राज्यकर्त्यांनो, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवा करा, तरच देशहित होईल !

६०व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने २० ते २६ जानेवारी या कालावधीत `सैनिक सप्‍ताह’ राबवत आहोत. सर्वसामान्यांचा `राष्ट्र व धर्म’ यांबाबत अभिमान वाढावा म्हणून भारतातील सैनिकांचे युद्धासंदर्भातील अनुभव या सप्‍ताहाच्या निमित्ताने देत आहोत.

माजी कर्नल श्री. भिकाजी महादेव निकम हे सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथील असून ते वयाच्या १८ व्या वर्षी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले. सातारा येथील रयत संस्थेच्या सयाजीराव महाविद्यालयात इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी सैन्यात जाण्याचा निश्चय केला. लहान वयातच स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या श्री. भिकाजी यांनी गोर्‍या इंग्रज अधिकार्‍यांची चीड येत असे. त्यातूनच त्यांनी बालवयातच भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस अगोदर एका सहकार्‍यासबोत रात्रीच्या वेळी नागठाणे येथे एका गोर्‍या अधिकार्‍याच्या चालत्या गाडीवर दगड मारून काच फोडली व डोंगरात जाऊन लपून बसले होते. सैन्यात कर्नल पदावर ३८ वर्ष सेवा केलेले व वीरचक्र प्राप्‍त झालेले श्री. भिकाजी निकम हे अद्यापही स्वत:चे जीवन समाजोपयोगी कार्यासाठी घालवत आहेत. ते `साप्‍ताहिक सनातन प्रभात’चे वाचकही असून संस्थेच्या कार्याची त्यांना ओळख आहे. दर दहा वर्षांनी लढाई हवीच, नाहीतर सैन्याची धमक लक्षात येत नाही, अशी भूमिका असणारे श्री. निकम यांचे विचार येथे पाहू .

सैनिक होऊन युद्ध लढणे हेच स्वप्न उराशी बाळगणे !
पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले सर्वजण युद्धातील अनुभव सांगत असत. त्याचप्रमाणे माझा चुलत भाऊ कर्नल आर्.डी. निकम व मामा यांनी पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी सैन्यात असतांना त्यांचे अनुभव ऐकून मी भारावून जात व त्यातूनच मी सैन्यात जाण्याचे ठरवले. ते ऐकल्यावर आपणही सैन्यात जायला हवे, बंदूक चालवायला यायला हवी, सैन्यात भरती झाल्यामुळे शत्रूशी लढण्याचा विलक्षण अनुभव अनुभवता येईल, असेच ध्येय ठेवून मी व माझे दोन मित्र सैन्यात भरती झालो होतो.

शत्रूच्या हाती जिवंत सापडायचे नाही, हेच सैनिकाचे ध्येय !
१९६६ साली विद्रोही नागा लोकांबरोबर झटापट झाली. आमची आठ जणांची तुकडी नागलँडमध्ये शस्त्रास्त्रे व दारुगोळा गाडीमधून घेऊन जात होती. अचानक नागा लोकांनी जंगलातून रात्रीच्या वेळी गाडी जात असतांना हल्ला केला. त्यानंतर आठ जणांमध्ये दोन विभाग करून आरडा-ओरडा करून शत्रूला आम्ही भरपूर जण आहोत, असे भासवण्याचा प्रयत्‍न केला. त्या वेळी विद्रोही नागांबरोबर लढतांना एक जवान गोळी लागून जखमी झाला. रात्रीच्या वेळी जंगलामध्ये कोण कोठे आहे, हे लक्षात येत नव्हते. सर्व जण आम्ही विखुरलेल्या स्थितीत होतो. मात्र सर्वांना एकच नियम होता; शत्रूच्या हाती जिवंत लागायचे नाही. अशा स्थितीत दिवस उजाडायची वाट पहात होतो. मागून संपर्क करून अतिरिक्‍त कुमक मागवल्यावर नागा विद्रोही पळून गेले. त्या वेळी नागा विद्रोह्यांविरुद्ध धाडसाने प्रतिहल्ला करून दारूगोळा व शस्त्रांचा बचाव करण्यास जखमी जवानांचे प्राण वाचवले, या कामासाठी भारत सरकारने राष्ट्रपतींचे शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले.
राज्यकर्त्यांच्या दुबळेपणामुळे

चीन-भारत युद्धात विनाकारण माघार !
भारत-चीन युद्धाच्या वेळी तुकडीमध्ये हवालदार पदावर होतो. माझ्या सोबत असणार्‍या तुकडीला जंगलातून प्रवास करावा लागला. आम्ही आठ दिवस चालत प्रवास करत होतो. रेशन पुरेसे नसल्याने सोबत असलेला तांदूळ पोकळ बांबूमध्ये मीठ टाकून शिजवायचो व जंगलात जी श्‍वापदे मिळत त्यांना भाजून खायचो. जंगलातून पायांना जळवा लागून त्या रक्‍त शोषण करायच्या. तुकडीतील कोणी आजारी पडला किंवा मेला तरी आठ जणांच्या तुकडीतील सातही जवान मदत करत. अशा परिस्थितीला सामोरे जाऊनही विनाकारण माघार घ्यावी लागली, हे दुर्दैव !

सैन्यामध्ये विविध ठिकाणी सेवा करता येणे !
मध्यप्रदेश (निचम), काश्मीर, लडाख, नेफा (अरुणाचलप्रदेश), मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, आसाम, नागालॅण्ड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था, निवडणूक शांतता राखण्यासाठी व दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. चीन-भारत युद्धाच्या वेळी हवालदार पदावर सेवा करत होतो. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पंजाबमध्ये असतांना नेतृत्व करण्याचा योग आला होता. त्यानंतर सैन्यामध्ये १६ वर्षे सर्वोत्तम सेवा केल्याबद्दल भारत सरकारने राष्ट्रपती विशेष सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले. सैन्यात असतांना घरातल्यांचा पत्राद्वारे संपर्क सहा महिन्यांनंतर व्हायचा; तर दोन वर्षांनंतर घरातल्यांची तोंडे पहाण्याचा योग यायचा.

भारत-पाक व पाक-बांगलादेश युद्धात सहभाग !
पाकिस्तान-बांगलादेश युद्धाच्या वेळी मी तुकडीचा निरीक्षक होतो. `सेंट्रल रिझर्व्ह फोर्स’च्या तुकडीचा मी निरीक्षक म्हणून सेवा करत होतो. त्रिपुरा भागांतून आमची तुकडी शत्रूवर हल्ला करत होती. त्या वेळी बांगलादेशातील जनतेचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे हे युद्ध आम्ही लढू शकलो. बांगलादेशातील नागरिकांसोबत रहातांना भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत झाली. तेथील नागरिकांनी बर्‍याच वेळा रेशनचाही पुरवठा केला. भौगोलिक परिस्थती योग्य असल्याशिवाय सैनिक युद्ध जिंकू शकत नाहीत. पाकिस्तानी शत्रूवर हल्ला करतांना स्थानिकांची मदत मिळत असल्याने आमचे सैन्य शत्रूवर चढाई करून पुढे-पुढे जात होते. भारत-पाक युद्धाच्या वेळी पठाणकोट भागांतून युद्धात सहभागी होण्याचा योग आला. त्या वेळी समोरील शत्रूला मारा किंवा मरा, अशीच भूमिका आम्ही सैनिकांनी बाळगली होती. या दोन्ही युद्धांच्या वेळी आम्हा सैनिकांचे मन कठोर ठेवूनच उतरलो होतो. या वेळी पाकिस्तानला नामोहरण करूनही पुन्हा त्यांना भूभाग द्यावा लागला, हे दुर्दैव.

सेवा काळात सरकारने विविध गोष्टींमुळे गौरवले !
नोकरी कार्यकाळात अत्यंत प्रामाणिक धडाडीने अचूक निर्णय घेऊन विशेष काम केले, याबद्दल सन १९६६ मध्ये भारत सरकारने विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले.
सन १९८४ मध्ये स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्ली येथे पंजाबी लोकांच्या विरोधात उसळलेल्या दंगलीमध्ये जाळपोळ, मारामारी व लुटालूट चालू असतांना २०० बस व ट्रक मध्ये अडकून पडलेल्या हजारो स्त्री-पुरुष आणि बालकांची सुखरूप सुटका करून त्यांना पंजबामध्ये पोहोचवले. या कार्याबद्दल मला पतियाळा पोलीस उपअधीक्षक, जिल्हाधिकारी व जनता यांनी माझा सत्कार केला.

उग्रवाद फोफावण्यास राज्यकर्त्यांची चुकीची धोरणे कारणीभूत !
दिल्लीवरून आदेश निघाल्यानंतर कारवाई होते. आदेश देणारे दारू पिऊन व वातानूकुलित खोलीमध्ये बसून स्थानिक परिस्थितीची पारख नसतांना आदेश देत असतात. कुठेही केव्हाही `पेट्रोलिंग’ करण्यास सांगतात. खाओ-पिओ, अशीच स्थिती असते. गेली दोन दशके उग्रवाद संपवण्याचा प्रयत्‍न करूनही तो संपला नाही; कारण आजपर्यंत तेथे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. दिल्लीवरून आदेश आल्यानंतर गोळी झाडली जाते. तोपर्यंत हातावर हात घालून बसावे लागते, अशी स्थिती आहे. नागा उग्रवाद्यांच्या विरोधात कारवाई करतांना तेथील नागा लोकांमध्ये मिसळून रहावे लागे. आजपर्यंतच्या नेत्यांमध्ये लालबहाद्दूरशास्त्री हेच खरे व कर्तव्यदक्ष नेता होते.

हेरखात्याचे अयोग्य कामकाज !
हेरखाते योग्य सेवा बजावत असते, तर गेल्या दशकात झालेले अयोध्या, संसद यांवर हल्ले झाले असते का ? सीमेवर घुसखोरी होतच रहाते. अधिकारी वर्गाला पैसे देऊन ती केली जाते. एकादा सैनिक वा अधिकारी पैसे घेण्यास तयार नसेल वा देशाची एकनिष्ठ रहात असेल, तर त्याची बदली वरिष्ठांना सांगून करायची, अशी धोरणे सैन्यातील सीमावर्ती भागातील वरिष्ठ अधिकारी राबवतात. त्यामुळे प्रत्येकामध्ये राष्ट्राभिमान जागृत होत नाही तोपर्यंत हेरखाते असो व सीमेवर कितीही सैनिक ठेवले, तरी देश सुरक्षित रहाणार नाही किंवा त्या सैनिकांचा सुरक्षेच्या दृष्टीने काहीही फायदा नाही.

शत्रूपासून नव्हे, तर घरातीलच घरफोड्यांपासून पहिल्यांदा जनतेला मुक्‍त करा !
आम्ही देशाच्या शत्रूशी लढलो; मात्र घरात असणारी घाण म्हणजे गावातील ग्रामसेवकापासून ते दिल्लीतील वरिष्ठ अधिकार्‍यापर्यंत सर्व ठिकाणी भ्रष्टाचार फोफावला आहे. या घाणीकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. घरची घाण काढून टाकल्याशिवाय बाहेरच्या शत्रूशी युद्ध करून काय फायदा ? एकीकडे भ्रष्टाचार फोफावत असतांना दुसरीकडे `अल्ला हो अकबर’चे प्रस्थ वाढले आहे. त्यांचे मंत्री-संत्री झाले आहेत. सध्या सुरू असलेले हे गृहयुद्ध संपण्याजोगे वाटत नाही. वाघाचे कातडे पांघरलेल्यांकडून काय अपेक्षा करणार ? हे करण्यासाठी सर्वांसाठी `एक राष्ट्र व एक कायदा’ झालाच पाहिजे. (उदा. नसबंदी सर्वांसाठीच लागू व्हायला हवी.)

राज्यकर्त्यांनो, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवा करा, तरच देशहित होईल !
लढाई सुरू झाल्यावर सरकार सैनिकांना लढण्यापूर्वी सहानुभूती देणार, मंत्री येणार, स्वतंत्र्याची गाणी गाणार, असे चालते. एकादा मंत्री, संत्री झाला की, तो करोडपती होतो. समाज त्याच्या मागे धावत असतो. लालबहाद्दूर शास्त्री, पटेल, हे खरे नेत होते. आजपर्यंत गावाचा विकास व्हावा, यासाठी ३४ वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर गावातच रहाण्याचा निर्णय घेतला. घराचा व स्वत:च्या आर्थिक प्रगतीचा विचार केला नाही. गावामध्ये शाळा काढावी व गावात समाजोपयोगी गोष्टी कराव्यात यासाठी राहिलो. मात्र सध्याचे मंत्री-संत्री असे समोपयोगी कार्य करून देतील का ? आताच्या राज्यकर्त्यांना समाजसेवा करायची असेल, तर घरावर तुळशीपत्र ठेवून करा, तरच देश प्रगती करेल. जनताही करोडपती झालेल्या मंत्र्याच्या पाठिमागे लागते, हे दुर्दैव. सध्या निवृत्तीनंतर जीवनास आवश्यक असणारी गरज पाणी यासाठी जलसंशोधन व भूगर्भसंशोधन शास्त्राचा सखोल अभ्यास करून सातारा, रायगड, रत्‍नागिरी, कोल्हापूर व पुणे या ठिकाणी भूगर्भातील पाण्याचा स्रोत अचूक दाखवून लोकांना विंधन विहीर, बोअरद्वारे शेतीला व पिण्यासाठी पाणी दाखवण्याचे मार्गदर्शन करून लोकांचे दैनंदिन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्‍न करत आहे.

दर दहा वर्षांनी लढाई हवीच !
प्रत्येक क्षणी सैनिकांनी युद्धस्थितीत राहायला हवे. कारण नुसते शस्त्र असून उपयोग नाही, तर ती चालवण्याचे प्रशिक्षण हवे. तसे झाल्यास सैनिक युद्धकाळात चोख भूमिका बजावू शकतो. नाहीतर सैनिक युद्धाला निर्भयतेने सोमेरे जाऊ शकत नाही; कारण प्रत्येक युद्ध मनाच्या स्तरावर पहिल्यांदा लढायला हवे. आज भारतीय सैनिकांची तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. तलवार मॅनात नको, तर हातात हवी ! त्यानुसार सैनिकांचे शस्त्र सतत तळपावण्यासाठी दर दहा वर्षांनी लढाई हवीच. तरच सैन्य कुशल व बलसंपन्न रहाते.

हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सस्नेह नमस्कार

`स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपट थांबवण्यास `सेन्सॉर’चा नकार

हिंदूंच्या भावनांचा अनादर करून हिंदुद्रोही चित्रपट थांबवण्यास नकार देणार्‍या `सेन्सॉर’ मंडळाचा धिक्कार !

मुंबई, २१ जानेवारी (वार्ता.) – प्रभु श्रीरामचंद्र व भारतीय संस्कृती यांचे विडंबन करणारा `स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला दिले होते. या निवेदनानुसार आज हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ व मंडळाचे विभागीय अधिकारी श्री. विनय आझाद यांच्यात चर्चा झाली; मात्र चित्रपटाला आधीच प्रमाणपत्र देण्यात आले असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास असमर्थ असल्याचे श्री. आझाद यांनी सांगितले.

(मुसलमानांनी अशा प्रकारची तक्रार आणली असती तर त्यांना असे उत्तर देणे शक्य झाले असते का ? हिंदूंच्या भावनांची किंमत केली जात नाही, ही वस्तूस्थिती अजून किती दिवस टिकणार आहे ? – संपादक) या चित्रपटात हिंदु-मुस्लीम दंगल घडतांना एका लहान मुलाला श्रीरामाच्या वेशात दाखवले आहे. जमाल हा चित्रपटाचा नायक त्या श्रीरामाला पाहून मरणाच्या भीतीने पळत सुटतो, असे यात दाखवले आहे. या दृश्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, तसेच हिंदू मुसलमानांवर अत्याचार करत आहेत, असे एकांगी दाखवले आहे. संपूर्ण चित्रपटात भारत म्हणजे गरीबी, दंगली, वेश्याव्यवसाय, अशा प्रकारचे बीभत्स वर्णन दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी समितीने या चर्चेदरम्यान केली. (भारताची प्रतीमा जगभरात डागाळणार्‍या चित्रपटाला प्रमाणपत्र देणार्‍या केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचा हा हिंदुद्रोह व राष्ट्रद्रोहच म्हणावा लागेल. हा चित्रपट बंद पाडण्यासाठी भारतीय राज्यकर्ते काही करतील काय ? – संपादक) श्री. आझाद यांनी सांगितले, “एका पुस्तकावर आधारलेले हे काल्पनिक कथानक आहे. हा माहितीपट (डॉक्युमेंट्री) नसल्याने दंगलीच्या दरम्यानच्या सर्वच गोष्टी दाखवलेल्या नाहीत. इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये दंगलीच्या बाबतीत चित्रण केलेले असते. रामाचा अवमान होईल, अशा स्वरूपातील हे दृश्य नाही, त्यामुळे परीक्षण मंडळाने इंग्रजी चित्रपटाला `अ’ प्रमणापत्र (फक्‍त प्रौढांसाठी) व हिंदी चित्रपटाला `यु/अ’ प्रमाणपत्र (१२ वर्षांपुढील दर्शकांसाठी व १२ वर्षांखालील मुलांना पौढांसोबत) दिलेले आहे. आता मंडळाने हे प्रमाणपत्र दिले असल्याने आम्ही चित्रपट प्रदर्शन थांबवू शकत नाही”, असे त्यांनी सांगितले. अध्यात्मशास्त्रानुसार चित्रपटातील श्रीरामाचे चित्रीकरण चुकीचे असून त्यामुळे श्रद्धेला तडा जाणार आहे, असे समितीने श्री. आझाद यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकारी मंडळात हे निवेदन चर्चेसाठी ठेवण्याचे आश्‍वासन दिले; मात्र चित्रपटाचे प्रदर्शन थांबवणे मंडळाच्या हातात नसून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय किंवा न्यायालयीन आदेशाद्वारेच हा चित्रपट थांबू शकेल, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. समितीच्या शिष्टमंडळात सर्वश्री शिवाजी वटकर, अनित पिंपळे व सौ. वर्षा ठकार यांचा समावेश होता. समितीचे सदस्य सौ. पौर्णिमा प्रभू व श्री. मोहन गौडा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने `कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स बंगळुरू’ आणि `फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड कर्नाटक’ यांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी निषेधपत्र दिले आहे. तसेच समितीच्या संकेतस्थळावरही या चित्रपटाच्या विरोधात निषेध मोहीम सुरू आहे. धर्माभिमानी पुढील पत्त्यावर निषेध नोंदवत आहेत.
पत्ता : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, भारतभुवन, ९१ इ, वाळकेश्‍वर रोड, मुंबई ६.
संपर्क : दू.क्र. : (०२२) २३६९ ९२५५, २३६२ ५७७०
फॅक्स : २३६९ ००८३
इ-मेल : aocbfcmum@rediffmail.com

`स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटात प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन व हिंदूंचा अवमान !

मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – `स्लमडॉग मिलेनिअर’ या आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटातून हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन करण्यात आले आहे.

(हिंदु त्यांच्या देवता व धर्म यांबद्दल उदासीन असल्याने कोणीही त्यांच्या देवता व धर्म यांचे सहज विडंबन करू धजावतात. मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करण्याची हिंमत कोणात आहे का ? – संपादक) या चित्रपटात प्रभु श्रीरामचंद्रांना विद्रुप स्वरूपात दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात `भारतात हिंदु मुसलमानांवर अन्याय करतात’ असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. (आंतरराष्ट्रीय पातळीवर सहिष्णू हिंदूंची प्रतीमा जाणूनबुजून खराब करण्याचे षडयंत्र यशस्वी करणार्‍यांचे पितळ उघडे पाडणारा एकही मायचा लाल अस्तित्वात नाही का ? हिंदुत्ववादी संघटना याबाबत काय करणार आहेत ? – संपादक) या संपूर्ण चित्रपटात केवळ भारतातील दारिद्र्याचेच प्रदर्शन करण्यात आले आहे. याबाबत जगभरातील धर्माभिमानी हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या चित्रपटाच्या विरोधात सर्वत्र निषेधाचे सूर उमटत आहेत व या चित्रपटाचे प्रदर्शन त्वरित थांबवावे व चित्रपट निर्मात्याने सर्व हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. हा चित्रपट भारतात २३ जानेवारी रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. (प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन करणार्‍या व हिंदूंचा अवमान करणार्‍या या चित्रपटाचा जाहीर निषेध ! – संपादक) विशेष म्हणजे या चित्रपटास आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. याबाबत हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील http://www.hindujagruti.org/news/6162.html या मार्गिकेवर विस्तृत माहिती उपलबध आहे. समितीच्या संकेतस्थळावर याबाबत निषेध व्यक्‍त करण्यात आला आहे. संकेतस्थळाला भेट देणार्‍या हिंदूंनी या चित्रपटाचे भारतात होणारे प्रदर्शन थांबवावे व चित्रपटाच्या निर्मात्यांनी समस्त हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धर्माभिमानी पुढील पत्ता व संपर्क क्रमांक यांवर निषेध नोंदवत आहेत.
फॉक्स सर्चलाईट पिक्चर्स, १०२०१ पिको ब्लव्ह्ड, लॉस एंजलिस सीए ९००३५, अमेरिका दूरध्वनी : ३१०-३६९-२४३१

हिंदु जनजागृती समितीचे चित्रपट परीनिरीक्षण मंडळास निवेदन
मुंबई – लाखो हिंदूंच्या व भारतियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने `स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाला भारतामध्ये दाखवण्यास प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला केली. हिंदु जनजागृती समितीतर्फे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला याबाबतचे निषेधपत्र देण्यात आले. समितीच्या महिला आघाडी प्रमुख सौ. वर्षा ठकार, संकेतस्थळ प्रतिनिधी श्री. अनित पिंपळे व समितीचे मुंबई समन्वय श्री. शिवाजी वटकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या सचिव श्रीमती विजया यांच्याबरोबर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आज चर्चा केली. उद्या या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी विभागीय अधिकारी श्री. विनय आझाद यांनी शिष्टमंडळास बोलावले आहे. या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मिला टागोर यांनाही हे निवेदन दाखवून उद्या या संदर्भात शिष्टमंडळाला माहिती देण्यात येईल. हिंदु जनजागृती समितीतर्फे हिंदु धर्माभिमान्यांना व राष्ट्राभिमान्यांना त्यांनी या चित्रपटाला विरोध करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

धर्माभिमानी पुढील पत्ता व संपर्क क्रमांक यांवर निषेध नोंदवत आहेत.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, भारतभुवन, ९१ इ, वाळकेश्‍वर रोड, मुंबई ६.
दू.क्र. व फॅक्स : (०२२) २३६२ ५७७०, २३६९ ९२५५

`स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील आक्षेपार्ह प्रसंग व दृश्ये
या चित्रपटातील कथानकात जमाल मलिक हा मुंबईतील झोपडपट्टीत रहाणारा तरुण मुलगा या खेळामध्ये विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन कोट्याधीश होतो, असे दाखवण्यात आले आहे. त्यात `प्रभु श्रीरामाने उजव्या हातात काय पकडले आहे ? असा एक प्रश्‍न सूत्रसंचालक असलेला अनिल कपूर जमालला विचारतो. त्या वेळी जमालला त्याच्या बालपणी झालेली दंगल आठवते त्यात हिंदु मुसलमानबहुल भागात हल्ला करतात व `ते पहा मुसलमान, त्यांना पकडा’, अशा घोषणा देत ते मुसलमानांवर हल्ला करतात व मुसलमान सैरभैर होऊन पळतात. एक हिंदु जमालच्या आईच्या डोक्यावर लोखंडी दांडा मारतो व तिची हत्या करतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तेथून पळ काढतात. पळतांना ते एका छोट्याशा बोळात शिरतात. तेथे त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेला एक लहान मुलगा दिसतो. जमाल त्याला बारकाईने न्याहाळतो. तेव्हा त्याला त्या मुलाच्या उजव्या हातात धनुष्य दिसतो. नंतर ते मार्ग बदलतात, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. (हिंदूंनो, या चित्रपटाच्या विरोधात जोरदार आवाज उठवा व हिंदु मुसलमानांवर नव्हे, तर मुसलमान हिंदूंवर अन्याय करतात, हे सिद्ध करून दाखवा ! – संपादक) प्रभु श्रीरामचंद्रांसारखी वेशभूषा केलेला तो मुलगा अतिशय भयानक दाखवण्यात आलेला आहे. चित्रपटात त्याच्या चेहर्‍यावर दाखवण्यात आलेले हावभाव व स्थिती अत्यंत विद्रुप आहे. प्रभू श्रीराम उजव्या हातात लोकांना मारण्यासाठीच धनुष्य घेऊन उभे आहेत, असे या दृश्यातून प्रतीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात भारत हा चोरट्यांचा व अमेरिका हा मानवतावाद्यांचा देश आहे, असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

बेळगावचे राजकारण !

स्वत:च्या सोयीप्रमाणे न्यायालयाचा दाखला देणारे शरद पवार मराठी जनतेला न्याय काय मिळवून देणार ?

विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेदामुळे राजकीय वातावरण तापले असतांनाच परवा शिवसेनेने भाजपबरोबर असलेली युती तोडण्याचा इशारा दिला आहे, तर भाजपने हा निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेनेला असल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे हा वाद अधिकच ताणला गेला आहे. या नव्या वादाचे कारण आहे, बेळगावमधील मराठीजनांवर कर्नाटकमधील भाजपच्या येड्डीयुरप्पा सरकारकडून होणारा अन्याय !

बेळगाव प्रश्‍नावर काँग्रेसची निष्क्रीयता
बेळगाव प्रश्‍नाबाबत लिहितांना प्रथम महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात डोकावून पहाणे क्रमप्राप्‍त ठरते महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यासाठी मराठी जनतेला मोठा लढा द्यावा लागला. सुमारे साडेतीन कोटी जनतेने त्यासाठी जिवाची बाजी लावून `मुंबईसह कारवार, बेळगाव-निपाणीसह संयुक्‍त महाराष्ट्र झाला पाहिजे’, अशी मागणी लावून धरली. जनतेच्या या प्रयत्‍नातून बेळगाव व कारवार महाराष्ट्राला मिळाले नसले, तरी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या प्रश्‍नाकडे तितक्या पोटतिडकीने न पाहिल्याने राज्याच्या निर्मितीनंतर गेली ४८ वर्षे हा प्रश्‍न खितपत पडला आहे. महाराष्ट्रनिर्मितीच्या वेळी यशवंतराव चव्हाणांनी `आपण देवाणघेवाण केली पाहिजे’, असे मत मांडून या वेळी डांग, बेळगाव, कारवार निपाणी हे भाग अन्य राज्यांना देऊन टाकले; मात्र मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच घेतले नाही. उलट ते म्हणाले, `धाकट्या भावाची सोय मोठ्या भावाने पाहिली पाहिजे.’ या प्रश्‍नावर विधिमंडळात आवाज उठवतांना तत्कालीन आमदार प्र.के. अत्रे म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांची भूमिका आपल्याला तत्त्वत: मान्य आहे; मात्र ही सोय केव्हा केली पाहिजे ? बाप मेला असेल, तर धाकट्या भावाची सोय मोठ्या भावाने पाहिली पाहिजे; परंतु आपला दिल्लीचा बाप जिवंत आहे. तेव्हा त्याला आपण सांगितले पाहिजे की, तुम्ही जिवंत आहात.”
महाराष्ट्राने राष्ट्रहित साधतांना नेहमीच स्वत:ला मोठा भाऊ समजून लहान भावाचा विचार केला आहे; मात्र मोठ्या भावाचा हा त्याग लहान भाऊ केव्हा समजणार ? उलट लहान भाऊ महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय करून आपला कृतघ्नपणा दाखवत आला आहे. त्याचे परिणामही मराठी जनता भोगत आहे. ४९ वर्षांनंतरही बेळगाव प्रश्‍न भिजत घातलेल्या घोंगड्याप्रमाणे तसाच पडला आहे. मराठीजनांना मारहाण करणे, त्यांच्यावर कन्नड भाषेची सक्‍ती करणे, मराठी संस्कृती चिरडणे हे अन्याय त्या वेळी बेळगावमध्ये मराठी जनतेवर झाले व ते आजही होत आहेत. फक्‍त माणसे बदलली, हाच काय तो फरक !

युतीच्या भांडणात काँग्रेसला फायदा नको !
या लढ्यात शिवसेनेची भूमिकाही मोठी आहे. शिवसेनेचा जन्मच मुळात मराठीजनांच्या हितासाठी झाल्याने या सीमावादात शिवसेना बेळगावमधील मराठी जनतेच्या ठामपणे पाठीशी उभी राहिली आहे. पूर्वी कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांचे सरकार होते. त्यामुळे मराठी जनतेच्या भावना ते समजू शकले नाहीत. भाजप सत्तेत आल्यास तो या प्रश्‍नाबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावेल, असे वाटले होते; मात्र कर्नाटकात भाजप सत्तेत आल्यानंतरही मराठी जनतेवरील अन्याय दूर झाले नाहीत. याचा प्रत्यय मागील दोन दिवसांपासून येत आहे. बेळगावमध्ये मराठीजनांचा महामेळावा आयोजित केला होता. हा मेळावा दडपण्यासाठी कर्नाटकातील भाजपच्या येड्डीयुरप्पा सरकारने मराठी जनतेवर पोलिसांकरवी अमानुष लाठीहल्ला केला. हा मेळावा होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रातील भाजपशी युतीचे नाते ताणले जाऊन हे नाते तोडण्याचा इशाराच शिवसेना नेत्यांनी भाजपला दिला. यामुळे ही युती तुटण्याची वाट पहाणार्‍या संधीसाधू काँग्रेसला व तथाकथित निधर्मीवाद्यांना आनंदाच्या उकळया फुटल्या असतील, हे मात्र नक्कीच !
काँग्रेसने या देशाच्या सीमांचे रक्षण केले नाही. उलट आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशांतर्गत प्रांतीय व जातीय वाद निर्माण करून ते कसे पेटत रहातील, हेच पाहिले आहे; मग तो काश्मीर प्रश्‍न असो वा बेळगावचा प्रांतीय वाद असो. काँग्रेसने काश्मीर प्रश्‍नातून मुसलमानांना, तर प्रांतीय प्रश्‍नातून परप्रांतियांना खूष करून मते मिळवण्याचा प्रयत्‍न चालू ठेवला आहे. `बेळगाव प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहायला हवी’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. एरवी स्वहिताचे निर्णय घेतांना न्यायालयाचे आदेशही धाब्यावर बसवण्याचे वा कायद्यात बदल करण्याचे धाडस काँग्रेस सरकारकडून दाखवले जाते. त्यामुळे बेळगाव प्रश्‍नाबाबत शरद पवार यांनी न्यायालयाकडे बोट दाखवणे, ही केवळ ढोंगबाजी आहे. मुळात काँग्रेसला बेळगाव प्रश्‍न सोडवण्यात स्वारस्य नाही, हेच गेली साडेचार दशके दिसून आले आहे. काँग्रेसच्या या स्वार्थापायी हिंदुत्वाचा व मराठीचा बळी जात आहे. `मराठी’ आणि `हिंदुत्व’ या दोन्ही गोष्टींशी आपल्या आस्था जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने बेळगावमधील मराठीचा प्रश्‍न सोडवतांना हिंदुत्वाला बाधा येणार नाही, हे पहाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भाजप व शिवसेना यांनी हा प्रश्‍न एकत्रित येऊन सोडवायला हवा व त्यासाठी केंद्रातील काँग्रेस सरकारवर दबाव आणायला हवा.

निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिध

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या संवेदनशून्यतेमुळे काश्मिरी हिंदूंची झालेली विदारक स्थिती !

१९ जानेवारी १९९० साली धर्मांध मुसलमानांनी काश्मीरमधून हिंदूंना हाकलून लावले. तेव्हापासून साडेचार लाख काश्मिरी हिंदू त्यांच्याच देशात विस्थापित जीवन कंठत आहेत. १९ जानेवारी रोजी असलेल्या `काश्मिरी हिंदू विस्थापनदिना’च्या निमित्त त्यांची विदारक स्थिती येथे देत आहोत.

काश्मिरी हिंदूंच्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये ३०० जणांसाठी एकच प्रसाधनगृह आहे.
३ ते ४ मजली भव्य घरांमध्ये पिढ्यान्पिढ्या रहाणार्‍या काश्मिरी हिंदूंना विस्थापित म्हणून एका खोलीत २० जणांबरोबर गेल्या २० वर्षांपासून रहावे लागत आहे.
विस्थापित छावण्यांमध्ये साप व विंचू यांचा वावर असतो, सांडपाण्याची व्यवस्था नाही, छावण्यांभोवती विटभट्टी आहे इत्यादी प्रतिकूल परिस्थिती सहन न झाल्याने ५ हजार काश्मिरी हिंदूंचे जीवन कामी आले.
(काश्मिरी हिंदूंच्या या व्यथा नव्हे, नरकयातना कायमच्या हिंदूंच्या डोळयांसमोर राहिल्या पाहिजेत किंवा त्यांची सल मनात कायमची राहिली पाहिजे. तशी जर राहिली, तरच आपण हिंदु धर्माचे रक्षण करण्याची काहीतरी शक्यता आहे. तसे जर आपल्या स्मरणात काही राहिले नाही, तर हा हिंदु समाज नष्ट होण्याच्याच लायकीचा आहे, याची खूणगाठ हिंदूंनी बाळगावी ! – संपादक)

काश्मिरी हिंदूंचे विस्थापन हे भारत सरकारचे नव्हे, तर पूर्ण शासनव्यवस्थेचे अपयश !
`विशिष्ट राज्यकर्तेच नव्हे, तर सारी शासन पद्धतीच काश्मिरी हिंदूंवर होत असलेले अत्याचार, त्यांचे विस्थापन रोखण्यात अपयशी ठरली आहे. भारतीय शासनकर्ते व त्यांच्या सार्‍या पद्धती सदोष आहेत. त्या मोडून काढायला हव्यात. त्यावर टीका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे. शासनपद्धती किंवा व्यवस्था व राष्ट्र यांत आपल्याला फरक करता यायला हवा. आम्हाला सुरक्षादलांचा भरोसा वाटायचा; पण ते असतांनाही काश्मिरी हिंदू विस्थापित झाले; कारण शेवटी त्यांच्या दोर्‍या व्यवस्थेकडे आहेत.’ – श्री कुलदीप रैना, महासचिव, पनून कश्मीर

भारताची धर्मनिरपेक्षता आणि पाकिस्तान !

समविचाराने एकत्र आणि शक्‍ती एकवटून लढायचे ठरवल्यासच सेनादलांना अधिक बळ प्राप्‍त होईल !
गुरुवारी भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांची अधिवेशने सुरू झाली. मुंबईवर नोव्हेंबरात दहा पाकिस्तानी म्हणजेच इस्लामी आतंकवाद्यांनी आक्रमण करून २०० निरपराध नागरिकांना ठार मारले. ४०० माणसांना घायाळ केले आणि प्रचंड भीतीचे साम्राज्य निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व संसदसदस्य एकत्र जमले. त्यांनी एकजुटीने आतंकवादाशी झुंज घेण्याचा निर्णय घेतला. आपापसांत भांडून समान राष्ट्रीय संकटाच्या वेळी शक्‍ती फुकट घालवू नये, हा शहाणपणा सगळयांना सुचला, हे सुचिन्ह म्हणता येईल. दुर्योधनाने एकदा अतीप्रसंग केला, तेव्हा विराट राजाने त्याला आणि त्याच्या सैन्याला झोडपून बंदी केले. त्या वेळी त्यांना सोडवण्याच्या प्रश्‍नावरून पांडवांत साहजिकच मतभेद झाले; कारण दुर्योधन पांडवांशी नेहमीच कपटकारस्थाने करून वागला होता; परंतु युधिष्ठिराने समजावले की, आपापसांत भांडतांना कौरव शंभर आणि पांडव पाच असले, तरी तिसरा आपल्यापैकी कोणाशीही लढत असेल, तेव्हा आपण एकशेपाच होऊन त्याचा पराभव केला पाहिजे. `वयं पंचाधिक शतम्’ असे उद््गार त्या वेळी युधिष्ठिराने काढले होते. त्यांचा पुनरुच्चार काही सदस्यांनी केला, हे चांगले झाले. परक्याला घरात घेऊन आपापसांतील भांडणात त्याला मध्यस्थी करायला सांगायची वाईट सवय हिंदूंना आहे. या वेळी सगळयांनी समविचाराने एकत्र येऊन आणि शक्‍ती एकवटून लढायचे ठरवले असल्याने भारतीय सेनादलांना अधिक बळ प्राप्‍त होणार आहे. शक्‍ती ही साधनांपेक्षा इच्छाशक्‍तीत वस्ती करून असते, इच्छाशक्‍ती सदैव तेजस्वी आणि चिरंजीव राहिली पाहिजे. यासाठी तिला अधूनमधून पाणी दिले पाहिजे. धार लावली पाहिजे. ती वेळ ही आहे. त्यासाठी पंतप्रधानांचे एक विधान तपासून पाहू.

इस्लामची सेवा करणे, हेच भारताचेही उद्दिष्ट आहे, असे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्‍न !
मुंबईवर पाकिस्तानी आतंकवादी तरुणांनी जो प्राणघातक हल्ला केला, तो भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला होता, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले. हे विधान वस्तूस्थितीला सोडून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्याच्या जेवढे जवळ जाता येईल, तेवढे नेतृत्वाने गेले पाहिजे. शक्‍तीला ज्ञानाचे अधिष्ठान असेल, तर शत्रूदमन योजना अचूकपणे आखता येते. पाकिस्तानला भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर आघात करून समाधान होणार नसून त्यापेक्षा अधिक काहीतरी करायचे आहे. पाकिस्तानला संपूर्ण भारत इस्लाममय करायचा आहे, पाकिस्तानचे हे उद्दिष्ट सफल होऊ द्यायचे नसेल, तर इस्लामपेक्षा चांगले असे भारताजवळ आहे, असा विश्‍वास भारतात रहाणार्‍या लोकांना दिला गेला पाहिजे; परंतु भारत सरकार अगदी उलट्या पद्धतीने वागत आहे. काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे सरकार पाकिस्तानची नेहमी खात्री पटवण्याचा प्रयत्‍न करत असते की, पाकिस्तानचे जेवढे इस्लामवर प्रेम आहे, त्यापेक्षा भारताचे इस्लामवरील प्रेम मुळीच कमी नाही; म्हणून पाकिस्तानने भारताशी लढू नये. असे नुसते सांगून भारत सरकार आणि काँग्रेस पक्ष थांबत नाही, तर प्रत्यक्ष कृतीने इस्लामची सेवा करणे, हे भारताचेही उद्दिष्ट आहे, असे दाखवण्याचा प्रयत्‍न करण्यात येत असतो. पाकिस्तान आणि भारतातील मुसलमान या दोन वेगळया गोष्टी आहेत. असे काँग्रेस पक्ष मानीत नाही. भारतातील मुसलमानांच्या मागण्या सारासार विचार न करता आणि देशहिताकडे दुर्लक्ष करून मान्य करण्याचे धोरण ठेवले की, पाकिस्तानचे समाधान होईल आणि तो भारताशी स्नेहपूर्ण वर्तन ठेवेल, अशी आशा काँग्रेसला आहे. मुसलमानांच्या मागण्या कितीही भयंकर असल्या, तरी त्या मान्य करण्यातच हिंदूंचे आणि भारताचे हित आहे, असा विचार करण्याची सवय काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत लावल्याने हिंदूंचा शक्‍तीपात होऊन पाकिस्तान निर्माण झाले; परंतु युधिष्ठिराला द्युताच्या व्यसनाची नशा चढली होती. तशी काँग्रेसला हिंदु-मुस्लीम ऐक्याची नशा गांधीयुगात चढवण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावरही काँग्रेसने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. भारतातील मुसलमानांना प्रसन्न ठेवले की, पाकिस्तान प्रसन्न राहील, असा सिद्धांत काँग्रेसने मांडला. तो सिद्धांत कृतीत उतरवतांना पाकिस्तानला प्रिय असलेली गोष्ट केली की, भारतातील मुसलमान प्रसन्न होतील, असा उपसिद्धांत मांडण्यात आला. परिणामी हिंदूंना वार्‍यावर सोडण्यात आले.


धर्मनिरपेक्षतेचे एकही तत्त्व कार्यवाहीत न आणल्याने भारतातील मुसलमानांना काँग्रेस देशभक्‍त करू शकली नाही !

पाकिस्तानने मुंबईवर आतंकवादी हल्ला केला आणि भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणली, हे पूर्ण सत्य नसून धर्मनिरपेक्षतेचे एकही तत्त्व कार्यवाहीत न आणल्याने भारतातील मुसलमानांना काँग्रेस देशभक्‍त करू शकली नाही, त्यामुळे पाकिस्तानला हल्ला करणे अतिशय सोपे झाले. असलेच तर हे पूर्णसत्य आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान जगात जसे मांडले जाते, त्यापेक्षा अगदी उलटे तत्वज्ञान भारतात मांडले जाते. धर्मनिरपेक्षतेची पहिली अट अशी आहे की, निर्बंधासमोर म्हणजे कायद्यासमोर सर्व समान असतात. त्या त्या देशाची संसद जे कायदे करते, ते सगळयांना पाळावे लागतात. एखाद्या विशिष्ट धर्ममताचे लोक आपल्या धर्मग्रंथातील वचने उद्धृत करून ती श्रेष्ठ आहेत आणि आम्ही त्यांचेच पालन करणार असून संसदेला आम्ही जुमानीत नाही, असे म्हणू शकत नाहीत; परंतु भारतात तसे स्वातंत्र्य मुसलमानांना आहे.

मुसलमानांच्या अवास्तव मागण्या मान्य करणे, ही काँग्रेस सरकारची धर्मनिरपेक्षता !
शहाबानो नावाच्या मुसलमान बाईला घटस्फोटानंतर नवर्‍याकडून पोटगी मिळाली पाहिजे, असा आदेश न्यायालयाने दिला; परंतु तो मुसलमानानांनी मानला नाही. घटस्फोटाने टाकून दिलेल्या बाईला पोटगी द्या, असे आमचा धर्म आम्हाला सांगत नाही, असे मुसलमानांनी दरडावून सांगितले आणि लढाईच्या पवित्र्यात ते मैदानात उतरले. त्याबरोबर काँग्रेस सरकार घाबरले. नेहरूंचे नातू आणि राहुल गांधीचे पिताश्री राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते. त्यांनी लोटांगण घातले. मुसलमानांना शरीयतप्रमाणे भारतात सुखाने आणि निर्भयपणे जगता येईल, न्यायालयाचे आदेश मानण्याचे त्यांच्यावर बंधनकारक नाही, असे आश्‍वासन राजीव गांधींनी दिले. तसे विधेयक संसदेत पारित करून घेतले. राजीव गांधींनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखली नाही. स्त्रीजातीचे अश्रू पुसले नाहीत. उलट भारताच्या संसदेला वेसण घालून त्यांनी तिला मुसलमानांच्या पडवीत बांधून टाकले. मुसलमानांच्या हिताविरुद्ध विधेयक पारित होणार नाही, हे त्यांनी जगप्रसिद्ध केले. भारतावर पाकिस्तानी आतंकवादी शेवटी हल्ला करतात. आधी हल्ला भारतातील मुसलमान करतात. त्यांच्या अवास्तव मागण्या काँग्रेस सरकार मान्य करते. अशा वर्तनालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाने पाकिस्तानला हल्ला करण्यास प्रोत्साहन मिळते; म्हणून `कायद्यासमोर मुसलमान धरून सर्व समान’ हे तत्त्व काँग्रेसने मान्य केले पाहिजे. भारतात शरीयतचे नाही, तर संसदेचे राज्य चालेल, असे मनमोहनसिंग सरकारने घोषित केले पाहिजे. काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तर त्यांनी देशभर समान नागरी संहिता लागू करण्याचे विधेयक संसदेत आणले पाहिजे. भारतातील मुसलमानांनी समान नागरी संहिता मान्य केल्यास पाकिस्तानचे निम्म्याहून अधिक सामर्थ्य कमी होईल.

`हिंदु’ या शब्दाच्या उपहासात्मक (कि खर्‍या) व्याख्या !

अ. `इतिहासातून शहाणपणा शिकत नाही, तो हिंदु !
आ. अगदी नित्यनेमाने, कित्येक वर्षांपासून स्वत:च्या विनाशाचा पाया रचतो, तो हिंदु !
इ. `मला काय त्याचे’ या कर्तव्यहीन भावनेने जगतो, तो हिंदु !
ई. स्वत:च्या धर्मावर चोहोबाजूंनी हल्ला होत असतांना शांत झोपतो, तो हिंदु !
उ. स्वधर्माचा विनाश करण्यासाठी सातत्याने मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसची
साथ देतो, तो हिंदु ! (संदर्भ : साप्‍ताहिक राष्ट्रपर्व)

बारा डिसेंबरला अनेक जन्मतात…

प्रत्येक हिंदू लढाऊ वृत्तीचा झाला पाहिजे, हा मुंजे यांचा संकल्प होता
सहस्रावधी माणसे बारा डिसेंबरला जन्मतात; पण त्यात बाळकृष्ण शिवराम मुंजे एखादेच असतात. आज मुंजे यांचे संकीर्तन होण्याची नितांत आवश्यकता आहे; कारण या माणसाने हिंदूंची युयुत्सु वृत्ती जागती ठेवण्यासाठी आपले उभे आयुष्य झिजवले. मध्यप्रदेशातील विलासपूर येथे आरपा नदीच्या काठी मुंजे यांचा जन्म १२ डिसेंबर १८७२ रोजी म्हणजे आधुनिक भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर सुरू होऊन १५ वर्षांनी झाला. मोहनदास गांधींचा जन्म १८६९चा म्हणजे दोघे समकालीन तथापी युद्धजिज्ञासेत दोघात महदंतर होते. भीक मागून नव्हे, तर इंग्रजांशी प्रत्यक्ष लढूनच भारताला स्वातंत्र्य मिळेल, यावर मुंजे यांचा ठाम विश्‍वास होता. ज्यांना पारतंत्र्यात भारताचे नेतृत्व करायचे आहे, त्यांनी युद्ध चालू असतांना प्रत्यक्ष समरांगणावर जाऊन ते पाहिले पाहिजे. या प्रबळ उर्मीने मुंबई महापालिकेची भरपूर वेतनाची चाकरी सोडून ते आफ्रिकेतील बोअर युद्धात अल्पवेतनावर सामील झाले. वडिलांनी त्यांना भविष्याचे काय असे विचारले, तेव्हा जिन्याखालच्या खोलीत राहीन; पण युद्ध पाहिल्यावाचून रहाणार नाही, असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले. हिंदूंच्या मनात पुन्हा कधीही विद्रोहाची भावना उत्पन्न होऊ नये; म्हणून धूर्त ब्रिटिशांनी चहूबाजूंनी कडेकोट बंदोबस्त केला होता. १८५७च्या देशव्यापी आणि रक्‍तरंजित उठावाचा ब्रिटिशांनी इतका धसका घेतला होता. मुंजे हा बंदोबस्त फोडून बाहेर पडले. केवळ सैनिकच नव्हे, तर प्रत्येक हिंदु लढाऊ वृत्तीचा झाला पाहिजे आणि तो रामकृष्णाच्या परंपरेशी जोडला गेला पाहिजे ? हा त्यांचा संकल्प होता; म्हणून पाकिस्तानचा ठराव मांडला जाण्यापूर्वीच त्यांनी नाशिकला काही वर्षे आधी भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली. तेथे शिकणार्‍यांना रामदंडी म्हणण्याचा प्रघात पाडला.

राज्यकर्त्यांवर गांधीवादाचा पगडा असल्याचे दुष्परिणाम
ब्रिटिशांच्या जाळयात मुंजे अडकले नाहीत; पण गांधी अडकले. ब्रिटिशांचे हित जपले जाईल, अशी पावले ते टाकू लागले. त्यांनी अहिंसेच्या दोरखंडाने हिंदूंना करकचून आवळून टाकले; म्हणून चाकूसुरे काढून मुसलमानांनी हिंदूंच्या भूप्रदेशावर आणि आयाबहिणींवर घाला घातला, तेव्हा प्रतिकार व्हावा, तसा झाला नाही. आजही पाकिस्तानी आणि इस्लामी आतंकवादी मुंबईवर हल्ला करतात, तेव्हा असे व्हायचेच, त्याचे एवढे काय मनावर घ्यायचे, अशा आशयाचे उद्‌गार आबा पाटलांच्या तोंडून निघू शकतात ! इस्लामी आक्रमक अंगावर धावून आले, तर मुंजे आणि सावरकर तलवारी परजून त्यांच्या समाचारासाठी रस्त्यावर उतरतील; पण मी तसे करणार नाही’, असे गांधी म्हणाले होते. तलवारीने प्रश्‍न सुटत नाहीत; प्रश्‍न हृदय परिवर्तनाने सुटतात, हा गांधींचा विशेषकरून मुसलमानांच्या विषयात आवडता सिद्धांत होता. आजच्या राज्यकर्त्यांवर गांधीवादाचा पगडा आहे; म्हणून मुंबईच्या हल्ल्यानंतर सात्त्विक संतापाने पेटून पाकिस्तानातील आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावे, असा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नाही. ते शौर्य दाखवतात, एखाद्या भारतनिष्ठ साध्वीसमोर.

मुसलमानांच्या अत्याचारांबाबत मुंजे व गांधी यांच्यातील मतभेद
१२ डिसेंबरला अनेक जीव जन्मतात; पण त्यात एखादेच मुंजे असतात. मुसलमानांच्या मनोवृत्तीवर मात कशी करायची, या विषयात मुंजे आणि मोहनदास यांच्यात गंभीर मतभेद होते. मोपल्यांच्या बंडात ते स्पष्टपणे प्रतीत होतात. ब्रिटिशांनी फाडून फेकून दिलेली तुर्कस्तानातील खलिफाची गादी हिंदूंनी पुन्हा शिवून देऊन पुण्य संपादन करावे; म्हणून गांधींनी खिलाफत चळवळ सुरू केली; परंतु अशा तर्कदृष्ट चळवळींना ब्रिटीश दाद देत नसत. त्यामुळे चिडलेल्या मुसलमानांनी आपला राग संत प्रवृत्तीच्या हिंदूंवर काढला. मलबारात त्यांनी सतत आठ दिवस हिंदूंना खिंडीत गाठून त्यांच्या सामूहिक कत्तली केल्या. दिसेल त्या हिंदू स्त्रीचा तिचे वय न पहाता त्यांनी उपभोग घेतला. गर्भवती हिंदु स्त्रियांची पोटे चिरून त्यांनी आतले गर्भ दगडावर आपटून छिन्नभिन्न केले. गावातील विहिरी हिंदूंच्या प्रेतांनी वाहत होत्या. ज्यांच्या वयामध्ये केवळ तीन वर्षांचे अंतर होते, ते मोहनदास आणि मुंजे या आपत्तीत कसे वागले ? गांधी ज्येष्ठ होते; पण श्रेष्ठ नव्हते. काही असेलच, तर ते नतद्रष्ट होते. मलबारात हिंदूंवर काहीही अत्याचार झालेले नाहीत, अशी भूमिका गांधींनी घेतली. या अत्याचारांचा निषेध त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला करू दिला नाही. तेव्हा मुंजे पन्नाशीत होते. ते धावत मलबारात गेले. घराघरात फिरून हिंदूंवरील अत्याचाराची विस्तृत माहिती त्यांनी गोळा केली आणि ती जगाच्या वेशीवर टांगली.

हिंदूंवरील अत्याचार हा दखलपात्र अपराध न वाटणारी काँग्रेस
गांधी म्हणाले की, थोडेफार इकडेतिकडे मुसलमानांकडून काही चुका झाल्याच असल्या, तर धर्माज्ञा म्हणून त्या त्यांनी केल्या आहेत, असे समजून त्यांना हिंदूंनी माफ केले पाहिजे. गांधी म्हणाले की, आपण `शूर मोपला’ म्हणून त्यांना अभिवादन करूया, म्हणजे आपल्या मनात राग नाही, हे त्यांच्या ध्यानात येईल. मुंजे म्हणाले की, या मग्रूर मुसलमानांना मराठ्यांनी अनेकवार चोपून काढले आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांनी घाबरून जायचे नाही. प्रतिकाराची वृत्ती आणि क्षमता ठेवण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली; परंतु पुढे मुसलमानांच्या आंतरराष्ट्रीय निष्ठांवर शिवाजीच्या मावळयांनी यशस्वीपणे चाल करून त्यांना भारताकडे वळवता येते, हे दाखवले आहे’, हेच पुढे महाराष्ट्रातील काँग्रेसजन विसरले. त्यामुळे महाराष्ट्राचा दिल्लीवर वचक राहिला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या या नराधम मोपल्यांना भारत सरकारने `स्वातंत्र्य सैनिक’ म्हणून घोषित केले आणि त्यांच्या वंशजांना मानधन देण्यास सुरुवात केली. मोपल्यांनी हिंदूंवर शस्त्र उगारले, तेव्हा तो हिंसाचार मोडून काढण्यासाठी राज्यकर्ते म्हणून ब्रिटिश पुढे धावले. तेव्हा मोपल्यांनी ब्रिटीशांशी संघर्ष केला. काँग्रेस सरकारने मोपल्यांनी हिंदूंवर अत्याचार केले, ही गोष्ट दडवून ठेवली आणि त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला. एवढेच ग्राह्य मानून त्यांना स्वातंत्र्य सैनिकास प्राप्‍त होणारे लाभ उपलब्ध केले. काँग्रेस शासन महंमद अफझल याला फाशी देत नाही, या करणीला ही पार्श्‍वभूमी आहे. परंपरा आहे. हिंदूंवरील अत्याचार हा काँग्रेसला दखलपात्र अपराध वाटत नाही.

मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुसलमानांशी कठोरपणे आणि दलितांशी सहानुभूतीने वागण्याची आवश्यकता
१२ डिसेंबरला अनेक माणसे या पृथ्वीतलावर आगमन करतात; पण त्यात धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्यासारखा नरसिंह एखादाच असतो. १९२५ पासून मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या मुंजे यांना दिल्या जात होत्या; पण हा धाडशी पुरुष एकदाही डगमगला नाही आणि हिंदु संघटनेसाठी, हिंदु पुरुषार्थ जागवण्यासाठी हिंदुस्थानावर दिवसामागून दिवस चाललेल्या दौर्‍यात एकदाही खंड पडला नाही. ते त्या वेळच्या विधानसभेवर, लोकसभेवर निवडून गेले होते. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेला हिंदु महासभेचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी करून त्यांनी ती परिषद गाजवली होती. गांधींनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केलेली नाही. रत्‍नागिरीत स्वा. सावरकर स्थानबद्ध असतांना त्यांनी सामाजिक समरसतेसाठी अस्पृश्यांसमवेत आयोजिलेल्या एका सहभोजनात मुंजे सामील झाले आणि एक सहस्त्र पान उठले. स्वा. सावरकरांची साथ त्यांनी कधी सोडली नाही आणि टिळकांवरील त्यांची निष्ठा कधी कमी झाली नाही. लोकमान्य हे त्यांचे दैवत होते; पण मुसलमानांना राजकीय लाभांमध्ये झुकते माप देणारा लखनौचा संधी केला, तेव्हा त्यांच्याशी वाद घालायला मुंजे मागे हटले नाहीत. दैवताशी वाद घालण्याची महाराष्ट्राची संत परंपरा आहे, हे सोनिया गांधींसमोर लाचार झालेल्यांना कसे कळणार ? बाळकृष्ण शिवराम मुंजे यांना हिंदु हितापेक्षा काहीही कधीही मोठे वाटले नाही. खुर्चीसाठी त्यांनी कोणाचा विश्‍वासघात केला नाही. खुर्चीसाठी ते लाचार एकदाही झाले नाहीत. गांधींनी आंबेडकरांशी केलेली `पुणे संधी’ प्रसिद्ध आहे; पण त्याचा मुंजे यांच्याशीही संबंध आहे, हे नेतृत्वहीन आजच्या दलितांनी लक्षात घेतले पाहिजे. एकात्मतेसाठी दलितांपेक्षा मुसलमानांचे लाड करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका गांधींनी घेतली होती, तर मुंजे यांचे म्हणणे होते की, लाड कोणाचेही करू नका. तसेच अन्यायही कोणावर करू नका. तथापी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुसलमानांशी कठोरपणे आणि दलितांशी सहानुभूतीने वागण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंची मानसिकता तेजस्वी व्हावी; म्हणून दृष्टी आणि बळ देणारे मुंजे
मुंजे हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते आणि त्याकाळात गांधींना आणि अनेक मुसलमान नेत्यांना त्यांनी घणाघाती आणि तर्कशुद्ध प्रचाराने निरुत्तर केले होते. मोपल्यांच्या बंडाची नुसती चौकशी करून मुंजे थांबले नाहीत. मुसलमानांनी बाटवलेल्या सहस्रावधी हिंदूंपैकी दोन सहस्रांना पुन्हा स्वधर्मात परत आणण्यात त्यांनी यश मिळवले. हिंदुहिताच्या बारीकसारीक गोष्टीत त्यांचे लक्ष असे. मसूरकर महाराजांनी गोव्यात बाटलेल्या शेकडो ख्रिस्त्यांना पुन्हा हिंदू केले; पण त्यांना मुळची हिंदु नावे धारण करू देण्यास गोव्यातील पोर्तुगाल सरकार सिद्ध नव्हते. तेव्हा मुंजे यांनी पोर्तुगालमध्ये जाऊन दार ठोठावले आणि विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मुंजे हे नेत्रतज्ञ होते. शस्त्रक्रिया विशारद होते. संशोधक होते. स्मिथची शस्त्रक्रिया म्हणून नेत्रारोग्य ज्ञानक्षेत्रात एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. तो सिद्धांत त्याआधी बरीच वर्षे डॉ. मुंजे यांनी मांडला होता. त्यांनी नेत्रविकार आणि उपचारांवर संस्कृत भाषेत लक्षणीय ग्रंथनिर्मिती केली आहे. मुंजे यांनी आयुष्यभर हिंदूंची जीवनदृष्टी स्वच्छ आणि तीक्ष्ण करण्याचा प्रयत्‍न केला. हिंदूंच्या मानसिकतेत क्लैब्य राहू नये, हिंदूंची मानसिकता तेजस्वी व्हावी; म्हणून लष्कराच्या भाकर्‍या भाजत त्यांनी आपला जीव पाखडला. १२ डिसेंबरला अनेक जन्मतात, दृष्टी आणि बळ देणारा मुंजे एखादाच असतो.

ख्रिस्त्यांना वेदना देणारा ब्रिटनमधील चर्चवरचा क्रॉस हटविणार !

ख्रिस्त्यांना त्यांच्या धार्मिक स्थळांचीच भीती वाटणे, म्हणजे ख्रिस्ती पंथाला लागलेली घरघर !

लंडन, १५ जानेवारी – येथील चर्चने ख्रिस्तीधर्मात पवित्र मानले जाणारे क्रॉस हटविण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रॉसमुळे बालकांमध्ये भीती निर्माण होते, असे सांगण्यात येत आहे. हा निर्णय पश्चिम ससेक्समधील रेव्हरंड इव्हान स्कुटर यांनी घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे, “चर्चवरील क्रॉस पाहून लोकांना अत्यंत वेदना व दु:ख होते. तसेच या वेदनांचे वर्णन करणे अशक्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच हा क्रॉस पाहून काहींना खूप भीती वाटते. त्यामुळे चर्चवरील क्रॉस हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” (चर्चला उशिरा सुचलेले शहाणपण ! ज्या क्रॉसच्या साहाय्याने येशूवर क्रूर अत्याचार केले होते, त्या क्रॉसमधून वेदनादायक व भीतीदायक स्पंदने जाणवणे चुकीचे नाही. – संपादक) सध्या ब्रिटनमधील अनेक चर्चमध्ये जाणे लोक टाळत आहेत. (युरोपमध्ये ख्रिस्तीधर्माला घरघर लागल्याचे आणखी एक उदाहरण ! – संपादक) लोकांनी चर्चमध्ये जाणे सोडून देणे योग्य नसल्याचे येथील ख्रिस्तीपंथाच्या प्रमुखांचे मत आहे.

Follow

Get every new post delivered to your Inbox.