भारताची `आध्यात्मिक राष्ट्र’ अशी ओळख पुन्हा निर्माण करणार !

हिंदुद्वेष्ट्यांना धडकी भरवणारे संतांचे संघटन म्हणजे समष्टी रूपातील ईश्‍वराचे प्रगटीकरण !

`धर्म रक्षा मंचा’च्या सभेत १५० संतांचा `संकल्प’

मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) – देशाला भयोत्पादकतेने ग्रासले आहे. त्यातून देशाचे रक्षण करण्यासाठी भारताची आता `निधर्मी राष्ट्र’ ही ओळख पुसून `आध्यात्मिक राष्ट्र’ अशी ओळख निर्माण करण्याची घोषणा येथील संकल्प सभेत दीडशेहून अधिक संतांनी केली. `धर्म रक्षा मंचा’ने येथील सोमय्या पटांगणामध्ये आयोजित केलेल्या या सभेला दीड लाख हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी २० फेब्रुवारी ते २० मार्च २००९ या कालावधीत धर्मजागृतीसाठी संपूर्ण देश ढवळून काढण्यात येणार आहे. या संकल्पपूर्तीचे दिशादर्शन या सभेला उपस्थित संतांनी आपल्या ओजस्वी वाणीतून उपस्थितांना केले.

…तर सत्ता परिवर्तन होणे गरजेचे ! – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे
अध्यक्ष प.पू. ग्यानदासजी महाराज

अमेरिकेने तिच्यावर भयोत्पादकी हल्ला झाल्यावर त्वरित अतिरेक्यांना पोसणारे राष्ट्र नष्ट केले. आम्ही मात्र हल्ला झाल्यानंतर पुरावे देत आहोत. आम्हाला असे केंद्रातील विधवा शासन नको. या देशातून भयोत्पादकता, धर्मांतर या समस्यांना जडापासून उखडून टाकायचे असेल, तर सत्ता परिवर्तन होणे गरजेचे आहे.

रावण, कंस यांच्या आदेशाने नष्ट न झालेल्या सनातनला शासन काय नष्ट करणार ! – साध्वी ऋतुंबरा
शासनाचा हेतु अशुद्ध आहे; म्हणून सनातन संकटात आहे, असे समजू नका. जे सनातन लंकाधिपतीच्या तलवारीने नष्ट झाले नाही, जे सनातन कंसाच्या आदेशाने नष्ट झाले नाही, ते सनातन आजचे शासन काय नष्ट करणार ? भौतिकवादाच्या वादळाने देशाला घेरले आहे. देशातील तरुणाई दारुच्या बाटल्यांमध्ये शांती शोधत आहे. विज्ञानामागे धावता धावता आम्ही आध्यात्माचा मार्ग सोडून दिला. संतांनी केवळ त्यांच्या साधनेच्या बळावर देश व त्याची संस्कृती सुरक्षित ठेवली आहे. आज राष्ट्राची सुप्‍तावस्थेतील चेतना जागृत करण्यासाठी सर्व संत संघटीत झाले आहेत. अजून कितीकाळ बलिदान द्यायचे ? या देशात तक्षक व राक्षस यांचा वंश आता वाढायला नको. त्यामुळे हिंदूंनो, सत्ता निधर्मी होता कामा नये, लांगूलचालनाची हवा या राष्ट्रात चालणार नाही, मानवांच्या रक्‍ताचे पाट वाहायला नको, राज्यसत्ता कुमकुवत लोकांच्या हातात नको, असा निश्चय या संकल्प सभेच्या माध्यमातून करा.

श्रीकृष्ण व श्रीराम यांचे पराक्रम आठवा ! – प.पू. आसारामजी बापू
साहस, धैर्य, बुद्धी व पराक्रम ज्याच्याकडे आहे, ते परिस्थितीवर मात करून आपले ध्येय साध्य करतात. त्यासाठी आम्हाला श्रीकृष्ण, श्रीराम यांचे पराक्रम आठवावे लागतील.

मग दंडनीतीबाबत शरीयतच्या कायद्याचा स्वीकार मुसलमान का करत नाहीत ? -शंकराचार्य स्वामी गंगा धीरेन
भारतातील मुसलमानांनी पुन्हा स्वगृही हिंदु धर्मात परतावे अन्यथा समान नागरी कायद्याचा स्वीकार करावा. नागरी कायद्याचा जर मुसलमान स्वीकार करत नसतील, तर दंडनीतीबद्दल ते शिक्षेमध्ये क्रूरतेची परिसीमा असलेल्या शरीयतच्या कायद्याचा स्वीकार का करत नाहीत ?

सर्वांत आधी तरुणांना जागृत करण्याचा संकल्प करा ! – जैन मुनी संत विमल महाराज
आम्ही विखुरलेले असल्याने कुमकुवत आहोत. भारतभूमी पवित्र असल्याने आम्हाला तिच्या संस्कृतीरक्षणासाठी जगायचे आहे. संत आणि धर्मनियम हेच सांगतात जेव्हा प्रजा झोपते, तेव्हा तिचा राजाही झोपतो. त्याप्रमाणे आमचे शासन झोपले आहे. आमच्या शिक्षण संस्कृतीतून ख्रिस्ती संस्कृती वाढत आहे. तरुणांमध्ये धर्माभिमान तसूभर नाही. त्यामुळे सर्वांत आधी तरुणांना जागृत करण्याचा संकल्प करायला हवा.

तुम्ही आम्हाला तुमचे तारुण्य द्या, आम्ही तुम्हाला `आध्यात्मिक भारत’ देऊ ! – स्वामी चिन्मयानंद
भयोत्पादनाची समस्या सोडवण्यासाठी अपात्र ठरलेल्या राजकीय पक्षांची आम्हाला लाज वाटते. प्रत्येक वेळी धर्मावर आघात झाल्यावर संतांनीच पुढाकार घेऊन धर्मरक्षणाचे कार्य केल, हा आपला इतिहास आहे. तसे आता भयोत्पादनाची समस्या सोडवण्यासाठी संत पुढे आले आहेत. आम्ही संत भयोत्पादन संपवण्यासाठी तरुणांना आवाहन करतो, “तुम्ही आम्हाला तुमचे तारुण्य द्या, आम्ही तुम्हाला आध्यात्मिक भारत देतो.” आम्हाला निधर्मी संविधान नको, आम्हाला `आध्यात्मिक राष्ट्र’ हवे आहे. ज्या दिवशी भारत आध्यात्मिक राष्ट्र बनेल, तेव्हा ते स्वयंपूर्ण असेल व स्वायत्त असेल.

संतांची क्रांतीच्या दिशेने वाटचाल !
* धर्मरक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांनी शस्त्र उचलणे, सूर्याला झाकणे आदी गोष्टी नियम डावलून केल्या. तसेच आताही धर्मरक्षणासाठी काही गोष्टी संतांना कराव्या लागत आहेत.
* संत आता केवळ गळयात माळा घालणार नाहीत, तर ते आता शस्त्र उचलणार आहेत.
* आम्ही संत आज शांतीसाठी नव्हे, तर क्रांतीसाठी आलो आहोत.
* प्रसिद्धीमाध्यमांनी हिंदु धर्माची बदनामी करणे बंद करावे व `हिंदु दहशतवाद’ हा शब्द स्वत:च्या शब्दकोशातून काढून टाकावा, असे आवाहन, तसेच साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना धर्म रक्षा मंचावर उपस्थित सर्व संत दहशतवादी (भयोत्पादकी) मानत नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन उपस्थित संतांनी केले.

संतांचे हिंदूंना आवाहन !
धर्म रक्षा मंचाचे संयोजक प.पू. हंसदास महाराज म्हणाले, “धर्म रक्षा मंच धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा स्वधर्मात घेण्यास सिद्ध आहे. ज्यांच्या देवांना दगड मारून मारले गेले व सुळावर चढवून मारले गेले, तो देव तुमचे रक्षण काय करणार ? येथे श्रीकृष्ण जन्मतो, तो कंसचा वध करण्यासाठी व राम येतो, तो रावणाचा वध करण्यासाठी. वैदिक परंपरेतील आमचे सर्व अवतार युगानुयुगे दुष्टतेचा संहार करत आले आहेत. ज्या पीर, प्रेषितांनी २०-२० लग्न करूनही त्यांना मुले झाली नाहीत, त्यांच्या दर्ग्यावर जातांना हिंदूंना लाज का वाटत नाही ? आज सर्व हिंदूंनी संकल्प करावा की कोणीही हिंदु दर्ग्यावर जाणार नाही. काय आमचे ३३ कोटी देव महान नाहीत का ?”

हिंदू संतांचे मुसलमान व ख्रिस्ती यांना आवाहन !
* हिंदू काफीर नाहीत, तसेच भारतभूमी `दारुल उल हरब’ (अपवित्र) नसून पवित्र आहे, असा फतवा सर्व मुसलमान धर्मगुरूंनी काढावा.
* ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंच्या देवतांबद्दलचा अपप्रचार न थांबवल्यास संत त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील.

क्षणचित्रे
* संपूर्ण सभेभोवती ॐ चिन्ह असलेले भगवे ध्वज लावण्यात आले होते.
* शेकडो संत विराजमान होतील, इतके भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते.

व्यासपिठाच्या पार्श्‍वभूमीला असलेले `मम दिक्षा हिंदु रक्षा !’ हे वचन, `भगवान श्रीकृष्णाचे विराट रूपाचे चित्र’, तसेच `ॐ’, `स्वस्तिक’, `सुदर्शनचक्र’ व `त्रिशूळ’ यांच्या प्रतीमा असलेला पडदा हिंदूंना क्षात्रवृत्ती वृद्धींगत करण्याचे व संस्कृतीरक्षणाचे आवाहन करत होता.

पुणे येथील पोलिसांचा संतापजनक कारभार : चोर सोडून संन्याशाला फाशी !

राष्ट्राभिमान्यांना अकारण मारहाण करून तुरुंगात डांबणार्‍या पोलिसांना हटवण्यासाठी क्रांतीला सज्ज व्हा !


वाचकहो, हे तुम्हाला गुन्हेगार वाटतात का, हे तुम्हीच ठरवा !

पुणे – प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या विक्रीविरुद्ध तक्रार करण्यास गेलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्याची व `चोराच्या उलट्या बोंबा’ याप्रमाणे पोलिसांकडून संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून त्यांना एक दिवस तुरुंगात डांबण्याची संतापजनक घटना २६ जानेवारी रोजी पुणे येथील शुक्रवार पेठ पोलीस चौकी येथे घडली.
२६ जानेवारी २००९ रोजी दुपारी ४ वाजल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सुनील घनवट, हेमंत शिंदे, नीलेश शिंदे व प्रशांत हिरवे हे पुणे येथील फरासखाना पोलीस ठाणे येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होत असल्यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी घडलेल्या घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे त्यांच्याच भाषेत दिली आहे.
१. आम्ही पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यानंतर एल्.आय.बी.(लोकल इन्फॉर्मेशन ब्युरो)चे काही अधिकारी भेटले व ते `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपट बंद पाडण्यासाठी त्यांनी समितीला कशी मदत केली, हे सांगत होते. हे सर्व बोलणे जवळीकतेने झाले; कारण ते समितीचे कार्य व वरील सर्वांना जवळून ओळखतात.
२. फरासखाना पोलीस ठाण्यातील एल्.आय.बी.चे श्री. दाते तेथे भेटले. त्या वेळी आम्ही त्यांना `प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या विक्रीसंदर्भात तक्रार द्यायची आहे’, असे सांगितले. त्या वेळी त्यांनी `घटना कुठे घडली आहे’, असे विचारले व “तुम्ही संबंधित पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यास गेल्यावर तेथे तक्रार दाखल करून घेतील”, असे सांगितले; परंतु आम्ही त्यांना “आतापर्यंतच्या अनुभवानुसार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करून न घेता आम्हाला पोलीस स्थानकातच पाठवतात”, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी “ठीक आहे. वर जाऊन तक्रार दाखल करा”, असे सांगितले.
३. फरासखाना पोलीस स्थानकात गेल्यावर तक्रारीसंदर्भात सांगितले, तेव्हा “आमचे वरिष्ठ बाहेर गेलेले आहेत. ते आल्यावर तुम्ही तक्रार दाखल करा”, असे सांगितले. त्या वेळी आम्ही त्यांना “पोलीस निरीक्षक नसतील, तर दुसरे कोणी तक्रार दाखल करून घेतात का ?”, असे विचारले. त्या वेळी त्यांनी “ते आल्यावरच ते तक्रार दाखल करून घेतील किंवा तुम्ही गुन्हा कुठे घडला आहे, त्या पोलीस चौकीला जाऊन तक्रार दाखल करा”, असे त्यांनी सांगितले. यावर आम्ही त्यांना “पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करून न घेता आम्हाला पोलीस स्थानकातच पाठवतात”, असे यापूर्वीचे आमचे अनुभव सांगितले. त्या वेळी त्यांनी “साहेबांना अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच ठिकाणी (पोलीस चौकीमध्ये) जाऊन तक्रार दाखल करा”, असे सांगितले व स्थानिक पोलीस चौकीला दूरध्वनी करून आम्हाला तेथे पाठवले.
त्यानुसार आम्ही शुक्रवार पेठ पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी गेलो. त्या वेळी उपस्थित हवालदारांनी नेहमीप्रमाणे `गुन्हा कुठे घडला ?, आमच्या पोलीस चौकीच्या हद्दीत ते ठिकाण आहे का ?’, अशा प्रकारचे प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले. (गुन्हा नोंदवून घेतांना हद्दीचा प्रश्‍न उपस्थित करणारे कामचोर पोलीस ! – संपादक)

श्री. सुनील घनवट (आग्रहाने) : साहेब, ही राष्ट्रध्वजासंदर्भातील तक्रार असून ती कुठे घडली, यापेक्षा ती नोंदवून घेणे महत्त्वाचे आहे.
हवालदार : राष्ट्रध्वजाची विक्री करणारे दुकान कोणत्या हद्दीत आहे, हे आम्हाला दाखवा.
त्यानंतर त्यांना आम्ही ज्या दुकानातून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज खरेदी केले, त्या दुकानाची त्यासंदर्भातील पावती दाखवली. त्यावरून ते दुकान त्याच पोलीस चौकीच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट होत होते; परंतु तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यासाठी ते हद्दीचा विषय बोलत होते.
हवालदार : तुम्ही आमच्याबरोबर दुकानात चला, म्हणजे आम्ही ते आमच्या हद्दीत आहे का, ते पहातो.
श्री. सुनील घनवट : साहेब, त्या पावतीवर स्पष्ट उल्लेख आहे, तुम्ही हवं तर खात्री करून या.
यानंतर आम्ही तेथील संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांचा, म्हणजे पोलीस उपनिरीक्षिका सौ. बिडवे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संबंधित विषय सांगितला. त्या वेळी “१५ मिनिटांमध्ये मी पोलीस चौकीत येते. तोपर्यंत तुम्ही आमच्या हवालदारांना ते दुकान कुठे आहे, ते दाखवा, म्हणजे ते आमच्या हद्दीत आहे का, ते लक्षात येईल”, असे त्या म्हणाल्या. त्यानुसार उपस्थित कार्यकर्ते श्री. नीलेश शिंदे हे हवालदारास सदर दुकान दाखवून आले. (हद्दीचा प्रश्‍न सातत्याने उपस्थित करून पोलीस प्रक्रिया करण्यास टाळाटाळ करणार्‍या अशा पोलिसांना जनतेच्या पैशांवर पोसायचे कशाला ? – संपादक)

सामंजसपणे बोलणार्‍या कार्यकर्त्यांवर अकारण रागावून पोलीस उपनिरीक्षिकेने त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे `ही मुले गोंधळ घालत आहेत’, अशी खोटी तक्रार करणे
पोलीस उपनिरीक्षिका सौ. विमल बिडवे पोलीस चौकीत आल्यावर आम्हाला त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. आल्यावर त्या घाईतच होत्या. (त्या वेळी पोलीस चौकीच्या बाहेर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.) आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर तेथे ५-६ महिला उपस्थित होत्या. आम्हाला बसायला जागाही न देता व आमच्या तक्रारीकडे गांभीर्याने न पहाता त्या महिलांच्या उपस्थितीतच आम्हाला आमचे काय म्हणणे आहे, ते विचारले. (पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांकडे नव्हे, तर हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाकडे जास्त लक्ष देणार्‍या उपनिरीक्षिका सौ. बिडवे ! – संपादक) प्रत्यक्षात आम्ही जे सांगत होतो, ते खूप ऐकून न घेता त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दूरध्वनी लावला. तत्पूर्वी कार्यकर्ते श्री. हेमंत शिंदे हे `आम्ही कोणत्या उद्देशाने येथे आलो आहोत’, हे सांगण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संवाद साधत होते. हा संवाद साधत असतांनाच सौ. बिडवे यांनी त्यांच्या वरिष्ठांना दूरध्वनी लावला व त्यावरूनच वरिष्ठ जे प्रश्‍न विचारत होते, तेच आम्हाला त्या विचारत होत्या. याप्रमाणे त्यांनी श्री. हेमंत शिंदे यांचे नाव व वय विचारले व श्री. सुनील घनवट यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सांगितले. पूर्णनाव विचारल्यानंतर पूर्ण नाव सांगितले. लगेचच त्यांनी वय विचारले. त्या वेळी श्री. सुनील घनवट यांनी “सर्वच माहिती तुम्ही दूरध्वनीवरून कशाला घेता आहात, साहेब प्रत्यक्ष येणारच आहेत, तर ते आल्यावर आम्ही सर्व माहिती देणारच आहोत”, असे सांगितले; परंतु असे सांगितल्यानंतर सौ. बिडवे यांच्या रागाचा पारा अनावर झाला व त्यांनी दूरध्वनीवरूनच वरिष्ठांना “ही आलेली मुले माझे ऐकत नाहीत. या ठिकाणी गोंधळ घालत आहेत”, असे सांगितले.
त्यानंतर श्री. सुनील घनवट एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी तेथून उर्वरित कार्यकर्त्यांना सांगून निघाले.

तक्रार दाखल करण्यासाठी अधिकार्‍यांची वाट पहात उभे असलेल्या कार्यकर्त्यांची कोणतीही चौकशी न करता व त्यांचे काहीही ऐकून न घेता अश्लील शिव्या देत अमानुष मारहाण करण्यास सुरुवात करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी म्हणजे खाकी वर्दीतील गुंड !
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पवार त्या पोलीस चौकीमध्ये आले. तेव्हा त्यांनी पोलीस चौकीच्या दारात त्यांची वाट पहात उभे असलेल्या आम्हा कार्यकर्त्यांची कोणतीही चौकशी न करता आल्या आल्या आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या अधिकार्‍यांसह असलेल्या अन्य पोलिसांनी आम्हाला मारत मारतच आतमध्ये नेले. त्यानंतर कार्यकर्ते श्री. प्रशांत हिरवे यांना सर्वांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारले. उर्वरित श्री. हेमंत व श्री. नीलेश शिंदे यांनाही ते अमानुषपणे मारत होते व आई-बहिणीवरून अश्लील शिव्या देत होते. “माज आला आहे का ? भडव्यांनो, तुमच्या गांडीवर लाथा घातल्या पाहिजेत, फालतू कुठले चार जण येतात व तक्रार दाखल करतात. पुढारी व्हायला चाललात का ? कसली जागृती करताहेत, लेडी पी.एस्.आय बघून तुम्ही गोंधळ घालता का ? भेंच्योत, मादरच्योत, मस्ती आली आहे का ?” वगैरे शिव्यांची लाखोली वाहत होते.
श्री. हेमंत शिंदे हे त्या अधिकार्‍यांना `आम्ही कशासाठी आलो आहोत’, हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवत असतांना व त्याबद्दल सांगत असतांना कोणीही त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना अर्वाच्च शिव्या देत मारत होते. तिघा कार्यकर्त्यांना मारत ६ ते ८ जण एकाच वेळी लाथाबुक्क्यांनी मारत होते.
त्यानंतर श्री. प्रशांत हिरवे यांनी श्री. सुनील घनवट यांना भ्रमणध्वनी केला व “तुम्ही या ठिकाणी त्वरित या”, असे सांगितले. त्या वेळी श्री. घनवट तेथे पोहोचले. त्या वेळी पोलिसांनी त्यांना तेथील मुख्य कार्यालयात शिव्या देत नेले व तेथे त्यांची कोणतीही गोष्ट ऐकून न घेता वरील प्रकारे शिव्या देत पोलिसांनी मारहाण केली. या वेळी आमचा (कार्यकर्त्यांचा) पोलीस चौकीत येण्यामागचा उद्देश काय आहे, हे कोणीच ऐकून घेत नव्हते.
पोलीस उपनिरीक्षिका सौ. बिडवे यांनी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष आल्यावर जे काही त्या अधिकार्‍यांना सांगितले होते, त्या गैरसमजातून व पूर्वग्रहातून ते सर्व आम्हाला आमानुष पद्धतीने मारहाण करत होते, असे लक्षात आले.

कार्यकर्त्याला मारहाण करत त्यास टेबलवर ढकलून देऊन टेबलवरची काच फुटण्यास स्वत:च कारणीभूत असतांना `सदर काच कार्यकर्त्यांनी बुक्की मारून फोडली’, अशी
खोटी नोंद तक्रारीमध्ये करणे, ही पोलिसांची हुकूमशाही !

श्री. सुनील घनवट यांना मारहाण करत असतांना पोलीस निरीक्षक श्री. पवार यांनी श्री. घनवट यांना तेथील टेबलवर ढकलून दिले. त्या वेळी कदाचित तेथील टेबलवरील काच फुटली असावी; मात्र नंतर पोलिसांनी आमच्याविरुद्ध (कार्यकर्त्यांविरुद्ध) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये `सदर काच कार्यकर्त्यांनी बुक्की मारून फोडली’, असे म्हटले आहे.

कार्यकर्त्यांचे म्हणणे काहीच ऐकून न घेता त्यांना उद्धटपणे व अरेरावीच्या भाषेत बोलत `तुमचे `रेकॉर्ड’ खराब करतो’, अशी धमकी देणारे कायदाद्रोही पोलीस !

त्यानंतर पोलिसांनी आम्हाला (कार्यकर्त्यांना) खाली बसण्यास सांगितले. `आमचे चुकले असेल तर आम्हाला माफ करा. आमचा उद्देश असा काहीही नव्हता. मॅडमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे’, असे पोलीस अधिकार्‍यांना सांगत असतांना ते ऐकून न घेता उद्धटपणे व अरेरावीच्या भाषेत श्री. पवार व श्री. धुमाळ हे “तुम्हाला पुढारीपणा काय आहे ते दाखवतोच, तुमचे रेकॉर्ड खराब करतो,’ असे बोलत होते.
त्या वेळी श्री. सुनील घनवट यांनी त्यांना “मी हिंदु जनजागृती समितीचे कार्य पहातो. आमची सर्व आंदोलने ही सनदशीरमार्गांनी असतात, हे तुम्हाला माहीत आहे. आम्ही येथे चुकीचे असे काही केलेले नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे”, असे सांगण्याचा प्रयत्‍न करत असतांनाच पोलीस निरीक्षक श्री. पवार हे त्यांना “कसली जागृती करतोस ? तुझ्याकडे बघतोच, बाईशी तुम्ही कसे वागले पाहिजे, हे कळत नाही का तुम्हाला ?,’ याच गोष्टीचा ते सतत उल्लेख करत होते. (समोरच्या व्यक्‍तीचा मुद्दा समजून न घेता त्यावर अनाठायी आरोप करत हाणामारी करत सुटलेले लोकशाहीद्रोही पोलीस ! – संपादक)

शिव्या देणे व अर्वाच्च भाषेत बोलणे, यांशिवाय बोलता न येणारे गुंडप्रवृत्तीचे पोलीस उपनिरीक्षक !
त्या वेळी श्री. पवार यांच्यासोबत उपस्थित असणारे पोलीस उपनिरीक्षक
श्री. धुमाळ त्या पाऊण तासाच्या कालावधीमध्ये सतत आम्हा सर्वांना शिव्या देत होते व अर्वाच्च भाषेत संभाषण करत होते. ते श्री. पवारसाहेबांच्या पुढे पुढे करत होते.

कार्यकर्त्यांची कोणतीच बाजू ऐकून न घेता एकतर्फी गुन्हा दाखल करण्याचा हुकूम सोडणारे पोलीस अधिकारी !
त्यानंतर त्या अधिकार्‍यांनी श्री. घनवट यांना उर्वरित तिघा कार्यकर्त्यांसमवेत खालच्या खोलीत बसण्यास सांगितले व “या सर्वांवर गुन्हा दाखल करा”, असे पोलीस कर्मचार्‍यांना सांगितले.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणे, हा कायद्यानुसार गुन्हा असतांना `तो गुन्हा कसा नाही’, हे सांगणारे व्यापारी व त्या व्यापार्‍यांची बाजू घेणारे आणि राष्ट्रप्रेमी कार्यकर्ता बाजू मांडू लागल्यास त्यास अर्वाच्च भाषेत बोलणारे राष्ट्रद्रोही पोलीस अधिकारी !
त्यानंतर १० मिनिटांनी अधिकार्‍यांनी श्री. सुनील घनवट यांना पुन्हा कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी ज्या व्यापार्‍यांविरुद्ध तक्रार दाखल करायची होती ते व अन्य ६-७ व्यापारी त्या पोलीस निरीक्षकांसमोर बसले होते आणि ते `प्लास्टिकचा राष्ट्रध्वज विकल्याने कोणताही गुन्हा कसा होत नाही’, हे समजावून सांगण्याचा प्रयत्‍न करत होते. ते प्रत्यक्षात झालेल्या प्रकाराच्या विरोधात साहेबांना खूष करण्यासाठीच बोलत होते. त्या वेळी शासनाचा अध्यादेश (जी.आर.) श्री. घनवट यांना दाखवून त्यात `प्लास्टिकचे ध्वज विकण्यास कुठे बंदी आहे ?’, असे विचारत होते. यावर श्री. घनवट यांनी त्या अध्यायदेशामध्ये सदर मुद्दा असल्याचे सांगण्यास सुरुवात केल्यावर त्यांचे काहीच ऐकून न घेता पोलिसांनी पुन्हा अरेरावीच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्या वेळी उपस्थित व्यापारी “राष्ट्रध्वजाची तक्रार गौण असून तुमचे वागणे चुकीचे आहे”, हे साहेबांसमोर सांगण्याचा प्रयत्‍न करत होते.

स्वत: जनतेचे सेवक असतांना तक्रार करण्यास आलेल्या कार्यकर्त्यांवर गुंडगिरी करणारे व `चोराच्या उलट्या बोंबा !’ याप्रमाणे उलट कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबणारे मोगलांचे वंशज शोभणारे पोलीस अधिकारी !

त्यांनतर श्री. घनवट यांना खाली बसवून सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या वेळी `गुन्हा दाखल करू नये व काही मदत मिळावी’, यांसाठी `आम्हाला आमच्या घरातील किंवा ओळखीच्या लोकांशी बोलू द्या,’ अशी कार्यकर्त्यांनी खूप विनवणी केली, तरीही कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही व अवघ्या १५ मिनिटांत सर्वांवर भा.दं.वि.च्या कलम ३५३, ४२७, ३४, तसेच क्रिमीनल लॉ सेक्शन ७ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात सर्वांना नेण्यात आले. त्यानंतर चौघांना फरासखाना पोलीस ठाण्यात एका रात्रीसाठी तुरुंगात ठेवण्यात आले.

लोकप्रतिनिधी व अन्य लोकांनी `कार्यकर्ते असे करू शकणार नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे’, असे सांगून कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्यास सांगितल्यावर `वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत हा विषय पोहोचवल्यामुळे तसे करू शकत नाही’, असे सांगणारे पोलीस अधिकारी !
आम्हा कार्यकर्त्यांना पोलीस वैद्यकीय तपासणीला घेऊन गेल्यानंतर तेथे श्री. नीलेश शिंदे यांचे काका श्री. राजेश शिंदे व त्यांच्या ओळखीचे काही ज्येष्ठ लोक आणि स्थानिक नगरसेवक आले होते. त्यांनीही पोलीस निरीक्षक श्री. पवार यांना दूरध्वनीवरून “सदर कार्यकर्ते आमच्या ओळखीचे असून ते असे कधी करू शकणार नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेऊन त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत”, असे त्यांना सांगितले; परंतु पोलीस निरीक्षक श्री. पवार यांनी हा सर्व विषय अत्यंत तत्परतेने ए.सी.पी. व डी.सी.पी. यांच्यापर्यंत पोहोचवला व “वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत हा विषय पोहोचवला असल्यामुळे मी आता काहीही करू शकत नाही”, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांची गुंडगिरी लपवण्यासाठी कार्यकर्त्यांवर खोटारडे आरोप करणार्‍या पोलीस उपनिरीक्षिका !
पोलीस उपनिरीक्षिका सौ. बिडवे यांच्याशी आमचे (कार्यकर्त्यांचे) प्राथमिक बोलणे त्या बसत असलेल्या कार्यालयात झालेले होते, तरीही सौ. बिडवे याबाबत सांगतांना “हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या १५० महिला उपस्थित असतांना हे कार्यकर्ते माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागले”, असे खोटे सांगत होत्या. प्रत्यक्षात असे काहीही झाले नव्हते.

निरपराध कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणारे जनतेचे सेवक नव्हे, तर गुंड पोलीस !
पोलिसांनी आमच्याविरुद्ध (कार्यकर्त्यांविरुद्ध) दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये `कार्यकर्त्यांनी पोलिसांचा एकेरी उल्लेख केला, शिपायांना `शिपुरड्या’ म्हटले, हवालदारांची गचुंडी पकडून त्यांना ढकलून दिले, बुक्क्या मारून टेबलवरील काच फोडली व सरकारी कामात अडथळा आणला’, असे नमूद केले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात हे सर्व आरोप खोटे आहेत.

निरपराध लोकांशी मुजोरीने वागून मोगली सत्तेची आठवण करून देणारे व नंतर पोलिसांच्या विरोधात न जाण्याचा सल्ला (नव्हे एक प्रकारची धमकी) देणारे पोलीस !
दुसर्‍या दिवशी, म्हणजे २७.१.२००८ रोजी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्य घेण्यासाठी आमच्यापैकी काही कार्यकर्ते शुक्रवार पेठ पोलीस चौकीत गेले. त्या वेळी तेथील काही पोलीस “तुम्ही पोलिसांबरोबरच राहून काम केले पाहिजे. कोणतीही संघटना पोलिसांच्या विरोधात जाऊन काम करूच शकत नाही”, असे समजावून सांगत होते.

पोलिसांनो, जनतेशी प्रथम मगु्ररीने वागायचे व परिस्थिती उलटून स्वत: अडचणीत येणार, असे वाटल्यावर प्रेमाने वागण्याचा व मदत करत असल्याचा आव आणायचा, या तुमच्या ढोंगीपणाला भुलायला जनता दूधखुळी नाही, हे लक्षात ठेवा !
पहिल्या दिवशी (२६ जानेवारी रोजी) आम्हा कार्यकत्यांना मारहाण करणे व आमच्या विरोधात तक्रार करणे यांमध्ये सहभागी असलेले सर्व पोलीस दुसर्‍या दिवशी आम्ही जामिनावर सुटल्यावर सर्व कार्यकर्त्यांशी अत्यंत शांतपणे, प्रेमाने व `आम्ही तुम्हाला मदत कशी करतो’, हे दाखवण्याच्या या आविर्भावाने वागतांना व बोलतांना दिसत होते.

सत्य परिस्थिती नाकारणार्‍या पोलीस उपनिरीक्षिका !
सदर प्रकार पोलिसांच्या गैरसमजातून झाल्याचे सांगून कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्यासंदर्भात अनेक व्यक्‍तींचे व लोकप्रतिमनाला झालेल्या जखमा सर्व ठिकाणच्या जनताद्रोही व अत्याचारी पोलिसांचा नायनाट केल्याशिवाय कधीही भरून येणार नाहीत. द्रौपदीने कौरवांनी केलेल्या अत्याचारांची जाणीव पांडवांना सतत करून देण्यासाठी आपले केस मोकळे ठेवले होते. त्याचप्रमाणे आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येऊन सर्वत्रच्या मग्रूर पोलिसांना योग्य धडा शिकवीपर्यंत दररोज त्या प्रसंगांची आठवण मनात ठेवा, म्हणजे जनताद्रोही पोलिसांविरुद्धचा सूडाग्नी धगधगता ठेवा !


वाचकांना विनंती व साधकांना सूचना

अन्यायकारक वागणूक देणार्‍या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे व न्यायालयीन अन्याय निवारण समितीकडे तक्रार करा !
पोलीस हे जनतेचे सेवक आहेत; पण बहुतांश वेळा सर्वसामान्य जनतेला त्यांचा उलट अनुभव येतो. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्यांना तासन्तास ताटकळत ठेवणे, त्यांची तक्रार नोंदवून न घेणे, तक्रारदारांशी उद्धटपणे बोलणे, दमदाटी करून तक्रारदाराच्या मनाचे खच्चीकरण करणे, तक्रार नोंदवून घेण्यासाठी पैशांची मागणी करणे, तक्रारदाराला निष्कारण धक्काबुक्की करणे, तक्रार करणार्‍याविरुद्धच खोटा गुन्हा दाखल करणे या व अशा विविध प्रकारांमुळे पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. पोलिसांकडून होणार्‍या अशा अन्यायाबद्दल त्यांच्या वरिष्ठांकडे, म्हणजे संबंधित पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, स्थानिक आमदार वगैरेंकडे तक्रार करा आणि त्याची एक प्रत न्यायालयीन अन्याय निवारण समितीकडे पुढील पत्त्यावर पाठवा.
न्यायालयीन अन्याय निवारण समिती, बी.जी. – ३, तळमजला, मार्विल अपार्टमेंट, फेज – २, सांताक्रूज, फोंडा, गोवा. ४०३४०१

जनेतला अन्यायकारक वागणूक देणार्‍या पोलिसांवर योग्य वेळी कारवाई करण्यासाठी त्यांची यादी बनवा !
वाचक व साधक यांनी कर्तव्यपराङ्मुख व जनेतला अन्यायकारक वागणूक देणार्‍या पोलिसांची पुढील कारवाईसाठी यादी बनवावी. त्यामध्ये संबंधित पोलिसाचे पूर्ण नाव, बक्कल क्रमांक, पद व शक्य असल्यास त्याच्या घरचा पत्ता आदी माहितीचा समावेश असावा. नंतर प्रसंगांनुरूप लक्षात येणार्‍या अन्यायकारी पोलिसांची नावे त्या त्या वेळी त्या यादीत अंतर्भूत करावीत. काही महिन्यांतच होऊ घातलेल्या निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू.

लोकहो, तुम्हाला पोलिसांनी दिलेल्या अन्यायकारक वागणुकीचा सूडाग्नी योग्य वेळ येईपर्यंत धगधगत ठेवा !
लोकहो, जनतेच्या पैशावर पोसले जाणारे बहुतांश पोलीस जनतेशी मगु्ररीने वागतांना व अन्यायकारक वागणूक देतांना आढळतात. त्याचा अनुभव तुमच्यापैकी काहीजणांनी कमी-जास्त प्रमाणात घेतलेला आहे व घेत आहेत. पोलिसांनी तुम्हाला दिलेल्या अन्यायकारक वागणुकीमुळे तुमच्या मनाला झालेल्या जखमा सर्व ठिकाणच्या जनताद्रोही व अत्याचारी पोलिसांचा नायनाट केल्याशिवाय कधीही भरून येणार नाहीत. द्रौपदीने कौरवांनी केलेल्या अत्याचारांची जाणीव पांडवांना सतत करून देण्यासाठी आपले केस मोकळे ठेवले होते. त्याचप्रमाणे आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येऊन सर्वत्रच्या मग्रूर पोलिसांना योग्य धडा शिकवीपर्यंत दररोज त्या प्रसंगांची आठवण मनात ठेवा, म्हणजे जनताद्रोही पोलिसांविरुद्धचा सूडाग्नी धगधगता ठेवा !

चांगल्या पोलिसांची नावे कळवा !
ज्या पोलिसांकडून जनतेला चांगली वागणूक दिले जात आहे, त्या पोलिसांचीही यादी बनवा. ईश्‍वरी राज्यात चांगल्या पोलिसांच्या गुणवत्तेचे कौतुक करून त्यांची महत्त्वाच्या जागांवर नेमणूक करण्यास नवीन सरकारला सांगू.

पुणे पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण : खोट्या गुन्ह्यांखाली अटक

जनहो, तुम्हाला पोलिसांनी दिलेल्या अन्यायकारक वागणुकीचा सूडाग्नी योग्य वेळ येईपर्यंत धगधगत ठेवा !

हिंदु जनजागृती समिती मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार !

पुणे, २९ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती विविध संघटनांच्या सहकार्याने गेल्या सहा वर्षांपासू्न `राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवत आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून यंदा २६ जानेवारी रोजी समितीचे चार कार्यकर्ते राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल करण्याकरता शुक्रवार पेठ पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना अटक केली. (आपण पोलीस आहोत, म्हणजे जनतेशी कसेही वागले, तरी चालेल, असे पोलिसांना वाटते कि काय ? जनतेने घाम गाळून भरलेल्या करांतून पोलीस पगार घेतात व ते जनतेचे मालक नव्हे, तर सेवक आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)
पोलिसांनी दिलेल्या या अन्याय्य वागणुकीच्या विरोधात समिती पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागणार असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांना सांगितले.


पोलिसांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाचा हिंदुत्ववाद्यांचा इशारा
या घटनेचा हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत तीव्र निषेध केला. येत्या ७ दिवसांत कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्यांना मारहाण करणार्‍या सर्व पोलिसांवर कडक कारवाई न केल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्याचबरोबर प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची बेकायदेशीर विक्री करणार्‍या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणीही या परिषदेत करण्यात आली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे व नगर जिल्ह्याचे प्रवक्‍ते श्री. सुनील घनवट, पुणे जिल्हा समन्वयक श्री. सारंग अकोलकर, समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. अनिल शिरोळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष श्री. संदीप खर्डेकर, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे, शिवसेनेचे श्री. सुनील जाधव, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. राज यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर प्रवक्‍ते श्री. नवनाथ बांदल व हिंदु एकता आंदोलनाचे अधिवक्‍ता राजीव देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी या घटनेत प्रत्यक्ष उपस्थित असणारे समितीचे श्री. सुनील घनवट यांनी सर्व घटनाक्रम उपस्थितांसमोर मांडला.


हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांत एकजूट

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या निघृण मारहाणीचे पडसाद हिंदुत्ववादी संघटनांत उमटले. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री मिलिंद एकबोटे, सुनील घनवट, सारंग अकोलकर, अँड्. राजीव देशपांडे, नवनाथ बांदल.
या वेळी संदीप खर्डेकर व अनिल शिरोळे हेही उपस्थित होते .


पोलीस उपायुक्‍त खैरे यांच्याकडे तक्रार दाखल
पोलिसांच्या या अन्यायाच्या विरोधात समितीने काल परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्‍त श्री. चंद्रकांत खैरे यांच्याकडे तक्रार केली. या वेळी श्री. खैरे यांनी येत्या ७ दिवसांत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन समितीच्या शिष्टमंडळाला दिले. या तक्रारीची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पुणे जिल्हाधिकारी व पुणे शहर पोलीस आयुक्‍त यांना पाठवण्यात आली आहे.

पोलिसांची निष्क्रीयता निषेधार्ह !
आपल्या पोलीस ठाण्याच्या किंवा चौकीच्या कार्यक्षेत्रात घडणार्‍या गुन्ह्यांबाबत पोलीसच जागरूक असायला हवेत व ते गुन्हे त्यांच्या लक्षात आले पाहिजेत. असे असतांना तसे पोलिसांकडून होत तर नाहीच; पण कोणी जागरूक नागरिक गुन्ह्यांसंदर्भात तक्रार घेऊन आल्यास त्यांना अशा पद्धतीची चुकीची वागणूक दिली जाते, हे निषेधार्ह आहे.


या प्रकरणी धर्माभिमानी हिंदू, तसेच समस्त लष्कर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व अधिवक्‍ता श्री. प्रशांत यादव यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत केली. (हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांच्या मदतीसाठी धावून येणारे धर्माभिमानी व अधिवक्‍ता श्री. प्रशांत यादव यांचे अभिनंदन ! त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. – संपादक)

हिंदुत्ववादी नेते श्री. प्रमोद मुतालिक यांची अटक निषेधार्ह !

कर्नाटक येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईच्या संदर्भात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची भूमिका

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेण्यास निष्क्रीय पोलीस प्रशासन व ६१ वर्षांतील सरकारे उत्तरदायी

मंगळुरू शहरात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पबमध्ये जाऊन अश्लील अंगविक्षेप करत नाचणार्‍या तरुणींना मारहाण केल्याच्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत सेनेच्या २७ कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई केली आहे. तसेच प्रखर हिंदुत्ववादी व श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनाही अटक अटक केली आहे. श्री. प्रमोद मुतालिक यांच्यासारख्या राष्ट्र व धर्म यांसंदर्भातील उत्तम कार्य करणार्‍या हिंदु नेत्याला विनाकारण अटक करणे निषेधार्ह आहे; कारण ते या प्रसंगात कुठेच सहभागी नव्हते, शिवाय त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घडलेल्या प्रसंगाबद्दल क्षमाही मागितली आहे. `श्री. मुतालिक यांना धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या एका जुन्या प्रकरणासाठी अटक करण्यात आली आहे’, अशाही बातम्या येत आहेत. असे असेल, तर पबप्रकरणी श्रीराम सेना बदनाम होत असतांना जुने एखादे प्रकरण उकरून काढून आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करणे, हे एक प्रकारचे षडयंत्र आहे आणि ते निश्चितच निषेधार्ह आहे. जुन्या प्रकरणासाठी आता अटक करणे, हे सरकारची अकार्यक्षमता दर्शवणारे आहे.

समाजविघातक कृत्ये रोखण्याकरता जनतेला कायदा हातात घ्यावा लागण्यास निष्क्रीय पोलीसच उत्तरदायी !
पबमध्ये अश्लील अंगविक्षेप करत तरुणींनी नाचणे, हे समाजाच्या नैतिक अध:पतनाचेच एक लक्षण आहे. खरेतर कोणत्याही समाजविघातक कृत्यांना आळा घालणे व ती कृत्ये करणार्‍यांवर कारवाई करणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे; परंतु पोलीस व पर्यायाने सरकार अशा गोष्टींीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते. त्यामुळे समाजामध्ये अनेक समाजविघातक प्रवृत्ती बोकाळतात. नीतीमत्तेचा र्‍हास घडवणार्‍या व भारतीय संस्कृतीला काळीमा फासणार्‍या अशा गोष्टी रोखण्यासाठी सरकार व पोलीस यांच्या निष्क्रीयतेला कंटाळून कोणी स्वधर्मरक्षणाच्या उद्देशाने पुढे सरसावला, तर लगेच `कायदा हातात घेतला’ म्हणून ओरड मारून त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो, हे अयोग्य आहे. म्हणजे `आम्हीही काही करणार नाही; पण तुम्ही काही केलेत, तर खबरदार !’, अशी जणू धमकीच अशा कारवाईतून पोलीस समाज व देश हित इच्छिणार्‍या लोकांना देतात, हे लक्षात येते.

पबमधील समाजविघातक कृत्यांना ६१ वर्षांच्या काळात शिक्षणातून धर्मशिक्षण वगळणारी सर्वपक्षीय सरकारेच उत्तरदायी !
समाजातील तरुणवर्ग समाजविघातक गोष्टींकडे वळण्यामागील मूळ कारण म्हणजे त्यांच्यातील नीतीमूल्यांचा र्‍हास हे आहे आणि नीतीमूल्यांचा र्‍हास होण्याचे कारण म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव. गेल्या ६१ वर्षांच्या काळात सर्वपक्षीय सरकारांनी निधर्मी लोकशाहीच्या नावाखाली शिक्षणातून मुलांना पाश्चात्त्य संस्कृतीचे धडे दिले व धर्मशिक्षण पूर्णत: डावलले. धर्मशिक्षणाच्या अभावी मुलांकडून, अर्थात समाजाकडून धर्माचरण झाले नाही. त्यामुळे साहजिकच नीतीमूल्यांचा र्‍हास झाला व पबमध्ये अश्लील अंगविक्षेप करत तरुणींनी नाचण्यासारखी कृत्ये घडू लागली. लहानपणापासूनच मुलांना धर्मशिक्षण दिले असते, तर त्यांच्याकडून धर्माचरण होऊन आपोआपच नीतीमूल्ये जोपासली गेली असती व समाजविघातक कृत्यांना आपोआपच आळा बसला असता.

पत्रकारांचा संभाव्य प्रश्‍न : श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पबमध्ये जाऊन तरुणींना केलेल्या मारहाणीला तुमचे समर्थन आहे का ?
उत्तर : नाही. आम्ही त्याचा निषेध करतो; पण अशा गोष्टी घडण्यास निष्क्रीय पोलीस प्रशासन व ६१ वर्षांतील सरकारे कशी जबाबदार आहेत, ते आपणाला आता सांगितलेलेच आहे.

श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना पुन्हा अटक

मंगळुरू, २८ जानेवारी (वृत्तसंस्था) – पबमध्ये अश्लील अंगविक्षेप करून नाचणाऱ्या तरुणींना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हिसका दाखवला होता. या प्रकरणात श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना आज अटक करण्यात आली.  (पब प्रकरणाच्या वेळी श्री. मुतालिक हे राज्याच्या बाहेर होते. असे असतांना न केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात त्यांना केलेली अटक ही दबावापोटीच आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक) काल श्री. मुतालिक यांना देवांगेरे येथे धार्मिक सलोखा बिघडण्याच्या एका जुन्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. (भारतात मुजोर मुसलमान दंगेधोपे करून देशातील धार्मिक सलोखा बिघडवून टाकतात. असे असतांना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी हिंदुत्ववाद्यांना अटक करणारे पोलीस ! – संपादक) आज श्री. मुतालिक यांना देवांगेरे प्रकरणात जामीन मिळाला. त्यानंतर त्यांना पब प्रकरणामध्ये अटक करण्यात आली.
देवांगेरे येथील पोलीस श्री. मुतालिक यांना मंगळुरू येथील पोलिसांकडे सुपूर्द करणार आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ए.एम्. प्रसाद यांनी दिली. पबमध्ये तरुणींना मारहाण केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. पब प्रकरणावरून राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप शासनावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. (काश्मीरमध्ये मुसलमानांनी हिंदूंवर अत्याचार केले. याबाबत चौकशी करण्यासाठी एखादी समिती स्थापन करण्याची बुद्धी राष्ट्रीय महिला आयोगाला का होत नाही ? – संपादक)

`स्लमडॉग मिलीयनेर’वर बंदी का आणली पाहिजे ?

हिंदूंनो, प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान करणार्‍या `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपटावर बहिष्कार घाला !

`स्लमडॉग मिलीयनेर’ हा भारतीय परिस्थितीवर परदेशी निर्मात्याने बनवलेला चित्रपट सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एका बाजूला या चित्रपटाला नामांकित `ऑस्कर’ पुरस्कारासाठी दहा नामांकने मिळाली आहेत, तर दुसरीकडे श्रद्धास्थानाचा अवमान केला म्हणून भारतातून काही जागृत हिंदूंनी व अन्य देशभक्‍त मंडळींनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. हिंदु जनजागृती समितीने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने या चित्रपटाचा केलेला अभ्यास.
संकलक : श्री. शिवाजी वटकर, मुंबई, ठाणे व रायगड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

चित्रपटाबद्दल माहिती
`स्लमडॉग मिलीयनेर’ या चित्रपटाचे निर्माते िख्र्टासीन कोलसन आणि दिग्दर्शक डॅनी बॉयल व श्रीमती लवलीन टंडन हे आहेत. या चित्रपटाचे कथानक काल्पनिक असून भारतीय लेखक विकास स्वरूप यांच्या `क्यु अँण्ड ए’ या कादंबरीवर अवलंबून आहे. (श्री. स्वरूप यांनी लिहिलेल्या कादंबरीत नायकाचे सर्वधर्मसमभावी (?) नाव राम महंमद थॉमस असे आहे.) चित्रपटाचा नायक जमाल मलिक हा मुंबईतील धारावी झोपडपट्टीत रहाणारा तरुण मुलगा `कोणाला कोट्यधीश व्हायचे आहे ?’ (व्हू वॉन्ट्स् टू बी अ मिलीयनेर ?) या प्रश्‍नोत्तर स्वरूपाच्या खेळामध्ये भाग घेतो. या खेळाचे सूत्रसंचालक अनिल कपूर यांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची योग्य उत्तरे देऊन तो कोट्यधीश होतो. झोपडपट्टीवासी मुलाला सर्व उत्तरे माहीत असणे शक्य नाही, या शंकेमुळे अनिल कपूर त्याला चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देतो. त्या वेळी जमाल पोलिसांना त्याच्या जीवनात घडलेल्या विविध घटना व त्यातून उत्तरे कशी मिळाली, हे सांगतो.


प्रभू श्रीरामचंद्रांना दंगलीसाठी दोषी ठरवण्याचा प्रयत्‍न !
अनिल कपूर यांनी १६ सहस्र रुपये बक्षिसासाठी जमाल याला, `प्रभु श्रीरामाने उजव्या हातात काय धरले आहे’ असा प्रश्‍न विचारलेला असतो. या प्रश्‍नाचे उत्तर तुला कसे मिळाले, असे पोलिसांनी जमालला विचारल्यावर त्याला बालपणी झालेली दंगल आठवते
या दंगलीमध्ये हिंदूंचा जमाव मुसलमान वस्तीवर काठ्या व सळया घेऊन हल्ला करतो. `ते मुसलमान आहेत, त्यांना मारा’, अशी ओरड करत हिंदू मुसलमानांना मारतात. मुसलमान सैरभैर होऊन पळतात. एक हिंदु जमालच्या आईच्या डोक्यावर लोखंडी सळई मारतो व त्यात तिचा जागीच मृत्यू होतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तेथून पळ काढतात. पळतांना ते एका छोट्याशा बोळात घुसतात. तेथे त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेला एक लहान मुलगा दिसतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तिथेच थबकतात व `त्या’ श्रीरामाला काही क्षण बारकाईने न्याहाळतात व श्रीराम आपल्याला ठार मारेल या भीतीने ते जीव मुठीत धरून अन्यत्र पळतात. त्यानंतर चित्रपटात हिंदु मुसलमानांना जिवंत जाळत आहेत, रॉकेल बाँब फेकून घरे, वस्ती पेटवत आहेत, अशी दृश्ये दाखवण्यात आली आहेत. शेवटी जमालला त्याच्या आईचा पाण्यात उताणा पडलेला मृतदेह आठवतो. पोलिसांना या प्रसंगाबाबत सांगतांना जमाल म्हणतो, “या प्रश्‍नाचे उत्तर मला माहीत नसावे, या आशेने मी रोज सकाळी उठतो. जर ही दंगल राम व अल्ला यांच्यासाठी नसती, तर माझी आई अजूनही असती.” त्यानंतर जमाल पुन्हा आठवणीत जातो. त्याला श्रीराम आठवतो व त्याच्या उजव्या हातातील धनुष्य स्पष्ट दिसते. त्यानुसार तणावग्रस्त चेहर्‍याने तो अनिल कपूर यांना `धनुष्यबाण’, असे प्रश्‍नाचे उत्तर देतो.
हा प्रसंग मनावर ठसवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या संगीत, `स्पेशल इफेक्ट्स’ यांचा वापर केला आहे व श्रीरामाचा चेहरा ५ ते ६ वेळा विविध कोनांमधून (अँगल) दाखवला आहे. तसेच श्रीरामाच्या हातात धनुष्य दाखवून आठवणीच्या दृश्याचा शेवट केला आहे. चित्रपटाच्या `ट्रेलर’मध्येही हा प्रसंग दाखवला आहे. एकूण चित्रपटात मधेमधे अनेक वेळा या श्रीरामाचे चित्र दाखवण्यात आले आहे. दंगली व मुसलमानांवरील कथित अत्याचारासाठी प्रभु श्रीरामांना दोषी ठरवण्याच्या विकृत हेतूने सदर प्रसंग चित्रपटात अंतर्भूत केला असल्याचे स्पष्ट होते.

धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्‍न
अयोध्येतील रामजन्मभूमीवरील बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईत उसळलेल्या दंगलीचे हे चित्रण आहे. या चित्रपटाचा मुसलमान व आंतरराष्ट्रीय समाजावर मोठा परिणाम होणार आहे. हिंदु जमाव मुसलमानांना ठार मारतो, जिवंत जाळतो, त्यांची वस्ती पेटवतो व नायकाच्या आईची निर्घृणपणे हत्या करतो. या निराधार, काल्पनिक, एककल्ली व द्वेषपूर्ण दृश्यांमुळे `हिंदू म्हणजे अत्याचारी’ अशी हिंदूंची प्रतिमा जगासमोर मांडली गेली आहे; मात्र प्रत्यक्षात मुसलमानच दंगलखोर असतात, हा आजवरचा अनुभव आहे. या चित्रपटामुळे हिंदु व मुसलमान समाजांत धार्मिक तेढ व तणाव निर्माण होऊ शकतो. सहिष्णू वृत्तीच्या हिंदूंना व त्यांच्या श्रद्धास्थानांना जगभरात कलंकित करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट आहे.

मुसलमान वस्तीत श्रीराम ?
मुसलमान वस्तीत श्रीरामाच्या वेशात भीक मागणारा मुलगा कसा आला, या वस्तीत त्याला कोण भीक देणार, दंगलीच्या गोंधळात लहान मुलगा अतिशय शांतपणे आशीर्वादाच्या मुद्रेत रस्त्यात कसा काय उभा राहू शकतो, असे अनेक प्रश्‍न या घटनेच्या संदर्भात उपस्थित होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बनवणार्‍या दिग्दर्शकाकडून एका विशिष्ट प्रसंगात एवढ्या बाळबोध चुका होणे शक्य नाही. हे दृश्य हेतूपुरस्सर हिंदु देवतांच्या अपमानासाठी चित्रपटात अंतर्भूत करण्यात आले आहे, हे स्पष्ट आहे.

डाव्या हाताने आशीर्वाद ?
प्रभु श्रीरामचंद्रांसारखी वेशभूषा केलेल्या त्या मुलाच्या चेहेर्‍यावरील हावभाव अतिशय गंभीर दाखवण्यात आले आहेत. त्या श्रीरामाच्या वेशातील मुलाने उजव्या हातात धनुष्य धरले असून आपला डावा हात आशीर्वादासाठी वर केला आहे. व्यक्‍ती उजव्या हातात धनुष्य धरते, तेव्हा ती युद्धसज्ज आहे, असा अर्थ असतो. प्रश्‍नातही उजव्या हाताचा उल्लेख जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. प्रत्यक्षात श्रीरामाचे डाव्या हाताने आशीर्वाद दिल्याचे एकही चित्र उपलब्ध नाही व हे धर्मविसंगत असल्याने तो देवतेचा हेतूपुरस्सर अपमान ठरतो.

भारताचे अतिशय विकृत चित्रीकरण
संपूर्ण चित्रपटात भारत म्हणजे भिकारी, लुटारू, नीच, दंगलखोर, वेश्याव्यवसाय करणारे यांचा देश, असे चित्र उभे केले आहे. काही प्रसंगात अमेरिकेचे श्रेष्ठत्व दर्शवणारी व भारताला हिणवणारी वाक्ये आहेत. भारताचे असे अतिरंजित व बीभत्स चित्रण कोणाही राष्ट्रभक्‍ताला क्लेशदायक वाटणारे आहे. त्यामुळे भारताच्या सन्मानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का पोहोचला आहे.

राष्ट्रीय मानचिन्हाचा अवमान
चित्रपटात `भारताच्या राजमुद्रेत तीन सिंहांचे चित्र आहे. त्याच्या खाली काय लिहिले आहे’, असा प्रश्‍न अनिल कपूर यांनी विचारला आहे. भारतीय राजमुद्रेत तीन नाही, तर चार सिंह आहेत. चुकीची माहिती देऊन चित्रपटातून राष्ट्रीय मानचिन्हाचा अवमान केला आहे.

हिंदु मुलींना सावधानतेचा इशारा
हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून फसवण्यासाठी मुसलमान तरुणांना पैसे देण्यात येतात, अशी वृत्ते वरचेवर आपल्या वाचनात येतात. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये तर मौलवींनी `हिंदु मुलीला बाटवा व १०० रुपये मिळवा’, अशी योजना मुसलमान तरुणांसाठी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये दरवर्षी ३० हजार युवती मुसलमान होतात, अशी आकडेवारी आहे. या प्रकाराबाबत हिंदु युवती आधीच अज्ञानी असून या चित्रपटामुळे त्यांना दिशाहीन होण्यास आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. हिंदु अभिनेत्री अथवा युवतीचा मुसलमान अभिनेत्याशी विवाह झाल्याच्या घटना प्रसिद्ध आहेत. विवाहानंतर या हिंदु युवती त्यांचा धर्म बदलतात; मात्र मुसलमान अभिनेत्रीने हिंदु अभिनेत्याशी विवाह केल्याचा घटना ऐकिवात येत नाहीत. या चित्रपटात जमाल या मुसलमान नायकाचे लतिका नावाच्या हिंदु युवतीशी प्रेमप्रकरण दाखवले आहे. समाजमनावर चित्रपटांचा विशेष परिणाम होतो. हिंदु युवतींनी चित्रपटाच्या या मायाजालास न भुलता समाजातील विदारक सत्याची कायम जाण ठेवावी. हिंदु समाजाला बाटवण्याच्या इस्लामी षड्यंत्राला स्वत: बळी पडू नये, तसेच इतरांनाही सावध करत रहावे.

असंवेदनशील सरकारी यंत्रणा
धार्मिकदृष्ट्या संवेदनशील प्रसंग असतांनाही हा चित्रपट `सेन्सॉर’ मंडळाने मंजूर केला. श्रीरामाऐवजी येशु, महंमद पैगंबर यांचा वापर केला असता, तर चित्रपटाला भारतीय चित्रपटगृहांचे दरवाजे कोणीही न सांगताच बंद झाले असते. तसेच हिंदु जमावाऐवजी मुसलमान जमाव असा अत्याचार करत आहे, असे चित्रपटातून जनतेला दाखवण्याचे धाडसही भारतीय राज्यकर्ते कधीच करू शकत नाहीत.

श्रद्धेवर घाला
श्रद्धेमुळे माणूस `मानव’ या संज्ञेला शोभेल, असे जीवन जगतो. ज्याची कोणावरही श्रद्धा नाही, अशा व्यक्‍तींचे जीवन बहुतांश वेळा स्वैर व समाजविघातक असते. प्रभु श्रीरामाचे जीवन समस्त हिंदूंना आदर्श आहे. भगवान श्रीराम हे आदर्श राजा, पिता, पती, पुत्र, बंधु आहेत. रामायण ऐकून जीवनाला चांगली दिशा मिळावी, यासाठी बालपणीच देवतांच्या कथा सांगून नीतीमत्तेचे धडे बालकांना दिले जातात. प्रभु श्रीरामांवरील अशी चुकीची दृश्ये समाजात गोंधळ उत्पन्न करतात. बुद्धीवादी व हिंदुद्रोही मंडळी त्यांचा कोलित म्हणून वापर करून देवतांबद्दल शंका उपस्थित करतात. देवतांवरील श्रद्धा ही समाजाला सशक्‍त बनवते; म्हणून श्रद्धेचे रक्षण केले पाहिजे. या चित्रपटाद्वारे भावनिक आधार घेत नेमक्या याच श्रद्धेचा पाडाव करण्याचा राक्षसी प्रयत्‍न केला आहे. हिंदूंच्या जीवनाचा आधारस्तंभ असलेल्या अशा श्रद्धांना आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करणारे चित्रपट हे धर्मासाठी मोठा धोका आहेत. हा हिंदूंचा अपमान आहे. देवतांबद्दल चुकीचे विचार निर्माण होतील, असे दृश्य समाजात प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूने कार्यरत व्हायला हवे.

आपण काय करू शकता ?
आपण नातेवाइकांत व मित्रमंडळींत या चित्रपटाबद्दल जागृती निर्माण करू शकता. वृत्तपत्रांतून चित्रपटाचे सत्यस्वरूप उघड करणारी पत्रे लिहिणे, हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील `ऑनलाईन’ निषेध मोहिमेत सहभागी होणे, या चित्रपटाच्या विरोधात पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवणे, चित्रपटगृहांना निवेदन देणे, जिल्हाधिकारी, मंत्री यांच्याकडे चित्रपटावर बंदी घालण्याबद्दल मागणी करणे, अशा अनेक प्रकारे आपण या चित्रपटाच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करू शकता. प्रभु श्रीरामाचे विडंबन उघड्या डोळयांनी पाहूनही कृती न करणार्‍या षंढ वृत्तीच्या जमावाचे घटक बनू नका. या चित्रपटाला शक्य त्या सर्व माध्यमांतून विरोध करून प्रभु श्रीरामांची कृपा संपादन करूया !

समितीच्या `ऑनलाईन’ निषेध चळवळीत सहभागी व्हा !
http://www.hindujagruti.org/denigrations/protestslumdog

श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांना अटक

मंगळुरू, २७ जानेवारी (वृत्तसंस्था) – शहरात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पबमध्ये अश्लील अंगविक्षेप करत नाचणार्‍या तरुणींना हिसका दाखवल्यावर या संघटनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांना अटक करण्याची मागणी होती. या दबावाला अखेर बळी पडून राज्यातील भाजप शासनाने श्री. मुतालिक यांना बेळगावमध्ये अटक केली.

(राज्यात पबसारख्या माध्यमातून नैतिकतेचे अध:पतन होत असतांना त्याच्या विरोधात कृती करण्याऐवजी श्री. मुतालिक यांना अटक करून भाजपही आता काँग्रेसच्या वाटेने जात आहे, हे दिसून येते ! – संपादक) मात्र श्री. मुतालिक यांना पब प्रकरणात अटक करण्यात आली नसून धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. (यावरून श्री. मुतालिक यांना झालेली अटक ही दबावापोटी आहे, हे सिद्ध होते ! – संपादक) आज पबमध्ये तरुणींना मारहाण केल्याच्या प्रकरणात श्रीराम सेनेचे उपाध्यक्ष श्री. प्रसाद अट्टवार यांच्यासहीत १० जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. (हिंदूंनो, शासन कोणाचेही असले, तरी धर्मरक्षणासाठी प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध लढावेच लागेल, हे जाणा ! – संपादक) देवांगेरे येथे श्री. मुतालिक यांच्या विरोधात एक प्रकरण प्रलंबित होते. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती बेळगावच्या पोलीस अधीक्षक श्रीमती सोनिया नारंग यांनी दिली. श्री. मुतालिक यांना मंगळुरूमधील पबप्रकरणामध्ये अटक का करण्यात आली नाही, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “या प्रकरणात त्यांना अटक करण्याबाबत मंगळुरूमधून काहीही सूचना मिळाली नाही. अशी सूचना मिळाल्यास त्यांना त्या न्यायालयात हजर करण्यात येईल.” धार्मिक सलोखा बिघडल्याच्या प्रकरणात श्री. मुतालिक यांच्या विरोधात देवांगगेरे येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना देवांगगेरे येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पबमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी श्री. मुतालिक राज्याच्या बाहेर होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचे त्यांनी समर्थन केले होते; मात्र झालेल्या प्रकाराबद्दल क्षमाही मागितली आहे.

भारतियांमध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज जागृत करायला हवे !

राष्ट्ररक्षणासाठी…जनतेला स्वत: धर्मपालनाचा आदर्श घालून देणारा व तिला धर्मपालन करायला भाग पाडणारा धुरंधर राज्यकर्ताच सध्या देशात नाही. समाजाच्या लायकीप्रमाणे समाजाला राज्यकर्ते मिळतात’, अशी एक म्हण आहे. भारतीयांना कर्तव्यशून्य राज्यकर्ते मिळायला भारतीयच कारणीभूत आहेत; कारण तेच त्यांना पुन:पुन्हा निवडून देतात. इतर देशांत असे राज्यकर्ते असते, तर जनतेने क्रांति करून त्या राजवटी केव्हाच उलथून टाकल्या असत्या. तसे भारतात न होण्याचे कारण म्हणजे भारतीय जनतेची प्रेतवत्, म्हणजे क्षात्रधर्महीन मानसिकता.

राज्यकर्त्यांनो, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवा करा, तरच देशहित होईल !

६०व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने २० ते २६ जानेवारी या कालावधीत `सैनिक सप्‍ताह’ राबवत आहोत. सर्वसामान्यांचा `राष्ट्र व धर्म’ यांबाबत अभिमान वाढावा म्हणून भारतातील सैनिकांचे युद्धासंदर्भातील अनुभव या सप्‍ताहाच्या निमित्ताने देत आहोत.

माजी कर्नल श्री. भिकाजी महादेव निकम हे सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथील असून ते वयाच्या १८ व्या वर्षी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले. सातारा येथील रयत संस्थेच्या सयाजीराव महाविद्यालयात इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी सैन्यात जाण्याचा निश्चय केला. लहान वयातच स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या श्री. भिकाजी यांनी गोर्‍या इंग्रज अधिकार्‍यांची चीड येत असे. त्यातूनच त्यांनी बालवयातच भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस अगोदर एका सहकार्‍यासबोत रात्रीच्या वेळी नागठाणे येथे एका गोर्‍या अधिकार्‍याच्या चालत्या गाडीवर दगड मारून काच फोडली व डोंगरात जाऊन लपून बसले होते. सैन्यात कर्नल पदावर ३८ वर्ष सेवा केलेले व वीरचक्र प्राप्‍त झालेले श्री. भिकाजी निकम हे अद्यापही स्वत:चे जीवन समाजोपयोगी कार्यासाठी घालवत आहेत. ते `साप्‍ताहिक सनातन प्रभात’चे वाचकही असून संस्थेच्या कार्याची त्यांना ओळख आहे. दर दहा वर्षांनी लढाई हवीच, नाहीतर सैन्याची धमक लक्षात येत नाही, अशी भूमिका असणारे श्री. निकम यांचे विचार येथे पाहू .

सैनिक होऊन युद्ध लढणे हेच स्वप्न उराशी बाळगणे !
पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले सर्वजण युद्धातील अनुभव सांगत असत. त्याचप्रमाणे माझा चुलत भाऊ कर्नल आर्.डी. निकम व मामा यांनी पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी सैन्यात असतांना त्यांचे अनुभव ऐकून मी भारावून जात व त्यातूनच मी सैन्यात जाण्याचे ठरवले. ते ऐकल्यावर आपणही सैन्यात जायला हवे, बंदूक चालवायला यायला हवी, सैन्यात भरती झाल्यामुळे शत्रूशी लढण्याचा विलक्षण अनुभव अनुभवता येईल, असेच ध्येय ठेवून मी व माझे दोन मित्र सैन्यात भरती झालो होतो.

शत्रूच्या हाती जिवंत सापडायचे नाही, हेच सैनिकाचे ध्येय !
१९६६ साली विद्रोही नागा लोकांबरोबर झटापट झाली. आमची आठ जणांची तुकडी नागलँडमध्ये शस्त्रास्त्रे व दारुगोळा गाडीमधून घेऊन जात होती. अचानक नागा लोकांनी जंगलातून रात्रीच्या वेळी गाडी जात असतांना हल्ला केला. त्यानंतर आठ जणांमध्ये दोन विभाग करून आरडा-ओरडा करून शत्रूला आम्ही भरपूर जण आहोत, असे भासवण्याचा प्रयत्‍न केला. त्या वेळी विद्रोही नागांबरोबर लढतांना एक जवान गोळी लागून जखमी झाला. रात्रीच्या वेळी जंगलामध्ये कोण कोठे आहे, हे लक्षात येत नव्हते. सर्व जण आम्ही विखुरलेल्या स्थितीत होतो. मात्र सर्वांना एकच नियम होता; शत्रूच्या हाती जिवंत लागायचे नाही. अशा स्थितीत दिवस उजाडायची वाट पहात होतो. मागून संपर्क करून अतिरिक्‍त कुमक मागवल्यावर नागा विद्रोही पळून गेले. त्या वेळी नागा विद्रोह्यांविरुद्ध धाडसाने प्रतिहल्ला करून दारूगोळा व शस्त्रांचा बचाव करण्यास जखमी जवानांचे प्राण वाचवले, या कामासाठी भारत सरकारने राष्ट्रपतींचे शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले.
राज्यकर्त्यांच्या दुबळेपणामुळे

चीन-भारत युद्धात विनाकारण माघार !
भारत-चीन युद्धाच्या वेळी तुकडीमध्ये हवालदार पदावर होतो. माझ्या सोबत असणार्‍या तुकडीला जंगलातून प्रवास करावा लागला. आम्ही आठ दिवस चालत प्रवास करत होतो. रेशन पुरेसे नसल्याने सोबत असलेला तांदूळ पोकळ बांबूमध्ये मीठ टाकून शिजवायचो व जंगलात जी श्‍वापदे मिळत त्यांना भाजून खायचो. जंगलातून पायांना जळवा लागून त्या रक्‍त शोषण करायच्या. तुकडीतील कोणी आजारी पडला किंवा मेला तरी आठ जणांच्या तुकडीतील सातही जवान मदत करत. अशा परिस्थितीला सामोरे जाऊनही विनाकारण माघार घ्यावी लागली, हे दुर्दैव !

सैन्यामध्ये विविध ठिकाणी सेवा करता येणे !
मध्यप्रदेश (निचम), काश्मीर, लडाख, नेफा (अरुणाचलप्रदेश), मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, आसाम, नागालॅण्ड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था, निवडणूक शांतता राखण्यासाठी व दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. चीन-भारत युद्धाच्या वेळी हवालदार पदावर सेवा करत होतो. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पंजाबमध्ये असतांना नेतृत्व करण्याचा योग आला होता. त्यानंतर सैन्यामध्ये १६ वर्षे सर्वोत्तम सेवा केल्याबद्दल भारत सरकारने राष्ट्रपती विशेष सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले. सैन्यात असतांना घरातल्यांचा पत्राद्वारे संपर्क सहा महिन्यांनंतर व्हायचा; तर दोन वर्षांनंतर घरातल्यांची तोंडे पहाण्याचा योग यायचा.

भारत-पाक व पाक-बांगलादेश युद्धात सहभाग !
पाकिस्तान-बांगलादेश युद्धाच्या वेळी मी तुकडीचा निरीक्षक होतो. `सेंट्रल रिझर्व्ह फोर्स’च्या तुकडीचा मी निरीक्षक म्हणून सेवा करत होतो. त्रिपुरा भागांतून आमची तुकडी शत्रूवर हल्ला करत होती. त्या वेळी बांगलादेशातील जनतेचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे हे युद्ध आम्ही लढू शकलो. बांगलादेशातील नागरिकांसोबत रहातांना भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत झाली. तेथील नागरिकांनी बर्‍याच वेळा रेशनचाही पुरवठा केला. भौगोलिक परिस्थती योग्य असल्याशिवाय सैनिक युद्ध जिंकू शकत नाहीत. पाकिस्तानी शत्रूवर हल्ला करतांना स्थानिकांची मदत मिळत असल्याने आमचे सैन्य शत्रूवर चढाई करून पुढे-पुढे जात होते. भारत-पाक युद्धाच्या वेळी पठाणकोट भागांतून युद्धात सहभागी होण्याचा योग आला. त्या वेळी समोरील शत्रूला मारा किंवा मरा, अशीच भूमिका आम्ही सैनिकांनी बाळगली होती. या दोन्ही युद्धांच्या वेळी आम्हा सैनिकांचे मन कठोर ठेवूनच उतरलो होतो. या वेळी पाकिस्तानला नामोहरण करूनही पुन्हा त्यांना भूभाग द्यावा लागला, हे दुर्दैव.

सेवा काळात सरकारने विविध गोष्टींमुळे गौरवले !
नोकरी कार्यकाळात अत्यंत प्रामाणिक धडाडीने अचूक निर्णय घेऊन विशेष काम केले, याबद्दल सन १९६६ मध्ये भारत सरकारने विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले.
सन १९८४ मध्ये स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्ली येथे पंजाबी लोकांच्या विरोधात उसळलेल्या दंगलीमध्ये जाळपोळ, मारामारी व लुटालूट चालू असतांना २०० बस व ट्रक मध्ये अडकून पडलेल्या हजारो स्त्री-पुरुष आणि बालकांची सुखरूप सुटका करून त्यांना पंजबामध्ये पोहोचवले. या कार्याबद्दल मला पतियाळा पोलीस उपअधीक्षक, जिल्हाधिकारी व जनता यांनी माझा सत्कार केला.

उग्रवाद फोफावण्यास राज्यकर्त्यांची चुकीची धोरणे कारणीभूत !
दिल्लीवरून आदेश निघाल्यानंतर कारवाई होते. आदेश देणारे दारू पिऊन व वातानूकुलित खोलीमध्ये बसून स्थानिक परिस्थितीची पारख नसतांना आदेश देत असतात. कुठेही केव्हाही `पेट्रोलिंग’ करण्यास सांगतात. खाओ-पिओ, अशीच स्थिती असते. गेली दोन दशके उग्रवाद संपवण्याचा प्रयत्‍न करूनही तो संपला नाही; कारण आजपर्यंत तेथे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. दिल्लीवरून आदेश आल्यानंतर गोळी झाडली जाते. तोपर्यंत हातावर हात घालून बसावे लागते, अशी स्थिती आहे. नागा उग्रवाद्यांच्या विरोधात कारवाई करतांना तेथील नागा लोकांमध्ये मिसळून रहावे लागे. आजपर्यंतच्या नेत्यांमध्ये लालबहाद्दूरशास्त्री हेच खरे व कर्तव्यदक्ष नेता होते.

हेरखात्याचे अयोग्य कामकाज !
हेरखाते योग्य सेवा बजावत असते, तर गेल्या दशकात झालेले अयोध्या, संसद यांवर हल्ले झाले असते का ? सीमेवर घुसखोरी होतच रहाते. अधिकारी वर्गाला पैसे देऊन ती केली जाते. एकादा सैनिक वा अधिकारी पैसे घेण्यास तयार नसेल वा देशाची एकनिष्ठ रहात असेल, तर त्याची बदली वरिष्ठांना सांगून करायची, अशी धोरणे सैन्यातील सीमावर्ती भागातील वरिष्ठ अधिकारी राबवतात. त्यामुळे प्रत्येकामध्ये राष्ट्राभिमान जागृत होत नाही तोपर्यंत हेरखाते असो व सीमेवर कितीही सैनिक ठेवले, तरी देश सुरक्षित रहाणार नाही किंवा त्या सैनिकांचा सुरक्षेच्या दृष्टीने काहीही फायदा नाही.

शत्रूपासून नव्हे, तर घरातीलच घरफोड्यांपासून पहिल्यांदा जनतेला मुक्‍त करा !
आम्ही देशाच्या शत्रूशी लढलो; मात्र घरात असणारी घाण म्हणजे गावातील ग्रामसेवकापासून ते दिल्लीतील वरिष्ठ अधिकार्‍यापर्यंत सर्व ठिकाणी भ्रष्टाचार फोफावला आहे. या घाणीकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. घरची घाण काढून टाकल्याशिवाय बाहेरच्या शत्रूशी युद्ध करून काय फायदा ? एकीकडे भ्रष्टाचार फोफावत असतांना दुसरीकडे `अल्ला हो अकबर’चे प्रस्थ वाढले आहे. त्यांचे मंत्री-संत्री झाले आहेत. सध्या सुरू असलेले हे गृहयुद्ध संपण्याजोगे वाटत नाही. वाघाचे कातडे पांघरलेल्यांकडून काय अपेक्षा करणार ? हे करण्यासाठी सर्वांसाठी `एक राष्ट्र व एक कायदा’ झालाच पाहिजे. (उदा. नसबंदी सर्वांसाठीच लागू व्हायला हवी.)

राज्यकर्त्यांनो, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवा करा, तरच देशहित होईल !
लढाई सुरू झाल्यावर सरकार सैनिकांना लढण्यापूर्वी सहानुभूती देणार, मंत्री येणार, स्वतंत्र्याची गाणी गाणार, असे चालते. एकादा मंत्री, संत्री झाला की, तो करोडपती होतो. समाज त्याच्या मागे धावत असतो. लालबहाद्दूर शास्त्री, पटेल, हे खरे नेत होते. आजपर्यंत गावाचा विकास व्हावा, यासाठी ३४ वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर गावातच रहाण्याचा निर्णय घेतला. घराचा व स्वत:च्या आर्थिक प्रगतीचा विचार केला नाही. गावामध्ये शाळा काढावी व गावात समाजोपयोगी गोष्टी कराव्यात यासाठी राहिलो. मात्र सध्याचे मंत्री-संत्री असे समोपयोगी कार्य करून देतील का ? आताच्या राज्यकर्त्यांना समाजसेवा करायची असेल, तर घरावर तुळशीपत्र ठेवून करा, तरच देश प्रगती करेल. जनताही करोडपती झालेल्या मंत्र्याच्या पाठिमागे लागते, हे दुर्दैव. सध्या निवृत्तीनंतर जीवनास आवश्यक असणारी गरज पाणी यासाठी जलसंशोधन व भूगर्भसंशोधन शास्त्राचा सखोल अभ्यास करून सातारा, रायगड, रत्‍नागिरी, कोल्हापूर व पुणे या ठिकाणी भूगर्भातील पाण्याचा स्रोत अचूक दाखवून लोकांना विंधन विहीर, बोअरद्वारे शेतीला व पिण्यासाठी पाणी दाखवण्याचे मार्गदर्शन करून लोकांचे दैनंदिन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्‍न करत आहे.

दर दहा वर्षांनी लढाई हवीच !
प्रत्येक क्षणी सैनिकांनी युद्धस्थितीत राहायला हवे. कारण नुसते शस्त्र असून उपयोग नाही, तर ती चालवण्याचे प्रशिक्षण हवे. तसे झाल्यास सैनिक युद्धकाळात चोख भूमिका बजावू शकतो. नाहीतर सैनिक युद्धाला निर्भयतेने सोमेरे जाऊ शकत नाही; कारण प्रत्येक युद्ध मनाच्या स्तरावर पहिल्यांदा लढायला हवे. आज भारतीय सैनिकांची तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. तलवार मॅनात नको, तर हातात हवी ! त्यानुसार सैनिकांचे शस्त्र सतत तळपावण्यासाठी दर दहा वर्षांनी लढाई हवीच. तरच सैन्य कुशल व बलसंपन्न रहाते.

धर्महानी करणार्‍यांना व राष्ट्रहिताला बाधक ठरणार्‍यांना खड्यासारखे बाजूला करा !

भारतात रहाणारे काही मुसलमान येथे राहून पैसाअडका मिळवितात; पण निष्ठा मात्र पाकिस्तानवर ठेवतात. हजार वर्षांपूर्वी भारतात एकही मुसलमान नसतांना त्यांनी येथे येऊन दीडशे-दोनशे वर्षांत भारतात सर्वत्र आपले राज्य स्थापन केले. आता ३० कोटी मुसलमान भारतात आहे. हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी त्यांच्या नमाजाच्या वेळी मशिदीवरून मिरवणूक गेली, तर ते दंगल करतात. काही मशिदींतून हिंदुद्वेष, भारतद्वेष अहोरात्र डोक्यात भिनविला जात आहे, शस्त्रास्त्रांचे साठे केले जात आहेत.

त्याचा सुगावाही पोलिसांना व हेरांना लागत नाही. अशा धर्मांध मुसलमानांनी देश पूर्णपणे पोखरलेला आहे. त्यांच्याशी लढतांना भारतीय सैन्य अडकून पडले की शत्रू सहज चालत येऊन दिल्लीच्या तख्तावर बसेल ! त्यांनी राज्य केल्यास तालिबानने अफगाणिस्तानमध्ये केले तेच भारतात सर्वत्र होईल. केवळ मंदिरे व मूर्ती फोडल्या जातील असे नाही, तर मानवजातीला अध्यात्मज्ञान देणारा विशाल ज्ञानसागर म्हणजे वेद, उपनिषदे, ज्ञानेश्‍वरी, भागवत, दासबोध इत्यादि सर्व धर्मग्रंथ ते नष्ट करतील. नालंदा, तक्षशीला या विश्‍वविद्यालयांतील ग्रंथ त्यांनी जसे जाळले, तसे ते आताही करतील. तसे आपण होऊ दिले, तर इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. पाकिस्तानधार्जिणे असतांना, ते भारतावर राज्य करू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच देशातील काही मिशनरी, म्हणजे ख्रिस्ती प्रचारक धर्मांतराचा आणि सामाजिक सेवाकार्याचा आधार घेऊन विघटनवादी प्रवृत्तींना खतपाणी घालत आहेत. आपल्या पंथीयांची संख्या येन केन प्रकारेण वाढवून त्याद्वारे विवक्षित लाभ उठविता यावेत, हा धर्मांतरामागील मूळ हेतू असतो.