मतदाराच्या दृष्टीक्षेपासाठी…

`सनातन बंदी पर्व विशेष’ प्रसिद्ध करून मागच्या रविवारी सनातनवर येऊ घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने आम्ही वाचकांसमोर वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्‍न केला. काँग्रेस सरकार ही बंदी आणण्यासाठी इतके काही उतावळे झाले आहे की, `दैनिक सनातन प्रभात’चा येणारा कोणताही अंक शेवटचा ठरू शकतो. राजकारणी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सनातनला पाण्यात पहात आहेत, असे आम्ही पूर्ण आत्मविश्‍वासाने म्हणू शकतो.

 

महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेले केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते श्री. शरद पवार यांनी त्यांचे एकही भाषण सनातनच्या मुद्याला हात घातल्याशिवाय उरकले नाही. `सनातनवरील बंदी’ हा राजकारण्यांच्या मनातील मुद्दा आहे; त्याविषयीची कारवाई हा राजकारण्यांच्या हातातील भाग आहे. त्याविषयी अधिक सांगण्यासारखे काही नाही; पण या बंदीच्या मुद्यापेक्षा मुसलमानांची मतपेढी निर्माण करण्याकडे असलेला या राजकारण्यांचा रोख जनता सहजपणे ओळखू शकली. महाराष्ट्राचे गृहमंत्री असे काही वक्‍तव्य करत सुटले आहेत की, राज्यात `सनातनवरील बंदी’ हा एकच जटील मुद्दा त्यांच्याजवळ आहे. सनातनवर बंदी आणण्याचा त्यांचा ठाम निर्धार दिसतो व त्याला अनुसरून तपास सुरू आहे, असे ते सांगतात. `प्रथम तपास व नंतर बंदी’ असा सर्वसाधारण संकेत असतो, मात्र सनातनवर बंदी घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस `प्रथम निर्णय व मग तपास’ या आडमुठ्या मार्गाचा अवलंब करत आहे.

काँग्रेसचा हिंदुद्वेष !
हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी आणण्याची काँग्रेसची (अ)नीती येथे अधोरेखित होते व इतिहासाकडे वळून पहाण्याची इच्छा होते. १९४८ मध्ये संघावर गांधीवधाचा आरोप करून बंदी आणण्यात आली व १९६७ साली निवडणुकीत मुसलमानांची मते मिळवण्यासाठी काँग्रेसने संघाविरुद्ध आगपाखड करण्यास सुरुवात केली. हीच नीती पुढील निवडणुकांचे वातावरण लक्षात घेऊन सध्याही काँग्रेस पक्ष वापरत आहे. अर्थात हा केवळ `निवडणूक देखावा’ म्हणून बेसावध रहाणे सयुक्‍तिक नाही. प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक सनातनप्रेमीने आजपर्यंत मिळालेल्या दृष्टीकोनांच्या आधारे सक्षम बनून तयार राहिले पाहिजे. प्रसिद्ध लेखक मा.गो. वैद्य यांनी संघावरील बंदीच्या प्रसंगाची आठवण त्यांच्या स्वत:च्या `हिंदुसंघटन शक्यता, आवश्यकता आणि सफलता’ या पुस्तकात नमूद केली आहे. हिंदुद्वेषभावाने काँग्रेसने केलेले ते कृत्य हिंदुत्ववाद्यांसाठी उद्बोधक आहे. प्रस्तुत पुस्तकातील पुढील वेचा पहा.
`३० जानेवारी १९४८ रोजी गांधींचा वध नथुराम गोडसे यांनी केला. या खुनाच्या कटातील लोकांना पकडण्यात येऊन त्यांना शिक्षाही झाली; परंतु महात्मा गांधींच्या वधाचे निमित्त करून संघावर बंदी घालण्यात आली. संघाच्या जवळपास २० हजार कार्यकर्त्यांच्या घरांच्या झडत्या घेण्यात आल्या. संघाची देशभरातील सर्व कार्यालये बंदीच्या कालावधीत दीड वर्षे सरकारच्या ताब्यात होती. त्यातील एकूण एक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. पण संघाला या कटात गोवावे, असा एकही पुरावा सरकारच्या हाती आला नाही. प.पू. गोळवलकर गुरुजींसारख्या ऋषीतुल्य व्यक्‍तीला भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमाखाली म्हणजे खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सरकार संघाला `हिंसक’ समजत होते व संघाचा गांधींच्या खुनाशी संबंध आहे, असे सांगून त्याने संघावर बंदी घातली; पण न्यायालयाची गोष्ट सोडाच, सरकारला सकृतदर्शनीही संघाचा दोष दिसला नाही. त्यामुळे गुन्ह्याच्या प्राथमिक चौकशीनंतर संघावरील बंदी उठवायला हवी होती; मात्र तसे झाले नाही. संघाने सत्याग्रह केल्यावर ही बंदी उठली. संघाचा गांधींच्या खुनाच्या कटाशी संबंध नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर संघाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर या आरोपावरून खटला भरण्यात आला नाही, हे दिसून आल्यानंतर नथुराम गोडसे हा लहानपणी संघाचा स्वयंसेवक होता, असे सांगण्यात आले.
१९६७ साली परत निवडणुकीत कम्युनिस्टांकडे असलेली मुसलमानांची मते मिळवण्यासाठी तत्कालीन इंडिकेट काँग्रेसने संघाचा बागुलबुवा उभा करून मुल्लामौलवींच्या दावणीत बांधली गेलेली मते ओढण्यासाठी संघाविरुद्ध प्रचाराचा धुरळा उठवण्यात आला. नंतर तत्कालीन भिवंडी-जळगाव येथील दंग्याचे निमित्त करून संघावर आग पाखडणे सुरू झाले. त्यानंतर बंदी आणण्यासाठी नवीन कारण शोधण्यात आले.’

आता जबाबदारी मतदाराची !
काँग्रेस पक्षाचे हे पूर्वग्रहदुषित आणि हिंदुद्वेषमूलक राजकारण सार्‍या देशाला वेठीस धरत असते. राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या मुद्यांच्या संदर्भात या पक्षाने केलेल्या चुका अनंत आहेत. संसदेवर हल्ला करणार्‍या अफझलला फाशी नाही, भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची अश्लील चित्रे रेखाटणार्‍याला पुरस्कार आणि मानपान मिळतो आणि संसदेच्या सभागृहात चलनी नोटांच्या बंडलांचे होणारे वाटप दूरचित्रवाणी वाहिन्या दाखवतात. काँग्रेसच्या सरकारकडे याचे उत्तर नाही. नैतिकतेचे अध:पतन झालेल्या आणि भ्रष्टाचार हा केंद्रबिंदू असलेल्या काँग्रेसच्या राजवटीतून सुटका करून घेण्यासाठी मतदाराने सावध होणे, हाच आता एकमेव पर्याय !

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो सावधान!

कानफटात मारणे नि बाँबस्फोट

कधीतरी एखादा हिंदु चिडू शकतो. अत्याचार्‍याच्या कानफटात मारू शकतो. त्यानंतर परिस्थिती शांत ठेवायची असेल, तर कानफटात का मारली, याची चौकशी करून तो हिंदु आणि अत्याचारी यांची समोरासमोर गाठ घालून कानफटात मारण्याचे मूळ कारण पुन्हा होणार नाही. याची पोलिसी भाषेत जर समज दिली, तर जे अत्यंत अनिच्छेने हिंदूला कधीतरी करावे लागते ते कानफटात मारण्याचे काम त्याला पुन्हा करावे लागणार नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की, कानफटात मारणे म्हणजे आतंकवाद नव्हे. आतंकवादाचा हेतु प्रतिपक्षाला समूळ नष्ट करण्याचा असतो. कानफटात मारण्याचा हेतु सुधारण्याचा असतो.

 लेखक : ज्येष्ठ पत्रकार

भारतभूमी पादाक्रांत करणे, हे इस्लामी आणि ख्रिस्तीधर्मांचे मुख्य उद्दिष्ट !
गेले तीन महिने इस्लाम आणि ख्रिस्तीधर्माचे गुंड प्रवृत्तीचे लोक हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून दंगली घडवून आणत आहेत. हिंदूंमध्ये हळूहळू जागृती निर्माण होत आहे. रा.स्व. संघ, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवसेना आणि सनातन संस्था या संघटना हिंदूंची उदासीनता झटकून टाकण्याचा प्रयत्‍न करत आहेत. जागतिक शांततेसाठी हिंदु संस्कृतीचा प्रभाव वाढून इस्लाम आणि ख्रिस्तीसंस्कृतीचा प्रभाव कमी झाला पाहिजे. हे ते सांगत आहेत. आशियातील प्रभावशाली इस्लामी राष्ट्र म्हणजे पाकिस्तान जे आज जागतिक आतंकवादाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आशियातील सर्वात जुने ख्रिस्तीराष्ट्र फिलिपिन्स ते आशियातील सर्वात दरिद्री राष्ट्र आहे. जगातील सर्वात श्रीमंत, सामर्थ्यशाली आणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणजे अमेरिका ते भारताचा ईशान्य भाग ख्रिस्तीमय करण्यासाठी पैसा पुरवत आहे. काश्मीर स्वतंत्र रहावा, असेही अमेरिकेला वाटत आहे. सध्याचे पोप महाशय यांनी या शतकात आशिया खंड िख्र्तास्मय करण्याची घोषणा केली आहे. ओसामा बिन लादेनच्या `हिट लिस्ट’वर भारत आहे. म्हणजे िख्र्चाश्‍न आणि इस्लामचे झेंडे खांद्यावर घेतलेल्या शक्‍ती हिंदुत्वाला संपुष्टात आणण्यासाठी बद्धपरिकर आहेत. गेल्या ४० वर्षात भारतातील मिशनर्‍यांच्या संख्येत शंभर पटीने वाढ झाली आहे. भारतात काही प्रमाणात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याइतका पैसा इस्लामी राष्ट्रांकडे आहे. इस्लामी आणि ख्रिस्तीधर्मांचे विस्तारीकरणाचे पुढच्या पन्नास वर्षाचे जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यात भारतभूमी पादाक्रांत करणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे.

हिंदुत्वाविषयी प्रबोधन झाल्यास किल्मिषे दूर होतील !
भारतात हिंदु ८५ प्रतिशत आहेत. मुसलमान आहेत तसे ख्रिस्तीही आहेत. मुसलमान आणि ख्रिस्तीकाही पिढ्यांपूर्वी हिंदु होते. हिंदु हा उदारमतवादी, परम्तसहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष असतो. त्यामुळे या पूर्वीच्या हिंदूंनी नव्या धर्मगुरूंना सांगितले पाहिजे की, आम्ही नवा धर्म स्वीकारला असला तरी मूळचे आम्ही हिंदु असल्याने उदारमनस्कता, धर्मनिरपेक्षता आणि परमतसहिष्णुता या मूल्यांचा त्याग करण्याचे आम्हाला काहीच कारण नाही. महमंद पैगंबर किंवा येशू िख्र्तास् यांच्या उपदेशाचे पालन केल्याने मानसिक शांती कशी मिळेल, ते तुम्ही पाहा. ती शांती मिळताच तिच्या बळावर पोटापाण्याचा उद्योग प्रामाणिकपणे करून स्वत:च्या आणि देशाच्या संपत्तीत भर कशी घालायची ते आम्ही पाहू. इतक्या स्पष्टपणे मुसलमान आणि ख्रिस्तीएकमुखाने भारताच्या बाजूने आपल्या धर्मगुरूंशी बोलले नसावेत. तथापि हिंदूंचा प्रबोधनाचा वेग जसा वाढेल, तसे मुसलमान आणि ख्रिस्तीयांच्या मनात हिंदुत्वाविषयी दुसर्‍यांनी भरवलेली काही किल्मिषे असतील, ती दूर होतील.

संपूर्ण भारतात मुसलमानांनी तळ ठोकला आहे !
पण तोपर्यंत हिंदूंनी काय करायचे ? आतंकवादाविषयी मुसलमानांच्या म्हणून ज्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटना आहेत. त्यांची मते काय आहेत, ते विचारण्याची वेळ आली आहे. या देशाच्या राजकीय समस्या या मूलभूत समस्या आहेत. मुसलमानांना काश्मीर हवा आहे. विशाखापट्टणपासून कन्याकुमारीपर्यंत एक सलग भूभाग त्यांना इस्लामच्या आधिपत्याखाली हवा आहे. मुसलमानांना आसामही हिंदूंकडून हिसकावून घ्यायचा आहे. मुसलमान संघटना आणि सामर्थ्य या दृष्टीने पहाता उत्तर प्रदेशात दंड थोपटण्याच्या अवस्थेत आहेत. भारतातील एक राज्य असे नाही की, जेथे मुसलमानांनी आपला तळ ठोकलेला नाही. 

अमर्याद पूर्वपुण्याईमुळे हिंदु देशोधडीला लागले नाहीत !
अशा परिस्थितीत हिंदूंनी काय करायचे ? एखाद्या घरात बाईचे पाऊल सतत बाहेर असते आणि तिला पदराची काळजी नसते, बाप व्यसनी आणि जुगारी असतो, त्या घरातील लहान मुले सन्मार्गाला लागली, तर ती पूर्वपुण्याई म्हणायची. हिंदूंच्या नावावर अशी पूर्वपुण्याई प्रचंड प्रमाणावर गोळा आहे. सरकार मायबाप असते. भारतावर प्रदीर्घ काळ काँग्रेसने राज्य केले आहे. या मायबाप सरकारमधील आई बाहेरख्याली आहे. ती आंतरराष्ट्रीय निष्ठांना सदोदित शरण जाते. बाप हिंदु-मुस्लिम ऐक्याचा जुगार खेळत आहे. हा जुगाराचा पट मांडून ८८ वर्षे झाली. सतत हार पत्कारावी लागत आहे. पाकिस्तान म्हणतात तो मूळचा हिंदु प्रदेश काँग्रेस संस्कृतीने जुगारात घालवला. पुढचा फासा उलटा पडला आणि एक तृतीयांश काश्मीर गमवावा लागला. त्यानंतर प्रतिपक्ष हिंदूंच्या छाताडावर बसून हिंदूंचे फासे स्वत:च टाकू लागला. भारत-पाकिस्तान सीमेवर प्रत्येक दिवशी एक भारतीय सैनिक पाकिस्तानी सैनिकांच्या अतिक्रमणाला रोखून धरण्याच्या प्रयत्‍नात आपल्या प्राणाचे बलिदान करत आहे. इस्लामी आतंकवाद भारतात जेथे जागा मिळेल, तेथे बीभत्स नंगा नाच करत आहे. त्यात प्रत्येक दिवशी एका हिंदुला आपला जीव गमवावा लागत आहे. हिंदूला देशोधडीला लावण्याचे काँग्रेस आणि बंगलबच्चांनी ठरवले आहे. तरी हिंदु देशोधडीला लागले नाहीत; कारण त्यांची पूर्वपुण्याई अमर्याद आहे.

सावरकरांनी दिलेला जीवितहेतू साध्य करण्यासाठी गोळवलकरांनी संघटना दिली
रा.स्व. संघ, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवसेना, सनातन संस्था या संघटना काम करत आहेत. हिंदूंची अस्मिता मोडू देत नाही आहेत. सावरकरांनी हिंदूंना जीवितहेतू दिला. तो साध्य करण्यासाठी गोळवलकरांनी संघटना दिली. शिवसेनेने या संघटनेला सत्तेवर येण्यास मोलाचे साह्य केले. आता हिंदूंच्या निष्ठा विचलित होऊ नयेत; म्हणून त्यांचा आध्यात्मिक पीळ घट्ट करण्याचे काम डॉ. आठवले करत आहेत. वरदानंद भारती होऊन गेले. संभाजीराव भिडे अजून आहेत.

कानफटात मारणे म्हणजे आतंकवाद नव्हे !
असे असूनही कधीतरी एखादा हिंदु चिडू शकतो. अत्याचार्‍याच्या कानफटात मारू शकतो. त्यानंतर परिस्थिती शांत ठेवायची असेल, तर कानफटात का मारली, याची चौकशी करून तो हिंदु आणि अत्याचारी यांची समोरासमोर गाठ घालून कानफटात मारण्याचे मूळ कारण पुन्हा होणार नाही. याची पोलिसी भाषेत जर समज दिली, तर जे अत्यंत अनिच्छेने हिंदूला कधीतरी करावे लागते ते कानफटात मारण्याचे काम त्याला पुन्हा करावे लागणार नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की, कानफटात मारणे म्हणजे आतंकवाद नव्हे. आतंकवादाचा हेतु प्रतिपक्षाला समूळ नष्ट करण्याचा असतो. कानफटात मारण्याचा हेतु सुधारण्याचा असतो. घरात वडीलधारी माणसे चुकणार्‍या लहान मुलांच्या कानफटात मारतात तेव्हा उद्देश ती मुले जगातून नाहीशी व्हावी, असा नसतो. ती सुधारावी, मोठी व्हावी, असा असतो. हिंदु या देशात वडीलधारे आहेत. त्यांनी मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू आणि पारशी यांना धाकट्या भावासारखे मानले आहे. पैकी ज्यू आणि पारशी यांच्याजवळ कृतज्ञता आहे. संबंध जगात आमचा द्वेष होत असतांना केवळ भारतात हिंदूंनी आम्हाला धाकट्या भावासारखे मायेने वागवले, असे इस्त्रायलने १९४८ मध्ये स्वतंत्र होताच अधिकृत इतिवृत्त प्रसिद्ध करून म्हटले आहे. पारशी हे भारताशी दूधात साखर मिसळावी. तसे एकरूप झाले आहे. मुख्य प्रश्‍न मुसलमानांचा आहे. ते कधीही भारताशी एकरूप झाले नाहीत. भारत इस्लाममय करण्याचे ध्येय आपण सोडले आहे, असे त्यांनी कधी म्हटलेले नाही. १९४८ मध्ये अगदी तसाच नव्हे; पण आम्ही ते नव्हेच असा आभास निर्माण करणारा एक ठराव मुस्लीम लीगने केला होता; पण मुस्लीम लीगकडे संशयाने बघू नका; ती देशभक्‍तांची संघटना आहे. असे प्रशस्तीपत्र नेहरूंनी दिल्यावर मुसलमानांना आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे. असे वाटण्याची आवश्यकता नव्हती.

दंगा मोडण्यास काँग्रेस सरकारची इच्छाच नाही !
परवा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रीय एकात्मता परिषदेची बैठक झाली. नेहरु आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या हिंदु-मुस्लीम विषयक दृष्टिकोनात फरक जाणवला नाही. हिंदूने कानफटात मारणे आणि मुसलमानाने आतंकवादी कृत्ये करण्याचा सपाटा लावणे, यातील फरक नेहरूंनाही कळला नाही; म्हणून आयएस्आयला सगळा भारत पोखरता आला. डॉ. मनमोहनसिंग जर पुन्हा पंतप्रधान झाले, तर ते नावाला पंतप्रधान असतील, देशाचा कारभार महंमद अफझल आणि त्याचे साथीदार चालवतील. सरकारची इच्छा असेल, तर कोणताही दंगा सरकार मोडू शकते. ब्रिटिश शासनाची इच्छा नसल्याने हिंदु-मुस्लीम दंगे मिटत नाहीत, असे लो. टिळक म्हणाले होते. काँग्रेस सरकारांच्या विषयी ते आजही खरे आहे.

`सनातन’वर बंदी विशेष

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/bandi/bandhi.htm

बंदीची पार्श्‍वभूमी

अनुक्रमणिका

  •  

    हिंदूंनो, खालील मुद्दे वाचा व आपण खरोखरच सुराज्यात आहोत का, याचा विचार करा !

     

  •  

    चिंताग्रस्त प्रजासत्ताक ! – संपादकीय : शुक्रवार, २६ जानेवारी २००७

     

  •  

    राष्ट्रीय सण साजरे करण्याची भारताची पद्धत ही मांत्रिकांसाठी पर्वणीच ! – सूक्ष्मजगतातील एक ज्ञानी

     

  •  

    भारतमातेचा आक्रोश ! – सनातनचे ज्ञान-प्राप्‍तकर्ते साधक श्री. गोपाळ कदम

     

  •  

    हिंदुस्थानची दुर्दशा का झाली ? – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

     

  •  

    हिंदुस्थानात देशभक्‍तीचा दुष्काळ ! – लेखक : प्रा. द.या. मुळे

     

  •  

    पुन्हा पारतंत्र्याच्या दिशेने … लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मुंबई

     

  •  

    धर्मसंस्कृतीपासून राजसत्ता दूर गेल्याने घराघरात नास्तिकता निर्माण झाली आहे ! – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

     

  •  

    स्वातंत्र्यानंतर आलेल्या सर्वधर्मसमभावी समाजवादी लोकशाही सरकारने भारताची लावलेली वाट ! – प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

     

  •  

    भारतीय संविधानाने जागतिक चक्रवर्तीत्वाचा प्रचार तर दूरच; पण विचारही न करणे

     

  •  

    म. गांधी, पंडित नेहरू व काँग्रेस यांच्यामुळे देशाचे झालेले नुकसान

     

  •  

    स्वातंत्र्यदिनाचा घोळ – इतिहासाचे अभ्यासक व प्रथितयश प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे

     

  •  

    भारताला विषारी विळखा ख्रिस्तीकरणाचा ! – संकलक : श्री. नीलेश बोरा, लासलगाव

     

सनातनची भूमिका

अनुक्रमणिका

  •  

    सनातन संस्थेची सत्त्वपरीक्षा !

     

  •  

    केला जरी पोत बळेची खाले । `सनातन’ ज्वाळा तरी ती वरती उफाळे ।।

     

  •  

    `साधकांनो, काँग्रेस सरकारचे बंदीचे आव्हान स्वीकारा !

     

लेख

अनुक्रमणिका

  •  

    हा हिंदुत्वाशी दुस्वास नव्हे का ?

     

  •  

    धोक्याची घंटा-विटंबना रोखा !

     

  •  

    समाज सनातन संस्थेबरोबर आहे !

     

  •  

    बंदी घातली तरी टिकणार नाही !

     

पोलिसांचा ससेमिरा

अनुक्रमणिका

  •  

    धर्माभिमानी हिंदूंच्या मागे पोलिसांचा ससेमिरा !

     

  •  

    रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात येऊन पोलिसांकडून संस्थेची चौकशी

     

  •  

    सनातनच्या देवद (तालुका पनवेल) येथील आश्रमाची पोलिसांकडून चौकशी !

     

  •  

    सनातनच्या आश्रमातील वाहनांचे क्रमांक गुप्‍तपणे नोंदवण्याचा पोलीसयंत्रणेचा प्रयत्‍न !

     

  •  

    सनातनच्या आश्रमात जाणार्‍या कुरियरची पोलिसांकडून तपासणी !

     

  •  

    `दैनिक सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या छपाई केंद्रांची पोलिसांकडून चौकशी !

     

घृणास्‍पद प्रचारमोहीम

अनुक्रमणिका

  •  

    `आयबीएन् लोकमत’ वृत्तवाहिनीची सनातन संस्थेच्या विरोधात घृणास्पद प्रसारमोहीम !

     

  •  

    सनातनला बदनाम करण्याची गोबेल्स नीती !

     

मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रिया

अनुक्रमणिका

  •  

    संत व कीर्तनकार

     

  •  

    विविध पक्षांचे लोकप्रतिनीधी

     

  •  

    हिंदुत्‍ववादी संघटना

     

निषेधाचे पत्र पाठवण्‍यासाठी खालील मार्गिकेवर संपर्क साधा.

http://www.sanatan.org/en/08/index.html