तसाच पडला आहे. मराठीजनांना मारहाण करणे, त्यांच्यावर कन्नड भाषेची सक्‍ती करणे, मराठी संस्कृती चिरडणे हे अन्याय त्या वेळी बेळगावमध्ये मराठी जनतेवर झाले व ते आजही होत आहेत. फक्‍त माणसे बदलली, हाच काय तो फरक !

युतीच्या भांडणात काँग्रेसला फायदा नको !
या लढ्यात शिवसेनेची भूमिकाही मोठी आहे. शिवसेनेचा जन्मच मुळात मराठीजनांच्या हितासाठी झाल्याने या सीमावादात शिवसेना बेळगावमधील मराठी जनतेच्या ठामपणे पाठीशी उभी राहिली आहे. पूर्वी कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांचे सरकार होते. त्यामुळे मराठी जनतेच्या भावना ते समजू शकले नाहीत. भाजप सत्तेत आल्यास तो या प्रश्‍नाबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावेल, असे वाटले होते; मात्र कर्नाटकात भाजप सत्तेत आल्यानंतरही मराठी जनतेवरील अन्याय दूर झाले नाहीत. याचा प्रत्यय मागील दोन दिवसांपासून येत आहे. बेळगावमध्ये मराठीजनांचा महामेळावा आयोजित केला होता. हा मेळावा दडपण्यासाठी कर्नाटकातील भाजपच्या येड्डीयुरप्पा सरकारने मराठी जनतेवर पोलिसांकरवी अमानुष लाठीहल्ला केला. हा मेळावा होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रातील भाजपशी युतीचे नाते ताणले जाऊन हे नाते तोडण्याचा इशाराच शिवसेना नेत्यांनी भाजपला दिला. यामुळे ही युती तुटण्याची वाट पहाणार्‍या संधीसाधू काँग्रेसला व तथाकथित निधर्मीवाद्यांना आनंदाच्या उकळया फुटल्या असतील, हे मात्र नक्कीच !
काँग्रेसने या देशाच्या सीमांचे रक्षण केले नाही. उलट आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशांतर्गत प्रांतीय व जातीय वाद निर्माण करून ते कसे पेटत रहातील, हेच पाहिले आहे; मग तो काश्मीर प्रश्‍न असो वा बेळगावचा प्रांतीय वाद असो. काँग्रेसने काश्मीर प्रश्‍नातून मुसलमानांना, तर प्रांतीय प्रश्‍नातून परप्रांतियांना खूष करून मते मिळवण्याचा प्रयत्‍न चालू ठेवला आहे. `बेळगाव प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहायला हवी’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. एरवी स्वहिताचे निर्णय घेतांना न्यायालयाचे आदेशही धाब्यावर बसवण्याचे वा कायद्यात बदल करण्याचे धाडस काँग्रेस सरकारकडून दाखवले जाते. त्यामुळे बेळगाव प्रश्‍नाबाबत शरद पवार यांनी न्यायालयाकडे बोट दाखवणे, ही केवळ ढोंगबाजी आहे. मुळात काँग्रेसला बेळगाव प्रश्‍न सोडवण्यात स्वारस्य नाही, हेच गेली साडेचार दशके दिसून आले आहे. काँग्रेसच्या या स्वार्थापायी हिंदुत्वाचा व मराठीचा बळी जात आहे. `मराठी’ आणि `हिंदुत्व’ या दोन्ही गोष्टींशी आपल्या आस्था जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने बेळगावमधील मराठीचा प्रश्‍न सोडवतांना हिंदुत्वाला बाधा येणार नाही, हे पहाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भाजप व शिवसेना यांनी हा प्रश्‍न एकत्रित येऊन सोडवायला हवा व त्यासाठी केंद्रातील काँग्रेस सरकारवर दबाव आणायला हवा.

निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिध

हिंदूंवरच हल्ला करणारे हिंदु राज्यकर्ते !

मुसलमानांना जिहादचे तत्त्वज्ञान देण्याचे स्वातंत्र्य; मात्र हिंदूंना भगवद्‍गीतेची शिकवण देण्यास नाकारणारे शासन !

३७० कलमामुळे काश्मीरबाहेरील हिंदूंना काश्मीरचे नागरिकत्व मिळत नाही. मालमत्ता धारण करता येत नाही. काश्मीरचा मुख्यमंत्री मात्र भारतात कोठेही मालमत्ता घेऊ शकतो. फाळणीच्या वेळी जे हिंदू काश्मीरमध्ये आश्रयाला गेले, त्यांना आजपर्यंत मतदानाचा हक्क मिळालेला नाही. सीमेवरील एका राज्यात ज्यांना भारताविषयी मातृभूमीची भावनाही नाही, अशा मुसलमानांची अनिर्बंध अत्याचारी बहुसंख्या रहावी आणि हिंदु औषधाला सापडू नये, अशी व्यवस्था भारताचा पंतप्रधान आपल्या हाताने करतो, हे जगातले सगळयांत मोठे आश्चर्य आहे.

लेखक : ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी

हिंदु संस्कृतीवर अन्याय करून इस्लामी संस्कृतीला संरक्षण देणे, हे कर्तव्य मानणारे भारतीय संविधान !
पाकिस्तान भारतावर हल्ला करते आणि मग हल्ला केल्याचा पुरावा मागते. पुढचा भारताचा बराच काळ, पुरावे देऊनही ते पाकिस्तान मानीत नाही, हे जगाला पटवण्यात जातो. तोपर्यंत नव्या हल्ल्याची सिद्धता पाकिस्तानने सुरू केलेली असते. हल्ला केला; म्हणून पाकिस्तानला शिक्षा क्वचित होते. पाकिस्तानला शिक्षा व्हावी, अशी लोकांची इच्छा असते; पण राज्यकर्ते शिक्षा देत नाहीत आणि शिक्षा दिली जावी; म्हणून सत्तेवर नसलेले आणि असलेले राजकीय पक्ष पुरेसा दबाव निर्माण करत नाहीत. याचा अर्थ आपली राजकीय व्यवस्था खूपच सदोष आहे. पाकिस्तानचे आणि भारतातील पाकिस्तानी मनोवृत्तीचे पारिपत्य करण्याइतकी ती पुरुषार्थी नाही. राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद याचे जे निकष पाश्चात्त्य राष्ट्रांनी ठरवले आहेत, त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने भारताची राजकीय व्यवस्था मार्गक्रमण करत आहे. भारताच्या संविधानात त्याचे प्रतिबिंब पडले आहे. इस्लामी संस्कृती आणि हिंदु संस्कृती यांच्या संघर्षात हिंदु संस्कृतीवर अन्याय करून इस्लामी संस्कृतीला संरक्षण देणे भारतीय संविधान आपले कर्तव्य आहे असे मानते, असे वाटायला जागा आहे. प्रत्यक्ष उदाहरणाने पडताळा घेऊ.
मुसलमानांना शाळांतून कुराण शिकवण्याचे स्वातंत्र्य, तर श्रीमद्‌भगवतगीता
शिकवण्यास शासनाचा असहकार !

संविधानातील तिसावा अनुच्छेद शिक्षणाविषयीचा आहे. इंग्रजांच्या राज्यात मेकॉलेने सांगून सवरून अशी शिक्षणपद्धती लागू केली की, तिच्याने संस्कारित झालेले प्रजाजन केवळ वर्णाने हिंदु असतील अन्यथा संस्कृतीने ते ख्रिस्तीझालेले असतील. त्यामुळे पारतंत्र्यात हिंदूंवर ख्रिस्तीसंस्कृतीचे झालेले दुष्परिणाम पुसले जाऊन स्वतंत्र भारतात हिंदु संस्कृतीच्या अस्तित्वाला आणि विकासाला बाधा पोहोचवण्यास प्रोत्साहन मिळणार नाही, अशी काळजी घटना समितीने घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात घडले ते असे की, हिंदूंना संशयित ठरवून मेकॉलेच्या जोडीला मुल्लामौलवींना बसवून त्यांची सेवा करण्यासाठी राज्यकर्त्यांची धडपड चालली आहे, असे वाटावे. अल्पसंख्यांकांना त्यांच्या धर्माचे शिक्षण देणार्‍या शाळा काढायला सरकार प्रोत्साहन देते. त्यांच्या धार्मिक मतांवर रचलेला अभ्यासक्रम त्यांना लागू करता येतो. नोकरचाकर नेमतांना अल्पसंख्यांकांना आपल्याच धर्माचे लोक नेमण्याचा अधिकार आहे. हिंदूंना जर हिंदु धर्मातील उदात्त विचारांचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे असेल, तर त्या विषयात सरकार तटस्थ आहे. सरकार प्रोत्साहन देत नाही, मुसलमानांच्या शाळांतून कुराण शिकवण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ कुराणातील जिहादचे तत्त्वज्ञान शिकवण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याला सरकारची अनुमती आहे आणि सहकार्य आहे; परंतु जिहादी आक्रमणाला पुरून उरण्याएवढे मनोबल प्राप्‍त व्हावे; म्हणून अत्यंत उपयुक्‍त असा जो भगवान श्रीकृष्णाचा श्रीमद्‌भगवतगीता हा ग्रंथ शाळा-महाशाळांतून शिकवायचे म्हटले, तर सरकारचे सहकार्य तर नाहीच; परंतु अनुमतीही नाही. गीता धर्म प्रसारक मंडळ अशासारखी एखादी संस्था हिंदू काढू शकतात; पण सरकार त्या प्रयत्‍नांपासून चार हात दूर रहाणार.

