कधीतरीच हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक ! – फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याऐवजी सरकारने जम्मूमधील हिंदूंचा संताप जाणून घेण्याचा प्रयत्‍न केल्यास योग्य होईल ! अमरनाथ मुद्यावर आत्मचिंतन करण्याची संधी सरकारने घालवू नये; कारण कधीतरी हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हिंदूंच्या संतापामागे अमरनाथ जमिनीचा एकच मुद्दा आहे का ? त्यांच्यामध्ये संताप निर्माण करण्यासाठी इतर मुद्दे नाहीत का ? या गोष्टींचा उहापोह होणे आवश्यक आहे.
- फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए

 

शतकभरात काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांत हिंदू अल्पसंख्य !
हिंदू शांतीप्रिय नागरिक आहेत; मात्र जगात प्रत्येक ठिकाणी हिंदूंची अवहेलना केली जाते. फिजी, पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे भारताच्या विरोधात संताप व्यक्‍त करतांना हिंदूंना लक्ष्य ठरवले जाते. १९०० सालात काश्मीर खोर्‍यात १० लाख हिंदू होते, तर आता तेथे काही शेकडोच हिंदू शिल्लक आहेत. दहशतवाद्यांमुळे काश्मीर सोडून पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. आसाम, त्रिपुरा किंवा नागालँड येथे तेथील हिंदूंपेक्षा बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची संख्या जास्त आहे. तसेच या राज्यांत िख्र्तासीवाद्यांचा दहशतवादही मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

सर्वसमावेशक हिंदूंना लक्ष्य का केले जाते ?
गेल्या ३ हजार ५०० वर्षांचा इतिहास पहाता, हिंदूंनी कधीच इतर देशावर आक्रमण केलेले नाही. तसेच त्यांनी त्यांचा धर्म इतरांवर कधीच लादला नाही. सांप्रत काळात हिंदु धर्माची उपांगे असलेल्या योग, ध्यान, आयुर्वेद, प्राणायम यांचा अंगीकार जगभरातील लाखो नागरिक करत आहेत. जगातील बहिष्कृत अल्पसंख्यांकांना हिंदूंनी नेहमीच आश्रय दिलेला आहे. अशा हिंदूंना िख्र्तासींनी धर्मांतराच्या माध्यमातून, तर मुसलमानांनी रक्‍तरंजित आक्रमणांनी नेहमी विरोधच केला.

अमरनाथमधील उद्रेक कशासाठी ?
गुजरात दंगलीची आपण निंदाच केली पाहिजे; मात्र त्यामागची कारणे जाणून घेणे तेवढेच आवश्यक आहे. गुन्हेगाराच्या एका गटाने ५९ निष्पाप हिंदूंना रेल्वेमध्ये जाळून टाकले होते. त्यामुळे हिंदूंचा संताप अनावर झाला. एवढ्यावरच हा संताप सीमित नाही, तर वर्षांनुवर्षे गुजरातच्या हिंदूंवर झालेल्या अन्यायांचाही संताप होतो, हे आपण जाणले पाहिजे. अमरनाथ मुद्याच्या बाबतीतही तसेच आहे. मुसलमानांना हज यात्रेसाठी कोट्यवधी रुपये सरकारकडून दिले जातात, त्याबद्दल हिंदूंनी कधी तक्रार केलेली नाही; मात्र जेव्हा हिंदूंना यात्रेसाठी सुविधा हव्या आहेत, तेव्हा त्या सरकारकडून नाकारल्या जातात; म्हणूनच हा उद्रेक आहे ! या सरकारने किंवा पुढे येणार्‍या सरकारने हिंदूंच्या या संतापाची दखल घेतली नाही, तर आणखी अनेक `जम्मू’ ज्वालामुखीप्रमाणे उद्रेक झालेले आपल्याला दिसतील !

अमरनाथ आंदोलनाबाबत विशेष

  • वाचा…. अमरनाथ विशेष

 

 

 

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-08-26

हिंदु धर्मजागृती सभा : राष्ट्र व धर्म कार्यार्थ जागृत हिंदुतेजाचा आविष्कार !

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी हिंदुसंघटन, हेच उत्तर !

सद्यस्थितीत हिंदूंचे धर्मांतर, हिंदूंच्या देवतांचे विडंबन, प्रखर हिंदुत्ववादी नेते व हिंदु धर्मगुरु यांच्या होणार्‍या हत्या, जिहादी दहशतवाद, हिंदूंच्या मंदिरांच्या जागांवर होत असलेली अतीक्रमणे, हिंदु धर्मविरोधी कायदे असे अनेक आघात हिंदु धर्मावर होत आहेत. धर्मावरील ही आक्रमणे परतवण्यासाठी हिंदुजागृती व हिंदुसंघटन ही काळाची गरज आहे. हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून यासाठी कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून समितीने जानेवारी २००८ ते जून २००८ या कालावधीत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये एकूण ४३ ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन केले. या सभांद्वारे १ लाख ६४ हजारहून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी राष्ट्र व धर्म कार्यार्थ कृतीशील होण्याचा निर्धार केला.

 

 
हिंदु धर्मजागृती सभांची वैशिष्ट्ये या सभांना संतांचे आशीर्वाद व त्यांचा कृतीशील सहभागही लाभला. लहान-मोठे अनेक हिंदुत्ववादी पक्ष, संघटना, तसेच धर्माभिमानी हिंदू यांच्यामध्ये या सभांद्वारे एकतेची भावना निर्माण झाली. हिंदु जागृत असून आपण त्यांना फसवू शकत नाही, हे या सभांतून हिंदूंनी राज्यकर्त्यांना, तसेच हिंदुद्रोही व हिंदुद्वेष्टे यांना ठणकावले. या सभांमधून हिंदूंना धर्माच्या सद्यस्थितीबाबत जागरूक करण्याबरोबरच प्राप्‍त परिस्थिती बदलण्यासाठी आत्मबळ वाढवण्याच्या दृष्टीने साधना करणे कसे अनिवार्य आहे, हेही सांगण्यात आले. धर्मासाठी काहीतरी करू इच्छिणार्‍या, पण `मी एकटा काय करू ?’ या विचारात असणार्‍या समस्त धर्माभिमानी हिंदूंना धर्मकार्य करण्यासाठी दिशा मिळाली. सभांमध्ये `हर हर महादेव’च्या उत्स्फूर्त गजरात धर्माभिमानी हिंदूंनी संमत केलेले ठराव !
१. रामसेतू पाडणार्‍या सरकारचा निषेध !
२. प्रखर हिंदुत्ववादी `सनातन प्रभात’च्या संपादकांना अन्यायपूर्वक अटक करणार्‍या आणि त्याच वेळी हिंदूंच्या देवता व भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणार्‍या म.फि. हुसेनसारख्यांना अटक करू न शकणार्‍या सरकारचा निषेध !
३. गोवा राज्यातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीकडे सरकार गांभीर्याने पहात नाही. ही देवळे पाडणे, हे मूर्तीभंजन होणे, म्हणजे आमच्या हिंदुहृदयावर झालेला आघात आहे व तो आम्ही कधीही सहन करणार नाही.
४. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन व मंदिर सरकारीकरण या हिंदु धर्मविरोधी कायद्यांचा तीका निषेध !
धर्मसभांची क्षणचित्रे
१. प्रत्येक धर्मसभेची सुरुवात वेदमंत्रांच्या पठणाने झाली.
२. सभास्थळी धर्माभिमानी बालकांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व हिंदुत्वाचे आचरण यांविषयी प्रबोधन करणारा कक्ष उभारला होता.
३. सभास्थळी विविध आध्यात्मिक संस्थांनी धर्मविषयक प्रबोधन
करणारे कक्ष उभारले होते.
४. जिहादी दहशतवादामुळे काश्मीरमधील हिंदूंची झालेली विदारक स्थिती फॅक्ट’निर्मित `दहशतवादाचे भीषण सत्य’ या प्रदर्शनाद्वारे दाखवण्यात आली.

समितीची यशस्वी वाटचाल आता उत्तर भारताकडे !
तीन राज्यांतील हिंदूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हिंदु जनजागृती समितीतर्फे उत्तर भारतात इंदूर, अहमदाबाद, फरीदाबाद, दिल्ली, वाराणसी, कतरास व धनबाद या सात ठिकाणी धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहीर सभांमध्ये `आम्ही हे करू, हे देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवणार्‍या राजकीय पक्षांचे नेते काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, तर जनतेला त्याग शिकवणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे नेते अजरामर होतात !’ समितीच्या धर्मसभाही हिंदूंना त्यागाची शिकवण देत आहेत.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण हीच काँग्रेसची नीती !

२२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील के.सी. कॉलेजच्या सभागृहात `अमरनाथ यात्रा व जम्मू-काश्मीर वाद’ या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या भाजपच्या सभेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

 

श्री. नितीन गडकरी यांच्या भाषणाचा संक्षिप्‍त वृत्तांत
“भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याची नीती काँग्रेसने अवलंबली आहे. हिंदूंच्या अस्मितेचा कोणताही विषय असो त्याविषयी सातत्याने अन्यायाची भूमिका घेणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे, असा अर्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काढला आहे. मुंबई दहशतवाद्यांचे केंद्र बनले आहे; सरकारची भूमिका मात्र अतिशय नरम आहे. काश्मीरमध्ये जे दहशतवादी होते, जे पाकिस्तानच्या बाजूने लढत होते ते `हिंदुस्थान मुर्दाबाद’चे नारे देत होते. त्यांच्यापैकी ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने पाच लाख रुपये मदत जाहीर केली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या परिवाराला आता पेन्शन जाहीर केले. महाराष्ट्राचे शिवराज पाटील केंद्रात गृहमंत्री असतांनाही संसदेवर हल्ला करणारा अफझलची धारिकाच राष्ट्रपतींकडे गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई बाँबस्फोटांतील आरोपीचा वकील मजीद मेमन यांना अखिल भारतीय सरचिटणीस बनवले. त्यामागील त्यांचा उद्देश एकच होता. तो म्हणजे मुसलमान समाजाची सहानुभूती मिळवणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर व काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून अझफलची शिक्षा माफ व्हावी, असे सांगितले. अशा एका ना अनेक गोष्टी आहेत. सर्व धर्मांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे; पण अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अवलंबले. ज्या सिमीचा मुंबईपासून, गुजरात, बेंगळूरू अशा अनेक ठिकाणी बाँबस्फोट करण्यामागे हात आहे, त्या सिमीला काँग्रेसचे सहकारी श्री. मुलायमसिंग यादव, लालुप्रसाद यादव व काँग्रेसचे नेते यांनी देशभक्‍तीचे `प्रमाणपत्र’च दिले. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जेव्हा मुंबईत आल्या, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, `मुसलमान समाजाला चौकशीकरता `टार्गेट’ करू नका.’ या शंभर कोटींच्या हिंदुस्थानमध्ये अमरनाथच्या यात्रेकरूंच्या सुविधांकरता शंभर एकर जमीन मिळू शकत नाही.
सर्व काँग्रेसचे नेते बाँबस्फोटांतील आरोपींना संरक्षण देण्याचे काम करत आहेत. दाऊदचा भाऊ इब्राहीम हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला, तरीही मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व मुसलमानांच्या विरोधात नाही. काँग्रेसने मुसलमानांचा उपयोग केवळ भावनात्मक राजकारणाकरता केला. अमरनाथ प्रकरणी राष्ट्रवादीच्या मुस्लीम नेत्यांनी विरोध करण्याचे कारण काय ?”

वाचा…. अमरनाथ विशेष

 

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिधी

गुजरातमधील दंगलींमध्ये हिंदूंना दोषी ठरवणार्‍यांनो, `गोध्रामध्ये काय घडले होते’, हे लक्षात ठेवा !

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर ९१६६ क्रमांकाच्या मुजफ्फरपूर-अहमदाबाद साबरमती एक्स्प्रेसच्या एस्-६ डब्याला धर्मांध मुसलमानांनी आग लावून ५९ हिंदूंना जिवंत जाळले. त्यांच्यापैकी ७ जण ओळख पटण्यापलीकडे जळाले. जळालेला डबा हा राममंदिरासाठी जाणार्‍या कारसेवकांचा होता.

 

त्यांनी राममंदिर बांधण्यासाठी जाऊ नये, यासाठी हे नरसंहारक कृत्य करण्यात आले, हे सुस्पष्ट आहे. मुसलमानांनी हे दहशतवादी कृत्य घडवून आणल्यावर त्यांना पाठीशी घालण्यासाठी निधर्मीवादी राज्यकर्त्यांनी व पत्रकारांनी `रेल्वेला लागलेली आग हा अपघात होता’ व `ते हत्याकांड नव्हते, तर जळीतकांड होते’, असा कांगावा सुरू केला. हल्लेखोरांना `या रेल्वेत कोण आहेत’, याची संपूर्ण माहिती होती. त्यांच्यावर कसा हल्ला करायचा, हे त्यांनी आधीच ठरवले होते. अन्यथा डिझेल अन् पेट्रोल घेऊन कोणी रेल्वेकडे धावणार नाही व ती पेटवण्याचा विचारही करणार नाही. समुदायाने ज्या संख्येने हा हल्ला केला व ज्या झपाट्याने ठरवलेले निर्घृण कृत्य घडवून आणले, त्या बाबी पूर्वनियोजनानेच घडू शकतात. इतका पराकोटीचा द्वेष, क्रूरता व त्यानुरूप संघटित कृती करण्याची तयारी एखाद्या समुदायाकडून होत असेल, तर ती एका दिवसात घडणारी घटना असूच शकत नाही.
वृत्तपत्रकार व प्रसारमाध्यमे यांनी `गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये `निरपराध मुसलमानांची कत्तल करणारे नाझी’, असे हिंदूंचे वर्णन केले. हिंदूंना मूलतत्त्ववादी संबोधण्यात आहे. गुजरातच्या प्रकरणावरून सर्व हिंदूंना मूलतत्त्ववादी म्हणणे, म्हणजे त्यांचा केवळ निर्बुद्धपणाच नव्हे, तर त्यात त्यांनी केलेला अन्याय व पक्षपातही दिसून येतो. गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये जे घडले, त्यात २५ टक्के हिंदूही मारले गेले होते व त्यानंतर ज्या दंगली झाल्या, त्या मुसलमानांकडूनच झाल्या होत्या. याची नोंद करण्यास पत्रकार व राज्यकर्ते विसरतात. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमधील उसळलेल्या दंगलींच्या वेळी पाश्चिमात्य पत्रकारांनी हिंदूंबद्दल जे काही विपर्यस्त लिहिले त्याचा प्रतिवाद पें्रऎच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी त्या वेळी केला होता. तो पुढीलप्रमाणे आहे,
“पाश्चिमात्य वृत्तपत्र व इंग्रजी माध्यमाच्या भारतीय प्रसारमाध्यमांनी, `माथेफिरू मूलतत्त्ववादी हिंदू शांतीप्रिय मुसलमानांच्या मागे लागलेले आहेत’, असे गुजरामधील दंगलीसंदर्भात म्हटल्याचे आपण पहातो; परंतु वस्तूस्थिती वेगळी आहे. सतत होणारी बदनामी, हल्ले, कत्तली, स्त्रियांवरील बलात्कार, बंदुकीच्या गोळया व हातगोळे यांच्या मार्‍याने वरून उद्ध्वस्त होणारी मंदिरे यांमुळे सहिष्णू, ईश्‍वराप्रती श्रद्धा असणारे, शांतताप्रिय हिंदू त्रासलेले नाहीत का ? या ग्रहावरील अत्यंत शांतताप्रिय, अनुशासनप्रिय, कायदा पाळणारा, सहिष्णू व वैभवसंपन्न, असा हा हिंदु समाज आहे. अखिल विश्‍वात यांची संख्या शंभर कोटी आहे. म्हणजे जगाच्या मानवजातीच्या एक षष्ठांश प्रतिनिधित्व हिंदूंचे आहे. त्यामुळे निधर्मी पक्ष व प्रसारमाध्यमे यांनी हिंदूंना माथेफिरू म्हणून हिणवण्याऐवजी अथवा देशातील केवळ मुसलमानांचा विचार न करत हिंदूंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.”

 

वाचा…. अमरनाथ विशेष

 |  मित्रांना पाठवा | छापील प्रत

  निगडीत वृत्त : हे वाचून ज्याचे रक्त सळसळत नाही, तो हिंदू नव्हे

जम्मू लढ्याचे सामरिक महत्त्व !

गेल्या ६१ वर्षांत केंद्रातील एकाही सरकारने पाकव्याप्‍त काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्‍न केला नाही. काश्मीरमधील आतंकवाद मोडण्याची स्पष्ट सूचना सैन्याला मिळालेली नाही. इस्लामी आतंकवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्यास भारतातील मुसलमान दु:खी होतील आणि हिंदी राष्ट्र बनवण्यास त्यांचे सहकार्य मिळणार नाही, या भीतीने भारत सरकार आतंकवादाकडे काणाडोळा करते. अशा स्थितीत जम्मूमधील हिंदूंनी दाखवलेला पुरुषार्थाचा आविष्कार पाहून सर्व डोळस भारतियांना, विशेषत: भारताच्या सेनादलांना हर्ष होणे साहजिक आहे !

 

श्री बाबा अमरनाथ लढ्यात जम्मूची जनता एकजुटीने रस्त्यावर उतरली आणि तिची भूमिका उर्वरित भारताने उचलून धरली. या घटनेला एक सामरिक अर्थ आहे. इस्लामी दहशतवादाविरुद्ध लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढे आले, अशी घटना भारतात प्रथमच घडत आहे. हा पुरुषार्थाचा आविष्कार आहे. तो पाहून सर्व डोळस भारतियांना हर्ष होणे साहजिक आहे. तथापी सर्वाधिक आनंद भारताच्या सेनादलांना, विशेषत: भूदलाला झाला आहे; कारण या लढाईतील महत्त्वाची आघाडी सांभाळायला साक्षात जनताजनार्दन पुढे आल्याने भूदलाने फार मोठा सुस्कारा टाकला आहे. भूदलाचे सामर्थ्य वाढले आहे. काश्मीर आघाडीवर गेली ६१ वर्षे एकाकी लढत देणार्‍या भारतीय भूदलाची कहाणी जशी रोमांचक आहे, तशी शोकात्मसुद्धा आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले तेव्हा ते परतवून लावण्यास भारतीय सैन्य सिद्ध होते. त्यांनी अर्धे काश्मीर मुक्‍तही केले होते आणि उरलेले काश्मीर पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी ते सैन्य पुढे जात होते. पंतप्रधान नेहरूंनी भारतीय सैन्याला मध्येच थांबण्याची आज्ञा दिली. त्यांनी हा विषय संयुक्‍त राष्ट्र संघाच्या दारात नेऊन ठेवला. त्याचा पाकिस्तानवर काही परिणाम झाला नाही. काश्मीरसाठी पाकिस्तानने चार मोठी आक्रमणे भारतावर केली. भारतीय सैनिकांपेक्षा पाकिस्तानी सैनिक शौर्यात कमी पडल्याने त्यांनी समोरासमोर युद्ध टाळून छद्मी युद्धाचा आश्रय घेतला. आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांशी पाकिस्तानचे साटेलोटे आहे. पाकिस्तान स्वत:च प्रमुख इस्लामी आतंकवादाचे केंद्र आहे. आयएस्आय आणि अशाच संघटनांकरवी घातपाती कृत्यांंनी संपूर्ण भारत खिळखिळा करण्याची पाकिस्तानची योजना आहे. कितीही नाही म्हटले, तरी वाट चुकलेल्या भारतातील मुसलमान समाजाचा ही योजना यशस्वी करण्यात सहभाग आहे. `काश्मीरवाचून फाळणीचे हिशेब पूर्ण होत नाहीत’, असे प्रत्येक पाकिस्तानी पंतप्रधान म्हणत आला आहे. तेव्हा काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानी राज्यकर्ते आणि एकंदर राजकीय जग, पाकिस्तानी सैन्य, तेथील सर्वसाधारण जनता, तसेच भारतातील मोठ्या प्रमाणातील पाकिस्तानी प्रवृत्तीचे मुसलमान या सगळयांचे एकमत आहे. त्यांना काश्मीर भारतापासून तोडून पाकिस्तानात समाविष्ट करायचे आहे. भारतात नेमकी उलट परिस्थिती असून तीच भारतीय सैन्याची मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या ६१ वर्षांत केंद्रातील एकाही सरकारने पाकव्याप्‍त काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्‍न केला नाही. काश्मीरमधील आतंकवाद मोडण्याची स्पष्ट सूचना सैन्याला मिळालेली नाही. इस्लामी आतंकवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्यास भारतातील मुसलमान दु:खी होतील आणि हिंदी राष्ट्र बनवण्यास त्यांचे सहकार्य मिळणार नाही. या भीतीने भारत सरकार आतंकवादाकडे काणाडोळा करते. खुशवंतसिंग स्वत: आणि त्यांच्या पठडीतले स्वच्छंदी पत्रकार `काश्मिरातील मुसलमानांना जे हवे ते देऊन टाका आणि प्रश्‍न कायमचा मिटवा’, असा प्रचार गेला महिनाभर करत आहेत. त्यामुळे काश्मिरात भारतीय सैन्य एकाकी पडले आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडत्व आणि एकात्मता यांचे रक्षण करण्यासाठी सैन्याने पाऊल उचलले की, `मानवाधिकाराचा भंग होतो’, अशी ओरड जगातील भारतविरोधी संघटना करतात. आता जम्मूची जनता मैदानात युद्धमान अवस्थेत उतरली आहे. त्यामुळे भारतविरोधी सर्व संबंधित घटकांना काश्मिरात दोन आघाड्यांवर लढावे लागेल. उर्वरित भारतातून जनतेचा पाठिंबा सक्रीय झाल्यास तिसरी आघाडी उघडली जाईल. जनता आणि सैन्य यांचे ध्येय एक होईल. मग चुटकीसरशी काश्मीर प्रश्‍न सुटेल !
- सुघोष

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : शरसंधान

म्हणे `स्वतंत्र काश्मीर’ची मागणी हे काश्मिरी जनतेचे हक्काचे बोल !

स्वतंत्र काश्मीरच्या मागणीला पाठिंबा देणार्‍या सईद यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरा !

मेहबूबा मुफ्ती सईद यांचे विघटनवादी फूत्कार !

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती सईद यांनी `आज तक’ या वृत्तवाहिनीवरील `सीधी बात’ या कार्यक्रमात विघटनवादी फूत्कार सोडले. त्या म्हणाल्या, “काश्मीरमधील जनता `स्वतंत्र काश्मीर’ची मागणी करत आहे.

(धर्माच्या आधारावर भारताची एक फाळणी आधीच झालेली आहे. आता मेहबूबा मुफ्ती सईद अशा प्रकारची वक्‍तव्ये करून दुसर्‍या फाळणीची तयारी करत आहेत. अशा देशद्रोह्यांना तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात खटले चालवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे धाडस केंद्राने दाखवावे ! – संपादक) त्यांची मागणी हे हक्काचे बोल आहेत. (मेहबूबा मुफ्ती सईद, त्यांचे वडील व त्यांचा पक्ष यांनी काश्मीरमध्ये आतंकवाद पोसला. तेथील राष्ट्रप्रेमी भारतीय हिंदूंना तेथून परागंदा होऊ दिले व आता आतंकवाद्यांचे आणि त्यांना मदत करणार्‍यांचे मत मेहबूबाबाई `काश्मिरी जनतेचे हक्काचे बोल’ म्हणून सांगत आहेत. विघटनवाद्यांचे असले डावपेच षंढ भारतीय राज्यकर्त्यांना त्यांच्यासमोर नांगी टाकायला लावतील, राष्ट्राभिमानी भारतीय जनतेला नव्हे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! अमरनाथाच्या जमिनीसाठी हिंदूंनी केलेल्या दीर्घकालीन आंदोलनातून हिंदूंच्या मनात काय खदखदत आहे, हे मेहबूबाबाइंर्नी समजून घेण्यात त्यांचे हित आहे ! – संपादक) देशात प्रत्येक समाजाला आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. (जी मते देशाचे अखंडत्व धोक्यात आणतात, ती मते मांडणे, हा देशद्रोह आहे व तो करण्याचे स्वातंत्र्य देशातील कोणत्याही समाजाला नाही ! – संपादक) काश्मिरी जनतेलाही ते आहे. अशी मागणी करण्याचा त्यांचा हक्क आहे.” कायद्याने श्री अमरनाथ देवस्थान मंडळाला जागा देता येत नाही. (हिंदुबहुल राष्ट्रात हिंदूंना परमश्रद्धेय अशा अमरनाथाच्या देवस्थान मंडळाला कायद्याने जागा देता येत नसेल, तर कायदा बदला ! – संपादक) आमचा पक्ष नेहमीच काश्मिरी हिंदूंप्रती संवेदनशील आहे. (असे आहे, तर काश्मीरमधून ५ लाख हिंदू विस्थापित का झाले ? – संपादक) त्याचबरोबर आम्ही काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आई-वडिलांच्या प्रतीही संवेदनशील आहोत. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन करतो. (मेहबूबा यांनी कधी एवढ्या मायेने काश्मीरमधील विस्थापितांच्या यातना जाणून घेतल्या आहेत का ? या हिंदूंची तर लहान बालके, तरुण मुले केवळ ते हिंदु आहेत, म्हणून दहशतवाद्यांनी कापली आहेत. त्यांच्याविषयी मेहबूबाबाई एक शब्द बोलतांना दिसत
नाहीत ! – संपादक)
त्या आई-वडिलांकडे पाठ का करायची, त्यांचा काय दोष असतो, असेही मेहबूबा म्हणाल्या. आज जम्मूमध्ये तातडीची कारवाई करण्याची गरज आहे. जम्मूमध्ये हिंदु एका हातात तिरंगा आणि दुसर्‍या हातात पेट्रोल बाँब घेऊन रस्त्यावरून फिरतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे. (आतापर्यंत लाखो काश्मिरी हिंदूंच्या हत्या करणार्‍या इस्लामी दहशतवाद्यांबाबत मेहबूबा मुफ्ती असे काही का बोलत नाहीत ? – संपादक) श्री अमरनाथ देवस्थान मंडळाच्या जागेचा प्रश्‍न असो, काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न असो कि संपूर्ण काश्मीर प्रश्‍न असो, हे सर्व प्रश्‍न चर्चेनेच सुटू शकतात, असे श्रीमती मेहबूबा सईद म्हणाल्या. (असे आहे, तर चर्चेच्या अनेक फेर्‍या करूनही काश्मीर प्रश्‍न अद्याप सुटला का नाही ? – संपादक)

 

वाचा…. अमरनाथ विशेष

 |  मित्रांना पाठवा |   छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशद्रोही मुसलमान