देशभरातील निद्रिस्त हिंदूंना अंतर्मुख करणारा धुळे दंगलीचा घटनाक्रम !

हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी धर्मांध मुसलमान दंगली घडवून हिंदु धर्मावर आघात करण्याचे दुष्कृत्य वर्षानुवर्षे करत आहेत. यंदा ऐन नवरात्रीत ठाण्यातील राबोडी परिसरात व धुळे शहरात धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या. गत वर्षीही नवरात्रीत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात देवीच्या मिरवणुकीवर हल्ला करून धर्मांधांनी दंगल घडवली होती. या घटनेला आता एक वर्ष उलटले, तरी त्या घटनेतून हिंदू शिकले नाही. त्यातून शिकून हिंदु समाजाने सुधारण्याचा प्रयत्‍न केला असता, तर कदाचित तशाच प्रकारच्या व आता दैनंदिन घडू लागलेल्या घटनांची पुनरावृत्ती टळू शकली असती आणि ठाणे व धुळे येथील दंगलींमध्ये हिंदूंची ससेहोलपट झाली नसती ! मुसलमानी आक्रमणांचा प्रतिकार ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत धुळे येथे झालेल्या दंगलीचा धावता घटनाक्रम येथे देत आहोत. निद्रिस्त हिंदूंनी त्यातून शिकावे, हाच यामागील एकमेव उद्देश.

रविवार ५ ऑक्टोबर (आश्‍विन शुद्ध षष्ठी)
* हिंदु रक्षक समितीच्या दहशतवादाच्या विरोधातील जाहीर सभेच्या जाहिरात फलकांवर साबीर शेख भंगारवाला याच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने जमलेल्या धर्मांध मुसलमानांची दगडफेक व त्यानंतर `अल्ला हो अकबर’च्या घोषणा
* मुसलमानांनी नवरात्रीचे फलकही फाडले.
* ३ जण ठार (पैकी १ हिंदु, दोघे कोण, ते कळले नाही.)
* जखमींच्या संख्येचा प्रत्यक्षदर्शी हिंदुत्ववाद्यांनी सांगितलेला आकडा १ हजार २००, शासकीय आकडा – ९७ जखमी, ७ गंभीर जखमी
* दंगलीमुळे दहशतवादाच्या विरोधातील सभा रद्द करण्याचा निर्णय
* अँसिडचे फुगे, स्पिरीटच्या बाटल्या, गॅस सिलेंडर, रॉकेल, दगड व विटा यांच्या साहाय्याने मुसलमानांचा हिंदूंवर हल्ला
* मुसलमानांचा तीन मंदिरांवर हल्ला
* हिंदूंकडून मशिदींची तोडफोड
* अनेक वाहने पेटवली
* धर्मांधांकडून दुकानांमध्ये लुटालूट
* हिंदु, वाहने व पोलीस यांवर मुसलमानांकडून तुफान दगडफेक
* मुसलमानांकडून काही ठिकाणी गलोलने दगडफेक (त्यांच्याजवळ धार असलेले दगड तयार होते व मारतांना ते दगड फिरवून मारत होते, त्यामुळे दगड लागणारा हमखास जखमीच होत होता.)
* पाचकंदिल भागात दंगल भडकली
* अतिरिक्‍त जिल्हाधिकारी एम्.वाय. पाटील दंगलीत जखमी
* पोलीसबळाचा अत्यंत अभाव आणि पोलिसांची कुमक शेजारील शहरांतून व राज्यांतून मागवली, शीघ्र कृती दल, राखीव पोलीस दल, राज्य राखीव दल मागवले
* परिथिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर
* हिंदूंनी पोलिसांना सांगितले, “बंदुकीचा वापर करा, नाहीतर आम्हाला द्या.’ त्यावर पोलिसांनी सांगितले, “आम्हाला तसे आदेश नाहीत.”
* धुळयात संचारबंदी लागू
* सिमीच्या युसुफचा कट असल्याचा मुंबई पोलिसांचा कयास

सोमवार ६ ऑक्टोबर (आश्‍विन शुद्ध सप्‍तमी)
* सलग दुसर्‍या दिवशीही मुसलमानांचे हिंदूंवर हल्ले सुरूच
* पोलिसांचे नियोजन व नियंत्रण पूर्णत: कोलमडले, त्यामुळे परि*थिती पोलिसांच्या हाताबाहेर
* दंगलीचे लोण नागाव, वणी, अंबोली अशा शेजारील छोट्या छोट्या गावांत पसरले
* मालेगावहून धर्मांध मुसलमानांना बोलावून घेण्यात आले. त्यामुळे स्थानिक मुस्लिमांचा जोर वाढला आणि मोगलाईचा थरारच धुळयातील हिंदूंनी अनुभवला.
* मुसलमानांनी ठिकठिकाणी अँसिडचे बाँब फेकले
* नंग्या तलवारी, गावठी कट्टे नाचवत अनेक हिंदूंची घरे लुटली आणि अत्यंत आक्रमक व निर्घृणपणे हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले. रात्रीच हल्ले सुरू केले
* अँसिड बॉँब, गॅस सिलेंडर, टोकदार दगड यांनी भरलेला ट्रॅक्टरच मुसलमानांच्या मदतीसाठी शहरातून फिरवण्यात येत होता.
* मुसलमानांनी घरांत घुसून हिंदु स्त्रिया व मुली यांची छेड काढली आणि त्यांना बेदम मारहाणही केली, पुरुषांनाही मारहाण केली.
* अनेकांनी आपल्या बायकामुलांना घेऊन पळ काढला व कसाबसा जीव वाचवला.
* गजानननगर वस्तीतील २०० हिंदूंनी बायकामुलांसह नेसत्या वस्रानिशी पलायन करून अरिहंत मंगल कार्यालयात आश्रय घेतला
* धर्मांध मुसलमान घरातून हिंदूंना जबरदस्तीने खेचून काढत होते. जे घरातून बाहेर निघू शकले नाहीत, ते बचावले. पाच-सहा तास हिंदूंनी स्वत:ला घरात कोंडून घेतले
* हिंदूंच्या घरांवर हल्ले करून अन्नधान्य गटारात फेकले आणि अन्नात माती मिसळली
* हजारो हिंदूंच्या घरात पाणी पिण्यासाठी फुटके मडकेही शिल्लक ठेवले नाही, मुसलमानांनी त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली.
हिंदु वस्त्या भयाने गोठून गेल्या.
* आग्रा रोड, पाच कंदील, ऐंशी फुटी रस्ता, देवपूर रोड, मनोहर चित्रपटगृह चौक, जी.टी. बापू चौक, तिरंगा चौक यांसह माधवपुरा या सर्वच भागांत धर्मांध मुसलमानांनी तुफान दगडफेक केल्याने वस्त्यांमध्ये दगडांचा प्रचंड खच पडला.
* शहरातील अंबिकानगर भागात मुसलमानांचे हिंदूंच्या घरांवर हल्ले
* शिवाजीनगर झोपडपट्टीवर मुसलमानांनी हल्ला चढवला.
* संतोषीनगर वस्तीत हिंदूंनी भीतीने घरात दडून बसून दारे लावून घेतली.
* गजानननगर भागातील हिंदूंच्या घरांवर लोटगाडीमध्ये दगड भरून मुसलमानांचा हल्ला, कॉलनी उद्ध्वस्त
* अंडाकृती बगीचा या भागावर मुसलमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्‍न केला; परंतु हिंदूंचा संघटितपणा व पोलिसांची वेळेवर मिळालेली मदत यांमुळे येथील हिंदू बचावले
* धारधार नंग्या तलावरी घेऊन मुसलमानांचा हिंदु वस्तीवर हल्ला, हिंदूंना दिसताचक्षणी मारण्याचे मुसलमानानांचे कृत्य
* मुसलमानांनी `काफीर हिंदु जलादो, अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देत हल्ले केले.
* `भडक चाळ’ या चाळीतील घरांना मुसलमानांनी आगी लावल्या.
* `पिंजारी चाळ’ या मुसलमानबहुल चाळीतील काही घरांना हिंदूंनी आगी लावल्या.
* फटाक्यांच्या कारखान्याला धर्मांधांनी आग लावली.
* मुसलमानांनी ५० घरांत घुसून गॅसच्या सिलेंडरचे स्फोट केले व घरांना आगी लावल्या.
* अनेक ठिकाणी हिंदूंना घरातून फरफटत बाहेर काढले व दुचाकी घरात नेऊन स्फोट घडवून आणले.
* मुसलमानांनी घरात घुसून शीतकपाट, दूरध्वनी संच, धुलाई यंत्र अशा महागाच्या संसारोपयोगी वस्तूंचा अगदी चक्काचूर केला.
* मित्रत्वाचे संबंध असणार्‍या हिंदूंचाही मुसलमानांकडून विश्‍वासघात
* वाकडीभोर भागातील दर्गा हिंदूंनी पाडला व त्या ठिकाणी रातोरात शिवमंदिर उभारले.
* ५० घरांतील दंगलग्रस्तांसाठी प्रशासनाने १० ते १२ पोळया पाठवल्या.
* अनेक वस्त्यांत हिंदू रात्रभर जागे होते व जीव मुठीत धरून बसले होते.
* गजानननगर येथे पोलिसांची मदत पाच तास तब्बल उशिराने पोहोचली
* अनेकांनी पोलिसांना “या दंगेखोरांपासून आम्हाला वाचवा”, अशी विनंती केली; मात्र पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, अशी तक्रार दंगलग्र*त हिंदूंनी केली.
* संचारबंदी असल्याने हिंदूंना बाहेरून मदत नाही.

मंगळवार, ७ ऑक्टोबर (आश्‍विन शुद्ध अष्टमी)
* ४८ तासांनंतरही शहर शांत झाले नाही, हिंदु दहशतीखालीच होते.
* मुसलमानांनी एका हिंदूला जिवंत जाळले. त्यामुळे वातावरण तापले.
* गजानननगर वसाहतीतील तीन तरुणी व एक महिला यांच्यावर धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला.
* तिसर्‍या दिवशी हिंदू रस्त्यावर उतरल्याने दोन्ही गट समोरासमोर येत होते. तेव्हा पोलिसांनी `शूट अँट साईट’चे आदेश दिले; दोन दिवस मुसलमान हिंदूंवर हल्ले करत असतांना षंढ पोलिसांनी त्यांची शस्त्रे मान्य केली होती व त्यांना `शस्त्र चालवण्याचे आदेश नाहीत’, असे बेजबाबदारपणे सांगत होते.
* गवळीवाडा परिसरात मशिदीवर चढून मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली. तेव्हा पोलिसांनी हवेत गोळीबार करून मुसलमानांना खाली उतरवले.
* साक्री भागात पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
* मालेगाव मार्गावर हत्यारांनी भरलेली इंडिका गाडी जप्‍त
* साखळी मार्गावर तलवारींनी भरलेला ट्रक पकडला.
* शस्त्रसाठा घेऊन जाणारा मुसलमान हवालदार व त्याचे वाहन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
* एम्आयडीसीतील एका रबर फॅक्टरीला जमावाने आग लावली, सात ट्रक पेटवून दिले.
* धर्मांधांनी वाहनांना आगी लावून पळ काढला.
* साक्रीतील हॉटेल अप्सरा, कुरेशी चिकन शॉप यांना आगी लागल्या.
* साक्री मार्गावरील `आशियाना’ बंगल्यातून सिमीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. याच घरातून अँसिड बाँब व पेट्रोल बाँब जप्‍त करण्यात आले.
* आर्थिक नुकसानीची तपासणी प्रशासनाकडून सुरू
* नेर गावात मुसलमानांची केवळ ११ घरे असतांना केवळ त्यांच्या संरक्षणासाठी संचारबंदी लागू
* एवढी मोठी दंगल सुरू होऊनही स्थानिक काँग्रेसचे आमदार श्री. राजवर्धन कदमबांडे व नेते श्री. रोहिदास पाटील यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली नाही.
* शांतीनगर भागात हिंदूंनी सामूहिक आरती सुरू केली.
* दंगल सुरू असतांनाही मुसलमानांचे पाच वेळा नमाज पठण सुरू होते.
* मुसलमान पुरुष आणि स्त्रिया मिळून हिंदूंच्या घरांवर हल्ले करत होते. पुरुष प्रथम दगडाने घरावर हल्ला करत व नंतर महिला घरात घुसून सामानाची लूट करायच्या व गॅस सिलेंडर पेटवून द्यायच्या. त्यामुळे पूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते.
* दोन दिवस होरपळलेल्या हिंदूंनी अखेर तिसर्‍या दिवशी सडेतोड प्रत्युत्तर दिले. `हर हर महादेव’च्या गर्जनेत मोहल्ल्यात मुसलमानांना पळता भुई थोडी केली. संचारबंदी धुडकावून मिल परिसर, मोहन थिएटर विभाग, जुने धुळे, एकवीरा मंदिर परिसर आणि ठिकठिकाणच्या कॉलनींतून हिंदू मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले.
* दोन गटांत धुमश्चक्री झाली.
* नेर, सिंदखेडा, नंदुरबार येथे प्रचंड तणाव
* बळींची संख्या सातवर पोहोचली, जखमींची संख्याही वाढली.
* हिंदू रस्त्यावर उतरल्याने बहुसंख्य मुसलमान त्यांच्या नातेवाइकांकडे पळाले.
* हिंदूंनी दंगेखोरांची वाहने पेटवली.
* हिंदू आक्रमक झाल्याने अनेक ठिकाणी दंगेखोर बाहेर पडलेच नाहीत.
* गजानननगर भागात शिवसेना नेते श्री. दिवाकर रावते व इतर शिवसेना नेते यांनी भेट दिली. निर्वासित हिंदूंना धीर देऊन विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
* गजानन कॉॅलनी व अलंकार सोसायटी या भागात शुकशुकाट होता.
* लळिंग येथे बंदोबस्तावर असलेल्या रामचंद्र चौधरी या पोलिसाला धर्मांधांनी बेदम मारहाण केली. त्यांची मोटरसायकल जाळली. इतकेच नव्हे, तर मारत मारत त्याला लळिंग गावातून बाहेर हाकलले.
* चाळीसगाव रोडवरील रुग्णालयात दंगलीतील जखमींची संख्या वाढल्याने तेथील औषधांचा साठा संपला.
* विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी शेजारील गावातील हिंदूंनी जेवणाखाणाची व मुलांसाठी दूधपाण्याची सोय केली.

बुधवार, ८ ऑक्टोबर (आश्‍विन शुद्ध नवमी)
* राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. राजवर्धन कदमबांडे अत्याचारग्रस्त हिंदूंना भेटायला गेले, तेव्हा संतप्‍त हिंदूंनी त्यांना अक्षरश: हाकलून लावले.
* महादेवपुरात हल्ला करण्यासाठी आलेल्या मुसलमानांना हिंदूंनी पळवून लावले.
* मुसलमानांनी हिंदूंच्या लहान मुलांना जबरदस्तीने गोमांस खायला घातले.
* घर लुटण्यासाठी आलेल्या मुसलमान महिला शिव्याही देत होत्या.
* नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे घरे जळाल्यामुळे जळून गेली.
* हिंदु घरातील पुरुष बाहेर गेल्यावर घरातील महिलांवर मुसलमान चाल करून आले, तेव्हा त्या गच्चीत लपून बसल्या. मुसलमान त्यांच्यावर पेट्रोल बाँब फेकत होते. पाच तासांनंतर जीव मुठीत धरून त्या खाली आल्या, असे श्री. यशवंत बोरसे यांनी सांगितले.
* श्री. विमल चौधरी व त्यांचे कुटुंबीय यांना सुरा दाखवून घराबाहेर काढले व कापण्याच्या तयारीत असतांनाच काही हिंदू तेथे धावून आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
* गजानननगरमधील अरिहंत भुवन येथे आश्रयाला आलेल्या २०० हिंदूंनी दयनीय स्थिती असूनही शासनाची मदत नाकारली.
* संचारबंदी कायम स् ग्रामीण भागात दंगलीची धग कायम
* मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख व जखमींना ५० हजार रुपये देण्याचे शासनाचे आश्‍वासन
* दंगलखोरांवर कारवाई देण्याचे आदेश देण्यात आले.
* मुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी पहाणी केली.
* दसर्‍याच्या आदल्या दिवशी हिंदूंच्या घरांत अस्वस्थता
* साडेपाच हजार निर्वासितांना विविध ठिकाणी आसरा
* दूध, भाज्या, औषधे, पाणी या जीवनावश्यक वस्तू व गॅस सिलेंडर यांचा मोठा तुटवडा
* विस्थापितांना शासनाकडून जेवण

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा

सनातनवर बंदी आणू पहाणारे सनातनच्या साधकांची आध्यात्मिक प्रगती रोखू शकणार नाहीत !

काही तरी करून सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व सनातन प्रभात यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यकर्ते व पोलीस यांचा सुरू असलेला खटाटोप !

४ जून २००८ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये काही हिंदूंनी बाँबस्फोट केला. या बाँबस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी सनातनच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली. संबंधित आरोपींनी `या कृत्याशी सनातनचा व हिंदु जनजागृती समितीचा संबंध नसून आम्ही हे कृत्य `आम्ही पाचपुते’ या नाटकात केलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरुद्ध वैयक्‍तिक रागातून केले आहे’, असे पोलिसांना सांगितले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व `सनातन प्रभात’चे संपादक यांनी पोलीस तपासामध्ये पूर्ण सहकार्य केले. असे असले तरीही राज्यकर्ते व धर्मद्रोही यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी कुठूनतरी या संघटनांचा व `सनातन प्रभात’चा बाँबस्फोटाशी संबंध जोडण्यासाठी गेले तब्बल चार महिने त्यांचा पिच्छा पुरवला, तसेच पोलिसांनी त्यांच्या तपासाचे सत्र अद्यापही सुरूच ठेवले आहे.
या प्रकरणी राज्यकर्ते व धर्मद्रोही यांनी घेतलेली भूमिका व पोलिसांनी दहशतवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र व धर्म कार्य करणार्‍या सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व सनातन प्रभात यांची टप्प्याटप्प्याने केलेली चौकशी यांसंदर्भातील महत्त्वाच्या बाबींचा संक्षिप्‍त आढावा येथे देत आहोत.
संकलक : श्री. मलगोंडा पाटील, रामनाथी आश्रम, गोवा.


हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांची पोलिसांकडून निष्कारण चौकशी
४ जून रोजी बाँबस्फोट झाल्यानंतर लगेचच दहशतवादविरोधी पथकाचा मोर्चा हिंदु जनजागृती समिती या हिंदु धर्मजागृतीचे तेजस्वी कार्य करणार्‍या संघटनेकडे वळला. या पथकाच्या पोलिसांनी समितीच्या काही पदाधिकार्‍यांकडे `संशयित आरोपी’ या नजरेतून पाहून अनेकांना रात्री-अपरात्री चौकशीसाठी नेले. विविध पदाधिकार्‍यांना ताब्यात घेऊन व पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात खेटे घालण्यास लावून त्यांची `आरोपी’ या नात्याने कधी सहजपणे, तर कधी धाकदपटशा दाखवून कसून चौकशी केली. दरम्यान बाँबस्फोटाशी तीळमात्र संबंध नसलेल्या या पदाधिकार्‍यांना शारीरिक व मानसिक त्रासांना अकारण सामोरे जावे लागले. अखेर बाँबस्फोटासंबंधी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे पहाण्याची नजर बदलून त्यांना `निर्दोष’ घोषित केले. त्यानंतरही `समिती या घटनेमध्ये सहभागी असेल’, अशी शंका पोलिसांना असल्यामुळे त्यांनी त्यानंतरही विविध ठिकाणी व विविध पद्धतीने समितीच्या मागे चौकशीचा ससेमिरा चालूच ठेवला.

हिंदूंचा छळ करणार्‍या पोलिसांबद्दल पुढे हिंदूंना सहानुभूती वाटेल का ?
`पुढे होणार्‍या दंगलीत दंगेखोर मुसलमान जेव्हा पोलिसांना ठार करत असतील, तेव्हा पोलिसांनी अगोदर केलेल्या अन्यायामुळे हिंदूंना त्यांच्याविषयी सहानुभूती वाटेल का ?

`सनातन प्रभात’चे वाचक व जाहिरातदार आणि सनातन संस्था व समिती यांच्या हितचिंतकांची चौकशी !
बाँबस्फोट करण्यामागे सनातन संस्था व समिती यांचे संघटनात्मक बळ असू शकते, असे गृहीत धरून पोलिसांनी `सनातन प्रभात’चे वाचक व जाहिरातदार आणि सनातन संस्था व समिती यांचे हितचिंतक यांची चौकशी करण्याची शिस्तबद्ध मोहीम उघडली. `सनातन संस्था ही `सनातन प्रभात’च्या माध्यमातून वाचकांना बाँबस्फोटासारखी देशविघातक कृत्ये करण्यास प्रोत्साहित करते व अशा संस्थेचे हितचिंतक आणि संस्थेला साहाय्य करणारे यांचीही त्यानिमित्ताने चौकशी करणे क्रमप्राप्‍त आहे’, असा पोलिसांनी मोठा गैरसमज करून घेतला व त्यापोटी त्यांनी या सर्वांच्या मागे चौकशीचा रेटा अत्यंत गतीने लावला. मुंबई, ठाणे व रायगड भागात काही वेळा दैनिक `सनातन प्रभात’चे वितरण करणार्‍या गाडीसोबत जाऊन पोलिसांनी या दैनिकाचे वितरण केली जाणारी स्थळेही पाहून घेतली.या सर्वांची चौकशी काही थेट पोलीस असल्याचे सांगून नव्हे, तर विविध नावे सांगून केली. महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सांगून `सर्व्हे करण्यासाठी आम्ही आलो आहोत’, अशी थापही अनेक ठिकाणी मारण्यात आली, तर काही ठिकाणी `अमूक तमूक कंपनीचे लोक आहोत’, असे भासवण्यात आले.
अशा पद्धतीने राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांचे उदात्त कार्य करणार्‍या या संघटना, असे कार्य करण्यास समाजाला उद्युक्‍त करणारे नियतकालिक आणि विविध माध्यमांतून या कार्यास सहकार्य करणार्‍या व त्यांचे हित चिंतणार्‍या व्यक्‍ती यांना दडपण्याचा हा प्रकार होता.
पोलीस तपासाचा हा अतिरेक पाहून एक वेळ वाटले, `पोलिसांनी असाच तपास गुन्हेगार व दहशतवादी यांच्या संघटनांचा केला असता, तर कदाचित त्या संघटना देशात आजपर्यंत अस्तित्वातच राहिल्या नसत्या आणि देश गुन्हेगार व दहशतवाद मुक्‍त झाला असता !’

हिंदूंनो, काँग्रेसरूपी कंस नष्ट होण्यासाठी प्रार्थना व प्रयत्‍न करा !
`मालेगावमधील बाँबस्फोटाबद्दल `हिंदु जनजागृती समिती’वर संशय, म्हणजे औरंगजेबाच्या घोड्यांना पाण्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संताजी व धनाजी दिसायचे, तशी काँग्रेसच्या पोलिसांची स्थिती झाल्याचे निदर्शक होय. कंसाच्या पापांचा घडा भरल्यानंतर श्रीकृष्णाने त्याचा नाश केला. त्याप्रमाणेच हल्लीची कंसरूपी काँग्रेस समूळ नष्ट होण्यासाठी, अर्थात काँग्रेसचा येत्या निवडणुकीत संपूर्ण पाडाव होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करा व काँग्रेसच्या विरोधात प्रचार करून हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रयत्‍न करा !’

…… आणि धर्मद्रोह्यांची कावऽ कावऽऽ सुरू झाली !
बाँबस्फोटाचे कृत्य केल्याच्या नावाखाली पोलिसांनी १६ जून रोजी काहींना अटक केली. `हे कृत्य करणारे आरोपी सनातन संस्थेचे व हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. आरोपींनी ते कृत्य वैयक्‍तिक स्तरावर केले असून त्या कृत्याशी संबंधित संघटनांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे’, असे पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाहीर केले आणि सनातनच्या विरुद्ध कुरापती काढण्याच्या संधीच्या शोधात असलेल्या धर्मद्रोह्यांना आयती शिकार मिळाली व त्यांची सनातन संस्थेच्या विरोधातील कावऽ कावऽऽ सुरू झाली.
सरकारला सनातनवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारदरबारी व दहशतवादविरोधी पथकाकडे त्यांचे घिरट्या घालण्याचे नसते उपद्व्याप सुरू झाले.
धर्मद्रोही व राज्यकर्ते यांनी सनातनवर विविध निराधार आरोप करून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करणे बाँबस्फोटातील आरोपी हे सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांचे असल्याचे कळताच काही धर्मद्रोही व राज्यकर्ते यांनी `यापूर्वी मालेगाव व जामा मशीद येथे झालेल्या बाँबस्फोटांमागेही समिती व सनातन संस्था यांचाच हात असू शकतो’, असा आरोप केला आणि `त्यादृष्टीने या संघटनांची चौकशी करण्यात यावी’, असा सूर आळवला. त्याचबरोबर `भारतात यापूर्वी झालेल्या सर्व बाँबस्फोटांशी या संघटनांचा काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यात यावा’, अशी मागणी करून `सनातन संस्था ही दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देते व तसे कार्यकर्ते तयार करते’ वगैरे निराधार आरोपांची तोफही त्यांनी संस्थेवर डागली. पनवेल व ठाणे येथील बाँबस्फोटांमागे केवळ अटक केलेल्यांचा हात नसून सनातनचा हात आहे, असा आरोप करून काहींनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुढे केली

साधकांनो, `बळीचा बकरा’ बनू नका !
`पू. बंडातात्या कराडकर यांच्या मागे वारकरी असल्यामुळे व आता शिवसेनाही असल्यामुळे काँग्रेस सरकार त्यांच्या विरुद्ध विशेष काही करू शकणार नाही. आपल्यात ते सामर्थ्य नसल्याने सरकार आपल्याला `बळीचा बकरा’ बनवत आहे. आपण सामर्थ्य वाढवले, तर सरकारला आपल्याविरुद्धही विशेष काही करता येणार नाही.’
सनातनला `दहशतवादी संघटना’ समजून पोलीस तपासाची चक्रे आणखी गतीमान होणे
बाँबस्फोट प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर धर्मद्रोही व राज्यकर्ते यांच्याकडून सनातनवर केले जाणारे बिनबुडाचे आरोप आणि राजकीय दबाव यांमुळे `सनातन ही दहशतवादी संघटनाच आहे’, अशा दृष्टीने पोलीस तपास सुरू झाला. `संस्था दहशतवादी तयार करते का’ व `संस्थेमध्ये दहशतवादाची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत’, याची विविधांगानी चौकशी सुरू झाली. संपूर्ण भारतभर सुरक्षाव्यवस्थेचे तीन-तेरा झालेले असतांना केंद्र व राज्य या स्तरांवरील विविध यंत्रणा आणखी जोमाने सनातनच्या चौकशीच्या कामाला लागल्या.

विविध आश्रमांत जाऊन चौकशी करणे पोलीस खात्यातील विविध विभागांची पथके राज्यातील विविध ठिकाणांबरोबरच प्रामुख्याने देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात तपासाकरिता रात्री-अपरात्री जाऊ लागली. साधकांची चौकशी करणे व त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती प्राप्‍त करणे आदी करू लागली. दहशतवादविरोधी पथकाकडून अनेकांना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावण्याचे आदेश दिले जाऊ लागले. त्या आश्रमात एकाच दिवशी पोलीस खात्याच्या विविध विभागांची पथके येऊन आपआपल्या पद्धतीने चौकशी करत होती.त्याचबरोबर मिरज व रामनाथी, गोवा येथील आश्रमांत जाऊनही काही पोलिसांनी चौकशी केली.

`पोलिसांनो, मुसलमानांच्या दंगलीच्या वेळी अथवा नक्षलवादी व दहशतवादी यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी राजकीय पक्षांचे नेते नव्हे, तर ईश्‍वरच तुम्हाला वाचवील, हे लक्षात घ्या व त्यासाठी साधना, म्हणजे दररोज प्रार्थना आणि नामजप करा !’

गृहखात्याच्या आदेशानुसार पोलिसांनी राज्यभरातील साधकांची चौकशी करणे व साधकांची माहिती जमवण्याचा प्रयत्‍न करणे
महाराष्ट्र राज्यातील गृहखात्याकडून राज्यातील पोलीस ठाण्यांना आदेश जारी झाल्याने जून व जुलै महिन्यात पोलिसांकडून सनातन संस्थेची खालपर्यंत चौकशी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणच्या साधकांची माहिती जमवण्याचे खटाटोप त्यांनी गतीने सुरू केले. त्याकरिता पोलीस साधकांच्या घरी व ते नोकरी करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्याविषयीची विविध माहिती जमवू लागले. काही स्थानिक साधकांना दूरध्वनी करून सर्व साधकांची यादी व त्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यास सांगू लागले. अशाच पद्धतीची चौकशी गोवा राज्यातही काही ठिकाणी करण्यात आली.
(हिंदूंनो, धर्मद्रोही व राष्ट्रद्रोही काँग्रेसचा येत्या निवडणुकीत केंद्र व राज्य स्तरांवर पराभव होईल व हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येईल. तेव्हा सनातनच्या निरपराध साधकांची चौकशी करणार्‍या धर्मद्रोही व राष्ट्रद्रोही काँग्रेसची अशीच चौकशी करू ! – संपादक)

`सनातन प्रभात’ नियतकालिकांतील तथाकथित आक्षेपार्ह मजकुरावरून संपादकांची चौकशी
`डॉ. आठवले हे `सनातन प्रभात’ नियतकालिकातून दहशतवादी कृत्ये करण्यास प्रोत्साहित करणारे लिखाण करतात व ते `हिंदु देवतांचे विडंबन करणारी धर्मद्रोही नाटके बंद पाडण्यासाठी दहशतवादी व नक्षलवादी बना !’, असा संदेश देतात’, हा मुद्दा पुढे करून काही नाट्यनिर्माते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अन्य काही धर्मद्रोही यांनी `सनातन प्रभात व डॉ. आठवले यांची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी आणि सनातनवर बंदी घालावी’, अशी मागणी सरकारकडे निवेदनांद्वारे व वृत्तपत्रांच्या माध्यमातून केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. श्याम मानव वगैरेंनी गेल्या पाच वर्षांत सनातन प्रभात नियतकालिकांत जनप्रबोधनार्थ प्रसिद्ध केलेल्या मजकुरातील काही निवडक (त्यांच्या दृष्टीने प्रक्षोभक) मजकूर काढून तो सरकारदरबारी सादर केला. त्यांच्या मते तो मजकूर दहशतवादी कृत्ये करण्यास प्रोत्साहित करणारा आहे म्हणे !
तसेच `डॉ. आठवले त्यांच्या कार्यकर्त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडत आहेत, ते मानवी रोबोेंचे कारखानदार आहेत’, असा आरोपही प्रा. मानव यांनी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या सर्व आरोपांची व मागण्यांची तात्काळ दखल घेऊन तपासकामाला सुरुवात केली. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पोलीस अधिकार्‍यांनी `सनातन प्रभात’च्या संपादकांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून सांगितले, “सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराच्या धर्तीवर तुमची व प.पू. डॉ. आठवले यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी तुम्ही मुंबईला याल कि आम्ही तिकडे येऊ ?” त्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी संपादकांना पनवेल येथे बोलावून त्यांची कित्येक तास चौकशी केली.
सनातन `धर्मक्रांती’च्या शिकवणुकीतून दहशतवादी मानसिकता तयार करत असल्याचा पोलिसांचा गैरसमज होणे दैनिक `सनातन प्रभात’मध्ये `धर्मक्रांती’चा उल्लेख वारंवार केला जातो. `समाजाला धर्माचरणी बनवणे, म्हणजे धर्मक्रांती’, असा खरा अर्थ असणार्‍या या शब्दाचा अर्थ त्यांनी वेगळाच काढला. त्याबाबत ते अनेक साधकांना `धर्मक्रांती म्हणजे काय ? त्यातून तुम्हाला काय अभिप्रेत आहे ?’, असे विचारू लागले.

पोलिसांनी एका साधकाकडून कोर्‍या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेणे
तपास करतांना पोलिसांनी कोर्‍या कागदांवर एका साधकाच्या सह्या घेतल्या. एक-दोन नाही, तर तब्बल आठ कागदांवर अशा सह्या घेतल्या. पोलिसांनी जबरदस्तीने एखाद्या व्यक्‍तीची कोर्‍या कागदावर सही घेणे, हे पोलीस आपली डाळ शिजवण्यासाठी गैरमार्गाचा नियोजनबद्ध अवलंब करत असल्याचे द्योतक आहे. अशा सह्या घेतल्याने पोलिसांना संबंधित व्यक्‍तीचा मूळ जबाब स्वत:ला हवा तसा फिरवून आपली बाजू बळकट करण्यासाठी उपयोग करता येतो. अशा सह्या घेणार्‍या, म्हणजे कायद्याचे रक्षकच भक्षक बनलेल्या पोलिसांचा हा गुन्हा नव्हे का ?

कोर्‍या कागदावर सह्या देणे, म्हणजे स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे, हे साधकांनी पुरते जाणून असावे. अशा पद्धतीने कोणी सह्या देण्यास सांगितल्यास त्यास ठाम नकार द्यावा व असे सांगणार्‍यांना `तुमच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार नोंदवू’, असे ठणकावून सांगावे.
सनातन संस्था व समिती यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या शिबिरांची चौकशी करण्यात आली. तसेच गुरुपौर्णिमा महोत्सवांची पोलिसांनी चौकशी केली. (याबाबतची सविस्तर वृत्ते वेळोवेळी प्रसिद्ध केली आहेत.)

सनातन व हिंदु जनजागृती समिती यांसारख्या निरपराध संस्थांची चौकशी करून होणारा कोट्यवधी रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी साधक-पोलीस हवेत !
`मालेगाव बाँबस्फोटात सनातन व हिंदु जनजागृती समिती यांसारख्या राष्ट्र व धर्म प्रेमी संघटनांची चौकशी करू पहाणारे काँग्रेस सरकार व दहशतवादी पथक आता १.१०.२००८ रोजी आगरतळा (त्रिपुरा) येथे झालेल्या बाँबस्फोटांबद्दलही सनातन व हिंदु जनजागृती समिती यांची चौकशी करील ! पोलिसांचे बळ निरर्थक तपासात फुकट घालवून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी साधक-पोलीस हवेत. त्यांना सूक्ष्मातील कळल्याने ते सर्व गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकतील.’

प्रा. श्याम मानव यांनी पोलिसांकडे खोटी कागाळी करणे व पोलिसांनी त्यानुसार सनातनची चौकशी करणे
प्रा. श्याम मानव यांना खूप उशिरा, म्हणजे तब्बल एका वर्षानंतर एका गोष्टीचा साक्षात्कार झाला, तो म्हणजे त्यांच्या मते गेल्या वर्षी पुणे येथील एका कार्यक्रमात त्यांच्यावर जो हल्ला झाला होता, तो म्हणे सनातनच्या लोकांनी केला होता ! त्याबाबत त्यांनी जुलै २००८ मध्ये दहशतवादविरोधी पथकाकडे कागाळी केली. तसेच त्यांनी त्यासंदर्भात सनातनची कसून चौकशी करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाकडे दीर्घकाळ तगादा लावला.पूर्वी या प्रकरणाचा तपास झाला होता व खरे हल्लेखोर कोण, याचा उलगडाही झाला होता आणि त्यात सनातनच्या सहभागाचा मुद्दा कोठेच आला नव्हता. असे असतांनादेखील प्रा. मानव यांच्या मागणीनुसार पोलिसांनी सनातनची त्या दृष्टीनेही काही दिवस चौकशी केली. या विषयाला अनुसरून पोलिसांनी सनातनच्या आश्रमाच्या प्रवक्‍त्याला विचारले, `मानव यांच्यावर तुम्ही हल्ला केला होता का ? नाहीतर कोणी केला होता ? तुमचा त्याच्यात काय सहभाग होता ?’ वगैरे. त्या वेळीही आमच्या प्रतिनिधीने वस्तूस्थिती कथन केली. या चौकशीमध्ये सनातनचा सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले. यातून प्रा. मानव यांचा बालहट्ट सिद्ध होतो. लहान मुलांप्रमाणे परत परत तक्रार करून आपले म्हणणे खरे करण्यासाठी केलेला हा त्यांचा केविलवाणा प्रयत्‍न होय. तसेच यांतून त्यांनी स्वत:चा खोटारडेपणा स्वत:च सिद्ध करून दाखविला.

`सनातन संस्था’ व `हिंदु जनजागृती समिती’ या न्यासांची ध्येये व उद्दिष्टे यांच्या प्रती घेऊन चौकशी करणे
सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती या दोन्ही न्यासांची उद्दिष्टे व ध्येयधोरणे यांच्या प्रती पोलिसांनी मागून घेतल्या व यात दहशतवादी कृत्याच्या दृष्टीने काही सापडते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला.पोलिसांनी केली दोन जणांची `नार्को’ व `ब्रेन मॅपिंग’ चाचणी २७.६.२००८ रोजी पोलिसांच्या वकिलांनी बाँबस्फोटाच्या गुन्ह्याबाबतची पोलीस चौकशी पूर्ण झाल्याचे न्यायाधिशांसमोर सांगितले. त्यानुसार न्यायाधिशांनी आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. काही दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांनी पुन्हा न्यायालयात जाऊन दोन आरोपींची `नार्को’ व `ब्रेन मॅपिंग’ चाचणी करण्यासाठी परवानगी मिळवली. त्यानुसार त्यांनी दोन जणांची प्रथम `नार्को’ चाचणी केली. त्यातून त्यांना अपेक्षित असे काहीच हाती न लागल्याने त्यांनी आणखी काही दिवसांनंतर त्यांची `ब्रेन मॅपिंग’ चाचणीही करून घेतली.
संस्थेने पोलिसांकडे त्यांना `संशयित आरोपी’ म्हणून हवा असलेल्याला स्वत:हून नेऊन हजर केले. तसेच पोलीस तपासाच्या दृष्टीने हवी असलेली प्रत्येक माहिती खरी व प्रामाणिकपणे पुरवून तपासकामात पूर्णत: सहकार्य केले. तरीही त्यांची संस्थेवरची वक्रदृष्टी कमी झाली नाही. `बाँबस्फोटाच्या गुन्ह्याशी काही तरी करून कुठून तरी सनातनचा संबंध जोडता येईल का’, हे पोलिसांना हवे होते आणि त्यासाठी त्यांची प्रयत्‍नांची पराकाष्ठा सुरू होती. यातीलच एक भाग म्हणजे या चाचण्या होत.
`चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणीप्रमाणे वागणार्‍या अंनिसवाल्यांच्या मागणीप्रमाणे सनातनने आतापर्यंत न्यायालयात लावलेल्या दाव्यांची व खटल्यांची पोलिसांनी चौकशी केली. उगाच कोणावरही खटले दाखल करायला संस्थेला वेळ नाही; कारण तिला धर्मप्रसाराचे व्यापक व अफाट कार्य करायचे आहे. सनातनविरुद्ध वक्‍तव्ये करून बदनामी करत असल्यामुळे केवळ न्याय मिळवण्यासाठी सनातन त्यांच्याविरुद्ध दावा दाखल करते व खटले लावते, दुसर्‍यांना नाहक त्रास देण्यासाठी नव्हे, हे धर्मद्रोही व संबंधित पोलीस यांनी लक्षात घ्यावे.

पोलीस व धर्मादाय आयुक्‍त यांच्याकडून संस्था व समिती यांची लेखाविषयक चौकशी
सरकारने पोलीस तपासाबरोबरच संस्थेची लेखाविषयक चौकशीही केली. या चौकशीचा एक भाग म्हणजे, सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती या न्यासांच्या काही वर्षांच्या आर्थिक ताळेबंदाच्या प्रती मागून घेतल्या. त्याचबरोबर सांगली येथे संस्थेच्या न्यासाच्या कागदपत्रांची धर्मादाय आयुक्‍तांकडून तपासणी करण्यात आली.सनातन संस्थेला विदेशातून निधी येतो का, याची वारंवार चौकशी पोलीस करत होते. पोलिसांनी विविध बँकांमध्ये जाऊन संस्थेच्या बँक खात्यांची माहिती घेतली.

`सनातन प्रभात’च्या संपादकांची अनेक वेळा चौकशी
जून महिन्यामध्ये `सनातन प्रभात’च्या संपादकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी सनातन संस्थेच्या मुख्यालयात येऊन संपादकांकडून काही माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच संपादकांना पुन्हा पथकाच्या कार्यालयात चौकशीकरिता पाचारण करून चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यंतरी आणखी काही माहितीही पाठवून देण्यास पोलिसांनी त्यांना सांगितले. ४ ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी अधिकार्‍यांनी संपादकांना संपर्क करून चौकशीकरिता पुन्हा त्यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले.

इमाम बुखारी यांच्या विखारी वक्‍तव्यांची नव्हे, तर सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या जनजागृतीविषयक लिखाणांची गंभीरपणे दखल घेऊन त्यांची चौकशी करणे
इमाम बुखारी यांनी `अहमदाबाद बाँबस्फोट प्रकरणातील सूत्रधार म्हणून पकडलेल्या अबूल बशीर याला न सोडल्यास १९४७ मधील फाळणीच्या वेळेपेक्षाही मोठा उत्पात घडवू’, अशी धमकी दिली. इमाम बुखारी यांचे हे विखारी वक्‍तव्य नव्हे, तर राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांसाठी जनजागृतीच्या उद्देशाने केलेले लिखाण या धर्मद्रोही काँग्रेसला व तिच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या पोलिसांना प्रक्षोभक वाटले. त्यामुळे अखेर पोलिसांची मजल सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉक्टरांच्या चौकशीपर्यंत गेली. ४.९.२००८ रोजी दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍याने सनातन संस्थेच्या गोवा येथील मुख्यालयात येऊन प.पू. डॉक्टरांची चौकशी केली. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनीही चौकशीला सामोरे जाऊन पोलिसांना आवश्यक ती माहिती दिली.

पोलीस मुसलमान नेत्यांची किंवा त्यांच्या धर्मगुरूंची अशी चौकशी करतात का ? आणि ते चौकशी करायला गेलेच, तर त्यांना कोणत्या कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो, हे ठिकठिकाणी मुसलमान लोकवस्तीत चौकशीला जाणार्‍या पोलिसांसंदर्भात घडलेल्या प्रसंगांवरून लक्षात येते. त्यामुळे खरोखरच दहशतवाद्यांना अभय देणार्‍या मुसलमान नेत्यांच्या विखारी फुत्करांकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालणे हा राष्ट्र व धर्म द्रोह नव्हे का ?

`सनातन प्रभात’ मुद्रित करणार्‍या मुद्रणालयांची चौकशी करणे व त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मिळवणे
दहशतवादविरोधी पथकाने बाँबस्फोटाच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सप्टेंबरमध्ये `सनातन प्रभात’च्या काही नियतकालिकांचे मुद्रण केल्या जाणार्‍या तुर्भे येथील मुद्रणालयात जाऊन पोलिसांनी `सनातन प्रभात’च्या मुद्रणाविषयी चौकशी केली. त्यानंतर मुद्रणालयाच्या मालकांना दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून चौकशी केली व त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे घेतली.
त्याचबरोबर सांगली व रत्‍नागिरी येथेही दहशतवादविरोधी पथकाने `सनातन प्रभात’ मुद्रित करणार्‍या मुद्रणालयांना पत्रे दिली असून सनातन प्रभातच्या मुद्रणाविषयीची काही माहिती मागवली आहे. असेच पत्र कन्नड साप्‍ताहिक `सनातन प्रभात’ मुद्रित करणार्‍या कर्नाटकातील मुद्रणालयालादेखील पाठवले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभांच्या संदर्भातील माहिती मागवणे
राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी झटणार्‍या हिंदु जनजागृती समितीला पोलिसांच्या चौकशीस सातत्याने सामोरे जावे लागत असून हिंदु जनजागृती समितीतर्फे ऑगस्ट २००७ ते जून २००८ या कालावधीत घेण्यात आलेल्या जाहीर `धर्मजागृती सभां’चीही चौकशी दहशतवादविरोधी पथकाकडून केली.या सभांची तपशीलवार माहिती या पथकाने २४ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे समितीकडे मागितली.

कुठेही बाँबस्फोट झाला, तर त्याचा संबंध संस्था व समिती यांच्याशी जोडण्याचा प्रयत्‍न म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार !
यापुढे कोठेही कोणीही बाँबस्फोट केले, तर त्याचा कोणताच तपास न करता त्या कृत्याचे खापर सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्यावर फोडायला काँग्रेस सरकार यत्किंचितही मागे-पुढे बघणार नाही, हे हल्लीच झालेल्या मालेगाव बाँबस्फोटाबाबत संस्था व समिती यांच्यावर संशय घेतल्याच्या मुद्यावरून स्पष्ट झाले आहे. असे करणे म्हणजे अहोरात्र राष्ट्र व धर्म कार्य करणार्‍या संस्था व संघटना यांना लक्ष्य करून त्यांना संपवण्यासाठी रचलेले काँग्रेसचे कटकारस्थान होय!

खर्‍या गुन्ह्याच्या दृष्टीने तपास संपला, आता हा केवळ राजकीय तपास !
पोलिसांनी मूळ गुन्ह्याचा तपास करून सप्टेंबरच्या मध्यावधीत आरोपपत्र दाखल केले; परंतु त्यानंतरही संस्था, समिती व सनातन प्रभात यांच्या पोलीस तपासाचे गुर्‍हाळ सुरूच राहिले. हा प्रकार म्हणजे `गुन्ह्याच्या दृष्टीने असलेला तपास संपल्यानंतर सुरू झालेला हा केवळ राजकीय तपास !’, असे मत राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्‍तींसह विविध क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

सनातनवर बंदी घालण्यासंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांची वक्‍तव्ये म्हणजे निवडणुका डोळयांसमोर ठेवून मुसलमानांना खुश करण्यासाठीचा एक राजकीय डावपेच !
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार व महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत विविध जाहीर कार्यक्रमांत वक्‍तव्ये करून साधकांना गर्भगळीत करण्याचा प्रयत्‍न करत आहेत. `हा प्रकार केवळ येत्या निवडणुका डोळयांसमोर ठेवून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्याकरता मुसलमानांच्या मागणीप्रमाणे सनातन संस्थेला दडपणे व मुसलमानांना खुश करणे यांसाठीचा एक राजकीय डावपेच आहे’, असेही मत राजकीय क्षेत्रातील अनेकांनी व्यक्‍त केले आहे.

डोंगर पोखरून उंदीर तरी मिळेल काय ?
पोलिसांनी राज्यकर्ते व धर्मद्रोही यांच्या दबावामुळे संस्था व समिती यांची कितीही खोलात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्‍न केला, तरी त्यांना हाती काहीतरी लागेल काय ? कारण `आडात नाही, तर पोहर्‍यात कुठून येणार ?’ या म्हणीप्रमाणे मुळात निखळ धर्मकार्य करणारी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यामध्ये दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालण्यासारखे मुळात काहीच नाही. दोन्ही संघटनांतील तथाकथित दहशतवादाची पाळेमुळे शोधून ती खणण्याच्या इराद्याने केवळ राजकीय दडपणाखाली येऊन या संघटनांचा तपास करणार्‍या पोलिसांना कित्येक महिने खोदून खोदून, म्हणजे डोंगर पोखरून उंदीर तरी मिळणार काय ?

साधकांनो, धर्म-अधर्म लढ्याची ही तर केवळ सुरुवात असून अजून भयंकर आपत्काल बाकी आहे !
साधकहो, सनातन गेली कित्येक वर्षे सांगत आहे, `२००८ सालापासून आपत्काळ येणार आहे !’ अगदी त्याचीच ही एक छोटीशी चुणुक धर्मविरोधकांच्या भूमिकेमुळे व पोलीस तपासाच्या या सत्रामुळे काही प्रमाणात आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आता व भविष्यातही सनातन संस्थारूपी सावज टप्प्यात येण्याच्या संधीची वाट पहात बसलेले मूठभर सनातनद्वेष्टे सनातनवर या ना त्या कारणाने चिखलफेक करण्याची लबाडी करतील आणि त्याची दखल घेऊन आताप्रमाणेच राज्यकर्ते व प्रशासन कारवाई करण्यासाठी सनातनच्या मागे लागतील; पण काहीही झाले, तरी धर्मासाठी धर्माने वागून धर्मकार्य करणार्‍या संस्थेचाच (म्हणजे धर्माचाच) विजय निश्चित आहे, ही खूणगाठ मनाशी बांधून ईश्‍वरावर अतूट श्रद्धा ठेवून येणार्‍या भयंकर अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवूया व धर्मकार्य जोमाने करूया !

ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेची आवश्यकता
`डोंगर पोखरून उंदीरही, म्हणजे सनातन विरुद्ध पुरावे न सापडल्याने पोलीस खोटे पुरावे सादर करतील व त्यांनुसार न्यायालये खोटे निकाल देतील. या सर्व प्रसंगांना तोंड देऊन आपल्याला ईश्‍वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. सरकार व पोलीस यांच्या खोटेपणाबद्दल देव जबाबदार व्यक्‍तींना त्यांच्या पापानुसार पाताळात किंवा नरकात पाठवील !’

 

आपले मत आम्हाला जरुर कळवा

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

साधकांनो, काँग्रेस सरकारचे बंदीचे आव्हान स्वीकारा !

  • ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी सनातनच्या काही वाट चुकलेल्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस दररोज सनातनचा पिच्छा पुरवत आहेत आणि राज्यकर्ते व धर्मद्रोही हे सनातनवर बंदी घालण्याची मागणी करून साधकांना गर्भगळीत करण्याचा प्रयत्‍न करत आहेत. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते श्री. मदन बाफना यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीचे बिगुल वाजवले. 

    त्यानंतर गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी विधानसभेत कारवाईचे सुतोवाच केले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरद पवार यांनी `सनातनवर बंदी केव्हा घालता’, या प्रश्‍नाचा भडिमार स्वत:च्याच पक्षाच्या मंत्र्यांवर थेट व्यासपिठावर करायला सुरुवात केली आहे. दुसर्‍या बाजूला दहशतवाद्यांच्या घरांना भेटी देणारे खासदार असलेल्या समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही त्यासाठी आंदोलने करून दबाव आणत आहेत. राज्यकर्ते व धर्मद्रोही यांच्या अशा आरोळयांमुळे व पोलिसी ससेमिर्‍यामुळे काही साधक दडपणाखाली आहेत. कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य
    श्री स्वामी जयेंद्र सरस्वती यांना खुनाच्या खोट्या आरोपाखाली अटक होऊ देणारे काँग्रेस सरकार `इस्लामी राक्षसा’ला खुष करण्यासाठी सनातनचा बळी द्यायला मागे-पुढे पहाणार नाही, हेच खरे. सनातनवर बंदी आल्यास साधकांची कोणतीही व्यावहारिक हानी होणार नाही; परंतु बंदीमुळे संस्थेच्या राष्ट्ररक्षण व धर्मजागृतीच्या कार्याची हानी होईल, याची त्यांना काळजी वाटते. वास्तविक सनातनच्या हजारो साधकांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्वत:च्या कमाईतील पै-पैची काटकसर केलेल्या धनाचा त्याग करून आणि रात्रंदिवस देह झिजवून संस्थेचे कार्य देश-विदेशात पसरवले आहे. त्यामुळे सनातनवरील बंदीची कल्पनाही सनातनच्या प्रत्येक साधकाला असह्य होणारी आहे, हे खरे आहे; म्हणूनच साधकांनी स्वत:ला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काही मुद्यांचा विचार विवेकाने करायला हवा. म्हणूनच येणार्‍या भयानक परिस्थितीची जाणीव हिंदु बांधवांना करून देण्यासाठी व या बंदीरूपी महापुरातून तरून जाण्यासाठी आवश्यक असणार्‍या विचारांची नौका त्यांच्या मनसामर्थ्याशी जोडण्याचा आमचा उद्देश आहे.त्यासाठीच बंदीच्या कारवाईचा उहापोह आज आम्ही करत आहोत.


    `दैनिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून आतापर्यंत मिळालेल्या दृष्टीकोनांच्या आधारे
    ईश्‍वरी राज्याची स्थापना होईपर्यंत वाटचाल करा !

    काँग्रेस सरकार `दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, कदाचित हा आमचा शेवटचा संदेश असेल. `दैनिक सनातन प्रभात’चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. सद्यस्थितीत कोणावरही बंदी आणली, तरी ती एका हिंदु संघटनेवर असल्यामुळे त्याचे दु:ख सर्वांनाच असेल; पण त्यातूनही ती बंदी `सनातन प्रभात’वर कोसळली, तर आमचे हजारो हिंदु बांधवांशी होणारे रोजचे संभाषण बंद होईल. `सनातन प्रभात’ने हिंदु बांधवांसाठी केलेल्या कार्यामुळे हजारो हिंदु बांधवांची रोजची व्यष्टीच नव्हे, तर समष्टी साधनेची सुरुवातही `सनातन प्रभात’मधील विचारांनी होते. बंदीनंतर हा विचारांचा ओघ खंडित होईल व हजारो हिंदु बांधवांची स्थिती महापुरात अडकल्याप्रमाणे दिशाहीन होईल. `सनातन प्रभात’वर बंदी आणल्यास शेकडो वाचकांनी भरलेले वार्षिक वर्गणीचे आगाऊ दिलेले पैसे त्यांना परत करण्यात येतील. वाचकांनो, आम्ही कधीच अर्थलाभासाठी `दैनिक सनातन प्रभात’चा वापर केला नाही. हिंदूंमध्ये जागृती व्हावी, हिंदु समाज बलसंपन्न व्हावा व ईश्‍वरी राज्याच्या रूपाने लागणारी मधुर फळे हिंदु समाजाला चाखता यावीत, हाच आमचा उद्देश आहे. काँग्रेस सरकारच्या धर्मद्रोहामुळे येऊ घातलेली बंदी पहाता असे प्रकर्षाने सांगावेसे वाटते की, आतापर्यंत जे काही दृष्टीकोन `दैनिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळाले, त्या आधारे ईश्‍वरी राज्याची स्थापना होईपर्यंत वाटचाल करा !

    `दैनिक सनातन प्रभात’ हिंदुत्वासाठी इतिहासात अजरामर होईल व काँग्रेस खलनायक बनेल !
    भारताने लोकशाहीचा स्वीकार केला व वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य प्राप्‍त झाले. त्यामुळे सरकारविरोधी विचार करणार्‍या एखाद्या वृत्तपत्रावर बंदी आणल्याचा इतिहास स्वातंत्र्यानंतरच्या ६१ वर्षांत कधीच घडला नाही. याला अपवाद १९७५ सालची आणीबाणी ठरली. आणीबाणीत तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात लिहिणार्‍या सर्वच वृत्तपत्रांची त्यांनी गळचेपी केली. ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीविरुद्ध लिहिले, त्या दैनिकांच्या छापखान्यांचा विद्युतप्रवाह खंडित करण्यात आला. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात ही आणीबाणी काळया अक्षरांत लिहिली गेली व इंदिरा गांधी खलनायक बनल्या. वृत्तपत्रांची शासनस्तरावरून अशी गळचेपी करण्याचा प्रकार त्यानंतर भारतात घडला नाही; पण आता `सनातन प्रभात’च्या बाबतीत तो होऊ घातलाय. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या दृष्टीने पहायचे झाले, तर आणीबाणीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. काँग्रेसने `दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घातली, तर `हिंदुत्ववादी विचारांमुळे बंदी घालण्यात आलेले दैनिक’ म्हणून इतिहासात नोंद होईल व तेव्हा काँग्रेसची खलनायक म्हणून नोंद होईल.

    रामराज्याच्या स्थापनेपूर्वी ऋषीमुनींना झालेल्या त्रासाप्रमाणे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेत साधकांना त्रास होणे अपरिहार्य !
    सनातनचे कार्य हे नेहमीच स्वार्थांध व भ्रष्ट राज्यकर्ते, प्रशासन व धर्मद्रोही यांच्या विरोधात आहे. त्यामुळे आकसापोटी कधी ना कधी सनातनवर कारवाई करण्याचा कोतेपणा राज्यकर्ते दाखवणार, यात दुमत नाही; म्हणूनच साधकांनी प्रथम संस्थेवरील या कारवाईची मानसिक तयारी करायला हवी. ही कारवाई म्हणजे काय असेल ? पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा आणखी कठोरपणे साधकांच्या मागे लागेल, ते आणखी काही साधकांना तुरुंगात टाकतील किंवा फारतर सनातनवर बंदी आणतील, सनातनच्या आश्रमांना टाळे ठोकतील व सनातनची बँक खाती गोठवतील. यापेक्षा जास्त ते सनातनचे काय बिघडवू शकणार आहेत ? `दगड-विटांनी बांधलेल्या इमारती म्हणजे सनातन’, असा ग्रह पोलीस व राज्यकर्ते यांनी करून घेतला असेल, तर ते `भ्रमात वावरतात’, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. सनातनने गेल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत धर्मासाठी तन, मन व धन यांचा त्याग करणारे हजारो साधक व लाखो हितचिंतक यांचे जाळे निर्माण केले. दगड-विटा-मातीच्या इमारती जाऊ शकतात, पैसे बळकावले जाऊ शकतात; पण गावागावांत सनातनने जोडलेली जिवाभावाची माणसे कुठेच जाऊ शकत नाहीत व तेच सनातनचे खरे बळ आहे. सनातनच्या एका आश्रमाला टाळे घातले, तर या हितचिंतकांची हजारो घरे सनातनचे आश्रम बनून कार्य करतील. `सनातनच्या पाच-पन्नास साधकांना अटक केली, तर हजारो साधकांचे शक्‍तीबळ गर्भगळीत होईल’, अशी दिवास्वप्ने कोणीही पाहू नयेत. अटक स्वीकारणार्‍या या पाच-पन्नास साधकांच्या आत्मस्फूर्तीतून तितकेच चैतन्य असलेले आणखी शेकडो तयार होतील. स्वातंत्र्याच्या लढ्यात जे झाले, त्याची पुनरावृत्ती सनातनच्या धर्मक्रांतीच्या लढ्यात होईल. त्या वेळी पोलीस कुणाकुणाला अटक करतील ? १९४८ व १९७५ साली याच हिंदुद्रोही काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली व हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले; पण ते संघवाल्यांना संपवू शकले का ? पोलीस तुरुंगात डांबू न शकलेल्या हजारो स्वयंसेवकांनी संघाचे कार्य सुरूच ठेवले ना व त्यामुळेच संघ वाढतच राहिला ना ! सनातनला तर शेकडो संतमहंतांचे आशीर्वाद आहेत व ईश्‍वरी पाठबळ आहे.

    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोलीस व राज्यकर्ते सनातनचे सर्वकाही घेऊ शकतील; पण जाज्ज्वल्य धर्माभिमान निर्माण झालेले सनातनचे साधक, त्यांनी मिळवलेले साधनेचे बळ, त्यांना आलेल्या ईश्‍वरी साक्षात्काराच्या अनुभूती कोणीतरी हिरावून घेऊ शकेल काय ? म्हणूनच बंदीसारख्या धमक्यांना साधकांनी भीक घालू नये. आम्ही सनातनचे साधक अध्यात्म जगणारे आहोत; मग आम्ही मानसिक स्तरावर कशाला जगायचे ? राज्यकर्ते काय किंवा पोलीस व प्रशासन काय, ते सनातनने सुरू केलेला धर्मयज्ञ उधळण्यासाठी टपलेले आहेत. त्यांचा जाच इ.स. २०१२ पर्यंत सनातनच्या साधकांना होणारच आहे. ऋषींच्या हाडामांसाचा डोंगर झाल्यावर रामराज्याची स्थापना झाली. तसा साधकांना भोगाव्या लागणार्‍या त्रासांचा डोंगर झाल्यावर ईश्‍वरी राज्याची स्थापना होणार असेल, तर साधक त्यास सदैव तयार आहेत. ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेत, हे अपरिहार्यही असते; कारण भक्‍तांना त्रास झाल्यावर धर्मद्रोही असुरांच्या पापाचा घडा भरतो व तेव्हा ईश्‍वर अवतार घेऊन धर्मद्रोह्यांना नष्ट करून ईश्‍वरी राज्याची, धर्मराज्याची स्थापना करतो.
    केवळ साधकच नव्हे, तर प्रत्येक धर्मनिष्ठ, सत्यान्वेषी व्यक्‍तीला ते छळणार आहेत; म्हणूनच प्रत्येक धर्मनिष्ठ व्यक्‍तीने ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेत स्वत:चे योगदान द्यायला हवे. या धर्मक्रांतीची नांदी येत्या निवडणुकांतून व्हायला हवी. आगामी निवडणुकीत धर्मद्रोही पक्ष निवडून येणार नाहीत, यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्‍न करावा ! हिंदूंमध्ये झालेला हा वैचारिक बदलच राज्यकर्त्यांच्या धर्मद्रोहाला सुरुंग लावणारा ठरेल, यात शंका नाही !

    सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांचे विश्‍वव्यापी कार्य सुरूच राहील !
    आता प्रश्‍न सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांचा आहे. या दोन्ही संघटनांनी देशाच्या भिंती केव्हाच ओलांडल्या आहेत. आता अनेक देशांत या संस्था हिंदु संघटन व धर्मशिक्षण यांचे कार्य करत आहेत व त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस सरकार या संस्थांचे फारतर भारतातील कार्य तात्पुरते थांबवू शकेल; पण जगभरच्या धर्मप्रसाराचे कार्य संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरूच राहील. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, काँग्रेसचे हे सूडनाट्य फार दिवस चालणारे नाही. `दिवा विझत आला की जास्त फडफडतो’, असे म्हणतात. त्याप्रमाणे काँग्रेसची ही शेवटची फडफड आहे. शिशुपालाप्रमाणे काँग्रेसचे १०० अपराध भरले आहेत व काँग्रेस शेवटच्या घटका मोजत आहे. येत्या निवडणुकांनंतर काँग्रेसचे राज्य नसेल, तेव्हा दुप्पट जोमाने कार्य करण्यासाठी हे तिन्ही स्तंभ पुन्हा तुमच्या सोबत असणारच !

    काँग्रेस सरकारला सनातन प्रभात’ची भीती का वाटते ?
    केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत `सनातन प्रभात’वर बंदी घालण्याच्या विषयाची चर्चा होणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. श्री. शरद पवार व श्री. पाटील यांनी `सनातन प्रभात’बद्दल गेले काही दिवस जे वातावरण निर्माण केले आहे, ते पहाता भारताला इंडीयन मुजाहिदीन, हुजी, लष्कर-ए-तोयबा, सिमी यांसारख्या इस्लामी दहशतवादी संघटनांपासून नव्हे, तर राष्ट्र व धर्म यांसाठी कार्य करणार्‍या `सनातन प्रभात’पासून अधिक धोका आहे, असा भास कोणालाही होईल. एका बाजूला इस्लामी दहशतवाद व नक्षलवाद बोकाळत असतांना आमचे मंत्री-संत्री सनातन प्रभातवर बंदी आणण्याच्या चर्चेत स्वत:चा बहुमोल वेळ वाया घालवणार, याचे आम्हाला वैषम्य वाटते. आम्हाला राहूनराहून एकच प्रश्‍न सारखा भेडसावतो तो हा की, आठ लाख खडे सैन्य असलेल्या काँग्रेस सरकारला जेमतेम १५ हजार (तोही केवळ महाराष्ट्रात) खप असलेल्या `सनातन प्रभात’ची इतकी भीती का वाटावी ?

    सत्याचाच विजय, हाच इतिहास !
    `दैनिक सनातन प्रभात’च्या स्थापनेपासून, म्हणजे गेल्या ९ वर्षांत आमच्या बाबतीत घडणार्‍या घटना इतिहासातही होऊन गेल्याची प्रचीती आम्हाला वारंवार येते. आमचा हिंदुत्वाचा व राष्ट्रीयत्वाचा बाणा आणि काँग्रेसचा जुलमी ब्रिटीश बाणा, या सर्वांची स्वातंत्र्याच्या ६१ वर्षांनंतर पुनरावृत्ती होत आहे, असे आम्हाला राहूनराहून वाटते. असेच दोन प्रसंग आहेत. पहिला प्रसंग आहे लोकमान्य टिळक यांच्या संदर्भातला. `मी शिक्षा भोगण्याच्या कारणामुळेच मी अंगिकारलेल्या कार्याला ऊर्जित दशा यावी, अशी कदाचित ईश्‍वराची इच्छा असेल’, असे लोकमान्य टिळकांनी `केसरी’तील लेखामुळे त्यांच्यावर चाललेल्या खटल्यात न्यायाधिशांना सुनावले होते. आज त्याच वाक्याचे स्मरण आम्हाला होत आहे. द्वितीय प्रसंग आहे सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्या संदर्भातला. १९४८ साली गांधीवध प्रकरणात संघावर काँग्रेसने अशीच अन्याय्य बंदी घातली होती. त्या वेळी त्या बंदीचा उहापोह करतांना पू. गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, `संघाच्या शक्‍तीमुळेच हे संकट आले आहे आणि त्या शक्‍तीमुळेच ते पुढे दूर होणार आहे.’
    वरील दोन्ही महात्म्यांच्या या विचारांमध्ये सनातनच्या विजयाचे विलक्षण बळ एकवटले आहे. तेव्हा धर्मासाठी लढणार्‍यांनो, घाबरू नका ! सत्य-असत्याच्या युद्धात अंतिम विजय सत्याचा, ईश्‍वराच्या पाठीराख्यांचा म्हणजेच साधकांचाच असतो. सनातनवर बंदी घातल्यामुळे धर्मजागृतीचे कार्य जोमाने वाढण्याची ईश्‍वरी योजना असेल; म्हणूनच कारवाईच्या कोणत्याच तणावाखाली न येता व त्याला सामोरे जाण्याची मनाची तयारी करूनच साधकांनी निर्धास्तपणे कार्याला लागावे. तसेच आकसापोटी राज्यकर्ते व धर्मद्रोही यांनी या ना त्या प्रकारे सनातनला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्‍न केला, तरी सनातन चिरंतन असल्यामुळे `राखेतूनही पुनर्बांधणी’ (Raised from
    the ashes) या वाक्प्रचारानुसार त्याची स्वयंतेजाने पुनर्निर्मिती होईल, हे सनातनद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे.
    आज इतिहासातून स्फूर्ती घेणार्‍या प्रत्येक धर्मनिष्ठाने आर्य चाणक्यांप्रमाणे प्रतिज्ञा करूया की, धर्माधिष्ठित, म्हणजे ईश्‍वरी राज्याची निर्मिती होईपर्यंत एक क्षणही स्वस्थ बसणार नाही !

    आपले मत आम्हाला जरुर कळवा 

  •   निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

  • बजरंग दल, सनातन प्रभात, सिमी यांच्यावर बंदी घालायलाच हवी : गृहमंत्री रा.रा. पाटील यांची दैनिक `लोकसत्ता’मध्ये मुलाखत  

<!– title=”

हिंदूंनो, या हिंदुद्वेष्ट्यांना पुढील निवडणुकीत धडा शिकवा !

” : removed on 14-Oct-07–>

<!– title=”

धुळे नव्हे काश्मीर !

धुळे, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – धुळे शहरातील तणावग्रस्त वातावरणातही ज्यांची घरे शाबूत आहेत, असे काही हिंदू आपल्या घराकडे परत येत आहेत. त्यांना जवळ रहाणारे मुसलमान धमक्या देत आहेत. `इथे येऊ नका. तुम्हाला पाहून घेऊ’, अशा प्रकारच्या धमक्यांनी हिंदू पुन्हा भयभीत झाले आहेत.” : removed on 14-Oct-07–>

आपले मत आम्हाला जरुर कळवा 

मुसलमानांचे चोचले पुरवणे बंद करा व मगच `सनातन’च्या वाट्याला जा ! – शिवसेनाप्रमुख

निधर्मी व मुसलमानधार्जिणे राज्यकर्ते सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीची झोड उठवत असतांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी `मुसलमान म्हणून त्या धर्मांधांचे चोचले पुरवणे बंद करा व मगच `सनातन’च्या वाट्याला जा’ अशी काँग्रेस सरकारवर घणाघाती टीका करत सनातनचे समर्थन केले आहे.

दैनिक `सामना’च्या ८ ऑक्टोबरच्या अग्रलेखात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. या अग्रलेखात शिवसेनाप्रमुख म्हणतात, “महाराष्ट्राचे `जाणते राजे’ शरद पवार सांगतात, फक्‍त मुस्लिमांनाच टार्गेट करू नका, हिंदू संघटनांवरही कारवाई करा. शरदबाबू आम्हाला सांगा; अल कायदा, सिमी, तोयबा, इंडियन मुजाहिदीनच्या तोडीच्या कोणत्या `हिंदू’ संघटना तुमच्या नजरेत आहेत ? त्या तोडीची एकतरी हिंदू संघटना आमच्या हाताशी असती, तर या हिरव्या सैतानांची इकडे बाँब फोडण्याची व दंगली घडविण्याची अजिबात हिंमत झाली नसती; पण आमच्या गृहखात्याचे `डबडे’ वाजते ते ऊठसूट त्या बजरंग दलाविरुद्ध व आता त्यांच्या पोटात दुखते ते सनातन प्रभातमुळे. हिंदु धर्माच्या नावावर थोडे धार्मिक व जास्त सांस्कृतिक कार्य करणारी ही संघटना. हिंदूंच्या देवतांची विटंबना करणार्‍या नाटकबाज अवलादीचा संताप येऊन त्यांच्यातील काही लोकांनी गडकरी रंगायतनमध्ये एक फुसका बॉम्ब फोडला. त्यामुळे या धार्मिक संघटनेस धोपटून, मारूनमुटकून `दहशतवादी’ ठरविण्याचा ठेका त्या `एटीएस’ की फीटीएसवाल्यांनी घेतला. थकले-भागलेले जीव आयुष्याच्या संध्याकाळी मन:शांतीसाठी त्या `सनातना’त जाऊन जपजाप, ध्यानधारणा करतात त्यांनाच अतिरेकी ठरवून मुसलमानांना खूश करण्याचा उद्योग राष्ट्रवादीवाल्यांनी आरंभला असेल, तर तो प्रकार मूर्खपणाचाच आहे. धर्मांध मुसलमानांचे, बाँबस्फोटांतील अतिरेक्यांचे खटले लढविणारे मजीद मेमन तुमच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बसतात. त्यांचा त्रास नाही होत. दहशतवाद रोखायचा असेल, तर आधी या वकिलांना रोखा. मुसलमान म्हणून त्या धर्मांधांचे चोचले पुरवणे बंद करा व मगच `सनातन’च्या वाट्याला जा !” (हिंदूंनो, कृती जाऊ द्या शिवसेनाप्रमुखांप्रमाणे बोलण्याचे धाडस तरी स्वत:त निर्माण करा ! – संपादक)

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!