बाळासाहेब ठाकरे यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवा ! – अबू आझमी यांचे फुत्कार

मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) – समाजवादी पक्षावर बंदीची मागणी घालून मुलायमसिंग, अमरसिंग व मला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करणार्‍या बाळ ठाकरे यांना वेड्यांच्याच रुग्णालयात पाठवावे. तसेच त्यांच्यावर व राज ठाकरे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आज आझाद मैदान येथे केली.

ते काल मनसे व शिवसेना यांच्याकडून रेल्वे नोकर भरतीच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज आझाद मैदान येथे करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. या ठिकाणी समाजवादी पक्षाकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. (असे नैतिकताहीन कार्यकर्ते देणारे पक्ष लोकशाही निरर्थक ठरवतात. – संपादक) आझमी पुढे म्हणाले की, मनसेची गुंडगिरी आता सहनशक्‍तीच्या पलीकडे गेली आहे. मुंबई ही कोणाच्या बापाची नाही. आम्ही टिपू सुलतानचे वंशज आहोत. आम्ही कोणाच्या जिवावर येथे जगत नाही. मुंबईतील ४० लाख उत्तर भारतियांना येथून हाकलवण्यासाठी बाळ ठाकरे व राज ठाकरे यांना २० जन्म घ्यावे लागतील, असे सांगत समाजवादी पक्षाकडून दादागिरीला अशा दादागिरीने उत्तर देऊ, असे अबू आझमी यांनी जाहीर केले.


छटपूजेला मनसेकडून होणार्‍या विरोधावर बोलतांना अबू आझमी यांनी समाजवादी पक्ष छटपूजेत सहभागी होणार आहे. ती होण्यापासून कोण रोखते हे आम्ही पाहून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली

दहशतवादी कार्यकर्ते असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घाला ! – शिवसेनाप्रमुख.

दहशतवाद्यांचा समर्थक असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या शिवसेनाप्रमुखांचे अभिनंदन !

 

 

मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) – दिल्लीतील बाँबस्फोटांमधील आरोपी जामियानगरच्या बाटला हाऊसमध्ये लपले होते. पोलिसांनी जिवावर उदार होऊन कारवाई केली. जे आरोपी तिकडे पकडले गेले, त्यांतील काहीजण समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते निघाले. खरेतर या एकाच कारणाबद्दल समाजवादी पक्षावर कडक कारवाई करून, त्यांच्या कार्याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

बजरंग दल व सनातन यांसारख्या संस्थांवर बंदी, वगैरे घालण्याची भाषा अधूनमधून काँग्रेससह ही सर्व भंपक मंडळी करत असतात ना मग त्याच कारणासाठी त्या `सप’वर कारवाई का करत नाही ? `सप’वर नुसती कारवाई नको, तर अशा धर्मांध पक्षावर बंदीच घालायला हवी, असे सडेतोड विचार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक `सामना’मधील संपादकीय लेखातून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मांडले आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे, “सप’वर बंदी घातली, तरच हा देश सुखी होईल. हिंदु संघटनांना एक न्याय व धर्मांध मुसलमानांची थुंकी झेलणार्‍या `सप’सारख्या पक्षांना दुसरा न्याय ! हा काय मामला आहे ? राष्ट्रद्रोही महंमद अफझलची वकिली करण्यातही हे `सप’वाले जास्त आघाडीवर आहेत. महंमद अफझलला `दया’ किंवा `मानवता’ दाखवणे, हाच जर या मंडळींचा राष्ट्रधर्म असेल, तर मग हिंदुस्थानच्या शालेय पुस्तकांत इतिहासाचे धडे बदलावे लागतील व शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, कान्हेरे, पिंगळे, अश्फाकउल्ला खां व मौलाना आझाद यांना `लुटारू’ ठरवून महंमद अफझललाच इतिहासाच्या पानावर `योद्धा’ व `क्रांतीकारक’ म्हणून स्थान द्यावे लागेल. मुसलमानांच्या खुषमस्करीसाठी आता हे एवढेच करणे उरले आहे व उद्या `सप’सारखा `जीनावादी’ पक्ष अशा प्रकारची मागणी करायलाही कमी करणार नाही.”

 

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !