सुधारणावादी मुसलमान गप्प का ?

दहशतवाद्यांचे रक्षक असणार्‍या मुसलमानांचे लांगूलचालन करणारी काँग्रेस क्रांती अपरिहार्य करते !

१९ सप्टेंबर रोजी जामियानगर येथे दहशतवाद्यांबरोबर उडालेल्या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे हुतात्मा झाले. “जामियानगरमधील सदनिकेमध्ये वास्तव्य करणारे दहशतवादी हे भोळेभाबडे होते.

पोलिसांनी त्यांच्याशी खोट्या चकमकी घडवून आणल्या”, असे म्हणत मुसलमानांनी व तथाकथित निधर्मीवाद्यांनी थयथयाट केला. याची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जागा झाला व त्याने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात नोटीस बजावली. हा सर्व प्रकार सुरू असतांना सुधारणावादी मुसलमानांना मात्र त्याचे सोयर-सुतक नव्हते. आपल्या मुसलमान जातभाईंच्‍या कुकृत्याचा निषेध करण्याची त्यांना गरज भासली नाही. जेव्हा मुसलमानांच्या गैरकृत्यांना आळा घालण्याची निर्णायक वेळ येते, तेव्हा सुधारणावादी मुसलमान शेपूट घालून गप्प बसतात, हे अनेक उदाहरणांती सिद्ध झाले आहे. `पायोनियर’ या इंग्रजी नियतकालिकात श्री. स्वपन दासगुप्‍ता यांचा प्रसिद्ध केलेला तथाकथित सुधारणावादी मुसलमानांचा बुरखा फाडणार्‍या लेखाचे स्वैर भाषांतर येथे देत आहोत.


भारतातील मुसलमान पुरवतात दहशतवाद्यांना सुरक्षाकवच !
जामियानगर येथे पोलीस व दहशतवादी यांच्यात उडालेल्या चकमकीमुळे भारतातील सामाजिक स्थितीचा उलगडा होतो. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून जामियानगरची निवड करण्यामागचे कारण स्पष्ट आहे. जामियानगर येथे त्यांना द्विस्तरीय कवच मिळाले. एक म्हणजे तो परिसर अती गजबजलेला असल्याने त्यांना सुरक्षा मिळाली. तसेच दुसरे म्हणजे त्या भागात मुसलमानांची वस्ती असल्याने दहशतवाद्यांना धार्मिक सुरक्षितताही मिळाली. पोलिसांनी त्या भागात दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली, तेव्हा स्थानिक मुसलमानांनी पोलिसांना शिव्या घातल्या व धर्मयुद्धाच्या घोषणा दिल्या. तेथील मुसलमानांची ही कृती अस्वस्थ करणारी आहे. मुसलमानांची दहशतवादाच्या विरोधातील मोहिमांना संघटितपणे विरोध करण्याची ही `हैद्राबादी पद्धत’ आता दिल्लीतही रुजल़्याचे यातून स्पष्ट झाले. मुसलमान समुदायाला मिळणार्‍या राजकीय वरदहस्ताचा दहशतवादी चांगल्या प्रकारे वापर करून घेत आहेत. १९ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला महंमद अतिफ या दहशतवाद्याचा त्याचे मुसलमान मित्र व शेजारी यांनी गुणगौरव केला. आझमगड येथे त्याच्या जन्मगावी संतापलेल्या गावकर्‍यांनी प्रसारमाध्यमाच्या एका पथकाला ओलीस ठेवले.मुसलमानांच्या संघटनाही दहशतवाद्यांची पाठराखण करतात, हे लक्षात घ्या ! भारतात अनेक ठिकाणी साखळी बाँबस्फोट घडवून आणणारा तौकीर याला पकडण्यासाठी भारतातील सुरक्षायंत्रणा जंगजंग पछाडत आहे. “माझा मुलगा निर्दोष आहे. तौकिर हा अल्-कैदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन असल्यासारखा भासवण्याचा प्रयत्‍न भारतातील प्रसारमाध्यमे करत आहेत”, अशी टीका तौकिर याच्या आईने केली होती. यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ही मुलाखत `मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ या संघटनेने आयोजित केली होती. ११ जुलै २००६ रोजी मुंबईमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांमध्ये २०९ नागरिक ठार झाले होते. हे साखळी बाँबस्फोट घडवून आणण्यात तौकिर याचा हात होता. या बाँबस्फोटांची चौकशी करणार्‍या पोलिसांच्या विरोधातही मुसलमान संघटनांनी अशीच आरडाओरड केली होती. त्यामुळेच तौकीर त्यावेळी पसार होण्यास यशस्वी झाला. `सिमी’ ही दहशतवादी संघटना देशभर क्रियाशील असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत व त्यांना मुसलमानांचा पाठिंबा मिळत आहे.

सुधारणावादी मुसलमानांनी त्यांच्या बांधवांचे प्रबोधन करावे
मुसलमानांचा दहशतवाद्यांना पाठिंबा असतोच, याची प्रचीती पुन्हा एकदा १९ सप्टेंबर रोजी जामियानगरमध्ये पोलीस व दहशतवादी यांच्या चकमकीच्या वेळी आली. `दहशतवादाला पोसण्यास मुसलमानांचा हात असतो, हे मुसलमान सुधारणावादी व मुसलमान नेते नाकारू शकत नाही. समाजवादी पक्षातील काही राजकीय नेत्यांची मुले बाँब पेरण्यात सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे. यावरून मुसलमान समाजातील वयस्क मंडळींचे त्यांच्या मुलांवरील नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. मदरशामध्ये शिक्षक म्हणून काम करणारा अबू बशीर व मौलवी म्हणून काम करणारो वालीउल्ला काझमी यांच्यासारखे मुसलमान इंडीयन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. `इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म आहे’, अशी घोषणा मुसलमान नेते व सुधारणावादी मुसलमान करतात. असे असेल, तर सुधारणावादी मुसलमानांनी त्यांचे जातभाई करत असलेल्या कुकृत्यांचा जाहीर निषेध करावा व त्यांचे प्रबोधनही करावे. अन्यथा या मुसलमानांचा सुधारणावादीपणा हाही एक `फार्स’ आहे, असे म्हणणे क्रमप्राप्‍त ठरेल.

 

  निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान

चलनी नोटांवर श्रीरामाचे चित्र छापा !

चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपण मुसलमान असल्याने आपल्याला हिंदु वस्तीत जागा दिली नसल्याचा आरोप केला. ज्यांना शबानासारख्या उपद्रवकारी व्यक्‍तीशी
संबंध ठेवावा लागतो, अशा माणसांनी धैर्य एकवटून तिला हिंदु आणि मुसलमान समाजातला फरक, कारणेपरत्वे समजावून सांगायला पाहिजे.
जसजशी मुसलमानांची लोकसंख्या वाढते, तसतसे ते हिंस्र प्रवृत्तीचे होऊ लागतात. शतप्रतिशत मुसलमान जेथे आहेत, तेथे शांतता कधीच नसते. भारतात मुसलमान तेरा ते वीस प्रतिशत असले, तरी ते आपण शतप्रतिशत आहोत, अशा उन्मत्तपणाने वागत आहेत; कारण भारतातील राज्यकर्ते मुसलमानांच्या बाजूने आहेत.

 

…म्हणून शबानाला हिंदु आणि मुसलमान यांच्यातील फरक कारणेपरत्वे समजावून सांगावा !
आपण मुसलमान असल्यामुळे हिंदु समाज आपल्याशी दूरत्वाने वागतो आणि हिंदु वस्तीत रहावयास जागा मागितली तर देत नाही, अशी तक्रार चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांनी दूरचित्रवाणीवर काही दिवसांपूर्वी केली होती. ती पूर्ण सत्याने भरलेली नव्हती. परिस्थितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने ती केलेली नव्हती. तसे बोलत राहिल्यामुळे दोन समाजांत दरी वाढली, तरी या नटीला त्याची चिंता नव्हती. काही कलावंत पैसा मिळतो; म्हणून रंगभूमीवर किंवा पडद्यावर वाटेल ते बरळायला आणि अंगविक्षेप करायला सिद्ध असतात, तसे समाजातही पैसे खाऊन घाणेरडे उद्योग करणारी माणसे असतातच. देवल यांंनी `शारदा’ नाटकात विचारला आहे, तसा `जठरानल शमवाया नीचा, कां न भक्षिसी गोमय ताजे’ असा प्रश्‍न विचारावा, अशी त्यांची योग्यता असते; पण काही वेळेला नुसते प्रश्‍न विचारून भागत नाही. सडेतोड उत्तरेही द्यावी लागतात. ज्यांना शबानासारख्या उपद्रवकारी व्यक्‍तीशी संबंध ठेवावा लागतो, अशा माणसांनी धैर्य एकवटून तिला हिंदु आणि मुसलमान समाजातला फरक कारणपरत्वे समजावून सांगायला पाहिजे. कुराणाने जे नीतीनियम आणि आचारसंहिता सिद्ध केलेली आहे, त्यानुसार जे इस्लाम धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना स्वर्गात प्रवेश मिळणार नसून नित्याचे नरकात सडत रहाणे, हेच त्यांच्या कपाळी लिहिलेले असते. स्वर्गात रहाण्याचे सुख हवे असेल, तर मुसलमान असल्याचा प्रेषिताचा दाखला सादर करावा लागतो. शबाना आझमीचे जे प्रेक्षक चाहते आहेत, त्यांतील हिंदु प्रेक्षकांना, कुराण सांगते त्याप्रमाणे स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांना नरकातच पिचत रहावे लागणार आहे. शबाना आझमी मुसलमान असल्यामुळे स्वर्गात जाईल, तेव्हा ती आपल्या हिंदु चाहत्यांना बरोबर घेऊन जाणार नाही. इस्लाम धर्मातील नीतीनियम बदलून हिंदूंनाही प्रवेश द्यावा आणि त्यांना आपल्या शेजारीपाजारी स्वर्गात राहू द्यावे; म्हणून शबाना रदबदली करणार आहे, अशी शक्यता नाही. जी बाई जिवंतपणी हिंदूंविषयी प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा एक शब्द बोलायला उत्सुक नाही, ती बाई मेल्यावर हिंदूंची काळजी करील, अशी आशा करता येत नाही. तात्पर्य हे की, आपण मुसलमान असल्यामुळे हिंदु वस्तीत रहाण्यास आपणास जागा मिळत नाही, हा अन्याय होत असल्याची जर शबानाची तक्रार असेल, तर हिंदूंना ते `इस्लामचे बंदे’ नाहीत; म्हणून स्वर्गात प्रवेश नाकारून नरकात डांबणार्‍या प्रेषिताविषयी नापसंतीचा एक शब्दही ती का उच्चारत नाही, असे तिला अडवून विचारण्याचा हिंदूंना अधिकार आहे.

मुसलमान एकूण लोकसंख्येच्या दोन प्रतिशत वा कमी असतात, तेव्हा ते सरळमार्गी असतात !
शबाना आझमी मुस्लीम समाजात अपवाद नसून नियम आहे. डॉ. पीटर हॅमंड यांच्या ग्रंथातील काही भागांविषयी गेल्या रविवारच्या अंकात वाचल्यानंतर या लेखात विस्ताराने ते मुसलमानांविषयी काय म्हणतात, ते पाहू.
`मुसलमान जेव्हा एकंदर लोकसंख्येच्या दोन प्रतिशत किंवा कमी असतात तेव्हा ते शांततेने कालक्रमण करत असतात आणि त्यांचा दुसर्‍यांना धोका वाटावा, असा उपद्रव होत नसतो. अशा प्रकारे सभ्यपणाची वर्तणूक मुसलमान पुढील राष्ट्रांत करतात. कंसातील आकडे त्यांचे तेथील लोकसंख्येचे प्रमाण दर्शवतात. `अमेरिका (०.६ ), ऑस्ट्रेलिया (१.५ ), कॅनडा (१.९ ), चीन (१.८ ), इटली (१.५ ), नॉर्वे (१.८ ).’ अर्थातच हॅमंड यांच्या प्रस्तुत पहाणीत आता बदल करण्याची आवश्यकता आहे. सात वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या जागतिक व्यापार केंद्रावर प्रवासी विमाने आदळवून सूडनाट्याचा जो नवा कोरा बीभत्स प्रकार इस्लामच्या पाईकांनी केला, तो जरी अमेरिकेच्या बाहेरच्या मुसलमानांनी केला असला, तरी त्यामुळे अमेरिकेत आणि सगळया युरोपात आपल्याकडील मुसलमानांकडे संशयाने आणि अतीसावधपणे बघितले जात
आहे. चीनमध्ये तर मुसलमानांच्या मनात तेथील लोकांविषयी आणि संस्कृतीविषयी प्रेम उत्पन्न व्हावे; म्हणून विशेष अभ्यासक्रम लागू केला गेला आहे.

मुसलमान एकूण लोकसंख्येच्या दोन प्रतिशतहून अधिक होतात तेव्हा स्वतंत्र अस्तित्व जपू लागतात !
मुसलमानांचे लोकसंख्येतील प्रमाण जेव्हा दोन प्रतिशतहून अधिक होते आणि ते पाच प्रतिशतपर्यंत जाऊन थांबते, तेव्हा त्यांच्या मनात दुसर्‍यांना बाटवण्याचे विचार येऊन तशी कृती व्हायला सुरुवात होते. दुसर्‍या अल्पसंख्यांकांकडे ते मोर्चा वळवतात. विशेषत: कारागृहातील गुंडांकडे ते लक्ष देतात. गुंडांना इस्लामच्या आक्रमकतेचे आणि असहिष्णुतेचे आकर्षण पडावे, असे मुसलमानांना वाटते. अशी परिस्थिती पुढील देशांत आहे. `डेन्मार्क (२ ), जर्मन (३.७ ), इंग्लंड (२.७ ), स्पेन (४ ) व थायलंड (४.६ ).
मुसलमान लोकसंख्येत पाच प्रतिशतहून अधिक होतात, तेव्हा ते देशाच्या एकंदर व्यवहारांवर यथाशक्‍ती प्रभाव पाडायला सुरुवात करतात. दुकानातून किवा उपाहारगृहातून जे अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात, ते हलाल पद्धतीने सिद्ध केलेले असले पाहिजेत, अशी त्यांची पहिली मागणी असते. ही मागणी मान्य झाल्यावर हलाल पद्धतीने कोंबड्याबकर्‍यांच्या माना मुरगळण्यासाठी मुसलमानांनाच नोकरीवर ठेवले जाते. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचे प्रमाण वाढते. `सुपरमार्केटां’वर हलालसाठी दबाव वाढवला जातो. तोडफोडीच्या धमक्या दिल्या जातात. असे प्रकार साधारणपणे पुढील देशांत होतात. `फ्रान्स (८ ), फिलिपिन्स (५ ), स्वीडन (५ ), स्वित्झर्लंड (४.३ ), नेदरलँड (५.५. ), त्रिनिदाद आणि टोबॅगो (५.८ ).
आणखी एक नवी गोष्ट होते. मुसलमान आपली वेगळी वस्ती करून रहायला सुरुवात करतात. आपल्या वस्तीचे वेगळे निर्बंध असावेत, असे ते ठरवतात. हे निर्बंध शरियतचे असतात. सगळया जगाचे व्यवहार शरियतच्या नीतीनियमानुसार चालले पाहिजेत, अशी मुसलमानांची आकांक्षा असते. त्यानुसार मुसलमान पाच प्रतिशत इतके झाले की, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखवण्याची खुमखुमी त्यांना येते.

मुसलमान दहा प्रतिशत होतात तेव्हा आक्रमक होतात !
मुसलमान लोकसंख्येच्या दहा प्रतिशत होतात, तेव्हा आपली परिस्थिती हलाखीची आहे आणि कुणीतरी आपल्यावर अन्याय करत असल्यामुळे आपण वंचित आहोत, हे जगाला सांगण्याची सुरसुरी त्यांना येते आणि आपण तोडफोड करून मालमत्तेची हानी केली, तरच लोकांचे लक्ष आपल्याकडे लागणार आहे, असा समज ते करून घेतात. इस्लामचा अवमान कशाही मुळे होतो, अशी समजूत ते करून घेतात आणि त्यावर त्यांची निषेधाची कृती साकार व्हायला वेळ लागत नाही. प्रेषित महंमदाचे चित्र वा व्यंगचित्र कोणी काढले, तर तेवढे कारणही मोठी दंगल करण्यास पुरेसे आहे आणि दंगल करून निषेध करून निषेध व्यक्‍त करण्याचा आपणास हक्क आहे, असे मुसलमानांना प्रामाणिकपणे वाटते.
दहा प्रतिशत आणि त्याच्या आसपास, मुसलमान पुढील देशांत आढळतात. `गयाना (१० ), भारत (१३.४ ), इस्रायल (१६ ), केनिया (१० ), रशिया (१५ ).

२० प्रतिशतहून अधिक मुसलमान माणसांना मारण्याचा खेळ खेळू लागतात !
मुसलमान जेव्हा २० प्रतिशत होतात, तेव्हा ते नुसत्या मोठ्या दंगली करून थांबत नाहीत, तर जिहाद पुकारण्यासाठी स्वतंत्र संघटना उभारण्याचा आपल्याला जन्मजात हक्क आहे, अशी त्यांची धारणा होते. मग ते आपल्या अंगातील मस्ती जिरवण्यासाठी अधूनमधून माणसे मारण्याचा खेळ खेळतात. जे मुसलमान नाहीत, अशा समाजातील प्रमुख व्यक्‍तींच्या हत्या कराव्या, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. मग चर्च, सिनेगॉग, मंदिरे जाळली जातात. हे अतिशय प्रभावीपणे इथिओपियात चालले आहे; कारण तेथे मुसलमान लोकसंख्येच्या ३२.८ प्रतिशत आहेत.
मुसलमान जेव्हा लोकसंख्येच्या ४० प्रतिशत होतात, तेव्हा त्या देशात सामूहिक हत्याकांड अनुभवायला मिळते. दहशतवादी अत्याचार सुरू होतात, जणू युद्ध चालले आहे, अशी अनुभूती इस्लामचे बंदे बाकीच्या समाजघटकांना देत असतात. पुढील देशांत असे भीतीदायक प्रसंग वारंवार तेथील लोकांच्या जीवनात येत असतात. `बोस्निया (४० ). छाड (५३.१ ), लेबेनॉन (५९.७ )’.

६० प्रतिशत मुसलमान काफिरांचा वंशविच्छेद करू लागतात !
लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण जेव्हा ६० प्रतिशत होते, तेव्हा जे मुसलमान नाहीत, अशा सर्वांचा छळ करण्याची अनुमती साक्षात प्रेषित महंमद पैगंबरांनी आपणाला दिली आहे, अशा समजुतीत मुसलमान नवनवे बीभत्स खेळ शोधून काढतात. अशा खेळांत काही सज्जन मुसलमानांचाही छळ केला जातो. त्यानंतरचा खेळ म्हणजे जे आपल्या वंशाचे वा विचारांचे नाहीत, त्यांचा वंशविच्छेद करावा, त्यांना त्यांच्या मूळ भूमीवरून हुसकावून लावून परागंदा करावे, यासाठी मुसलमानांना शस्त्र हाती घ्यावे असे वाटते. या प्रत्येक संघर्षात मुसलमानांचे हत्यार `शरियतचे निर्बंध’ हे असते. सवलत म्हणून काही वेळा जिझिया कराची वसुली केली जाते आणि त्यांना दुय्यम नागरिक म्हणून संशयित आरोपींसारखे खाली मान घालून जीवन जगण्याची संधी मिळते. असे प्रकार पुढील राष्ट्रांत पहावयास मिळतात. `अल्बानिया (७० ), मलेशिया (६०.४ ), कतार (७७.५ ), सुदान (७० )’.

जेथे ८० प्रतिशत मुसलमान असतात, तेथे लोकांचा दैनंदिन छळ करणे हा सरकारी कार्यक्रम होतो !
ज्या देशात मुसलमान ८० प्रतिशत असतात तेथे जे मुसलमान नाहीत, अशा लोकांचा दैनंदिन छळ करणे हा सरकारी कार्यक्रम असतो. जिहाद हे अधिकृत धोरण असते. अइस्लामी लोकांना हाकलवून लावणे, हा खेळ होतो. सामूहिक हत्याकांड ही करमणूक असते. हे सगळे तुम्हाला बांगलादेशात पहावयास मिळते; कारण तेथे मुसलमान ८३ आहेत. पुढील देशांत अशीच अनागोंदी पहावयास मिळते; कारण तेथे मुसलमानांचे लोकसंख्येतील प्रमाण ८० प्रतिशत आहे. `इजिप्‍त (९० ), गाझा (९८.७ ), इंडोनेशिया (८६.१० ), इराण (९८ ), इराक (९७ ), जॉर्डन (९२ ), मोरोस्को (९८.७ ), पाकिस्तान (९७ ), पॅलेस्टाइन (९९ ), सिरिया (९० ), ताजिकिस्तान (९० ), तुर्कस्थान (९९.८), संयुक्‍त अरब अमिरात (९६ )’.

शतप्रतिशत मुसलमान झाल्यावर त्यांची एकाधिकारशाही होते !
ज्या देशात शतप्रतिशत मुसलमान असतात त्यांना दार-ऐस-सलाम म्हणतात. म्हणजे `इस्लामचे शांतीकुंज’. `प्रत्येकजण मुसलमान, मदरसा म्हणजे शाळा आणि सत्ता केवळ कुराणाची’. असे चार देश आहेत. अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, सोमालिया आणि येमेन या देशांत सगळे मुसलमान आहेत आणि औषधालाही अल्पसंख्यांक ठेवलेला नाही; परंतु तेथेही शांतता नसते. `बापाला ठार मारून त्यांची गादी बळकावणे आणि मुलाच्या पत्‍नीवर डोळा ठेवणे’, या मुसलमानांच्या परंपरा आहेत. बापाच्या शब्दासरशी मुलाने सिंहासनावरचा अधिकार सहज त्यजून वनवासाला जाण्याची परंपरा मुसलमानात नाही; परंतु अशी पितृनिष्ठ आणि कर्तव्यकठोर माणसे या पृथ्वीतलावर जन्माला येऊन गेली, याचे मुसलमानांना सतत स्मरण रहावे; म्हणून बाबरी मशीद पाडण्यात आली आणि तेथे भव्यदिव्य राम मंदिर उभे रहाणार आहे. मुसलमानांमध्ये उत्तम सात्त्विक गुणांचा प्रादुर्भाव व्हावा; म्हणून भारतात प्रत्येक मुस्लीम वस्तीत एकतरी रामाचे देऊळ असले पाहिजे.

भारतात मात्र वीस प्रतिशत मुसलमान शतप्रतिशतप्रमाणे उन्मत्तपणे वागतात ! भारतात मुसलमान तेरा ते वीस प्रतिशत असले, तरी ते शतप्रतिशत आहेत, असा उन्मत्तपणाने वागत आहेत; कारण भारतातील राज्यकर्ते, राजकीय आणि वैचारिक सृष्टी मुसलमानांच्या बाजूने आहे. आपल्याच हाताने आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे करून एक तुकडा आपल्याला नष्ट करण्याचा वसा उचललेल्या मुसलमानांना देणारा मोहनदास गांधींसारखा नेता केवळ भारतात जन्माला येऊ शकतो. अशा मातृभूमीभंजक विश्‍वासघातक्याला महात्मा म्हणून पूजण्याचा मूर्खपणाही भारतातच होऊ शकतो. मुसलमानांना बदलायचे असेल, तर त्यांना रामाच्या जवळ न्यावे लागेल; म्हणून चलनी नोटांवर प्रभू रामचंद्रांचे चित्र छापा, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे.

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

केवळ वैज्ञानिक दृष्टीने अंधश्रद्धेचे निर्मूलन करतांना त्यातून उद्‌भवणार्‍या दुष्परिणामांची पूर्ण जाणीव ठेवली पाहिजे !

धर्मद्रोह्यांना खडे बोल सुनावणारे भवरलाल जैन यांच्यासारखे धर्माभिमानी सर्वत्र हवेत !

 

श्री. भवरलाल जैन यांचा परिचय जगप्रसिद्ध जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रणेते व जळगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री विभूषित श्री. भवरलालजी जैन `भाऊ’ या नावाने प्रसिद्ध आहेत. अत्यंत साधी रहाणी; पण उच्च विचारसरणी असलेले भाऊ फक्‍त उद्योगपती नसून लेखकही आहेत. त्यांची `आजची समाजरचना : तिचे स्वरूप व पुनर्बांधणी’, `वाघूरचं पाणी’, `वाकोदचा वटवृक्ष’, `उमललेले संवाद’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जैन उद्योग समुहाचा दर महिन्याचा आलेख दर्शवणारे `भूमीपुत्र’ नावाचे एक मासिक प्रकाशित होते. त्यांनी वृत्तपत्र संघाने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभामध्ये `दैनिक सनातन प्रभात’बद्दल प्रशंसोद्‌गार काढले व त्याचा आदर्श ठेवायला इतर वृत्तपत्रांना सांगितले. `सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. पृथ्वीराज हजारे यांनी अलीकडेच त्यांची भेट घेतली व सनातनच्या कार्याबद्दल त्यांना माहिती दिली.

 

जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात २७ व २८ सप्टेंबर २००८ रोजी `वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद’ पार पडली. या परिषदेचे आयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र शैक्षणिक महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले होते. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात येथील प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांनी केलेले भाषण येथे लेखस्वरूपात प्रसिद्ध करत आहोत.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याबद्दलचे गैरसमज दूर करणे गरजेचे
या परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्षपद भूषवावे, अशी विनंती मला डॉ. दाभोलकरांनी केली होती. त्यानुसार संयोजक व समन्वयक, अशी दुहेरी जबाबदारी मी माझ्याकडे घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याबद्दल जनतेमध्ये बरेच समज व गैरसमज आहेत. या अंधश्रद्धा दूर करणे गरजेचे आहे. सत्य आणि असत्य हे कोणीतरी सांगणे गरजेचे आहे.

विनोबाजींनी हृदयपरिवर्तन शक्य असल्याचे कुमार केतकरांना त्यांचेच उदाहरण देऊन सांगणे
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत इ. वृत्तपत्रांचे ते संपादक होते. आजही ते `लोकसत्ता’ वृत्तपत्राचे संपादक आहेत. `कम्युनिझम’ (साम्यवाद)पासून `सोशालीजम’ (समाजवाद)पर्यंत त्यांचा वैचारिक प्रवास झाला आहे. केतकर हे एकदा ज्येष्ठ कर्मयोगी विनोबा भावे यांच्याकडे गेले होते. विनोबाजी लोकांना भेटतांना दोन्ही हात वर करून `जय राम’ असे म्हणत. त्यांनी तसे म्हटलेले केतकरांना आवडत नव्हते. ते विनोबाजींना म्हणाले, `तुमचे `जय राम’ म्हणणे आम्हाला पसंत नाही. आम्ही `कम्युनिस्ट’ आहोत. आमचा `देव’ या संकल्पनेवर विश्‍वास नाही. तुम्ही हृदयपरिवर्तनाबाबत जे नेहमी सांगता, ते शक्य आहे का ? आमचा क्रांतीवर विश्‍वास आहे.’ विनोबाजींनी केतकरांचा परिचय करून घेतला. त्यानंतर ते केतकरांना म्हणाले, `तुम्ही आताच म्हणालात की, तुम्ही कम्युनिस्ट आहात. तुम्ही जन्मापासून कम्युनिस्ट आहात का ?’ त्यावर केतकर म्हणाले `नाही.’ `मग केव्हापासून झालात ?’ विनोबांचा प्रश्‍न. केतकर उत्तरले `मी वयाच्या २८ व्या वर्षापासून कम्युनिस्टवादी झालो.’ विनोबाजी म्हणाले, `तुम्ही म्हणालात की, हृदयपरिवर्तन यावर माझा विश्‍वास नाही. मग तुम्ही वयाच्या २८ व्या वर्षी कसे काय कम्युनिस्ट झालात ? म्हणजेच तुमच्या २७ व्या वर्षांनंतर तुमचे हृदयपरिवर्तन झाले, हे सिद्ध होते.’

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील सीमारेषा स्पष्टपणे मांडणे अत्यंत कठीण
केतकरांचे दुसरे मत होते, विश्‍वास देवावर नाही, तर क्रांतीवर आहे. त्यावर विनोबाजी म्हणाले, `ठीक आहे. तुमचा नसला तरी देवाचा तुमच्यावर विश्‍वास असेल, तर त्याचे काय ? थोडक्यात अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवणारे पुष्कळ आहेत; पण अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय, हे सांगणारे कमी आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींच्या सीमारेषा स्पष्टपणे मांडणे अत्यंत कठीण आहे.

भारतीय संस्कृतीत चर्चा, वाद-विवाद याला अक्षय स्थान
श्रीकृष्ण आणि अर्र्जुन यांच्यातील संवाद म्हणजे एक पात्र भावना व्यक्‍त करते, तर दुसरे कर्मवाद सांगते. या विषयावर `गीता’ उभी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चर्चा, वाद-विवाद याला अक्षय असे स्थान आहे. अमर्त्यसेन या नोबेल पारितोषिक प्राप्‍त अर्थशास्त्रज्ञाने त्याच्या साडेतीनशे पानांच्या एका पुस्तकात महाभारतापासून आतापर्यंतचे विविध प्रसंग मांडले आहेत. त्यानंतर तो म्हणतो, `प्रत्येक गोष्टीबद्दल चर्चा, वाद-विवाद करतो. तसे करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असे समजणे हे चूक आहे.’ मला मात्र यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. सत्य विचाराला विरोध करणे, हा मनोविकाराचा एक भाग ठरेल ! विरोध करणे व दुमत असणे यात अंतर आहे. माझे दुमत मी डॉ. दाभोलकरांना सांगितले आहे. माझे काही वेगळे अनुभवही मी त्यांना सांगितले आहेत. मी सत्यशोधक व विज्ञान यांवर विश्‍वास असणारा आहे. याचा अर्थ `माझा अध्यात्मावर विश्‍वास नाही, अध्यात्माला अंधश्रद्धा मानतो’ असे नाही. याचा खुलासा मी स्पष्ट शब्दांत करू इच्छितो.

केवळ विज्ञानाद्वारे सर्व गोष्टी आत्मसात करणे किंवा बदल घडवून आणणे अशक्य इंग्रजीत असे म्हटले जाते की, `Too much Vidnyan is creating
problem.’ (विज्ञानाच्या अतिरेकामुळे समस्याच निर्माण होतात.) म्हणून आपल्याला विज्ञानावर खूप भर देऊन चालणार नाही. आपण विज्ञानाच्या माध्यमातून मानवतावाद प्रस्थापित करू इच्छितो. त्याबाबत मला दाभोलकरांना विचारायचे आहे, `माणसात माणुसकी निर्माण करता येईल असा एखादा `फॉर्म्युला’ विज्ञानात आहे का ?’ माणूसकी सोडा किमान व्यक्‍तीला संवेदनशील, संस्कारक्षम बनवता येईल का ? विज्ञान अशा गरजा पूर्ण करू शकते का ?, केवळ विज्ञानाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टी आत्मसात करणे किंवा बदल घडवून आणणे शक्य नाही. त्यासाठी वेगळया मार्गाचा विचार केला पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोबरच मन विकसित करणे, हेही तेवढेच गरजेचे
विज्ञानही वेळोवेळी स्वत:चे निष्कर्ष स्वत:च बदलत असते. थोर वैज्ञानिक आईनस्टाईनने म्हटले आहे, `आम्हाला विज्ञानाच्या माध्यमातून निसर्गाबाबत जे काही आकलन झाले आहे, त्यात `देव’ या संकल्पनेबद्दल आम्हाला माहिती प्राप्‍त झाली आहे. त्यातील थोडीशी माहिती समजलेली आहे, तर खूप माहिती आम्हाला समजलेली नाही.’ वैज्ञानिक दृष्टीकोनाबरोबरच मन विकसित करणे हेही तेवढेच गरजेचे आहे. मनाला संवेदनशील, कार्यक्षम करण्यासाठी आपल्या मनाची शक्‍ती वाढवणे गरजेचे आहे. गांधीजींनी म्हटले आहे, ‘I just do not understand how
chara5ctor building is possible without religion.’ (`धर्म या संकल्पनेशिवाय चारित्र्यसंपन्नता विकसित करणे कसे शक्य आहे’, हे मला समजत नाही ?’) याचा अर्थ असा नाही की, गांधीजी अंधश्रद्धावादी होते.’ या गोष्टींचा खुलासा सांगोपांगपणे झाला, तर त्याला समाजही उत्तम प्रतिसाद देईल, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

`जाती-पाती नसलेल्या देशातील लोक सुखाने नांदतात’, हा समज चुकीचा
अंधश्रद्धा निर्मूलन या विषयातील विषयांना माझा अंशत:च पाठिंबा रहाणार आहे; कारण तुम्ही मांडलेल्या विषयांतून माझे गैरसमज दूर झालेले नाहीत. जाती-पातीवर कोणताही व्यवहार घडू नये. याचा अर्थ `जात पात घालवणे गरजेचे आहे’, असा नाही. कारण फक्‍त भारतातच जातीपाती आहेत. ती एक प्राचीन ओळख आहे. `जाती-पाती नसलेल्या देशातील लोक सुखाने नांदतात’, हा समज चुकीचा आहे. आठ हजार वर्षांहून अधिक काळ असलेली भारतीय संस्कृती जिवंत आहे. तर अडीचशे ते तीनशे वर्षांची जुनी संस्कृती असलेल्या अमेरिकेसारख्या देशात मोठा हिंसाचार घडत आहे.

धर्मात कोणत्याही चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी खोल आणि रुंदावत आहे. हा दोष धर्माचा वा समाजव्यवस्थेचा नाही, तर अर्थव्यवस्थेचा आहे. धर्मात कोणत्याही चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत. प्रत्येक धर्मात `अपरिग्रहतेच्या भावनेने वागा’ असेच म्हटले आहे. कोणत्याही विषयावर प्रत्येकाने स्वत: विचार केला पाहिजे. ही वृत्तीही विज्ञानाने नाही, तर धर्माने दिली आहे. विज्ञान अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही.

समाजाला घातक ठरणारे मुद्दे अंधश्रद्धेच्या अंधारात दडवून ठेवू नका
`मी माझ्या पुरताच विचार करणार आणि दुसरा देश माझ्याशी मित्रत्वाचे नाते ठेवणार नसेल, तर तो माझा शत्रू आहे, असे समजणार’, असा विचार प्रत्येक राष्ट्राने केला, तर त्यातून एकमेकांना मारण्याचीच वृत्ती निर्माण होईल. प्रत्येक राष्ट्रच जर अशा हिंसक वृत्तीचा विचार करणार असेल, तर मग शांती कशी नांदेल ?’ श्रद्धा व अंधश्रद्धा या वादात समाजाला घातक ठरणारे मुद्दे बाजूला ठेवू नका. ते विचार अंधश्रद्धेच्या अंधारात कुठे तरी दडवून ठेवू नका. सत्य विचाराचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे.

विवेकाचा संबंध बुद्धीबरोबरच संस्काराशी आहे !
अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा जो विडा उचललेला आहे, त्यामध्ये विज्ञानावर जास्त विश्‍वास ठेवणार असाल, तर ते जमणे शक्य नाही. कारण अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची उत्तरे विज्ञानाला सापडलेली नाहीत आणि विज्ञान त्यासाठी कोणत्याही प्रकारचा दावाही करत नाही. विवेकबुद्धी हवी, हे बरोबर आहे; परंतु विवेकाचा `फॉॅर्म्युला’ विज्ञानाने दिला आहे का ? विचार बुद्धीनिष्ठ आहे, विवेक नाही. विचाराचा बुद्धीशी संबंध आहे. विवेकाचा संबंध बुद्धीबरोबरच संस्काराशी आहे. असा संबंध जोडला नाही, तर समतोल विकास होऊ शकणार नाही.

विज्ञानाला दिसले नाही, ते शोधण्याचा प्रयत्‍न अध्यात्माद्वारे सुरू आहे !
बुवाबाजी, पशूहिंसा किंवा जादूटोणे या गोष्टी वाईटच आहेत. याला कोणाचा विरोध असेल, तर त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेत हे आवश्यक आहे. ते सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. अंधश्रद्धेचे निर्मूलन करतांना अतिविज्ञान दृष्टीचा विचार केला, तर त्याचेही दुष्परिणाम लवकरच उद्‌भवतात, याची पूर्ण जाणीव ठेवली पाहिजे. विज्ञानाला जे दिसले नाही, ते शोधण्याचा प्रयत्‍न अध्यात्माद्वारे सतत सुरू राहिलेला आहे. यात संत आणि महात्मे यांचे योगदान विसरून चालणार नाही. अंधश्रद्धेमुळे समाजाला बाधा पोहोचवणार्‍या गोष्टी पूर्ण बंद झाल्या पाहिजेत. मला आपण या ठिकाणी बोलावले, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

 

  निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंनिस

`सनातन प्रभात’सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे गृहमंत्र्यांचे सुतोवाच !

`सनातन प्रभात’च्या बंदीचा कुटील डाव म्हणजे राष्ट्र व धर्म प्रेमी वृत्तपत्राचा राजकीय छळ !

`सह्याद्री’ वाहिनीने `साडेनऊच्या बातम्यां’मध्ये सांगितलेली माहिती !

 

मुंबई, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – `सनातन प्रभात’सारख्या संघटनांवर बंदी घालण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी केल्याची माहिती नुकतीच दूरदर्शनच्या `सह्याद्री’ वाहिनीवरून रात्री `साडेनऊच्या बातम्यां’मध्ये वृत्तनिवेदिकेने सांगितली. (`सनातन प्रभात’ ही संघटना नाही, तर ते नियतकालिक आहे ! – संपादक) काल सकाळी `साडेआठच्या बातम्यां’तही ही माहिती वृत्तनिवेदिकेने पुन्हा दिली. कवठेमहांकाळ येथील महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पाटील यांनी वरील प्रतिपादन केले, असे तिने सांगितले. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भात ते बोलत होते, असे ती म्हणाली. (दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या संदर्भात बोलतांना गृहमंत्र्यांनी `सनातन प्रभात’वर बंदी घालणार असल्याचे सांगणे, हे आश्चर्यकारक आहे. `सनातन प्रभात’ नियतकालिक हे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या स्थितीबाबत माहिती देऊन समाजप्रबोधन करते. त्याचे गृहमंत्र्यांना एवढे वावडे असण्याचे काय कारण ? – संपादक)

 

  निगडीत वृत्त : सनातनला विरोध