दहशतवादाशी दोन हात करण्यास आपण तयार आहोत का ?

दहशतवाद्यांच्या विरोधातील लष्करी कारवायांचे चित्रण दाखवून त्यांना सावध करणार्‍या विवेकशून्य वृत्तवाहिन्या !

राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडरांनी हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज व नरीमन हाऊस येथील दहशतवाद्यांना ठार मारून मोहीम फत्ते केली. येथील घटनांनंतर एक प्रश्‍न आपल्याला सतत भेडसावत रहाणार व तो म्हणजे भारतीय जनता दहशतवादाशी दोन हात करण्यास खरोखर तयार आहे का ? दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी जनता, राज्यकर्ते व लष्कर यांनी त्यांचे काम चोखपणे बजावणे आवश्यक असते; मात्र मागील तीन दिवसांत घडलेल्या घटनांचा आढावा पहाता राज्यकर्ते, वृत्तवाहिन्या व जनता त्यांची भूमिका बजावतांना अनुत्तीर्ण झाल्याचेच दिसून आले. दहशतीचे सावट असतांना एकमेकांना धीर देण्याऐवजी मुंबईत अफवांचा पूर आला. याही पुढे जाऊन ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाऊस येथे कमांडो त्यांची मोहीम तडीस नेत असतांना तेथे उपस्थित असलेल्या बघ्यांनी बाँबस्फोट झाल्यावर टाळया वाजवून हीन मानसिकतेचे दर्शन घडवले.

बाँबस्फोट झाल्यावर टाळया पिटणारा समाज हा देशद्रोहीच !
`रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार केला’, अशी अफवा व्हिक्टोरिया टर्मीनसवर काल पसरली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांवर दहशतीचे सावट पसरले. मंत्रालयामध्ये बाँब ठेवल्याच्या अफवेमुळे तेथे काम करणारा एक कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. आणीबाणीच्या काळात सूचनांचे तंतोतंत पालन करणे, हेच जनतेचे प्रथम कर्तव्य असते; मात्र मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जनता सैरभैर झाल्याचे चित्र होते. अशी दुबळी मानसिकता असलेली जनता दहशतवादाशी दोन हात काय करणार ? दहशतवादाचा नि:पात करायचा असेल, तर जनता मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, हे मुंबईवरील हल्ल्यांच्या घटनांवरून दिसून आले.
हॉटेल ताज, नरीमन हाऊस व हॉटेल ओबेरॉय येथील दहशतवाद्यांवर कारवाई करतांना प्रेक्षणीय स्थळ पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांप्रमाणे वावरणारे हे बघे लष्करासाठी मोठा अडसर होते. हॉटेल ताजसमोर दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणल्यावर काही बघ्यांनी त्या वेळी टाळया वाजवल्या. भारतीय अस्मितेवर घाला घालणार्‍या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्याऐवजी अशा प्रकारे आसुरी वृत्तीचे दर्शन घडवून आणणारी जनता वैचारिक क्रांती अपरिहार्य करते ! नरीमन हाऊस येथेही कमांडो कारवाई करत असतांना बघ्यांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. कमांडोंची मोहीम संपलेली नसतांनाही तेथील जमावाने मोहीम संपल्याच्या आविर्भावात घोषणा देण्यास सुरुवात केली. दहशतवाद निपटण्यासाठी स्वत: काही ठोस कृती तर करायची नाहीच, उलट दहशतवाद निपटण्याच्या कार्यात मग्न असलेल्यांना अडसर निर्माण करणारा समाज कधीतरी दहशतवादाच्या विरोधात खंबीर लढा देऊ शकतो का ? दहशतवाद्यांनी हल्ले केल्यानंतरच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याचे प्रशिक्षण जनतेला देणे आवश्यक आहे, हे यातून दिसून आले.

दहशतवादाला पोषक ठरलेल्या वृत्तवाहिन्या !
आणीबाणीच्या काळात समाजाला दिशा देण्याचे कार्य प्रसारमाध्यमांनी करणे आवश्यक होते; मात्र मुंबईवरील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर भारतीय वृत्तवाहिन्या `ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागल्या होत्या. २६ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांवर `दहशतवाद्यांनी मंत्रालयाच्या समोर ग्रेनेड फेकले’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त श्री. सदानंद दाते हे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले; मात्र अनेक वृत्तवाहिन्यांवर दहशतवाद्यांशी लढतांना त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. नरीमन हाऊसमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडरांना पाचारण करण्यात आले. या कमांडरांना हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने नरीमन हाऊसमध्ये उतरवण्यात आले. वास्तविक पहाता दहशतवाद्यांना अंधारात ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते; मात्र `टीआर्पी’ वाढवण्याच्या अट्टाहासापायी वृत्तवाहिन्यांनी ताळतंत्र सोडून दहशतवाद्यांच्या विरोधात चाललेल्या लष्करी कारवायांचे मुक्‍तपणे चित्रण केले. असे करून या वृत्तवाहिन्या दहशतवाद्यांना सावधच करत होत्या. कर्तव्य विसरलेल्या अशा वृत्तवाहिन्या समाजप्रबोधन करण्यास लायक नाहीत.
या सर्व घटनांमध्ये राज्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत काही भाष्य न करणेच इष्ट ठरेल. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात आहे, हे आता समोर आले आहे; मात्र काँग्रेस सरकारने पाकिस्तानला दमदाटी करण्यापलीकडे जाऊन काहीही केलेले नाही व सरकार काही करणारही नाही ! भारत दहशतवादमुक्‍त करण्यासाठी आता पाकिस्तानवर चढाई करणारे राज्यकर्ते भारताला लाभणे आवश्यक आहे. ते वैचारिक क्रांतीनेच प्राप्‍त होऊ शकतात, हे जनतेने लक्षात घ्यावे.

निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत

नानासाहेबांनी सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य केले – मुख्यमंत्री

ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांना `महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

नवी मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – अंधश्रद्धा व व्यसनाधिनतेच्या विरोधात लढून शिस्तबद्ध व सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य नानासाहेबांनी केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी खारघर येथे एका कार्यक्रमात केले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सन २००८ वर्षाकरता रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे `महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे आज खारघर येथे वितरण करण्यात आले. ५ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी २५ लाखांहून अधिक भक्‍तगण उपस्थित होते. नानासाहेबांचे सुपुत्र श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नानासाहेबांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एकीकडे संपत्ती वाढत असतांना व्यसनाधिनता वाढत आहे. नानासाहेबांच्या सात पिढ्या व्यसनमुक्‍तीसह अनेकविध कार्य करत आहेत. केंद्रशासनाने नानासाहेबांवर पोस्टाचे तिकीट काढून त्यांचे विचार देशपातळीवर पोहोचवावे, असे विचार उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी या वेळी व्यक्‍त केले. पुरस्काराला उत्तर देतांना श्री. अप्पासाहेब म्हणाले की, प्रत्येक माणसाला राष्ट्रासाठी कार्य करण्याची जाणीव आध्यात्मिकतेतूनच होते. अध्यात्म व संत शिकवण याचा अर्थ धार्मिकता असा नाही. मतभेद, जातीभेद व विचारभेद दूर करण्यासाठी मानवता धर्माची आवश्यकता आहे, असे श्री. अप्पासाहेब यांनी सांगितले. संत वा*मयाची शिकवण प्रत्येक शाळेतून दिली, तर विद्यार्थ्यांचे मन सुसंस्कारीत होईल, तरच राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

क्षणचित्रे
* शासनाने आयोजित केलेला हा कार्यक्रम १ तास उशिरा सुरू झाला. त्यामुळे २५ लाख लोकांचे सुमारे २५ लाख तास वाया गेले.
* काँग्रेसचे नेते अ.र. अंतुले यांनी आमची भाषणबाजी ऐकायला तुम्ही आले नाहीत, असे सांगतांनाच स्वत: मात्र १५ मिनिटे भाषण केले. त्यामुळे रणरणत्या उन्हात भक्‍तगणांना ते ऐकणे भाग पडले.

 

व्हॅलेंटाईन डे : ही आपली संस्कृती नव्हे

अनुक्रमणिका

 

व्हॅलेंटाईन डे : हिंदु युवा पिढीचे वैचारिक प्रबोधन आवश्यक

व्हॅलेंटाईन कि पॅलेस्टाईन ?

पाद्री व्हॅलेंटाइन खरेच `पॉवरबाज\’ आहे काय ?

मूर्तीवर कचरा उडतो म्हणून रेती गाळण्यास विरोध करणार्‍या हिंदूला धर्मांध मुसलमानाकडून जबर मारहाण !

मूर्तीचे रक्षण करणार्‍या हिंदूला मुसलमानाकडून मारहाण म्हणजे भारताचे पाकिस्तान होणे !

पाळधी (तालुका धरणगाव), २३ नोव्हेंबर (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावातील एका मंदिराजवळ मुसलमान व्यक्‍ती रेती गाळत असल्याने त्याचा कचरा मंदिरातील मूर्तीवर उडत होता. या वेळी तेथील एका हिंदूने त्यास विरोध केल्याने मुसलमानाने त्या हिंदूला मारहाण केली.

(राज्यकर्त्यांच्या लांगूलचालनामुळे मुजोर झालेले मुसलमान ! – संपादक)
येथील कालू देशपांडे नामक मुसलमान व्यक्‍तीने त्याच्या घरकामासाठी वापरायची रेती गाळण्याची चाळणी त्याच्या घराजवळ असणार्‍या श्री जाखोबा मंदिराला टेकवून लावली. रेती गाळण्यामुळे त्याचा कचरा व धूळ मंदिरातील देवतांवर उडत होती; म्हणून श्री. विजय झवर या हिंदूने त्या व्यक्‍तीला विरोध केला. तेव्हा त्या मुसलमानाने व त्याच्या सोबतच्या महिलेने श्री. झवर यांच्याबरोबर बाचाबाची सुरू केली. या वेळी कालू देशपांडे याने हातातील फावड्याने श्री. झवर यांच्यावर वार केले. त्यामुळे श्री. झवर यांना मोठी दुखापत झाली. त्यांना जळगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (धर्मांधांच्या क्रूर मानसिकतेचे अस्सल उदाहरण ! – संपादक)

निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान

पवारांच्या तोंडी संतवाङ्मय !

केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार म्हणाले, `मी बरेच संत वाङ्मय वाचले आहे; पण एखाद्या संताने `बाँब तयार करा आणि निरपराध लोकांना मारा’, असे म्हटल्याचे मी वाचलेले नाही.’ खरे आहे. हिंदू संतांनी तसे म्हटलेले नाही; पण संत सांगतात, तसेच सगळे वागतात, असे दिसत नाही. संसदेवर खासदारांची सामूहिक हत्या करण्याच्या उद्देशाने सशस्त्र आक्रमण करणार्‍या महंमद अफझल याला सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली, तरी `सरकारने ती देऊ नये’, असे कोणत्याही संताने म्हटलेले नाही. तरीसुद्धा महंमद अफझल याला फाशी देण्याविषयी पवार तोंडातून एकही शब्द बाहेर पडू देत नाहीत !

काँग्रेस नेत्यांच्या लबाड्या बहुजन समाजाच्या लक्षात येण्याचा काळ केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांच्या विषयी नवी माहिती बाहेर येत आहे. ही माहिती ते स्वत:च पुरवत आहेत. सुखद आणि दु:खद धक्का देणारी अशी ही माहिती आहे. मुंबईतून ही माहिती पवार महोदयांनी जगापुढे सादर केली आहे. `इंडियन नॅशनल काँग्रेस’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस’ अशा दोन पक्षांच्या वतीने संयुक्‍त सभा काही दिवसांपूर्वी झाली. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा जणू नारळ या सभेत फोडण्यात आला, असे वृत्तपत्रांतून सांगण्यात आले आहे. साहजिकच आहे की, या आणि अशा सभांतून जी भाषणे होणार ती राजकीयच असणार. आपल्या पक्षाव्यतिरिक्‍त इतर सर्व पक्ष राज्य करायला कसे अयोग्य आहेत, हे अशा सभांतून शिरा ताणून सांगितले जाते. जनतेची विशेषत: तळागाळातील माणसांची काळजी केवळ आपल्यालाच कशी आहे, हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा खटाटोप केला जातो. पवारजी शिरा ताणत नाहीत; परंतु अतिशय चतुराईने सामान्य माणसाचा बुद्धीभ्रम करणारी भाषणे करण्यात ते पटाईत आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांचे एकमेव उद्दिष्ट भाजप-शिवसेना युतीचे बारा वाजवणे, हे असते. त्यासाठी भलेबुरे सर्व मार्ग ते अवलंबतात, हिंदुत्वाचे राजकारण हे देशाला सर्व दृष्टीने किती घातक आहे, हे सांगण्यावर त्यांचा भर असतो. कठीण गोष्ट सोपी करून सांगावी, तसे पवारसाहेब अशा वेळी सांगतात. `हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे ब्राह्मणांचे राजकारण’, अशी सोपी सरळ सुलभ व्याख्या पवार महाशय करतात. जर हिंदुत्ववादी सत्तेवर आले, तर अस्पृश्यांना पुन्हा गळयांत मडकी बांधावी लागतील, अशी भीती बहुजन समाजाला वाटावी, अशी त्यांची भाषणे असतात. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ते जाणीवपूर्वक `श्रीमंत’ असा करतात; परंतु फार मोठे धाडस करून असे म्हणता येईल की, शरदराव पवारांचा महाराष्ट्रातील जनतेशी पूर्वीसारखा जो थोडाफार सुसंवाद राहिला होता, तो तेवढा राहिलेला दिसत नाही.
हिंदुत्वाविषयी वस्तूस्थिती अशी आहे की, पवारसाहेब, ते आता ब्राह्मणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते तळागाळात जाऊन स्थिरावते आहे. ज्याला आपण `ओबीसी’ म्हणतो, तो समाज आज हिंदुत्वाच्या अग्रस्थानी आहे. मुसलमानांचे फाजील लाड करतांना काँग्रेस शासनाने हिंदुत्वाची जी विटंबना केली, त्यामुळे सगळयांत अधिक संताप या तथाकथित मागास समाजाला आला आहे. मुसलमानांचे लाड केल्याने काँग्रेस पक्षाचे भले होत असेल; पण भारताची चारही दिशांनी वाट लागत आहे, असे गण्यागणप्यालासुद्धा वाटू लागले आहे. देशाच्या स्वाभिमान रक्षणासाठी हा साधासरळ मनाचा समाज लढाऊ पवित्र्यात उभा ठाकला आहे. हे राजकारणातील सुप्‍त प्रवाह आहेत. ते सगळे अजून पृष्ठभागावर वहात आलेले नाहीत; परंतु त्याचा कानोसा गृह मंत्रालयाला लागला पाहिजे. तसा तो आबा पाटलांना लागला असणार. त्यांनी पवारसाहेबांच्या कानांवर खरीखुरी माहिती घातलीच असणार. जेम्स लेन प्रकरणात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराच्या वास्तूवर हल्ला करून मोडतोड झाली. पुरंदरे आणि बेडेकर या इतिहासाच्या भाष्यकरांना विटंबित आणि विद्रूप करण्याच्या सुपार्‍या देऊन झाल्या. दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरु नव्हेत; म्हणून त्यांच्या नावे पुरस्कार देण्याची आवश्यकता नाही, असे आरडाओरडून आंदोलन करून झाले; पण बहुजन समाजावर त्यांचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. ब्रिटीश राज्यकर्ते, सेंट झेव्हिअर्ससारखे धर्मगुरु आणि काँग्रेस संस्कृतीत मुरलेले पवारांसारखे महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्या विचारांत एक साम्य आढळते आणि ते म्हणजे हे की, बहुजन समाजावर आपल्याला राज्य करायचे असेल, तर त्यांना ब्राह्मणांपासून दूर ठेवले पाहिजे; कारण ब्राह्मण सत्य सांगतात आणि त्यांचा शत्रूमित्रविवेक सदैव जागा असतो. ते समाजाला लाचार होऊ देत नाहीत. बहुजन समाजाच्या लक्षात काँग्रेस नेत्यांच्या लबाड्या येऊ लागल्या आहेत.

हिंदुत्वावर तुटून पडण्याची काँग्रेस नेत्यांची सवय
हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण्य म्हणजे शोषण, असा जो विषारी प्रचार काँग्रेसी नेत्यांनी महाराष्ट्रात केला, तो बिनबुडाचा आहे, हे बहुजन समाजाच्या लक्षात आले आहे. आपल्या ज्ञातीच्या, समाजाच्या एवढेच नव्हे, तर एकंदर देशाच्या स्थैर्याला आणि सुरक्षित भवितव्याला खरा धोका इस्लामी आतंकवादाचा आणि त्याला सांभाळून घेणार्‍या काँग्रेस संस्कृतीचा असून हिंदुत्वाचा मनोभावे स्वीकार केल्याने ही धरून अन्य संकटेही नाहीशी होण्याची निश्चिती आहे, असे आता तळागाळातील माणसांना वाटू लागले आहे. हिंदुत्वामुळे समाजाची पक्की एकजूट होईल. क्षुद्र स्वार्थ गळून, देशासाठी प्रामाणिकपणे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला खूपच आळा बसेल, असे सामान्य माणसाला वाटू लागले आहे; परंतु लोकांनी जर हिंदुत्व अंत:करणात प्रतिष्ठित केले, तर आपले काय होईल, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागली आहे; कारण मुल्लामौलवींकडून आणि मिशनर्‍यांकडून सुपारी घेतल्यासारखी हिंदुत्वावर तुटून पडण्याची काँग्रेस नेत्यांना सवय झाली आहे; परंतु तरुणांना, महिलांना हिंदुत्वाची ओढ लागत आहे आणि आपल्या द्वेषपूर्ण प्रचाराचा परिणाम होत नाही, हे लक्षात आल्यामुळे लोकांना बनवण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले आहे, असे दिसते.

संतवाङ्मयाचे वाचन करतो, असे सांगण्यामागे पवार यांचा उद्देश
निदान पवारांनी वेगळया पद्धतीने लोकांना संबोधित करायचे ठरवले आहे, असे दिसते. आपण बरेच संत वाङ्मय वाचले आहे, असे ते लोकांना सांगू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या संयुक्‍त सभेत भाषण करतांना ते म्हणाले, `मी बरेच संत वाङ्मय वाचले आहे,’ मला स्वत:ला हे वाचून आनंद झाला. वाचनाचा वेगळा संस्कार असतो, तो सगळयांवर होतो, असे नाही; पण तो दोष ग्रंथाचा नसतो. तुम्ही खिडकी उघडलीत, तर प्रकाश आत येण्यास उत्सूक असतो. पवारसाहेब वाचनवेडे नाहीत. त्यांच्या भाषणात ग्रंथवाचनाचे उल्लेख फार नसतात; परंतु आता ते आपण बरेच संत वाङ्मय वाचल्याचे म्हणत असतील, तर त्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. अर्थात संत वाङ्मयाचे परिशीलन केल्याने होणारे संस्कार गडद असतात. तुमच्या दैनंदिन सहज बोलण्यातूनही तुम्ही संत वाङ्मय वाचले असल्याचे लक्षात येते; मात्र पवारजींचे प्रकरण फार वेगळे आहे. संत वाङ्मय वाचूनही एकाही संतांची रचना आपल्या मुखावाटे बाहेर पडू द्यायची नाही, असे एकदा त्यांनी ठरवले, तर कोणीही त्यांना तोंड उघडायला बाध्य करू शकणार नाही. ज्ञानेश्‍वर आणि रामदास सोडा; पण तुकारामाचा तरी एखादा मार्मिक अभंग पवारांनी उद्धृत करायला आडकाठी असू नये; पण तुकारामाचे तेवढे भाग्य दिसत नाही. मग आपण संत वाङ्मय वाचत असल्याचा उल्लेख इतक्या वर्षांत बहुधा प्रथमच पवारांनी का केला ?
पवार म्हणाले, `मी बरेच संत वाङ्मय वाचले आहे; पण एखाद्या संतांनी `बाँब तयार करा आणि निरपराध लोकांना मारा’, असे म्हटल्याचे मी वाचलेले नाही.’ खरे आहे. हिंदू संतांनी तसे म्हटलेले नाही; पण संत सांगतात तसेच सगळे वागतात असे दिसत नाही. संसदेवर खासदारांवर सामूहिक हत्या करण्याच्या उद्देशाने सशस्त्र आक्रमण करणार्‍या महंमद अफझल याला सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली, तरी सरकारने ती देऊ नये, असे कोणत्याही संताने म्हटलेले नाही. तरीसुद्धा महंमद अफझल याला फाशी देण्याविषयी पवार तोंडातून एकही शब्द बाहेर पडू देत नाहीत.
माझे पवारांएवढे वाचन नाही; पण तुकारामबुवांचे अभंग माझ्या डोळयांसमोर कधीतरी उभे रहातात. पंढरीच्या पांडुरंगाचे वर्णन करतांना ते म्हणतात, `महाकाळ हे कापती दैत्य ज्यासी । पाहा सावळे रूप हे पापनाशी’. त्याच अभंगात तुकाराम महाराजांनी `जया चिंतिता अग्नि हा शांति निवे’, असे म्हटले आहे. विठ्ठल साजरागोजिरा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो महाकाळ आहे. असा धाक शत्रूच्या मनात शिवराज पाटील किंवा शरद पवार यांच्याविषयी आहे काय ?
श्री शिवाजी महाराजांना उपदेश करतांना तुकारामबुवांनी म्हटले आहे, `आता एक योग साधावा हा नीट । भल्याच्या तो वीट मानू नये । जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये । निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्‍ती चित्ती आणू नका । परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया । सांगणे न लगे सर्वज्ञ तूं राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।

राजा हाच प्रजेचा कळीकाळ असतो !
ज्यांनी फाळणी केली, तेच राज्याचे रक्षक आहेत, असे मानून चाल, असे तुकारामाने म्हटलेले नाही. मग तुकारामाने काय म्हटले आहे ? महाराष्ट्र शासनाने १९५० मध्ये श्री तुकारामबुवांच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध केली. त्यातील ३०३५ वा अभंग पुढीलप्रमाणे आहे.

पाहा हो कलिचे महिमान
पाहा हो कलिचे महिमान
असत्यासि रिझले जन
पापा देती अनुमोदन
करिती हेळण संतांचे ।।
ऐसे अधर्माचे बळ
लोक झकविले सकळ
केले धर्माचे निर्मूळ
प्रलयकाळ आरंभला ।।
थोर या युगाचे आश्चर्य
ब्रह्मकर्म उत्तम सार
सांडूनिया द्विजवर
दावलपीर स्मरताती ।।
नमस्कारावया हरिदासा
लाजती धरती काही गर्वसा
पोटासाठी खौसा
वंदिती मलिंछाच्या ।।
मुख्य सर्वोत्तम साधने
ती उच्छेदूनि केली दीने
कुडी कापटये महा मोहने
मिरविताती दुर्जन ।।
कैसे विनाशकाळाचे कौतुक
राजे झाले प्रजांचे अंतक
पिते पुत्र सहोदर
एकाएक शत्रुघाते वर्तती ।।
राजा प्रजेचा कळीकाळ कसा होतो, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी सविस्तर केले आहे. मोगलाची अत्याचारपूर्व राजवट समोर ठेवून त्यांनी लिहिली आहे. त्यावर शिवाजी महाराजांनी मात कशी केली, ते सांगितले आहे. आज तुकारामबुवा असते, तर आतंकवादाच्या संदर्भात ते पवारांना उद्देशून काय म्हणाले असते, हा चिंतनाचा विषय आहे. बाँबस्फोट करा, असे संत सांगत नाहीत; पण अन्याय सहन करा, असेही
कोणी संत सांगत नाहीत; परंतु `बाँबस्फोट करा, शत्रूचे हालहाल करा, सामूहिक संहार करा’, असे कुराण सांगते.

त्याविषयीची माहिती पुढच्या अंकात पवारांसाठी उपलब्ध करू.

निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

दहशतवादविरोधी पथकाकडून बेदम मारहाण व जिवे मारण्याची धमकी

कर्नल पुरोहित यांच्या पत्रातील माहिती

पुणे, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून आपल्याला बेदम मारहाण झाल्याची, तसेच खोटा कबुलीजबाब देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटकेत असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आज न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत सादर केलेल्या एका लेखी पत्राद्वारे दिली.

(साध्वी प्रज्ञासिंग व लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे वारंवार मुंबईचे दहशतवादविरोधी पथक त्यांना प्रचंड प्रमाणावर मारहाण करत असल्याच्या व मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी करत आहेत; परंतु केवळ हे दोघेही हिंदु असल्याने त्यांच्या तक्रारींची दखल शासकीय स्तरावर घेण्यात आलेली नाही. हेच जर मुसलमान असते, तर एव्हाना दिल्लीहून त्यांच्या सुटकेचे आदेश आले असते ! हिंदूंनो, येत्या निवडणुकीत अशा हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारला पराभूत करा व अत्याचारग्रस्त हिंदूंना न्याय मिळवून द्या ! – संपादक) `याच कारणास्तव आपल्याला पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात अधिक सुरक्षित वाटते’, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हरियाणा पोलीस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून जिवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीचाही पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे. (हरियाणा पोलीस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग हे स्वत:ला सर्वसत्ताधीश समजतात कि काय ? ते काहीही करतील व कुणीही त्यांना काही विचारणार नाही, असे त्यांना वाटते का ? अशा मुजोरांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हिंदुसंघटनाला पर्याय नाही ! – संपादक) बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदूक मिळवून दिल्याच्या आरोपाच्या प्रकरणी पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेले ले. कर्नल पुरोहित यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. या प्रकरणी सरकारी वकिलांनी ले. कर्नल पुरोहित यांना ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. यावर प्रतिवाद करतांना अधिवक्‍ते शिवदे म्हणाले, “मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असून २९ नोव्हेंबर रोजी त्यांना `मोक्का’ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तोपर्यंत पोलीस कुठल्या ना कुठल्या कारणास्तव कर्नल पुरोहित यांना पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी प्रयत्‍नरत आहेत. मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचा कटू अनुभव लक्षात घेता ले. कर्नल पुरोहित यांना येथेच ३ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.” आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. अखेर न्यायालयाने सरकारी वकिलांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत ले. कर्नल पुरोहित यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर पोलिसांनी ले. कर्नल पुरोहित यांना नाशिक येथील कारागृहात नेले.

पूजासाहित्य, पुस्तके व औषधे जवळ बाळगण्यास न्यायालयाची परवानगी
ले. कर्नल पुरोहित यांनी पूजासाहित्य, पुस्तके व औषधे जवळ बाळगण्याची मागणी आज न्यायालयात वकिलांमार्फत केली. ती न्यायालयाने मान्य केली. ले. कर्नल पुरोहित यांना अस्थमाचा त्रास आहे.

हिंदूंनो, हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी काँग्रेस सरकारने ही कुटील कारस्थाने रचली आहेत, तरीही घाबरू नका ! येत्या निवडणुकीनंतर सर्वच स्तरांवर हिंदुत्ववाद्यांचे सरकार असेल. त्या वेळी अशा अन्याय्य चौकशा बंद होतील !

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील १० आरोपींवर मोक्का

मुंबई, २० नोव्हेंबर (वृत्तसंस्था) – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १० आरोपींच्या विरोधात आज दहशतवादविरोधी पथकाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्याच्या अंतर्गत आरोपींना एक वर्ष जामीन मिळणार नसून त्यांनी दिलेला कबुलीजबाब हाच न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. आज दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख श्री. हेमंत करकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्ये, श्री. समीर कुलकर्णी, स्वामी अमृतानंद, श्री. श्यामलाल साहू, श्री. सतीश चतुर्वेदी, श्री. राकेश धावडे, श्री. दिलीप म्हात्रे व श्री. शिवराज यांना मोक्का कायदा लागू करण्यात आल्यामुळे आरोपींच्या विरोधात १८० दिवस दोषारोपत्र दाखल न करता अटकेत ठेवणे दहशतवादविरोधी पथकाला शक्य होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आता मुंबईमधील शिवडी न्यायालयात होणार आहे. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा तपास हा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सुरू असून पथकावर कोणताही राजकीय दबाव नाही, असे श्री. करकरे म्हणाले. दहशतवादविरोधी पथकाने आरोपींवर अत्याचार केलेले नाहीत, असे ते म्हणाले. ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचे बोलले जात होते. खुद्द ले. कर्नल पुरोहित यांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार केले गेले नाहीत, असे न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी पथक आरोपींवर अत्याचार करत आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. या प्रकरणाचा तपास ९० दिवसांत पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
(भारतामध्ये जिहादी दहशतवाद्यांनी गेल्या ८ वर्षांत ३ हजार ५०० हून अधिक बाँबस्फोट घडवून हजारो निष्पाप हिंदूंना ठार मारले. त्यांच्याविरुद्ध पोटा व मोक्का या कायद्यांच्या अंतर्गत कारवाई न करणारे दहशतवादविरोधी पथक व काँग्रेस सरकार हिंदुत्ववाद्यांवर मात्र मोक्का लावतात. – संपादक)

नार्को चाचणीचा अहवाल प्राप्‍त झालेला नाही
या प्रकरणातील काही आरोपींची नार्को चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केला होता; मात्र अहवाल दहशतवादविरोधी पथकाला प्राप्‍त झालेला नाही, असे श्री. करकरे म्हणाले. इतर वृत्तपत्रांना हा अहवाल कसा प्राप्‍त झाला, हे आपल्याला माहीत नाही, असेही ते म्हणाले. आज मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना न्यायालयाने ट्रान्झीट रिमांड सुनावला आहे. त्यांना ४ नोव्हेंबर रोजी माटुंगा येथे अटक करण्यात आली आहे.

दहशतवादविरोधी पथकाच्या विरोधात कडक कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेकडे सुपूर्द करावा व साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर अत्याचार करणार्‍या दहशतवादविरोधी पथकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या सचिव
श्रीमती शिल्पा देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. (हिंदु साधुसंतांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी कृतीशील बनलेल्या धर्माभिमानी श्रीमती देशमुख यांचे अभिनंदन ! – संपादक) ही याचिका मी पक्षाच्या वतीने नाही, तर वैयक्‍तिकरीत्या सादर करत आहे, असे त्या म्हणाल्या. वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तांच्या आधारावर ही याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर अजून सुनावणी झालेली नाही. “सिमीसारख्या दहशतवादी संघटनांचा तपास करतांना दहशतवादविरोधी पथक सौम्य धोरण स्वीकारते. या प्रकरणाचा तपास करतांना दहशतवादविरोधी पथकाच्या हालचाली संशयास्पद वाटतात. दहशतवादविरोधी पथक या प्रकरणात हिंदूंना दुजाभावाची वागणूक देत आहे”, असे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. “साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दहशतवादविरोधी पथक त्यांच्यावर करत असलेल्या अत्याचाराबाबतची माहिती नाशिक न्यायालयासमोर मांडली असून त्याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच राज्याचे पोलीस महासंचालक श्री. अनामी रॉय व दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख श्री. हेमंत करकरे यांच्यावर कठोर कारवाई करावी”, अशी मागणीही याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

वमन नको, नमन करा !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी या बाँबस्फोटात आपला सहभाग असल्याचे मान्य करावे, म्हणून मुंबईत पोलिसांनी त्यांना भयंकर मारहाण केल्याचे निवेदन त्यांनी नाशिकच्या न्यायालयात सादर केले. पोलिसांना पुरावे मिळत नसल्याने आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दुष्कीर्त करण्याचे कारस्थान सफल होत नसल्याने वैफल्यातून हा छळ होत आहे, हे उघड आहे.

त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नसल्याने आणि वैयक्‍तिक स्वार्थाला गाडून भव्यतर धार्मिक आणि राष्ट्रीय उत्थानासाठी त्यांनी तरुणपणात संन्यस्त जीवन स्वेच्छेने स्वीकारले असल्याने, जर त्यांनी बाँबस्फोटात हातभार लावला असता, तर अभिमानाने त्यांनी ते मान्य केले असते. त्या साध्वी असल्याने त्यांच्यासारख्या व्यक्‍तींशी वागण्याचे शिष्टसंमत संकेत ठरलेले आहेत. त्यांचा भंग पोलिसांनी का केला, हे गृहमंत्र्यांना आज ना उद्या समाजाला विश्‍वासात घेऊन सांगावे लागेल. प्रसंगी मन मोठे करून जनतेची माफी मागावी लागेल. साध्वी प्रज्ञासिंगजी यांना त्यांच्या शिष्याकरवी मारहाण करण्यात आली, त्यांच्या गुरूंविषयी अपशब्द वापरण्यात आले आणि साध्वीच्या विमल चारित्र्याविषयी संशय व्यक्‍त करणारे अभद्र शब्द वारंवार उच्चारण्यात आले. हा उद्धटपणा सहनशक्‍तीच्या पलीकडचा आहे. ज्याचे शील विकाऊ आहे, अशा व्यक्‍तीला वेश्येच्याही चारित्र्याविषयी बोलण्याचा हक्क नसतो. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या, दाऊद इब्राहिमची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणार्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांसमोर पायघड्या अंथरणार्‍या महाराष्ट्राच्या काँग्रेस सरकारने साध्वीच्या चारित्र्याविषयी पोलिसांना अर्वाच्च बरळण्यास चिथावणी द्यावी, हा नुसता उद्धटपणा नाही, तर हे महापाप आहे. आणि या पापाला प्रायश्चित्त या सरकारच्या हातून सत्ता काढून घेणे, हेच आहे. दलालीवर सरकार चालवणार्‍या या नेत्यांना शुद्ध चारित्र्याची महती काय कळणार ? आपल्या पितरांना नरकात ढकलणारे हे गर्हणीय कृत्य या फाळणीबहाद्दर विश्‍वासघातक्यांनी केले; कारण त्यांना `पॅरिटी’ साधायची आहे. बाँबस्फोट झाले की नेहमीच मुसलमानांना पकडले जाते. त्यामुळे मुसलमानांना किती राग आला असेल या कल्पनेने काँग्रेस नेत्यांची झोप उडाली आहे. तेव्हा आम्ही पक्षपाती नाही, हे दाखवण्यासाठी साध्वीचा छळ निर्लज्जपणे केला जात आहे. अत्यंत अभिनव पद्धतीने हिंदूंनी निषेध करून काँग्रेस संस्कृतीच्या मुखंदांना धडा शिकविला पाहिजे. सुरुवातीला महिलांचे मोर्चे शांत, गंभीरतेने प्रत्येक पोलीस ठाण्यावर गेले पाहिजेत आणि साध्वीला नमन करण्याऐवजी वमन का करता, असा प्रश्‍न विचारला गेला पाहिजे.
- सुघोष

`हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका !’

कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमानी हिंदूंचा देश व धर्म द्रोह्यांना इशारा !

३ हजारहून अधिक धर्माभिमानी उपस्थित
कुडाळ, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – एखाद्या देशात जो समाज बहुसंख्येने असतो, त्या समाजाच्या स्थितीवर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते. या तत्त्वानुसार विचार करायचा झाल्यास सद्यस्थितीत धर्मद्रोही राज्यकर्त्यांमुळे या देशात बहुसंख्येने असलेले हिंदू असुरक्षित बनले आहेत व परिणामी देशविरोधी घटक सबल होऊन देशाच्या सुरक्षिततेसमोरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही स्थिती बदलण्यासाठी देशात फोफावलेला जिहादी दहशतवाद, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, हिंदु संतांच्या हत्या इत्यादी राष्ट्र व हिंदु धर्म यांच्यावरील आघातांच्या विरोधात उभे ठाकणे, हे या देशातील बहुसंख्येने असलेल्या हिंदु धर्मियांचे कर्तव्य ठरते. या दृष्टीने हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे आज येथे पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला ३ हजार २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी उपस्थित राहून हिंदुसंघटनाचा आविष्कार दाखवला. त्याचबरोबर मान्यवर वक्‍त्यांनी `हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, असा इशारा देश व धर्म द्रोह्यांना दिला. हिंदु संघटनांवर बंदी आणण्याच्या दोन्ही काँग्रेसच्या सरकारच्या प्रयत्‍नाचा निषेधही या वेळी करण्यात आला. या वेळी सन्माननीय वक्‍त्यांनी त्यांच्या विचारांतून धर्माभिमानी हिंदूंमध्ये धर्मरक्षणाचे स्फुल्लिंग चेतवले. येथील कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील वेदपाठशाळेतील ब्रह्मवृंदाने वेदमंत्र म्हणून व भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्री. मधू चव्हाण यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून सभेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर भाजपचे सिंधदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद जठार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे, धर्मशक्‍ती सेनेचे श्री. विनय पानवळकर व सनातन संस्थेचे श्री. मदन सावंत हे उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा हिंदु जनजागृती समितीतर्फे सत्कार करण्यात आला. या सभेचे सूत्रसंचालन श्री. संदेश गावडे व कु. शोभना बेहरे यांनी केले. धर्मसभेच्या वेळी देण्यात आलेल्या विविध आवेशपूर्ण घोषणांमुळे हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

हिंदूंनो, विराट रूप दाखवा, म्हणजे देशद्रोही व हिंदुद्वेषी बांडगुळे आपोआपच नष्ट
होतील ! – आमदार मधू चव्हाण

युद्धभूमीवर अर्जुन नातेवाइकांमध्ये अडकला, तेव्हा श्रीकृष्णाने विराट रूप दाखवले व अर्जुनाला सांगितले, `सर्वकाही मीच करणार तू निमित्तमात्र हो !’ आपण १०० कोटी हिंदू एकत्र येऊन आपल्या शक्‍तीचे विराट रूप देशद्रोह्यांसमोर उभे करूया. आपोआप देशातील हिंदुद्वेषी बांडगुळे नष्ट होतील. आज हिंदू लाचार झाल्यामुळे आपल्या धर्माला ग्लानी आली आहे. अनेक अत्याचार सहन करावे लागत आहेत. लाचार झाल्यामुळे सर्वच बाजूंनी आपल्यावर अत्याचार होत आहेत. हे बदलण्यासाठी चार लोकांनी नव्हे, तर सर्व हिंदूंनी धर्मरक्षणासाठी एकत्र येऊन हलकल्लोळ केला पाहिजे, असे आवाहन भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्री. मधू चव्हाण यांनी येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले. या वेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.

`दैनिक सनातन प्रभात’चे पत्रकार श्री. संजय जोशी यांचा सत्कार !
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मरक्षणाच्या कार्याला सातत्याने व्यापक स्तरावर प्रसिद्धी देणार्‍या `दैनिक सनातन प्रभात’ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी श्री. संजय जोशी यांचा श्री. मधू चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हिंदु धर्मजागृती सभेचे वैशिष्ट्य
`समाज, संघटना व साधक यांना अध्यात्म आणि धर्म या विषयी जागृत करणारी, हिंदु संघटनेत एकजूट निर्माण करणारी आणि साधकांमध्ये उत्साह निर्माण करणारी अशी ही धर्मसभा आहे. – ईश्‍वर (कु. क्षिप्रा वेद यांच्या माध्यमातून)

१. `कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
२. `कुठे जनतेला विविध प्रलोभने दाखवून स्वार्थी बनवणारे व नंतर काही न देणारे राजकीय पक्ष, तर कुठे राष्ट्र व धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणार्‍या व ईश्‍वरप्राप्‍तीचा मार्ग दाखवणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
३. कुडाळ शहराची लोकसंख्या १८ हजार आहे. त्याशिवाय कोकणातील गावे दुर्गम भागात असल्यामुळे रहदारीसाठी हा भाग खूप त्रासदायक आहे. असे असतांना कुडाळ येथील सभेला ३ हजार २०० हून अधिक हिंदू उपस्थित असणे, हे हिंदु जनजागृती समितीबद्दल हिंदूंच्या मनात विश्‍वास व आशा निर्माण होत असल्याचे द्योतक आहे.

हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने ठिकठिकाणी धर्मजागृती सभा होत आहेत. या सभांच्या वेळी वाईट शक्‍तींचा त्रास होतो, हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. तो त्रास दूर होण्यासाठी व धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सनातनचे संत पू. निकमतात्या नामजप करत आहेत. – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था

निगडीत वृत्त : धर्मजागृती सभा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मराठीचा पुळका !

मातृभाषा `मराठी’कडे दुर्लक्ष करून `उर्दू’चा उदोउदो करणे म्हणजे `पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा व वेश्येला मणीहार’ !

मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी महाराष्ट्रात चार वर्षे सत्तेवर असूनही मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलेले व आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मराठीचा साक्षात्कार झालेले काँग्रेस शासनाचे मुख्यमंत्री म्हणाले, `मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि मातृभाषा आहे. राज्यातील कोणत्याही शाळेत मराठी विषयाला अन्य भाषांचा पर्याय देता येणार नाही. वेळप्रसंगी मराठी विषयाची सक्‍ती सुद्धा सक्‍तीने केली जाईल.’

आपल्या कारकिर्दीत काँग्रेस शासनाने मराठीला किमान महाराष्ट्रात न्याय मिळेल, यासाठी काय केले, हेही मुख्यमंत्री महोदयांनी या वेळी सांगायला हवे होते. त्यांच्या शासनाने असे काहीच न केल्याने ते या मुद्याला हात कसा घालणार ? या सोहळयात मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्री श्री. देशमुख यांना शालजोडे हाणतांना `नवाकाळ’चे संपादक श्री. निळकंठ खाडिलकर म्हणाले, “तुम्ही चारवर्षे खूप काम केलेत. सत्तेच्या पाचव्या वर्षी तरी मराठीला निवारा द्या. फाटक्या वस्त्रात दारात बसलेल्या मराठीला नवा शालू नेसवून मंत्रालयात बसवा.” महाराष्ट्रातील माणूस मराठी त्याची भाषा मराठी. तरीही वरील आवाहन मराठीचा द्रोह करणार्‍या काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्र्यांना करावे लागते, हे मराठी माणसाचे व त्याच्या भाषेचे दुर्दैव म्हणावे लागेल !

मराठी शाळा, मुसलमान आणि उर्दू भाषा !
आपण ज्या राज्यातून निवडून येऊन मंत्रीपद उपभोगत आहोत, त्या राज्यातील जनता ही मराठी भाषिक आहे, हे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य (अ)मराठी मंत्री सोयीस्कररीत्या विसरले आहेत. मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना (अमराठी सोडून) राज्यातील मराठी माणसे व त्यांची मराठी मातृभाषा यांचे महत्त्व लक्षात घ्यायला वेळ नाही. मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी काँग्रेसला त्यांचा व त्यांच्या उर्दू भाषेचा विकास कसा होईल, याचा विचार करण्यास व त्यावर प्रसंगी कृती करण्यास वेळ आहे. महाराष्ट्राचे पाकिस्तान करायला निघालेले मुख्यमंत्री श्री. देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, “मराठी माध्यमाच्या शाळांत उर्दू विषयाचे शिक्षण देण्यात येईल.” राजभाषा मराणासन्न अवस्थेत असतांना व संस्कृत भाषेला हद्दपार करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्र्यांना उर्दू भाषेत कोणता जिवंतपणा आढळला ? मातृभाषा मराठीकडे दुर्लक्ष करून उर्दूचा उदोउदो करणे म्हणजे `पतिव्रतेच्या गळयात धोंडा वेश्येला मणीहार’! अशीच अवस्था होईल.

मुख्यमंत्र्यांना मराठीची आठवण का झाली ?
येथे लक्षात घेण्यासारखा प्रश्‍न म्हणजे मुख्यमंत्री यांना मराठीची सक्‍ती करण्यासारखी कठोर भाषा आताच का वापरावी लागली ? याचा मागोवा घेतल्यास लक्षात येईल की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी `मराठी’ हा त्यांच्या कार्यक्रमाचा मुख्य मुद्दा बनवला व त्यासाठी आटोकाट प्रयत्‍न केले. मराठीच्या मुद्याचे श्रेय श्री. ठाकरे यांना जाणार व आपल्यापासून मराठी माणूस दूरावणार, याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, हे जाणून काँग्रेसमधील काहींनी (ज्यांना मराठीबद्दल काही तरी वाटते) मराठी भाषेची बाजू घेण्यास सुरुवात केली. जर पुढे होणार्‍या निवडणुका घोषित झाल्या नसत्या, तर काँग्रेसमधील तथाकथित मराठी मंडळींनी मराठीचे नावतरी घेतले असते का, ते देवच जाणो !

काँग्रेस शासनाचा घातकी निर्णय !
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये काँग्रेस शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सक्‍तीचा करण्याचा घातकी निर्णय घेऊन मराठीच्या पायावर कुर्‍हाडच मारली आहे. पहिलीपासून पदवीपर्यंत इंग्रजी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. हा न्याय इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात मराठीला लागू नाही. हा इंग्रजीधार्जिणा निर्णय घेतांना शासनाने जी तत्परता दाखवली, ती मराठी भाषेचा प्रसार व विकास यांसाठी दाखवली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते. दक्षिणेतील राज्यांमध्ये तेथील भाषेच्या विकासासाठी मंत्रिमंडळात स्वतंत्र खाते आहे; मात्र अशा खात्याची महाराष्ट्र शासनाला आवश्यकता वाटत नाही हे मराठीचे दुर्दैव ! अशा खात्याची मागणी मराठी जनतेने लावूनच धरली, तर शासन ते निर्माणही करील; मात्र अशा खात्यावर मंत्री म्हणून कृपाशंकरसिंह यांच्यासारख्या अमराठींची वर्णी काँग्रेस शासनाने लावली तर नवल वाटायला नको !
मराठीच्या सर्वंकष उत्कर्षासाठी काँग्रेसच्या शासनामध्ये प्रचंड राजकीय इच्छाशक्‍ती हवी. स्वत:ला जमत नाही तर समाजातील भाषेच्या निष्णातांची मदत घेऊन मातृभाषा मराठीचे वैभव वाढवणे कठीण नाही. तसे झाले तरच मराठीविषयी बोलल्याचे सार्थकी लागेल अन्यथा नाही, हे काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे !

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूरमध्ये हिंदूंच्या संघटित शक्‍तीचे दर्शन !

राजापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेस ४ हजार ५०० हिंदूंची उपस्थिती !

राजापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – समर्थ रामदासस्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महान योगी प.पू. गगनगिरी महाराज यांचे साधनास्थळ असलेल्या राजापूर नगरीत ४ हजार ५०० हून अधिक हिंदूंनी `हिंदु धर्मजागृती सभे’ला उपस्थिती लावून त्यांच्या संघटित शक्‍तीचे दर्शन घडवले.

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या `हिंदु धर्मजागृती सभे’ची सुरुवात ब्रह्मवृंदाने केलेल्या वेदमंत्रांच्या पठणाने झाली. वेदमंत्रांतून निर्माण झालेल्या चैतन्यदायी वातावरणात ओणी-कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. राजन साळवी, धर्मशक्‍ती सेनेचे श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे श्री. मदन सावंत आदी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीचे श्री. संजय जोशी यांनी मांडला.

निधर्मी शिक्षणप्रणालीमुळे समाज धर्मशिक्षणापासून वंचित ! – प.पू. उल्हासगिरी महाराज
हिंदूंना आज धर्मशिक्षणाची अत्यंत गरज आहे. निधर्मी शिक्षणप्रणालीमुळे समाजाला धर्मशिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. तरुण पिढीला धर्मसंस्कारापासून दूर नेले जात आहे. मंदिर सरकारीकरण कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केला जात असलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांना तडा देण्याचे काम केले जात आहे. सनातन संस्थेसारख्या राष्ट्र व धर्म यांसाठी कार्य करणार्‍या संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. हिंदु धर्मातील देवतांचे सर्रास विडंबन होत आहे. अनेक संतांवर हल्ले होत आहेत. त्यांना जिवे मारण्याच्याही धमक्या दिल्या जात आहेत. हिंदुबहुल भारतामध्ये हिंदूंचे धर्मग्रंथ जाळले जात आहेत. अशा स्थितीत निद्रिस्त हिंदूंना जागृत करून आपल्या धर्माचा भगवा ध्वज या विश्‍वात चिरंतन फडकत ठेवूया !

सण व उत्सव साजरे करण्यात धार्मिकता असावी ! – मदन सावंत, सनातन संस्था
आपण करत असलेल्या धर्मजागृतीच्या चळवळीला ईश्‍वराचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या देवतांची अश्लील चित्रे काढली जात असतांना निद्रिस्त हिंदू षंढपणे बघत रहातात. धर्मावरील आघातांना जो विरोध करतो, तोच खरा हिंदुत्ववादी. हिंदूंनी व्यष्टी साधनेकडे लक्ष देऊन स्वत:मधील अहं व दोष यांचे निर्दालन केले पाहिजे. सण व उत्सव साजरे करण्यात धार्मिकता असली पाहिजे. उत्सव त्या त्या तिथीला साजरे केले, तरच देवतांच्या तत्त्वाचा लाभ होतो. आपण जे संस्कार करतो, त्यांना मनुष्याच्या जीवनात खूपच महत्त्व आहे. आज राज्यकर्ते हिंदु असूनही धर्मासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे आता हिंदु जनतेनेच धर्माकरता कृतीशील व्हायला हवे !

हिंदूंना स्वत:चे रक्षण स्वत: करण्यासाठी धर्माचे पाठबळ आवश्यक ! – विनय पानवळकर, धर्मशक्‍ती सेना
जिहादी दहशतवाद, संतांच्या हत्या व हिंदु धर्मावर होत असलेले आघात यांची जाणीव होऊनही हिंदु जागा होत नाही. काँग्रेसवाल्यांना सगळीकडे बाँबस्फोट झाले की, सनातनवालेच दिसतात. काँग्रेस सरकार बजरंग दल, सनातन संस्था व अनेक हिंदुत्ववादी संघटनां यांना अडकवण्याचा प्रयत्‍न करत आहे. स्वत:चे रक्षण स्वत: करायला हिंदूंना धर्माचे पाठबळ आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाने शरीर बळकट करावे व हिंदूंना एकत्र करावे, यासाठी धर्मशक्‍ती सेनेची स्थापना करण्यात आली आहे. धर्मशक्‍ती सेनेने सुरू केलेल्या प्रशिक्षणवर्गात सहभागी व्हा. प्रत्येकाला जिवंत रहाण्यासाठी स्वत:चे मनगट बळकट करायला पाहिजे. मनाची शक्‍ती वाढवण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता आहे.


हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने ठिकठिकाणी धर्मजागृती सभा होत आहेत. या सभांच्या वेळी वाईट शक्‍तींचा त्रास होतो, हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. तो त्रास दूर होण्यासाठी व धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सनातनचे संत पू. निकमतात्या नामजप करत आहेत. – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था

१. `कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
२. `कुठे जनतेला विविध प्रलोभने दाखवून स्वार्थी बनवणारे व नंतर काही न देणारे राजकीय पक्ष, तर कुठे राष्ट्र व धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणार्‍या व ईश्‍वरप्राप्‍तीचा मार्ग दाखवणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
३. राजापूर शहराची लोकसंख्या ९ हजार आहे. त्याशिवाय कोकणातील गावे दुर्गम भागात असल्यामुळे रहदारीसाठी हा भाग खूप त्रासदायक आहे. असे असतांना राजापूर येथील सभेला ४ हजार ५०० हून अधिक हिंदू उपस्थित असणे, हे हिंदु जनजागृती समितीबद्दल हिंदूंच्या मनात विश्‍वास व आशा निर्माण होत असल्याचे द्योतक आहे.

हिंदु धर्मजागृती सभेचे वैशिष्ट्य
`समाज, संघटना व साधक यांना अध्यात्म आणि धर्म या विषयी जागृत करणारी, हिंदु संघटनेत एकजूट निर्माण करणारी आणि साधकांमध्ये उत्साह निर्माण करणारी अशी ही धर्मसभा आहे.- ईश्‍वर (कु. क्षिप्रा वेद यांच्या माध्यमातून)

`हिंदु धर्मजागृती सभे’चे वृत्त असलेले `दैनिक सनातन प्रभात’चे अंक व इतर वृत्तपत्रे पुढील धर्मजागृती सभांच्या व इतर प्रसारासाठी अर्पण करा !
हिंदु धर्मजागृती सभेचे छायाचित्र व वृत्त असलेले `सनातन प्रभात’ तसेच इतर वृत्तपत्रांचे अंक पुढील हिंदु धर्मजागृती सभांच्या वेळी व एरव्हीही करण्यात येणार्‍या प्रसारासाठी उपयोगी पडतील. प्रसार सेवकांनी स्वत:साठी ठेवलेले अंक कोणाला न देता फक्‍त दाखवण्यासाठी वापरावेत. साधकांनी ते अंक एकत्र करून नजीकच्या आश्रमात पाठवून द्यावेत. आज प्रसिद्ध झालेल्या इतर मजकुरासाठी हा अंक संग्रही ठेवणार असल्यास अंक जमा करण्याची आवश्यकता नाही.

निगडीत वृत्त : धर्मजागृती सभा