भारताला जागतिक महासत्ता आणि जगद्‌गुरु बनवण्याची ऊर्जा गीता ग्रंथात आहे !
वास्तविक काळाची गरज अशी आहे की, गीतेचे तत्त्वज्ञान सर्व भारतियांना नीट समजावून सांगितले गेले पाहिजे. ते कर्मयोगाची शिकवण देते एवढेच नव्हे, तर कोणत्याही संकुचित विचाराचे समर्थन करत नाही. भेदाभेदांना थारा देत नाही. गीता सगळया मनुष्यमात्रासाठी सांगण्यात आली आहे. दुष्ट शक्‍तींच्या प्रभावापासून संपूर्ण जग मुक्‍त रहावे; म्हणून माणसाने परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवून निर्भयपणे आपल्या कर्तव्याचे पालन कसे करावे, याचे शिक्षण गीता वाचून म्हणजे त्यात अवगाहन केल्याने मिळते. प्रत्येक हिंदूच्या हृदयात गीता भिनली, तर झालेल्या पूर्वीच्या सगळया फाळण्या नष्ट होतील. भारत नित्याचा अखंड हिंदुस्थान होईल. त्याकडे वाकडा डोळा करून बघण्याची छाती कोणाची होणार नाही. भारताला जागतिक महासत्ता आणि जगद्‌गुरु बनवण्याची ऊर्जा गीतेत आहे; परंतु सरकार गीतेविषयी उदासीन आहे. कुराणाविषयी सद्‌गदित आहे. बायबलविषयी बेभान आहे. त्याचा लाभ उठवून या दोन्ही शक्‍ती भारताचे तुकडे पाडण्याचा उद्योग करत असतात. भारताची घटना धर्मनिरपेक्ष आहे, असा दावा केला जातो; परंतु जे धर्म असहिष्णू, हिंसाचारी आणि आतंकवादी आहेत, त्यांना विकासाची संधी देणारी आणि उदारमतवादी, शांततावादी, सुसंवादवादी, अहिंसक आणि मनुजमंगलाचीच केवळ चिंता करणार्‍या धर्माविषयी उदासीन आणि प्रसंगी पूर्वग्रहदूषित असणारी राजकीय व्यवस्था विकृत, सडलेली आणि आत्मघातक मानावी लागेल.
स्वातंत्र्य हे हिंदूंसाठी नसून केवळ मुसलमान आणि इसाईंसाठी !
भारताच्या सहस्रावधी वर्षे म्हणजे प्रारंभापासून आजपर्यंत हिंदु बहुसंख्यांक म्हणून विशिष्ट आध्यात्मिक मस्तीत जगत आले आहेत. ते आध्यात्मिक पिंडाचे होते, तरी व्यावहारिक कर्तव्याचा त्यांना विसर पडला नव्हता. जेव्हा जेव्हा परक्यांची आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा ते झुंजले आणि आपली बहुसंख्या त्यांनी कमी होऊ दिली नाही. मोगलांपासून आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र्य हिंदूंनी मिळवून दिले; परंतु स्वातंत्र्य मिळताच ते हिंदूंसाठी नसून ते मुसलमान आणि इसाई लोकांसाठी आहे, असे काँग्रेस शासनाने प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने सिद्ध करण्यास सुरुवात केली. त्याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे काश्मीर होय.

भारताचा एक इंचही भूभाग मुसलमानांना मिळणार नाही, याची काळजी हिंदूंनी घेण्याची गरज !
काश्मीरवर हिंदूंनी राज्य केले, याचे पुरावे महाभारतात मिळतात. सम्राट अशोकाच्या साम्राज्यात काश्मीर अंतर्भूत होते. इ.स. १३०० ते १८०० ही पाचशे वर्षे एवढाच काळ मुसलमानांनी काश्मीरवर राज्य केले. या काळात त्यांनी एक तृतीयांश हिंदूंना दाल सरोवरात बुडवून ठार मारले. एक तृतीयांश हिंदूंना त्यांनी काश्मीरमधून हाकलवून लावले म्हणजे मुसलमानांच्या हातात काश्मीर गेल्यावर तेथून पद्धतशीरपणे हिंदूंचे अस्तित्व कसे पुसले जाते, ते कळले होते. म्हणजे काश्मीरच काय पण भारताचा एक इंचही भूभाग मुसलमानांच्या हातात जाणार नाही, याची काळजी हिंदूंनी घ्यायला हवी होती; परंतु तेवढा जागेपणा हिंदूंनी दाखवला नाही.

काश्मीर हिंदूंच्या स्वाधीन होऊ नये; म्हणून संविधानात ३७० व्या अनुच्छेदाची योजना आखणारे नेहरू !
इ.स. १८०० मध्ये पंजाबचे महाराज रणजितसिंग यांनी मुसलमानांचा पराभव करून काश्मीर जिंकून घेतले. त्या वेळी मुक्‍तीचा आनंद साजरा करण्यासाठी काश्मिरात जीव मुठीत धरून जगणार्‍या थोड्याफार हिंदूंनी घरावर दिव्यांची आरास करून दिवाळीचा सण साजरा केला. हैद्राबादच्या निझामाच्या पशूतुल्य राजवटीपासून सोडवले; म्हणून त्या संस्थानातील हिंदु जनता सरदार पटेलांना मुक्‍तीदाता मानते, तसे त्या काळी रणजितसिंगांना भजत असत. तेथून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे महाराज
हरिसिंगपर्यंत काश्मिरात हिंदूंची सत्ता चालली; परंतु काश्मीरवर पाकिस्तानने आक्रमण केले आहे आणि ते परतवून लावण्यासाठी भारतीय सैन्य तेथे पाठवायला पाहिजे, या असाधारण परिस्थितीचा लाभ उठवून नेहरूंनी काश्मीरमध्ये मुसलमानांचीच सत्ता चालली पाहिजे, असा हट्ट धरला आणि महाराज हरिसिंग यांना काश्मीरमधून हाकलवून त्यांच्या ठिकाणी शेख अब्दुल्लाची स्थापना केली. काश्मीरचा एक तृतीयांश भाग त्यांनी भारतीय सैन्याला मुक्‍त करून दिला नाही. उरलेला काश्मीर शेख अब्दुल्लांना देऊन टाकला. पुन्हा काश्मीर हिंदूंच्या स्वाधीन होऊ नये; म्हणून नेहरूंनी संविधानात ३७० व्या अनुच्छेदाची योजना केली. त्यानुसार काश्मीरबाहेरील हिंदूंना काश्मीरचे नागरिकत्व मिळत नाही. मालमत्ता धारण करता येत नाही.

भारताच्या पंतप्रधानाला काश्मीरमध्ये एक इंचही भूमी खरेदी करता येत नाही. काश्मीरचा
मुख्यमंत्री मात्र भारतात कोठेही मालमत्ता धारण करू शकतो. फाळणीच्या वेळी जे हिंदू
काश्मीरमध्ये आश्रयाला गेले त्यांना आजपर्यंत मतदानाचा हक्क मिळालेला नाही. त्यांना सरकारकडून ऋण मिळत नाही.

भारताचा पंतप्रधान सीमेवरील एका राज्यात ज्यांना भारताविषयी मातृभूमीची भावना नाही, अशा मुसलमानांची अनिर्बंध अत्याचारी बहुसंख्या रहावी आणि हिंदु औषधाला सापडू नये, अशी व्यवस्था आपल्या हाताने करतो, हे जगातले सगळयांत मोठे आश्चर्य आहे. अशा बावळट लोकांच्या देशावर हल्ला करण्याचा आपल्याला हक्क आहे, असे पाकिस्तानला वाटले, तर त्यात चूक कोणाची, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे.

देशातील असुरक्षित सर्वसामान्य जनता आणि सुरक्षित नेतेमंडळी !

जनतेच्या रक्षणाचे उत्तरदायित्व (?) असलेल्या राज्यकर्त्यांच्या उदासीनतेची किंमत जनतेला तिचा बळी देऊन चुकवावी लागत आहे. दुसरीकडे सामान्य जनतेला सुरक्षा पुरवण्यास अपयशी ठरलेली नेतेमंडळी मात्र सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरतात ! घटनेने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे आणि त्या अधिकारपासून देशवासियांना हेतूपुरस्सर वंचित ठेवले जात आहे !
संकलक : श्री. संदीप सावंत, फोंडा, गोवा

नेत्यांच्या सुरक्षेचा त्रास सामान्य जनतेने का भोगावा ?
अलीकडे नेत्याचे वजन त्याच्याभोवती असलेल्या सुरक्षाकड्याने मापले जाते, त्यामुळे उच्च दर्जाचे संरक्षण मागण्यासाठी आता नेत्यांमध्ये शर्यत लागलेली दिसते. सद्यस्थितीत `राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां’च्या सक्षम जवानांतील ६० टक्के जवान नेत्यांच्या सुरक्षेसाठी जुंपले गेले आहेत. सुरक्षा रक्षकांचा गराडा असलेला नेता रस्त्यावरून जात असल्यास मग्रूर पोलीस रस्ता अडवून ठेवतात व जनतेच्या जिवावर नेता झालेला राजकारणी मात्र वाट काढून निघून जातो. दैनंदिन जीवनात घडणार्‍या या प्रसंगांना आता सामान्य माणूस कंटाळला आहे. काही नेते बेताल वक्‍तव्य करत सुटतात व त्यामुळे त्यांना ठराविक घटकांकडून धोका संभवतो. मग त्या नेत्याकडून सुरक्षा हवी असल्याचे रडगाणे सुरू होते. एका पक्षाच्या नेत्याला दुसर्‍या पक्षाच्या नेत्याकडून धोका संभवतो, अशी राज्येही भारतात आहेत, हे या देशाचे दुर्दैव !

नेत्यांच्या सुरक्षेबाबत डेन्मार्कचे अनुकरण करा !
काही वर्षांपूर्वी एक भारतीय पर्यटक डेन्मार्कच्या भेटीवर गेला होता. एका मॉलमध्ये खरेदी करत असतांना त्याला डेन्मार्कची राणी त्याच ठिकाणी खरेदी करतांना दिसली. तिच्या सोबत केवळ तिची एक सेविका होती. राणी स्वत:ला हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करत होती व तिची सेविका त्या उचलण्यास तिला मदत करत होती. तेथे ना सुरक्षा रक्षकांचा गराडा ना प्रसारमाध्यमांचा पाठलाग ! या प्रसंगाने अचंबित झालेल्या भारतीय पर्यटकाने या प्रकाराबाबत वाटाड्याला हटकले. वाटाड्याने “राज्यकर्त्यांना जर त्यांच्याच राज्यातील लोकांपासून सुरक्षा हवीशी वाटली, तर त्या राज्यकर्त्यांनी खुशाल पायउतार व्हावे. ज्या नेत्याला त्याच्याच लोकांमध्ये असुरक्षित वाटत असेल, तर त्याच्या सुरक्षेचा खर्च जनतेने का उचलावा ? केवळ वक्र वळणाच्या नेत्याला भीती वाटते व अशा नेत्यांची डेन्मार्कला आवश्यकता नाही”, असे दिलेले उत्तर भारतीय पर्यटकालाच काय, तर प्रत्येक भारतीय नागरिकालाही चकीत करणारे आहे. प्रत्येक भारतियाला `असे भारतात व्हावे’, असे का वाटणार नाही ?

अतिरेक्यांच्या विरोधात लढण्याची क्षमता असलेले जवान नेत्यांच्या सुरक्षेसाठी कशाला ?
सामान्य जनतेला भयोत्पादनापासून सुरक्षा पुरवण्यास अपयशी ठरलेले नेते स्वत:च्या सुरक्षेवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करतात. देशातील अतीमहनीय व्यक्‍तींच्या सुरक्षेवर २५० कोटी खर्च केले जातात, त्यात देवेगौडा, अमरसिंग, रामविलास पासवान, सज्जन कुमार, बी.एल्. जोशी, भाटीया, शरद यादव, रामेश्‍वर ठाकूर, इ. अहमद, प्रमोद तिवारी व इतर नेते आहेत. यांतील किती जणांना खरोखरच सुरक्षेची आवश्यकता आहे ? सज्जन कुमार सारख्या खुन्याच्या सुरक्षेवर लाखो रुपये खर्च
का ? अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी १९८४ साली `राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां’च्या दलाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या अंतर्गत दोन दले आहेत. एक म्हणजे `विशेष कृती दल’. त्यात सेनेतील निवडक जवान असतात व दुसरे म्हणजे `स्पेशल रेंजर्स ग्रूप’. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल व इतर निमलष्करी दलातील जवानांचा सहभाग असतो. `स्पेशल रेंजर्स ग्रूप’च्या निम्म्याहून अधिक जवानांना अतीमहनीय व्यक्‍तींच्या सुरक्षेसाठी जुंपण्यात आले आहे. भयोत्पादकी हल्ल्यांच्या विरोधात लढण्याची कुवत असलेल्या या सक्षम जवानांना नेत्यांच्या सुरक्षेसाठी जुंपणे कितपत योग्य आहे ?

गांधी कुटुंबियांना भारतात असुरक्षित का वाटते ?
गांधी कुटुंबीय, पंतप्रधान व माजी पंतप्रधान यांच्या सुरक्षेसाठी `स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप’ची स्थापना करण्यात आली. मागील आर्थिक वर्षात `स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप’साठी ११७ कोटी एवढ्या रकमेची तरतूद केली गेली होती, तर देशातील जनतेच्या रक्षणासाठी केवळ १५९ कोटी रुपये एवढी रक्कम होती. २००८-०९ च्या आर्थिक वर्षासाठी `स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप’ला १८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर या वर्षी जनतेच्या रक्षणासाठी केवळ १५८ कोटी रकमेची तरतूद झाली. गांधी घराण्यातील काही माणसे व आजी-माजी पंतप्रधानांसाठीच्या सुरक्षेसाठीचा खर्च देशाच्या एकूण लोकसंख्येवरच्या सुरक्षेच्या खर्चापेक्षा अधिक आहे ! पंतप्रधानांना सोडा; पण देशातील १२० कोटी जनतेपेक्षा गांधी घराणे महत्त्वाचे आहे का ?

नेत्यांच्या सुरक्षेला केवळ `झेड प्लस’च का, आता सेनाही बोलवा !
अतीमहनीय व्यक्‍तींची सुरक्षा पाच स्तरांत विभागली जाते. `स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप’चे सर्वोच्च कडे, नंतर `झेड प्लस’, `झेड’, `वाय’ व `एक्स’ दर्जाची सुरक्षा. `झेड प्लस’ सुरक्षेत `राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां’चे ६ `ब्लॅककॅट कमांडोज’ बरोबरच दोन हेडकॉन्स्टेबल, १२ कॉन्स्टेबल, एक `एस्कॉर्ट’ व एक `पायलट’ गाडी पुरवली जाते. मायावती, जयललिता, अमरसिंग, रामविलास पासवान, श्री. नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच देशातील ३० नेत्यांना `झेड प्लस’ सुरक्षा आहे. अन्य ६८ अतीमहनीय व्यक्‍तींना `झेड’, २४३ व्यक्‍तींना `वाय’, तर ८१ जणांना `एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. `स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप’ आणि `राष्ट्रीय सुरक्षा रक्षक’ यांच्या बरोबरच राज्यातील पोलीसही अतीमहनीय व्यक्‍तींच्या सुरक्षेसाठी जुंपले जातात. एकट्या दिल्लीत अतीमहनीय व्यक्‍तींच्या सुरक्षेसाठी तब्बल १४ हजार २०० पोलीस जुंपले गेले आहेत. “नेत्यांच्या सुरक्षेवर अमाप खर्च करण्यासाठी नेते ही राष्ट्रीय मालमत्ता नव्हे”, अशी समज सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. यावरून न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे राजकारणी नेत्यांनी वेळीच ओळखावे !

अतिरेक्यांचा समूळ नाश हेच खरे संरक्षण !
एकूणच नेत्यांच्या सुरक्षेचा त्रास सामान्य जनतेलाच भोगावा लागतो, एवढेच नव्हे तर त्यांच्या सुरक्षेचा प्रचंड खर्चही जनतेकडूनच कर रूपाने मिळवला जातो. नेत्यांची पत वाढवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या छानछौकीसाठी सुरक्षा पुरवणे आतातरी थांबवा व अतिरेक्यांची सतत टांगती तलवार असणार्‍यांनाच सुरक्षा पुरवा ! अर्थात अशा जनतेला सुरक्षा पुरवणे, हा अतिरेक्यांपासून संरक्षणाचा पहिला टप्पा असला, तरी भयोत्पदनाचे (दहशतवादाचे) समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांच्या मूळ स्थानांवर आघात करून ते नष्ट करणे क्रमप्राप्‍त आहे. हे होण्यासाठी राष्ट्राभिमानी नेते सत्तेवर आणायला हवेत !