फाळणीचे गुन्हेगार गांधी

गांधींनी देशावर फाळणी लादली. फाळणीच्या वेळी मुसलमानांनी लाखो हिंदूंची अमानुष कत्तल केली. या सर्व घटना पहाता गांधी भारताचे राष्ट्रपिता आहेत का, याचा निर्णय आता भारतियांनी घेणे आवश्यक आहे.

अ. `बॅ. जिनांनी `प्रत्यक्ष कृती’चा (direct action) निर्णय घोषित केला. मास (महिना) उलटत नाही, तोच कोलकाता अन् नौखाली येथे हिंदूंच्या कत्तलीचा फतवा पेटला. देशाच्या फाळणीचा ब्रिटिशांनी निर्णय घेतला. गांधींनी घोषणा केली की, देशाची फाळणी होण्याआधी माझ्या देहाचे तुकडे होतील. ही गोष्ट मार्च १९४७ ची ! काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. काँग्रेसच्या बैठकीला जाण्यासाठी गांधी दिल्लीला निघाले. त्या वेळी ते म्हणाले, “हरणारे युद्ध लढण्यासाठी मी दिल्लीला जातो आहे.”
आ. गांधी व्हाईसरॉयला भेटले आणि म्हणाले, “फाळणीमुळे शांतता प्रस्थापित होईल. फाळणी व्हायची, तर ती ब्रिटीश राजवटीखाली नको. आता प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी उतावीळ झाला आहे. त्यामुळे अन्य मार्ग नाही.”
इ. `दुबळयांच्या अहिंसेला मी खरी अहिंसा समजलो’, अशी स्वीकृती देणारे गांधी म्हणजे गांधींचा अहिंसावाद फोल ठरल्याचे लक्षण ! : `प्यारेलाल लिहितात, `गांधीजी स्नान करतांना म्हणाले, “फाळणीचा शिक्कामोर्तब आजच्या दिवशी होणार. फाळणीने देशाचे भवितव्य धोक्यात येणार आहे. दीडशे वर्षांची गुलामगिरी संपली खरी; पण स्वातंत्र्य फार काळ टिकेल, असे वाटत नाही. पूर्वी परमेश्‍वराने माझ्या दृष्टीवर पडदा टाकला. त्यामुळे दुबळयांच्या अहिंसेला मी खरी अहिंसा समजलो. आता माझ्यावरही अंधत्वाचा आघात केला असावा.”
ई. ४ जूनला प्रार्थनासभेत ते म्हणाले, “फाळणीची वस्तूस्थिती आता मान्य करायलाच हवी.”
उ. ४ जूनच्या प्रार्थना सभेत गांधी म्हणाले, “भारत द्विखंडित होत आहे, याविषयी फारच वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. तुम्ही मागितली म्हणूनच फाळणी मान्य झाली.”
ऊ. ५ जूनला ते म्हणाले, “फाळणी आता वस्तूस्थिती झाली आहे.”
ए. फाळणीचा दोष स्वत:वर नव्हे, तर जनतेवर लादणारे गांधी म्हणे महात्मा ! : ९ जूनला ते म्हणाले, “देशाची फाळणी म्हणजे माझ्या देहाचे तुकडे !’, हे माझे शब्द किती निरर्थक आणि फोल आहेत, हे दाखवून देऊन मी फाळणीला कसून विरोध करावा’, अशी पत्रे मला येत आहेत; परंतु फाळणीचा दोष माझ्यावर येतो, असे मला वाटत नाही. `देशाचे तुकडे करू नयेत’, असे मी म्हणालो होतो. त्या वेळी `सामान्य जनतेचा पाठिंबा मला आहे’, असा मला आत्मविश्‍वास होता; पण आता बहुमत विरोधात आहे, असे दिसल्यावर मी माझे मन लोकांवर का
लादावे ? `खोटेपणा आणि दुष्टपणा यांच्याशी तडजोड करू नये’, असे मी वारंवार सांगतो आहे. आज मी खात्रीने सांगतो की, सगळे मुस्लीमेतर माझ्या पाठीशी असते, तर मी फाळणी होऊ दिली नसती. आज बहुजन माझ्यासह नाहीत; म्हणून मला बाजूला होऊन थांबले पाहिजे.”
ऐ. दोन दिवसांनंतर हाच संदेश त्यांनी दिला. ते म्हणाले, “काँग्रेस कार्यकारिणी लोकांची अधिकृत प्रतिनिधी आहे. त्यांनी लोकांच्या जिवावरही हुंडी लादली आहे. ती स्वीकारणे आता लोकांचे कर्तव्य आहे. नंतर पाहिजे, तर ती कार्यकारिणीच पालटून टाकावी.”
ओ. एका प्रसंगी ते म्हणाले, “फाळणीच्या निर्णयाने मला आनंद झाला नाही; पण जगात आपल्या मनाविरुद्ध पुष्कळ गोष्टी घडतात आणि त्या चालवून घ्याव्या लागतात. ही फाळणी आपण तशीच खपवून घ्यायला हवी.”
औ. काँग्रेस कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीत ते म्हणाले, “फाळणीच्या मार्गात सभासद अथवा मी कोणीच आडवे येणार नाही.” या बैठकीनंतर अनेकांनी गांधींना छेडले. त्या वेळी गांधीचे उत्तर ठरलेले असे, “नेता किती करू शकेल, याला मर्यादा आहेत. एखाद्या गोष्टीकरता यातना भोगण्याचा निर्णय लोकच घेतात. अशा वेळी नेता त्यांना ओलांडून जाऊ शकत नाही.”
अं. काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेत ते म्हणाले, “जनता म्हणजे तुम्हीच. जे घडेल ते तुम्हालाच पसंत आहे. जे पसंत नाही, ते तुम्हीच काँग्रेसला सभ्यभाषेत कळवू शकता.”
क. कार्यकारिणीत ते म्हणाले, “देशाच्या फाळणीने मला जितक्या वेदना झाल्या, तितक्या अन्य कोणालाही नसतील, हे तुम्ही मान्य करायला हवे.”
ख. काँग्रेस पक्षाला ते म्हणाले, “जे घडले, ते घडले. कार्यकारिणी काँग्रेसच्या वतीने कार्य करीत होती. तिचा ठराव तुम्ही फेटाळला, तर जग तुम्हाला दायित्वशून्य म्हणेल. दुसरा मार्ग नव्हता; म्हणून नेत्यांनी फाळणी स्वीकारली.”
ग. हिंदुद्रोही निर्णय घेतांना सवंग लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमरण उपोषण करणार्‍या गांधींनी फाळणी रोखण्यासाठी मात्र आमरण उपोषण न करणे
पत्रकार : `गांधीजी ! `देशाचे तुकडे म्हणजे माझ्या देहाचे तुकडे’, असे आपण वारंवार सांगत होता ना ? आता फाळणी झाली आहे. आता तुम्ही आमरण उपोषण का करत नाही ? फाळणी थांबविण्यासाठी आपण धर्मयुद्ध का करत नाही ?
गांधी : उपोषण करावे, असा आम्हाला आतून आदेश येत नाही. काँग्रेस ही राष्ट्रीय सभा आहे आणि मी तिचा सेवक आहे. काँग्रेसने फाळणी स्वीकारली आहे. आता मी उपोषण केले, तर प्रत्येक निर्णयाची सक्‍ती मी काँग्रेसवर करतो, असे होईल. काही झाले तरी फाळणी ही काळया दगडावरची रेघ आहे. घटना समित्या स्थापन झालेल्या आहेत. त्या रद्द करण्याकरता मी मरावे का ? अशा तर्‍हेने मी मरणार नाही.
घ. फाळणी होण्यासाठी मुसलमान हिंसाचार करत असतांना त्यांना नव्हे, तर सर्व भारतियांना `जातीयवादी’ संबोधून त्यांना फाळणीचे गुन्हेगार ठरवणारे गांधी !
हिंदू-मुसलमान एकमेकांचे मुडदे पाडत होते. कोलकात्यात प्रचंड हत्याकांड झाले. गांधी तिथे आले, त्या वेळी पुढील संवाद झाला.
एन््.के. बोस : कार्यकारिणीच्या फाळणीच्या ठरावाला तुम्ही पाठिंबा दिला होता. याचा अर्थ फाळणी अगोदर स्वीकारणार्‍या नेत्यांना संरक्षण देणे, हाच तुमचा हेतू नव्हता का ?
गांधी : त्याचा तसा अर्थ करता येईल; पण ते खरे नव्हे. मी लढणार तरी कोणाविरुद्ध ? वर्षभर जातीय दंगली चालू आहेत. सगळे भारतीय जातीयवादी झाले आहेत. जातीय विवादापलीकडे त्यांना काहीच दिसत नाही. सगळया देशाच्या या भावनांचे प्रतिबिंब काँग्रेसमध्ये पडले आहे. त्याला मी विरोध कसा करणार ?”
च. काँग्रेसला फाळणीचा निर्णय पालटण्यास भाग न पाडणारे गांधी म्हणजे फाळणीचे समर्थक !
एन्.के. बोस : `फाळणी चुकीची आहे, हे माहीत असतांना तुम्ही काँग्रेसला तिचा निर्णय पालटण्यास भाग का नाही पाडले ?
गांधी : निर्णयाला पाठिंबा देणे चूक कि बरोबर, हे केवळ काळच ठरवू शकेल ! मी विरोध करण्याला परिस्थिती अनुकूल नव्हती.
बोस : तुम्ही परिस्थिती निर्माण करू शकला नसता का ? यापूर्वी तुम्ही तसे केले आहे.
गांधीजी : आयुष्यात मी कधीही परिस्थिती निर्माण केली नाही. तुमच्यापैकी अनेकांकडे नाही, असा एक गुण माझ्यात आहे. सामान्य जनतेच्या मनातील खळबळ मला अंर्त:प्रेरणेने समजू शकते. त्यानुसार मी कार्यक्रम आखतो. ते प्रतिसाद देतात. आज तशी शुद्ध भावना माणसात असल्याचे चिन्ह मला दिसत नाही.’
अरुण शौरी यांच्या `रिलीजन इन पॉलीटिक्स’ (Religion in
politics) या ग्रंथात फाळणीच्या संदर्भात विस्तृत विवेचन आले आहे. जिज्ञासूंनी ते पहावे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

`भारतखंड द्विखंड नव्हे त्रिखंड झाला ! अखंड भारतमूर्ती दुभंगली ! भग्न मूर्तीचे षोडषोपचार किती दिवस करत रहाणार ? ती मूर्ती का षोडषोपचारांनी साजरी होईल ? ती पुन: एकजीव केल्याविना तिच्यात जिवंत राष्ट्राची प्रार्णैंातिष्ठा कशी होईल ?’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

दलितांना `हरिजन’ म्हणून दलितांचा अपमान करणारे गांधी !
`हरिजन कार्याकरता गांधींनी देशाला जुंपले. दलित सांगतात, “हरिजन म्हणजे देवाला वाहिलेल्या स्त्रियांची (गणिकेची) अपत्ये. गांधींनी दलितांना `हरिजन’ म्हणून दलितांचा अपमान केला.” दिल्लीत यमुनेच्या तिरावर गांधी-समाधीसमोर जी अखंड ज्योत आहे, ती बहुजन समाजवादी पक्षाचे संस्थापक काशीराम यांनी लाथ मारून विझवली. आफ्रिकेत जोहान्सबर्गला तिथले शासन कोटी रुपये खर्चून गांधींचा पुतळा उभारणार होते. हिंदुस्थानातील दलितांनी कडाडून विरोध केला. आफ्रिकन शासनाने ती योजना रद्द केली.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

source :http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-10-02&action=fullnews&catid=3&id=24530

दंगलीचा सूत्रधार मूर्तीभंजक इम्रान नदाफ याला अटक !

दंगलीचा सूत्रधार मूर्तीभंजक इम्रान नदाफ याला अटक !
एकट्या इम्रानला अटक करून सहस्रावधी दंगलखोर मुसलमानांना दोषमुक्‍त करणारी काँग्रेस !

कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – अफझलखान वधाच्या चित्राचे भांडवल करत मिरज येथे दंगल घडवण्याचा कट रचणार्‍या इम्रान हसन नदाफ (वय ३० वर्षे, र. नदाफ मशिदीनजीक, मिरज) या दंगलीच्या मुख्य सूत्रधाराला सांगलीतील पोलिसांनी कोल्हापूर येथील पोलिसांच्या साहाय्याने गुरुवारी येथे पकडले.

(दंगलीतील मुख्य सूत्रधाराला दंगलीनंतर आठ दिवसांनी अटक करणारे पोलीस अतीप्रगत प्रशिक्षण घेतलेल्या छुप्या आतंकवाद्यांना शोधण्यास किती वेळ घेतील ? – संपादक)


हाच तो इम्रान नदाफ

नदाफने भिवंडीसह मिरजेतील काही स्थानिक मुसलमान गुंडांच्या साहाय्याने हा कट रचला होता. त्याला पकडल्यानंतर मारहाण करत पोलिसांनी त्याची धिंड काढली.
दंगलीनंतर इम्रान पुन्हा गुजरातला पळून जाण्याच्या बेतात होता. बुधवारी सायंकाळी तो कोल्हापूर येथे आला. मिरजेतील काही अनैतिक व्यवसाय करणार्‍यांशी संपर्क साधून त्याने आर्थिक साहाय्याची मागणी केली. ही माहिती मिळताच अपर पोलीस महासंचालक शिवप्रतापसिंह यादव यांच्या सूचनेनुसार सांगली पोलिसांनी कोल्हापूर पोलीसयंत्रणेशी संपर्क साधून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यादव यांनी दोन तास इम्रानची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. इम्रानने दंगल घडवण्याच्या हेतूने मिरजेतील श्रीकांत चौकात मुसलमानांच्या जमावासमोर चिथावणीखोर वक्‍तव्य करून घोषणाबाजी केली. शिवाय जमीर फौलाद याच्या हातात हिरवा झेंडा देऊन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलीस यांच्या डोळयांदेखत पोलिसांच्या गाडीवर चढून धिंगाणा घालण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत इम्रानने हिंदु एकता आंदोलनाच्या स्वागत कमानीची मोडतोड केली. जवळच असलेल्या महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीवर दगडफेक करून तिची विटंबना केली. गणेशोत्सव मंडळाच्या कमानीचा फलक काढून पायाने तुडवत नासधूस केली, असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
इम्रान गेल्या काही वर्षांपासून भिवंडीसह गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यातील नवसारी येथे रहात होता. नवसारी येथील काही दंगली घडवणार्‍या गुन्हेगारी टोळयांशी त्याचा संपर्क होता. जमावाला भडकवणे आणि चिथावणी देण्याचे त्याने प्रशिक्षण घेतल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले आहे. गुजरात येथून तो कोल्हापूर येथे आला. तेथे दोन वर्षे, तर उदगाव (तालुका शिरोळ) येथे एक वर्ष त्याने धार्मिक शिक्षण घेतले. नदाफ हा मूळचा मिरजेचा, किणी वाठार (तालुका हातकणंगले) ही त्याची सासूरवाडी.त्याचे मिरजेतील कमान लावण्याच्या सर्व घटनांवर बारीक लक्ष होते. अफझलखान वधाचे चित्र लावताच दंगल करण्याचे त्याचे नियोजन होते. त्याने भिवंडी येथील काही गुन्हेगारांसह मिरजेतील काही सराईत गुंडांशी संपर्क करून जुळवाजुळव केली. चार-पाच दिवस याच प्रयत्‍नात तो होता. त्यासाठी त्याने त्याच्या साथीदारासमवेत दोन-तीन वेळा बैठकाही घेतल्या. त्याला दंगलीची पूर्ण ध्वनीचित्रफित दाखवून त्याच्या पळून गेलेल्या तीन साथीदारांची नावे पोलिसांनी मिळवली आहेत. जमीर फौलाद याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्याचबरोबर इम्रानला मदत करणारा आणि पंधरा वर्षांपूर्वी हिंदु एकताचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित मेहबूब पिरजादे यालाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

| मित्रांना पाठवा | 62 – वाचक संख्या | छापील प्रत

निगडीत वृत्त : धर्मांध मुसलमान

जिहादी आतंकवाद्यांकडून केरळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रेमाचे आमिष ! : 2009-09-09
विसर्जन मिरवणुकीवरील मुसलमानांच्या दगडफेकीमुळे गणेशमूर्ती दुखावली; पोलिसांची अन्याय्य कारवाई : 2009-09-06
कुराणाची विटंबना केल्याच्या अफवेवरून मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात ६ ख्रिस्त्यांना जाळले ! : 2009-08-11
विवाहित मुसलमानाकडून हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी लग्न ! : 2009-08-04
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या घरांची पोलिसांकडून नासधूस : 2009-08-03
जामखेड (जिल्हा नगर) येथे नागपंचमीनिमित्तच्या यात्रेत मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण ! : 2009-08-02
मध्यप्रदेशातील शाळांत भोजनापूर्वी प्रार्थना करण्यास मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा आक्षेप ! : 2009-07-31
भारताबरोबरच्या चर्चेत सामावून घेण्याची `आयएस्आय’ची मागणी : 2009-07-24
पाकमधील वृत्तपत्रांकडून भारताची बदनामी ! : 2009-07-24
आता भारतात भगवा झेंडा फडकवण्यास मुसलमानांकडून बंदी, : 2009-07-13

पितृपक्ष व श्राद्धविधी

१. श्राद्ध करण्याचे उद्देश

२. श्राद्धाचे महत्त्व व आवश्यकता

३. श्राद्धविधीचा इतिहास

४. श्राद्धामुळे होणारे फायदे

५. श्राद्ध कधी करावे ?

६. श्राद्धाच्या देवता

७. श्राद्धाचे प्रकार

८. श्राद्धाची तयारी

९. श्राद्धाची परिभाषा

१०. तर्पण

११. पितृतर्पण

१२. अविधवा नवमी

१३. इतर माहिती

१४. अधिक माहिती वाचा

१. श्राद्ध करण्याचे उद्देश
अ. पितृलोक प्राप्‍त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना मदत करणे

आ. आपल्या कुळातील ज्या मृतात्म्यांना त्यांच्या अतृप्‍त वासनांमुळे सद्‌गती प्राप्‍त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्‍त करून देणे.

इ. काही पितर कुकर्मांमुळे पितृलोकात न जाता भूतयोनीत जातात. त्यांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्‍त करणे.

२. श्राद्धाचे महत्त्व व आवश्यकता

अ. `देव, ऋषी व समाज या तीन ऋणांबरोबरच पितृऋण फेडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे’, असे धर्मशास्त्र सांगते.

आ. पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक (पिंड व उदक) दिल्यावरच सुखी व संतुष्ट होतात. यासंदर्भात `पुत्र कोणाला म्हणावे’, याविषयी महाभारतात दिलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे -
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुत: ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्‍त: स्वयमेव स्वयंभुवा ।। – महाभारत

अर्थ : मुलगा हा आपल्या पितरांचे (पूर्वजांचे) पुं नामक नरकापासून रक्षण करतो; म्हणून त्याला स्वत: ब्रह्मदेवानेच `पुत्र’ म्हटले आहे.
या श्लोकानुसार पितरांना सद्‌गती लाभावी, त्यांना भोगाव्या लागणार्‍या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी व पितरांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी यांसाठी पुत्राने श्राद्धादी विधी करावेत. स्वत:ला पुत्र म्हणवणार्‍यांचे ते कर्तव्यच आहे, हे स्पष्ट होते.
(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)

इ. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम । – तैत्तिरीय उपनिषद १.११
अर्थ : देवकार्य व पितृकार्य यांत कधीही प्रमाद करू नये. ती कार्ये टाळू नयेत.

ई. श्राद्धविधी न करणार्‍यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे.
पतन्ति पितरो ह्येषां लुप्‍तपिंडोदकक्रिया: । – श्रीमद्भगवद्‌गीता १.४२
अर्थ : अशांचे (श्राद्धविधी न करणार्‍यांचे) पितर पिंडश्राद्धतर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपला अभ्युदय होत नाही.’

उ. सुमंतुऋषी सांगतात, `श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करम् उदाहृतम् ।’, म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही. याकरिताच विवेकी माणसाने श्राद्ध कधी टाळू नये.

ऊ. ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, `देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.

ए. ब्रह्मपुराण सांगते, `जी व्यक्‍ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते, ती ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जिवांना तृप्‍त करते. श्राद्ध करणार्‍याच्या कुळात कोणी दु:खी रहात नाही.’

ऐ. एखाद्या मृतात्म्याची `आपले श्राद्ध व्हावे’, अशी इच्छा असली व अपेक्षितांकडून ती पूर्ण झाली नाही, तर वासना- अतृप्‍तीचे दु:ख त्याला होते. असा एखादा मृतात्मा पिशाच (आसुरी शक्‍तीचा एक प्रकार) होऊन श्राद्ध न केल्याचा राग नातेवाइकांवर काढण्याची शक्यता असते.

ओ. मृत्यूपूर्वी एखाद्याला, `श्राद्धामध्ये काही अर्थ नाही; म्हणून आपण निवर्तल्यावर आपल्यासाठी श्राद्ध करायला नको’, असे वाटत असेल व मृत्यूनंतर श्राद्ध न केल्याने, `आपण अडकलो आहोत’, अशी जाणीव झाली; तरी तो तसे सांगू शकत नाही. इच्छा पूर्ण न झाल्याने तो दु:खी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य आहे.

औ. एखाद्या व्यक्‍तीशी असलेला देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो, उदा. आपण एखाद्याचे देणे द्यायच्या आतच तो जग सोडून गेला, तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठी त्याचे श्राद्ध करावे. हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्‍त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. आपल्याला पूर्वज त्रास देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, याविषयी उन्नतच (संतच) सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा न टिकणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनदेखील लग्न न होणे, लग्न झाल्यास पतीपत्‍नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे व कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे. श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट झाल्याने त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळे, तसेच मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासांचे निवारण होते.

क. श्राद्ध केल्याने पितरांना गती मिळते, तरी ते सातत्याने करणे आवश्यक :
मृत व्यक्‍तीच्या तिथीला श्राद्ध केल्यामुळे ते अन्न त्याच्या सूक्ष्म-देहाला वर्षभर पुरते. जोपर्यंत इच्छा-आकांक्षा असतात, तोपर्यंत ती मृत व्यक्‍ती त्या तिथीला आपल्या वंशजांकडून अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवते. श्राद्ध केल्याने त्यांची इच्छापूर्ती तर होतेच, तसेच त्यांना पुढे जाण्यासाठी ऊर्जाही मिळते. पूर्वजांची एखादी जरी वासना तीव्र असली, तरी श्राद्धविधींद्वारे मिळणारी ऊर्जा त्यांच्या वासनापूर्तीसाठीच वापरली गेल्याने पितरांना पुढे जाण्यास गती मिळत नाही. त्यामुळे सातत्याने श्राद्ध केल्याने हळूहळू त्यांची वासना कमी होत जाऊन ते गतीस प्राप्‍त होऊ शकतात. तसेच शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून दरवर्षी श्राद्ध करणे, हेच योग्य आहे.

ख. पितरांची पातळी ५० टक्के आहे, असे माहीत असले, तरी श्राद्धपक्षादी विधी करण्याची कारणे

१. कलीयुगात रज-तमाच्या आधिक्यामुळे साधना करणार्‍यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अतृप्‍त इच्छांमुळे जिवाला पुढची गती मिळत नाही, तसेच साधनेचे बळ नसल्याने जीव गटांगळया खात रहातो. श्राद्धपक्षादी विधी न केल्यास पूर्वजांना गती मिळत नाही. तसेच तीर्थक्षेत्री श्राद्ध केले, तरी ज्या पितरांची पुढील गती मिळण्याची वेळ जवळ आली असेल, तेवढ्याच पूर्वजांना त्या वेळी गती मिळते. त्याव्यतिरिक्‍त इतर पूर्वजांसाठी दर वर्षी श्राद्ध करणे आवश्यक असते.

२. ज्या पितरांची पातळी जास्त असेल, त्यांच्यासाठी धर्मशास्त्रात सांगितले आहे म्हणून व समाजासमोर धार्मिक विधींचा आदर्श ठेवण्यासाठी श्राद्ध करावे; कारण पातळीपेक्षा धर्मपालन महत्त्वाचे असते. पितरांची पातळी किती आहे, हे सांगणारेही समाजात नसतात.

३. काही संत समाजासमोर आदर्श रहावा, यासाठी स्वत:देवपूजा करतात. खरे तर त्यांना स्थूलातून देवपूजा करण्याची आवश्यकता नसते. तसे हे आहे.

वरील उत्तरे लक्षात घेऊन सर्वांनी धर्मपालन म्हणून श्राद्धपक्षादी विधी करावेत.

३. श्राद्धविधीचा इतिहास

या मुद्द्यात आपण श्राद्धाचा इतिहास व अग्नौकरण, पिंडदान व ब्राह्मणभोजन या इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था यांबाबत माहिती पाहणार आहोत.

अ. श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रुढ आचार आजही सुरू आहे.

आ. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात.’

इ. लक्ष्मण व जानकी यांसह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो व त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो, असा उल्लेख रामायणात आहे.

इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था व सांप्रत काळातील अवस्था

अ. अग्नौकरण : ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे.

आ. पिंडदान (पिंडपूजा) : यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत व गृह्य सूत्रे यांत पिंडदानाचे विधान आहे. गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले.
`पिंडपूजेला कधी सुरुवात झाली यासंबंधीची पुढील माहिती महाभारतात (शांतीपर्व १२.३.३४५) आहे – विष्णूचा अवतार वराहदेव याने श्राद्धाची संपूर्ण कल्पना विश्‍वाला दिली. त्याने आपल्या दाढेतून तीन पिंड काढून ते दक्षिण दिशेला दर्भावर ठेवले. `त्या तीन पिंडांना वडील, आजोबा व पणजोबा यांचे स्वरूप समजले जावे’, असे सांगून त्या पिंडांची तिळांनी शास्त्रोक्‍त पूजा करून वराहदेव अंतर्धान पावला. अशा तर्‍हेने वराहदेवाच्या सांगण्याप्रमाणे पितरांच्या पिंडपूजेला सुरुवात झाली.’

इ. ब्राह्मणभोजन : गृह्यसूत्रे, श्रृती-स्मृती यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मणभोजन आवश्यक मानले गेले व तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला.

ई. वरील तीनही अवस्था एकत्रित : सांप्रत काळातील `पार्वण’ श्राद्धात वरील तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मशास्त्रात हे श्राद्ध गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
(संदर्भ : सनातनच्या श्राद्धविषयक ग्रंथ मालिकेतील ग्रंथ `श्राद्ध – महत्त्व व शास्त्रीय विवेचन’)

४. श्राद्धामुळे होणारे फायदे

अ. श्राद्धविधी हा शुभ, कल्याणकारक, पुत्र देणारा व यश देणारा असा पितृयज्ञ आहे. श्राद्ध केल्याने कोणती फलप्राप्‍ती होते, याविषयी स्मृतिचंद्रिकेत व इतर ग्रंथांत एक श्लोक दिला आहे, तो पुढीलप्रमाणे

आयु: पुत्रान् यश: स्वर्गं कीर्ति पुष्टिं बलं श्रिय: ।
पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात् ।।

अर्थ : आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने (श्राद्ध केल्याने) प्राप्‍त होतात.

आ. ग्रहणात श्राद्ध केल्याने श्राद्धकर्त्याला पृथ्वीदानाचे फळ मिळते.’

५. श्राद्ध कधी करावे ?

सामान्यत: दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) श्राद्ध करावे; मात्र मृत्यूतिथी माहिती नसल्यासही श्राद्ध करता येते, याबाबतची माहिती आज पाहू.

सर्वसाधारणत: योग्य तिथी सर्वसाधारणत: अमावास्या, वर्षातल्या बारा संक्रांती, चंद्र-सूर्य ग्रहणे, युगादी व मन्वादी तिथी, अर्धोदयादी पर्वे, मृत्यूदिन, श्रोत्रिय ब्राह्मणांचे आगमन इत्यादी तिथी या श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.
श्राद्धविधी अमुक एका काळी करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !

१. सामान्यत: दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) श्राद्ध करावे. मृत्यूतिथी माहीत नाही, पण फक्‍त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.

२. मृत्यूतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास, माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.

३. निश्चित मृत्यूतिथी माहीत नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.

४. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.

५. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास, दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.

६. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्‍विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे.

७. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्‍विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.

(हिंदु धर्माने धर्माचरणात इतकी मुभा दिली असतांनाही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? – संकलक)

६. श्राद्धाच्या देवता

अ. पुरुरव-आर्द्रव व धूरिलोचन : पुरुरव-आर्द्रव व धूरिलोचन हे पितरांचे विश्‍वेदेव आहेत. श्राद्धात यांचा उल्लेख केला जातो.

आ. वसु-रुद्र-आदित्य

१. `श्राद्धाचा संबंध वसु, रुद्र व आदित्य या पितरांच्या अधिष्ठात्री देवतांशी आहे. श्राद्धमंत्र व विधी हे या देवतांशी संपर्क साधून देतात.’

२. ज्याला उद्देशून श्राद्ध करायचे त्या मृत व्यक्‍तीची वसुगणांत गणना होते, त्याच्या माता-पित्याची रुद्रगणांत व आजी-आजोबांची आदित्यगणांत गणना होते; म्हणून श्राद्धाच्या वेळी वसु-रुद्र-आदित्य यांचे प्रतिनिधी म्हणून पिता-पितामह-प्रपितामह (किंवा माता-पितामही-प्रपितामही) यांचा उच्चार केला जातो.

(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध’ (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)

७. श्राद्धाचे प्रकार

अ. मुख्य व प्रचलित प्रकार : मत्स्यपुराणात म्हटले आहे, `नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविध श्राद्ध मुख्यते ।’ अर्थात नित्य, नैमित्तिक व काम्य असे श्राद्धाचे तीन मुख्य प्रकार आहेत. यमस्मृतीमध्ये वरील तीन
प्रकारांबरोबरच नांदी श्राद्ध व पार्वण श्राद्ध हेही मुख्य प्रकार सांगितले आहेत.

अ १. नित्य श्राद्ध : दर दिवशी केल्या जाणार्‍या श्राद्धाला नित्य श्राद्ध म्हणतात. हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते.

अ २. नैमित्तिक श्राद्ध : मृतात्म्यासाठी केली जाणारी एकोद्दिष्ट वगैरे प्रकारची श्राद्धे ही नैमित्तिक श्राद्धे आहेत.

अ ३. काम्य श्राद्ध : विशिष्ट कामना धरून, म्हणजे `कामनापूर्ती व्हावी’, या उद्देशाने केल्या जाणार्‍या श्राद्धाला काम्य श्राद्ध, असे म्हणतात.

८. श्राद्धाची तयारी

श्राद्धासाठी लागणार्‍या साहित्याची आदल्या दिवशीच खरेदी करावी. श्राद्धासाठी लागणारे साहित्य व वर्ज्य पदार्थ येथे दिले आहोत.

श्राद्धासाठी लागणारे साहित्य

सर्वसाधारण साहित्य (श्राद्धद्रव्ये) : आसने, तीन ताम्हणे, तांब्या, पळी-पंचपात्रे, दर्भ, पांढरी लोकर, वस्त्र, धोतर, जानवी जोड, पंचा, शाल, चादर, पांढरे गंध, उगाळलेले गोपीचंदन, काजळ किंवा सुरमा, कापूर, धूप, दीप, सुवासिक पांढरी फुले, माका, तुळस, काळे तीळ, सुपार्‍या, अगस्तीची पाने, विड्याची देठ असलेली पाने, सातू, काीही (न सडलेला तांदूळ), यव (सवाद), काळे तीळ, उडीद, गहू, सावे, मूग व मोहरी, मध, सुटे पैसे, भस्म, केळीची पाने किंवा मोहाच्या पत्रावळी, केळीचे द्रोण, तयार झालेला स्वयंपाक, तूप व कालास अनुसरून दक्षिणा.
अधिक योग्य पदार्थ (फुले, फळे व धान्य) : अगस्ती, कांचन, मोगरा, जाई, जुई, सोनटक्का, दुहेरी तगर, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुळी, सुरंगी इत्यादी फुले; महाळुंग, उंबर, आवळे, चिंच, आमसूल, आंबाडा, कवठ, मकाणा, अक्रोड, चारोळी, खारीक, खजूर, नारळ, केळी, द्राक्षे, डाळिंब, बोरे, फणस, खरबूज इत्यादी फळे व सुका मेवा; काळे उडीद, सावे, राळे, चुका, प्रियंगु, मोहरीचा कल्क, देवभात व लाह्या.

वर्ज्य पदार्थ : श्राद्धासाठी लागणार्‍या उपयुक्‍त पदार्थांचा विचार करतांनाच श्राद्धासाठीचे वर्ज्य पदार्थ कोणते, याचाही विचार करणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. वर्ज्य पदार्थांची यादी पुढे दिली आहे.

अ. कांदा, लसूण, मीठ, वांगे, वाटाणे, हरीक व पुलक नावांचे भात, राजगिरा, शेवगा, गाजर, कोहळा, वावडींग, मांस, काळे जिरे, मिरी, बिडलोण, शीतपाकी, अंकुर फुटणार्‍या भाज्या, शिंगाडे, जांभळया रंगाचे व नासलेले-कुजलेले पदार्थ.
आ. दुर्गंधीयुक्‍त, खारे, शिळे, ज्याने गायीची तहान भागत नाही असे, डबक्यातले व रात्री भरून ठेवलेले पाणी.
इ. वत्सरहित किंवा प्रसूत होऊन दहा दिवस पूर्ण न झालेल्या गायीचे दूध
ई. बकरी, मेंढी, घोडी, उंटीण, म्हैस यांचे दूध व दुधाचे पदार्थ (मात्र म्हशीचे तूप योग्य आहे.)
उ. मांजर, कुत्रा, उंदीर इत्यादींनी उष्टावलेले पदार्थ
ऊ. पूर्वी प्रणीवध करून मांसाने पितरांना तृप्‍त करीत, असा आधुनिक वेद-संशोधकांचा दावा आहे; पण ब्राह्मणांना मांसभक्षण निषिद्ध आहे. (श्राद्धात ब्राह्मणभोजन महत्त्वाचे मानले आहे.) यासंदर्भातील एक श्लोक पुढीलप्रमाणे –

यस्तु प्रणिवधं कृत्वा, मांसैस्तर्पयते पितृन् ।
स विद्वांश्चन्दनं दग्ध्वा कुर्यादंगार विक्रयम् ।।
क्षिप्‍त्वा कूपे यथा कंचित् बाल आदातुमिच्छति ।
पतत्यज्ञानत: सोऽपि मांसेन श्राद्धकृत्तथा ।।

अर्थ : प्रणीवध करून जो मांसाने पितरांना तृप्‍त करतो, तो `चंदन जाळून कोळशाचा व्यापार करायला सिद्ध झाला आहे’, असे समजावे. विहिरीत एखादा पदार्थ टाकल्यावर तो घेण्याकरता हात लांब करून डोकावणारा बालक जसा विहिरीत पडतो, तसेच मांसाने श्राद्ध करणारा स्वत:च्याच हाताने स्वत:चा विनाश ओढवून घेतो. मांसाने श्राद्ध करणार्‍याला पाप लागते.

९. श्राद्धाची परिभाषा

अ. पितर : मनुष्य मृत पावल्यानंतर त्याचा लिंगदेह श्राद्धादी विधींनंतर प्रेतयोनीतून मुक्‍त होतो व त्याला पितृलोकात स्थान मिळते. त्या वेळी तो पितर या पदाला प्राप्‍त होतो.

आ. पार्वण : सपिंडीकरण श्राद्धानंतर (वर्षपूर्तीच्या म्हणजे अब्दपूर्तीच्या आदल्या दिवशी करण्यात येणारे श्राद्ध, म्हणजे सपिंडीकरण श्राद्ध.) पितर या पदाला पोहोचलेला मृतात्मा इतर पितरांशी संलग्न होतो व पार्वणांच्या यादीत जातो, तसेच तो पार्वणश्राद्धाचा अधिकारी होतो. हे श्राद्ध पित्रादी त्रयीला उद्देशून केले जाते. प्रतिसांवत्सरिक, अमावास्यादी ९६ श्राद्धे, महालय हे पार्वण श्राद्धाचे प्रकार होत.

इ. पितृत्रयी (पितरांतील त्रयी) : सर्वसामान्यत: मृत व्यक्‍तीचे श्राद्ध हे तिच्या मुलाने करायचे असते. तो नसेल, तर इतर पर्याय योजतात. श्राद्धाची परिभाषा श्राद्धकर्ता हा मुलगा आहे, असेच धरून बनवलेली आहे. त्यामुळे ज्याच्यासाठी श्राद्ध करायचे त्या मृतात्म्याचा उल्लेख श्राद्धात `पिता’, असा करतात (श्राद्धकर्त्या मुलाचा पिता या अर्थाने). त्याच्या आधीच्या पिढीचा, म्हणजेच मृतात्माच्या पित्याचा उल्लेख `पितामह’, असा करतात (श्राद्धकर्त्या मुलाचे आजोबा या अर्थाने).
त्यांच्याही आधीच्या पिढीचा, म्हणजेच मृतात्म्याच्या आजोबांचा उल्लेख `प्रपितामह’, असा करतात (श्राद्धकर्त्या मुलाचे पणजोबा या अर्थाने). त्यांच्या आधीच्या पिढ्यांची गणना पितृत्रयीत होत नाही; कारण त्यांना मुक्‍तरूप मानलेले आहे

ई. जीवत्पितृक :
ज्याचा पिता जिवंत आहे असा मुलगा. जीवत्पितृकास पितृश्राद्धाचा अधिकार नाही; पण मातामहश्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) व मातेचे श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. तसेच एरव्ही नारायणनागबली, त्रिपिंडी यांचा अधिकार जीवत्पितृकास नसतो; पण संतानप्राप्‍तीसाठी केलेल्या या विधींचा अधिकार जीवत्पितृकास असतो. नारायणनागबली यासारख्या विधीचा उद्देश अतृप्‍त लिंगदेहांमुळे होणारे त्रास दूर करणे हा असल्याने, लग्न न झालेल्या जीवत्पितृकासही हा विधी करण्याचा अधिकार काही ठिकाणी दिला जात असल्याचे आढळते. जीवत्पितृकास अपसव्याचे वेळी फक्‍त डाव्या हाताच्या अंगठ्यात जानवे अडकवून अपसव्य करावे लागते; पूर्णपणे डाव्या हातात घालता येत नाही.

उ. जानवे घालण्याचे प्रकार – सव्य, अपसव्य व निवीत :
जानवे गळयात घालतांना ते नेहमी डाव्या खांद्यावर असावे. त्या अवस्थेला `सव्य’ म्हणतात. ते उजव्या खांद्यावर घेतले की, त्या अवस्थेला `अपसव्य’ म्हणतात. माळेसारखे गळयात सोडले की, त्याला `निवीत’ म्हणतात.

ऊ. क्षण देणे :
श्राद्धाच्या वेळी देव व पितर यांना एक एक दर्भ अर्पण करून निमंत्रित केले जाते. यालाच क्षण देणे असे म्हणतात.

१०. तर्पण

१. व्युत्पत्ती व अर्थ : `तृप्’ म्हणजे संतुष्ट करणे. `तृप्’ या धातूपासून तर्पण हा शब्द तयार झाला आहे. देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली (उदक) देऊन तृप्‍त करणे, म्हणजे तर्पण होय.

२. उद्देश : ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो.

३. प्रकार : ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे) अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात व ती त्या त्या प्रसंगी करायची असतात.

४. तर्पण करण्याची पद्धत
अ. `तर्पण नदीवर करावे’, असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे.
आ. देव व ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन व पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते.
इ. `देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने व पितरांचे अपसव्याने करावे’, असे शास्त्र आहे.
ई. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून व अग्रावरून पितरांचे तर्पण करावे.
उ. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका व कनिष्ठा यांच्या मुळांतून ऋषींना आणि तर्जनी व अंगठा यांचा मध्यभाग यांतून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे).
ऊ. देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन व पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे.’
(`अंजली’ या शब्दाचा मूळ अर्थ `ओंजळ’, असा होतो. येथे मात्र `एक अंजली तर्पण द्यावे’, म्हणजे `एकदाच तर्पण द्यावे’, अशा अर्थाने `अंजली’ हा शब्द वापरला आहे. – संकलक)
(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध’ (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)

११. पितृतर्पण

१. व्याख्या : पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे.

२. का करावे ? : पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते.

३. महत्त्व : तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्‍याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश व अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचवण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्‍त करतात.

४. कधी करावे ?
अ. देव, ऋषी व पितर यांना उद्देशून नित्य (दर दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी दररोज श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे.
आ. पार्वण श्राद्ध केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पितृतर्पण करावे.

५. तीलतर्पण : पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळांचे काळे व पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे. तीळ न मिळाल्यास त्यांच्या ऐवजी सोने किंवा रुपे वापरावे.
अ. `तीलमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात.
आ. जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते.
इ. दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्‍या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात.
ई. नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.’

६. तीलतर्पणाचे महत्त्व
अ. `पितरांना तीळ प्रिय आहेत.
आ. तिळांचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करत नाहीत.
इ. श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे, निमंत्रित ब्राह्मणांना
तीळमिश्रित जल द्यावे व तिळांचे दान द्यावे.’ – जैमिनीय गृह्यसूत्र (२.१), बौधायन धर्मसूत्र (२.८.८) व बौधायन गृह्यसूत्र

(संदर्भ : सनातनच्या `अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील `श्राद्ध’ (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) हा ग्रंथ)

१२. अविधवा नवमी

अ. अर्थ
सौभाग्यवती असतांना मृत झालेल्या स्त्रीच्या नावे सुवासिनीला जेवण देऊन मृत स्त्रीचा आत्मा तृप्‍त करणे (भाद्रपद वद्य नवमीला हे नाव आहे. स्वत:ची माता अथवा कुटुंबातील अन्य कोणी स्त्री अहेवपणी (सधवा) मृत झाली असल्यास या दिवशी तिचे श्राद्ध करतात. यात ब्राह्मणभोजनाप्रमाणे सुवासिनीलाही भोजन घालण्याची रूढी आहे. – संकलक)

आ. महत्त्व
आ १. शास्त्रात या दिवशी मृत्यू येणार्‍या स्त्रियांची गणना पुण्यश्लोकात केली जाते. त्यामुळे ही तिथी पितृपक्षातील असली, तरी ती स्त्रियांसाठी चांगली मानली जाते.
आ २. सौभाग्यवती स्त्री म्हणजे प्रकट शक्‍तीचे प्रतीक असल्याने या दिवशी वातावरणात शक्‍तीचे ३ टक्के तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे पितृपक्षातील इतर दिवस व हा दिवस यांत काही प्रमाणात बदल असल्याचे लक्षात येते.
(साधकांनी पितृपक्षातील इतर दिवस व हा दिवस यांत जाणवणार्‍या फरकाचे परीक्षण करावे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची गती वाढेल व येणार्‍या तत्त्वाच्या लहरींमुळे तीव्र तळमळ आणि गुरुनिष्ठा असलेल्या २ टक्के साधकांना या दिवसापासून सूक्ष्मातून ज्ञान मिळणे सुरू होईल.)

इ. विधी
इ १. मृत झालेल्या स्त्रीच्या बरोबरीच्या स्त्रीला जेवायला बोलवावे, उदा. मृत झालेली स्त्री गर्भवती असेल, तर गर्भवती स्त्रीला, वयस्क असेल, तर वयस्क स्त्रीला.
इ २. मृत झालेल्या स्त्रीची ज्या स्त्रीमध्ये अधिक आसक्‍ती असते, तिला मृत स्त्रीच्या नावे जेवायला बोलावू नये. या दिवशी मृत स्त्रीचा आत्मा भटकत असतो व आसक्‍तीमुळे त्या आत्म्याने त्या सुवासिनीच्या देहाचा ताबा घेण्याची शक्यता असते.
इ ३. सौभाग्यवती मृत स्त्रियांच्या संसारातील इच्छा नेहमी अतृप्‍त असतात. त्यामुळे या दिवशी त्यांचे छायाचित्र २ तासांपेक्षा अधिक काळ घरात ठेवू नये.
इ ४. मृत स्त्रीला पुढची गती मिळून तिला पुढच्या योनीत जाता यावे, यासाठी विधी पार पडल्यावर घरातील सर्वांनी १५ माळा `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.
इ ५. इतर विधी पितृपक्षात दिल्याप्रमाणे करावेत.
- श्रीकृष्ण (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ८.९.२००५, रात्री ९.४८)

१३. इतर माहिती

पूर्वजांच्या त्रासापासून कायमची मुक्‍ती मिळवायचा एकमेव मार्ग

डॉ. आठवले

`पूर्वजांच्या त्रासापासून मुक्‍ती मिळावी; म्हणून दत्ताचा नामजप, नारायणनागबळी विधी वगैरे उपाय करण्यात येतात. त्यांमुळे तात्पुरता फायदा होतो. पूर्वजांच्या त्रासापासून कायमची मुक्‍ती मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे आपले पूर्वज बदलणे.
`पूर्वज कसे बदलायचे’, असा प्रश्‍न कोणाच्याही मनात येईल. त्याचे उत्तर पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.
१. मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा तिच्या माहेरच्या पूर्वजांशी तिचा असलेला संबंध कमी होतो व सासरचे पूर्वज तिचेही पूर्वज होतात.

२. जेव्हा एखादा संन्यास घेतो, तेव्हाही त्याचे कुटुंबीय व पूर्वज यांच्याबरोबरचे संबंध संपतात.

३. श्री. दिनकर सखारामपंत कसरेकर हे जेव्हा `प.पू. भक्‍तराज महाराज’ झाले, तेव्हा ते त्यांचे नाव `भक्‍तराज, गुरु अनंतानंद साईश’, असे लिहू लागले. तेव्हापासूनच कसरेकर घराण्याच्या पूर्वजांचा व त्यांचा संबंध संपला.
आपल्या सर्वांचा खरा पूर्वज एकच आहे व तो म्हणजे ईश्‍वर. आपण त्याच्या कुटुंबाचे व्हायचे, हाच पूर्वजांच्या त्रासापासून कायमची मुक्‍ती मिळवायचा एकमेव मार्ग आहे.’
- डॉ. आठवले (१५.४.२००७)

पूर्वजांना मुक्‍ती मिळण्याच्या संदर्भात `श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्‍तीने देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण ही चार ऋणे फेडणे आवश्यक असते. त्यांपैकी पितृऋण फेडण्याच्या संदर्भात अनेकांना वाटते की, केवळ मृत आप्‍तेष्टांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण केला म्हणजे आपण पितृऋणातून मुक्‍त झालो. त्यांच्या बाराव्या दिवशी अथवा मृत्यूच्या वार्षिक दिनी `तुझ्या आठवणींशिवाय एकही क्षण जात नाही….’ अशा आशयाची एखादी जाहिरातही काही जण त्यांच्या छायाचित्रासह देतात. ही केवळ एक मानसिक औपचारिकता आहे. त्यामुळे आपल्या पितरांना मुक्‍ती मिळू शकत नाही. उलट अशा प्रकारचे पूर्वजांचे स्मरण करणे म्हणजे त्यांच्या भुवलोकातून पुढच्या जन्माकडे जाण्याच्या मार्गातील अडथळा होय. त्यांचे लिंगदेह अशा गोष्टींमुळे भूलोकाकडे आकर्षित होऊन भुवलोकातच घुटमळत रहातात. `श्राद्ध न करता त्याऐवजी आम्ही गरिबांना अन्नदान करू, शाळेला मदत करू’, असे काही जण म्हणतात; मात्र धार्मिक विधींचा अभ्यास केल्यावर असे म्हणणे हास्यास्पद आहे, हे लक्षात येते. आपल्या पाठीमागे साधनेचे बळ असेल, तर पूर्वजांना मुक्‍ती मिळणे सहज शक्य होते. भगीरथाने ६० हजार वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या पूर्वजांना मुक्‍ती मिळाली. कलीयुगात हे शक्य नसल्याने श्राद्धपक्षादी विधींबरोबच आपल्याला होत असलेल्या त्रासाच्या तीव्रतेनुसार `श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप दररोज ३ किंवा ६ माळा करावा. त्रासाची तीव्रता खूपच जास्त असल्यास ९ माळा जप करावा. तसेच श्राद्धपक्षातही दत्ताचा नामजप जास्तीतजास्त करावा. आपण केलेल्या या नामसाधनेमुळेही पूर्वजांना लवकर मुक्‍ती मिळण्यास मदत होते. हल्लीच्या काळात `श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप प्रत्येक व्यक्‍तीसाठी आवश्यक आहे.

मृत व्यक्‍तीचे छायाचित्र पुढील कारणांसाठी कोठेही लावू नये.

१. मृत व्यक्‍तीचा लिंगदेह तिच्या छायाचित्राकडे आकर्षित होतो व त्यामुळे त्याच्या पुढील गतीमध्ये अडथळा निर्माण होतो.
२. मृत व्यक्‍तीचे छायाचित्र समोर असल्यास तिची वारंवार आठवण येते. परिणामी तो लिंगदेह आठवण काढणार्‍याकडे वारंवार खेचला जातो. त्यामुळे भावनेच्या स्तरावर आठवण काढण्यापेक्षा किंवा आठवण आल्यास श्री दत्तगुरूंना `त्या मृत व्यक्‍तीच्या लिंगदेहाला उत्तम गती मिळूदे’, अशी प्रार्थना करावी.
३. श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या ३ ते ९ माळा जप नित्य करावा व श्राद्धादी विधी करावेत. त्यामुळे लिंगदेहाला पुढील गती मिळणे सुलभ होते. – संकलक)

श्राद्धाच्या वेळी मृत व्यक्‍तीचे छायाचित्र लावावे व एरव्ही ते विभूती लावून दत्तगुरूंच्या चित्राबरोबर `श्री गुरुदेव दत्त’ ही नामपट्टी चिकटवून पिशवीत ठेवावे
एक विद्वान : एरव्ही ते छायाचित्र भिंतीवर प्रथमदर्शनी न लावता दत्तक्षेत्रातील विभूती छायाचित्रावर लावून पिशवीमध्ये थोडी विभूती घालून ठेवावे किंवा दत्तगुरूंच्या चित्राबरोबर पिशवीत घालून ठेवावे किंवा छायाचित्राच्या मागे `श्री गुरुदेव दत्त’ ही नामपट्टी चिकटवून पिशवीत ठेवावे. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, रात्री ९.३४)

