हिंदूंनो, तुमच्या दु:स्थितीची कारणे ओळखा !

कुठे राष्ट्रद्रोह्यासाठी केवळ तो मुसलमान आहे म्हणून प्रार्थना करणारे मुसलमान, तर कुठे संकटात सापडलेल्या राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी मदत तर लांबच प्रार्थनाही न करणारे हिंदू !

जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये `हिंदु जनजागृती समिती’तर्फे दर आठवड्याला धर्मशिक्षण वर्ग घेण्यात येतो. या वर्गात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील मुसलमानांच्या जत्रेत मुंबईच्या बाँबस्फोटातील भयोत्पादक कसाबसाठी दर्ग्यावर मुसलमान चादरी चढवत असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगावरून एकीकडे धर्मांधतेमुळे राष्ट्रद्रोही कसाबसाठी प्रार्थना करणारे मुसलमान व हिंदुहितासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रप्रेमी हिंदूंवर संकट आल्यावर त्यांच्यासाठी कृतीतर लांबच; मात्र साधी प्रार्थनाही हिंदू करत नाहीत, हा भाग उपस्थितांच्या लक्षात आणून देण्यात आला. या प्रबोधनाने प्रभावित झालेल्या अमळनेर, धरणगाव, पाळधी, फैजपूर व वाघोदा येथील हिंदूंनी धर्माभिमानी हिंदू व हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांपासून त्यांची सुटका व्हावी; तसेच धर्मद्रोही जनता आणि धर्मद्रोही सरकार नष्ट व्हावे, यांसाठी सामूहिक प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. धर्मशिक्षण वर्गाला येणार्‍या हिंदूंनी त्याप्रमाणे कृतीला सुरुवात केली आहे. (धर्मशिक्षण वर्गातील प्रबोधनाप्रमाणे कृतीला सुरुवात करणारे धर्माभिमानीच हिंदूंची दु:स्थिती दूर करण्यासाठी आशास्थान आहेत. – संपादक)


`द स्टोरी ऑफ इंडिया’ माहितीपटाला हिंदु संघटनेचा आक्षेप

न्यूयॉर्क, १४ जानेवारी – इतिहासकार मायकेला वूड यांच्या `द स्टोरी ऑफ इंडिया’ या माहितीपटात `आर्य युरोपातून आले’ ही संकल्पना मांडली असल्याने अमेरिकेतील `हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ या संघटनेने त्याला आक्षेप घेतला आहे. हा माहितीपट दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारीत होत असून त्यात आर्यांच्या स्थलांतराच्या सिद्धांताचे विपर्यस्त सादरीकरण झाले आहे, असा आक्षेप या हिंदुत्ववादी संघटनेने घेतला आहे.

(प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी `आर्य युरोपातून आले’ अशी चुकीची माहिती देणार्‍या चित्रपटाला विरोध करणार्‍या अमेरिकेतील `हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ या संघटनेचे अभिनंदन ! – संपादक) या माहितीपटात वूड यांनी भारताचा गौरव केला असून त्याचे चित्रण चांगले केले आहे; मात्र यातील आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत कुठलीही शहानिशा न करता घुसडण्यात आला आहे, असा मुद्दा संघटनेच्या संचालक शीतल शहा यांनी स्पष्ट केला आहे. आर्य हे मूळचे येथील नसून ते युरोपातून आले, असा सिद्धांत ब्रिटिश वसाहतवादी इतिहासकारांनी मांडला असून त्याला पुरातत्त्वशास्त्रातही कोणताही आधार नाही. हा सिद्धान्त दुषित हेतूने प्रेरित होता, असे श्रीमती शीतल शहा यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे `देवपूजेची पद्धत मध्य आशियातून भारतात आली’, असेही या माहितीपटात म्हटले आहे. त्यावर या संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुहाग शुक्ला यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी म्हटले आहे की, `भारत ही नेहमीच हिंदु संस्कृतीला पोषक असलेली भूमी होती. वेद व पुराणे याची साक्ष आहेत.’ (परदेशात राहून हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगून त्याविषयी प्रसारित होणार्‍या चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घेणार्‍या हिंदूंकडून भारतातील हिंदु शिकतील काय ? – संपादक)