कोरड्या शपथांनी राष्ट्राभिमान कसा रुजणार !

दहशतवाद निपटण्यासाठी निवळ शपथा नकोत, तर धर्म व राष्ट्र यांसाठी कृतीशील व्हायला हवे !

`मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांतून ज्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या प्रामुख्याने दोन विचारसरणीत विभागाव्या लागतील; एक मवाळ किंवा निधर्मीवादी आणि दुसरी जहाल किंवा राष्ट्रवादी. या हल्ल्यानंतर अशाच मवाळ विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक कार्यक्रम नुकताच पुण्यात झाला. `देशाच्या सुरक्षेसाठी नागरी पुढाकार’ या अराजकीय व्यासपिठावर पुण्यातील जागरूक नागरिकांनी एक शपथ घेतली. देशाचा विचार करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे आणि अर्थातच आजच्या काळाची ती गरज आहे; परंतु ही शपथ जर आपण बघितली व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी व्हायला लावले, ही बाब लक्षात घेतली, तर यातून राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीने नेमके काय साध्य झाले, असा प्रश्‍न पडतो.

या शपथेतील काही ओळी लक्षपूर्वक बघा – `राष्ट्रीय अस्मिता व सामाजिक एकात्मतेची भावना माझ्या रहाण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायम प्रयत्‍नशील राहीन. संपूर्ण देशात माझ्यासह प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजली तरच दहशतवादाचा खरा पराभव करता येईल, याची मला जाणीव आहे……’
`राष्ट्रीय अस्मिता’ व `सामाजिक एकात्मता’ या भावना काय बाजारात मिळणार्‍या वस्तू आहेत का कि शपथ घेतली आणि त्या लागोलाग आमच्यात निर्माण झाल्या ? बरे काही जणांमध्ये त्या भावना आल्या तरी त्या प्रत्येकाला इतरांच्यात निर्माण करण्यासाठी काय प्रयत्‍न करायचे, हे केवळ शाब्दीक शपथ घेऊन कसे लक्षात येणार ? बरे हे दोन्ही झाले, तर त्यामुळे `दहशतवादाचा खरा पराभव’ तो कसा होणार ? त्यामुळे मुंबईवरील हल्ल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ठिकठिकाणी घेण्यात येणारे हे असे शपथा घेण्याचे कार्यक्रम म्हणजे भारतियांना जी निधर्मीवादाच्या रोगाची लागण झाली आहे व गांधीवादाचे जे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले आहे, त्याचेच दुष्परिणाम म्हणावे लागतील !

राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी धर्माभिमान हवा !
यातील `माझ्यासह प्रत्येकाने’ ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे; मात्र खर्‍या अर्थाने `राष्ट्रीय अस्मिता’ विद्यार्थ्यांसह तुमच्या-आमच्यात निर्माण करायची असेल, तर ती केवळ अशा शाब्दीक बुडबुड्यांनी होणार नाही; त्यासाठी आमची भाषा, संस्कृती, धर्मग्रंथ, परंपरा, इतिहास, आमचे आचार-विचार, चारित्र्य, शौर्य; थोडक्यात म्हणजे आमचा `धर्म’ याचा जाज्ज्वल्य अभिमान आम्हाला हवा. तो आमच्यात कधी निर्माण होईल ? जेव्हा आम्हाला आमच्या (हिंदूंच्या) या सर्व गोष्टींचे अनन्यसाधारण महत्त्व समजेल तेव्हा ! हे महत्त्व कधी समजेल, जेव्हा आपण या सर्व गोष्टींचे प्रत्यक्षात आचरण करू तेव्हा ! म्हणजेच आपल्या संस्कृतीचे आणि धर्माचे आचरण करू तेव्हा ! आणि आज आपल्याला दिसणारे चित्र काय आहे ? या सर्वच गोष्टींचा आपल्यात अभाव आहे. असे असतांना या निधर्मीवाद्यांच्या पठडीत घासून गुळगुळीत झालेल्या `राष्ट्रीय अस्मिता’ आणि `सामाजिक एकात्मता’ यांसारख्या शब्दांच्या शपथा घेतांना त्यांचे गर्भितार्थ लक्षात घ्यावेत, असे पोटतिडकीने सांगावेसे वाटते.
जे माझ्या देशाचे हित, मान, गौरव, उत्कर्ष तेच माझे हित, तोच माझा मान, गौरव आणि उत्कर्ष आणि त्यासाठी प्राणार्पण करण्याची तयारी याला राष्ट्राभिमान म्हणतात. पूर्वी इंग्रजांमध्ये असा राष्ट्राभिमान होता. आपल्याला आपल्या संस्कृतीची महत्ता कळली, तर खरा राष्ट्राभिमान जागृत होईल व या राष्ट्राभिमानाचा देशभर प्रसार झाला तर नाना प्रकारच्या भेदांनी भरलेल्या खंडप्राय देशातही ऐक्य निर्माण होऊ शकेल. ती खरी `सामाजिक एकात्कता’ असेल. नुसते `एकता पाहिजे’, `विविधतेतून एकता’ असे घोष केल्याने ती साध्य होणार नाही.

गांधीवादाचे भूत उतरवल्याशिवाय दहशतवाद नष्ट करता येणार नाही !
जसे आमचे राज्यकर्ते पाकिस्तानच्या तोफगोळयांवर शांतीची कबुतरे आणि सहिष्णूतेत बुडालेले एकतर्फी प्रेमाचे संदेश उत्तरादाखल पाठवत आहेत, तसे आमच्या या निधर्मी देशाचे नागरिक मेणबत्त्या पेटवणे, मानवी साखळया करणे, एकात्मतेच्या प्रतिज्ञा घेणे अशा पोकळ गोष्टी करत आहेत आणि प्रसारमाध्यमे आणि `मुंबई कशी पुन्हा उभी राहिली’ हे निर्बुद्धपणाने सांगत आहेत. या सर्व दहशतवाद्यांशी लाळघोटेपणा करणार्‍या लाचार मानसिकतेच्या कृती आहेत. आपले बाकी सर्व वागणे राष्ट्र व धर्म द्रोहीपणाचे असतांना कोरड्या शपथांनी `दहशतवादाचा खरा पराभव’ कसा करणार ? दहशतवाद ही तातडीने संपवण्याची गोष्ट आहे. गांधीवादाच्या भूताने पछाडलेल्या भारतियांनो, लक्षात घ्या, `दहशतवाद हा नष्ट करूनच संपवावा लागतो !’ त्यासाठी लागते छत्रपतींची आणि स्वातंत्र्यवीरांची मुत्सद्देगिरी, कणखरता, निश्चयात्मकता आणि आक्रमकता !

किरकोळ कारणावरून धर्मांध मुसलमानांकडून पानगाव (जिल्हा लातूर) येथे दोन हिंदूंची निर्घृण हत्या !

हिंदूंवर मुसलमानांचे वाढते हल्ले, हे काँग्रेसच्या राज्यात मोगलाई आल्याचे लक्षण !

हिंदूंनो, मुसलमानांची ही मुजोरी किती काळ सहन करणार आहात ?

* संपूर्ण गावावर मुसलमानांचा हल्ला ! * * पोलिसांकडून हिंदूंवर लाठीहल्ला ! *
* पत्रकारांनाही पोलिसांकडून मारहाण !* * ४९ मुसलमानांना अटक ! * *मुसलमानांकडून दीडशे हत्यारे जप्‍त !* * अघोषित जमावबंदी !*


लातूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – घरासमोर शौचास बसलेल्या मुसलमानांना हटकल्याच्या कारणावरून दंगल घडवत धर्मांध मुसलमानांनी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील हिंदूंची घरे पेटवली. (दंगली घडवण्यासाठी मुसलमानांना फक्‍त निमित्त लागते, हेच यावरून स्पष्ट होते ! – संपादक) मुसलमानांच्या चुकीच्या वर्तनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी पोलिसांकडे जाणार्‍या हिंदूंवर धर्मांधांच्या जमावाने लाठ्या-काठ्या व तलवारी यांनी हल्ला चढवला. (केवळ निवेदन द्यायला निघालेल्या हिंदूंवर सशस्त्र हल्ला करणार्‍या मुसलमानांनी पूर्वनियोजित कट करूनच हा हल्ला केल्याचे यातून स्पष्ट होते. केवळ माहिती मिळताच हातांत शस्त्रे घेऊन मुसलमान बाहेर पडतात, यावरून त्यांच्याकडे नेहमीच शस्त्रे उपलब्ध असतात, तसेच ते कायम दंग्याच्या तयारीतच असतात, हेही सिद्ध होते. हिंदूंनो, अशा सशस्त्र मुसलमानांचा सामना करण्यासाठी संघटित व्हा ! – संपादक) या वेळी भागूराम नारायण पेद्दे व त्यांचा मुलगा बालाजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. (हिंदूंनो, आणखी किती जणांचे बळी जातांना पहात रहाणार आहात ? मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारला मुजोर मुसलमानांवर कारवाई करण्यास भाग पाडा व सरकार कारवाई करत नसेल, तर येत्या निवडणुकीत सरकारला पाडा ! – संपादक) एवढ्यावरच न थांबता `अल्ला हो अकबर’च्या घोषणा देत धर्मांधांनी गावात प्रचंड हैदोस घातला. (हिंदूंनो, असे करून हिंदूंची ताकद किती आहे, पोलीस किती विरोध करतात, आदी बाबी मुसलमान जोखत आहेत. `आपल्याला विरोध करणारा कुणीही नाही’, हे जेव्हा मुसलमानांच्या लक्षात येईल, तेव्हा काश्मीरप्रमाणे येथेही हिंदूंचा नरसंहार सुरू होईल, यात शंका नाही ! – संपादक) गावभर दगडफेक करत घरे, पाच दुकाने आणि एका रुग्णवाहिकेसह अनेक वाहने मुसलमानांनी जाळली. पोलिसांनी मात्र दंगलखोर मुसलमानांना सोडून दिले व वेळा अमावास्या आटोपून शेतातून परतणार्‍या हिंदूंवरच लाठ्या चालवल्या. (हिंदूंनो, मुसलमानांसमोर नांगी टाकणार्‍या आणि तुमच्याशी मग्रुरीने वागणार्‍या या पोलिसांवर वैचारिक सुंता झालेले काँग्रेस सरकार कठोर कारवाई करणार नाही. त्यामुळे ती व्हावी, यासाठी पुढील निवडणुकीत कृतीशील हिंदुत्ववाद्यांनाचा निवडून द्या ! – संपादक) रेणापूर तालुक्यात प्रचंड तणाव पसरला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ४९ मुसलमानांना अटक करून मुसलमानांच्या घरांतून चाकू, गुप्‍ती, कोयता, कुर्‍हाडी, सुरे, कत्ती यांसारखी दीडशे हत्यारे जप्‍त करण्यात आली आहेत. (हत्यारे नुसती जप्‍त करून उपयोगाचे नाही. मुसलमानांना ती पुरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) शुक्रवारी रात्री पानगाव येथील भागूराम पेद्दे यांच्या घरासमोर काही मुसलमान शौचास बसले होते. पेद्दे यांनी मुसलमानांना हटकल्याने वाद झाला. (हिंदूंनो, दुसर्‍याच्या घरासमोर शौचास बसून उलट वादही घालण्याएवढे या देशातील मुसलमान मुजोर व्हायला हा देश पाकिस्तान आहे का ? – संपादक) त्यामुळे पेद्दे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक निवेदन तयार केले. ते देण्यासाठी ते पानगाव येथील औटपोस्ट पोलीस चौकी येथे जात असतांना धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. (आता मुसलमानांच्या विरोधात तक्रार अथवा निवेदन देणे, हाही गुन्हा झाला आहे व या गुन्ह्याला मुसलमान त्यांच्या पद्धतीने शिक्षा देतात. हिंदूंनो, या देशात मुसलमानांचे जणू प्रतीसरकार बनू देणारी धोरणे राबवणार्‍या प्रत्येक काँग्रेसवाल्यावर कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे सरकार आले की, कठोर कारवाई होईल, असे पहा ! – संपादक) तेव्हा नि:शस्त्र हिंदू सैरभैर झाले. (सरकार मुसलमानांना नि:शस्त्र करत नाही व हिंदूंना शस्त्रे देत नाही. अशाने क्षुब्ध झालेल्या हिंदूंनी उद्या स्वत:च शस्त्रसज्ज होण्याची तयारी केल्यास नवल नाही ! – संपादक) या वेळी भागूराम (वय ५० वर्षे), त्यांचा मुलगा बालाजी (वय २५ वर्षे) व भाऊ शंकर यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. भागूराम व बालाजी यांच्या हत्येनंतर मुसलमानांनी त्यांचे डोळे फोडले. (धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यात हिंदुद्वेष किती भिनलेला आहे, हेच यातून दाखवून दिले आहे. – संपादक) धर्मांध मुसलमान पळून गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संजय लाटकर, जिल्हाधिकारी श्री. एकनाथ डवले व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. (नेहमी मुसलमानांनी हिंदूंना चोपल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक)
शनिवारी सकाळी पेद्दे पिता-पुत्राचे मृतदेह ताब्यात घेण्यास हिंदूंनी नकार दिला. दंगलखोर मुसलमानांना अटक केल्यानंतरच ते ताब्यात घेऊ, असे सांगितले. (धर्मांधांना अटक करण्याची कणखर मागणी करणार्‍या पानगाव येथील हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक) या वेळी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. त्यामुळे अनेक हिंदू जखमी झाले. (हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी अवलंबलेला मार्ग पोलीस मुसलमानांच्या बाबतीतही अवलंबतील का ? का अवलंबणार नाहीत, याचा हिंदूंनी अभ्यास करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक) शेवटी पोलिसांनी मुसलमानांना अटक करू, असे सांगितल्यावर मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. आज रविवारी भाजप व शिवसेना यांच्या वतीने रेणापूर तालुक्यात कडकडीत `बंद’ पाळण्यात आला. (हिंदूंनो, आता पुरे झाले बंद व मोर्चे ! आता परिणामकारक कृती करायला शिका ! – संपादक).

प्रशासनाकडून हिंदूंनाच शांततेचे आवाहन ?
पसार झालेल्या मुसलमानांचा शोध न घेता प्रशासनाने शनिवारी केवळ हिंदूंची बैठक घेऊन हिंदूंनाच शांततेचे आवाहन केले. शनिवारपासून गावात ४ दिवस अघोषित संचारबंदी सुरू आहे. राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी ठेवले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्‍त झाले आहे.

वार्ताहरांची ओळखपत्रे फेकून देऊन पोलिसांकडून मारहाण !
शनिवारी हिंदूंना मारहाण करतांना पोलिसांनी दैनिक `सामना’चे श्री. नरसिंग गुडे, दैनिक `सम्राट’चे श्री. विष्णू आचार्य व श्री. एम्.डी. आचार्य यांनी दाखवलेली ओळखपत्रे फेकून दिली. त्यांचे भ्रमणध्वनी जप्‍त करून त्यांच्यावर लाठीमार केला. (वृत्तपत्रकारांशी असे वर्तन करणारे अलोकशाही पोलीस प्रशासन ! – संपादक)

निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा