अमरनाथ यात्रेच्या कालावधीत कपात करण्याची काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांची मागणी

हिंदूंनो, तुमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार्‍या राज्यकर्त्यांना वेळीच रोखा !

हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणारे मुसलमान नेते !

जम्मू, १९ जुलै (प्रे.ट्र.) – अमरनाथ यात्रेचा कालावधी दोन महिन्यांऐवजी १ महिन्याचा करावा, तसेच यात्रेकरूंची संख्याही ७५ हजारापर्यंत असावी, अशी मागणी केंद्रीय जलस्रोत राज्यमंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केली.

(हज यात्रेचा कालावधी व भारतातून तेथे जाणार्‍या मुसलमान यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी सोझ यांनी केली असती का ? हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार्‍या मुसलमान नेत्यांना आता हिंदूंनीच संघटित होऊन जाब विचारावा. – संपादक) अमरनाथ यात्रेबाबत काँग्रेस सरकारने नितिश सेनगुप्‍ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने काही शिफारसी मांडल्या होत्या. या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस सरकार विचाराधीन आहे त्या शिफारसींच्या आधारावर हे वक्‍तव्य केल्याचे सोझ यांनी म्हटले आहे. (सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्याने हाज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंच्या संख्येत कपात करून दाखवावी. हिंदूंनो, हिंदु धर्माच्या मुळावर उठलेल्या सरकारला निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवा. – संपादक) सोझ यांच्या वक्‍तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक खजुरिया यांनी सोझ यांच्यावर टीका केली आहे. “सोझ यांनी असे वक्‍तव्य करून हिंदु धर्मातील अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्‍न चालवला आहे”, असे खजुरिया म्हणाले. सेनगुप्‍ता आयोगाच्या शिफारसींबाबत बोलतांना श्री. खजुरिया म्हणाले,“या आयोगाने १९९७ साली त्याच्या शिफारसी मांडल्या होत्या; मात्र त्यानंतर सरकार अथवा श्री अमरनाथ देवस्थान मंडळ या दोघांनीही या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही. सोझ यांनी असे वक्‍तव्य करून हिंदु धर्मावर हल्ला केला आहे. त्यांच्या या वक्‍तव्यावरून त्यांना काश्मीरमधील मूलतत्त्ववादी व विघटनवादी यांचा पुळका आला आहे, असे दिसून येते”, असे ते म्हणाले. “हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये सोझ व काश्मीरमधील काँग्रेसच्या इतर नेत्यांनी नाक खुपसू नये”, असा इशाराही श्री. खजुरिया यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.

 |  मित्रांना पाठवा |  35 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply