बंगळुरू ९ साखळी बाँबस्फोटांनी हादरले

२ ठार १२ जखमी

बंगळुरू, २५ जुलै (प्रे.ट्र. / वृत्तसंस्था) – माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ख्याती असणार्‍या बंगळुरू शहरात आज एकामागून एक ९ बाँबस्फोट झाले आणि देश हादरला.

 

(नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे `दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट होणारा पहिल्या क्रमांकाचा देश’, अशी नवी ओळख झालेल्या भारतात आणखी वेगळे काय घडणार ? – संपादक) या बाँबस्फोटांनी दोन वर्षांपूर्वी भारतीय विज्ञान केंद्रावर झालेल्या बाँबस्फोटाची आठवण करून दिली.
आज दुपारी १.३० ते १.४५ या कालावधीत ७ ठिकाणी बाँबस्फोट झाले. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता म्हैसूर रोडवर असलेल्या गोपालन मॉलमध्ये आठवा बाँबस्फोट झाला. या साखळी बाँबस्फोटांत २ जण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. हे बाँबस्फोट कमी शक्‍तीशाली होते. (जनतेचा जीव घेणारे बाँबस्फोट म्हणे सौम्य प्रकारचे ! – संपादक) शहरात घातपात घडवून आणण्यापेक्षा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा बाँबस्फोट घडवून आणण्यामागे हेतू होता. “मदीवाला येथे झालेल्या बाँबस्फोटात १ महिला ठार झाली”, अशी माहिती पोलीस आयुक्‍त श्री. शंकर बिद्री यांनी दिली. रुग्णांना सेंट जॉन व मल्ल्या रुग्णालयांत हालवण्यात आले आहे.

बाँबस्फोट झालेली ठिकाणे
हे बाँबस्फोट अदूगोडी, मदीवाला, नयनदहल्ली, म्हैसूर रोड, रिचमंड सर्कल, पंथरपल्ल्या व विठ्ठल मल्ल्या रोडच्या परिसरात झाले. ही सर्व ठिकाणे शहरातील दक्षिण भागात आहेत. “पहिले चार बाँबस्फोट होसूर रोड व मदीवाला या परिसरात झाले. त्यानंतरचे ३ बाँबस्फोट नयनदहल्ली, विठ्ठल मल्ल्या रोड व रिचमंड सर्कल येथे झाले”, अशी माहिती शहराचे आयुक्‍त श्री. शंकर बिद्री यांनी पोलिसांना दिली. मदीवाला परिसर हा शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. मदीवालातील बसस्थानकात हा स्फोट झाला. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता गोपालन मॉल व उत्तर बंगळुरूमध्ये दोन बाँबस्फोट झाले.

बाँबस्फोटांनंतर शहरात दहशतीचे वातावरण !
बाँबस्फोटांनंतर शहरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. (बाँबस्फोट रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न काढता बाँबस्फोटांनंतर प्रतिबंधात्मक सुरक्षाव्यवस्था वाढवणारे सरकार म्हणे दहशतवाद निपटणार ! – संपादक) स्फोटांनंतर दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली असून `नागरिकांनी घाबरून जाऊ नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बाँबस्फोट झाल्यानंतर लोकांची
घरी जाण्यासाठी झुंबड उडाली. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली. “शहरात आणखी १२ ठिकाणी जिवंत बाँब पेरल्याची शक्यता आहे. पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्‍न करत आहेत. हे बाँब मिळाल्यानंतर ते निकामी करण्यात येतील”, असे कर्नाटकचे पोलीस महासंचालक श्री. श्रीकुमार म्हणाले.

बाँबस्फोटांमधील साहित्य शोधण्यासाठी तपास सुरू
हे बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी `टायमर’ लावलेल्या क्रूड बाँबचा वापर करण्यात आला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या बाँबस्फोटांची तीव्रता १-२ ग्रेनेड स्फोटांएवढी होती. हे स्फोट घडवून आणण्यासाठी जिलेटीन स्टीक्स वापरल्याचा तसेच अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. गुन्हे वैद्यकशास्त्राचे पथक व बाँबनिकामी करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

बाँबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर देशात अतीदक्षतेचे आदेश
बंगळुरूमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी दक्षतेचे आदेश देण्यात आले. “मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर इत्यादी शहरांतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे”, अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. अनामी रॉय यांनी दिली.

सिमीचा हात असण्याची शक्यता
या बाँबस्फोटांची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही; मात्र बंदी घालण्यात आलेल्या `सिमी’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता केंद्रीय गृह खात्यातील सूत्रांनी वर्तवली. या स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले साहित्य पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने पुरवले असल्याची शक्यता आहे. (पाकिस्तान भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे, याचे आणखी किती पुरावे सापडल्यावर भारत सरकार त्याच्या विरोधात पावले उचलणार ! – संपादक)

ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत
बाँबस्फोटांमध्ये ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे”, अशी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली. सर्वांनी धार्मिक एकोपा पाळावा, असे सांगत श्री. सिंग यांनी या बाँबस्फोटांचा निषेध केला आहे. (दहशतवादाचा धार्मिक एकोप्याशी काय संबंध ? – संपादक)

कर्नाटकातील हालचालींवर केंद्रीय गृह मंत्रालयाची नजर
बंगळुरूमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्रालय नजर ठेवून आले, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव श्री. मधुकर गुप्‍ता यांनी दिली. केंद्रातील गृह खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी कर्नाटकमधील सरकारी अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांनी या बाँबस्फोटांचा निषेध केला आहे. “परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार कर्नाटक सरकारला सर्वतोपरी मदत करणार”, असे श्री. पाटील म्हणाले.


कर्नाटक सरकारला बाँबस्फोटांची पूर्वकल्पना देण्यात आली होती – जयस्वाल
कानपूर, २५ जुलै (प्रे.ट्र.) – बंगळुरू व हैद्राबाद या शहरांमध्ये दहशतवादी बाँबस्फोट घडवू शकतात, अशी सूचना केंद्र सरकारने कर्नाटक व आंध्रप्रदेश या दोन राज्यांना दिली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. श्रीप्रकाश जयस्वाल यांनी दिली. “माहिती व तंत्रज्ञान शहरे म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगळुरू व हैद्राबाद या शहरांमध्ये दहशतवादी बाँबस्फोट घडवून आणणार, अशी माहिती केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेला मिळाली होती. या दोन्ही राज्यांच्या सरकारांना दक्षता बाळगण्यासाठी सांगण्यात आले होते. दहशतवाद पसरवण्यासाठी बंगळुरूमध्ये बाँबस्फोट घडवून आणण्यात आले”, असे ते म्हणाले. (जनतेला सुरक्षित जीवन देणे, ही प्रामुख्याने केंद्र सरकारची जबाबदारी असतांना राज्य सरकारवर ढकलणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री ! – संपादक)


हे दुष्टचक्र आणखी किती वर्षे चालणार ?

साल शहर जिवितहानी
१. १३ जानेवारी २००८ जयपूर ६३ ठार
२. २५ ऑगस्ट २००७ हैद्राबाद ४२ ठार
३. १८ मे २००७ मक्का मशीद, हैद्राबाद १३ ठार
४. ८ सप्टेंबर २००६ मालेगाव ३७ ठार
५. ११ जुलै २००६ मुंबई २०० ठार
६. ७ मार्च २००६ वाराणसी २१ ठार
७. २१ ऑक्टोबर २००५ दिल्ली ७० ठार
८. १५ ऑगस्ट २००४ आसाम १६ ठार
९. २५ ऑगस्ट २००३ मुंबई ५२ ठार
१०. १६ फेब्रुवारी १९९८ कोईमतूर ४६ ठार
११. १२ मार्च १९९३ मुंबई २५७ ठार

 |  मित्रांना पाठवा |  41 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत

राष्ट्रद्रोही व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत !

हिंदूंनो, सावधान ! देवतांची नग्न चित्रे काढणारे हुसेन भारतात परतत आहेत !

लंडन, २५ जुलै (वृत्तसंस्था) – हिंदु देवता व भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणारे व भारतातून पलायन करून लंडन व दुबई येथे आसरा घेतलेले चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत आहेत.

लंडन येथील एकोणिसाव्या शतकातील महान चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्वत: हुसेन यांनी भारतात परतत असल्याची घोषणा केली. (राष्ट्रद्रोही कृत्य करणारे हुसेन भारतात परतल्यावर त्यांच्या हातात कायद्याचे रक्षक बेड्या घालतील का ? – संपादक) भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रांची मालिका रेखाटून पूर्ण होताच आपण भारतात परतू, असे ते म्हणाले.

 |  मित्रांना पाठवा |  33 – वाचक संख्या |  छापील प्रत

 निगडीत वृत्त : देवतांचे विडंबन करणारे हिंदू धर्माचे वैरी

हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे अंनिसला आश्‍वासन

हिंदूंनो, सावधान ! तुमच्या धर्माचरणावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुन्हा डोके वर काढत आहे !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा सरकारने त्वरित करावा, या
मागणीसाठी आज आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या `थोबाडीत मारा’ आंदोलनाचा विचका झाला.

हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या प्रमाणात असलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना अखेर आंदोलन गुंडाळावे लागले; मात्र घाईघाईने भेट देणारे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्यात येईल, असे आपल्याला आश्‍वासन दिल्याचे डॉ. दाभोलकर यांनी या वेळी सांगितले. (हिंदूंनो, हिंदु धर्मावर घाला घालणार्‍या या धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी स्थानिक आमदारांना भेटा ! – संपादक)
आंदोलनाच्या वेळी अंनिसच्या शिष्टमंडळाने आज सामाजिक न्यायमंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत कार्यकर्त्यांना माहिती देतांना डॉ. दाभोलकर म्हणाले, “हंडोरे यांच्याशी माझा वाद झाला. `तुम्ही संयुक्‍त चिकित्सा समितीचे कामकाज १५ महिन्यांत पूर्ण केले नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर हिवाळी अधिवेशनापूर्वी कामकाज पूर्ण करण्याचे आश्‍वासन द्या’, असे मी श्री. हंडोरे यांना सांगितले; मात्र ते आपली तबकडी वाजवत बसले. या वेळी श्री. हंडोरे यांनी, `मी कायद्याच्याच बाजूने आहे; म्हणूनच कायदा इथपर्यंत आला. कायद्यासाठी सर्वांनीच मिळून काम केले पाहिजे. कायद्याबाबत जे गैरसमज आहेत, ते दूर केले पाहिजेत’, असे सांगितले. या वेळी श्री. हंडोरे यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही; मात्र कायदाविरोधी लोकांची समजूत काढता येईल व हिवाळी अधिवेशनात कायदा मंजुरीसाठी आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दर १५ दिवसांनी श्री. हंडोरे यांचे सचिव अंनिसला कायद्याविषयी माहिती देत रहातील, असे शेवटी ठरले”, असे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांच्याशी भेट ठरलेली नसतांनाही त्यांनी आमच्याकडे भेट मागितली होती. श्री. पाटील यांच्याशी आमची फक्‍त ३ मिनिटेच भेट झाली. या वेळी श्री. पाटील म्हणाले की, कायदा अधिवेशनात व्हावा, यासाठी कामकाज बैठकीत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनीही तसे मान्य केले होते; मात्र संयुक्‍त चिकित्सा समितीचे कामकाज पूर्ण झालेले नाही. अधिवेशनानंतर आगामी ४ ऑगस्टच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या वेळी तुम्ही या आपण मुख्यमंत्र्यांकडे वेगळे बसून चर्चा करू. कायदा व्हावा, असे मलाही वाटते.”
विधानसभा अध्यक्ष श्री. बाबासाहेब कुपेकर यांनीही मुख्यमंत्र्यांशी त्यांची वेगळया विषयावर बैठक असल्याचे सांगून या बैठकीत मी कायद्याविषयी त्यांच्याशी चर्चा करीन, असे आश्‍वासन दिले असल्याचे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.


अंनिसच्या आंदोलनाचे खरे स्वरूप !


अंनिसच्या आंदोलनाच्या मंडपाशेजारीच शेकापचे नेते श्री. एन्.डी. पाटील यांचे रायगड जिल्ह्यातील `सेझ’च्या विरोधात आंदोलन सुरू होते. तेथे आलेल्या शेतकर्‍यांना अंनिसवाले त्यांच्या मंडपात बोलावत असल्याचे दिसले. अंनिसच्या मंडपात जेमतेम ४० कार्यकर्तेच उपस्थित होते.

 |  मित्रांना पाठवा |  39 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा

ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत शिवसैनिक ताजमहालमध्ये घुसले

नवी दिल्ली, २४ जुलै (प्रे.ट्र./ वृत्तसंस्था) – ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सांगत आज शिवसैनिकांनी ताजमहालच्या परिसरामध्ये पूजा केल्याचा दावा केला; मात्र या वृत्ताचा ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्‍या व्यवस्थापनाने नकार दिला.

 

आमयाचे पोलीस अधीक्षक श्री. रघुवीर लाल म्हणाले, “शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. वीरू लबानिया यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ताजमहालच्या परिसरात जाण्यासाठी तिकिट
खरेदी केले.” उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक श्री. ब्रीज लाल म्हणाले, “श्री. लबानिया यांच्यासमवेत पाच कार्यकर्ते व २ महिला कार्यकर्त्या होत्या. ते सर्व वास्तूच्या बाहेर आले; मात्र त्यांनी आतमध्ये पूजा केली नाही. ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्‍या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची श्री. लबानिया व इतर कार्यकर्त्यांवर बारीक नजर होती.” श्री. लबानिया यांनी ताजमहालच्या बाहेर आल्यावर त्यांनी ताजमहालमध्ये पूजा केल्याचा दावा केला. “श्री. लबानिया यांनी पूजा करण्यासाठी कोणतेच साहित्य नेले नव्हते. त्यामुळे त्यांनी पूजा केली नाही, अशी माहिती श्री. ब्रीज लाल यांनी दिली. “ताजमहालमध्ये पूजा करण्यात आलेली नाही”, अशी माहिती उत्तरप्रदेशचे गृहसचिव श्री. महेशकुमार गुप्‍ता यांनी दिली. ताजमहालला भेट देणारे सातही जण शिवसैनिक होते. ताजमहालच्या परिसरातून बाहेर आल्यावर या कार्यकर्त्यांनी त्यांचे एकत्रित छायाचित्र काढले. “हे सर्व घडतांना सुरक्षाजवान तेथे उपस्थित होते. तेथे पूजा करण्यात आलेली नाही. ताजमहालच्या परिसरात पूजा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रश्‍नच नाही”, असे श्री. ब्रीज लाल म्हणाले.

ताजमहालचा मुद्दा शिवसेनेच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही – खासदार संजय राऊत
ताजमहालमध्ये प्रवेश करण्याच्या प्रकाराची आग्रा येथील शिवसैनिकांनी वरिष्ठांना माहिती दिलेली नव्हती. या प्रकरणाची आपण चौकशी करत आहोत, असे वक्‍तव्य शिवसेनेचे खासदार व `दैनिक सामना’चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी `झी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. `ताजमहल ही भारताची ऐतिहासिक वास्तू असून त्याला कोणत्याही धर्माशी जोडू नये’, असे ते म्हणाले.

ताजमहल नव्हे, शिवालय आणि तोच तेजोमहालय !
ताजमहाल म्हणजे शिवालय असल्याचा दावा आश्चर्यचकित करणारा नाही. ताजमहाल म्हणजे शिवालय आहे, असे सांगणारे शिवसैनिक एकटेच नाहीत. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहासाचे संशोधक कै. पु.ना. ओक यांनी तर या विषयावर `ताजमहाल तेजोमहालय आहे’ हे पुस्तकच लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी जवळजवळ १२० पुरावे दिले आहेत. ताजमहाल ऊर्फ तेजोमहालय हा शहाजहानपूर्व हिंदु प्रासाद आहे. शहाजहानने ताजमहाल बांधल्याचा काडीचाही पुरावा नाही. असे असतांनाही अनेक पिढ्यांच्या इतिहासतज्ञांनी केवळ इस्लामी थापांची शहनिशा न करता री ओढली आहे !

ताजमहाल शिवमंदिर असल्याचे पुरावे !
ताजमहाल ही इस्लामिक वास्तू नसल्याच्या पु.ना. ओक यांनी दिलेल्या पुराव्यांपैकी काही निवडक पुरावे जुजबी बदल करून येथे देत आहोत.
१. `ताजमहाल’ हा शब्दच मुळी शहाजहान व औरंगजेब यांच्या दरबारी कागदपत्रात वा समकालीन बखरीत उल्लेखित नाही. कारण तो `तेजोमहालय’ असा संस्कृत शब्द आहे. कडवे मुसलमान संस्कृत शब्दांचा उल्लेख जाणूनबुजून टाळतात.
२. विश्‍वकर्मा वास्तूशास्त्रात पंचमहाभूतागणिक शिवलिंगाचे पृथ्वीलिंग, आकाशलिंग, वायूलिंग, आपलिंग व तेजोलिंग असे पाच प्रकार नमूद आहेत. भारतातील सर्व प्रसिद्ध प्राचीन शिवक्षेत्रांत वरीलपैकी कोणत्या प्रकारचे लिंग प्रस्थापित आहे, ते भक्‍तांनी व प्रेक्षकांनी स्थानिक पुजारी इ. जाणकार व्यक्‍तींकडून ज्ञात करून घ्यावे. आमयास तेजोमहालयात शिवाचे तेजोलिंग होते, हे त्या नावावरून स्पष्ट आहे. आग्रा हे नगर व ती वास्तू त्यांतील तेजोलिंगासाठी पूर्वापार प्रसिद्ध होती, हे पीटर मंडी या आंग्ल व बर्निए या फ्रेंच प्रवाशांच्या नोंदीवरून स्पष्ट आहे.
३. आमयात जाट लोकांची वस्ती आहे. ते लोक शंकराला तेजाजी म्हणतात. त्यांचे ते तेजोमहालय होते.
४. आमयातील कर्मठ लोक श्रावणमासातील सोमवारी पूर्वापार पाच स्थानिक शिवलिंगांचे दर्शन घेऊन उपवास सोडीत. त्यातील पृथ्वीनाथ, बलकेश्‍वर, राजराजेश्‍वर व मनकामेश्‍वर अशा चारांचेच दर्शन घेऊन आधुनिक पिढ्यांना समाधान मानावे लागते. पाचवे शिवमंदिर कोणते, याचे ज्ञान काळाच्या ओघात नष्ट झाले. ते पाचवे प्रसिद्ध, पवित्र शिवक्षेत्र तेजामहालय होय.
५. गेली ३५० वर्षे जगातील कोट्यवधी प्रेक्षकांनी प्रवेश-शुल्क देऊन ताजमहाल पाहिला. तरी ताजमहालातील नक्षीकामात ॐ, शंखाकृती पाने, नागयुगले, त्रिशूळ, कमळे, घुमटावरील नारळाकृतीने मंडित सुवर्णकलश, थडग्याभोवतीच्या जाळीवरील कलश इ. वैदिक चिन्हे स्वत:ही पाहिली नाहीत व सरकारमान्य स्थलदर्शकांनीही (guides) त्यांना ती दाखवली नाहीत. यावरून ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण-परीक्षण किती आंधळेपणाने चालते ते दिसते, तसेच पुरातत्वविद, इतिहासतज्ञ व अन्य विद्वानही ऐतिहासिक वास्तू किती उथळपणे पहातात, ते दिसते. एकूण ऐतिहासिक वास्तूंची बारकाईने पाहणी न करणे, बखरीतील उल्लेख जनतेपासून लपवून ठेवणे अथवा त्यांचा अर्थ फिरवून जनतेची दिशाभूल करणे, असे घोर अपराध आजवरचे पदवीप्राप्‍त अधिकारी इतिहासतज्ञांकडून झाले आहेत.
६. शहाजहानच्या क्र. २ च्या राणीचे नाव मुमताझ्-उल-झमानी असे कागदोपत्री नोंदलेले आहे. तरीही तिचे नाव मुमताझमहल होते, असा इतिहासतज्ञांनी खोटा डांगोरा पिटून त्या इमारतीचे नाव ताजमहाल पडले, ते मुमताझमहल त्यात पुरली आहे म्हणून, अशी सर्वांची फसवणूक केली. तिचे नाव मुमताझमहलच होते, असे जरी घटकाभर धरून चालले तरी त्यातील पहिली दोन `मुम’ ही अक्षरे वगळून उरलेली पाच अक्षरे (ताजमहाल) हे इमारतीचे नाव उरते, हे कोठल्या तत्त्वान्वये ?
७. मुमताझचे प्रेत ताजमहालात पुरले तरी आहे कि नाही, या बाबतीत नि:पक्षपणे शोध घेणे आवश्यक आहे. कारण ती बुर्‍हाणपूर नगरी वारली होती व सहा महिने तिला तेथे पुरलेही होते. शहाजहानास खरोखर ताजमहाल बांधायचा असता, तर तो त्याने बुर्‍हाणपुरातील मुमताझच्या कबरीवर बांधला असता. सहा महिने जमिनीत कुजलेले प्रेत काढून कोणी अन्यत्र उकरून नेत नाही.

 |  मित्रांना पाठवा |  114 – वाचक संख्या |  छापील प्रत

रामसेतू प्रकरणी केंद्र सरकारची पुन्हा सावध भूमिका वादग्रस्त प्रतिज्ञापत्राबाबत २९ रोजी सर्वोच्च न्यायालयात उत्तर देणार

नवी दिल्ली, २४ जुलै (प्रे.ट्र.) – श्रीरामाने स्वत:च्याच बाणाने रामसेतू तोडल्याचे काल सर्वोच्च न्यायालयाला सांगणार्‍या केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने आज रामसेतू प्रकरणी सावध भूमिका घेतली. रामसेतू प्रकरणी सरकारची भूमिका २९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली जाईल, तसेच सरकार पर्यायी मार्गाविषयीचा तोडगाही न्यायालयाला सादर करणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

सेतूसमुद्रम प्रकल्पाला विरोध करण्यासाठी धर्म व श्रद्धा यांचा आधार घेणार्‍या विरोधकांवर सरकारी वकील फली एस्. नरीमन यांनी टीका केली. श्रीलंकेतून कोणीही भारतात येऊ नये, म्हणून श्रीरामाने रामसेतू तोडल्याचा उल्लेख `कामबन रामायण’ व `पद्मपुराण’ यांमध्ये आहे, असे नरीमन यांनी सांगितले. (पुराणांवर विश्‍वास न ठेवणार्‍या निधर्मी सरकारला या ग्रंथाचा संदर्भ खरा वाटणे हास्यास्पद आहे. हिंदूंच्या ग्रंथांचा सोयीस्करपणे उपयोग करून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणारे धर्मद्रोही सरकार ! – संपादक) २००४ साली सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी खोदकाम सुरू होताच हिंदूंनी रामसेतू नष्ट होण्याच्या भीतीने या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली होती. रामसेतू तोडल्यास त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणतज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

केंद्र सरकारच्या वादग्रस्त प्रतिज्ञापत्रावर भाजपचा आक्षेप
सेतूसमुद्रम प्रकल्पाला विरोध करण्यासाठी धर्माचा आधार घेतला जात असल्याचा आरोप करणार्‍या केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राला भाजपने आज आक्षेप घेतला. केंद्र सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणार्‍या द्रमुक पक्षाला त्याचा मोबदला देण्यासाठीच संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारने हा मुद्दा पुढे रेटला आहे, असा दावा भाजपने आज केला. केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे भाजपचे नेते श्री. व्ही.के. मल्होत्रा यांनी सांगितले. या मुद्यावर सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी सांगितले. विश्‍व हिंदु परिषदेनेही सरकारने रामसेतूच्या विरोधात भूमिका घेतल्यास देशव्यापी संपाचा
इशारा दिला आहे.

 |  मित्रांना पाठवा |  29 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : रामसेतू प्रकरण

थोबाडीत मारून कायदे होत नाहीत, तर चर्चा व अभ्यास करून कायदे करावे लागतात ! – आमदार दिवाकर रावते

मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – राज्यशासनातर्फे प्रस्तावित (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयक सध्या संयुक्‍त चिकित्सा समितीकडे आहे. या संदर्भात १ लाख ४० हजार जनमते जमा झालेली आहेत. त्या मतांची अद्याप चिकित्सा झालेली नाही, तसेच कायद्याच्या गाभ्याची चर्चासुद्धा झालेली नाही. थोबाडीत मारून कायदे होत नाहीत, तर चर्चा व अभ्यास करून कायदे करावे लागतात, असे स्पष्ट प्रतिपादन विधान परिषदेतील शिवसेनेचे सभागृह नेते व समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री. दिवाकर रावते यांनी `दै. सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी विधान भवनात बोलतांना केले. त्यामुळे कोणी थोबाडीत मारून घेतले म्हणून हा कायदा संमत होणार नाही आणि चालू पावसाळी अधिवेशनात येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 

कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक प्रथा व परंपरा यांच्यावर प्रतिबंध आणणारा आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात वादग्रस्त ठरत असलेला (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा चालू पावसाळी अधिवेशनात चर्चेला येणार, अशा वावड्या काही प्रसिद्धीमाध्यमे व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याद्वारे उडवल्या जात आहेत आणि त्यांना राज्यशासनातर्फे दुजोरा दिला जात आहे; मात्र या सर्वांकडून जनतेची दिशाभूल होतांना दिसत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर कायदा संमत व्हावा, यासाठी विविध आंदोलने करून राज्यशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्‍न करत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवनात संयुक्‍त चिकित्सा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते श्री. पांडुरंग फुंडकर व आम्ही ठाम भूमिका घेऊन अधिवेशन संपल्यानंतर पंढरपूर येथे वारकरी संप्रदायातील सर्व संघटनांबरोबर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतरच समितीच्या बैठकीत प्रत्येक कलमावर विस्तृत चर्चा होईल, असे ठरले आहे, असे श्री. रावते यांनी सांगितले. म्हणजेच हे विधेयक या चालू अधिवेशनात चर्चेला येणार नाही, हे स्पष्ट होते. श्री. रावते पुढे म्हणाले, “हा कायदा लवकर व्हावा, यासाठी ज्या संस्था कार्यान्वित आहेत, त्यांना हे कळत नाही की, जनतेच्या दृष्टीने सर्वंकष कायदा करतांना तो योग्य कि अयोग्य हे जबाबदारीने पाहिले जाते. तो कोणाच्या हट्टावरून, आग्रहावरून व थोबाडीत मारले म्हणून होत नाही. या राज्यात स्वत:च्या हाताने स्वत:च्या थोबाडीत मारणे हा गुन्हा होत नाही; पण आपल्या हाताने दुसर्‍याला मारणे हा गुन्हा होतो. या राज्यात जोपर्यंत लोक श्रद्धेने पूजाअर्चा करत रहातील, तोपर्यंत अशा श्रद्धाविरोधी लोकांना स्वत:लाच थोबाडीत मारून घ्यावे लागेल.” या संदर्भात विधान भवनातील एका अधिकार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यशासन कोठेही चर्चा करून शकते. कोणी काहीही वक्‍तव्य केली, तरी हे विधेयक आता विधानभवनाच्या मालकीचे आहे. त्यामुळे संयुक्‍त चिकित्सा समितीचे सदस्य जे ठरवतील, त्याप्रमाणे घडणार. म्हणजे आधी वारकरी संप्रदायाबरोबर चर्चा होणार आणि त्यानंतरच पुढील बैठक होईल. त्यामुळे हे विधेयक चालू अधिवेशनात चर्चेला येणार नाही.

 |  मित्रांना पाठवा |  38 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा