छत्रपतीद्रोही वन खाते म्हणते, `शिवाजीने विश्‍वासघाताने अफजलखानाचा खून केला !

शिवरायांना विश्‍वासघातकी म्हणून इतिहास बदलायला निघालेल्या वन खात्याचा निषेध !

हिंदूंनो, प्रथम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारच्या पोलीस खात्याने
अफझलखानाच्या वधाच्या देखाव्यावर बंदी घातली. आता याच सरकारचा वन विभाग छत्रपती शिवरायांना विश्‍वासघातकी म्हणत आहे. लवकरच काँग्रेस सरकार छत्रपती शिवरायांना खलपुरुष ठरवून अफझलखानाचा उदोउदो करण्यास सुरुवात करील. अशा काँग्रेसचा राजकारण व समाजकारण या क्षेत्रांवरील प्रभाव शून्य होण्यासाठी दररोज १० मिनिटे प्रार्थना आणि नामजप करा !

पुणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा वन विभागाने राज्यशासनाला पाठवलेल्या एका अहवालात `शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाचा खून केला’, असे लिहिले आहे, ही गंभीर बाब माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आली आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातीलच वन विभाग छत्रपतींचा एकेरी उल्लेख करतो व छत्रपतींच्या शौर्याचा उपमर्द करतो, हे पाहून या महाराष्ट्रावर राज्य करणारे अफझलखानाचे वंशज आहेत का, असा प्रश्‍न हिंदूंना पडल्यास नवल वाटायला नको ! – संपादक) याबाबतची माहिती प्रतापगड उत्सव समितीचे श्री. मिलिंद एकबोटे, श्रीमती विजयाताई भोसले, अखिल भारतीय मराठा विकास परिषदेचे अध्यक्ष कर्नल जयवंतराव बाजी-मोहिते यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रतापगड उत्सव समितीचे श्री. राज यादव, लाल महाल उत्सव समितीचे श्री. चंद्रशेखर शिंदे आदी धर्माभिमानी उपस्थित होते. प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवतीच्या अनधिकृत बांधकामांबाबत राज्यशासनाने महसूल खाते व वन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला होता. त्यानुसार वन विभागाने पाठवलेल्या अहवालात सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. या वेळी श्री. एकबोटे म्हणाले, “महाराष्ट्रावर वार करणार्‍या अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा शिकवला, हा इतिहास आहे. असे असतांना छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणे व `शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाचा खून केला’, असे म्हणणे, हे सरकारच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. शासनाने सरकारी कागदपत्रांवर शिवाजी महाराजांना अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवणे, ही निषेधार्ह व लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे एकीकडे अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा उभा करायला निघालेल्या व दुसरीकडे त्याच शिवरायांना खुनी ठरवणार्‍या सरकारचा निषेध कसा करायचा, ते आता जनतेनेच ठरवावे.”
कर्नल जयवंतराव बाजी-मोहिते यांनीही शासनाचा निषेध केला. ते म्हणाले, “शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाचा खून केला’, असे म्हणणे हे आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. इतिहासाचा विपर्यास करणार्‍या सरकारला याबाबत जनतेने जाब विचारणे आवश्यक आहे.” श्रीमती विजयाताई भोसले यांनीही सरकारचा निषेध करून आपण अनेकदा मागूनही सदर अहवाल आपल्याला देण्यात टाळाटाळ करण्यात आली, असे सांगितले.
या अहवालात `शिवाजीने अफझलखानाचे डोके जाळले’, अशा आशयाचाही मजकूर आहे, असे सांगून श्री. एकबोटे म्हणाले, “अफझलखानाचे धड प्रतापगडाच्या पायथ्याशी पुरण्यात आले आणि त्याचे डोके जिजामातांना दाखवण्यासाठी राजगडावर पाठवण्यात आले, हा इतिहास आहे. यावरून सरकारचा इतिहास किती कच्चा आहे, हे स्पष्ट होते.”

वन विभागाचा अहवाल इंग्रजीतून !
वन विभागाने राज्यशासनाला पाठवलेला अहवाल हा इंग्रजीतून असल्याचेही उघडकीस आले आहे. (काँग्रेस सरकारचे अक्षम्य अपराध ! – संपादक) माहितीच्या अधिकाराखाली वरील मान्यवरांनी मिळवलेल्या सदर अहवालाच्या प्रती इंग्रजीतून आहेत. त्यामुळे एकीकडे सबंध राज्यकारभार मराठीत करायला निघालेल्या सरकारला
त्याच्याच इंग्रजाळलेल्या वन विभागाबाबत काय म्हणायचे आहे, असा प्रश्‍न मराठीप्रेमींकडून उपस्थित करण्यात आला आहे.

 

  निगडीत वृत्त : इतिहासद्रोही राज्यकर्ते

गोध्रा हत्याकांडाचा कट मुसलमानांचाच !

नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी पूर्णत: निर्दोष !

गांधीनगर, २५ सप्टेंबर (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) – साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळण्याची घटना हा पूर्वनियोजित कट होता व तो मौलवी उमरजी याने रचला होता, असे नानावटी आयोगाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

 

(मुसलमान हे हिंदूंच्या जिवावर उठले आहेत, हे या अहवालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. – संपादक) गोध्रा हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी.टी. नानावटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. आज आयोगाने त्याचा पहिला अहवाल विधानसभेमध्ये सादर केला. हा अहवाल सादर होताच काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. (हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसकडून यापेक्षा आणखी कसली अपेक्षा करणार ? – संपादक) गोध्रा हत्याकांड घडवून गुजरातमध्ये दहशत पसरवणे व प्रशासन खिळखिळे करण्याचा मौलवी व त्याच्या सहकार्‍यांचा डाव होता. गोध्रा हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या दंगली यांमधील पीडितांना संरक्षण देण्यास अथवा त्यांचे पुनर्वसन करण्यास मोदी सरकार कुठेही कमी पडले नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचनांप्रमाणेच दंगलग्रस्तांचे पुनर्वसन झाले, असेही आयोगाने म्हटले आहे. साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यासाठी १४० लीटर पेट्रोल वापरण्यात आले, असे आयोगाने स्पष्ट केले. साबरमती एक्स्प्रेसचे सर्व डबे पेटवण्याचा मुसलमानांचा कट होता; मात्र ही योजना यशस्वी झाली नाही. गोध्रा हत्याकांडामध्ये ५९ जण ठार झाले होते. रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यु.सी. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. “गोध्रा हत्याकांड हा घातपात नसून अपघात होता”, असा अहवाल या समितीने सादर केला होता. नानावटी आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर न्या. बॅनर्जी यांनी गोध्रा हत्याकांड हा घातपात नसून अपघात होता, याचा पुनरुच्चार केला. (निवळ मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी लालूप्रसाद यादव यांनी बॅनर्जी यांना हाताशी धरून त्यांना हवा तसा अहवाल तयार करून घेतला, हे अनेक मुद्यांवरून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. – संपादक)

नानावटी आयोगाने दिलेले दाखले
१. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत लालू व महंमद लतिका यांनी एस् ६ व एस् ७ या डब्यांचे दरवाजे उघडले. एस्-६ डब्यामध्ये हसन लालू याने आग लावली. मौलवी उमरजी याने साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्याचा कट रचला व त्यामध्ये रज्जाक कुरकूर, सलीम पानवाला, शौकत अली, इम्रान शेरी, रफीक बटूक व सिराज बाला हे सहभागी झाले होते.
२. साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळल्यानंतर मुसलमानांनी १० ते २० मिनिटे दगडफेक केली व डब्यातील प्रवाशांना बाहेर येण्यापासून मज्जाव केला, अशी साक्ष गाडीतील प्रवाशांनी दिली.
३. रज्जाक कुरकूर व सलीम पानवाला यांनी गाडीला आग लावण्यासाठी १४० लीटर पेट्रोल खरेदी केले.
४. गोध्रा येथील अमन गेस्ट हाऊसमध्ये साबरमती एक्स्प्रेस जाळण्याचा कट रचण्यात आला.

हिंदुद्वेष्ट्या काँग्रेससह माकप व तिस्ता सेटलवाड यांना पोटशूळ !
नवी दिल्ली – नानावटी आयोगाने सादर केलेल्या अहवालावर काँग्रेसने नाराजी व्यक्‍त केली. “नानावटी आयोग ज्या परिस्थितीत स्थापन करण्यात आला, अहवाल सादर करण्यासाठी तारखांवर तारखा वाढवण्यात आल्या, अनेक साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या, या सर्व गोष्टींमुळे अहवालाच्या निष्कर्षांबद्दल मनात संशय निर्माण होतो”, असे काँग्रेसचे प्रवक्‍ते श्री. अभिषेक सिंघवी यांनी सांगितले. हा अहवाल म्हणजे फार्स आहे, असे वक्‍तव्य तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या व मुसलमानांच्या पाठीराख्या श्रीमती तिस्ता सेटलवाड यांनी केले. “पुढील निवडणुकांवर लक्ष ठेवून मते मिळवण्यासाठी भाजपने हा कट रचला आहे”, असे त्या म्हणाल्या. “नानावटी आयोगाने सादर केलेला अहवाल हा पक्षपाती आहे. या आयोगाच्या निष्कर्षांना विरोध करणार”, असा कांगावा माकपचे श्री. गुरूदास दासगुप्‍ता यांनी केला.