निसर्गनियमाप्रमाणे जगामध्ये अनेक राष्ट्रे निर्माण झाली. त्या राष्ट्रांच्या निर्मितीस तिथे रहिवास करणार्या कोणत्यातरी महापुरुषाचे प्रयत्न कारणीभूत असतात. त्यामुळे त्या महापुरुषाला राष्ट्रपिता म्हणण्यात येते. आपला देश भारत या पंक्तीत बसतो का, हे पहाणे उचित ठरेल; कारण आपल्या देशात मोहनदास गांधींना `राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली आहे. ३० जानेवारी रोजी त्यांच्या असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने याविषयाची चिकित्सा करूया !
लेखक : श्री. रामदास बिसन सोनार, बोदवड, जिल्हा जळगाव
लेखकाचा परिचय
श्री. रामदास बिसन सोनार एक प्रखर हिंदुत्ववादी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते कट्टर अनुयायी आहेत. `अभारतीय शब्दकोष’ या ग्रंथाचे ते लेखक आहेत. सनातनशी त्यांचे संबंध याच शब्दकोषाच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत.
१९४७ साली मिळवले ते स्वातंत्र्य नव्हे, तर अखंड हिंदुस्थानचे तुकडे !
भारताच्या इतिहासाप्रमाणे भारत अकराशे वर्षे मुसलमान व दीडशे वर्षे इंग्रजांशी संघर्ष करत राहिला. या संघर्षात येथील अनेक स्वाभिमानी भूमीपुत्रांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची व संसाराची राखरांगोळीही केली. अनेकांनी आत्माहुती देत हौतात्म्य स्वीकारले. शके १८६९ (सन १९४७) मध्ये या अखंड हिंदुस्थानचे हैद्राबाद, काश्मीर, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान व भारत असे पाच तुकडे करून या देशाला खंडित राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य मिळवले.
इंग्रज गेले, ते गांधींमुळे नव्हे, तर क्रांतीकारकांमुळे !
हे स्वातंत्र्य गांधींच्या अहिंसा, उपोषण व सत्याग्रह अशा चळवळींना घाबरून मिळाले, असेच चित्र आजही देशापुढे उभे करण्यात आले आहे. या अनुषंगाने हा देश सोडून जातांना हिंदुस्थानचे त्या वेळचे ब्रिटीश महाराज्यपाल (व्हाईसरॉय) लॉर्ड माऊंटबॅटन यांनी मुंबईच्या `गेटवे ऑफ इंडिया’जवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराला दिलेले उत्तर पहाणे उचित ठरेल. हा पत्रकार म्हणाला, “अखेर तुम्ही महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळीमुळे जात आहात.” त्यावर माऊंटबॅटन यांनी दिलेले उत्तर गांधींच्या अनुयायांनी जनतेसमोर कधीच येऊ दिले नाही. ते म्हणाले, `गांधींच्या अहिंसात्मक चळवळीमुळे नव्हे, तर क्रांतीकारकांमुळे हा देश सांभाळण्यास आम्ही असमर्थ आहोत. म्हणून हा देश सोडून जात आहोत.’
गांधींना आगाखान पॅलेस, तर टिळक-सावरकर यांना अंधारकोठडी !
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी एकटेच जिवाचा आटापिटा करून व सर्वस्वाचा त्याग करून लढले का ? केवळ त्यांच्याच संघर्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले का ? वीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे `हे भारतमाते, तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण ‘ अशी त्यागी वृत्ती कधी गांधीजींची होती का ? तर नन्नाचाच पाढा वाचावा लागेल. `गांधींवाचून कोणीही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले नाहीत’, असे म्हणणे वेडेपणाचे ठरेल. गांधींनी जीवनभर संघर्ष करत असतांना शब्दांचे बुडबुडे भरपूर सोडले; पण स्वत:ला थोडेसेही खरचटून घेतले नाही. उलट त्यांच्या शब्दांच्या बुडबुड्यांपायी मुंबईला बाबू गेनू आणि नंदुरबारचा शिरीषकुमार यांसह काही बालके या स्वातंत्र्ययज्ञात बळी पडली आणि हुतात्मा झाली. गांधीपुरस्कृत आंदोलनाला इंग्रज घाबरत होते, असे कधीही दिसून आले नाही. आफ्रिकेच्या आंदोलनानंतर भारतात गांधींचे आणि इंग्रजांचे फार सख्य राहिले; म्हणून गांधींना इंग्रज लोक जेव्हा लाजेखातर अटक करत, तेव्हा त्यांना पुणे येथील शे-पाचशे सेवक असलेल्या भव्य आगाखान पॅलेसमध्ये ठेवत आणि मुदतपूर्व सोडूनही देत असत. याउलट वीर सावरकर, लोकमान्य टिळक व चाफेकर यांना इंग्रज घाबरत; म्हणूनच सावरकरांचा `१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच इंग्रजांनी त्यावर बंदी घातली होती. सावरकरांना अटक केली की, मोठे भयानक कारागृह किंवा अंदमानची काळकोठडी येथे ठेवण्यात येत असे, तसेच टिळकांना भारताबाहेरच्या कारागृहात ठेवले जात असे.
एके काळी हिंदुस्थान `जगद्गुरु’ म्हणून मान्यता पावला होता !
पिता या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाता. यावरून राष्ट्रपिता म्हणजे राष्ट्राला जन्म देणारा. `हिंदु’ या शब्दाला प्रखर विरोध असलेल्या गांधींनी खंडित केलेल्या या हिंदूंच्या हिंदुस्थानला जन्म दिला आहे का ? त्यांच्यापूर्वी हे राष्ट्र या भूतलावर अस्तित्वात नव्हते का ? या प्रश्नांची उत्तरे डोळसपणे पाहिल्यास हे राष्ट्र गांधींच्या आधी सहस्रावधी वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासात उदयास आलेले दिसून येते. एवढेच नव्हे, तर हे प्रगत राष्ट्र असल्यामुळे `जगद्गुरु’ म्हणूनही मान्यता पावलेले होते. चीन, ब्रह्मदेश इत्यादी परदेशांतील जनताही या देशातील नालंदा व तक्षशिला विद्यापिठांतून संस्कृतचे शिक्षण घेऊन जात असत. त्याच्या पूर्वीही चारही वेद, महाभारत, रामायण यांसारखे महान आणि जगन्मान्य ग्रंथांची निर्मिती येथेच झाली आहे. १० सहस्र वर्षांपूर्वीचा भूर्जपत्रावर लिहिलेला `ऋग्वेद’ लंडन येथील `इंडिया लायब्ररी’मध्ये आजही पहायला मिळतो. प्राचीन काळी या देशाला `आर्यावर्त’ म्हणत असत. नंतर भरत राजाचे साम्राज्य या संपूर्ण देशावर स्थापित झाले व या देशाला `भरतवर्ष’ व `भारत’ संबोधू लागले. त्यांपैकी भारत हे नाव आजपर्यंत अस्तित्वात आहे. तरीही त्या भरत राजाला कोणीही या देशाचा जन्मदाता म्हणजेच राष्ट्रपिता म्हणून संबोधत नाही.
आर्यावर्त हिंदुस्थान कसे झाले ?
पुढे पारसकडचे लोक या देशाशी व्यापारी आणि शैक्षणिक व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांचा प्रथम संपर्क येत असलेल्या सिंधू नदीवरून तिच्या काठावर रहाणार्या लोकांना त्यांच्या भाषेत `स’ नसल्यामुळे आणि `स’चे काम ते `ह’ने करून घेत असल्यामुळे (उदा. सप्ताहचे हप्ताह, सिंधूचे हिंदू) हिंदू म्हणून संबोधू लागले आणि पुढे या जीवनपद्धतीवरून या भूभागाला हिंदुस्थान म्हणण्यात येऊ लागले.
देशबांधवांना दिलेले वचन न पाळणार्या गांधींना सत्यवादी कसे म्हणता येईल ?
गांधींनी शके १८६४ (सन १९४२) मध्ये `भारत छोडो’ म्हणजे `क्विट इंडिया’ आंदोलन करायचे घोषित केल्याचे सावरकरांना कळले, तेव्हा त्यांनी त्वरित पुण्याच्या जाहीर सभेत सांगितले, “गांधीजी म्हणतात, एक आणि त्यातून निष्पन्न होते दुसरेच ! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेले आतापर्यंत कधीही दिसून आलेले नाही. म्हणून आता गांधीजींनी `भारत छोडो’ आंदोलन सुरू करण्याची घोषणा दिली. तेव्हा याचा विपर्यास `भारत तोडो’ म्हणजेच (`स्लिप्ट इंडिया’) `स्प्लिट इंडिया’मध्ये निष्पन्न होईल, याची जनतेने निश्चिती बाळगावी.” सावरकरांनी उच्चारलेली ही खोचक भविष्यवाणी ऐकून गांधींच्या हृदयात क्रोधाग्नी भडकला आणि त्यांनी सावरकरांच्या सभेच्या तिसर्या दिवशी मुंबईला आझाद मैदानावर सभा घेऊन देशातील जनतेला वचन दिले, `सावरकरांचे म्हणणे मला मान्य नाही. मी जिवंत असेपर्यंत या देशाचे विभाजन होऊन तुकडे होऊ देणार नाही. प्रसंगी आधी माझ्या देहाचे तुकडे होतील आणि नंतरच या देशाचे तुकडे होतील.’ त्यानंतरही शके १८६७ (सन १९४५) मध्ये या देशात झालेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या काँग्रेसने जनतेला आवाहन केले होते, `तुम्ही काँग्रेसला प्रचंड मतांनी निवडून द्या. आम्ही या देशाचे तुकडे होऊ देणार नाही.’ या आवाहनाला भुलून हिंदूंनी काँग्रेसला प्रचंड बहुमताने निवडून दिले. गांधींनी आणि त्यांच्या काँग्रेसने मात्र आपले वचन पाळले नाही आणि लॉर्ड माऊंटबॅटनच्या सांगण्यावरून त्यांनी काँग्रेसश्रेष्ठींची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सरदार वल्लभलाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी, डॉ. राधाकृष्णन, मदन मोहन मालवीय, जयप्रकाश नारायण, गोविंद वल्लभभाई पंत अशा चौदा मान्यवरांचा विरोध ठोकरून २९ विरुद्ध १५ अशा बहुमताने या देशाचे तुकडे करण्यास बहुमताने संमती दिली व तसा ठराव रातोरात करून सकाळी इंग्रजांच्या हातात ठेवला. अशा तर्हेने या देशाची चिरफाड करून त्याचे पाच तुकडे करून त्यातील एका भूभागाचे गांधी सत्ताधीश झाले.
वीर सावरकर, डॉ. आंबेडकर, आचार्य कृपलानी व इतर नेत्यांच्या देशहितकारक मागण्या फेटाळणारे गांधी !
या ठरावानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य कृपलानी, इतर काही नेते व देशातील जनतेच्या तीन मागण्या होत्या. मुसलमानांना पाकिस्तान दिले, तर हिंदुबहुल राष्ट्र असलेल्या भूभागाला जगभरात प्रचलित असलेले `हिंदुस्थान’ नाव राहू द्यावे, ही पहिली मागणी. हा हिंदूंचा हिंदुस्थान असल्यामुळे या देशाचा प्राचीन काळापासून असलेला भगवा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून त्याला मान्यता द्यावी, ही दुसरी; तर मुसलमानांसाठी वेगळे पाकिस्तान दिल्यामुळे पाकिस्तानातील सर्व हिंदूंना हिंदुस्थानात आणून येथील सर्व मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून द्यावे व मुसलमानांच्या सततच्या दंगे, मारठोक, जाळपोळ व लुटालूट या जाचातून हिंदूंना मुक्त करावे. या तीन मागण्या पदरात पाडून घेतल्यानंतर या देशाची फाळणी करावी. गांधींनी मात्र `हिंदू-मुस्लीम भाई-भाई आहेत’ म्हणून या मागण्या फेटाळून लावल्या. त्याची कारणे देतांना त्यांनी स्पष्टीकरण दिले की, `हिंदुस्थान या शब्दात केवळ हिंदु शब्द येत असल्यामुळे व या देशात २-३ कोटी का होईना, मुसलमान रहात असल्यामुळे या देशाला हिंदुस्थान न म्हणता भारत म्हणावे. भगव्या ध्वजात केवळ हिंदूंचा रंग असल्यामुळे त्याच्याऐवजी हिंदूंसाठी केशरी पट्टा, मुसलमानांसाठी हिरवा पट्टा आणि ख्रिश्चनांसाठी पांढरा पट्टा असलेला तिरंगाध्वज राष्ट्रध्वज राहील. तिसर्या मुद्याचे स्पष्टीकरण देतांना `हिंदू-मुसलमान भाई-भाई’ असल्यामुळे त्यांनी गुण्यागोविंदाने आणि आवडीप्रमाणे कुठेही रहावे आणि कुठेही जावे, म्हणून पाकिस्तानातून हिंदूंना भारतात आणा आणि येथील मुसलमानांना पाकिस्तानात पाठवा, हा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे सांगून सावरकर, डॉ. आंबेडकर, आचार्य कृपलानी व इतर नेत्यांनी हिंदू हितासाठी सादर केलेल्या या तीनही मागण्या गांधींनी नाकारल्या आणि या देशाची फाळणी करून पाकिस्तानातील हिंदूंना लांडग्यांच्या तोंडी दिले. गांधींच्या या हट्टामुळे पाकिस्तानातील मुसलमानांनी लाखो सिंधी हिंदूंची आणि त्यांच्या बायका मुलांची हालहाल करून कत्तल केली. कित्येक हिंदूंना इस्लामपंथ स्वीकारायला लावला. अनेक हिंदु महिलांवर अनन्वित अत्याचार केलेत. एवढे अत्याचार हिंदूंवर होऊनही गांधींना त्याचे रतीभरही दु:ख झाले नाही. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी मुसलमानांच्या या दुष्कृत्याविरुद्ध साधा निषेधही व्यक्त केला नाही. उलट पाकिस्तानातून मार खाऊन भारतात आलेल्या हिंदूंना त्यांनी `तुम्हाला तिकडे मरण आले असते, तरी चालले असते. तुम्ही इकडे पळून यायला नको होते’, असा उपदेशाचा डोस पाजला !
फाळणीच्या वेळी हिंदु देशबांधवांना वाचवणारे फक्त रा.स्व. संघ व हिंदु महासभा !
फाळणीच्या वेळी गांधींच्या कृपेने पाकिस्तानात हिंदूंची अशी लांडगेतोड सुरू असतांना या खंडित भारतात सर्व गांधीवादी जनता आनंदोत्सव साजरा करत होती. केवळ सावरकरांच्या आदेशानुसार हिंदुमहासभेचे कार्यकर्ते आणि पू. गोळवलकर गुरुजींच्या आदेशावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आपल्या प्राणाची चिंता न करता आपल्या हिंदु बांधवांना वाचवून भारतात सुरक्षित पोहोचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते.
भारतमातेची चिरफाड करून तिचे तुकडे तुकडे करणार्या गांधींना राष्ट्रपिता म्हणता येईल का ?
गांधींना या देशातील काँग्रेसच्या काही स्वार्थी लोकांनी या खंडित भारताचे राष्ट्रपिता म्हणून मान्यता दिली. तसा प्रचार आणि प्रसार करत हे गांधीवादी लोक त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे उभारून, गावागावांतील चौकांना त्यांचे नाव देऊन, चलनी नोटांवर त्यांचे छायाचित्र छापून त्यांचे खोटे अवडंबर माजवत आहेत. `या भारताचे निर्माते नि उद्धारकर्ते महापुरुष एकमेव गांधीच आहेत’, असा भ्रम येथील शासनकर्त्यांना झालेला दिसून येत आहे. नवलाची गोष्ट म्हणजे ज्या गांधींना त्यांच्या स्वत:च्या मुलांनीही कधी पिताजी म्हणून हाक मारली नाही, त्यांना आज भारतातील जनता राष्ट्रपिता म्हणून संबोधते ! वास्तविक जन्म न देता अवयव छाटून टाकणार्याला पिता म्हणून संबोधणारे लोक भारतभूमीतच आढळतात, हे या देशाचे महान दुर्भाग्य म्हणावे लागेल. इतर देशात असे होणे नाही !
या देशाचा राष्ट्रपिता कोणी होऊ शकला नाही आणि यापुढेही कोणीही होऊ शकत नाही. !
जगाच्या पाठीवर माता म्हणून संबोधण्यात येणारा भारत हाच एकमेव देश आहे. अशा वंदनीय भारत मातेला तिचे अवयव तोडून घायाळ करण्याचे षडयंत्र रचण्यात गांधीजींचीच प्रमुख भूमिका होती, याला इतिहास साक्षी आहे. निदान या देशाच्या इतिहासाची जाणीव असणार्या सुज्ञ नागरिकांनी `या देशाचा राष्ट्रपिता कोणी होऊ शकला नाही आणि यापुढेही कोणीही होऊ शकत नाही’, याचे भान ठेवावे हे श्रेयस्कर ! गांधींजींची निर्मिती म्हणजे पाकिस्तान. तेव्हा गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता न म्हणता पाकिस्तानचेच राष्ट्रपिता म्हणणे उचित होईल !
निगडीत वृत्त : गांधी खरोखरंच राष्ट्रपिता होते का?




