भारताची धर्मनिरपेक्षता आणि पाकिस्तान !

समविचाराने एकत्र आणि शक्‍ती एकवटून लढायचे ठरवल्यासच सेनादलांना अधिक बळ प्राप्‍त होईल !
गुरुवारी भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांची अधिवेशने सुरू झाली. मुंबईवर नोव्हेंबरात दहा पाकिस्तानी म्हणजेच इस्लामी आतंकवाद्यांनी आक्रमण करून २०० निरपराध नागरिकांना ठार मारले. ४०० माणसांना घायाळ केले आणि प्रचंड भीतीचे साम्राज्य निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व संसदसदस्य एकत्र जमले. त्यांनी एकजुटीने आतंकवादाशी झुंज घेण्याचा निर्णय घेतला. आपापसांत भांडून समान राष्ट्रीय संकटाच्या वेळी शक्‍ती फुकट घालवू नये, हा शहाणपणा सगळयांना सुचला, हे सुचिन्ह म्हणता येईल. दुर्योधनाने एकदा अतीप्रसंग केला, तेव्हा विराट राजाने त्याला आणि त्याच्या सैन्याला झोडपून बंदी केले. त्या वेळी त्यांना सोडवण्याच्या प्रश्‍नावरून पांडवांत साहजिकच मतभेद झाले; कारण दुर्योधन पांडवांशी नेहमीच कपटकारस्थाने करून वागला होता; परंतु युधिष्ठिराने समजावले की, आपापसांत भांडतांना कौरव शंभर आणि पांडव पाच असले, तरी तिसरा आपल्यापैकी कोणाशीही लढत असेल, तेव्हा आपण एकशेपाच होऊन त्याचा पराभव केला पाहिजे. `वयं पंचाधिक शतम्’ असे उद््गार त्या वेळी युधिष्ठिराने काढले होते. त्यांचा पुनरुच्चार काही सदस्यांनी केला, हे चांगले झाले. परक्याला घरात घेऊन आपापसांतील भांडणात त्याला मध्यस्थी करायला सांगायची वाईट सवय हिंदूंना आहे. या वेळी सगळयांनी समविचाराने एकत्र येऊन आणि शक्‍ती एकवटून लढायचे ठरवले असल्याने भारतीय सेनादलांना अधिक बळ प्राप्‍त होणार आहे. शक्‍ती ही साधनांपेक्षा इच्छाशक्‍तीत वस्ती करून असते, इच्छाशक्‍ती सदैव तेजस्वी आणि चिरंजीव राहिली पाहिजे. यासाठी तिला अधूनमधून पाणी दिले पाहिजे. धार लावली पाहिजे. ती वेळ ही आहे. त्यासाठी पंतप्रधानांचे एक विधान तपासून पाहू.

इस्लामची सेवा करणे, हेच भारताचेही उद्दिष्ट आहे, असे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्‍न !
मुंबईवर पाकिस्तानी आतंकवादी तरुणांनी जो प्राणघातक हल्ला केला, तो भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला होता, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले. हे विधान वस्तूस्थितीला सोडून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्याच्या जेवढे जवळ जाता येईल, तेवढे नेतृत्वाने गेले पाहिजे. शक्‍तीला ज्ञानाचे अधिष्ठान असेल, तर शत्रूदमन योजना अचूकपणे आखता येते. पाकिस्तानला भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर आघात करून समाधान होणार नसून त्यापेक्षा अधिक काहीतरी करायचे आहे. पाकिस्तानला संपूर्ण भारत इस्लाममय करायचा आहे, पाकिस्तानचे हे उद्दिष्ट सफल होऊ द्यायचे नसेल, तर इस्लामपेक्षा चांगले असे भारताजवळ आहे, असा विश्‍वास भारतात रहाणार्‍या लोकांना दिला गेला पाहिजे; परंतु भारत सरकार अगदी उलट्या पद्धतीने वागत आहे. काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे सरकार पाकिस्तानची नेहमी खात्री पटवण्याचा प्रयत्‍न करत असते की, पाकिस्तानचे जेवढे इस्लामवर प्रेम आहे, त्यापेक्षा भारताचे इस्लामवरील प्रेम मुळीच कमी नाही; म्हणून पाकिस्तानने भारताशी लढू नये. असे नुसते सांगून भारत सरकार आणि काँग्रेस पक्ष थांबत नाही, तर प्रत्यक्ष कृतीने इस्लामची सेवा करणे, हे भारताचेही उद्दिष्ट आहे, असे दाखवण्याचा प्रयत्‍न करण्यात येत असतो. पाकिस्तान आणि भारतातील मुसलमान या दोन वेगळया गोष्टी आहेत. असे काँग्रेस पक्ष मानीत नाही. भारतातील मुसलमानांच्या मागण्या सारासार विचार न करता आणि देशहिताकडे दुर्लक्ष करून मान्य करण्याचे धोरण ठेवले की, पाकिस्तानचे समाधान होईल आणि तो भारताशी स्नेहपूर्ण वर्तन ठेवेल, अशी आशा काँग्रेसला आहे. मुसलमानांच्या मागण्या कितीही भयंकर असल्या, तरी त्या मान्य करण्यातच हिंदूंचे आणि भारताचे हित आहे, असा विचार करण्याची सवय काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत लावल्याने हिंदूंचा शक्‍तीपात होऊन पाकिस्तान निर्माण झाले; परंतु युधिष्ठिराला द्युताच्या व्यसनाची नशा चढली होती. तशी काँग्रेसला हिंदु-मुस्लीम ऐक्याची नशा गांधीयुगात चढवण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावरही काँग्रेसने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. भारतातील मुसलमानांना प्रसन्न ठेवले की, पाकिस्तान प्रसन्न राहील, असा सिद्धांत काँग्रेसने मांडला. तो सिद्धांत कृतीत उतरवतांना पाकिस्तानला प्रिय असलेली गोष्ट केली की, भारतातील मुसलमान प्रसन्न होतील, असा उपसिद्धांत मांडण्यात आला. परिणामी हिंदूंना वार्‍यावर सोडण्यात आले.


धर्मनिरपेक्षतेचे एकही तत्त्व कार्यवाहीत न आणल्याने भारतातील मुसलमानांना काँग्रेस देशभक्‍त करू शकली नाही !

पाकिस्तानने मुंबईवर आतंकवादी हल्ला केला आणि भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणली, हे पूर्ण सत्य नसून धर्मनिरपेक्षतेचे एकही तत्त्व कार्यवाहीत न आणल्याने भारतातील मुसलमानांना काँग्रेस देशभक्‍त करू शकली नाही, त्यामुळे पाकिस्तानला हल्ला करणे अतिशय सोपे झाले. असलेच तर हे पूर्णसत्य आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान जगात जसे मांडले जाते, त्यापेक्षा अगदी उलटे तत्वज्ञान भारतात मांडले जाते. धर्मनिरपेक्षतेची पहिली अट अशी आहे की, निर्बंधासमोर म्हणजे कायद्यासमोर सर्व समान असतात. त्या त्या देशाची संसद जे कायदे करते, ते सगळयांना पाळावे लागतात. एखाद्या विशिष्ट धर्ममताचे लोक आपल्या धर्मग्रंथातील वचने उद्धृत करून ती श्रेष्ठ आहेत आणि आम्ही त्यांचेच पालन करणार असून संसदेला आम्ही जुमानीत नाही, असे म्हणू शकत नाहीत; परंतु भारतात तसे स्वातंत्र्य मुसलमानांना आहे.

मुसलमानांच्या अवास्तव मागण्या मान्य करणे, ही काँग्रेस सरकारची धर्मनिरपेक्षता !
शहाबानो नावाच्या मुसलमान बाईला घटस्फोटानंतर नवर्‍याकडून पोटगी मिळाली पाहिजे, असा आदेश न्यायालयाने दिला; परंतु तो मुसलमानानांनी मानला नाही. घटस्फोटाने टाकून दिलेल्या बाईला पोटगी द्या, असे आमचा धर्म आम्हाला सांगत नाही, असे मुसलमानांनी दरडावून सांगितले आणि लढाईच्या पवित्र्यात ते मैदानात उतरले. त्याबरोबर काँग्रेस सरकार घाबरले. नेहरूंचे नातू आणि राहुल गांधीचे पिताश्री राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते. त्यांनी लोटांगण घातले. मुसलमानांना शरीयतप्रमाणे भारतात सुखाने आणि निर्भयपणे जगता येईल, न्यायालयाचे आदेश मानण्याचे त्यांच्यावर बंधनकारक नाही, असे आश्‍वासन राजीव गांधींनी दिले. तसे विधेयक संसदेत पारित करून घेतले. राजीव गांधींनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखली नाही. स्त्रीजातीचे अश्रू पुसले नाहीत. उलट भारताच्या संसदेला वेसण घालून त्यांनी तिला मुसलमानांच्या पडवीत बांधून टाकले. मुसलमानांच्या हिताविरुद्ध विधेयक पारित होणार नाही, हे त्यांनी जगप्रसिद्ध केले. भारतावर पाकिस्तानी आतंकवादी शेवटी हल्ला करतात. आधी हल्ला भारतातील मुसलमान करतात. त्यांच्या अवास्तव मागण्या काँग्रेस सरकार मान्य करते. अशा वर्तनालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाने पाकिस्तानला हल्ला करण्यास प्रोत्साहन मिळते; म्हणून `कायद्यासमोर मुसलमान धरून सर्व समान’ हे तत्त्व काँग्रेसने मान्य केले पाहिजे. भारतात शरीयतचे नाही, तर संसदेचे राज्य चालेल, असे मनमोहनसिंग सरकारने घोषित केले पाहिजे. काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तर त्यांनी देशभर समान नागरी संहिता लागू करण्याचे विधेयक संसदेत आणले पाहिजे. भारतातील मुसलमानांनी समान नागरी संहिता मान्य केल्यास पाकिस्तानचे निम्म्याहून अधिक सामर्थ्य कमी होईल.

`हिंदु’ या शब्दाच्या उपहासात्मक (कि खर्‍या) व्याख्या !

अ. `इतिहासातून शहाणपणा शिकत नाही, तो हिंदु !
आ. अगदी नित्यनेमाने, कित्येक वर्षांपासून स्वत:च्या विनाशाचा पाया रचतो, तो हिंदु !
इ. `मला काय त्याचे’ या कर्तव्यहीन भावनेने जगतो, तो हिंदु !
ई. स्वत:च्या धर्मावर चोहोबाजूंनी हल्ला होत असतांना शांत झोपतो, तो हिंदु !
उ. स्वधर्माचा विनाश करण्यासाठी सातत्याने मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसची
साथ देतो, तो हिंदु ! (संदर्भ : साप्‍ताहिक राष्ट्रपर्व)

बारा डिसेंबरला अनेक जन्मतात…

प्रत्येक हिंदू लढाऊ वृत्तीचा झाला पाहिजे, हा मुंजे यांचा संकल्प होता
सहस्रावधी माणसे बारा डिसेंबरला जन्मतात; पण त्यात बाळकृष्ण शिवराम मुंजे एखादेच असतात. आज मुंजे यांचे संकीर्तन होण्याची नितांत आवश्यकता आहे; कारण या माणसाने हिंदूंची युयुत्सु वृत्ती जागती ठेवण्यासाठी आपले उभे आयुष्य झिजवले. मध्यप्रदेशातील विलासपूर येथे आरपा नदीच्या काठी मुंजे यांचा जन्म १२ डिसेंबर १८७२ रोजी म्हणजे आधुनिक भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर सुरू होऊन १५ वर्षांनी झाला. मोहनदास गांधींचा जन्म १८६९चा म्हणजे दोघे समकालीन तथापी युद्धजिज्ञासेत दोघात महदंतर होते. भीक मागून नव्हे, तर इंग्रजांशी प्रत्यक्ष लढूनच भारताला स्वातंत्र्य मिळेल, यावर मुंजे यांचा ठाम विश्‍वास होता. ज्यांना पारतंत्र्यात भारताचे नेतृत्व करायचे आहे, त्यांनी युद्ध चालू असतांना प्रत्यक्ष समरांगणावर जाऊन ते पाहिले पाहिजे. या प्रबळ उर्मीने मुंबई महापालिकेची भरपूर वेतनाची चाकरी सोडून ते आफ्रिकेतील बोअर युद्धात अल्पवेतनावर सामील झाले. वडिलांनी त्यांना भविष्याचे काय असे विचारले, तेव्हा जिन्याखालच्या खोलीत राहीन; पण युद्ध पाहिल्यावाचून रहाणार नाही, असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले. हिंदूंच्या मनात पुन्हा कधीही विद्रोहाची भावना उत्पन्न होऊ नये; म्हणून धूर्त ब्रिटिशांनी चहूबाजूंनी कडेकोट बंदोबस्त केला होता. १८५७च्या देशव्यापी आणि रक्‍तरंजित उठावाचा ब्रिटिशांनी इतका धसका घेतला होता. मुंजे हा बंदोबस्त फोडून बाहेर पडले. केवळ सैनिकच नव्हे, तर प्रत्येक हिंदु लढाऊ वृत्तीचा झाला पाहिजे आणि तो रामकृष्णाच्या परंपरेशी जोडला गेला पाहिजे ? हा त्यांचा संकल्प होता; म्हणून पाकिस्तानचा ठराव मांडला जाण्यापूर्वीच त्यांनी नाशिकला काही वर्षे आधी भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली. तेथे शिकणार्‍यांना रामदंडी म्हणण्याचा प्रघात पाडला.

राज्यकर्त्यांवर गांधीवादाचा पगडा असल्याचे दुष्परिणाम
ब्रिटिशांच्या जाळयात मुंजे अडकले नाहीत; पण गांधी अडकले. ब्रिटिशांचे हित जपले जाईल, अशी पावले ते टाकू लागले. त्यांनी अहिंसेच्या दोरखंडाने हिंदूंना करकचून आवळून टाकले; म्हणून चाकूसुरे काढून मुसलमानांनी हिंदूंच्या भूप्रदेशावर आणि आयाबहिणींवर घाला घातला, तेव्हा प्रतिकार व्हावा, तसा झाला नाही. आजही पाकिस्तानी आणि इस्लामी आतंकवादी मुंबईवर हल्ला करतात, तेव्हा असे व्हायचेच, त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे, अशा आशयाचे उद्‌गार आबा पाटलांच्या तोंडून निघू शकतात ! इस्लामी आक्रमक अंगावर धावून आले, तर मुंजे आणि सावरकर तलवारी परजून त्यांच्या समाचारासाठी रस्त्यावर उतरतील; पण मी तसे करणार नाही’, असे गांधी म्हणाले होते. तलवारीने प्रश्‍न सुटत नाहीत; प्रश्‍न हृदय परिवर्तनाने सुटतात, हा गांधींचा विशेषकरून मुसलमानांच्या विषयात आवडता सिद्धांत होता. आजच्या राज्यकर्त्यांवर गांधीवादाचा पगडा आहे; म्हणून मुंबईच्या हल्ल्यानंतर सात्त्विक संतापाने पेटून पाकिस्तानातील आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावे, असा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नाही. ते शौर्य दाखवतात, एखाद्या भारतनिष्ठ साध्वीसमोर.

मुसलमानांच्या अत्याचारांबाबत मुंजे व गांधी यांच्यातील मतभेद
१२ डिसेंबरला अनेक जीव जन्मतात; पण त्यात एखादेच मुंजे असतात. मुसलमानांच्या मनोवृत्तीवर मात कशी करायची, या विषयात मुंजे आणि मोहनदास यांच्यात गंभीर मतभेद होते. मोपल्यांच्या बंडात ते स्पष्टपणे प्रतीत होतात. ब्रिटिशांनी फाडून फेकून दिलेली तुर्कस्तानातील खलिफाची गादी हिंदूंनी पुन्हा शिवून देऊन पुण्य संपादन करावे; म्हणून गांधींनी खिलाफत चळवळ सुरू केली; परंतु अशा तर्कदृष्ट चळवळींना ब्रिटीश दाद देत नसत. त्यामुळे चिडलेल्या मुसलमानांनी आपला राग संत प्रवृत्तीच्या हिंदूंवर काढला. मलबारात त्यांनी सतत आठ दिवस हिंदूंना खिंडीत गाठून त्यांच्या सामूहिक कत्तली केल्या. दिसेल त्या हिंदू स्त्रीचा तिचे वय न पहाता त्यांनी उपभोग घेतला. गर्भवती हिंदु स्त्रियांची पोटे चिरून त्यांनी आतले गर्भ दगडावर आपटून छिन्नभिन्न केले. गावातील विहिरी हिंदूंच्या प्रेतांनी वाहत होत्या. ज्यांच्या वयामध्ये केवळ तीन वर्षांचे अंतर होते, ते मोहनदास आणि मुंजे या आपत्तीत कसे वागले ? गांधी ज्येष्ठ होते; पण श्रेष्ठ नव्हते. काही असेलच, तर ते नतद्रष्ट होते. मलबारात हिंदूंवर काहीही अत्याचार झालेले नाहीत, अशी भूमिका गांधींनी घेतली. या अत्याचारांचा निषेध त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला करू दिला नाही. तेव्हा मुंजे पन्नाशीत होते. ते धावत मलबारात गेले. घराघरात फिरून हिंदूंवरील अत्याचाराची विस्तृत माहिती त्यांनी गोळा केली आणि ती जगाच्या वेशीवर टांगली.

हिंदूंवरील अत्याचार हा दखलपात्र अपराध न वाटणारी काँग्रेस
गांधी म्हणाले की, थोडेफार इकडेतिकडे मुसलमानांकडून काही चुका झाल्याच असल्या, तर धर्माज्ञा म्हणून त्या त्यांनी केल्या आहेत, असे समजून त्यांना हिंदूंनी माफ केले पाहिजे. गांधी म्हणाले की, आपण `शूर मोपला’ म्हणून त्यांना अभिवादन करूया, म्हणजे आपल्या मनात राग नाही, हे त्यांच्या ध्यानात येईल. मुंजे म्हणाले की, या मग्रूर मुसलमानांना मराठ्यांनी अनेकवार चोपून काढले आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांनी घाबरून जायचे नाही. प्रतिकाराची वृत्ती आणि क्षमता ठेवण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली; परंतु पुढे मुसलमानांच्या आंतरराष्ट्रीय निष्ठांवर शिवाजीच्या मावळयांनी यशस्वीपणे चाल करून त्यांना भारताकडे वळवता येते, हे दाखवले आहे’, हेच पुढे महाराष्ट्रातील काँग्रेसजन विसरले. त्यामुळे महाराष्ट्राचा दिल्लीवर वचक राहिला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या या नराधम मोपल्यांना भारत सरकारने `स्वातंत्र्य सैनिक’ म्हणून घोषित केले आणि त्यांच्या वंशजांना मानधन देण्यास सुरुवात केली. मोपल्यांनी हिंदूंवर शस्त्र उगारले, तेव्हा तो हिंसाचार मोडून काढण्यासाठी राज्यकर्ते म्हणून ब्रिटिश पुढे धावले. तेव्हा मोपल्यांनी ब्रिटीशांशी संघर्ष केला. काँग्रेस सरकारने मोपल्यांनी हिंदूंवर अत्याचार केले, ही गोष्ट दडवून ठेवली आणि त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला. एवढेच ग्राह्य मानून त्यांना स्वातंत्र्य सैनिकास प्राप्‍त होणारे लाभ उपलब्ध केले. काँग्रेस शासन महंमद अफझल याला फाशी देत नाही, या करणीला ही पार्श्‍वभूमी आहे. परंपरा आहे. हिंदूंवरील अत्याचार हा काँग्रेसला दखलपात्र अपराध वाटत नाही.

मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुसलमानांशी कठोरपणे आणि दलितांशी सहानुभूतीने वागण्याची आवश्यकता
१२ डिसेंबरला अनेक माणसे या पृथ्वीतलावर आगमन करतात; पण त्यात धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्यासारखा नरसिंह एखादाच असतो. १९२५ पासून मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या मुंजे यांना दिल्या जात होत्या; पण हा धाडशी पुरुष एकदाही डगमगला नाही आणि हिंदु संघटनेसाठी, हिंदु पुरुषार्थ जागवण्यासाठी हिंदुस्थानावर दिवसामागून दिवस चाललेल्या दौर्‍यात एकदाही खंड पडला नाही. ते त्या वेळच्या विधानसभेवर, लोकसभेवर निवडून गेले होते. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेला हिंदु महासभेचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी करून त्यांनी ती परिषद गाजवली होती. गांधींनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केलेली नाही. रत्‍नागिरीत स्वा. सावरकर स्थानबद्ध असतांना त्यांनी सामाजिक समरसतेसाठी अस्पृश्यांसमवेत आयोजिलेल्या एका सहभोजनात मुंजे सामील झाले आणि एक सहस्त्र पान उठले. स्वा. सावरकरांची साथ त्यांनी कधी सोडली नाही आणि टिळकांवरील त्यांची निष्ठा कधी कमी झाली नाही. लोकमान्य हे त्यांचे दैवत होते; पण मुसलमानांना राजकीय लाभांमध्ये झुकते माप देणारा लखनौचा संधी केला, तेव्हा त्यांच्याशी वाद घालायला मुंजे मागे हटले नाहीत. दैवताशी वाद घालण्याची महाराष्ट्राची संत परंपरा आहे, हे सोनिया गांधींसमोर लाचार झालेल्यांना कसे कळणार ? बाळकृष्ण शिवराम मुंजे यांना हिंदु हितापेक्षा काहीही कधीही मोठे वाटले नाही. खुर्चीसाठी त्यांनी कोणाचा विश्‍वासघात केला नाही. खुर्चीसाठी ते लाचार एकदाही झाले नाहीत. गांधींनी आंबेडकरांशी केलेली `पुणे संधी’ प्रसिद्ध आहे; पण त्याचा मुंजे यांच्याशीही संबंध आहे, हे नेतृत्वहीन आजच्या दलितांनी लक्षात घेतले पाहिजे. एकात्मतेसाठी दलितांपेक्षा मुसलमानांचे लाड करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका गांधींनी घेतली होती, तर मुंजे यांचे म्हणणे होते की, लाड कोणाचेही करू नका. तसेच अन्यायही कोणावर करू नका. तथापी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुसलमानांशी कठोरपणे आणि दलितांशी सहानुभूतीने वागण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंची मानसिकता तेजस्वी व्हावी; म्हणून दृष्टी आणि बळ देणारे मुंजे
मुंजे हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते आणि त्याकाळात गांधींना आणि अनेक मुसलमान नेत्यांना त्यांनी घणाघाती आणि तर्कशुद्ध प्रचाराने निरुत्तर केले होते. मोपल्यांच्या बंडाची नुसती चौकशी करून मुंजे थांबले नाहीत. मुसलमानांनी बाटवलेल्या सहस्रावधी हिंदूंपैकी दोन सहस्रांना पुन्हा स्वधर्मात परत आणण्यात त्यांनी यश मिळवले. हिंदुहिताच्या बारीकसारीक गोष्टीत त्यांचे लक्ष असे. मसूरकर महाराजांनी गोव्यात बाटलेल्या शेकडो ख्रिस्त्यांना पुन्हा हिंदू केले; पण त्यांना मुळची हिंदु नावे धारण करू देण्यास गोव्यातील पोर्तुगाल सरकार सिद्ध नव्हते. तेव्हा मुंजे यांनी पोर्तुगालमध्ये जाऊन दार ठोठावले आणि विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मुंजे हे नेत्रतज्ञ होते. शस्त्रक्रिया विशारद होते. संशोधक होते. स्मिथची शस्त्रक्रिया म्हणून नेत्रारोग्य ज्ञानक्षेत्रात एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. तो सिद्धांत त्याआधी बरीच वर्षे डॉ. मुंजे यांनी मांडला होता. त्यांनी नेत्रविकार आणि उपचारांवर संस्कृत भाषेत लक्षणीय ग्रंथनिर्मिती केली आहे. मुंजे यांनी आयुष्यभर हिंदूंची जीवनदृष्टी स्वच्छ आणि तीक्ष्ण करण्याचा प्रयत्‍न केला. हिंदूंच्या मानसिकतेत क्लैब्य राहू नये, हिंदूंची मानसिकता तेजस्वी व्हावी; म्हणून लष्कराच्या भाकर्‍या भाजत त्यांनी आपला जीव पाखडला. १२ डिसेंबरला अनेक जन्मतात, दृष्टी आणि बळ देणारा मुंजे एखादाच असतो.

गांधीवाद आणि सरदार पटेल

सरदार पटेलांसारखा पोलादी पुरुष गृहमंत्री असतांनाही गांधींच्या प्रभावाखालील काँग्रेस मुसलमानांच्या अत्याचारांना प्रतिकार करण्यापेक्षा रक्‍तपात होण्याच्या भीतीने फाळणीला सिद्ध झाली; पण कत्तली पुढेही चालूच राहिल्या. आजही चालूच आहेत. तेव्हा चाकूसुरे होते. आज बाँबस्फोट होत आहेत. आता सरदारांसारखा गृहमंत्रीही काँग्रेसकडे राहिलेला नाही; म्हणून २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याला काँग्रेसकडे उत्तर नाही.

ख्रिस्तीजगताचे नवे वर्ष एक जानेवारीला सुरू होते. आपल्या अस्मितेविषयी विशेष जागरूक असलेले काही लोक सोडले, तर बहुतेक हिंदू १ जानेवारी आणि गुढीपाडवा या दोन्ही दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ साजरा करतात. नव्या वर्षाचे स्वागत करतांना एकमेकांना भेटी देण्याची पद्धत असते. परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने भेटी दिल्या जातात. एकमेकांशी जवळचे संबंध ठेवून परस्परांत सांस्कृतिक देवाणघेवाण करावी, अशी इच्छा निर्माण झाली की, दोन व्यक्‍तीत वा समाजात प्रेमभावना उत्पन्न झाली असल्याचे मानले जाते. १ जानेवारीला गौहत्तीत तीन बाँबस्फोट करून हिंदूंना नववर्षाची भेट देण्यात आली. हे बाँबस्फोट `उल्फा’ या आतंकवादी संघटनेने केल्याचे म्हटले जाते. या संघटनेत इस्लामी आतंकवादी संख्येने अधिक नाहीत. तथापी या संघटनेवर इस्लामी आतंकवादाचा प्रभाव आहे. उल्फा संघटनेचा पैसा बांगलादेशातील बँकांमध्ये ठेवला आहे. पाकिस्तानचे आणि चीनचेही सहकार्य या संघटनेला मिळते. इस्लामी आतंकवाद हा अन्य अनेक प्रकारच्या आतंकवादाचे भारतीय उपखंडातील मोठे प्रेरणास्थान आहे. आपली राजकीय आणि धार्मिक उद्दिष्टे आतंकवादी कृत्ये घडवून साध्य करता येतात, हे इस्लामने भारतीय उपखंडात सिद्ध केल्यामुळे अन्य उद्दिष्टांच्या आणि विचारांच्या संघटनांनाही तसा मोह होऊन त्यांच्या हातून हिंसाचार होणे स्वाभाविक आहे.
दुर्बलांवर अन्याय करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे रक्षण करण्यासाठी सबलांनी सामर्थ्य वापरले पाहिजे, ही हिंदु धर्माची शिकवण
भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसर्‍या क्रमांकाचा म्हणजे १०० कोटीचा देश आहे. सैनिकी सामर्थ्याच्या आणि सैनिक संख्येच्या दृष्टीने जगातील पहिल्या पाच बलवान राष्ट्रांत भारताचा समावेश होतो. पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन ही तीन राष्ट्रे भारताच्या शेजारी आहेत आणि तीच भारताची सर्वांत कडवी शत्रूराष्ट्रे आहेत. पैकी भारताला आतून खिळखिळा करण्याचे उद्दिष्ट चीन अप्रत्यक्षपणे म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याकडून भारताला छळून पार पाडीत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे भारताशी शत्रूत्व करण्याची मुख्य प्रेरणा इस्लाम ही आहे. इस्लामच्या आधी कितीतरी सहस्त्र वर्षे हिंदु धर्म अस्तित्वात आहे. हिंदु धर्माने जगाला शांतता दिली, नैतिकता दिली आणि समाधान दिले. पारलौकिकाविषयीच्या कुतुहलाला विज्ञानाची बैठक हिंदु विचाराने दिली. हिंदूंनी जनक आणि रघु असे राजा निर्माण केले. नीतीमान आणि प्रजाहितदक्ष अशा या राजांच्या पासंगाला पुरेल, असा एखाददुसरा राजाही इस्लामला निर्माण करता आला नाही. भारतीय भावविश्‍वाशी पूर्णपणे विसंगत असा इस्लाम आहे. हिंदु धर्माचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य हे आहे की, सृष्टीच्या आदीशक्‍तीचे आणि सृष्टीतील प्रत्येक चराचर वस्तूचे निश्चित नाते आहे, असे तो मानतो; म्हणून जे सबल घटक असतात, त्यांनी दुर्बलांवर अन्याय करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे रक्षण करण्यासाठी आपले सामर्थ्य वापरले पाहिजे, असे हिंदु धर्माने सांगितले. सबलांच्या हाती हिंदु धर्माने सर्व सत्ता एकवटून दिली नाही. राजावर ऋषींचा दंडक बसवला. त्यामुळे दुर्बलांचा विचार राजाला करावा लागला. इस्लामने पाशवी बळाने आपला विचार प्रस्थापित केला. लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना आपले म्हणणे इस्लामने मान्य करायला लावले. इस्लामचे हे राक्षसी स्वरूप भोळया हिंदूंना सगळेच्या सगळे कळले, असे नाही; परंतु जसे आणि जेवढे कळले, तेवढे सावध होऊन हिंदूंनी इस्लामशी अखंड झुंज दिली. इस्लामची झुंज देतांना हे जडमूळ भारतातून उपटून फेकून दिले पाहिजे, याची जाणीव काहींना होती; कारण तसे शिवाजीने मिर्झाराजे जससिंगाला स्पष्ट सांगितले होते. त्याप्रमाणे मोगलांना आणि इस्लामच्या अन्य पाइकांना खरपूस मार देऊन मराठ्यांनी हिंदवी साम्राज्य भारतभर स्थापन केले.
गांधीयुगाच्या अहिंसापर्वामुळे निरपराध माणसे ठार मारायची, ही आता या देशाची परंपरा
तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, या देशाची परंपरा आमयाहून सुखरूपपणे सुटण्याची आहे, सिंहगडावर डोणागिरी कडा चढून तो सर करण्याची आणि औरंगजेबाच्या तंबूचे कळस पळवण्याची आहे. पहिल्या बाजीरावाचा, जनकोजी शिंद्याचा, बाळकृष्ण शिवराम मुंज्यांचा आणि चापेकर बंधूचा हा देश आहे. सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान या देशात सावरकरांनी निर्माण केले आणि त्या परंपरेने देश स्वतंत्र केला. १ जानेवारीला दुष्ट शक्‍तींनी बाँबस्फोट करून निरपराध माणसे ठार मारायची आणि त्यांचे मृतदेह भेट म्हणून भारत सरकारकडे धाडायचे, ही खरे म्हणजे या देशाची परंपरा गांधीयुगाच्या अहिंसापर्वाला या देशावर लादले तेव्हापासून सुरू झाली. ती कशी ते सरदार पटेलांसारख्या लोहपुरुषाची फाळणीच्या वेळी काय अवस्था झाली होती, हे पाहिल्यावर कळते.
फाळणीचा ठराव मान्य करा, असे सांगणारे गांधी
त्र्यं. रं. तथा मामा देवगिरीकर म्हणून जुन्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे प्रस्थ होते. ते सरदारांच्या आग्रहावरून चिटणीसही झाले होते. १९३५ ते १९५७ पर्यंतच्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांचे जवळजवळ सगळे दायित्व त्यांच्याकडे होते. त्यांनी `वल्लभभाई पटेल : चरित्र व काळ’ नावाचे सुंदर चरित्र १९७१ मध्ये लिहिले. त्यात पटेल म्हणतात, `जेव्हा सर्वस्व गमावण्याच्या अवस्थेला पोहोचलो, तेव्हा अखेरचा आधार म्हणून मी फाळणीला सिद्ध झालो.’ १४ जून १९४७ मध्ये मुंबईत फाळणीवर निर्णय घेण्यासाठी अ.भा. काँग्रेसची सभा झाली. गांधी या सभेत म्हणाले, `काँग्रेस फाळणीला विरोधी आहे आणि मीही सतत त्या गोष्टीला विरोध करत आलो आहे; पण आता मी तुम्हाला हा फाळणीचा ठराव मान्य करा, हे सांगण्याकरता आलो आहे. कधी कधी न रुचणारे निर्णय घेणे भाग पडते. ज्यांना ताबडतोब क्रांती करावयाची आहे किंवा बंड करावयाचे आहे, त्यांना हा ठराव फेटाळून तसे करता येईल; पण त्यांच्यात काँग्रेसची व सरकारची सूत्रे सांभाळण्याची शक्‍ती आहे, असे मला वाटत नाही, माझ्यात आज ती शक्‍ती नाही. अन्यथा मीच एकट्याने बंड पुकारले असते.’
हिंदूंना फसवण्यासाठी आणि इस्लामच्या प्रसारासाठी शक्‍ती वापरणारे गांधीे
गांधींच्या या भाषणाचा अर्थ भयंकर आहे. १९२० मध्ये देशाच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यापासून हत्या होईपर्यंत गांधींनी प्रामुख्याने दोन गोष्टी केल्या. खिलाफत आणि तत्सम चळवळी सुरू करून मुसलमानांच्या हिंसाचाराला उघडपणे आणि अनिर्बंधपणे प्रोत्साहन दिले. हिंदूंना अहिंसाकाताशी जोडून त्यांचे क्षात्रतेज निर्माल्यवत केले. त्या वेळी मुसलमानांना पाकिस्तानची मागणी करण्याचे बळ आले. या मागणीसाठी मुसलमानांनी हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले. या अत्याचारांना पुरून उरण्याची शक्‍ती हिंदूंमध्ये, काँग्रेसमध्ये आणि आपल्या स्वत:त नसल्याने मुसलमानांना पाकिस्तान दिले पाहिजे, असे गांधींनी हिंदूंना सांगितले. गांधी बोलत होते, ते सगळे सत्य नव्हते; कारण फाळणी झाल्यावर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी गांधींनी आपल्यातील शक्‍तीचा पुरेपूर वापर केला. म्हणजे गांधींमध्ये शेवटपर्यंत शक्‍ती होती; पण ती त्यांनी नेहमी हिंदूंना फसवण्यासाठी आणि इस्लामच्या प्रसारासाठी वापरली.
गांधीवादाचा त्याग केला तरच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देता येईल !
या सभेत पटेल म्हणाले, `आमच्यापुढे पर्याय होता, तो एक फाळणी हवी की, अनेक फाळण्या हव्या हा. नऊ महिने आम्ही मुस्लीम लीगसमवेत संयुक्‍त सरकार चालवले. काही सन्मान्य अपवाद सोडले, तर सारे मुसलमान अधिकारी, वरपासून खालच्या चपराश्यांपर्यंत मुस्लीम लीगकरता काम करत होते. लीगला जो जातीय `व्हेटो’ देण्यात आला. त्याने हिंदुस्थानची प्रगती जागोजागी मुस्लीम लीगने अडवली असती.’ परंतु नेहरू पुढे १९४९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये म्हणाले की, `फाळणीचा परिणाम कत्तलीत होणार, हे माहीत असते, तर आम्ही फाळणीला प्रतिकार केला असता.’ म्हणजे मुसलमानांच्या कत्तलींना तोंड देण्याची शक्‍ती हिंदूत नाही; म्हणून फाळणी स्वीकारा, असे गांधी १९४७ पूर्वी म्हणायचे आणि १९४७ नंतर नेहरूंनी कत्तली होणार, हे माहीत असते, तर प्रतिकार केला असता, असे म्हणायचे. गांधी आणि नेहरू दोघेही लोकांना फसवीत होते. पटेलांना एकटे पाडत होते. देवगिरीकर म्हणतात, `गोंविद वल्लभ पंतांनी जून १९४७ च्या अ.भा. काँग्रेस समितीच्या सभेत माऊंटबॅटन योजनेचा ठराव मांडतांना परखडपणे म्हटले की, एकतर ही योजना स्वीकारा किंवा आत्महत्या करा. आमचे पुढारी इतके त्रासले होते. ते भ्याले नव्हते; पण रक्‍तपाताला ते तयार नव्हते; म्हणून रक्‍तपात टाळण्याकरता, लीगच्या त्रासातून सुटण्याकरता त्यांनी दोन्ही अप्रिय गोष्टी पत्करल्या. एक वसाहत स्वराज्याची व दुसरी फाळणीची. सरदार पटेलांसारखा पोलादी पुरुष गृहमंत्री असतांनाही गांधींच्या प्रभावाखालील काँग्रेस मुसलमानांच्या अत्याचारांना प्रतिकार करण्यापेक्षा रक्‍तपात होण्याच्या भीतीने फाळणीला सिद्ध झाली; पण कत्तली पुढेही चालूच राहिल्या. आजही चालूच आहेत. तेव्हा चाकूसुरे होते. आज बाँबस्फोट होत आहेत. आता सरदारांसारखा गृहमंत्रीही काँग्रेसकडे राहिलेला नाही; म्हणून २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याला काँग्रेसकडे उत्तर नाही. गांधीवादापुढे पटेल निष्प्रभ ठरले. तेथे बाकीच्या सोम्यागोम्याचे काय ? म्हणून गांधीवादाचा त्याग केला की, हिंदूंना अवसान येईल आणि ते पाकिस्तान आणि बांगलादेश यांना नववर्षाच्या संस्मरणीय भेटी पाठवू शकतील.

ख्रिस्त्यांना वेदना देणारा ब्रिटनमधील चर्चवरचा क्रॉस हटविणार !

ख्रिस्त्यांना त्यांच्या धार्मिक स्थळांचीच भीती वाटणे, म्हणजे ख्रिस्ती पंथाला लागलेली घरघर !

लंडन, १५ जानेवारी – येथील चर्चने ख्रिस्तीधर्मात पवित्र मानले जाणारे क्रॉस हटविण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रॉसमुळे बालकांमध्ये भीती निर्माण होते, असे सांगण्यात येत आहे. हा निर्णय पश्चिम ससेक्समधील रेव्हरंड इव्हान स्कुटर यांनी घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे, “चर्चवरील क्रॉस पाहून लोकांना अत्यंत वेदना व दु:ख होते. तसेच या वेदनांचे वर्णन करणे अशक्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच हा क्रॉस पाहून काहींना खूप भीती वाटते. त्यामुळे चर्चवरील क्रॉस हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” (चर्चला उशिरा सुचलेले शहाणपण ! ज्या क्रॉसच्या साहाय्याने येशूवर क्रूर अत्याचार केले होते, त्या क्रॉसमधून वेदनादायक व भीतीदायक स्पंदने जाणवणे चुकीचे नाही. – संपादक) सध्या ब्रिटनमधील अनेक चर्चमध्ये जाणे लोक टाळत आहेत. (युरोपमध्ये ख्रिस्तीधर्माला घरघर लागल्याचे आणखी एक उदाहरण ! – संपादक) लोकांनी चर्चमध्ये जाणे सोडून देणे योग्य नसल्याचे येथील ख्रिस्तीपंथाच्या प्रमुखांचे मत आहे.