बेंगळुरू येथे ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांची बैठक !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
खरा इतिहास एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केला जात नसल्याबद्दल बैठकीत नाराजीचा सूर !

बेंगळुरू, २७ जून (वार्ता.) – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एन्.सी.ई.आर्.टी.) खरा इतिहास शालेय पुस्तकांत समाविष्ट करत नाही, असे सांगत ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्‍त केली. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्ध हिंदु जनजागृती समितीने चळवळ उभारली आहे. त्याअंतर्गत समितीने काल ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपरोल्लेखित नाराजी व्यक्‍त करण्यात आली.

या बैठकीला प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. एम्. चिदानंदमूर्ती, केंद्रातील रालोआ शासनाच्या कार्यकाळात एन्.सी.ई.आर्.टी.मध्ये काम केलेले आणि सध्या कर्नाटक शासनाच्या `गॅझेटीयर’चे मुख्य संपादक असलेले प्रख्यात इतिहासतज्ञ श्री. सूर्यनाथ कामत, बेंगळुरू येथील आय.आय.एस्.मधील संशोधक वैज्ञानिक श्री. शतावधानी गणेश अन् इतिहासाची अनेक पुस्तके लिहिलेले इतिहासतज्ञ श्री. एन्.एस्. राजाराम हे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्याचे समन्वयक श्री. मोहन गौडा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एन्.सी.ई.आर्.टी.ने) शालेय पुस्तकांतून विकृत इतिहास समाविष्ट केल्याच्या विरोधात सुरू असलेल्या चळवळीबद्दल माहिती दिली. समितीचे कार्यकर्ते श्री. शिवानंद प्रभू यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समिती शालेय पुस्तकांतील विकृत इतिहास बदलण्यासाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल सर्व इतिहासतज्ञ व संशोधक यांनी समितीचे कौतुक केले. “शालेय इतिहासाच्या पुस्तकांतील आक्षेपार्ह भाग काढून त्याजागी कुठला घ्यायचा, हे आम्ही जरूर सांगू”, असे या सर्वांनी या वेळी सांगितले.

सध्याच्या इतिहासाच्या पुस्तकांतील वर्णाश्रमव्यवस्थेविषयीची माहिती चुकीची ! – डॉ. एम्. चिदानंदमूर्ती
या प्रसंगी डॉ. एम्. चिदानंदमूर्ती म्हणाले, “सध्या इतिहासाच्या पुस्तकांत दिलेली वर्णाश्रमव्यवस्थेची माहिती चुकीची आहे. त्या माहितीत `वर्णाश्रमव्यवस्था म्हणजे जाती’, असे सांगत ब्राह्मण व शूद्र यांच्यात दरी उत्पन्न केली आहे. त्याऐवजी योग्य माहिती पुस्तकात अंतर्भूत केली पाहिजे. महिलांचे सैन्यदल निर्माण करून शत्रूच्या विरुद्ध लढणार्‍या बेलावदी मल्लमा यांच्यासारख्या थोर स्त्रियांची नावे इतिहासात घेतली पाहिजेत. थोर संत अल्लमा महाप्रभू, अक्का महादेवी, कनका दास, पुरंदरा दास यांची माहिती इतिहासाच्या पुस्तकांत घेण्यात आलेली नाही.”

वेदांतील थोर विचारांचा पाठ्यपुस्तकांत समावेश आवश्यक ! – सूर्यनाथ कामत
या वेळी श्री. सूर्यनाथ कामत म्हणाले, “एन्.सी.ई.आर्.टी.ने मागे एकदा पुस्तकाची पाने वाढतात, म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे शालेय पुस्तकातून वगळली होती. (क्रांतीकारकांचे शौर्य अन् पराक्रम यांचे वावडे असलेली नपुंसकवादी एन्.सी.ई.आर्.टी. ! – संपादक) खरेतर वेदांतील थोर विचारांचा शालेय इतिहासाच्या पुस्तकांत समावेश असणे आवश्यक आहे.”

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांत अर्धवट इतिहास ! – एन्.एस्. राजाराम
हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन शहरे सरस्वती आणि गंगा या नद्यांच्या काठी होती, हे शालेय इतिहासाच्या पुस्तकातून नमूद केले आहे; पण सरस्वती व गंगा या नद्यांचे महत्त्व त्यातून वगळले आहे. औरंगजेबाने `जिझिया’ कर लागू केल्याचे पुस्तकात आहे; पण त्या कराचा हेतू वगळण्यात आला आहे, असा हा अर्धवट इतिहास आहे, या शब्दांत इतिहासतज्ञ एन्.एस्. राजाराम यांनी त्यांचा संताप व्यक्‍त केला.

पाठ्यपुस्तकांतून संस्कृत भाषेची माहिती वगळणे चुकीचे ! – शतावधानी गणेश
`ब्राह्मणाची भाषा’, असे सांगत पाठ्यपुस्तकांतून संस्कृत भाषेची माहिती वगळणे, हे चुकीचे आहे; कारण पूर्वीच्या काळी ती सगळयांची भाषा होती. श्री बसवण्णा यांच्या वेळी संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे शूद्र होते, असे उद्‌गार श्री. शतावधानी गणेश यांनी या प्रसंगी काढले.

निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

ज्यांना रामदासस्वामी, दादोजी व पुरंदरे मान्य नाहीत, ते छत्रपती शिवराय व महाराष्ट्राचे शत्रू ! – बाळासाहेब ठाकरे

असे बोलण्याचे धाडस शिवसेनाप्रमुखांच्या व्यतिरिक्‍त कोणीच का दाखवत नाही ?

मुंबई, १ जून (वार्ता.) – आजही जी मंडळी शिवरायांचे स्मारक करू इच्छित आहे, ती कुठेही शिवरायांच्या मूलभूत कार्याचा उल्लेख करू इच्छित नाही. त्यांना दादोजी कोंडदेव मान्य नाहीत. त्यांना समर्थ रामदास मान्य नाहीत. त्यांना आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही मान्य नाहीत. असा विचार करणारे जातीयवंत मराठेच शिवाजीचे व महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज `सामना’च्या संपादकीयातून केला आहे. या संपादकीयात श्री. ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे !

आम्हाला अभिप्रेत असलेले हिंदवी स्वराज्य, हे नाही !
मुंबईच्या अरबी समुद्रात शासन भव्य शिवस्मारक उभे करीत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही `मराठे’जनांनी शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध सुरू केला. श्री. पुरंदरे हे ब्राह्मण असल्यानेच त्यांना सुरू असलेला हा विरोध महाराष्ट्राच्या इभ्रतीला व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला शोभणारा नाही. स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना काढा नाहीतर शिवशाहिरांवर हल्ला वगैरे करण्याच्या धमक्या काही जातीयवादी मराठा संघटनांनी दिल्या आहेत. `स्मारक’प्रश्‍नी हात एकमेकांना उखडून टाकण्यासाठीच उठणार असतील, तर छत्रपती शिवरायही `मराठी माणसांचे थडगेच या जातीयतेने उभे रहाणार असेल, तर कृपा करून माझ्या नावाचा वापर करून ते बांधले जाऊ नये. आम्हाला अभिप्रेत असलेले `मराठा साम्राज्य’ व `हिंदवी स्वराज्य’ हे नाही’, असे म्हणतील.

देशावरील परचक्रांना विरोध न करता पुरंदरेंना संपवण्याची भाषा, हा षंढपणा !
शिवरायांच्या वेळी मोगल बादशहांचे परकीय राज्य चालविणार्‍यास अनेक स्वकीय वर्ग व घराणी मदत करीत होती. साडेतीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रात व हिंदुस्थानातही तोच इतिहास परत घडत आहे. परदेशी बाईला दिल्लीत मुजरे झडत आहेत. महाराष्ट्रातील लाचार वतनदारांनी स्वाभिमान खुंटीला टांगून पदे मिळविली आहेत. इस्लामचे अतिरेकी परचक्र धडका मारत आहे. `सिमी’च्या हातात हात घालून देशाचे इस्लामीकरण सुरू आहे. त्याविरोधात `ब्र’ न काढणारे व या परचक्राविरोधात लढण्याची भाषा न करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना संपवण्याची भाषा करतात, हा षंढपणा व नादानपणाच आहे.

काँग्रेसचे शिवप्रेम निवळ एक ढोंग !
जे लोक शिवस्मारकाचे उद्घाटन घाईघाईने उरकण्याचा डाव रचत आहेत, त्यांचे शिवप्रेम निवळ एक ढोंग आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस राजवटीने आतापर्यंत कुठच्या ऐतिहासिक स्थळांची, विशेषत: शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक स्थळांची दखल घेतली ? शिवछत्रपतींचा जिथे राज्याभिषेक झाला, त्या रायगडवरील वाड्याची छपरे उडून गेली व माळावरचा महाराजांचा पुतळा उघड्यावरच आहे. पुरातन खात्याच्या अक्षम्य दायित्वशून्यतेचा हा साक्षात नमुना आहे. मग समुद्रातील स्मारकाचा नारळ फोडण्याची व त्यानिमित्ताने जातीयवादाचे फुत्कार सोडण्याची एवढी घाई कशासाठी ?

शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकण्याचा इंग्रजांप्रमाणेनच काँग्रेजींचा प्रयत्‍न !
काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छत्रपतींचे स्मारक जणू निवडणुकीत प्रचारात वापरायचे एक `प्यादे’ आहे. ठीक आहे, तुमची प्यादी तुम्ही चालवा; पण त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध विखारी चळवळी राबवून महाराष्ट्रात प्रदूषण पसरवण्याची गरज काय ? जे जातीयवादी लोक `मराठे’पणाचा आव आणत आहेत, त्यांना शिवराय समजलेच नाहीत. याच काँग्रेसवाल्यांच्या `बापजाद्यांनी’ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना चोर, लुटारू व दरोडेखोर ठरवलेच होते व शिवाजी हे राष्ट्रपुरुष नसल्याची आरोळीही काँग्रेसवाल्यांनी ठोकली होती. त्या नतद्रष्टांना शिवरायांचा जो पुळका आला आहे, तो हास्यास्पदच आहे. या दोन्ही काँग्रेसवाल्यांनी खरोखरच शिवचरित्र वाचले असते, तर आज महाराष्ट्राची ही अशी दशा झाली नसती. शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकून ठेवण्याचा जसा इंग्रजांनी प्रयत्‍न केला, तसाच त्यांच्यानंतर आलेल्या काँग्रेजी बगलबच्च्यांनीही केला.

तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या वतीने खेडेकर, मेटे व दलवाई यांच्या पुतळयाचे दहन
तळेगाव दाभाडे, १ जून – महाराष्ट्र शासनाच्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अनुद्‌गार काढल्याने संतप्‍त झालेल्या तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर, विनायक मेटे व हुसेन दलवाई यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे नुकतेच दहन केले. या वेळी येथील शाळा चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेड व त्यांचे नेते आणि दलवाई यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.

कत्तलीसाठी नेणार्‍या गायींना रोखल्याने शेकडो मुसलमानांचा शिवसैनिकांवर हल्ला

सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी आताच संघटित होऊन याला तोंड न दिल्यास हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय रहाणार नाही.

 

ऐवढे दिवस सर्वसामान्य हिंदूंवर हल्ले करणार्‍या मुजोर मुसलमानांचा शिवसेनेसारख्याहिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्‍न हा हिंदूंचे खच्चीकरण करणारा आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी आताच संघटित होऊन याला तोंड न दिल्यास हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय रहाणार नाही. – संपादक कडव्या

अमरावती, ३० मे – येथील अकोली मार्गावरील चांदुरीजवळ मुसलमानांकडून कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गायी, बैल व कालवड अशा १०७ गोवंशाचा कळप शिवसैनिकांनी रोखल्याने शंभर ते दीडशे मुसलमानांच्या सशस्त्र जमावाने शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला केला. यात दोन शिवसैनिक गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना काल दुपारी घडली.

बडनेरा येथे गुरांचा बाजार भरतो. त्यासाठी चार ते पाच कुरेशी समजातील मुसलमान या १०७ गुरांना घेऊन जात असतांना त्यांना निर्दयतेने मारहाण करत होते. हे येथील शिवसैनिकांनी पाहिल्याने व ही गुरे कत्तलखान्याकडे जात असल्याच्या संशयाने त्यांनी ती रोखून धरली. गुरे हाकणार्‍यांना दम दिल्याने ते पळून गेले. याबाबत शिवसैनिकांनी त्वरित पोलिसांना कळवले. पोलीस येण्यापूर्वी दुचाकी व इतर वाहनांतून शंभर ते दीडशे मुसलमानांचा जमाव हातात काठ्या व शस्त्रे घेऊन येथे आला. या जमावाने येथील २५ शिवसैनिकांवर हल्ला चढवला. यात अमोल रामदास ठाकरे व बलराम भनक हे दोघे जखमी झाले. दरम्यान पोलीस मोठी कुमक घेऊन येथे दाखल झाले. त्यांनी संपूर्ण स्थिती नियंत्रणात आणत सर्व गुरांना ताब्यात घेतले. जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याचे समजते.

 

  निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?

हिंदूंची अंत:प्रेरणा प्रतिबिंबित करणारे नाटक ! : मी नथुराम गोडसे बोलतोय !

मोहनदास गांधी यांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे स्वातंत्र्यानंतरची ६२ वर्षे उलटली, तरी देश अजूनही सुखाने जगत नाही. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे बीज गांधींनी रोवले. आज त्याचा वृक्ष होऊन त्याच्या गडद काळया छायेखाली संपूर्ण देश झाकला गेला आहे. गांधींचा वध झाल्यानंतर नथुराम गोडसे यांना दोषी ठरवून त्यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी गोडसे यांची भूमिका कोणी समजून घ्यावी, अशी स्थिती नव्हती; कारण स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या हिताचे रक्षण करणार्‍यांचे गांधी व त्यांच्या काँग्रेसने खच्चीकरण केले होते व संपूर्ण देशावर मुसलमानांना पंखाखाली घेणार्‍या काँग्रेसचे अधिराज्य झाले होते.
आज काही वर्षांनंतर बघता नथुराम गोडसे यांनी गांधींच्या हत्येच्या वेळी जी कारणे दिली, तेच मुद्दे घेऊन काँग्रेस गेली ६२ वर्षे राज्य करत आहे, असे लक्षात येते. परिणामी आजही `गांधी काँग्रेसच्या रूपाने जिवंत आहेत आणि हिंदुत्वरूपी नथुराम मात्र प्रतिदिन फासावर चढत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गांधींच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी २७ मे १९४८ या दिवसापासून सुरू झाली. हा अभियोग ऐतिहासिक होता. त्याला यंदा ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. गांधींची हत्या करण्याबाबत त्यांनी केलेली मीमांसा आजही जगाला चिंतन करायला लावते. नथुराम गोडसे यांची बाजू भक्कमपणे मांडणारे `मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक गेली काही वर्षे गाजते आहे. .

 

जोखीम उचलून प्रयोग सुरू
नथुराम गोडसे यांची गांधींच्या हत्येमागील भूमिका पुढच्या पिढ्यांनाही आणि सार्‍या जगाला समजावी, हा हेतू मराठी रंगभूमीवरील `मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातून साध्य झाला आहे. मराठी रंगभूमीच्या सध्याच्या साचेबद्ध नाटकांमध्ये निश्चितच अधिक वास्तववादी चित्रण असणारे हे नाटक ! आजही या नाटकाचे प्रयोग `माऊली प्रोडक्शन’तर्फे निर्माता श्री. उदय धुरत जोखीम उचलून करत आहेत. दिग्दर्शक श्री. विनय आपटे, लेखक श्री. प्रदीप दळवी, नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे प्रमुख कलाकार श्री. शरद पोंक्षे व इतर सहकलाकार असा फौजफाटा नव्या पिढीला `नथुरामांची भूमिका’ पटवून देण्याचे महतकार्य करत आहे.

शासनाची बंदी; न्यायालयाचा पाठिंबा
भाजप केंद्रात सत्तेवर असतांना `मी नथुराम…’चे ७ प्रयोग झाल्यावर लोकसभेत त्यावर बंदी घाला, अशी आरडाओरड झाली. ३ दिवस लोकसभेचे कामकाज विरोधकांनी अर्थात काँग्रेसवाल्यांनी बंद पाडले. शेवटी कै. प्रमोद महाजन यांनी मुंबईला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माननीय बाळासाहेब ठाकरे नथुराम गोडसे हे नाटक बंद पडू नये, या मताशी सहमत होते आणि त्यांचा पाठिंबा श्री. उदय धुरत यांना होता.
शेवटी श्री. लालकृष्ण आडवाणी यांनी बाळासाहेबांना दूरध्वनी करून विनंती केली की, लोकसभा पुढे चालू शकत नाही, तूर्तास हे नाटक बंद ठेवावे. नंतर काँग्रेसप्रणीत महाराष्ट्र शासनाने नाटकावर बंदी आणली. बंदीच्या विरोधात श्री. उदय धुरत मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि ६ वर्षे हे प्रकरण लढवून न्यायदेवतेने नथुरामला न्याय दिला.

मुंबईतील शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात या नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेसवाल्यांनी मोर्चे आणून नाटक बंद करण्याचा प्रयत्‍न केला होता. त्यास शिवसेनेने चोख उत्तर देत मोर्चेवाल्यांना पिटाळून लावले व या वेळी पोलिसांनीही लाठीमार केला.

नथुराम गोडसे यांचे आत्मनिवेदन
नाटकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्‍त करतांना नथुराम गोडसे म्हणतात, “मी नथुराम गोडसे. माझे सध्याचे वय ९८ वर्षे. नव्या पिढीला माझी ओळख `एक हिंदु माथेफिरू’ अशीच आहे; कारण सरकारी दफ्तरी माझी अशीच ओळख झाली आहे. मधल्या वयाच्या पिढीला मी धर्मांध वाटतो आहे, तर माझ्या वयाचे किंबहुना माझ्यापेक्षा काहीसे कमी वयाने असलेल्या वयस्करांना माझी ओळख चांगली असेल, त्यांनी माझे लिखाण वाचले असेल, भाषणे ऐकली असतील; मात्र गांधींच्या वधानंतर तेही काहीसे माझ्यापासून दूर गेलेले आहेत.”

गांधी हत्येमागील कारणे !
“गांधीजींनी आफ्रिकेत वर्णभेदाच्या विरोधात पुकारलेले बंड, इंग्रजांच्या विरोधातील `चले जाव’ची चळवळ, तो मिठाचा सत्याग्रह, या सर्व कार्याबद्दल या नथुरामच्या मनात गांधींच्या प्रती आदर होता आणि आहे; पण फाळणी अनावश्यक होती. त्यानंतर अहिंसेच्या हट्टापायी हिंदूंची कत्तल, आपल्या देशातील सीमांवरील सैनिकांच्या विरुद्ध संहार करण्यासाठी पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांची मदत, गांधींचे हे सर्व निर्णय चुकले. या अक्षम्य चुका आहेत. गांधींच्या या देशविघातक चुकांची बोचणी मनात सतत होती. `अशा चुका पुन: पुन्हा होऊ नयेत’, असा विचार करून मी गांधींचा वध केला.” नाटकाच्या प्रारंभी गांधीवधामागील नथुराम गोडसे यांनी स्पष्ट केलेली ही भूमिका कोणत्याही राष्ट्रप्रेमी प्रेक्षकाला सहज आकलन होते !

गांधींची हत्या नव्हे वध !
गांधीवधानंतर दिल्लीतील पोलीस अधीक्षक शेख यांनी जबानी लिहून घेतांना `गांधींचा खून’ असा शब्दप्रयोग केला, तेव्हा त्याला हरकत घेत जबानीत `वध’ हाच शब्द वापरण्याचा आग्रह नथुराम यांनी धरला. “एखाद्या योद्ध्याप्रमाणे रणांगणावर वीरमरण द्यावे, असे मरण मी गांधींना दिले आहे. या कृत्यामागे कुठेही पूर्वग्रह, वैयक्‍तिक हेवेदावे नव्हते, तर केवळ राजकीय कारण होते”, इतक्या स्पष्ट स्वरूपात नथुराम गोडसे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरून गांधीवध हा भावनेच्या भरात नव्हे, तर देशहिताचा विचार करून करण्यात आला, ही इतिहासाची दुसरी बाजू समाजासमोर येते.

गांधींच्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा उबग आलेले गोडसे !
या नाटकाच्या सुरुवातीला नथुराम विनायक गोडसे हे `दैनिक हिंदुराष्ट्र’चे संपादकीय लेख लिहीत असतांना दाखवण्यात आले आहे. दिवसाच्या शेवटाला आकाशवाणीवर बातमी येते, `सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला !’, ही बातमी सांगण्यासाठी नाना (नथुराम गोडसे यांचे मित्र नाना आपटे) लगबगीने नथुराम गोडसे यांच्याकडे येतात आणि संपादकीयचा विषय बदलण्यास सांगतात; परंतु नथुराम गोडसे यांनी केव्हाच त्या विषयावर संपादकीय लिहून ठेवलेले असते ! आणि मग सुरू होतो दोघांमध्ये चर्चेचा खल. “आजवर आपण फक्‍त निषेध मोर्चे काढत राहिलो, अग्रलेख लिहीत राहिलो, `जनतेने उठाव करावा’, असे म्हणत राहिलो; पण नाना, जनतेने उठाव करावा म्हणजे तू आणि मी उठाव करावा. आणि म्हणून मी उद्याच्या अग्रलेखात `उद्या संक्रांत नाही, तर दसरा साजरा करूया, शमीच्या झाडाखाली पाझरलेली शस्त्रे हातात घेऊया’, असे आवाहन केले आहे.” गोडसेंचे हे उद्‌गार ऐकत असतांना नाना काही काळ स्तब्ध रहातात व `हे वाचून सरकार आपल्याला अटक करेल’, अशी प्रतिक्रिया देतात. तेव्हा नथुराम गोडसे म्हणतात, “सरकार हिंदूंच्या शब्दांना किंमत देत नाही. तेव्हा असे काही होणार नाही, सरकार याची दखल घेणार नाही. सरकार आता फक्‍त एका खटल्याची दखल घेईल आणि तो म्हणजे गांधीवधाचा खटला!”
नथुराम यांनी अग्रलेख लिहीत असतांनाच गांधींचा वध करण्याचा निश्चय केला होता आणि तो सर्वात प्रथम नानांसमोर बोलून दाखवला होता. वारंवार प्रयत्‍न करूनही न बदलणारी स्थिती धर्माभिमानान्यांसाठी क्रांती करणे कसे अपरिहार्य करते, हे गोडसेंच्या वरील उद्‌गारावरून लक्षात येते.

क्रांतीकारक निर्णय घेण्याची अपरिहार्यता !
“देशविघातक सत्र थांबायला पाहिजे असेल, तर गांधी आताच संपले पाहिजेत. घावांना जर जिभा असत्या, तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या. हिंदूंच्या घावांना फक्‍त अश्रू आहेत. हिंदूंच्या मतांना सरकार टीचभर महत्त्व देत नाही. त्यामुळे हा अग्रलेख लिहितांना हे मी स्वगत लिहीत आहे, असे मी स्वत:ला बजावले आहे. गांधींचे इतिहासातील स्थान अजरामर रहाणार आहे. काळाच्या पाठोपाठ इतिहासाची पाने उलटली जातील, तेथे गांधी असतीलच; पण हा इतिहास लांबवता कामा नये, गांधींची अहिंसेची व्याख्या चुकीची आहे. हा निर्णय धाडसाचा असला तरी धाडस करणे गुन्हा आहे का”, असा प्रश्‍न गोडसे नानांना विचारतात.

नथुराम गोडसेंनी गांधीवधाचा निर्णय बदलावा म्हणून नाना आपटे तेव्हा `सरकारच्या विरुद्ध तीव्र निदर्शने करू’, असे सुचवतात. तेव्हा गोडसे उसळतात आणि पुन्हा तोफ डागतात, “फाळणीच्या वेळी आपण किती निदर्शने केली, झाला का उपयोग त्याचा ? `बिर्ला हाऊस’कडील निदर्शने आठव ! म्हणे शांततापूर्ण निदर्शने ! नंतर काय, व्हायचे तेच झाले ना ! गांधींनी हिंदूंना न जुमानता जिनांच्या हट्टापायी फाळणी केली, संपूर्ण मंत्रीमंडळ या निर्णयाच्या विरोधात असतांना गांधींनी हा निर्णय घेतला. नाना, गांधी स्वत:ला देशापेक्षा मोठे समजू लागले आहेत. जिनाने तलवार उपसली आणि गांधींनी ती भारतमातेच्या छातीत घुसवून तिचा लचकाच तोडला. स्वत:च्या देहाला जेव्हा-जेव्हा गांधी आव्हान देत, तेव्हा तेव्हा संपूर्ण देशाला गांधींसमोर झुकावे लागले व देशविघातक निर्णय झाले; म्हणून नाना, तो देहच संपवायचा आहे. आज मुसलमानांनी देशाचे तुकडे केले, उद्या शीख, परवा हिंदूंमधील अनेकविध जातीमधील लोक या देशाचे तुकडे करतील. कोणाकोणाला रोखणार ? फाळणी झाली तेव्हाही मी असेच प्रखर विचार मांडले होते. फाळणीच्या वेळी हैद्राबादमधील मुसलमानांच्या मुलुखातील एकमेव हिंदूच्या कुटुंबाला मी जेव्हा भेट दिली, तेव्हा मुसलमानांनी त्या घरातील आठ वर्षांच्या मुलाची कत्तल केलेली होती. त्याचा बाप त्या मुलाचा रक्‍ताळलेला मृतदेह माझ्यासमोर करून मला सांगतो, `जाऊन सांगा तुमच्या गांधीला की, पुन्हा कधी उपोषणाला बसलात, तर उपोषण सोडायला संत्र किंवा मोसंबीचा रस घेऊ नका, याचे रक्‍त घ्या !” गोडसे यांनी वर्णन केलेली ही स्थिती गांधींचे भ्रमवादी जीवन उघडकीस आणते. या पार्श्‍वभूमीवर या नाटकाचे महत्त्व लक्षात येते.

नथुराम गोडसे असामान्य असल्याचे मान्य करणारा पोलीस अधीक्षक शेख !
गांधींच्या वधाचा नियोजनबद्ध कट रचलेल्या नथुराम गोडसेंना गांधींचा वध एकांतात करण्याची संधी मिळाली होती; मात्र त्यांनी त्याचा फायदा घेतला नाही. उघडपणे त्यांना गांधींचा वध करून व स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करवून घ्यायचे होते; म्हणून त्यांनी बिर्ला हाऊस येथे गांधींची प्रार्थना सुरू असतांना त्यांच्या कारकिर्दीला प्रथम वंदन करून नंतर त्यांच्यावर तीन गोळया झाडल्या. त्यानंतर हातात पिस्तूल घेऊन नथुराम तसेच उभे राहिले. कोणीही त्यांच्याजवळ आले नाही. त्यांनी स्वत: पोलिसांना जवळ बोलावून स्वत:ला त्यांच्या हवाली केले. त्यानंतर नथुराम दिल्लीचे पोलीस अधीक्षक शेख यांच्या नजरकैदेत होते.
सुरुवातीला त्यांचा पराकोटीचा तिरस्कार करणारे शेख जेव्हा गोडसेंना फाशी देण्यासाठी अंबाला येथील तुरुंगात नेण्याची वेळ येते, तेव्हा गोडसेंशी वाद-प्रतिवाद करतांना अप्रत्यक्षपणे बुद्धीभेद झालेले शेख काहीसे गहिवरतात आणि म्हणतात, “नथुराम, तू असामान्य आहेस. तुझ्या सहवासात आलेल्या आमच्यासारख्या हाडामासाच्या लोकांच्या रक्‍तात तू विषासारखा हळूहळू भिनत जातोस. आता मीही पाकिस्तानचा, जिनांचा तिरस्कार करू लागलोय. तुझा गळफास मी स्वत:च्या हाताने विणला, आता तो उसवता येऊ शकतो का, याचा विचार करू लागलोय !” नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीतील सत्यता आणि त्यांची देशप्रेमाची प्रामाणिक तळमळ, याचाच हा परिणाम म्हणावा लागतो. या प्रसंगाचे सादरीकरण करून लेखकाने नाटकाला एका विशिष्ट उंचीवर पोहोचवले आहे.
या चर्चेच्या शेवटी नथुराम गोडसे मुद्दाम गांधींच्या मुसलमानप्रेमाचा संदर्भ अधिक खोलवर देत सांगतात, “गांधी मृत्यूच्या वेळी `हे राम’ बोलले नव्हते. आयुष्यभर ज्या माणसाने `राम-रहीम’, असेच म्हटले, असे गांधी मृत्यूक्षणी कधी `हे राम’ म्हणतील का ? बोलायचे तर `राम-रहीम’ असेच बोलतील, अन्यथा फक्‍त `रहीम’ बोलतील; कारण राम गांधींच्या हृदयात होता आणि रहीम त्यांच्या मुखात होता.”

`अखंड भारत’ स्वप्न मूर्त स्वरूपात येईल, असा ठाम विश्‍वास असणारे गोडसे !
`अंतीम क्षणी माझ्या हातात श्रीमद्‌भगवतगीता, भगवा झेंडा आणि अखंड भारतमातेचा नकाश असावा’, अशी इच्छा गोडसे यांनी व्यक्‍त केली होती. फाशीच्या आधी गांधींचे पुत्र देवीदास गांधी हे नथुराम गोडसे यांना भेटायला येतात, तेव्हाही नथुराम त्यांना त्यांच्या पित्याच्या चुका स्पष्टपणे उलगडून सांगतात. “मृत्यूपत्रात मी `जोवर अखंड सिंधु नदी अखंड भारतात येत नाही, तोपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नका, त्या पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित करा’, असे लिहून ठेवले आहे.” हे सांगतांना गोडसे आवर्जून म्हणतात, “गांधींचाही आत्मा अशांतच आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी; म्हणून मी असे केले आहे. गांधींनी त्यांच्या अस्थी जगातील सर्व नद्यांमध्ये विसर्जित करा, असे म्हटले होते; परंतु पाकिस्तानने सिंधु नदीत त्यांच्या अस्थी विसर्जित करायला दिली नाही. गांधींचा वध झाला होता, तेव्हा पाकिस्तानच्या आकाशवाणीवर `हिंदूंचे पुढारी गेले’ असे सांगितले गेले. आम्ही गांधींना वारंवार हेच सांगत होतो की, गांधी तुम्ही आमचे आहात, हिंदूंचे आहात; पण गांधी मात्र `मी त्यांचा आहे’, असेच म्हणत राहिले. असे असले तरी हा भारत देश अखंड होईल, गंगा खेचून आणणार्‍या भगीरथाच्या परंपरेचा हा देश आहे. सिंधु नदी आज ना उद्या अखंड भारतात येईल, याचा मला ठाम विश्‍वास वाटतो आहे.” नथुरामांचे वरील संवाद प्रत्येक राष्ट्रप्रेमीला त्याच्या कर्तव्याची जाणीवच एक प्रकार करून देतात आणि नाटकाचा पडदा पडतो.

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-05-24&action=fullnews&catid=9&id=20303

धर्मशिक्षणाची आवश्यकता

 

हिंदूंची सद्यस्थिती

हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांची स्थापना प्रामुख्याने `हिंदु धर्माचे रक्षण झाले पाहिजे’ या विचारातून झाली; मात्र हिंदु धर्म वाचवण्यासाठी `तो समजून घेऊन त्याचे आचरण केले पाहिजे व तो टिकवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे’ या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी त्या दृष्टीने कार्य केले नाही.

 

त्यामुळे हिंदूंच्या या संघटना किंवा पक्ष यांची निर्मिती होऊनही धर्महानी थांबली नाही. या हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी ना धर्माचा अभ्यास केला, ना धर्म समजून घेतला. त्यामुळेच त्यांच्यात आज तत्त्वनिष्ठता उरली नाही. तसेच धर्मशास्त्र माहीत नसल्यामुळे व धर्माचरण करत नसल्यामुळे धर्मावरील आक्रमणांनाही ते परिणामकारकपणे तोंड देऊ शकले नाहीत.

याउलट ख्रिस्ती व मुसलमान धर्मांत लहानपणापासून धर्माचे शिक्षण देऊन धर्मविषयक कट्टरता निर्माण केली जाते; इतकेच नव्हे तर धर्माच्या अभ्यासासाठी केंद्र, साहित्य यांची निर्मिती केली जाते व धर्माच्या प्रसारावर भर देऊन इतर धर्मियांचे आपल्या धर्मात धर्मांतर केले जाते. नांदेड येथे धर्मप्रसारासाठी `इस्लाम दर्शन केंद्र’ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोणीही जाऊन इस्लामविषयी माहिती घेऊ शकतो; परंतु लाखो वर्षांची परंपरा सांगणार्‍या व प्राचीन काळी अनेक विद्यापीठांतून धर्माचे ज्ञान देणार्‍या आपल्या हिंदू धर्माची माहिती देणारे केंद्र आजही कोणीही स्थापन केलेले नाही.
आज हिंदु धर्माची स्थिती कशी आहे ? धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचे खरे ज्ञान नाही. मोगल आक्रमकांनी विद्यापीठे व धर्मग्रंथ जाळले, तर इंग्रजांनी इतिहासलेखनाच्या नावे ते विकृत केले व स्वत:च्या धर्माचे कौतुक मांडले. त्यामुळे हिंदूंच्याच मनात स्वत:च्याच धर्माविषयी अनेक गैरसमजुती आहेत आणि अज्ञान आहे. त्यामुळेच धर्मांतर, देवा-धर्माच्या विरोधात होणारी टीका, श्रद्धास्थानांचे विडंबन इत्यादी गोष्टी उघड उघड होत आहेत व हिंदूंना त्याचे काहीच वाटत नाही. तथाकथित पुरोगामी, निधर्मी, बुद्धीवादी, समाजसुधारक व धर्मद्रोही याचाच फायदा घेऊन हिंदू धर्माविषयी अधिकच घृणा निर्माण होईल, अशीच वक्‍तव्ये करत आहेत व हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेत. त्यामुळे दिवसागणीक हिंदू धर्मापासून दूर दूर चालला आहे.
भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी म्हटले, `मी जन्माने मुसलमान, संस्काराने ख्रिस्ती व अपघाताने हिंदु आहे.’ अशी `अपघाताने हिंदु असलेली’ व्यक्‍ती पंतप्रधान होण्याचा दुष्परिणाम असा झाला की, `हिंदु धर्माविषयी काही बोलणे म्हणजे जातीयता व धर्मांधता’ असा समज रूढ झाला.
आतापर्यंत धर्मावर अनन्वित अत्याचार, आघात होत राहिले. गेली हजार वर्षे मुसलमानांनी सातत्याने आक्रमणे करून हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यांच्या स्त्रियांना बाटवले, हिंदूंच्या कत्तली केल्या, जिझियासारखे कर लादले. या परिस्थितीत `परित्राणाय साधूनां….’हा श्रीमद् भगवद्‍गीतेतला संदेश घेऊन छत्रपती शिवराय अवतरले व त्यांनी हिंदूंमध्ये अस्मिता निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज काँग्रेस शासन हिंदूंसाठी कर्दनकाळ ठरलेल्या मुसलमानांची भलावण करणारा इतिहास केंद्रीय शाळांमध्ये शिकवत आहे व हिंदूंच्या छत्रपती शिवरायांना मात्र त्यातून वगळण्याचा प्रयत्‍न करत आहे ! काँग्रेसच्या मुसलमानांचे अवास्तव लाड करण्याच्या धोरणामुळेच आज भयोत्पादन, दंगली, बाँबस्फोट यांच्या रूपाने देशावरील आक्रमणांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.
इंग्रज अधिकारी मेकॉलेने हिंदूंचे सामर्थ्य त्यांच्या धर्मात, म्हणजेच धर्मशिक्षणात आहे, हे ओळखून इथली गुरुकुल शिक्षणपद्धती बंद केली. हिंदूंची संस्कृती संपवणे किंवा तिला विकृत करणे हेच उद्दिष्ट ठेवले. यामुळे आज हिंदूंना स्वधर्माविषयी जाणून घेण्यासाठी, धर्मशिक्षण घेण्याची सोय कोठेच उपलब्ध नाही व पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व चंगळवाद यांच्या रूपाने हीच विषवल्ली दारोदारी झालेली दिसते आहे.
इस्रायलमध्ये ज्यूंनी २ हजार वर्षांपूर्वीची त्यांची भाषा पुनरुज्जीवित केली व ती पुन्हा वापरायला सुरुवात केली. आपण आपल्या देववाणी असलेल्या `संस्कृत’ भाषेला मृत ठरवले, तर मातृभाषा मराठीला गौण स्थान दिले आणि परकियांच्या इंग्रजीचा उदोउदो सुरू केला. भाषा, भूमी आणि धर्म यांचा अभिमानच आपल्यात उरलेला नाही. शाळेत शिक्षण घेण्याचा उद्देश पुढे विदेशात जाऊन पैसा कमवणे, असा झाला आहे. शिक्षण घेऊन `राष्ट्र व धर्म यांची सेवा करायची आहे’, या संकल्पनेचा पूर्णत: अभाव आहे.
हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हिंदूंना स्वत:चा धर्म कळला पाहिजे. त्यांना त्याविषयी स्वाभिमान वाटला पाहिजे व त्यांनी त्यानुसार आचरण केले पाहिजे, यासाठी समितीने ठिकठिकाणी विविध माध्यमांतून धर्मशिक्षणवर्ग सुरू करण्याच्या चळवळीस प्रारंभ केला आहे.

धर्मप्रसार करतांना लक्षात आलेले मुद्दे
हिंदूंमध्ये धर्मप्रसार करतांना प्रामुख्याने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यांचे धर्माविषयीचे अज्ञान व गैरसमजुती. हिंदूंना स्वधर्माविषयीची काही माहिती नाहीच; किंबहुना `आपण हिंदु धर्मात जन्माला आलो आहोत’, `धर्म, भाषा, संस्कृती या अस्मितेच्या गोष्टी आहेत’ यांची जाणीवच त्यांना नाही. `शिक्षण, नोकरी व कुटुंब धर्म’ यांत धर्म हा भाग पूर्णत: दुर्लक्षिला गेला आहे; एवढेच नव्हे, तर गैरसमजामुळे नकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाले आहेत. ते दूर करण्यासाठी धर्मप्रसाराचा बहुतांश वेळ द्यावा लागतो.
प्रत्यक्षात हिंदु धर्म हा सर्वात जास्त व्यक्‍ती व विचार स्वातंत्र्य देणारा धर्म असूनही आज हिंदु मुली मुसलमानांच्या फितवण्याला बळी पडून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी स्वत:चे धर्मपरिवर्तन करत आहेत. लहानपणापासून आपली हिंदु संस्कृती व आपला हिंदु धर्म किती श्रेष्ठ आहे, याची शिकवण, स्वाभिमान मनावर न बिंबवल्यामुळे त्याचा फायदा अन्य धर्मीय उठवत आहेत.
एके ठिकाणी हिंदू धर्म व त्यावरील आक्रमणांबाबत पुराव्यासह माहिती दिल्यावर एकाने सांगितले की, “तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत; परंतु आपण आपली मुले १५ वर्षांची होईपर्यंत हे त्यांना सांगूया नको” याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, “त्यामुळे मुलांमध्ये जातीय दृष्टीकोन निर्माण होईल !” यावरून हिंदूंची धर्माविषयीची कीव आणणारी स्थिती लक्षात येते. एकीकडे काही धर्मांध आपल्या धार्मिक स्थळांचा उपयोग मुलांमध्ये कट्टरता बाणवून त्यांना जिहादी अतिरेकी करण्यासाठी करत आहेत, तर हिंदु धर्माविषयी, त्यावर होणार्‍या आक्रमणांविषयी केवळ माहिती करून घेणे म्हणजे जातीयता निर्माण करणे, असे वाटणे, हे काँग्रेस शासनाच्या शिकवणुकीचे फळ आहे.
समाजातील प्रतिष्ठित आणि पुढारलेले यांना आपण हिंदु धर्माचे आहोत, असे सांगणेही कमीपणाचे वाटते. त्यांना आपण निधर्मी आहोत, अशी स्वत:ची प्रतीमा जपायची असते. जसाजसा पैसा येतो तसतसा धर्म विसरून पाश्चात्त्यांप्रमाणे चंगळवाद व निधर्मीपणा वाढून हिंदूंच्या जीवनातील धर्माचे महत्त्व कमी होते, असे लक्षात येते.
धर्मांतर तसेच हिंदूंवरील अत्याचार, देव व धर्म यांची विविध माध्यमांतून होणारी विटंबना आणि चंगळवादाचा पुरस्कार यांना रोखणे व त्यासाठी स्वधर्माविषयीचे अज्ञान दूर करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याची गरज असल्याचे हिंदु जनजागृती समितीच्या लक्षात आले. धर्मशिक्षणामुळे समाज धर्माचरण करेल व त्यातूनच स्वधर्माभिमान निर्माण होईल. त्यामुळे हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य करते.

धर्मशिक्षणवर्गामुळे बदल झालेली काही उदाहरणे
कर्‍हाड येथे समितीने धर्मशिक्षणवर्ग सुरू केल्यावर ७० टक्के जणांनी ३१ डिसेंबर साजरा केला नाही. आता अनेक जण कपाळावर कुंकूमतिलक लावूनच घराबाहेर पडतात.
जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावात काही जातीजातींमध्ये वैरभाव होता. धर्मशिक्षणवर्ग सुरू केल्यानंतर गावातील सर्व जण वैरभाव विसरून हिंदु म्हणून एकत्र आले आहेत व ते विविध उपक्रमही एकत्रित राबवत आहेत.
सांगली जिल्ह्यातील नागाव येथे धर्मशिक्षणवर्ग वर्षभर सुरू आहे.
तेथील यात्रेत मद्यपान, मांसभक्षण व अनिष्ट प्रथा चालायच्या. आता तिथे एवढा बदल झाला की, गावातील सर्व घरांतील व्यक्‍तींनी यात्रेच्या दोन दिवसांत अखंड नामस्मरण केले व ५० हून अधिक मुलांनी व्यसनमुक्‍तीची शपथ घेतली. गावातील धार्मिकता वाढली. संघटितपणा वाढला.

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मशिक्षण घ्या!

फाशीच्या शिक्षेची शासनाने ठराविक काळात अंमलबजावणी करावी ! – उज्ज्वल निकम

अफझलला फाशी देण्याचे टाळणार्‍या काँग्रेसला हा टाहो ऐकू येईल का ?

मुंबई, २५ एप्रिल – सर्वोच्च न्यायालयाने फाशीसारख्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शासनाने ठराविक काळात त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा `दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे कायद्याने फाशी जन्मठेपेवर आणावी’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देण्याची भीती असते, असे सांगत सुप्रसिद्ध शासकीय अधिवक्‍ते उज्ज्वल निकम यांनी अतिरेक्यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत होणार्‍या चालढकलपणाविषयी नाराजी व्यक्‍त केली.

(अफझलला फाशी देण्याबाबत काँग्रेस शासन जो अक्षम्य वेळकाढूपणा करत आहे, त्यामागे अतिरेकी अफझलची फाशी वर प्रकारे रद्द व्हावी, हाच प्रयत्‍न असावा, असे कुणी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही ! – संपादक)

निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

मतदाराने काय समजायचे ?

लोकहो, सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी सोयरिक करून स्वार्थ साधणार्‍या मायावतींसारख्या नेत्यांना कायमचे घरी बसवा !

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती त्यांच्या चौफेर आणि बेधडक वक्‍तव्य करण्याच्या पद्धतीबद्दल प्रसिद्ध आहेत. केंद्रातील सत्ता उपभोगण्यासाठी किंवा उत्तरप्रदेशमधील राजकारणातील राजकीय फायदे उपटण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांबरोबर सोयरिक केली आणि मतभेद झाले तेव्हा त्यांच्यावर खरपूस टीका केली.

 

आज त्यांच्याशी मैत्री असलेला एकही राजकीय पक्ष देशात नाही, अशी स्थिती आहे. त्यांनी उत्तरप्रदेश राज्यात स्वबळावर निवडणूक लढवून राज्यातील सत्ता स्वत:च्या पक्षाकडे खेचून आणली आणि आता लोकसभा निवडणूकही त्या स्व:तच्या पक्षाच्या बळावर लढवत आहेत. संपूर्ण देशात स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे, असा त्यांचा निश्चय होता आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांनी उमेदवार उभे केले. त्यांच्या पक्षाने आकर्षित केलेले उमेदवार पहाता त्यांचा पक्ष किमयागार असल्याचा भास झाल्यावाचून रहात नाही आणि त्यांना तिसर्‍या आघाडीने भावी पंतप्रधान म्हणून दिलेली मान्यता भारतियांना विचारप्रवण केल्याशिवाय सोडत नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करून स्वत:चे आधिपत्य सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्‍न जनतेच्या नजरेतून सुटत नाही. भाजपचे उमेदवार श्री. वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तुरुंगात पाठवतांना एके काळचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला त्या साफ विसरल्या. अर्थात् राजकीय स्वार्थ साधतांना अशा संबंधांना तिलांजली देण्याचे काम कोणताही राजकीय पक्ष करत असतो. त्यामुळे मायावती त्याला अपवाद असू शकत नाहीत. त्यांच्या वागण्यातील हा फटकळपणा त्यांच्या बोलण्यातही असतो आणि त्याचा प्रत्यय म्हणून कि काय, नव्या मुख्य निवडणूक आयुक्‍तांबद्दल त्यांनी बेधडक विधान केले. मुख्य निवडणूक आयुक्‍त श्री. गोपालस्वामी परवा २० एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर त्यांच्या पदावर आलेले निवडणूक आयुक्‍त नवीन चावला हे काँग्रेसचे दलाल आहेत, असे विधान मायावती यांनी केले. सध्या निवडणुकीचे वारे असल्यामुळे राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता सुरू आहे. राजकीय व्यक्‍तीने किंवा उमेदवाराने काय बोलावे व काय बोलू नये याची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. आता मायावतींचे विधान नव्याने नेमणूक झालेले निवडणूक आयुक्‍त नवीन चावला कोणत्या अर्थाने घेतात, हे पहावे लागेल.

पक्षपातीपणाचा दावा !
मायावती यांची नवीन चावला यांच्याविषयीची टीकाटीपणी कोणत्या परिस्थितीत झाली ते पहायचे झाले, तर उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथील तीन पोलीस अधिकार्‍यांच्या करण्यात आलेल्या बदल्या पहाव्या लागतील. इंडियन जस्टीस पार्टीच्या उमेदवाराची हत्या झाली त्याप्रकरणी उत्तरदायी धरून पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली. आपल्या राज्यातील पोलीस अधिकार्‍यांची अशा प्रकारे बदली केल्यामुळे राजकीय यंत्रणेचे नैतिक धैर्य ढासळते, परिणामी राज्यशासनाची बदनामी होते, असा मायावती यांचा दावा आहे. झारखंड, आंध्रप्रदेश, बिहार, या राज्यांत अलीकडे पार पडलेली निवडणुकीची पहिली फेरी हिंसाचारग्रस्त होती, तर उत्तरप्रदेशमध्ये तसे काही झाले नाही. तरीही निवडणूक आयुक्‍त एस्.वाय्. कुरेशी या राज्यांच्या दौर्‍यावर न जाता उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर परत का येतात, हा मायावती यांचा प्रश्‍न आहे. वस्तूस्थितीचा अभ्यास केला तर त्यांचा प्रश्‍न कोणाला गैर वाटण्याचे कारण नाही. निवडणूक आयुक्‍त कुरेशी आणि नव्याने मुख्य निवडणूक आयुक्‍त म्हणून एनेमणूक झालेले चावला यांच्यावर नि:पक्षपाती नसल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. सत्ताधारी पक्षांशी असलेली त्यांची जवळीक हे त्यामागील एक कारण आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्‍त गोपालस्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी तेव्हा निवडणूक आयुक्‍त असलेले नवीन चावला पक्षपाती कारभार करतात, असा आरोप ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केंद्रातील काँग्रेस सरकारकडे केली होती. काँग्रेसच्या सरकारने ती शिफारस विनाविलंब फेटाळली आणि त्याच वेळी आवश्यकता नसतांना नवीन चावला लवकरच मुख्य निवडणूक आयुक्‍त होतील, असे घोषित करून टाकले. श्री. गोपालस्वामी यांच्या निरोपसमारंभाच्या दिवशी
श्री. गोपालस्वामी यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून उल्लेख केला की, नवीन चावला नि:पक्षपातीपणे कारभार करतील. वस्तूत: निरोपसमारंभाच्या दिवशी उत्तरदायी व्यक्‍तीबाबत अशा शब्दांत मतप्रदर्शन करणे ही बाबच मुळी खटकणारी आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सेवेविषयी लिखित नियमावली असतांना त्यांच्या वर्तनाविषयी संशय निर्माण करणारी अशी विधाने काय सांगतात ? आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने अशा अधिकार्‍याविषयी काही मतप्रदर्शन केले तर जनतेने काय समजायचे ?

 

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

कोणत्याही क्षणी पोलीस आयुक्‍तालयावर हल्ला होण्याची शक्यता !

लोकहो, भयोत्पादकी हल्ल्याची स्थिती निर्माण करणार्‍या निष्क्रीय काँग्रेसला सत्ताच्यूत करा ! पाकचे १०० हून अधिक प्रशिक्षित अतिरेकी मुंबईत ! मुंबई, १९ एप्रिल – येथील क्रॉफर्ड मार्केटमधील पोलीस मुख्यालय असुरक्षित झाले आहे. पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेले शंभरपेक्षा जास्त प्रशिक्षित अतिरेकी मुख्यालयाच्या आसपास वावरत आहेत. कोणत्याही क्षणी अतिरेक्यांकडून मुख्यालयावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता गुप्‍तचर यंत्रणांनी व्यक्‍त केल्याचे वृत्त आज दैनिक `सामना’ने प्रसिद्ध केले आहे. (मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिरेकी देशात येतातच कसे ? यावरून हा देश अतिरेक्यांसाठी नंदनवनच झाला आहे, असे म्हणावे लागते. अफझलपासून कसाबपर्यंत प्रत्येक अतिरेक्याला जिवंत ठेवणारे मुसलमानप्रेमी काँग्रेस शासनच यास उत्तरदायी आहे. हिंदूंनो, अशा काँग्रेसवाल्यांना येत्या निवडणुकीत पराभूत करून त्यांच्या विरोधात याबद्दल खटले दाखल करा व त्यांना कठोर शिक्षा होईल, असे पहा ! – संपादक) पोलीस आयुक्‍त कार्यालयात अतिरेकी अगदी बिनधास्तपणे घुसू शकतात, इतक्या वाटा आहेत. कार्यालयाच्या सभोवतालची भिंत आखूड आहे. (मुळात आपल्याच देशात आपल्याच आयुक्‍तालयाच्या सभोवताली भिंत कशाला बांधावी लागते ? आपल्या आयुक्‍तालयाचे रक्षण करण्याची धमक काँग्रेसी राज्यकर्त्यांमध्ये का नाही ? अशा षंढ राज्यकर्त्यांना एक क्षणही सत्तेवर रहाण्याचा काय अधिकार ? – संपादक) ही भिंत अगदी सहज ओलांडून ते पोलीस आयुक्‍त कार्यालयात घुसू शकतात, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेठीस धरू शकतात. त्यासाठी आता सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे, असे पोलीस आयुक्‍त कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी बोलत आहेत.

निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

अतिरेकी हल्ल्यानंतर मुसलमानांना पकडण्याची `फॅशन’ ! – इमाम बुखारी

गृहमंत्रीजी, तुमची कारवाई योग्य कि बुखारींचे वक्‍तव्य ?

नवी दिल्ली, १२ एप्रिल – गेल्या साठ वर्षांत सर्व पक्षांनी मुसलमान समाजाला केवळ निवडणुकीपुरती आश्‍वासने देऊन फसवले आहे.

(मुसलमानांचे अपरिमीत लांगूलचालन करणार्‍या दोन्ही काँग्रेसना चपराक ! – संपादक) कुठेही अतिरेकी हल्ला झाला की, मुसलमान तरुणांना पकडायचे आणि त्यांना तुरुंगात टाकायचे, ही `फॅशन’च झाली आहे. (गृहमंत्रीजी, याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे ? तुमच्या खात्यातील पोलीस करत असलेली कारवाई योग्य कि इमाम बुखारी यांचे हे वक्‍तव्य, हे जनतेला स्पष्ट व्हायला हवे. – संपादक) या सर्वांवरचा विश्‍वास उडाल्याने आगामी निवडणुकीत मुसलमान समाजाने विश्‍वासार्ह प्रादेशिक पक्ष वा उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सय्यद बुखारी यांनी आज केले.

 

  निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान

दैनिक सनातन प्रभात’ने `समर्थ’ (बोधचित्र) सदराद्वारे राबवलेली मतदार जागृती चळवळ !

 
निवडणुकीच्या काळात हिंदु मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी सनातन प्रभात कार्यरत असते. `समर्थ’ हे बोध देणारे `दैनिक सनातन प्रभात’मधील लोकप्रिय चित्रमय सदर ! सनातनच्या बोधचित्रकर्त्या साधिका सौ. गौरी वैभव आफळे यांनी तयार केलेल्या या सदराच्या माध्यमातून सनातन प्रभातने आगळीवेगळी मतदार जागृती चळवळ राबवली. महाराष्ट्रात १६, २३ व ३० एप्रिल, तर गोवा राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्त याच बोधचित्रांच्या साहाय्याने मतदारांचे प्रबोधन करण्याचा आणखी एक प्रयत्न !

सर्व संकल्पना व चित्रांकन सौ. गौरी वैभव आफळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल