आत्मा विक्रीचे दलाल : करण थापर

हिंदूंचे आत्मे ख्रिस्त्यांना विकून विहिंपला वनवासात पाठवू इच्छिणार्‍या थापर यांना हद्दपार करा !

स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अत्यंत क्रूर अत्याचार होत असतांनाही छत्रपती संभाजी राजे यांनी धर्म बदलला नाही. धर्म बदलणे म्हणजे आत्मा विकणे. टिपू बळाचा वापर करून जबरदस्तीने धर्मांतर करण्यात कुख्यात होता. त्याचा पराभव करणारे मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी टिपू लढाईत हरल्यानंतर भेदरलेल्या त्याच्या मुलाला जवळ घेऊन धीर दिला. त्याचे धर्मांतर करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. धर्मावर आघात झाला, तरच हिंदु धर्माच्या रक्षणासाठी बळाचा वापर करतात, धर्म वाढवण्यासाठी नव्हे. ओरिसामध्ये वनवासींच्या आत्म्यांचे रक्षण करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषद धडपडत आहे; परंतु करण थापर यांच्यासारखे हिंदूंच्या आत्म्यांचे दलाल मात्र वनवासींचे आत्मे ख्रिस्त्यांना विकून विहिंपला वनवासाला पाठवण्याची इच्छा बाळगत आहेत. करण थापर यांच्यासारख्यांचा शासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा !

 

छ. संभाजी राजे आणि हिंदु धर्माभिमान !
हिंदुस्थान टाइम्सच्या ३१ ऑगस्टच्या अंकातील करण थापर यांच्या `हू इज दि रियल हिंदू’ या लेखातील पहिल्या तीन परिच्छेदांचा समाचार गेल्या लेखात आपण घेतला. मला माझा आत्मा विकायचा असेल, जुने देव काढून त्या स्थानी नवे देव आणायचे असतील, तर तुम्ही मला विचारणारे कोण, असा प्रश्‍न श्री. थापर यांनी विचारला होता. माणूस पारतंत्र्यात असतो, तेव्हा अनेक वेळा आत्मा विकून दिवस काढावे लागतात. माणूस स्वतंत्र होतो, तेव्हा त्याचा आत्मा सुरक्षित रहातो. मोगलांच्या काळात आणि ब्रिटीश राजवटीत सर्वांत मोठा आघात हिंदूंच्या आत्म्यावर झाला. एका लढाईत पराभव होऊन भूमी सोडावी लागली, तर दुसर्‍या लढाईत विजयी होऊन गेलेली सर्व भूमी परत मिळवता येते; परंतु आपल्या पत्‍नीवर बलात्कार होतो, आपल्या तोंडात गोमांस कोंबले जाते, मुलांना भिंतीत चिरडून मारले जाते, तेव्हा आत्म्यावर होणारे आघात कधीही पुसले जात नाहीत. तू मुसलमान होतोस का, असा प्रश्‍न औरंगजेबाने संभाजीला विचारला, तेव्हा खरे म्हणजे `तू मला तुझा आत्मा विकत देतोस का’, असा प्रश्‍न त्याला संभाजीला विचारायचा होता. संभाजी जर हो म्हणाला असता, तर वाटेल त्या भावाने औरंगजेबाने त्याचा आत्मा विकत घेतला असता; पण आत्मा ही विकायची वस्तू नाही, असे संभाजीला जगाला दाखवून द्यायचे होते. त्यांनी आपले डोळे फोडून घेतले, जीभ कापून घेतली, औरंगजेबाने त्यांची व्रतडी सोलून काढली; पण संभाजीने आपला आत्मा विकला नाही. आपण हिंदु असतांना जीव वाचवण्यासाठी मुसलमान धर्माचा स्वीकार करणे म्हणजे आत्मा विकणे होय, असे संभाजीला वाटले. आपल्या अस्मितेचा त्याग करणे म्हणजे आत्मा विकणे होय. सर्वसाधारणपणे आपण ज्याचा त्याग करत नाही, ते बळाने वा प्रलोभनाने सोडून देणे म्हणजे आत्मा विकणे होय. ज्यांना आपण आत्मा विकणार आहोत, ते लोक आपल्या वाईटावर आहेत, हे माहीत असतांनाही त्यांना आपला आत्मा विकण्याची पाळी येणे, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट जगात नाही, असे हिंदु मानतो.

धर्मावर जेव्हा घाला आला, तेव्हाच त्याच्या रक्षणार्थ हिंदूंनी बळाचा वापर केला !
हिंदु स्वत: आत्मा विकत नाही, तसा तो दुसर्‍यालाही विकू देत नाही आणि विकत घेतही नाही. खंडनमंडण करून आपले मत दुसर्‍याला पटवून देण्याची हिंदूंची पद्धती आहे. हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ऋषीमुनी बाहेर पडले, ते भगवी वस्त्रे परिधान करून आणि कमंडलू घेऊन. सर्व जगभर त्यांनी उदात्त विचारांचा प्रसार केला. चर्चा केली. बैठका घेतल्या. `कृण्वन्तो विश्‍वमार्यम’ ही घोषणा त्यांनी केली, तेव्हा त्यांचा स्वत:च्या तत्त्वज्ञानावर ठाम विश्‍वास होता. आपले तत्त्वज्ञान सर्वमांगल्यकारी असल्यामुळे ते लोकांना पटणारच आहे; त्यासाठी तलवारीचा उपयोग करण्याची आवश्यकता नाही. या विषयी ते निश्चिंत होते. तलवारीचा उपयोग हिंदूंनी धर्मप्रसारासाठी केला नाही. आपल्या धर्मावर जेव्हा घाला आला, तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी बळाचा वापर केला आणि शत्रूला पराभूत केले.
मराठ्यांनी टिपू सुलतानावर स्वारी करून त्याचा पराभव केला, तेव्हा मराठ्यांचा सेनापती हरिपंत फडके याला एका कोपर्‍यात टिपूचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत लपलेला सापडला. फडक्यांनी त्याची विचारपूस केली. धीर दिला. त्याच्यासाठी सुग्रास भोजन करायला लावले आणि ते त्याला जवळ बसवून भरवले. बळाचा वापर करून त्याला हिंदु करून घ्यावा, असा विचार मराठ्यांच्या मनात आला नाही. टिपू हा बळाने आणि क्रौर्याने हिंदूंना बाटवण्याविषयी कुख्यात होता. त्याचा पराभव मराठ्यांनी तलवारीने केला; पण त्याच्या अजाण मुलावर तलवारीचा उपयोग करावा, असे सेनापती हरिपंत फडक्यांना वाटले नाही.

हिंदूंच्या आत्म्याचे दलाल करण थापर यांसारख्यांचा शासनाने बंदोबस्त करावा !
ओरिसातील वनवासी हे लहान मुलासारखे आहेत. सगळा वनवासी समाज निरागस, निष्पाप फुलासारखा आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारक बळाने आणि प्रलोभनाने त्यांचा आत्मा विकत घेण्याचे कारस्थान रचतात. ते कारस्थान सरकारने हाणून पाडले पाहिजे; पण सरकार आपले कर्तव्य पार पाडत नाही. उलट आत्मा खरेदी व्यवहार सुलभपणे व्हावा; म्हणून सरकार ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अनुकूल परिस्थिती निर्माण करत असते. अशा परिस्थितीत त्या निरागस आणि निष्पाप वनवासींचे रक्षण करण्याचे काम विश्‍व हिंदु परिषद करत असते. वनवासींचा आत्मा अपवित्र वस्तूंच्या स्पर्शाने विटाळू नये, ही काळजी विश्‍व हिंदु परिषद घेते. वनवासींना आपल्या कुशीत घेतले नाही, तर गिधाडे त्यांचा चावा घेतील, तो आघात भारताच्या घटनेच्या सार्वभौमत्वावर होईल, हे विश्‍व हिंदु परिषदेला माहीत आहे; म्हणून वनवासींना विश्‍व हिंदु परिषदेने आपल्या पांघरुणात लपेटून घेतले आहे. तरीही या वनवासींना हिंदूंच्या संरक्षणापासून खेचून त्यांचे अपहरण करण्यासाठी गिधाडांची टोळधाड धावून आल्यावर त्यांच्यात आणि हिंदु संघटनात संघर्ष होणे अपरिहार्य आहे. त्या संघर्षात दोन-चार गिधाडांना मार पडणे, अटळ आहे. अशा वेळी ज्यांना गिधाडांविषयी सहानुभूती वाटते, अशा करण थापरसारख्या माणसांनी लक्षात घेतले पाहिजे की, मूळ मुद्दा वनवासींचे रक्षण करणे, हा आहे. त्यांना गिधाडांपासून संरक्षण हवे आहे. ते सरकार देणार नसेल, तर जनतेने दिले पाहिजे. विश्‍व हिंदु परिषद जे जनता जनार्दनाला हवे, ते काम करत आहे. भारतीय संविधान निरागस आत्म्यांचे, निरपराध जिवांचे रक्षण करण्यासाठी बनवले आहे. विश्‍व हिंदु परिषद घटनेला जे अपेक्षित ते काम करत आहे. करण थापर, गिधाडांपासून निरपराध जिवांचे रक्षण करणे म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा अपराध आहे, असा विचार फैलावत आहे. सरकारने गिधाडांपासून वनवासींचे रक्षण केले पाहिजे, असे मत थापर मांडत नाहीत. वनवासींना गिधाडांच्या स्वाधीन करावे आणि विश्‍व हिंदु परिषदेला वनवासाला पाठवावे; म्हणून त्यांनी लेखणी उचलली आहे. हिंदूंच्या आत्म्याचे करण थापरसारखे लोक दलाल आहेत. त्यांचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे. थापर यांच्या बाकीच्या मुद्यांचे धोकादायक स्वरूप पुढच्या आठवड्यात पाहू.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

कंधमल येथील हिंसेमागील सत्य !

ओरिसामधील हिंदूंचे धर्मांतर रोखणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ख्रिस्ती माओवाद्यांनी हत्या केली. या हत्येनंतर हिंदूंच्या भावनांचा उद्रेक झाला व त्यांनी ठिकठिकाणी चर्च व ख्रिस्त्यांची घरे पेटवली. या घटनेनंतर ख्रिस्तीधार्जिणी प्रसारमाध्यमे व तथाकथित निधर्मीवादी हिंदूंना दोषी ठरवत आहेत. ख्रिस्त्यांची पाठराखण करायला महेश भट्ट यांच्यासारखी काही मंडळीही पुढे सरसावली.

 



डिसेंबर २००७ सालीही ओरिसामध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांच्यावर ख्रिस्त्यांनी हल्ला केल्यानंतर तेथील हिंदूंनी ख्रिस्त्यांवर हल्ला केला होता. या सर्व प्रकरणांत हिंदूंची बाजू ऐकून घ्यायला मात्र कोणालाही वेळ नाही. हिंदू हे मुळात सहिष्णू. २००७ साली स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ते एवढे हिंसक का बनले, हे जाणून घेण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी श्री. पी.सी. डोग्रा यांनी कंधमलला भेट दिली होती. त्याबाबत त्यांचा `ऑर्गनायजर’मध्ये लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा अनुवाद येथे देत आहोत. हा लेख छापण्यामागे `जुन्या कबरी पुन्हा उकरून काढणे’, हा उद्देश नसून हिंदूंची सर्व बाजूंनी गळचेपी कशी केली जात आहे, हे दाखवायचे आहे. भारतात अल्पसंख्यांकांच्या मनाविरुद्ध जराजरी काही घडले, तरी ते हिंसाचार करतात. भारतातील निधर्मी नेते त्याला `स्वाभाविक प्रतिक्रिया’ म्हणत त्यांची बाजू घेतात. मात्र हिंदूंनी अन्यायाचा प्रतिकार केल्यानंतर त्यांना दोषी का ठरवले जाते, याचे उत्तर प्रसारमाध्यमे व निधर्मी राज्यकर्ते यांनी देणे आवश्यक आहे. मागील लेखात आपण कंधमल येथे झालेल्या हिंसाचारामागील धार्मिक कारण पाहिले. आज आपण त्यामागील सामाजिक स्वरूप पाहूया. (उत्तरार्ध)


दंगलींच्या मागील सामाजिक कारण !
आतापर्यंत आपण या दंगलींच्या पाठीमागील धार्मिक कारण पाहिले; आता आपण त्याच्या पलीकडे जायला हवे. `कोंद’ व `पणस’ या दोन जमातींमध्ये वारंवार होत असलेल्या भांडणाचे मूळ कारण धार्मिक नसून सामाजिक आहे. कंधमल जिल्ह्यात तेथील मूळ आदिवासी कोंद, हेच बहुसंख्येने आहेत. `पणस’ नावाच्या मूळच्या अनुसूचित जमातीतील लोकांनी धर्मांतर केले असून त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. पूर्वी अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या `पणस’ जमातीला मिळणारे फायदे आता त्यांना मिळत नाहीत. कंधमल जिल्ह्यात `कुई’ नावाची कोंदांची मातृभाषा जिल्ह्याची मुख्य भाषा आहे. धर्मांतर झालेले ख्रिस्ती `पणस’, हे हिंदु असलेल्या कोंदांच्या जवळ रहात असल्यामुळे ते देखील कोंदांची `कुई’ हीच भाषा बोलतात. या कारणांमुळेच `पणस’देखील त्यांची गणना अनुसूचित जमातींमध्ये होण्याची इच्छा ठेवतात. `पणस’ या बाटलेल्या जमातीमुळे आपल्या अधिकारांवर गदा येईल’, अशी भीती इतर अनुसूचित जाती-जमातींना वाटते. काँग्रेस सरकारने नेमलेल्या रंगनाथ आयोगाने बाटलेल्या दलित ख्रिस्त्यांची गणना अनुसूचित जातींमध्ये करण्याची शिफारस केली आहे. `पणस’ यांना अनुसूचित जाती व जमाती यांमध्ये समाविष्ट केले, तर आपल्या अधिकारांवर गदा येईल, अशी भीती इतर जमातींना वाटत आहे.

बाटग्या `पणस’ जमातीने सवलती मिळण्यासाठी केलेले खटाटोप !

आपल्याला अनुसूचित जातीचा दर्जा मिळण्यासाठी `पणस’ जमातीने एक क्लृप्‍ती लढवली. त्यांनी `ते `कुई’ (कुई ही कोंद यांची बोलीभाषा आहे) या अनुसूचित जमातीचे असल्याने सुविधा मिळाव्यात’, अशी जे.बी. पटनाईक सरकारकडे शिफारस केली.
१९८२ साली जे.बी. पटनाईक सरकारने `कुई’ला अनुसूचित जमाती म्हणून मान्यता मिळावी’, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली. २००२ साली या शिफारसीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली `कुई’, ही भाषा आहे व जमात नाही’, असे सांगत त्या काळी राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने ही मागणी फेटाळली. “पणस’ जमातीने त्यांच्या जातीचे नाव बदलून `कुई’ असे ठेवले. असे नामकरण करण्यासाठी कोणताही ऐतिहासिक किंवा मानववंशशास्त्रीय आधार नसल्यामुळे तसे करता येत नाही”, असे राज्य सरकारने म्हटले आहे. या निर्णयाच्या विरोधात `कुई जनकल्याण संघ’ ओरिसा उच्च न्यायालयात गेला. “या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालावे”, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला व याचिका रद्द केली. त्या वेळी तत्कालीन सरकारने `कुई ही भाषा असून जमात नाही”, याचा पुनरुच्चार केला. त्या वेळी `कुई जनकल्याण संघ’ ही संघटना परत न्यायालयात गेली. न्यायालयाने सरकारच्या महसूल विभागाकडे निर्णय सोपवला.

पणस यांच्या विरोधात कोंद समाजाने छेडलेले आंदोलन

अनुसूचित जातीचा दर्जा मिळवून सुविधा लाटण्याचा प्रयत्‍न करणार्‍या पणस जमातीच्या विरोधात कोंद समाजाने आंदोलन छेडले. २५ व २६ डिसेंबर २००७ रोजी त्यांनी खालील मागण्यांसाठी बंद पुकारला होता.
१. `कुई’ समाजाला अनुसूचित जमात म्हणणार्‍या संस्थेचे नोंदणीकरण रद्द करावे.
२. भूतपूर्व मंत्री पद्मनाभ बेहेरा यांनी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्‍न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात यावा.
३. केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेमार्फत आर्.के. नायक, (भारतीय प्रशासन सेवा (सेवानिवृत्त)आणि राज्यसभेचे काँग्रेसचे सदस्य) यांची तपासणी करण्यात यावी. नायक हे `फुलबनी कुई जनकल्याण संघा’चे संस्थापक आहेत. ही संस्था `पणस’ समाजाला अनुसूचित जमात म्हणून मंजूर करण्याकरिता कार्यरत आहे. नायक हे बाटगे ख्रिस्ती असूनही त्यांनी अनुसूचित जमातीच्या राखीव कोट्यातून भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला. भारतीय घटनेनुसार नायक यांनी धर्मांतर केल्यामुळे त्यांना अनुसूचित जातीच्या सुविधा मिळू शकत नाहीत. असे असतांनाही ते अनुसूचित जातीच्या कोट्यातून प्रशासकीय सेवेत रुजू झाले.
४. ज्या बाटलेल्या `पणस’ जमातीने स्वत: अनुसूचित जमातीचे असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले, त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी.
५. पणसांनी हडप केलेल्या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत देण्यात याव्यात.

बाटग्या `पणसां’कडून `कोंद’च्या जमिनी हडप

`पणसां’नी हडप केलेल्या जमिनी परत मिळाव्यात, यासाठी कोंद जमातीने बाराखोमातील न्यायालयात १३ याचिका दाखल केल्या.
२००१ साली न्यायालयाने कोंदांच्या बाजूने निकाल दिला व तहसीलदाराला आदिवासींच्या जमिनी त्यांना परत देण्याबद्दल स्पष्ट आदेश दिले; मात्र आजपर्यंत स्थानिक प्रशासन व पोलीस यांनी हे आदेश जुमानले नाहीत. आजमितीला बाराखोमातील २२ एकर, केलपाडातील ७ एकर, ठोसिगातील ५ एकर व इतर ठिकाणच्या आदिवासींच्या जमिनी चर्च व ख्रिस्ती यांनी हडप केल्या आहेत.

आदिवासींचे धर्मांतर हेच अशांतीचे कारण !

धर्मांतरविरोधी कायदा बनवणारे ओरिसा हे पहिले राज्य आहे. असे असूनही कंधमलमध्ये ख्रिस्त्यांची संख्या जोमाने वाढत आहे.
१९७० साली जिल्ह्यातील ख्रिस्त्यांची लोकसंख्या ६ टक्के होती. २००१ साली ती २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. धर्मांतराच्या विरोधात कार्य करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी धर्मांतराबद्दल खुल्या चर्चेसाठी आवाहन केले होते. त्यांच्या मतानुसार आदिवासीबहुल क्षेत्रात अशांतीचे हेच प्रमुख कारण आहे. “मी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सांगितले आहे की, धर्मांतर व ख्रिस्ती धर्मप्रसारकांना विदेशांतून मिळणारी मदत, या दोन कारणांमुळे कंधमलमध्ये धार्मिक दंगली उसळतात”, असे स्वामी लक्ष्मणानंदजी यांनी म्हटले होते.

ख्रिस्त्यांना विदेशातून मिळणार्‍या आर्थिक मदतीची चौकशी होणे आवश्यक
राज्य सरकारने ख्रिस्ती करत असलेल्या उपद्रवांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही कृती स्वागतार्ह आहे; पण ख्रिस्ती प्रचारकांना विदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीची तसेच तिच्या वापराची चौकशी होण्यासाठी एका समितीची नेमणूक होणेही गरजेचे आहे. दरवर्षी गृह मंत्रालयाला विदेशी स्वयंसेवी संस्थांकडून भारताला मिळणार्‍या आर्थिक मदतीचा अहवाल प्राप्‍त होतो. अहवालानुसार विदेशातून येणारा मदतीचा ओघ हा नैसर्गिक आपत्तीग्रस्त, ग्रामीण सुधार, औषधे व शिक्षण यांवर खर्च होतो. पाद्री, धर्मप्रसारक व इतर धार्मिक बाबींसाठी २ कोटी १० लाख डॉलरची विदेशी मदत मिळते. चर्चकडून गरीब, अशिक्षित ग्रामीण लोकांना औषधे, कपडे, खाद्यपदार्थ व पैसे वाटण्यात येतात. त्यानंतर हे ख्रिस्ती आदिवासींची प्रार्थनास्थळे नष्ट करतात. एका रम्य सकाळी त्यांना सांगण्यात येते की, ते सर्व ख्रिस्ती झाले आहेत. शासकीय जमिनीवर गवतांची घरे बांधून त्यांना चर्च असे संबोधण्यात येते.
कंधमल येथे हे राजरोस चालते. अजूनही तेथील परिस्थिती धुमसत आहे. डिसेंबर
२००७ साली झालेल्या हिंसेमागील हे सत्य मात्र भारतियांपर्यंत पोहोचलेले नाही. ख्रिस्ती व माओवादी यांचे खरे स्वरूप जगासमोर आणण्याचे धाडस प्रसारमाध्यमे दाखवतील का ?