आर्थिक खर्चाचे अहवाल दाबून ठेवून भ्रष्टाचार करू नका – नितीन गडकरी

जनतेच्या पैशांतून शासकीय योजना राबवून त्यात भ्रष्टाचार करणारे प्रशासन हटवा !

मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत पंतप्रधानांच्या विशेष आर्थिक सामूहिक विकासासाठी ६ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.

राज्यशासनानेही त्यासाठी खर्च केला; मात्र याबाबतची आकडेवारी सादर करतांना `वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन’ने ९ कोटी २२ लाख रुपये, महिला बाल कल्याण आयुक्‍तांनी १२ कोटी ७८ लाख रुपये, तर महिला व बालविकास अधिकार्‍याने सहा लेखापालांकडे सादर केलेल्या एकत्रित आकडेवारीत ११ कोटी ५८ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. एकाच कारणासाठी खर्च केलेल्या या रकमेबाबत तिन्ही अहवालात विसंगती असून हा खर्च अहवाल अद्याप सदनांच्या मंजुरीसाठी आलेला नाही. तो आजवर दाबून ठेवण्यात आल्याने भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. नितीन गडकरी यांनी आज विधान परिषदेत केली.
या प्रकरणी उपस्थित झालेल्या तारांकित प्रश्‍नाच्या निवेदनात महिला व बालविकास मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी या जिल्हा खर्च अहवालात तफावत असल्याची कबुली दिली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार श्री. दिवाकर रावते यांनी खोटे विवाह दर्शवून अनुदान लाटण्याच्या या प्रकारावर तीव्र कोरडे ओढले. पितळेची मंगळसूत्रे, निकृष्ट भांडी देणार्‍या या शासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अकोला व यवतमाळ येथे बोगस विवाह झाल्याचे मंत्र्यांनी मान्य केले. (लोकहो, हे आहे तुमच्या पैशांतून चालवल्या जाणार्‍या शासकीय योजनांचे खरे स्वरूप ! – संपादक) संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु विरोधी सदस्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केल्यावर सभापती श्री. शिवाजीराव देशमुख यांनी महिला व बाल कल्याण मंत्र्यांना असे अहवाल वित्त मंत्रालयाकडे येत असतात, असे सांगून त्यांच्याकडून ते मागवून घेत सदनासमोर ठेवण्याची प्रथा पार पाडत संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

 |  मित्रांना पाठवा |  18 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : लोकहो भ्रष्टाचार रोखा

लज्जास्पद स्थितीत संपुआ सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

सत्तेच्या खेळातील घोडेबाजार ही ५८ वर्षांतील भारतीय लोकशाहीची अधोगती !

नवी दिल्ली, २२ जुलै (वृत्तसंस्था) – आज संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारने विश्‍वासदर्शक ठराव १९ मतांनी जिंकला. आज ठरावाच्या बाजूने २७५ खासदारांनी मतदान केले, तर त्याच्या विरोधात २५६ खासदारांनी मतदान केले.

 

अणूकराराच्या मुद्यावर अल्पमतात आलेल्या सरकारला विरोधी पक्षाची मते मिळाली, हे मतदानाच्या वेळी स्पष्ट झाले. (ही मते अर्थव्यवहारातून मिळाली नसतील, हे कशावरून ? – संपादक) मतदानाच्या सुरुवातीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १ मिनिटांचे भाषण केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संसदेला संबोधित करण्यासाठी उभे रहाताच विरोधकांनी सभागृहाच्या हौदात येऊन `पंतप्रधान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. भाषणाच्या सुरुवातीला भाजपच्या खासदारांनी त्यांना लाच
दिल्याचा आरोप केल्याबद्दल डॉ. सिंग यांनी दु:ख व्यक्‍त केले. “या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्‍तींवर कठोर कारवाई करण्यात येईल”, असे त्यांनी आश्‍वासन दिले.
त्यानंतर पंतप्रधानांनी विश्‍वासदर्शक ठराव मांडला. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे ४८७ जणांनी मतदान केले, तर ५१ जणांनी मतदानपेटीद्वारे त्यांचे मत मांडले. १० खासदार सभागृहात मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले. (देशाच्या राजकारणाशी निगडित अत्यंत महत्त्वपूर्ण मतदानात सहभाग न घेणारे लोकप्रतिनिधी जनताद्रोही आहेत ! अशांना पुढील निवडणुकीत धडा शिकवा ! – संपादक)


लोकसभेत भाजपच्या खासदारांनी दाखवल्या नोटा !
लोकसभेच्या इतिहासातील लज्जास्पद घटना !
भाजपच्या खासदारांना विकत घेण्याचा सत्ताधार्‍यांनी प्रयत्‍न केला, असा आरोप करत आज भाजपच्या तीन खासदारांनी पुरावा म्हणून त्यांना देण्यात आलेली १ कोटी रुपयांचे नोटांचे गठ्ठे थेट लोकसभेच्या अध्यक्षांसमोर नाचवले. या घटनेमुळे लोकसभेत एकच गोंधळ उडाला. याचे थेट प्रक्षेपण सर्व देशाने पाहिले. (असा चालतो घोडेबाजार ! लोकशाहीचे हे अध:पतन रोखण्यासाठी वैचारिक क्रांतीच हवी ! – संपादक)
या घटनेनंतर विरोधी पक्षाचे सदस्य लोकसभेच्या हौद्यात जमा झाले. भाजपचे श्री. फग्गनसिंग कुलस्ते, श्री. अशोक अर्गल व श्री. महावीरसिंग भगोडा या तीन खासदारांनी त्यांना समाजवादी पक्ष तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव अहमद पटेल यांनी विश्‍वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या वेळी सभागृहामध्ये अनुपस्थित रहाण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्‍न केला, असा आरोप केला. यामध्ये
श्री. अमरसिंग यांचा हात असल्याचा खासदारांचे म्हणणे आहे.
काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विश्‍वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर १६ तास खासदारांची भाषणे सुरू होती. आज अनेक वरिष्ठ खासदारांची भाषणे झाल्यानंतर श्री. राहुल गांधी यांचे भाषण झाले, त्यानंतर रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांचे भाषण झाले. त्यानंतर श्री. फग्गनसिंग कुलस्ते, श्री. अशोक अर्गल व श्री. महावीरसिंग भगोडा हे भाजपचे तीन खासदार उठले व त्यांनी १ कोटी रुपयांची बंडले सभागृहाला दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष श्री. सोमनाथ चॅटर्जी यांनी संसदेचे कामकाज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबवले व प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यानंतर विविध वृत्तवाहिनींवरील प्रक्षेपणही बंद करण्यात आले.
भाजपचे मध्यप्रदेशातील खासदार श्री. अशोक अर्गल यांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी ३ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्‍न केला. श्री. अर्गल यांना `अँडव्हान्स’मध्ये १ कोटी रुपये देण्यात आले, अशी माहिती भाजपचे नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी दिली. “या तीनही खासदारांना ३ कोटी रुपये सभागृहामध्ये आणण्यास सांगितले”, असे श्री. अडवाणी म्हणाले.विश्रांतीगृहातून मतदान करण्यास अध्यक्षांची परवानगी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपचे चार खासदार सभागृहात येऊन मतदान करू शकले नाहीत. त्यांना आहे त्या ठिकाणी मतदान करण्याची परवानगी लोकसभेच्या अध्यक्षांनी दिली. हे चारही खासदार लोकसभेच्या विश्रांतीगृहात आहेत. भाजपचे खासदार श्री. गरोडिया यांची `बायपास’ शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना अँम्बुलन्सच्या साहाय्याने लोकसभेच्या विश्रांतीगृहात आणण्यात आले. त्यांनी विश्रांतीगृहातून मतदान केले. भाजपचे वरिष्ठ नेते तसेच माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीगृहातून मतदान केले.


राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी गदारोळ !
नवी दिल्ली – आज सकाळच्या सत्रात केंद्र सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या चर्चेच्या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार श्री. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात गरिबी आणि ऊर्जा या मुद्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला. त्या वेळी `भारतातील गरिबीचा संबंध ऊर्जाप्रश्‍नाशी कसा जोडला जाऊ शकतो’, असा आक्षेप घेत विरोधकांनी खा. राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळे आणले. या खासदारांमध्ये विशेषत: बहुजन समाज पार्टीचे खासदार जास्तच आक्रमक झाले होते. या गदारोळामुळे लोकसभेचे अध्यक्ष श्री. सोमनाथ चटर्जी यांना संसदेचे सत्र अर्ध्या तासासाठी स्थगित करावे लागले.
लोकसभेच्या अध्यक्षांनी गोंधळ घालणार्‍या सदस्यांना वेळोवेळी शांत राहण्याचा व शिस्तीचा सल्ला देऊनही संबंधित सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्याच वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य काही काँग्रेसचे खासदार श्री. राहुल गांधी यांच्या मदतीला धावून आले. त्यांनीही संबंधित खासदारांना शांत राहण्याची आणि खा. गांधी यांना आपले बोलणे पुरे करू देण्याची विनंती केली. तथापी या विषयावरील गोंधळ खूपच वाढल्याने आणि बसपचे खासदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने श्री. चटर्जी यांनी लोकसभेचे सत्र जेवणाच्या सुटीसाठी दुपारी १.१० च्या सुमारास अर्ध्या तासासाठी स्थगित केले.

भारत चीनपेक्षा मोठा होऊ नये, असे साम्यवाद्यांना वाटते – चिदंबरम
अर्थमंत्र्यांना उशिरा सुचलेले शहाणपण !
नवी दिल्ली – देशातील तरुणपिढीचे भविष्य घडवायचे असेल, तर अणूकरार अत्यावश्यक आहे. आपल्या देशात असे काही लोक आहेत की, त्यांना चीनपेक्षा भारत मोठा होऊ नये, असे वाटते. म्हणून ते अणूकराराला विरोध करत आहेत. अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री श्री. पी. चिदंबरम यांनी लोकसभेत केली. पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने ते चर्चेत सहभागी झाले होते.
श्री. चिदंबरम यांनी त्यांच्या भाषणात चीन आणि भारत यांचा तुलनात्मक अभ्यास मांडला. चीनमध्ये सध्या एकूण वीजनिर्मितीपैकी ८० टक्के कोळशापासून, १८ टक्के पाण्यापासून, तर दोन टक्के वीज अणूपासून निर्माण होते. चीनने आता अणूउर्जानिर्मितीवर भर द्यायचा ठरवला असल्याने सन २०३० मध्ये ते वीजनिर्मितीत स्वतंत्र होतील, असे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांच्या या भाषणातील टीकास्त्रामुळे डाव्या पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी सदस्य यांत परस्परविरोधी घोषणाबाजी झाली.

संसदेचे कामकाज तीनदा स्थगित
आज काँग्रेसचे खासदार श्री. राहुल गांधी यांनी भाषण करायला सुरुवात केल्यावर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या तीन खासदारांनी पैशांची बंडले दाखवल्यावर कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर ६ वाजता कामकाजाला सुरुवात करण्याची सूचना अध्यक्ष श्री. चॅटर्जी यांनी केली; मात्र कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर लाच प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. समाजवादी पक्षाचे नेते श्री. अमरसिंग यांनी खासदारांना लाच देतांनाची ध्वनीचित्रफीतही उपलब्ध आहे. ती दाखवण्याची मागणीही काही सदस्यांनी केली. या मागण्या श्री. चॅटर्जी यांनी फेटळाल्या व संसदेचे कामकाज संध्याकाळी ६.३० वाजता सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

सोनिया गांधी यांच्या घरातून पंतप्रधानांचा कारभार ! – भाजप नेते मल्होत्रा यांची टीका
नवी दिल्ली – `पंतप्रधानांचा कारभार सोनिया गांधींच्या निवासस्थानातून चालतो,’ असा आरोप भाजप नेते श्री. विजय मल्होत्रा यांनी आज लोकसभेत केला. डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेतांना भाजपचे लोकसभेतील उपनेते श्री. मल्होत्रा यांनी संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने जनतेच्या विरोधात सर्व निर्णय घेतले, असेही श्री. मल्होत्रा म्हणाले.
सरकारने त्याच्या कारकिर्दीत सीबीआयचा गैरवापर केला. आरोपी खासदारांच्या साहाय्याने केंद्र सरकार विश्‍वास मत जिंकण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे पंतप्रधानही गुन्हेगार ठरत नाहीत का ?’, असा सवालही त्यांनी त्यांच्या भाषणातून केला. आरोपी खासदारांचा उल्लेख झाल्यामुळे पप्पू यादव व अन्य खासदारांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. (लोकशाहीत झुंडशाहीने वागणारे व त्यांचे समर्थन करणारे वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! – संपादक) त्यामुळे लोकसभा काही काळासाठी स्थगित करण्यात आली.

मायावती यांच्याकडून समाजवादी पक्षाच्या ६ खासदारांचे अपहरण – अमरसिंग
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांनी समाजवादी पक्षाच्या ६ खासदारांना पळवून नेले आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते श्री. अमरसिंग यांनी आज केला. मायावती यांनी त्यांना उत्तरप्रदेश भवनात जबरदस्तीने बंद करून ठेवले आहे. मायावती समाजवादी पक्षामध्ये फूट पाडू पहात आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

सरकारला मत देण्यासाठी गुप्‍तचर यंत्रणेकडून दबाव – ब्रजेश पाठक
विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप बहुजन समाजवादी पक्षाचे श्री. ब्रजेश पाठक यांनी केला. संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेला तशा प्रकारचा आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्‍तचर यंत्रणेतील काही अधिकारी विरोधी पक्षातील खासदारांच्या घरी जाऊन सरकारला समर्थन द्या, असे सांगून खासदारांवर दबाव आणत आहेत. श्री. पाठक यांनी त्यांच्या जिविताला धोका असल्याचे सांगून लोकसभेच्या अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली.

पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा – मायावती
नवी दिल्ली – संसद सदस्यांना विकत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्‍न ही एक लांच्छनास्पद घटना आहे. या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी बसपच्या नेत्या मायावती यांनी आज येथे केली. आपल्या विरोधात खोटे आरोप तयार करून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून आपल्याला खोट्या खटल्यात गोवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

ओमर अब्दुल्ला यांची भाजप व डावे यांच्यावर टीका
विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी आज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचे भाषण झाले. त्या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली. “गुजरातच्या दंगलींनंतर मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलो नाही, ही चूक केली”, असे ते म्हणाले. काश्मिरींनी कधीही अमरनाथ यात्रेमध्ये अडथळा आणला नाही व आणणारही नाही. आम्ही धर्मांध भाजपप्रमाणेच मंदिरे व मशिदी पाडत नाही”, असे ते म्हणाले. “भाजपने अमरनाथ देवस्थान मंडळाचा मुद्दा पुढे केला आहे; मात्र ही जमीन आमची आहे. ती आम्ही कदापी देणार नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू”, असे त्यांनी सांगितले. (काश्मीरभूमी मुसलमानांची भूमी आहे, अशा तोर्‍यात बोलणारे ओमर अब्दुल्ला म्हणे निधर्मी ! – संपादक)

 |  मित्रांना पाठवा |  13 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

ब्राह्मणेतर शब्दांत मुसलमान, पारशी, ख्रिस्ती अगर इंग्रज लोकही येऊ शकतील !

`भारतीय असंतोषाचे जनक’

लोकमान्य टिळक

पारतंत्र्याच्या काळात `भारतीय असंतोषाचे जनक’ ठरलेले लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन !

 

 

 

सौदेबाज राज्य करत आहेत !

काँग्रेस आणि समविचारी पक्ष या भूमीवर राज्य करण्याचा मुसलमानांचा हक्क आहे, हे मान्य करतात. हे भीतीपोटी ते मान्य करतात; परंतु आपली भूमी दुसर्‍याला वापरायला द्यायची सवय लागली की कधी भीतीपोटी, तर कधी पैशांसाठी भूमीचा सौदा केला जातो. काँग्रसने भूमीचा सौदा प्रथम मुसलमानांशी केला. आता तो अमेरिकेशी केला जात आहे. हिंदी राष्ट्रवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत या देशात सौदेबाज राज्य करणार आहेत; म्हणून लोकांनी हिंदुत्वाला मत दिले पाहिजे !


 

 

अमेरिकेसमवेत करावयाच्या संदर्भात अणूऊर्जासंधीसंबंधात मनमोहन सरकारवर जो विश्‍वास किंवा अविश्‍वास दाखवायचा आहे, त्याचे संध्याकाळपर्यंत काय झाले, ते कळेलच. मला जाणवलेले या वादंगातील विशेष म्हणजे `हिंदी राष्ट्रवाद’ या देशातील लोकांना एकत्र बांधून ठेवू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हिंदु राष्ट्रवाद, हिंदी राष्ट्रवाद, इस्लामी राष्ट्रवाद आणि कम्युनिस्टांचा भाषिक राष्ट्रवाद अशा चार प्रमुख विचारधारा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. अणूऊर्जासंधी अमेरिकेशी होणे पसंत न पडून कम्युनिस्टांनी पाठिंबा काढून घेतला. मुसलमानांच्या संघटनांनी सावध भूमिका घेतली. सैद्धांतिक भूमिका न घेता थोड्या दूरवरचा स्थानिक स्वार्थ पाहून काहींनी काँग्रेसला, तर काहींनी कम्युनिस्टांना पाठिंबा दिला; परंतु मुसलमान अमेरिकेस शत्रू मानीत असल्याने अमेरिकेसमवेत केलेला करार त्यांना आवडणार नाही, असे गृहीत धरून मायावतींच्या बसपाने करारास विरोध केला. जे पक्ष स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवतात, त्यांची भूमिका त्यातल्यात्यात सुसंगत राहिली आहे. त्यांचा अणुपासून वीज बनवायला, अमेरिकेसमवेत युद्धरचनेच्या दृष्टीने (स्ट्रॅटेजिक) संबंध असायला आडकाठी नाही. त्यांचा आक्षेप हा आहे की, विजेच्या छोट्या लाभासाठी भारताची सुरक्षितता अमेरिकेकडे गहाण टाकली आहे. आपली परराष्ट्रनीती, अणूचाचणी इत्यादी विषयातील सार्वभौम राष्ट्र म्हणून जे अधिकार आहेत, ते आपण अमेरिकेच्या पायावर वाहिले आहेत. अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला अमेरिका सिद्ध नसतांना दुय्यम राष्ट्र म्हणून लाचारीने हा करार आपण केला आहे. हे का शक्य झाले; कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या भारताच्या नागरिक आहेत; परंतु भारतीय भावविश्‍वाशी परिचित नसल्याने भारतीय हित आणि अमेरिकेचे हित यांत अंतर आहे, हे त्यांच्या लक्षात आले नसावे. कम्युनिस्टांनी हिरावलेले बहुमत पुन्हा सांधण्यासाठी काँग्रेसने घोडाबाजार म्हणजे खासदार विकत घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. ज्याला ध्येयवाद नसतो, तो विकला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांत जे खासदार गेले ते हिंदी राष्ट्रवादी म्हणजे बेगडी सेक्युलर आहेत. काँग्रेसने मुसलमानांसाठी हिंदुत्वाचा त्याग करून हिंदी राष्ट्रवाद निर्माण केला; परंतु मुसलमानांनी हिंदी राष्ट्रवादाचाही धिक्कार करून भारताचे इस्लामीकरण करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे हिंदी राष्ट्रवाद पोरका झाला असून त्याच्या अनुयायांना सत्तेवाचून अस्तित्वासाठी दुसरी प्रेरणा उरलेली नाही. हिंदुत्वनिष्ठ सत्तेवाचून कितीही काळ जगू शकतात; कारण हिंदुत्वाचे विशाल आणि उदात्त तत्त्वज्ञान त्यांना जगण्याचे बळ देते. हिंदुत्वनिष्ठा स्वत:ला विकावू समजत नाहीत; कारण ते जननीरूपात देशाला पाहतात. काँग्रेस आणि समविचारी पक्ष या भूमीवर राज्य करण्याचा मुसलमानांचा हक्क आहे, हे मान्य करतात. हे भीतीपोटी ते मान्य करतात; परंतु आपली भूमी दुसर्‍याला वापरायला द्यायची सवय लागली की कधी भीतीपोटी, तर कधी पैशासाठी भूमीचा सौदा केला जातो. काँग्रसने भूमीचा सौदा प्रथम मुसलमानांशी केला. आता तो अमेरिकेशी केला जात आहे. हिंदी राष्ट्रवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत या देशात सौदेबाज राज्य करणार आहेत; म्हणून लोकांनी हिंदुत्वाला मत दिले पाहिजे !
- सुघोष

 |  मित्रांना पाठवा |  35 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : शरसंधान

अंनिसच्या `थोबाडीत मारा’ आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून अ.भा. छावा संघटनेचे `दंड थोपटा’ आंदोलन

अंनिसच्या धर्मद्रोही कृत्यांना दंड थोपटून आव्हान देणार्‍या अ.भा. छावा संघटनेचे अभिनंदन !

 

जळगाव, २१ जुलै (वार्ता.) – प्रस्तावित (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा हिंदूंच्या विरोधातील आहे. हिंदू करत असलेल्या आंदोलनातून व विधान परिषदेमध्ये या कायद्याला होणार्‍या विरोधातून हे स्पष्ट झाले आहे; म्हणून हा कायदा संयुक्‍त चिकित्सा समितीकडे अवलोकनार्थ पाठवला आहे.

तरीही हा कायदा सरकारने संमत करण्याचा प्रयत्‍न केल्यास हिंदूंच्या तीव्र प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागेल. आता शांततामय मार्गाने विरोध न करता समस्त हिंदू व छावा संघटना या कायद्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहाणार आहेत. २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजता `छावा संघटने’तर्फे `दंड थोपटा’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे छावा संघटनेतर्फे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. (धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करणार्‍या छावा संघटनेचे अभिनंदन ! – संपादक)
आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने `थोबाडीत मारा’ हे आंदोलन काँग्रेस सरकारला निवडून देऊन स्वत: केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून केले. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून छावा संघटना हे `दंड थोपटा’ आंदोलन करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या `दंड थोपटा’ आंदोलनाला छावाप्रेमी व छावाचे मल्ल यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन छावाचे जळगाव जिल्हा संघटक प्रा. उमेश पाटील, महानगर अध्यक्ष श्री. संतोष पाटील, महानगर उपाध्यक्ष श्री. भागवान सोनवणे
यांनी केले आहे.

अंनिसच्या जळगाव येथील आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद
जळगाव – येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंनिसतर्फे करण्यात आलेल्या `स्वत:च्याच थोबाडीत मारा’ आंदोलनाला जनतेचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. या समितीचे केवळ दहा-बारा कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते.

 |  मित्रांना पाठवा |  60 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा