जनतेच्या पैशांतून शासकीय योजना राबवून त्यात भ्रष्टाचार करणारे प्रशासन हटवा !मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत पंतप्रधानांच्या विशेष आर्थिक सामूहिक विकासासाठी ६ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. राज्यशासनानेही त्यासाठी खर्च केला; मात्र याबाबतची आकडेवारी सादर करतांना `वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन’ने ९ कोटी २२ लाख रुपये, महिला बाल कल्याण आयुक्तांनी १२ कोटी ७८ लाख रुपये, तर महिला व बालविकास अधिकार्याने सहा लेखापालांकडे सादर केलेल्या एकत्रित आकडेवारीत ११ कोटी ५८ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. एकाच कारणासाठी खर्च केलेल्या या रकमेबाबत तिन्ही अहवालात विसंगती असून हा खर्च अहवाल अद्याप सदनांच्या मंजुरीसाठी आलेला नाही. तो आजवर दाबून ठेवण्यात आल्याने भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. नितीन गडकरी यांनी आज विधान परिषदेत केली. | मित्रांना पाठवा | 18 – वाचक संख्या | छापील प्रत |
निगडीत वृत्त : लोकहो भ्रष्टाचार रोखा
|


