हिंदुत्वाविषयी सडेतोड विचार मांडून `सावरकर’ आडनाव सार्थ करणार्‍या हिमानी सावरकर यांचा समस्त हिंदूंना अभिमान वाटतो !

सनातनतर्फे हिमानी सावरकर यांचे अभिनंदन !

`देशात हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ती इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील हिंदूंची प्रतिक्रियाच आहे. हिंदूंना तुम्ही `दहशतवादी’ म्हणणार असाल, तर स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांनाही तुम्हाला `दहशतवादी’ म्हणावे लागेल. यापुढे हिंदू शिवाजी महाराज व क्रांतीकारक यांच्या इतिहासातून धडे घेऊन कार्य करतील.’
- `अभिनव भारत’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला त्यांचा अभिमान वाटतो !

हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ती इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील प्रतिक्रिया ! – हिमानी सावरकर

पुणे, २९ ऑक्टोबर – देशात हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ते हिंदूंच्या इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील प्रतिक्रियाच होत. हिंदूंना तुम्ही दहशतवादी म्हणणार असाल, तर स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांनाही तुम्हाला दहशतवादी म्हणावे लागेल. यापुढे हिंदू शिवाजी महाराज व क्रांतिकारक यांच्या इतिहासातून धडे घेऊन कार्य करतील, असे परखड मत `अभिनव भारत’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर यांनी आज येथे व्यक्‍त केले.

`अभिनव भारत’ संघटनेचे मध्यप्रदेशातील कार्य पहाणार्‍या श्री. समीर कुलकर्णी या तरुण कार्यकर्त्याला आज दहशतवादविरोधी पथकाने मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक केली. त्याबाबत `स्टार माझा’ या मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना श्रीमती सावरकर बोलत होत्या. श्रीमती सावरकर पुढे म्हणाल्या, “हिंदूंच्या बाबत सर्वत्र घोर अन्याय सुरू आहे. हिंदूंनी काही चांगले काम केले की, त्याला चिरडून टाकण्यात येत आहे. काँग्रेसचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना चिरडून टाकत असतांना मुसलमान व ख्रिस्तीयांच्यावर कृपा करत आहे.” बाँबस्फोटांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, “बाँबस्फोटांचे समर्थन आम्ही करणार नाही. हिंदूंनी बाँबस्फोट केले असतील, तर ते अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. आता त्यांना तुम्ही अतिरेकी म्हणू शकत नाही. समजा हिंदूंनी बाँबस्फोट केलेच असतील, तर ती एक प्रतिक्रिया आहे. इतकी वर्षे देशात बाँबस्फोट होत आहेत, त्याबद्दल आतापर्यंत त्याचा कोणीही `इस्लामी दहशतवाद’ असा उल्लेख करत नव्हते. आता हिंदूंना बाँबस्फोटांत अटक करण्यात आल्यावर मात्र लगेच सर्व जण `हिंदु दहशतवादी’ असा उल्लेख करू लागले आहेत.” “जागोजागी बाँबस्फोटात हिंदु मारले जात असतांना कोणाला काहीच वाटत नव्हते. अमरसिंग यांच्यासारखे नेते २० कोटी मुसलमान ८० कोटी हिंदूंना भारी पडतील”, असे सांगतात. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. दहशतवादी अफझल याला फाशी दिली जात नाही. त्यामुळे हिंदु आता हा अन्याय सहन करणार नाहीत”, असा गर्भित इशारा त्यांनी या वेळी दिला.


गोळीचे उत्तर गोळीने, तर बाँबस्फोटांचे उत्तर बाँबस्फोटाने, असे का म्हणू नये ?
मुंबईत बसमध्ये राहुल राज याला चकमकीत ठार केल्यावर गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी `गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल’, असे सांगितले होते. तर बाँबस्फोटांचे उत्तर बाँबस्फोटांनीच देण्यात येत आहे, असे म्हटले तर ?, असा मार्मिक प्रश्‍न श्रीमती सावरकर यांनी विचारला.

श्री. समीर कुलकर्णी हा देशाची सेवा करणारा सरळ मार्गी व स्पष्टवक्‍ता तरुण आहे. कोणावर अन्याय करू नये व अन्याय सहनही करू नये, अशा विचारांचा तो मुलगा आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे भाषण करून अथवा लिखाण करून तो त्यावर कृती करतो, अशी माहिती श्रीमती सावरकर यांनी अटक करण्यात आलेल्या श्री. कुलकर्णी याच्याबद्दल दिली.


मालेगाव बाँबस्फोटाप्रकरणी माजी लष्करी अधिकार्‍यासह दोघांना पोलीस कोठडी
नाशिक – मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी काल दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले निवृत्त लष्करी अधिकारी श्री. रमेश उपाध्याय व `अभिनव भारत’ संघटनेचा
कार्यकर्ता श्री. समीर कुलकर्णी यांना आज नाशिक न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत
पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

सनातनसारख्या संस्थेला हिंदु दहशतवादी ठरवणार्‍या `एटीएस्’चा समाचार योग्य वेळी घेऊच ! – शिवसेनाप्रमुख

मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आतंकवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. ही शिबिरे उधळावीत व त्यांना छुपा पाठिंबा देणार्‍यांच्याही मुसक्या बांधाव्यात, असे कुणालाही वाटत नाही. चार साधकांनी हिंदूंच्या देवतांच्या विटंबनेबद्दल संतापाच्या भरात एक लहानसे कृत्य केले. त्या बदल्यात सनातनसारख्या संस्थेला हिंदु दहशतवादी ठरवून तिच्या साधकांचा छळ `एटीएस्’वाल्यांनी चालवला आहे. `एटीएस्’वाल्यांचा समाचार आम्ही योग्य वेळी घेऊच. मालेगाव स्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञाच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यालयावर जो हल्ला केला, त्या नामर्दानगीस काय म्हणावे, असा प्रश्‍न शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज दैनिक `सामना’च्या संपादकीयातून विचारला आहे.

सिमीच्या किती अड्ड्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ले केले ?
या संपादकीयात शिवसेनाप्रमुख पुढे लिहितात, `स्वत:जवळ गृह खात्याची खुर्ची असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना कसेही वागण्याचा परवाना आमच्या आबांनी दिलेला नसावा. राष्ट्रवादीवाल्यांच्या हल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळयाची मोडतोड झाली. प्रभू श्रीरामाच्या तसबिरीची विटंबना झाली. (मुसलमानधार्जिण्या दोन्ही काँग्रेसवाल्यांना छत्रपती शिवरायांबद्दल आदर नाही व प्रभू श्रीराम हा तर काँग्रेसवाल्यांच्या लेखी काल्पनिक पात्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या दोहोंचा मान राखला जाण्याची शक्यताच नाही. अशांना हिंदूंवर राज्य करण्याचा काय अधिकार ? – संपादक) प्रज्ञा साध्वींचा संबंध कधीकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व संघ परिवार यांच्याशी होता, या चिडीतून म्हणे राष्ट्रवादीवाल्यांनी हा हल्ला केला. दहशतवादाचा निषेध म्हणून हा हल्ला झाला असेल, तर या षंढांना आमचा एकच सवाल आहे तो म्हणजे, हिंदुस्थानात ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवणार्‍या सिमीच्या किती अड्ड्यांवर तुम्ही हल्ले केलेत हो ?’
दहशतवाद्यांना मदत करणार्‍या वकिलांची कॉलर धरण्याची हिंमत का दाखवली नाही ?
बाँबस्फोटातील खतरनाक आरोपींचे वकीलपत्र घेणारे अँड्. माजीद मेमन हे तर तुमच्याच राष्ट्रवादीचे पदाधिकारी. मग दहशतवाद्यांना मदत करतात म्हणून कुणी त्या वकिलांची कॉलर धरण्याची हिंमत दाखवली नाही; कारण तिकडे त्या दाऊदचा धाक आहे. अफझलची तरफदारी करणार्‍या किती राजकारण्यांच्या घरावर हे दहशतवादविरोधी चाल करून गेले ? तिकडे शेपट्या घालायच्या व हिंदूंच्या बाबतीत मात्र आरोळया ठोकायच्या. नाशकातील नामर्दानगीचा निषेध करावा तेवढा थोडाच. साध्वीला तुरुंगात डांबणारे पोलीस व नाशकातील हल्लेखोर एकाच माळेचे मणी आहेत, असे ताशेरेही श्री. ठाकरे यांनी ओढले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

हिंदूंना असे राज्यकर्ते हवे आहेत ! …..हिंदूंना असे राज्यकर्ते नकोत !

हिंदूंना असे राज्यकर्ते हवे आहेत !

१. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर, पराक्रमी व निधड्या छातीचे.
२. अपराध्याला हात-पाय तोडणे अशा कठोर शिक्षा देणारे व त्या माध्यमातून इतर अपराध्यांवर वचक ठेवणारे
३. दुर्जनांना चळचळ कापायला लावणारे
४. दहशतवाद्यांवर वचक ठेवून त्यांना पळता भुई थोडी करणारे
५. गो-ब्राह्मण प्रतिपालक व स्त्रियांचा आदर करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे
६. प्रजाहितदक्ष व प्रजेविषयी कळवळा असणारे
७. स्वधर्म व राष्ट्र यांच्याविषयी कमालीचे प्रेम व निष्ठा असणारे
८. धर्मांतरावर बंदी घालणारे
९. कोणत्याही परिस्थितीत विकले न जाणारे स्वाभिमानी
१०. प्रजेची सेवा करून प्रजेच्या मनात स्वत:विषयी विश्‍वास निर्माण करणारे


हिंदूंना असे राज्यकर्ते नकोत !

 
१. मुसलमान व ख्रिस्तीयांच्यापुढे माना झुकवणारे व त्यांना पाहिजे तसे वागणारे
२. अपराध्याला कडक शासन करू न शकणारे, पोलिसांचे हात बांधणारे
३. दुर्जनांना पाठीशी घालणारे
४. दहशतवादाविरुद्ध गुळमुळीत धोरण राबवणारे, दहशतवाद्यांना घाबरणारे
५. राष्ट्रद्रोही व देवतांचे विडंबन खपवून घेणारे धर्मद्रोही
६. `हिंदू-मुसलमान ऐक्य’ या भोंगळ कल्पनेसाठी हिंदूंना कायम मुसलमानांच्या दबावाखाली ठेवणारे व निरपराध हिंदूंना मुसलमानांच्या हातून मरू देणारे
७. स्त्रियांना संरक्षण न देणारे
८. स्वधर्म व राष्ट्र यांचा अभिमान तर दूरच; पण त्यांच्याशी काहीही देणे-घेणे नसल्यासारखे वागणारे
९. स्वार्थासाठी अगदी खालच्या पातळीला जाऊन विकले जाणारे
१०. आपल्या वाईट कृत्यांनी जनमानसांत प्रतिमा डागाळलेली असणारे
११. जनतेचा विश्‍वासघात करणारे

गुरु-ता-गद्दीची त्रिशताब्दी !

हिंदूंनो, स्वधर्म व स्वदेश यांच्यासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणार्‍या खालसा पंथियांचा आदर्श घ्या !

शिखांच्या चार प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक असलेल्या नांदेडग्रामी गुरु-ता-गद्दीच्या त्रिशताब्दी सोहळयाला आजपासून प्रारंभ झाला आणि लक्षावधींची गर्दी गोदावरीच्या तटी दिसू लागली.

शिखांसाठी गुरुस्थानी असलेल्या `गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथाबद्दल श्रद्धा बाळगणार्‍या २० लाखांचा समुदाय या सात दिवस चालणार्‍या भक्‍तीमय सोहळयाला उपस्थित राहील, हे गृहित धरून येथील प्रसिद्ध गुरुद्वारा परिसराचा विकास करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांपासून ते येथे येणार्‍या लाखो भाविकांच्या रहाण्यापासूनच्या ते सुरक्षेपर्यंतच्या सार्‍या सुविधांची तयारी तेथे करण्यात आली आहे. राजकीय नेते व प्रशासन यांची इच्छाशक्‍ती असली, तर काय होऊ शकते, हे नांदेड शहराचा कायापालट पाहून लक्षात येते. भव्य विमानतळ, प्रचंड मोठे रस्ते, गोदावरीवरील अतिभव्य घाट, अवाढव्य रेल्वे स्थानक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिखांसाठी पवित्र ठिकाण असलेले गुरुद्वारा या सर्वांचा चेहरामोहरा बदलला आहे. अवघ्या २१ महिन्यांत हा झालेला चमत्कार म्हणजे ठिकठिकाणच्या शहर विकासात नाकर्तेपणा दाखवणार्‍या शासन व प्रशासन यांसाठी एक वस्तूपाठ आहे !

गुरु-ता-गद्दीचा धर्मरक्षणाचा इतिहास !
औरंगजेबाने शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने दिल्लीच्या चांदणी चौकात वध केला. तत्पूर्वीच्या शीखगुरूंचाही दिल्लीपती सुलतानांनी अमानुष छळ केला होता. त्यामुळे शिखांमध्ये सूडाग्नी धगधगत होता. वयाच्या दहाव्या वर्षी शिखांचे दहावे गुरु झालेल्या गोविंदसिंग यांनी गुरुगादीवर आरूढ होताच दुष्ट सुलतानी शक्‍तींचा नि:पात करत, शिखांना सामर्थ्यशाली बनवले. गुरु गोविंदसिंग यांनी त्यांच्या अनुयायांना आनंदपूरनजीक कोट्टनयना देवीच्या ठाण्यापाशी १६९९ मध्ये धर्मरक्षणासाठी एकत्र आणले. त्यांनी शिखांना `खालसा’ म्हणजे विशुद्ध धर्मशील जीवन जगण्यासाठी आणि दुर्जनांचा प्रतिकार करत सृजनांचा सांभाळ करण्यासाठी एक नवा मार्ग दाखविला. या मार्गावरून क्रमण करणार्‍यांच्या पंथाला `खालसा पंथ’ संबोधले जाते. खालिस म्हणजे तावून सुलाखून निघालेला. हा पंथ शीख बांधवांसाठी तारक, तर भारतियांच्या भूमीत राहून हिंदूंना छळणार्‍या आक्रमकांसाठी मारक ठरला. या पंथाने शीख व हिंदू बंधू आहेत, अशी गर्जना केली. गुरु गोविंदसिंग यांनी नांदेड येथे १७०८ मध्ये देह ठेवला. तत्पूर्वी त्यांनी `गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथाची स्थापना शिखांसाठी शाश्‍वत गुरुपदी केली. या दोन्ही घटनांना येत्या गुरुवारी ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरु गोविंदसिंग त्यांच्या अखेरच्या दिवसांत नांदेड येथेच राहिले. येथूनच त्यांनी खालसांचे नेतृत्व करून शिखांना १७०८ साली `गुरु मानियो ग्रंथ !’ अर्थात `श्रीगुरुग्रंथसाहिब हाच यापुढील गुरुचैतन्याची ओळख घडवील’, अशी आज्ञा दिली. शिखांसाठी वेगळा मानवी देहातील गुरु आता नाही. गेल्या ३०० वर्षांपासून गुरु-ता-गद्दी हेच त्यांच्यासाठी गुरुस्थान आहे.

खालसा पंथाची आधुनिक कामगिरी !
गुरु गोविंदसिंगांनी अकारावे गुरु म्हणून गुरुग्रंथसाहिब यांना मान्यता दिली व खालसाचे प्रमुख बंदा बैरागी यांना बनवले. बंदा बैरागी धर्मवीर होते. त्यांनी केलेले धर्मरक्षणाचे कार्य अचाट आहे. त्यांना सुलतानी आक्रमकांनी ठार मारले, तर त्यानंतर खालसाचे नेतृत्व स्वीकारणार्‍या रणजीतसिंग यांनी शीख साम्राज्य उभे केले. त्या पुढच्या काळात शीख खालसा ही भारतीय सैन्यातील सर्वांत मोठी शक्‍ती ठरली. भारतीय क्रांतीकारकांचे मुकूटमणी ठरलेले सरदार भगतसिंगही खालसा होते. या समुदायाला गेली ५ शतके अत्याचार सोसावे लागले. देशविभाजन, पाकिस्तानी आक्रमणे आणि युद्धे यांत हा समाज होरपळून निघाला. गुरु-ता-गद्दीच्या तीन शतकांच्या इतिहासात अनेक बरेवाईट प्रसंग आले आणि कधी संघर्ष करून किंवा कधी सहन करून खालसा अधिकच उजळत गेला. स्वदेश, स्वधर्म व सज्जन यांच्या रक्षणासाठी खालसा पंथ समर्पित वृत्तीने आजही कार्यरत राहिला आहे. आज देश जिहादी आक्रमकांच्या विळख्यात सापडला असतांना खालसाचे धर्मरक्षक हिंदु धर्मासाठी आशेचा किरण आहेत. गुरु-ता-गद्दीच्या त्रिशताब्दी सोहळयाच्या निमित्ताने शिखांनी त्यांचा भूतकाळातील पराक्रम आठवावा व `सत् श्री अकाल’ हा वीरघोष करत देशाला जिहाद्यांच्या व धर्मांधांच्या तावडीतून सोडवावे, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !



येता सण दिवाळीचा ।
पणत्या-कंदील यांनी सजती दारे ।।
राष्ट्र व धर्म प्रेम वाढवूनी ।
उजळूया जीवन सारे ।।

…………तर श्री. शरद पवारांच्या आधी राज ठाकरे कदाचित पंतप्रधानही होतील.

मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव राज ठाकरे यांना कळत नसेल, असे नाही. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. मुंबईतील घुसखोर मुसलमानांना बांगलादेशात पळवून लावायचे, एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, तरी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल.

 

राज अटकेचे राजकारण हिंदूंच्या हिताचे नाही !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी पहाटे
रत्‍नागिरीत अटक केली. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. `अटक करून दाखवण्याचे आव्हान’ श्री. ठाकरे यांनी सरकारला दिले होते. मुख्यमंत्री देशमुख यांनी ते आव्हान स्वीकारले. `महाराष्ट्र पेटेल’, असे श्री. ठाकरे म्हणाले होते. पहिल्या दिवशी तरी तो पेटला नाही. म्हणून श्री. ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे महत्त्व किंचितही कमी होत नाही. उलट अनेकांची श्री.ठाकरे यांनी पंचाईत केली आहे. एकंदरीत जे राजकारण चालले ते मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या हिताचे नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

केंद्र शासनाच्या दडपणामुळेच राज ठाकरे यांना अटक
रेल्वे मंडळाच्या वतीने गेल्या रविवारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या
अन्य काही भागांत नोकरभरती करण्याच्या दृष्टीने काही परीक्षा घेण्यात आल्या, तशा परीक्षा होणार असल्याच्या जाहिराती बिहारच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या; पण महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या नाहीत, असे मनसेचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठी मुलांना या परीक्षांना बसता आले नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे चिडून परीक्षाकेंद्रावर हल्ला केला. काही विद्यार्थ्यांना चोप बसला. परीक्षांना बसता आले नाही. साहजिकच रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आगपाखड करून श्री. ठाकरे यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. लोकसभेत चर्चा झाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अंगात राक्षस संचारला असून दिसेल त्या परप्रांतियाला झोडून काढले जात आहे आणि त्यांना जगणं अशक्य झाले आहे, असे चित्र उभे केले गेले. परिणामी सर्व बाजूंनी दडपण वाढले. ठाकरे यांना अटक करण्यावाचून देशमुखांसमोर दुसरा पर्याय राहिला नाही.
ठाकरे यांचे राजकारण योग्य कि अयोग्य हा मुद्दा नाही. श्री. ठाकरे यांचे आंदोलनाचे विषय बरोबर आहेत. त्यासाठी त्यांनी निवडलेली वेळ योग्य नाही. त्यांच्या राजकारणामुळे हिंदूंमध्ये फूट पडत असून मुख्य शत्रू जो इस्लामी आतंकवाद त्याचे काय करायचे, हा प्रश्‍न तसाच अनिर्णित राहिला आहे.

मराठ्यांवरील अन्यायाची दाद मागणे म्हणजे संकुचितपणा
रेल्वे बोर्ड मराठी माणसावर अन्याय करते, हे उघड आहे. लालूप्रसाद
यादव रेल्वेमंत्री झाल्यापासून बिहारी माणसांची भरती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे, हे खरे आहे; परंतु याविरुद्ध महाराष्ट्रात निवडून गेलेल्या खासदारांना आवाज उठवता आला असता. मुख्यमंत्र्यांना नियोजन मंडळाकडे दाद मागता आली असती; परंतु मराठी माणसावरील अन्यायाची दाद मागणे म्हणजे संकुचितपणा आहे, असे खासदारांना वाटते. म्हणून बेळगावात कर्नाटक सरकारकडून गेली ५० वर्षे मराठी माणसावर सतत अन्याय होत आहे. त्याविरूद्ध मराठी खासदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कधी आवाज उठवल्याचे ऐकलेले नाही. म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोनचार बिहारींना चोप दिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. आपली पहिली मागणी श्री. ठाकरे यांना धडा शिकवा, अशी असते. मराठी माणसावरील अन्याय दूर झाला पाहिजे, असा मराठी माणसांचा सामूहिक आवाज उठत नाही.

प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना खलनायकाच्या रूपात उभे केले दुकानाच्या पाट्या मराठीत पाहिजेत, हा विषय वास्तविक महापालिकेच्या कार्यवाहीचा आहे. तसे नियम आहेत. निर्बंध आहेत. महापालिकेने आग्रह धरला नाही म्हणून मनसेला आग्रह धरावा लागला; परंतु मराठीत पाटी लिहायला सांगणे म्हणजे धर्मांतर करायला सांगण्याइतके गंभीर आहे, असा अर्थ प्रसारमाध्यमांनी लावला, आणि कारण नसतांना खलनायकाच्या रूपात राज ठाकरे यांना उभे केले गेले.

मराठी माणसाच्या एकजुटीवर वैचारिक गोंधळाचा परिणाम
श्री. ठाकरे अशा मुद्यांवर आंदोलन उभे करतात, तेव्हा सर्वसामान्य मराठी
माणसाला ते मुद्दे पटलेले असतात आणि या मुद्यांना पाठिंबा द्यावा, असेच त्याला वाटत असते; परंतु त्याची निष्ठा यापूर्वी त्याने शिवसेनेला वाहिलेली असल्याने शिवसेनेला अव्हेरून तो स्वतंत्र भूमिका घेत नाही. काही वेळा शिवसैनिकांचे मन राज ठाकरे यांच्याबरोबर तर शरीर श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असते. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती द्विधा होते. तेवढ्या प्रमाणात मराठी माणसाच्या एकजुटीवर या वैचारिक गोंधळाचा परिणाम होतो. श्री. राज ठाकरे आंदोलनासाठी जे मुद्दे घेतात, ते मुळचे आमचे मुद्दे आहेत, असे म्हणून शिवसेनेचे नेते राजच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्‍न करतात; परंतु अशी हवा काढता येत नाही. कारण मुद्दे कोणाची खाजगी `प्रॉपर्टी’ नसते. उद्या समान नागरी संहितेचा मुद्दा काही कारणाने काँग्रेसने मांडायचा ठरवल्यास तर तो आमचा मुद्दा आहे. तुम्ही मांडू शकत नाही, असे भाजप काँग्रेसला म्हणू शकत नाही. उलट आपला मुद्दा काँग्रेसने घेतला, हा भाजपने आपला विजय मानला पाहिजे. काँग्रेस तसे करत असते. उदा. सावरकरांचा अखंड हिंदुस्थानचा मुद्दा इतका उचलून धरला की, १९४६ च्या सार्वजनिक निवडणुकीत काँग्रेसने अखंड हिंदुस्थानला पाठिंबा देऊन त्या मुद्यावर निवडणुका लढवण्याचे ठरवले. काँग्रेसने अखंड हिंदुस्थानच्या मुद्यावर लढायचे ठरवले म्हणून लोकांना इतका आनंद झाला की, त्यांनी काँग्रेसला बहुमताने निवडून दिले. सत्तेवर येताच वर्षाच्या आत काँग्रेसने फाळणीला पाठिंबा दिला आहे आणि लोकांना फसवले. तशी फसवणूक राजने करू नये, असे वाटत असेल, तर शिवसेनेने सावध रहावे; पण आमचे मुद्दे उचलू नका, असे म्हणू नये.

उत्तरप्रदेशीय लोकांची मते पदरात पाडणे, हा काँग्रेसचा डाव
शिवसेना ही शक्‍ती आहे. या शक्‍तीचा आधार घेऊन भाजप महाराष्ट्रात
सत्ता संपादन करू शकतो. काँग्रेसच्या विशेषत: शरद पवारांचा राग भाजपवर आहे. भाजपला उखडून टाकण्यासाठी ते शिवसेनेला दुर्बळ करणार आहेत. शिवसेनेला दुबळी करण्यासाठी ते राज ठाकरे यांचा वापर करणार आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि आपण उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव आहे. तो राज ठाकरे यांना कळत नसेल असे नाही. पण संघटना चलवण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे आणि तेवढा पैसा त्यांना केवळ शरद पवार देऊ शकतात, अशी त्यांची समजूत आहे.

राज ठाकरे यांनी देशहितासाठी मराठी मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवून बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्‍न प्रथम हाती घ्यावा

यावर उपाय म्हणजे मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला पाहिजे. व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहीजे. मुंबईत घुसलेले बांगलादेशी मुसलमान यांना बांगलादेशात पळवून लावायचे एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, तरी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल, लोक या आंदोलनाला वाटेल तेवढा पैसा उपलब्ध करून देतील आणि मराठी माणसात फूट पडणार नाही. राष्ट्रीय कर्तव्यकर्म केल्याचे पुण्य श्री. ठाकरे यांना मिळेल. दुकानच्या पाट्या मराठीत लिहिण्यापेक्षा दोनचार नोकर्‍या पदरात पाडून घेण्यापेक्षा बांगलादेशी मुसलमानांना मुंबईबाहेर बांगलादेशात हाकलून देण्याचा मुद्दा सर्वांना पटणारा आहे. मुंबईचे गुजराती, दाक्षिणात्य, उत्तरप्रदेशी इत्यादी सगळयांना या मुद्याला पाठिंबा द्यावाच लागेल. जे पाठिंबा देणार नाहीत ते उघड्यावर पडतील. उदा. समाजवादी पक्षाचे अमरसिंग बांगलादेशी मुसलमानांविरूद्ध बोलणार नाहीत. त्या वेळी जया बच्चन, शबाना आझमी, तिस्ता सेटलवाड आणि महेश भट काय करतील, ते पहाणे मनोरंजक ठरेल.
म्हणून श्री. राज ठाकरे यांनी देशहितासाठी मराठी माणसाचे मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवून बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्‍न प्रथम हाती घ्यावा. त्यानंतर आपोआप इस्लामी आतंकवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी तरुण त्यांच्या भोवती गोळा होतील. त्यात ते यशस्वी झाले, तर श्री. शरद पवारांच्या आधी ते कदाचित पंतप्रधानही होतील.

 

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

चिक्कमगळूरच्या दत्तपिठात पूजा सुरू

हिंदूंच्या दीर्घ आंदोलनाला यश !

हिंदूंनो, धर्मरक्षणाच्या आंदोलनात मिळालेल्या या यशाबद्दल ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्‍त करा !
चिक्कमगळूर (कर्नाटक) – आश्‍विन पौर्णिमा, शके १९३० म्हणजे १४ ऑक्टोबर २००८ या दिवशी जिल्ह्यात असलेल्या चंद्रद्रोण पर्वतावरील दत्तपिठात हिंदूंना पूजा करायला कर्नाटक सरकाराने परवानगी दिली. या वेळी एक हजार दत्तभक्‍त एकत्र आले व त्यांनी दत्तपिठात वैदिक पद्धतीनुसार पूजा केली. या पूजेच्या वेळी प.पू. सद्‌गुरु स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज (श्री समर्थ श्रीधर आश्रम, बेंगळुरू), श्रीमहंत श्रीजमुनापुरीजी महाराज (काशी) व विजापूरच्या आंदोल मठाचे पूज्य श्री सिद्धलिंगस्वामी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या ५० कार्यकर्त्यांचा सहभाग होता. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद प्रभु व त्यांच्या धर्मपत्‍नी सौ. प्रतिमा प्रभु यांनी पूजा केली. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मे २००७ पासून दर पौर्णिमेला दत्तपिठात पूजा करायचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करत होते. त्याप्रमाणे १४.२.२००८ रोजी उच्च न्यायालयाने दत्तपिठात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार समितीने दर पौर्णिमेच्या दिवशी सातत्याने १५ वेळा पूजा करण्याचा प्रयत्‍न केला. `श्री गुरुदत्तपीठ संवर्धन समिती’ने १९७८ पासून कायद्याला अनुसरून आखलेल्या मोहिमेला अखेर यश मिळाले आहे.

 

  निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

रंधा (जिल्हा जळगाव) येथे एका रात्रीत देवीच्या मूर्तीची तोडफोड करून तेथे दर्गा उभारला !

दिवाळीच्या शुभदिनी हिंदूंसाठी काळी बातमी !

रंधा (जिल्हा जळगाव), २५ ऑक्टोबर – रंधा (तालुका रावेर) येथील आदिवासींच्या देवतेची मूर्ती तोडून मुसलमानांनी रातोरात दर्गा उभारल्याची घटना नुकतीच घडली.

(महमद गझनीने जशी हिंदूंची देवळे नष्ट करण्याचा सपाटा लावला होता, तशीच स्थिती आता येत असल्याची ही घटना द्योतक आहे ! तेव्हा दिवस नव्हे, तर रात्रही वैर्‍याची आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे व जागरूक रहावे ! – संपादक) या प्रकरणी सरपंचासह आठ व्यक्‍तींना अटक करण्यात आली. तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रंधा गावात बंजारी समाजाचे `दुर्गा नाईक’ हे देवीचे देऊळ आहे. सततच्या दुष्काळामुळे गावकरी हे गाव सोडून गेले; पण दरवर्षी दसरा व दिवाळीच्या वेळी या देवीच्या उत्सवासाठी बंजारा एकत्र येतात. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी येथील हुसेन तडवी, गुलजार तडवी, नजीर तडवी, यांच्यासह २० ते २५ व्यक्‍तींनी या देवीच्या मूर्तीची तोडफोड करून ती फेकून दिली व त्या ठिकाणी असलेले भगवे झेंडेही काढून फेकले. (हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या वेळी दंगे करून त्यांना भीतीच्या वातावरणात ठेवणे, हाच एककलमी कार्यक्रम मुसलमान राबवत आहेत ! – संपादक) लगोलग त्या ठिकाणी पीरबाबाचा दर्गा तयार करण्यात आला व त्यावर हिरवी चादर चढवण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आणि आठ व्यक्‍तींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुसलमानी अंमल व आताची स्थिती

 

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा

… तर काँग्रेसवाल्यांनो, आम्ही आमच्या अटकेची वाट पहात आहोत !

सनातनवर बंदी आलीच तर हिंदूंमध्ये वैचारिक क्रांतीचा उन्माद निर्माण होईल !

महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारला सनातनच्या साधकांचे अनावृत्त पत्र

प्रती,
काँग्रेस सरकार,
महाराष्ट्र.

मागील महिन्यापासून आपण सनातनवर बंदी आणण्याचा अटोकाट प्रयत्‍न करत आहात. त्यामुळे कदाचित आपण नंतर आम्हा साधकांना आपल्या अंधार्‍या कोठडीची हवा (तेथे असते का, हा प्रश्‍नच !) खायला लावाल; पण काँग्रेसवाल्यांनो, त्यामुळे `सनातन प्रभात’ने सांगितल्याप्रमाणे तुमची शंभर पापे भरणार आहेत, त्यामुळे तुमचा नायनाट होऊन पुढील कित्येक पिढ्या वाचणार आहेत, सध्याचे तुमचे हे तथाकथित निधर्मी राज्य जाऊन धर्माधिष्ठित राज्याची स्थापना करण्यासाठी ईश्‍वर अवतार घेणार आहे, तर आम्ही आमच्या अटकेची वाट पहात आहोत.

आमचा आदर्श आहे, महर्षी दधिचींचा, वीर सावरकर व भगतसिंग यांचा… !
काँग्रेसवाल्यांनो, आमच्यापुढे आदर्श आहे, महर्षी दधिचींचा ! दधिचींनी असुरांचा नाश करण्यासाठी इंद्राला शस्त्राची आवश्यकता असतांना स्वत: देहत्याग करून आपली हाडे वज्र तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. आमच्यापुढे आदर्श आहे, वीर सावरकर व भगतसिंग यांचा ! त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, या हिंदुस्थानात स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली. आमच्यापुढे आदर्श आहे, आमच्या सद्‌गुरूंचा ! ज्यांनी साधकांना होणारे अनिष्ट शक्‍तींचे त्रास स्वत:च्या अंगावर झेलले व साधकांचे रक्षण केले.

काँग्रेसवाल्यांनो, आमची तयारी आधीच झाली आहे !
आपण म्हणाल, `बोलणे सोपे असते. एकदा पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यावर कळेल.’ काँग्रेसवाल्यांनो, कारावासात तुमचे पोलीस साधकांना फोडून काढतील. त्यामुळे आमचे हाडन्हाड दुखेल; प्रसंगी आमच्या अंगातून रक्‍तही पडेल. कारागृहातील जेवणात किडे, अळया आदींचा कचरा असेल. त्यामुळे साधकांना `जेऊ नये’, असे वाटेल. कारागृहातील शौचालये बांधल्यापासून कोणीही स्वच्छ न केल्याने तुंबलेली असतील व त्यांची दुर्गंधी कारागृहात पसरलेली असेल. त्यामुळे साधकांना किळस येऊन रात्रंदिवस झोप लागणार नाही; परंतु काँग्रेसवाल्यांनो, हे त्रास आम्ही साधक कितीतरी वर्षांपासून अनुभवत आहोत. अनिष्ट शक्‍तींच्या तीव्र त्रासांमुळे साधकांना हाडे दुखणे, घरात रक्‍ताचे डाग पडून विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होणे, सुग्रास जेवण समोर असूनही ते `जेवू नये’, असे वाटणे, अगदी चांगली स्वच्छता असतांनाही दुर्गंध येणे, कित्येक रात्री झोप न लागणे, प्राणशक्‍ती कमी होणे, साधक बेशुद्ध होणे असे कितीतरी प्रकारचे गंभीर त्रास आम्हा साधकांना यापूर्वीच झाले आहेत. या सर्व त्रासांतही आमच्या सद्‌गुरूंनी आम्हाला आनंदात ठेवले. इतक्या गंभीर त्रासांची अगदी थोडीच झळ साधकांना भोगायला सांगून बहुतांश स्वत: झेलली. एकीकडे दुर्गंध येत असतांनाच ईश्‍वरी तत्त्वामुळे साधकांना तेथे सुगंधही अनुभवता आला. काँग्रेसवाल्यांनो, हाच भाग तुमच्या कारागृहातही होईल. `आमचा ईश्‍वर साधकांची काळजी घेईलच घेईल’, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे `आमची तयारी आधीच झाली आहे’, असे समजा !

आम्ही तेथेही साधनाच, म्हणजे धर्मप्रसारच करू !
राहिला प्रश्‍न साधकांच्या साधनेचा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला देवाधर्माचे करणारे लोक आवडत नसल्याने कदाचित तुमच्या पोलीस अधिकार्‍यांनी तुम्हाला सांगितले नसेल; पण तुमच्या एक-दोन कारागृहात आमचे सत्संगही चालायचे हो ! पोलिसांसाठी वेगळे व कैद्यांसाठी वेगळे असे सत्संगही आम्ही साधकांनी घेतले. त्यामुळे बराच लाभ झाल्याची प्रतिक्रियाही त्या वेळी पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली होती. काँग्रेसवाल्यांनो, तुमच्या तथाकथित निधर्मीवादामुळे तुम्ही हिंदु पोलिसांना कायमच पाण्यात पहाता. त्यामुळे पोलिसांवर कायमच ताण असतो. सत्ता तुमच्या हातात असल्याने ते काही करू शकत नाहीत. तुमच्या हिटलरशाहीमुळे जे निराश होतात, ते आत्महत्या करतात; पण जे देवावर श्रद्धा ठेवणारे असतात, ते सनातनसारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून मनाची स्थिरता टिकवून ठेवतात. काँग्रेसवाल्यांनो, असेच सत्संग आम्ही कारागृहातही घेऊ. त्यामुळे तुम्हाला `पोलिसांवरील ताण कमी करण्याचे’ कधीही न जमलेले कामही होईल. एकप्रकारे तुम्हाला मदतच होईल ना ! काँग्रेसवाल्यांनो, वीर सावरकरांनी हिंदु कैद्यांचे कारागृहात होणारे धर्मांतर रोखले होते. आम्ही कैद्यांना धर्मशिक्षण देऊन तेथे त्यांच्यात खरे हिंदुत्व, म्हणजेच साधकत्व निर्माण करण्याचा प्रयत्‍न करू, म्हणजे तुमच्या कारागृहातही साधनाच करू.

`केला पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरी ती वरती उफाळे’ या उक्‍तीप्रमाणे `सनातनवरील बंदी’ हीच वैचारिक क्रांतीची ठिणगी ठरेल !
काँग्रेसवाल्यांनो, भगतसिंगादी क्रांतीवीरांच्या अटकेनंतर क्रांतीची ज्वाला आणखी धगधगली. त्यातून होरपळल्याने गोर्‍या इंग्रजांना देश सोडून पळावे लागले, तसे काँग्रेसवाल्यांनो, सनातनच्या साधकांना अटक झाल्यानंतर हिंदूंमध्ये निश्चितच वैचारिक क्रांती करण्याचा उन्माद निर्माण होईल. त्यामुळे येत्या निवडणुकीत काळया इंग्रजांना, म्हणजेच तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, हे सत्य जाणा !

काँग्रेसवाल्यांनो, साधकांच्या संघटित त्यागातून ईश्‍वरी राज्य निश्चितच येईल !
त्रेतायुगात राम वनवासाला निघाला असतांना त्याने राक्षसांनी खाल्लेल्या लाखो ऋषीमुनींच्या हाडांचे डोंगर पाहिले. त्यानंतर त्याने राक्षसांना नायनाट करून रामराज्य स्थापले. द्वापारयुगात श्रीकृष्णाने कंस, चाणूर, शिशुपाल, कौरव आदी असुरांच्या अपराधांचा घडा भरल्यानंतर महाभारत घडवले व धर्मराज्याची स्थापना केली. तसे काँग्रेसवाल्यांनो, कलीयुगात साधकांच्या संघटित त्यागातून ईश्‍वरी राज्य येईल, हे सुनिश्चित आहे. जितक्या लवकर तुम्ही आमच्यावर बंदी आणाल, तितक्या लवकर तुमची पापे भरतील व ईश्‍वर अवतार घेईल. आम्ही ईश्‍वरी अवताराचीच वाट पहात आहोत.

आम्ही प्रार्थना करतो विश्‍वमांगल्याची !
काँग्रेसवाल्यांनो, आम्ही साधक आहोत. आम्हाला तुमचे राज्य नको. आमचे ध्येय ईश्‍वरप्राप्‍ती आहे. आम्हाला ईश्‍वरी राज्य हवे आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासारखा खलनायकी विचार करू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही नेहमी संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांप्रमाणे विश्‍वमांगल्याची प्रार्थना करतो,
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।।
भुता परस्परे जडो । मैत्र्य जिवांचे ।।
दुरितांचे तिमीर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ।।
जो जे वांछील, तो ते लाहो । प्राणीजात ।।

- सनातनचे हजारो साधक

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!