अमरनाथ प्रश्‍नावर विहिंपच्या `तुरुंग भरा’ आंदोलनाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) – अमरनाथ देवस्थानाला सरकारने भूमी हस्तांतरित करावी, या मागणीसाठी विहिंपने केलेल्या `तुरुंग भरा’ आंदोलनाला आज देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब व महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली.

दिल्लीमध्ये विहिंपचे वरिष्ठ नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांनी आज स्वत:हून अटक करून घेतली. शहरातील राजौरी उद्यानात हजारो आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. जगदीश मुखी, आमदार श्री. ओ.पी. बब्बर, एच्.एस्. बाली तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी स्वत:हून अटक करून घेतली. या आंदोलनामध्ये ७ हजारांहून अधिक आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती विहिंपच्या सूत्रांनी दिली. “अमरनाथ मुद्दा आता केवळ जम्मूपुरता मर्यादित नाही. हे आता राष्ट्रव्यापी आंदोलन झाले आहे. आमच्या तीन मागण्या आहेत. अमरनाथ देवस्थान मंडळाला भूमी परत द्यावी, यात्रेचे नियोजन अमरनाथ देवस्थान मंडळाकडे सोपवावे व राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना अटक करण्यात यावी”, असे डॉ. तोगाडिया म्हणाले.

राजस्थानमध्ये हजारो आंदोलनकर्त्यांकडून स्वत:हून अटक
जयपूर – शहरात ३ हजार आंदोलनकर्त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे खासदार श्री. जी.एल्. भार्गव यांनी केले. विहिंपचे आचार्य धर्मेंद्र व श्री. नरपत सिंग यांनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आज आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते; मात्र त्याची चिंता न करता आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली व अटक करून घेतली.

पंजाबमध्येही निदर्शने
जालंधर – आज ७५० आंदोलनकर्त्यांनी येथील कंपनी बाग चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. रवि महिंद्रु यांनी या वेळी भाषण केले. ते म्हणाले, “केंद्र सरकार अमरनाथ मुद्याच्या बाबत बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा भूमिकेमुळे ही समस्या सुटणार नाही.”

अमरावतीमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळला
अमरावती – आज विहिंप, संघ, बजरंग दल व भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शने केली. येथील राजकमल चौकात आज चारशेहून अधिक कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी ४०० कार्यकर्त्यांना अटक केली व काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी भाषणे केली.

औरंगाबादमध्येही आंदोलन
औरंगाबाद – आज भाजप, विहिंप व बजरंग दल यांच्या ६० कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी रोखल्यावर आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

अलिबाग - आज देशभरात रा.स्व. संघाने केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आलिबागमधील जोगळेकर नाक्यावरील श्री काशी विश्‍वनाथ मंदिरासमोर आमरनाथ संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, रा.स्व. संघ, भाजप व शिवसेना यांचे १०० कार्यकर्ते उपस्थित होते.

काश्मीरमधील फळ बागायतदारांचा उपोषणावर जाण्याचा इशारा
पुढील काही दिवसांत परिस्थिती न सुधाल्यास काश्मीरमधील फळ बागायतदार बेमुदत संपावर जाणार, असा इशारा फळबागायतदारांच्या संघटनेने दिला आहे. `परिस्थिती पूर्वपदावर न आल्यास श्रीनगर-मुझफ्फराबाद’ मार्गावर उपोषण करण्यात येईल’, असे वक्‍तव्य फळ बागायतदार संघटनेचे अध्यक्ष गुलाम रसूल भट यांनी केले. तीन दिवसांपूर्वी फळांनी भरलेले ट्रक जम्मूमधील आंदोलनकर्त्यांनी जाळले, तर सांबामध्ये ६ ट्रकांचे नुकसान करण्यात आले सोपोर येथील फळ बागायतदार संघटनेचे अध्यक्ष बशीर अहमद शेख म्हणाले,“आमचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इस्लाम आत्महत्या करण्यास परवानगी देत नाही. असे असते, तर आम्ही आत्महत्याच केली असती.”


हिंदूंनो, इतर काही करत नाही, तर निदान आंदोलन यशस्वी होण्यासाठी दररोज प्रार्थना तरी करा !
काश्मीरचे राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांनी अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली जमीन परत घेतल्यानंतर जम्मूमधील धर्माभिमानी हिंदू पेटून उठले ! विहिंपच्या `तुरुंग
भरा’ आंदोलनानंतर आता हे आंदोलन राष्ट्रव्यापी होत आहे. `अमरनाथ भूमीचा प्रश्‍न हा आपल्या अस्मितेचा प्रश्‍न आहे’, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता नाही आले, तरी हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक हिंदूने दररोज निदान प्रार्थना तरी करणे आवश्यक आहे.काश्मीरमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या वाहनावर हल्ला
आज समितीच्या आंदोलनकर्त्यांनी काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्री. मंगतराम शर्मा यांच्या वाहनावर हल्ला केला. आंदोलनकर्ते लोखंडी सळया व हातात दगड घेऊन श्री. शर्मा यांच्या वाहनावर चाल करून गेले. आज श्री. शर्मा त्यांच्या नातवासह डॉक्टरकडे जात असतांना आंदोलनकर्त्यांनी हा हल्ला केला. श्री. शर्मा यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षाजवानांनी त्यांची आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यापासून सुटका केली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी तीन वाहनांची तोडफोड केली. गुलाम नबी आझाद यांच्या मंत्रीमंडळात पूर्वी उपमुख्यमंत्री असलेले श्री. मंगतराम यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी आतापर्यंत दोन वेळा हल्ला केला आहे.

| मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 4 – वाचक संख्या | छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply