…………तर श्री. शरद पवारांच्या आधी राज ठाकरे कदाचित पंतप्रधानही होतील.

मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव राज ठाकरे यांना कळत नसेल, असे नाही. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. मुंबईतील घुसखोर मुसलमानांना बांगलादेशात पळवून लावायचे, एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, तरी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल.

 

राज अटकेचे राजकारण हिंदूंच्या हिताचे नाही !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी पहाटे
रत्‍नागिरीत अटक केली. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. `अटक करून दाखवण्याचे आव्हान’ श्री. ठाकरे यांनी सरकारला दिले होते. मुख्यमंत्री देशमुख यांनी ते आव्हान स्वीकारले. `महाराष्ट्र पेटेल’, असे श्री. ठाकरे म्हणाले होते. पहिल्या दिवशी तरी तो पेटला नाही. म्हणून श्री. ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे महत्त्व किंचितही कमी होत नाही. उलट अनेकांची श्री.ठाकरे यांनी पंचाईत केली आहे. एकंदरीत जे राजकारण चालले ते मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या हिताचे नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

केंद्र शासनाच्या दडपणामुळेच राज ठाकरे यांना अटक
रेल्वे मंडळाच्या वतीने गेल्या रविवारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या
अन्य काही भागांत नोकरभरती करण्याच्या दृष्टीने काही परीक्षा घेण्यात आल्या, तशा परीक्षा होणार असल्याच्या जाहिराती बिहारच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या; पण महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या नाहीत, असे मनसेचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठी मुलांना या परीक्षांना बसता आले नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे चिडून परीक्षाकेंद्रावर हल्ला केला. काही विद्यार्थ्यांना चोप बसला. परीक्षांना बसता आले नाही. साहजिकच रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आगपाखड करून श्री. ठाकरे यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. लोकसभेत चर्चा झाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अंगात राक्षस संचारला असून दिसेल त्या परप्रांतियाला झोडून काढले जात आहे आणि त्यांना जगणं अशक्य झाले आहे, असे चित्र उभे केले गेले. परिणामी सर्व बाजूंनी दडपण वाढले. ठाकरे यांना अटक करण्यावाचून देशमुखांसमोर दुसरा पर्याय राहिला नाही.
ठाकरे यांचे राजकारण योग्य कि अयोग्य हा मुद्दा नाही. श्री. ठाकरे यांचे आंदोलनाचे विषय बरोबर आहेत. त्यासाठी त्यांनी निवडलेली वेळ योग्य नाही. त्यांच्या राजकारणामुळे हिंदूंमध्ये फूट पडत असून मुख्य शत्रू जो इस्लामी आतंकवाद त्याचे काय करायचे, हा प्रश्‍न तसाच अनिर्णित राहिला आहे.

मराठ्यांवरील अन्यायाची दाद मागणे म्हणजे संकुचितपणा
रेल्वे बोर्ड मराठी माणसावर अन्याय करते, हे उघड आहे. लालूप्रसाद
यादव रेल्वेमंत्री झाल्यापासून बिहारी माणसांची भरती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे, हे खरे आहे; परंतु याविरुद्ध महाराष्ट्रात निवडून गेलेल्या खासदारांना आवाज उठवता आला असता. मुख्यमंत्र्यांना नियोजन मंडळाकडे दाद मागता आली असती; परंतु मराठी माणसावरील अन्यायाची दाद मागणे म्हणजे संकुचितपणा आहे, असे खासदारांना वाटते. म्हणून बेळगावात कर्नाटक सरकारकडून गेली ५० वर्षे मराठी माणसावर सतत अन्याय होत आहे. त्याविरूद्ध मराठी खासदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कधी आवाज उठवल्याचे ऐकलेले नाही. म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोनचार बिहारींना चोप दिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. आपली पहिली मागणी श्री. ठाकरे यांना धडा शिकवा, अशी असते. मराठी माणसावरील अन्याय दूर झाला पाहिजे, असा मराठी माणसांचा सामूहिक आवाज उठत नाही.

प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना खलनायकाच्या रूपात उभे केले दुकानाच्या पाट्या मराठीत पाहिजेत, हा विषय वास्तविक महापालिकेच्या कार्यवाहीचा आहे. तसे नियम आहेत. निर्बंध आहेत. महापालिकेने आग्रह धरला नाही म्हणून मनसेला आग्रह धरावा लागला; परंतु मराठीत पाटी लिहायला सांगणे म्हणजे धर्मांतर करायला सांगण्याइतके गंभीर आहे, असा अर्थ प्रसारमाध्यमांनी लावला, आणि कारण नसतांना खलनायकाच्या रूपात राज ठाकरे यांना उभे केले गेले.

मराठी माणसाच्या एकजुटीवर वैचारिक गोंधळाचा परिणाम
श्री. ठाकरे अशा मुद्यांवर आंदोलन उभे करतात, तेव्हा सर्वसामान्य मराठी
माणसाला ते मुद्दे पटलेले असतात आणि या मुद्यांना पाठिंबा द्यावा, असेच त्याला वाटत असते; परंतु त्याची निष्ठा यापूर्वी त्याने शिवसेनेला वाहिलेली असल्याने शिवसेनेला अव्हेरून तो स्वतंत्र भूमिका घेत नाही. काही वेळा शिवसैनिकांचे मन राज ठाकरे यांच्याबरोबर तर शरीर श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असते. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती द्विधा होते. तेवढ्या प्रमाणात मराठी माणसाच्या एकजुटीवर या वैचारिक गोंधळाचा परिणाम होतो. श्री. राज ठाकरे आंदोलनासाठी जे मुद्दे घेतात, ते मुळचे आमचे मुद्दे आहेत, असे म्हणून शिवसेनेचे नेते राजच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्‍न करतात; परंतु अशी हवा काढता येत नाही. कारण मुद्दे कोणाची खाजगी `प्रॉपर्टी’ नसते. उद्या समान नागरी संहितेचा मुद्दा काही कारणाने काँग्रेसने मांडायचा ठरवल्यास तर तो आमचा मुद्दा आहे. तुम्ही मांडू शकत नाही, असे भाजप काँग्रेसला म्हणू शकत नाही. उलट आपला मुद्दा काँग्रेसने घेतला, हा भाजपने आपला विजय मानला पाहिजे. काँग्रेस तसे करत असते. उदा. सावरकरांचा अखंड हिंदुस्थानचा मुद्दा इतका उचलून धरला की, १९४६ च्या सार्वजनिक निवडणुकीत काँग्रेसने अखंड हिंदुस्थानला पाठिंबा देऊन त्या मुद्यावर निवडणुका लढवण्याचे ठरवले. काँग्रेसने अखंड हिंदुस्थानच्या मुद्यावर लढायचे ठरवले म्हणून लोकांना इतका आनंद झाला की, त्यांनी काँग्रेसला बहुमताने निवडून दिले. सत्तेवर येताच वर्षाच्या आत काँग्रेसने फाळणीला पाठिंबा दिला आहे आणि लोकांना फसवले. तशी फसवणूक राजने करू नये, असे वाटत असेल, तर शिवसेनेने सावध रहावे; पण आमचे मुद्दे उचलू नका, असे म्हणू नये.

उत्तरप्रदेशीय लोकांची मते पदरात पाडणे, हा काँग्रेसचा डाव
शिवसेना ही शक्‍ती आहे. या शक्‍तीचा आधार घेऊन भाजप महाराष्ट्रात
सत्ता संपादन करू शकतो. काँग्रेसच्या विशेषत: शरद पवारांचा राग भाजपवर आहे. भाजपला उखडून टाकण्यासाठी ते शिवसेनेला दुर्बळ करणार आहेत. शिवसेनेला दुबळी करण्यासाठी ते राज ठाकरे यांचा वापर करणार आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि आपण उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव आहे. तो राज ठाकरे यांना कळत नसेल असे नाही. पण संघटना चलवण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे आणि तेवढा पैसा त्यांना केवळ शरद पवार देऊ शकतात, अशी त्यांची समजूत आहे.

राज ठाकरे यांनी देशहितासाठी मराठी मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवून बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्‍न प्रथम हाती घ्यावा

यावर उपाय म्हणजे मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला पाहिजे. व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहीजे. मुंबईत घुसलेले बांगलादेशी मुसलमान यांना बांगलादेशात पळवून लावायचे एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, तरी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल, लोक या आंदोलनाला वाटेल तेवढा पैसा उपलब्ध करून देतील आणि मराठी माणसात फूट पडणार नाही. राष्ट्रीय कर्तव्यकर्म केल्याचे पुण्य श्री. ठाकरे यांना मिळेल. दुकानच्या पाट्या मराठीत लिहिण्यापेक्षा दोनचार नोकर्‍या पदरात पाडून घेण्यापेक्षा बांगलादेशी मुसलमानांना मुंबईबाहेर बांगलादेशात हाकलून देण्याचा मुद्दा सर्वांना पटणारा आहे. मुंबईचे गुजराती, दाक्षिणात्य, उत्तरप्रदेशी इत्यादी सगळयांना या मुद्याला पाठिंबा द्यावाच लागेल. जे पाठिंबा देणार नाहीत ते उघड्यावर पडतील. उदा. समाजवादी पक्षाचे अमरसिंग बांगलादेशी मुसलमानांविरूद्ध बोलणार नाहीत. त्या वेळी जया बच्चन, शबाना आझमी, तिस्ता सेटलवाड आणि महेश भट काय करतील, ते पहाणे मनोरंजक ठरेल.
म्हणून श्री. राज ठाकरे यांनी देशहितासाठी मराठी माणसाचे मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवून बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्‍न प्रथम हाती घ्यावा. त्यानंतर आपोआप इस्लामी आतंकवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी तरुण त्यांच्या भोवती गोळा होतील. त्यात ते यशस्वी झाले, तर श्री. शरद पवारांच्या आधी ते कदाचित पंतप्रधानही होतील.

 

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

Leave a Reply