अफझलखान वधाच्या देखाव्याला पोलिसांचा विरोध

`सनातन प्रभात’च्या वाचकाकडून पोलिसांचा निषेध

कल्याण (जिल्हा ठाणे), १० सप्टेंबर (वार्ता.) – येथील कासारहाट परिसरातील उदय मित्रमंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने `अफझलखान वध’ या विषयावरील देखावा चलच्चित्र व ध्वनीफीत यांच्या साहाय्याने उभारण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेत पोलिसांनी मंडळाला तो देखावा काढून टाकण्यास भाग पाडले.

(छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सत्य इतिहास सांगण्यावर आता खुद्द महाराष्ट्रातच बंदी आली आहे. उद्या शिवरायांचे नाव उच्चारण्यावरही बंदी आली, तर नवल वाटायला नको ! – संपादक) अंबरनाथ येथील `दैनिक सनातन प्रभात’चे क्रियाशील वाचक व धर्माभिमानी हिंदु श्री. कौस्तुभ फाटक हे त्या ठिकाणी दर्शनासाठी आले असता, त्यांना `पोलिसांनी आक्षेप घेतल्याकारणाने आम्ही देखावा हटवत आहोत’, असे लिहिलेला फलक दिसला. तो वाचल्यावर श्री. फाटक यांनी या संदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. सुभाष पाटील यांच्याकडे जाऊन स्वत: निषेध नोंदवला. (`दैनिक सनातन प्रभात’चे हिंदु धर्माभिमानी वाचक श्री. कौस्तुभ फाटक यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवेत ! – संपादक) त्या प्रसंगी झालेले संभाषण पुढे दिले आहे.
श्री. फाटक : उदय मित्रमंडळाने `अफझलखानाचा वध’ या विषयावर देखावा उभारला. त्यात गैर काय आहे ? शिवाजी महाराजांनी स्वसंरक्षणासाठी त्याचा वध केला होता आणि अफझलखान हा काही कोणी सूफी संत नव्हता.
पोलीस अधिकारी श्री. पाटील : त्या बदल्यात दुसरा देखावा दाखवता आला असता. तोच का ?
श्री. फाटक : आज शिवाजी महाराजांची माहिती देणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस काय चालू आहे ? ओरिसामध्ये काय चालू आहे ? पुढच्या पिढीला घडवण्यासाठी हे सर्व सांगणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पुस्तकातून चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. त्यामुळे समाजाला खरे कळले पाहिजे.
पोलीस अधिकारी श्री. पाटील : तुम्ही कोण त्यांचे नातलग लागता का ?
श्री. फाटक : माझे त्यांच्याशी काहीही नाते नाही. मी अंबरनाथ येथे रहातो. दरवर्षी मी येथे माझ्या काकांकडे गणपतीला येतो व मंडळातील गणपतीच्या दर्शनाला जातो. तुम्ही देखावा काढून टाकायला लावला, हे मला खटकले आहे व आवडले नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही असे करू नका. ही म्हणजे हिंदूंची एक प्रकारे गळचेपी आहे. तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हणता, तर असे करू नका. यात तसे काही नाही. अफझलखान हा शिवाजी महाराजांना मारायलाच आला होता.
(त्यावर अन्य एक पोलीस कर्मचारी श्री. शिर्के हे श्री. पाटील यांना “बाहेर चला”, असे म्हणाले.)
पोलीस कर्मचारी श्री. शिर्के : बोललात ते बोललात. तुम्ही एकदम साहेबांकडे का जाता ?
श्री. फाटक : मी काही त्यांना घाबरत नाही. तुम्हीपण शिर्के. तुमच्यातपण शिवाजी महाराजांचे रक्‍त आहे. तुम्ही असे घाबरले नाही पाहिजे. मुख्य म्हणजे तिथे कोणाचीही तक्रार नसतांनाही पोलिसांनी असे केले आहे. (अगदी कोणाची तक्रार आली असती, तरीही असे सत्य लपवणे, हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे ! – संपादक)
श्री. फाटक यांनी `सनातन प्रभात’शी बोलतांना सांगितले, “त्यानंतर मी पुन्हा सायंकाळी उदय मित्रमंडळात गेलो, तर पोलिसांनी कलम १४९ ची नोटीसच बजावली होती. तेथे पोलिसांच्या गाड्या होत्या. तेथील कार्यकर्त्यांनी पोलिसांचा उगाचच विरोध नको, म्हणून देखावा काढून ठेवला होता. प्रथम अफझलखान व दुसर्‍या दिवशी सय्यद बंडा याचा पुतळा काढून टाकला. (आक्रमकांचे एवढे लांगूलचालन केवळ भारतातच होते ! हे असेच चालू राहिले, तर उद्या येथे आक्रमकांचा उदोउदोही होऊ लागेल ! – संपादक) येथे कोणीही तक्रार करू शकत नाही आणि ज्यांचा गणपति होता, त्यांनी त्रास होऊ नये, म्हणून काही केले नाही.” उदय मित्रमंडळाचे श्री. हजारे यांनी पोलिसांना त्या देखाव्याच्या सोबत लावलेली ध्वनीफीत ऐकवली व “तीत काही आक्षेपार्ह नाही. हा तर इतिहासच आहे”, असे सांगितले. आज एका पोलीस अधिकार्‍याने एका मंडळातील देखावा काढला. उद्या त्याचे धारिष्ट्य आणखी वाढून तो प्रत्येक हिंदूला त्रास देईल, असे श्री. फाटक म्हणाले.

 |  मित्रांना पाठवा |    छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply