एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
|
निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती
एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
|
निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती
मुंबई, १ जून (वार्ता.) – आजही जी मंडळी शिवरायांचे स्मारक करू इच्छित आहे, ती कुठेही शिवरायांच्या मूलभूत कार्याचा उल्लेख करू इच्छित नाही. त्यांना दादोजी कोंडदेव मान्य नाहीत. त्यांना समर्थ रामदास मान्य नाहीत. त्यांना आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही मान्य नाहीत. असा विचार करणारे जातीयवंत मराठेच शिवाजीचे व महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज `सामना’च्या संपादकीयातून केला आहे. या संपादकीयात श्री. ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे !
आम्हाला अभिप्रेत असलेले हिंदवी स्वराज्य, हे नाही !
मुंबईच्या अरबी समुद्रात शासन भव्य शिवस्मारक उभे करीत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही `मराठे’जनांनी शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध सुरू केला. श्री. पुरंदरे हे ब्राह्मण असल्यानेच त्यांना सुरू असलेला हा विरोध महाराष्ट्राच्या इभ्रतीला व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला शोभणारा नाही. स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना काढा नाहीतर शिवशाहिरांवर हल्ला वगैरे करण्याच्या धमक्या काही जातीयवादी मराठा संघटनांनी दिल्या आहेत. `स्मारक’प्रश्नी हात एकमेकांना उखडून टाकण्यासाठीच उठणार असतील, तर छत्रपती शिवरायही `मराठी माणसांचे थडगेच या जातीयतेने उभे रहाणार असेल, तर कृपा करून माझ्या नावाचा वापर करून ते बांधले जाऊ नये. आम्हाला अभिप्रेत असलेले `मराठा साम्राज्य’ व `हिंदवी स्वराज्य’ हे नाही’, असे म्हणतील.
देशावरील परचक्रांना विरोध न करता पुरंदरेंना संपवण्याची भाषा, हा षंढपणा !
शिवरायांच्या वेळी मोगल बादशहांचे परकीय राज्य चालविणार्यास अनेक स्वकीय वर्ग व घराणी मदत करीत होती. साडेतीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रात व हिंदुस्थानातही तोच इतिहास परत घडत आहे. परदेशी बाईला दिल्लीत मुजरे झडत आहेत. महाराष्ट्रातील लाचार वतनदारांनी स्वाभिमान खुंटीला टांगून पदे मिळविली आहेत. इस्लामचे अतिरेकी परचक्र धडका मारत आहे. `सिमी’च्या हातात हात घालून देशाचे इस्लामीकरण सुरू आहे. त्याविरोधात `ब्र’ न काढणारे व या परचक्राविरोधात लढण्याची भाषा न करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना संपवण्याची भाषा करतात, हा षंढपणा व नादानपणाच आहे.
काँग्रेसचे शिवप्रेम निवळ एक ढोंग !
जे लोक शिवस्मारकाचे उद्घाटन घाईघाईने उरकण्याचा डाव रचत आहेत, त्यांचे शिवप्रेम निवळ एक ढोंग आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस राजवटीने आतापर्यंत कुठच्या ऐतिहासिक स्थळांची, विशेषत: शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक स्थळांची दखल घेतली ? शिवछत्रपतींचा जिथे राज्याभिषेक झाला, त्या रायगडवरील वाड्याची छपरे उडून गेली व माळावरचा महाराजांचा पुतळा उघड्यावरच आहे. पुरातन खात्याच्या अक्षम्य दायित्वशून्यतेचा हा साक्षात नमुना आहे. मग समुद्रातील स्मारकाचा नारळ फोडण्याची व त्यानिमित्ताने जातीयवादाचे फुत्कार सोडण्याची एवढी घाई कशासाठी ?
शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकण्याचा इंग्रजांप्रमाणेनच काँग्रेजींचा प्रयत्न !
काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छत्रपतींचे स्मारक जणू निवडणुकीत प्रचारात वापरायचे एक `प्यादे’ आहे. ठीक आहे, तुमची प्यादी तुम्ही चालवा; पण त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध विखारी चळवळी राबवून महाराष्ट्रात प्रदूषण पसरवण्याची गरज काय ? जे जातीयवादी लोक `मराठे’पणाचा आव आणत आहेत, त्यांना शिवराय समजलेच नाहीत. याच काँग्रेसवाल्यांच्या `बापजाद्यांनी’ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना चोर, लुटारू व दरोडेखोर ठरवलेच होते व शिवाजी हे राष्ट्रपुरुष नसल्याची आरोळीही काँग्रेसवाल्यांनी ठोकली होती. त्या नतद्रष्टांना शिवरायांचा जो पुळका आला आहे, तो हास्यास्पदच आहे. या दोन्ही काँग्रेसवाल्यांनी खरोखरच शिवचरित्र वाचले असते, तर आज महाराष्ट्राची ही अशी दशा झाली नसती. शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकून ठेवण्याचा जसा इंग्रजांनी प्रयत्न केला, तसाच त्यांच्यानंतर आलेल्या काँग्रेजी बगलबच्च्यांनीही केला.
तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या वतीने खेडेकर, मेटे व दलवाई यांच्या पुतळयाचे दहन
तळेगाव दाभाडे, १ जून – महाराष्ट्र शासनाच्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने संतप्त झालेल्या तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर, विनायक मेटे व हुसेन दलवाई यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे नुकतेच दहन केले. या वेळी येथील शाळा चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेड व त्यांचे नेते आणि दलवाई यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी आताच संघटित होऊन याला तोंड न दिल्यास हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय रहाणार नाही.
ऐवढे दिवस सर्वसामान्य हिंदूंवर हल्ले करणार्या मुजोर मुसलमानांचा शिवसेनेसारख्याहिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा हिंदूंचे खच्चीकरण करणारा आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी आताच संघटित होऊन याला तोंड न दिल्यास हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय रहाणार नाही. – संपादक कडव्याअमरावती, ३० मे – येथील अकोली मार्गावरील चांदुरीजवळ मुसलमानांकडून कत्तलीसाठी नेण्यात येणार्या गायी, बैल व कालवड अशा १०७ गोवंशाचा कळप शिवसैनिकांनी रोखल्याने शंभर ते दीडशे मुसलमानांच्या सशस्त्र जमावाने शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला केला. यात दोन शिवसैनिक गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना काल दुपारी घडली. बडनेरा येथे गुरांचा बाजार भरतो. त्यासाठी चार ते पाच कुरेशी समजातील मुसलमान या १०७ गुरांना घेऊन जात असतांना त्यांना निर्दयतेने मारहाण करत होते. हे येथील शिवसैनिकांनी पाहिल्याने व ही गुरे कत्तलखान्याकडे जात असल्याच्या संशयाने त्यांनी ती रोखून धरली. गुरे हाकणार्यांना दम दिल्याने ते पळून गेले. याबाबत शिवसैनिकांनी त्वरित पोलिसांना कळवले. पोलीस येण्यापूर्वी दुचाकी व इतर वाहनांतून शंभर ते दीडशे मुसलमानांचा जमाव हातात काठ्या व शस्त्रे घेऊन येथे आला. या जमावाने येथील २५ शिवसैनिकांवर हल्ला चढवला. यात अमोल रामदास ठाकरे व बलराम भनक हे दोघे जखमी झाले. दरम्यान पोलीस मोठी कुमक घेऊन येथे दाखल झाले. त्यांनी संपूर्ण स्थिती नियंत्रणात आणत सर्व गुरांना ताब्यात घेतले. जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याचे समजते.
|
| मोहनदास गांधी यांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे स्वातंत्र्यानंतरची ६२ वर्षे उलटली, तरी देश अजूनही सुखाने जगत नाही. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे बीज गांधींनी रोवले. आज त्याचा वृक्ष होऊन त्याच्या गडद काळया छायेखाली संपूर्ण देश झाकला गेला आहे. गांधींचा वध झाल्यानंतर नथुराम गोडसे यांना दोषी ठरवून त्यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी गोडसे यांची भूमिका कोणी समजून घ्यावी, अशी स्थिती नव्हती; कारण स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या हिताचे रक्षण करणार्यांचे गांधी व त्यांच्या काँग्रेसने खच्चीकरण केले होते व संपूर्ण देशावर मुसलमानांना पंखाखाली घेणार्या काँग्रेसचे अधिराज्य झाले होते. आज काही वर्षांनंतर बघता नथुराम गोडसे यांनी गांधींच्या हत्येच्या वेळी जी कारणे दिली, तेच मुद्दे घेऊन काँग्रेस गेली ६२ वर्षे राज्य करत आहे, असे लक्षात येते. परिणामी आजही `गांधी काँग्रेसच्या रूपाने जिवंत आहेत आणि हिंदुत्वरूपी नथुराम मात्र प्रतिदिन फासावर चढत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गांधींच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी २७ मे १९४८ या दिवसापासून सुरू झाली. हा अभियोग ऐतिहासिक होता. त्याला यंदा ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. गांधींची हत्या करण्याबाबत त्यांनी केलेली मीमांसा आजही जगाला चिंतन करायला लावते. नथुराम गोडसे यांची बाजू भक्कमपणे मांडणारे `मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक गेली काही वर्षे गाजते आहे. .
जोखीम उचलून प्रयोग सुरू मुंबईतील शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात या नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेसवाल्यांनी मोर्चे आणून नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास शिवसेनेने चोख उत्तर देत मोर्चेवाल्यांना पिटाळून लावले व या वेळी पोलिसांनीही लाठीमार केला. नथुराम गोडसेंनी गांधीवधाचा निर्णय बदलावा म्हणून नाना आपटे तेव्हा `सरकारच्या विरुद्ध तीव्र निदर्शने करू’, असे सुचवतात. तेव्हा गोडसे उसळतात आणि पुन्हा तोफ डागतात, “फाळणीच्या वेळी आपण किती निदर्शने केली, झाला का उपयोग त्याचा ? `बिर्ला हाऊस’कडील निदर्शने आठव ! म्हणे शांततापूर्ण निदर्शने ! नंतर काय, व्हायचे तेच झाले ना ! गांधींनी हिंदूंना न जुमानता जिनांच्या हट्टापायी फाळणी केली, संपूर्ण मंत्रीमंडळ या निर्णयाच्या विरोधात असतांना गांधींनी हा निर्णय घेतला. नाना, गांधी स्वत:ला देशापेक्षा मोठे समजू लागले आहेत. जिनाने तलवार उपसली आणि गांधींनी ती भारतमातेच्या छातीत घुसवून तिचा लचकाच तोडला. स्वत:च्या देहाला जेव्हा-जेव्हा गांधी आव्हान देत, तेव्हा तेव्हा संपूर्ण देशाला गांधींसमोर झुकावे लागले व देशविघातक निर्णय झाले; म्हणून नाना, तो देहच संपवायचा आहे. आज मुसलमानांनी देशाचे तुकडे केले, उद्या शीख, परवा हिंदूंमधील अनेकविध जातीमधील लोक या देशाचे तुकडे करतील. कोणाकोणाला रोखणार ? फाळणी झाली तेव्हाही मी असेच प्रखर विचार मांडले होते. फाळणीच्या वेळी हैद्राबादमधील मुसलमानांच्या मुलुखातील एकमेव हिंदूच्या कुटुंबाला मी जेव्हा भेट दिली, तेव्हा मुसलमानांनी त्या घरातील आठ वर्षांच्या मुलाची कत्तल केलेली होती. त्याचा बाप त्या मुलाचा रक्ताळलेला मृतदेह माझ्यासमोर करून मला सांगतो, `जाऊन सांगा तुमच्या गांधीला की, पुन्हा कधी उपोषणाला बसलात, तर उपोषण सोडायला संत्र किंवा मोसंबीचा रस घेऊ नका, याचे रक्त घ्या !” गोडसे यांनी वर्णन केलेली ही स्थिती गांधींचे भ्रमवादी जीवन उघडकीस आणते. या पार्श्वभूमीवर या नाटकाचे महत्त्व लक्षात येते. नथुराम गोडसे असामान्य असल्याचे मान्य करणारा पोलीस अधीक्षक शेख ! `अखंड भारत’ स्वप्न मूर्त स्वरूपात येईल, असा ठाम विश्वास असणारे गोडसे ! |
http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-05-24&action=fullnews&catid=9&id=20303
|
|
हिंदूंची सद्यस्थितीहिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांची स्थापना प्रामुख्याने `हिंदु धर्माचे रक्षण झाले पाहिजे’ या विचारातून झाली; मात्र हिंदु धर्म वाचवण्यासाठी `तो समजून घेऊन त्याचे आचरण केले पाहिजे व तो टिकवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे’ या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी त्या दृष्टीने कार्य केले नाही.
त्यामुळे हिंदूंच्या या संघटना किंवा पक्ष यांची निर्मिती होऊनही धर्महानी थांबली नाही. या हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांनी ना धर्माचा अभ्यास केला, ना धर्म समजून घेतला. त्यामुळेच त्यांच्यात आज तत्त्वनिष्ठता उरली नाही. तसेच धर्मशास्त्र माहीत नसल्यामुळे व धर्माचरण करत नसल्यामुळे धर्मावरील आक्रमणांनाही ते परिणामकारकपणे तोंड देऊ शकले नाहीत. याउलट ख्रिस्ती व मुसलमान धर्मांत लहानपणापासून धर्माचे शिक्षण देऊन धर्मविषयक कट्टरता निर्माण केली जाते; इतकेच नव्हे तर धर्माच्या अभ्यासासाठी केंद्र, साहित्य यांची निर्मिती केली जाते व धर्माच्या प्रसारावर भर देऊन इतर धर्मियांचे आपल्या धर्मात धर्मांतर केले जाते. नांदेड येथे धर्मप्रसारासाठी `इस्लाम दर्शन केंद्र’ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोणीही जाऊन इस्लामविषयी माहिती घेऊ शकतो; परंतु लाखो वर्षांची परंपरा सांगणार्या व प्राचीन काळी अनेक विद्यापीठांतून धर्माचे ज्ञान देणार्या आपल्या हिंदू धर्माची माहिती देणारे केंद्र आजही कोणीही स्थापन केलेले नाही. धर्मप्रसार करतांना लक्षात आलेले मुद्दे धर्मशिक्षणवर्गामुळे बदल झालेली काही उदाहरणे |
|
मुंबई, २५ एप्रिल – सर्वोच्च न्यायालयाने फाशीसारख्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शासनाने ठराविक काळात त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा `दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे कायद्याने फाशी जन्मठेपेवर आणावी’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देण्याची भीती असते, असे सांगत सुप्रसिद्ध शासकीय अधिवक्ते उज्ज्वल निकम यांनी अतिरेक्यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत होणार्या चालढकलपणाविषयी नाराजी व्यक्त केली.
(अफझलला फाशी देण्याबाबत काँग्रेस शासन जो अक्षम्य वेळकाढूपणा करत आहे, त्यामागे अतिरेकी अफझलची फाशी वर प्रकारे रद्द व्हावी, हाच प्रयत्न असावा, असे कुणी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही ! – संपादक)
|
लोकहो, सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी सोयरिक करून स्वार्थ साधणार्या मायावतींसारख्या नेत्यांना कायमचे घरी बसवा !उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती त्यांच्या चौफेर आणि बेधडक वक्तव्य करण्याच्या पद्धतीबद्दल प्रसिद्ध आहेत. केंद्रातील सत्ता उपभोगण्यासाठी किंवा उत्तरप्रदेशमधील राजकारणातील राजकीय फायदे उपटण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांबरोबर सोयरिक केली आणि मतभेद झाले तेव्हा त्यांच्यावर खरपूस टीका केली.
आज त्यांच्याशी मैत्री असलेला एकही राजकीय पक्ष देशात नाही, अशी स्थिती आहे. त्यांनी उत्तरप्रदेश राज्यात स्वबळावर निवडणूक लढवून राज्यातील सत्ता स्वत:च्या पक्षाकडे खेचून आणली आणि आता लोकसभा निवडणूकही त्या स्व:तच्या पक्षाच्या बळावर लढवत आहेत. संपूर्ण देशात स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे, असा त्यांचा निश्चय होता आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांनी उमेदवार उभे केले. त्यांच्या पक्षाने आकर्षित केलेले उमेदवार पहाता त्यांचा पक्ष किमयागार असल्याचा भास झाल्यावाचून रहात नाही आणि त्यांना तिसर्या आघाडीने भावी पंतप्रधान म्हणून दिलेली मान्यता भारतियांना विचारप्रवण केल्याशिवाय सोडत नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करून स्वत:चे आधिपत्य सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न जनतेच्या नजरेतून सुटत नाही. भाजपचे उमेदवार श्री. वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तुरुंगात पाठवतांना एके काळचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला त्या साफ विसरल्या. अर्थात् राजकीय स्वार्थ साधतांना अशा संबंधांना तिलांजली देण्याचे काम कोणताही राजकीय पक्ष करत असतो. त्यामुळे मायावती त्याला अपवाद असू शकत नाहीत. त्यांच्या वागण्यातील हा फटकळपणा त्यांच्या बोलण्यातही असतो आणि त्याचा प्रत्यय म्हणून कि काय, नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांबद्दल त्यांनी बेधडक विधान केले. मुख्य निवडणूक आयुक्त श्री. गोपालस्वामी परवा २० एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर त्यांच्या पदावर आलेले निवडणूक आयुक्त नवीन चावला हे काँग्रेसचे दलाल आहेत, असे विधान मायावती यांनी केले. सध्या निवडणुकीचे वारे असल्यामुळे राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता सुरू आहे. राजकीय व्यक्तीने किंवा उमेदवाराने काय बोलावे व काय बोलू नये याची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. आता मायावतींचे विधान नव्याने नेमणूक झालेले निवडणूक आयुक्त नवीन चावला कोणत्या अर्थाने घेतात, हे पहावे लागेल. पक्षपातीपणाचा दावा !
|
|
लोकहो, भयोत्पादकी हल्ल्याची स्थिती निर्माण करणार्या निष्क्रीय काँग्रेसला सत्ताच्यूत करा ! पाकचे १०० हून अधिक प्रशिक्षित अतिरेकी मुंबईत ! मुंबई, १९ एप्रिल – येथील क्रॉफर्ड मार्केटमधील पोलीस मुख्यालय असुरक्षित झाले आहे. पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेले शंभरपेक्षा जास्त प्रशिक्षित अतिरेकी मुख्यालयाच्या आसपास वावरत आहेत. कोणत्याही क्षणी अतिरेक्यांकडून मुख्यालयावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्याचे वृत्त आज दैनिक `सामना’ने प्रसिद्ध केले आहे. (मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिरेकी देशात येतातच कसे ? यावरून हा देश अतिरेक्यांसाठी नंदनवनच झाला आहे, असे म्हणावे लागते. अफझलपासून कसाबपर्यंत प्रत्येक अतिरेक्याला जिवंत ठेवणारे मुसलमानप्रेमी काँग्रेस शासनच यास उत्तरदायी आहे. हिंदूंनो, अशा काँग्रेसवाल्यांना येत्या निवडणुकीत पराभूत करून त्यांच्या विरोधात याबद्दल खटले दाखल करा व त्यांना कठोर शिक्षा होईल, असे पहा ! – संपादक) पोलीस आयुक्त कार्यालयात अतिरेकी अगदी बिनधास्तपणे घुसू शकतात, इतक्या वाटा आहेत. कार्यालयाच्या सभोवतालची भिंत आखूड आहे. (मुळात आपल्याच देशात आपल्याच आयुक्तालयाच्या सभोवताली भिंत कशाला बांधावी लागते ? आपल्या आयुक्तालयाचे रक्षण करण्याची धमक काँग्रेसी राज्यकर्त्यांमध्ये का नाही ? अशा षंढ राज्यकर्त्यांना एक क्षणही सत्तेवर रहाण्याचा काय अधिकार ? – संपादक) ही भिंत अगदी सहज ओलांडून ते पोलीस आयुक्त कार्यालयात घुसू शकतात, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेठीस धरू शकतात. त्यासाठी आता सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे, असे पोलीस आयुक्त कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी बोलत आहेत.
निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !
|
नवी दिल्ली, १२ एप्रिल – गेल्या साठ वर्षांत सर्व पक्षांनी मुसलमान समाजाला केवळ निवडणुकीपुरती आश्वासने देऊन फसवले आहे.
(मुसलमानांचे अपरिमीत लांगूलचालन करणार्या दोन्ही काँग्रेसना चपराक ! – संपादक) कुठेही अतिरेकी हल्ला झाला की, मुसलमान तरुणांना पकडायचे आणि त्यांना तुरुंगात टाकायचे, ही `फॅशन’च झाली आहे. (गृहमंत्रीजी, याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे ? तुमच्या खात्यातील पोलीस करत असलेली कारवाई योग्य कि इमाम बुखारी यांचे हे वक्तव्य, हे जनतेला स्पष्ट व्हायला हवे. – संपादक) या सर्वांवरचा विश्वास उडाल्याने आगामी निवडणुकीत मुसलमान समाजाने विश्वासार्ह प्रादेशिक पक्ष वा उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सय्यद बुखारी यांनी आज केले.
| निवडणुकीच्या काळात हिंदु मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी सनातन प्रभात कार्यरत असते. `समर्थ’ हे बोध देणारे `दैनिक सनातन प्रभात’मधील लोकप्रिय चित्रमय सदर ! सनातनच्या बोधचित्रकर्त्या साधिका सौ. गौरी वैभव आफळे यांनी तयार केलेल्या या सदराच्या माध्यमातून सनातन प्रभातने आगळीवेगळी मतदार जागृती चळवळ राबवली. महाराष्ट्रात १६, २३ व ३० एप्रिल, तर गोवा राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्त याच बोधचित्रांच्या साहाय्याने मतदारांचे प्रबोधन करण्याचा आणखी एक प्रयत्न !
सर्व संकल्पना व चित्रांकन सौ. गौरी वैभव आफळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल |