दोन मुले तरच पोलिसांत नोकरी

राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र पोलिसात मुसलमानांचा सामावेश करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय होण्यापूर्वी हिंदूंनी आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रेसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आहे. तेव्हा मुसलमानांना आधी भारतभक्त बनू द्या. जेवढा हिंदू या देशावर प्रेम करतो, तेवढे मुसलमानांनाही करायला शिकवा. `अनिर्बंध संतती कि पोलिसांत नोकरी’ असा पर्याय समोर ठेवा आणि मुसलमान काय उचलतात, ते पहा. मग निर्णय घेणे योग्य ठरेल !
लेखक – ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी

 

मुसलमानांना पोलिसांच्या नोकरीत घेण्यापूर्वी हिंदुहित निश्चित करा !
मुसलमानांनी पोलिसांत भरती व्हावे; म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख आपला जीव पाखडायला उत्सुक आहेत. सोनिया गांधींच्या सरकारने सच्चर समितीचे प्रतिवृत्त तंतोतत कार्यवाहीत आणायचे ठरवले आहे. `हिंदु मुसलमानांशी चांगले वागत नसल्यामुळे ते मागास राहिले’, असा निष्कर्ष समितीने काढल्यामुळे थेट पोलिसांतच भरती करून `आम्ही तुमच्याशी किती चांगले वागतो, ते पहा’, असे म्हणत मुसलमानांची समजूत काढण्याचा प्रयत्‍न काँग्रेसने करायचा ठरवले आहे. मुसलमान पूर्वी हिंदु होते. ते भारताचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना चाकरी देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न थोडाफार सोडवण्यात हिंदंूना आनंदच होणार आहे.
तरीसुद्धा हिंदु मुसलमानाला नोकरी देणार असल्यामुळे हिंदूने आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. त्यानंतर मुसलमानांना पोलिसांत घेतले, तर त्यांच्याकडून हिंदुहिताचे पुरेसे संरक्षण होईल का, हा प्रश्‍न हिंदूंनी सोनिया गांधी इत्यादी कोणाचेही चित्र डोळयांपुढे न आणता स्वत:च्या छातीवर हात ठेवून विचारला पाहिजे.
मुसलमान हिंदुहिताशी किती प्रामाणिक आहेत. याविषयी पुढील माहिती वाचतांना मुसलमानांचे अनुभव मोहनदास गांधी आणि सी. सुब्रह्मण्यम यांना कसे आले, ते प्रथम लक्षात घेतले पाहिजेत. हिंदु-मुस्लीम ऐक्याचे गेली ३२ वर्षे आपण सातत्याने प्रयत्‍न केले; पण आपल्याला काहीही यश आले नाही, असे गांधी त्यांच्या अंतकाळी म्हणत असत. दुसरे सी. सुब्रह्मण्यम हे केंद्रीय कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांचे एक वाक्य आहे की, काश्मीरमधील विकासावर उर्वरित भारताने गेल्या ५० वर्षांत एक लाख कोटी रुपये खर्च केले. तेथील मुसलमानांना आटोकाट प्रयत्‍न करून सुखांत ठेवण्याचा प्रयत्‍न भारताने केला; पण मुसलमानांचे प्रेम त्याला मिळवता आले नाही.

गुन्हेगारी आणि पोलिसीनीती !

सर्वसामान्य हिंदु आणि मुसलमान माणसाचे हितसंबंध आणि त्या हितसंबंधाचे रक्षण करणारे पोलीस यांचे हितसंबंध सर्वसाधारणपणे समान आहेत का, हे बघणे हा साधा व्यवहार आहे.
पोलिसांचे काम अपराध शोधणे, तसे अपराध पुन्हा होऊ नये; म्हणून धाक निर्माण करणे, जे संशयित आहेत त्यांना शिक्षा होईल, असे खरेखुरे पुरावे गोळा करणे आणि जे दंडित आहेत त्यांना शिक्षा पुरेपूर भोगायला लावणे, हे असते. `परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम, हे पोलिसांचे ब्रीद असते. सर्वसाधारण नीतीमत्तेचे दंडक समाजाने पाळले पाहिजेत आणि संसद वा विधिमंडळ जे निर्बंध पारित करेल, त्याचा आदर केला जाईल, हे पहाण्याचे काम पोलिसांचे असते. काही गुन्हे पोटासाठी होतात, काही रागापोटी, अभिमानापोटी, क्षणिक आवेगापोटी होतात. हे जे किरकोळ गुन्हेगार असतात, त्यांचे राज्यशासनाशी आणि त्याच्या उद्घोषित उद्दिष्टांशी काही भांडण नसते. किरकोळ गुन्हेगारांच्या दृष्टीने पोलीस म्हणजेच शासन किंवा सरकार असते. त्याच्या गुन्हा करण्याच्या मार्गात पोलीस आडवा येतो; म्हणून त्याचे पोलिसांशी भांडण असते; पण राष्ट्रपे्रम या विषयात गुन्हेगाराचे पोलिसांशी एकमत असते.

गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा काँग्रेसचा अलिखित नियम !
गुन्हेगारांमध्ये हिंदु आणि मुसलमान असे दोन भाग असतात. पोलिसांमध्ये प्रामुख्याने हिंदूच असतात. सैन्यात आणि पोलिसात मुसलमानांना घेऊ नये, असा अलिखित नियम आहे. घ्यावे लागलेच तर नाजूक कामे त्यांच्याकडे देऊ नयेत, हे पथ्य पाळले जाते. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी पंतप्रधान झाल्यावर मुफ्ती महंमद सईद यांना गृहमंत्री नेमले, तेव्हा शंकरराव चव्हाण अतिशय कृद्ध झाले होते आणि मलबार हिलवरील सह्याद्री अतिथीगृहात आपला संताप त्यांनी माझ्याजवळ व्यक्‍त केला होता. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आणि त्याचे उल्लंघन पहिल्यांदा विश्‍वनाथ प्रतापसिंगांकडून झाले, हे मला बारकाव्यानिशी समजावून सांगण्यात शंकररावांनी एक संध्याकाळ खर्च केली आहे. तेव्हा अपराध्यांमध्ये हिंदु आणि मुसलमान असे दोन भाग असले तरी पोलिसांत तसे दोन भाग निर्माण करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक ठरणार आहे, हे विलासरावांनी लक्षात ठेवले पाहिजे.

राष्ट्रप्रेमाविषयी मुसलमान हिंदूंना संशयास्पद वाटत असतात !
मुसलमानांना पोलिसांत घेऊ नये, या भूमिकेमागे वैयक्‍तिक रागलोभ नसून तात्त्विक आणि मूलग्राही कारणे आहेत. पोलिसांचे दायित्व निष्ठेने पार पाडण्याइतके प्रगल्भ मन मुसलमानांजवळ नाही. त्याला मुसलमानांप्रमाणे हिंदूही कारणीभूत आहेत. लहान मुलांना आपण काचसामानाला हात लावू देत नाही. त्याचे कारण त्या मुलांविषयी आपल्या मनात वाईट भावना असते, असे नाही. काचेच्या वस्तू लहान मुलांना नीट सांभाळता येणार नाहीत आणि त्यांच्या हातून त्या फुटू शकतात, हे कारण असते. याचा अर्थ आपण लहान मुलांना काचेच्या वस्तूंना कधीच हात लावून देणार नसतो, असे नाही. उलट अशा वस्तू कशा हाताळाव्या आणि सांभाळाव्या, याचे शिक्षण आपण मुलांना द्यायला सुरुवात केलेली असते. ते शिक्षण पूर्ण होऊन काचवस्तू फुटणार नाही, असा विश्‍वास मुलांच्याकडून मिळत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याकडे संशयानेच पहात असतो.
हिंदु मुसलमानांकडे संशयाने पहातात; कारण `राष्ट्र’ हा अत्यंत संवेदनशील विषय कसा हाताळावा, याचे प्रशिक्षण त्याला अद्याप मिळालेले नाही. राष्ट्रावर प्रेम करायला हिंदूला शिकवावे लागत नाही. जगत्‌जननी भारतभूच्या रूपाने अवतरली आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. जन्मत:च तो मातृभक्‍त आणि देशभक्‍त असतो. या देशाबाहेर त्याला श्रद्धास्थान नाही. गंगानदीला तो गंगामैया म्हणतो. प्रादेशिक भाषाभेदामुळे भारताची एकात्मता धोक्यात येत नाही. संस्कृत हा मूलस्रोत म्हणजे रिझर्व्ह बँक आहे आणि तिने सर्व भाषाभगिनींना धरून ठेवले आहे. उत्तर भारतातील हिंदूंना मुक्‍त करण्यासाठी मराठ्यांची एक लाख बांगडी फुटते, तेव्हा सह्याद्रीच्या मावळयांना विशेष त्याग केल्याचा अभिमान नसतो. आपण जन्मदत्त कर्तव्य केले, अशी त्याची भावना असते. पुन्हा पानिपतावर चालून जाण्यासाठी अब्दालीच्या विरुद्ध दंड थोपटून तो उभा रहातो. सावरकर गोदाकाठी जन्मले; पण सिंधू मुक्‍त केल्यावाचून महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार अगदी सहजपणे त्यांच्या तोंडून बाहेर पडतो.

परकीय आक्रमणाच्या वेळी मुसलमानांची भारतनिष्ठा दोलायमान होऊ शकते ! – इति डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देशावर परकीय आक्रमण होते, तेव्हा हिंदू हे आक्रमकांना आतून सामील होतील, अशी भीती पोलिसांना नसते. हिंदूंचे पक्षीय मतभेद राष्ट्रीय आपत्तीत गळून पडतात. भारत-पाक १९६५ च्या युद्धात दिल्लीतील वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींनी रा.स्व. संघाची साहाय्यता घेतली होती. दंगे होतात तेव्हा मुस्लीम वस्तीत पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो. दंग्यात हिंदूंनी भरपूर मार खाल्ला असून आता तरी मुसलमानांना आवरण्यासाठी आम्हाला अधिकार द्या, अशा विनवण्या करत पोलीस अधिकार्‍यांना सत्ताधिशांच्या दारात उभे रहावे लागते.
तात्पर्य हे आहे की, मनुष्यामध्ये विविध कारणांनी ज्या कमीअधिक प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असतात, त्याचा अतिरेक होऊन उद्रेक झाला की, तेवढा नियंत्रणात आणणे एवढेच काम हिंदु समाज पोलीस यंत्रणेला पुरवतो. हिंदु देशाला धोका देणार नाही, ही निश्चिती असल्याने प्रत्येक हिंदूंकडे संशयाने पहावे लागणार नाही आणि हिंदु वस्तीत बंदोबस्त ठेवावा लागणार नाही, हे पोलिसांना माहीत असते. असे मुसलमानांविषयी म्हणता येणार नाही. पाकिस्तान निर्मितीला भारतातील सर्व भागांतील मुसलमानांनी पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानचे आक्रमण होते. तेव्हा येथील मुसलमान आतून काय करतील, हे शोधण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागते. परकीय आक्रमणाच्या वेळी मुसलमानांची भारतनिष्ठा दोलायमान होऊ शकते, असे स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवले आहे.

देशांतर्गत सुरक्षा यंत्रणेत दुफळी करणे, हे अराजकाचे संकट ओढावून घेण्यासारखे आहे !
अर्थात मुसलमानांच्या संशयास्पद वागण्याविषयी संपूर्ण दोष मुसलमानांना देता येणार नाही. मुसलमानांना बदलण्यासाठी हिंदूंनी करायला पाहिजे, तेवढे प्रयत्‍न केले नाहीत. हा दोष हिंदूंनी स्वीकारला पाहिजे. हिंदु आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे आहेत आणि त्यांचे सहजीवन अशक्य आहे, असे १८८८ मध्ये सर सय्यद अहमद यांनी उद्घोषिल्यानंतर मुसलमानांची स्वतंत्रता आणि युद्धमानता नष्ट करून ते प्रेमाने आणि शांतीने हिंदूंशी वर्तन करतील, असे संस्कार हिंदूंनी करायला हवे होते; परंतु गांधीयुग सुरू झाले आणि नंतर नेहरूंच्या हाती देशाचा कारभार गेला आणि मुसलमान हिंदूंसारखे देशभक्‍त होतील, ही शक्यता संपली. मुसलमान या देशाला आई मानीत नाहीत, ते भारताला दार-उल्-हरब म्हणजे परक्याची भूमी मानतात. ही भूमी जोपर्यंत दार-उल्- इस्लाम होत नाही, तोपर्यंत येथील लोकांशी म्हणजे हिंदूंशी जिहाद करून त्यांना संपवणे, हे मुसलमान धार्मिक कर्तव्य समजतात. या देशाविषयी शत्रूभाव बाळगणार्‍या लोकांतून काहींची पोलिसांत भरती करणे म्हणजे देशांतर्गत सुरक्षा यंत्रणेत दुफळी करणे, हे अराजकाचे संकट ओढवून घेण्यासारखे आहे.
तेव्हा मुसलमानांना आधी भारतभक्‍त बनू द्या. जेवढे हिंदू या देशावर प्रेम करतो, तेवढे मुसलमानांनाही करायला शिकवा. भारतावर प्रेम करण्याच्या मोबदल्यात हिंदु काही मागत नाही. तसे निरपेक्ष प्रेम करण्याचा संस्कार मुसलमानांवर करूया. भारतप्रेमाची पहिली साक्ष म्हणजे समान नागरी संहिता मुसलमानांनी मान्य करणे. ज्याला सर्व बायकांची मिळून दोनच मुले आहेत, त्याच मुसलमानाला पोलिसांत भरती होता येईल, असे सरकारने घोषित करावे, `अनिर्बंध संतती कि पोलिसांत नोकरी’, असा पर्याय समोर ठेवा आणि मुसलमान काय उचलतात, ते पहा. मग निर्णय घेणे योग्य ठरेल. देशहिताचे ठरेल.

 |  मित्रांना पाठवा |  8 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

श्री अमरनाथ यात्रेतील वाईट अनुभव !

श्री अमरनाथ देवस्थान येथे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात यात्रा भरते. फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असणारे भाविक श्री. किरण कुलकर्णी यांनी यंदा या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांना यात्रेच्या कालावधीत आलेले वाईट अनुभव हिंदूंना चीड आणणारे आहेत.

 

बालतल ते अमरनाथ यातील १६ कि.मी अंतराच्या प्रवासासाठी १० तास ताटकळावे लागले !
श्री अमरनाथ यात्रा पूर्वीपासूनच अतिशय असुरक्षित व अवघड आहे, असे ऐकले होते; पण त्याचा प्रत्यय या वेळी आला. आम्ही श्रीनगरहून पहाटे २ वाजता निघालो व सकाळी ६.१५ वाजता बालतल येथे आलो. बालतलहून १६ कि.मी.वर श्री अमरनाथची पवित्र गुहा आहे. आम्ही सकाळी ६.१५ पासून हेलीकॉप्टरसाठी रांगेत उभे होतो; पण आधीच लोकांनी हेलीकॉप्टरमधील जागा आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला दुपारी ४.३० वाजताचे तिकीट मिळाले. यामध्ये कोणी तरी २०० तिकिटे गावच्या ओळखीच्या माणसाला दिली होती म्हणे. तेथे आम्हाला शिस्तीचा अभाव वाटला; परंतु उदार भाविकांनी आम्हाला तेथे चहा, बिस्कीटे, पराठे वगैरे दिल्याने संध्याकाळपर्यंत आम्ही टिकाव धरू शकलो.

हेलीकॉप्टरच्या ७ मिनिटांच्या प्रवासासाठी ३ हजार २०० रुपये भाडे !
संध्याकाळी ६ वाजता आम्ही हेलीकॉप्टरने अमरनाथ येथे पोहोचलो. बालतलहून अमरनाथ येथे हेलीकॉप्टरने पोहोचण्यासाठी ७ मिनिटे लागतात व त्यासाठी प्रत्येकी ३ हजार २०० रुपये भाडे आकारले जाते.

बेभरवशाचे हेलीकॉप्टर !
दर्शन घेवून हेलीकॉप्टरने परत जायचे; म्हणून आलो, तर ढगाळ वातावरणामुळे हेलीकॉप्टर आता येणार नाही, असे कळले. आता अमरनाथलाच मुक्काम करावा लागणार, हे समजले. आमच्यापैकी काही जण बालतल येथेच थांबले होते.

दानशूर हिंदूंचा यात्रेकरूंना आधार !
दानशूर हिंदूंनी अमरनाथ यात्रेकरूंसाठी वाटेत लंगर अर्थात भंडारे लावले आहेत. त्यात मोफत जेवण देण्यात येते. अमरनाथ येथे मुक्कामी थांबावे लागल्याने आम्ही लंगरमध्ये जेवण्यासाठी गेलो.

निवासी सुविधांचा अभाव !
अमरनाथ येथे मुक्कामी रहावे लागणार असल्याने व्यापार्‍यांकडून झोपडी (टेन्ट) भाड्याने घेतली. झोपडीसाठी १५० रुपये प्रत्येकी भाडे घेण्यात आले. झोपडीत काहीही सोय नव्हती. झोपण्यासाठी खाली प्लास्टिकचे कापड, त्यावर रजई आणि कमी व्होल्टेजमुळे एक मिणमिणता दिवा होता, तोही ११ वाजता बंद करण्यात आला. पिण्याचे पाणी किंवा इतर सोयी म्हणजे शौचालय वगैरे यांसाठी बाहेरच जावे लागत होते. जी शौचालये होती, ती अतिशय घाण होती. आम्ही दुसर्‍या दिवशी पहाटे ५.१५ वाजता अतिशय थंड पाण्याने चूळ भरून हेलीकॉप्टरच्या रांगेत येऊन उभे राहिलो; पण बालतल येथे गोळीबार झाल्याने हेलीकॉप्टर येणार नाही, असे समजले. मग आम्ही सकाळी १० वाजता घोड्यासाठी प्रत्येकी १२०० रुपये आणि डोलीसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये भाडे देऊन खाली यायचे, असा निर्णय घेतला.
दरवर्षी अमरनाथ येथे एवढ्या मोठ्या संख्येने यात्री येतात; पण त्यांच्या मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत, याचे वाईट वाटले. काश्मीर सरकारतर्फे येथे वीज, निवासी खोल्या, गरम पाणी, सुलभ शौचालये इ. सोयी नक्कीच होऊ शकतील. एवढ्या अडचणी असूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येतात, याचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे !

 |  मित्रांना पाठवा |  5 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : भ्रष्टाचाराचा भस्मासूर

जम्मूमधील हिंदूंचे ५० दिवसांचे आंदोलन म्हणजे ८५ कोटी मृतवत हिंदूंसमोर ठेवलेला आदर्श !

जम्मू-काश्मीर गेले दोन महिने होरपळतेय ! अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणामुळे पहिले श्रीनगर व नंतर जम्मू पेटले. काश्मीरमधील या दोन राजधान्या गेले दीड महिना संचारबंदीच्या छायेत वावरल्या. तथापी धर्मांध मुसलमानांनी श्रीनगर येथे केलेले उग्र व हिंसक आंदोलन हिंदूंवर अन्याय करणारे होते. मुसलमानधार्जिणे सरकार या आंदोलनासमोर नमले व त्यांनी जागा परत घेतली. सरकारच्या अन्याय्य धोरणाचा निषेध करण्यासाठी सहनशीलतेचा अंत झालेले जम्मूतील धर्माभिमानी हिंदू गेली दीड महिना रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. हे आंदोलन न्याय्य आहे. त्यामुळे त्याची दाहकता देशभर पसरली आहे !

 

काश्मीरमधील धर्मांधांनी व सत्ताधार्‍यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर केलेल्या अन्यायाच्या
विरुद्ध देशातील सर्व सत्ताधारी हिंदू राज्यकर्ते `ब्र’ही का काढत नाहीत ?

गेली १६० वर्षे अमरनाथ यात्रा अखंडपणे चालू आहे. आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात दररोज हजारो हिंदू या तीर्थक्षेत्री दर्शन घेण्यासाठी येतात. तरी अजूनही श्री अमरनाथ गुंफेजवळ रहाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे यात्रेकरूंना पहाटे निघून संध्याकाळपर्यंत आपल्या पडावावर परत यावे लागते. बालतलमार्गे यात्रेकरूंना जातांना १६ कि.मी. व येतांना १६ कि.मी. असे एकूण ३२ कि.मी. अंतर एकाच दिवसात पायी कापावे लागते. या प्रवासादरम्यान लागणारे खाण्यापिण्याचे सर्व साहित्य त्यांना निघतांनाच बरोबर घ्यावे लागते. अमरनाथ यात्रेला येणार्‍या भाविकांना अत्यंत प्रतिकूल व लहरी हवामानामुळे व मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. या यात्रेच्या मार्गात प्रत्येक पडावावर भाविकांची सोय तात्पुरत्या तंबूमध्ये केलेली असते. वनखात्याच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायला परवानगी नसल्याने यात्रेकरूंना नैसर्गिक विधी करता यावेत; म्हणून जमिनीत चर खणून त्याभोवती गोण्यांचा आडोसा करण्यात येतो. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात तर परिस्थिती अजूनच बिकट आहे.
(हिंदूंनो, हज यात्रेकरूंसाठी हज घरे उभारणार्‍या व त्यात त्यांना पंचतारंकित सुविधा देणार्‍या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचा हिंदू यात्रेकरूंबद्दलचा हा उदासीनपणा जाणा ! – संपादक )

ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता शाळेला सुटी दिली ! जाब विचारणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुख्याध्यापकाकडून उर्मट उत्तरे !

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत न म्हणणारा मुसलमान मुख्याध्यापक राष्ट्रद्रोहीच होय !

 

उत्राण (जिल्हा जळगाव) येथील मुसलमान मुख्याध्यापकाचा राष्ट्रद्रोह !

उत्राण (तालुका एरंडोल), १६ ऑगस्ट (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील उत्राण या
गावातील उर्दू शाळेतील मुसलमान मुख्याध्यापकाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता विद्यार्थ्यांना सुटी दिली.

(या प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांना या राष्ट्रात रहाण्याचा काय
अधिकार ? – संपादक)
या घटनेचा जाब विचारायला गेलेल्या अखिल भारतीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या मुख्याध्यापकाने “ये हमारे धर्मके खिलाफ है”, असे उर्मट उत्तर दिले. (मुसलमानांना हे उत्तर मान्य आहे का ? या मुख्याध्यापकाचा त्वरित जाहीर निषेध करून मुसलमानांनी ते देशप्रेमी असल्याचे सिद्ध करावे ! – संपादक) या शिक्षकाने `भारतमाता की जय’ या घोषणेऐेवजी `सोनिया गांधीकी जय’, अशी घोषणा मुलांना द्यायला लावली. (काँग्रेसजनांनी या घटनेचा खरोखरीच अंतर्मुख होऊन विचार करावा अन्यथा राष्ट्राभिमानी भारतीय नागरिक या घटनेवरून काय समजायचे, ते समजून गेले आहेतच ! – संपादक) याबाबत विचारणार्‍या अखिल बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्या मुख्याध्यापकाने “तुम्हें जो करना है, वो करो”, असे उर्मट उत्तर दिले. हा वृत्तांत या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. प्रमोद भोईटे यांना जळगाव येथे कळवल्यानंतर त्यांनी या शिक्षकाविरुद्ध जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी व शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्याच्या सूचना केली. त्याप्रमाणे गावाचे सरपंच, तलाठी व पंचमंडळ यांनी ठराव करून निवेदन तयार केले आहे. (देशभक्‍त नागरिकांनो, या राष्ट्रद्रोही शिक्षकाला कडक शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करा ! – संपादक)

 |  मित्रांना पाठवा |  10 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशद्रोही मुसलमान

अहमदाबाद बाँबस्फोटांतील मुख्य सूत्रधाराला अटक

दहशतवाद्यांच्या अटकेची गुजरात पोलिसांनी दाखवलेली तत्परता, हे मोदी यांच्या नेतृत्वाचे प्रतीक !

 

* बाँबस्फोटांमागे सिमीच * १० दहशतवाद्यांना अटक * देशभरातील बाँबस्फोटांचे धागेदोरे उलगडणार

गुजरात पोलिसांना नेत्रदीपक यश !
अहमदाबाद, १६ ऑगस्ट (वृत्तसंस्था) २६ जुलै रोजी शहरात झालेल्या साखळी बाँबस्फोटांमागील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश आले आहे. या बाँबस्फोटांमागे सिमी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा हात असून सूत्रधार मुफ्ती अबू बशीर याला उत्तरप्रदेशातील आजमगढ येथे अटक करण्यात आली, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक श्री. पी.सी. पांडे यांनी दिली.

गुजरात पोलिसांनी पत्रकार परिषद आयोजित करून याबाबत माहिती दिली. बशीर याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला विशेष विमानाने गुजरातमध्ये आणण्यात येणार आहे. भारतात अनेक ठिकाणी बाँबस्फोट झाले; मात्र ते घडवून आणणार्‍या प्रमुख सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलीस अयशस्वी ठरत असत. या वेळी प्रथमच बाँबस्फोट घडवून आणणार्‍या प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, असे श्री. पांडे म्हणाले. २६ जुलै रोजी अहमदाबादमध्ये १७ बाँबस्फोट झाले होते, तर दुसर्‍या दिवशी सुरत शहरात २४ बाँब सापडले होते.

बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण
हे बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी ४० दहशतवाद्यांना केरळमधील अरण्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल २००८ मध्ये हा कट रचण्यात आला. हे बाँबस्फोट घडवून आणण्यात सहभागी झालेले दहशतवादी हे केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांतील आहेत. अहमदाबादमध्ये घडवून आणलेले बाँबस्फोट हा पूर्वनियोजित कट होता. या बाँबस्फोटांसाठी आवश्यक असलेले सामान बाहेरून आणण्यात आले; मात्र बाँबची जोडणी गुजरातमध्ये करण्यात आली. बाँबस्फोटांचे नियोजन करण्यासाठी गुजरातमधील बडोदा, अहमदाबाद, सुरत व भरूच, तर केरळ व कर्नाटक या राज्यांतही दहशतवाद्यांनी बैठका घेतल्या. या प्रकरणात आतापर्यंत १०५ संशयितांची चौकशी करण्यात आली. सिमीच्या दहशतवादी तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतांना त्यांचे नाव बदलले जाते. त्यामुळे एखादा दहशतवादी पकडला गेला, तरी त्या दहशतवाद्याला इतर दहशतवाद्यांचे खरे नाव माहीत नसते. या कारणामुळे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमार्फत इतर दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. त्यामुळे अहमदाबादमधील बाँबस्फोटांमागील खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचणे, हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांतील पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी १ जण विप्रो या प्रसिद्ध कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होता.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा लष्कर- ए-तोयबाशी संबंध
आज अबु बशीर याच्या व्यतिरिक्‍त सिमीच्या १० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यांपैकी २ दहशतवाद्यांचा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती श्री. पांडे यांनी दिली. बशीर हा आजमगढ येथील असून त्याला उत्तरप्रदेश व गुजरात या राज्यांतील पोलिसांच्या पथकांनी अटक केली. गुजरातमधील सिमीचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

`इंडियन मुजाहिदीन’ म्हणजेच `सिमी’ असल्याचे उघड !
अहमदाबादमध्ये साखळी बाँबस्फोट घडवून आणण्याच्या आधी त्याबाबत `इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेने याबाबत वृत्तवाहिन्यांना ई-मेलद्वारे कळवले होते. चौकशीअंती सिमीचेच दुसरे नाव `इंडियन मुजाहिदीन’ आहे, असे उघडकीस आले आहे.

देशातील घातपाती कारवायांमागे सिमी
गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, जयपूर, महाराष्ट्र व हैद्राबाद येथे झालेल्या बाँबस्फोटांमागे सिमी या दहशतवादी संघटनेचा हात आहे, अशी माहिती श्री. पांडे यांनी दिली. “गुजरात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर इतर राज्यांत झालेल्या बाँबस्फोटांचे धागेदोरे मिळू शकतील, असेही ते म्हणाले. (सिमीची पाठराखण करणारे राजदचे नेते व रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव व समाजवादी पक्षाचे श्री. मुलायमसिंग यांना याबाबत काय म्हणायचे आहे ? – संपादक)

केंद्र सरकारसाठी लज्जास्पद दिवस ! – भाजप
संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व लोकजनशक्‍ती पक्ष यांचा सिमीला पाठिंबा आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या मागे सिमीचा हात असल्याचे उघड झाल्यामुळे आजचा दिवस केंद्र सरकारसाठी लज्जास्पद आहे, असे वक्‍तव्य भाजपचे नेते श्री. अरुण जेटली यांनी केले. “सरकारच्या घटकपक्षांनीच सिमीला पाठिंबा दिल्यामुळे दहशतवाद निपटण्याच्या सरकारच्या धोरणांबाबत संशय निर्माण झाला आहे. गेली दोन वर्षे भारतात ठिकठिकाणी साखळी बाँबस्फोट होत आहेत; मात्र दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम कायदे अस्तित्वात नसल्यामुळे या प्रकरणांचा तपास धिम्या गतीने होत आहे”, असेही श्री. जेटली म्हणाले.

देशाची सूत्रे मोदी यांच्याच हाती द्या !
देशभरात अनेक बाँबस्फोट झाले; पण सूत्रधारासह सर्व दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधण्यात केवळ गुजरात पोलीस यशस्वी झाले, हे गुजरातचे कणखर मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचेच यश ! देश दहशतवाद मुक्‍त करण्यासाठी आता देशाची सूत्रे श्री. मोदी यांच्याच हाती द्या !

 |  मित्रांना पाठवा |  10 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत