म्हणे मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात नागपूरमध्येही सनातनवर नजर !

सनातनविषयी अपप्रचार करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणार्‍या दैनिक सकाळचा निषेध !

दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर सनातनविषयी अपप्रचार !

नागपूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – मालेगावमधील बाँबस्फोटामागे सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूरमध्ये पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असलेल्या नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. येथे बहुतांश हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची निवासस्थाने आणि कार्यालये आहेत. त्यांत सनातनचाही समावेश आहे, असे आधारहीन व धादांत खोटे वृत्त दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(हाती कोणताही पुरावा नसतांना सनातनवर असा अश्लाघ्य आरोप करणार्‍या दैनिक `सकाळ’चा निषेध ! सनातनचे पदाधिकारी वगैरे कुणीही नाहीत. सनातनमध्ये वैयक्‍तिक आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी साधक येतात. सनातनमध्ये पदाधिकारीच नाहीत, तर अशी काही निवासस्थाने वा कार्यालये नागपूरमध्ये असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही ! सनातनची बदनामी करणार्‍या दैनिक `सकाळ’वर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने सनातन वकिलांचा सल्ला घेत आहे. मालेगाव बाँबस्फोटात सनातन अथवा हिंदु जनजागृती समिती यांचा कोणताही संबंध नाही, असा निर्वाळा खुद्द दहशतवादविरोधी पथकाने दिला आहे. – संपादक) या वृत्तात पुढे म्हटले आहे, `सनातनशी संबंधित कार्यकर्त्यांना मालेगाव बाँबस्फोटाच्या अनुषंगाने अटक केल्याचे वृत्त मिळाल्यामुळे नागपूरमध्येही खळबळ उडाली. (निखालस खोटे वृत्त प्रसिद्ध करणारे दैनिक `सकाळ’चे संकेतस्थळ ! – संपादक)पोलिसांनी तातडीने सनातनच्या प्रतापनगरातील, तसेच अन्य ठिकाणच्या कार्यालयांकडे नजर वळवली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांनी अधिक माहिती देण्याचे मात्र टाळले.’

सनातनचा तपास नाही ! – नागपूर पोलीस आयुक्‍त
मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या संदर्भात सनातनची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताबाबत आज सनातनच्या नागपूर येथील साधकांनी पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली असता “कोणत्याही बाँबस्फोटाच्या प्रकरणात सनातनचा तपास आमच्याकडे सुरू नाही”, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी साधकांकडून सनातनच्या कार्यालयांची माहिती घेतली व इतरही काही बाबींची चौकशी केली.

खानदेशमधील काही जिल्ह्यांत सनातनची चौकशी !
खानदेशमधील काही जिल्ह्यांत सनातनची चौकशी करण्याचा आदेश उच्चस्तरावरून प्राप्‍त झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. अकोल्यात सनातनच्या एका साधकाच्या भावाला सनातनचा साधक समजून पोलीस चौकशीसाठी त्याच्याकडे गेले; परंतु तो सनातनशी संबंधित नसल्याचे कळल्यावर ते परतले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

काँग्रेस सरकारला `सनातन प्रभात’ची भीती का वाटते ?

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत `सनातन प्रभात’वर बंदी घालण्याच्या विषयाची चर्चा होणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. श्री. शरद पवार व श्री. रा.रा. पाटील यांनी `सनातन प्रभात’बद्दल गेले काही दिवस जे वातावरण निर्माण केले आहे, ते पहाता भारताला इंडीयन मुजाहिदीन, हुजी, लष्कर-ए-तोयबा, सिमी यांसारख्या इस्लामी दहशतवादी संघटनांपासून नव्हे, तर राष्ट्र व धर्म यांसाठी कार्य करणार्‍या `सनातन प्रभात’पासून अधिक धोका आहे, असा भास कोणालाही होईल.

एका बाजूला इस्लामी दहशतवाद व नक्षलवाद बोकाळत असतांना आमचे मंत्री-संत्री सनातन प्रभातवर बंदी आणण्याच्या चर्चेत स्वत:चा बहुमोल वेळ वाया घालवणार, याचे आम्हाला वैषम्य वाटते. आम्हाला राहूनराहून एकच प्रश्‍न सारखा भेडसावतो तो हा की, आठ लाख खडे सैन्य असलेल्या काँग्रेस सरकारला जेमतेम १५ हजार (तोही केवळ महाराष्ट्रात) खप असलेल्या `सनातन प्रभात’ची इतकी भीती का वाटावी ?

 

आपल्याला काय वाटते ? आम्हाला प्रतिक्रिये द्वारे अवश्य कळवा

 

धर्माभिमानी हिंदूंना आवाहन : सनातनवरील बंदीच्‍या विरोधात आवाज उठवा!

काँग्रेस सरकार `दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, कदाचित हा आमचा शेवटचा संदेश असेल. `दैनिक सनातन प्रभात’चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. सद्यस्थितीत कोणावरही बंदी आणली, तरी ती एका हिंदु संघटनेवर असल्यामुळे त्याचे दु:ख सर्वांनाच असेल; पण त्यातूनही ती बंदी `सनातन प्रभात’वर कोसळली, तर आमचे हजारो हिंदु बांधवांशी होणारे रोजचे संभाषण बंद होईल. `सनातन प्रभात’ने हिंदु बांधवांसाठी केलेल्या कार्यामुळे हजारो हिंदु बांधवांची रोजची व्यष्टीच नव्हे, तर समष्टी साधनेची सुरुवातही `सनातन प्रभात’मधील विचारांनी होते. बंदीनंतर हा विचारांचा ओघ खंडित होईल व हजारो हिंदु बांधवांची स्थिती महापुरात अडकल्याप्रमाणे दिशाहीन होईल. वाचकांनो, आम्ही कधीच अर्थलाभासाठी `दैनिक सनातन प्रभात’चा वापर केला नाही. हिंदूंमध्ये जागृती व्हावी, हिंदु समाज बलसंपन्न व्हावा व ईश्‍वरी राज्याच्या रूपाने लागणारी मधुर फळे हिंदु समाजाला चाखता यावीत, हाच आमचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री : मुख्यमंत्री, मंत्रालय, मुंबई-३२, महाराष्ट्र

दूरध्‍वनी क्रमांक : (022) 2202-5151,5222

chiefminister@maharashtra.gov.in

निषेधाचे पत्र पाठवण्‍यासाठी खालील मार्गिकेवर संपर्क साधा.

http://www.sanatan.org/en/08/index.html

वाचा `सनातन’वर बंदी विशेष 

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/bandi/