वाईट शक्‍तींच्या निवारणासाठी रशियन संसदेने संसदेची शुद्धी केली !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

रशियन संसदेच्या सदस्यांनी संसद भवनाला वाईट शक्‍तींच्या त्रासातून मुक्‍त करण्यासाठी सायबेरियन तांत्रिक टोइजिन बर्गेनोव्ह यांना बोलावले होते. बर्गेनोव्ह यांनी जून २००४ पासून रशियन संसद भवनातून वाईट शक्‍तींना पळवून लावण्याचे काम सुरू केले. या उपायांमुळे संसद भवन, संसद सदस्य व तेथे काम करणारे कर्मचारी यांना या वाईट शक्‍तींचा त्रास सोसावा लागत नाही. रशियन संसद भवनातून वाईट शक्‍तींना घालवून देण्यासाठी प्रयत्‍न करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही १९९४ मध्ये स्थानिक ऑर्थोडॉक्स चर्चच्या एका पाद्र्याने संसद भवनात शुद्धीकरण केले होते. आता करण्यात येणार्‍या शुद्धीकरणामुळे संसद भवन प्रदीर्घ कालावधीसाठी वाईट शक्‍तींपासून मुक्‍त राहील, असा संसद सदस्यांना विश्‍वास आहे. (दैनिक `भास्कर’, गुरुवार १३ मे २००४)

भूत, पिशाच, करणी, भूतबाधा व ईश्‍वर यांसारख्या सर्व संकल्पना खोट्या असल्याचे सांगणार्‍या साम्यवाद्यांचा प्रभाव गेली कैक वर्षे रशियन संसदेवर होता. या साम्यवाद्यांच्या वैचारिक जोखडातून केवळ १० वर्षांपूर्वी मुक्‍त झालेल्या रशियातील खासदारांना या सर्व संकल्पना मान्य होतात, मग भारतातील साम्यवाद्यांना व बुद्धीप्रामाण्यवाद्यांना त्या का मान्य होत नाहीत ?

पुनर्जन्म का मानावा ?

कारणे
अ. कृतप्राणाश : `आपण जी कर्मे करतो, त्यांचे सुख-दु:खात्मक फल आपणाला प्राप्‍त होते. पुनर्जन्म न मानला, तर केलेल्या कर्माची फलाप्राप्‍ती न होताच विनाश होईल. म्हणजे इथे `कृतप्राणाश’ आहे. पुनर्जन्म न मानला, तर या जीवनात माणसाने जी जी सत्कर्मे वा दुष्कर्मे केलीत, त्यातील जी याच जन्मात फलद्रूप होत नाहीत, ती वाया गेलीत असे होईल, हाच कृतप्राणाश !
आ. अकृताभ्यागम : काही माणसे श्रीमंत, निरोगी, बुद्धीमान असे जन्माला येतात, याचे कारण काय ? तसेच काही माणसे जन्मत:च दरिद्री असतात; पंगू, आंधळे, मुके व रोगी असतात; हीन जातीत जन्म घेतात. ही जी दु:स्थिती जन्मत:च प्राप्‍त झाली, याला कारण काय ?
पुनर्जन्म न मानला, तर दुष्कर्म वा सत्कर्म यावाचून ती स्थिती प्राप्‍त झाली, असे होईल. यालाच `अकृताभ्यागम’ म्हणतात.

मृत्यूनंतरची गती
१. `ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी : हे ईश्‍वर मानतात, पुनर्जन्म मानीत नाहीत. त्यांचा जीवात्मा मृत्यूनंतर देवदुताच्या निवाडयाप्रमाणे कायमचा स्वर्ग वा नरक यांतच रहातो. त्याला कर्मभोग संपवण्याचा कोणताच मार्ग नाही.
२. हिंदु धर्म : जीवात्मा हा मृत्यूनंतर देवलोकी वा यमलोकी जातो.
अ. मृत्यूनंतर देवयान मार्गाने ज्ञानी व तपस्वी ब्रह्मलोकात जातात.
आ. पुण्यवान लोक पितृयानमार्गाने परलोकी स्वर्गात जातात, पुण्य भोगून पुन्हा मृत्यूलोकात येतात.
इ. पापी इथेच नाना नीच योनीत जन्म घेऊन भटकतात.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन)

विधी करणार्‍या ब्राह्मणांची मानसिकता !

श्राद्धविधी करण्यासाठी एका ब्राह्मणाकडे गेलेल्या एका महिलेला आलेला अनुभव :
`श्राद्धविधी करण्यासाठी किती खर्च येईल व विधी करण्यासाठी आपण किती वाजता येणार’, हे विचारण्यासाठी एक महिला विधी करणार्‍या ब्राह्मणाकडे गेली होती. चौकशी केल्यावर त्यांनी `३५० रुपये खर्च येईल व विधी आमच्या पद्धतीने करू’, असे सांगितले. त्यावर त्यांना `पिंडदान करणार ना’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “आम्हाला वेळ असला, तर करू. नाहीतर अर्ध्या तासात उरकून घेऊ.”
(शास्त्राला बगल देऊन विधी उरकणारे पुरोहित समाजाची फसवणूकच करत आहेत. – संकलक) हे ऐकल्यावर त्या महिलेने त्यांना स्पष्टपणे सांगितले, “असे असेल, तर विधी करायला नको !” त्यानंतर सदर महिला सनातन आश्रमात आली व तिने सनातने प्रकाशित केलेली `पितृपक्ष व महालय श्राद्ध’ ही ध्वनीचित्र-तबकडी खरेदी केली आणि सांगितले, “मी या ध्वनीचित्र-तबकडीचा अभ्यास करून त्याप्रमाणे विधी करीन.” – सौ. कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

पिंडदानामागील पुरोहितांचे अज्ञान !

हिंदूंनो, धार्मिक विधींमागील शास्त्र समजून घ्या !

आमच्याकडे प्रतिपदेला (८.९.२००६ रोजी) महालय श्राद्ध होते. इथल्या एक-दोन पुरोहितांना विचारले असता त्यांनी सांगितले, “आम्ही हे विधी करत नाही.” शेवटी एकाच्या ओळखीने एक पुरोहित मिळाले. ते विधी करण्यासाठी घरी आले. त्यांना `काय काय विधी करणार’, असे विचारल्यावर ते म्हणाले, “प्रथम पुरोहितांची पाद्यपूजा, त्यानंतर वडील, आजोबा व पणजोबा यांच्या नावे तीलतर्पण आणि दर्भाची अंगठी घालणे व शेवटी पुरोहितांना शिधा व दक्षिणा देणे, हे विधी करू.” मी विचारले, “पिंडदान करणार नाही का ?” तेव्हा ते म्हणाले, “पिंडदान हे वर्षश्राद्ध असेल किंवा मृत व्यक्‍तीचा दहावा दिवस असेल, त्या वेळीच करतात. (हे पूर्णपणे चुकीचे आहे. अपवादात्मक भाग सोडल्यास प्रत्येक श्राद्धाला पिंडदान सांगितलेले आहे. एवढेच नव्हे, तर गुरुचरित्रात असे सांगितले आहे की, श्राद्धदिनी न करी पिंडदान, तोही होय चांडाळ । म्हणजे जो श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करत नाही, तो चांडाळ होय.)आजचा दिवस पितरांची आठवण म्हणून करायचा असतो.” (पिंडदान श्राद्ध करणे म्हणजेच खरी आठवण. – संकलक) मी त्यांना सनातन प्रभातचा `पितृपक्ष विशेषांक’ देऊन पिंडदानामागील शास्त्र सांगितले; पण त्यांची अंक वाचण्याची तयारी नव्हती. ते म्हणाले, “आजपर्यंत मी जसा विधी करत आलो आहे, त्या पद्धतीने करूया. पुढील वर्षी सनातन संस्था जसे सांगते, त्याप्रमाणे करेन.” तरीही मी त्यांना पुन:पुन्हा पिंडदान करण्याविषयी सांगूनही त्यांनी माझे न ऐकता तो विधी त्यांच्या मताप्रमाणे व `एक कृती उरकायची आहे’ अशा प्रकारे केला. यावरून लक्षात आले की, समाजातील लोकांना तर धार्मिक विधींमागील शास्त्र माहीत नाहीच; पण पुरोहितांनाही त्यांबाबत अज्ञान आहे. – एक साधक
(यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची किती गरज आहे, हे लक्षात येते. यासाठीच सनातन संस्था धार्मिक विधींमागील शास्त्र सांगणारे ग्रंथ प्रकाशित करत आहे. त्यांमध्ये पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
१. मृत्यू व मृत्योत्तर क्रियाकर्म
२. श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)
३. श्राद्धातील कृतींमागील शास्त्र
४. देवघर व देवपूजेतील उपकरणे यांच्या मांडणीमागील शास्त्र
५. पूजासाहित्याचे महत्त्व काय ?
६. आरती कशी करावी ?
७. नमस्काराच्या योग्य पद्धती – संकलक)

श्राद्धामध्ये पिंडदानानंतर पिंडांना वडे व खीर तसेच काही ठिकाणी वडे व खीर यांसह अन्नाचा नैवेद्य दाखवतात. हा नैवेद्य काही ठिकाणी घरची मंडळी किंवा श्राद्धकर्ता यांना संध्याकाळी खायला सांगतात. तसेच काही ठिकाणी पिठाचे पिंड करतात.
त्या वेळी पिंड तयार करून झाल्यानंतर शिल्लक पिठाचा नैवेद्य पिंडांना दाखवतात. तो नैवेद्य रात्री पोळी भाजून खायला सांगतात. वरील गोष्टी अशास्त्रीय आहेत, याची कल्पना काही पुरोहितांना पूर्णपणे माहीत आहे. काहींना माहीत नाही. तरीपण कुलपरंपरा म्हणा किंवा रीतीरिवाज हे मोडायला पुरोहित किंवा यजमान तयार नसतात. याचे कारण म्हणजे `काही अनिष्ट घडले, तर’ ही भीती असते.
काही ठिकाणी घरातील आई, वडील, काका तसेच घरातील अन्य व्यक्‍ती यांचे श्राद्ध एकाच दिवशी सोयीनुसार करतात. फक्‍त महालय श्राद्धात, म्हणजेच पितृपक्षात सर्वांना पिंडदान करता येते. पितृपक्ष सोडून असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक आईच्या तिथीला फक्‍त आईचेच श्राद्ध, वडिलांच्या तिथीला फक्‍त वडिलांचे श्राद्ध अन्य मृत व्यक्‍तीच्या दिवशी केवळ तिचेच श्राद्ध केले पाहीजे. असे असतांना काही जण देवाला कौल लावून वरीलप्रमाणे श्राद्धे करतात. या गोष्टीला काही पुरोहित अनुमोदन देतात. या बाबतीत देवाला कौल लावणे व विचारणे हेच चुकीचे आहे. कारण मृत व्यक्‍तीचे श्राद्ध त्या त्या तिथीलाच करणे असे शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे. असे असतांना सुद्धा वरीलप्रमाणे कृती करणे म्हणजे शास्त्राचे उल्लंघन होते. त्याचबरोबर मृत व्यक्‍तीला सुद्धा काडीचाही फायदा होत नाही.

साधकांना सूचना : श्राद्धविधी करण्याबाबत प्रत्येकाने स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा !

धर्मशास्त्रानुसार प्रत्येकाला चार ऋणे फेडावी लागतात. त्यांपैकी एक म्हणजे पितृऋण. त्यामुळे श्राद्धविधी करून पूर्वजांना गती मिळवून देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. गुरुकृपायोगानुसार साधना करून आध्यात्मिक पातळी वाढल्याने साधकाकडून गुरुऋण फेडले जात आहे. गुरुऋण जेव्हा फेडले जाते, तेव्हा त्या जिवाची अन्य ऋणे आपोआप फेडली जातात; म्हणजेच तो पितृऋणातून मुक्‍त होतो. अशा जिवाला श्राद्धविधी करणे आवश्यक नाही; मात्र साधना करणार्‍यांनी तो कार्यकर्ता आहे कि साधक, याबाबत आत्मपरीक्षण करावे व श्राद्ध करायचे किंवा नाही, ते स्वत:च ठरवावे. – सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे, फोंडा, गोवा.

श्राद्धविधी अमुक एका काळी करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !

१. `सामान्यत: दर वर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला)
श्राद्ध करावे. मृत्यूतिथी माहीत नाही, पण फक्‍त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२. मृत्यूतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास, माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.
३. निश्चित मृत्यूतिथी माहीत नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.
४. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.
५. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.
६. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्‍विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे.
७. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्‍विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.’
(हिंदु धर्माने धर्माचरणात इतकी मुभा दिली असतांनाही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? – संकलक)

श्राद्धात केवळ पितरच नाही, तर इतर देवदेखील असणे

`श्राद्धविधीत पितर असतात, तसेच विश्‍वेदेव असतात. श्राद्धात आधी विश्‍वेदेवाचे पूजन, संभावना वगैरे वगैरे विधी-विधाने होतात. एक ब्राह्मण पूर्वेकडे तोंड करून बसतो, तो विश्‍वेदेव व दुसरा उत्तरेकडे तोंड करून बसतो, तो पितररूपात असतो. वसु, रुद्र व आदित्य हे काही पितरांतच नसतात, तर देवातही असतात. डोळयाने प्रत्यक्ष दिसणारा `सूर्य’ हा यज्ञत्रिक्रियेने निर्माण झाला. त्याच्या रोहित शुक्ल-कृष्ण स्वरूपाचे वसु, रुद्र व आदित्य यांना दर्शन घडते. अमृताचा लाभ होतो. या देवता प्रत्यक्ष अन्नसेवन वा जलपान करत नाहीत, तर वसु, रुद्र व आदित्य या देवता इंद्र, अग्नि, वरुण या देवतांच्या मध्यस्थीने अमृतसेवन करतात.’
(संदर्भ : गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय पत्रिका `घनगर्जित’)

आईच्या अस्थी असलेला डबा घेऊन एक प्रवासी रिक्शात बसल्यामुळे तीव्र डोकेदुखी सुरू होणे व तो रिक्शातून उतरल्यावर आध्यात्मिक उपाय केल्यावर डोके दुखायचे थांबणे :
`२७.९.२००७ रोजी सकाळी मी रिक्शा चालवत असतांना कुर्ला स्थानकात जाण्यासाठी एक प्रवासी माझ्या रिक्शात बसल्यानंतर माझे डोके खूप दुखू लागले. दुखण्याची तीव्रता एवढी वाढली की, मला रिक्शा चालवणेही कठीण जाऊ लागले. मी त्या प्रवाशाला सहजच `कुठे जाणार’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “माझी आई वारली आहे. मी तिच्या अस्थी घेऊन जात आहे.” अधिक चौकशी केल्यावर अस्थी असलेला डबा त्यांच्या हातातच असल्याचे मला कळले. त्या वेळी मला माझे डोके दुखण्याचे कारण लक्षात आले. मी त्या प्रवाशाला नियोजित स्थानी सोडल्यावर मग रिक्शामध्ये विभूतीचे पाणी शिंपडले व उदबत्ती लावली. थोडा वेळ नामजप केल्यावर माझे डोके दुखायचे थांबले.’ – श्री. दिनेश वारंग, घाटकोपर, मुंबई.

१४. अधिक माहिती वाचा

१. कुळातील मृत व्यक्‍तींच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि त्यांना पुढील गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करावा !
२. पितृपक्ष आज पासून चालू होत आहे. मृत आप्‍तेष्टांच्या संबंधाने हा कालावधी कसा महत्त्वाचा आहे आणि आपले त्यासंबंधीचे कर्तव्य, याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया.
३. श्राद्ध

अफझलखान तुमचा कोण लागतो ?

अफझलखान तुमचा कोण लागतो ?

हिंदूंनो, नाव शिवरायांचे आणि कारभार मोगलांचा करणारे काँग्रेस शासन सत्ताच्यूत करा !

अरबी समुद्रात पुतळा; मिरजेत कोथळा !

गणेशोत्सव काळात मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीतून दगडफेक करून दंगल माजवणे हे हिंदूंना आता नवीन नाही. या वर्षी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मरोळ आणि अमळनेर येथे मुसलमानांनी मिरवणुकीवर आक्रमण केले, तर मिरज येथे अफझलखान वधाच्या कमानीला विरोध करत धर्मांध मुसलमानांनी दंगल केली. तीत त्यांनी पाच गणेशमूर्तींची विटंबना केली. नंग्या तलवारींनी आणि दगडफेक करून हिंदूंवर आक्रमण केले; मात्र या धर्मांध मुसलमानांना रोखण्याऐवजी त्यांना प्रत्यूत्तर करणार्‍या हिंदूंवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. अशा प्रकारे काँग्रेस शासनाच्या काळात पराक्रमी शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास शिवरायांच्या महाराष्ट्रातच सांगण्यास आणि चित्ररूपाने दाखवण्यास गुन्हा ठरला आहे. याविषयी `दैनिक सामना’च्या कालच्या संपादकीयातून परखडपणे झोड उठवली. हा आग्रलेख आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

नाव शिवरायांचे आणि कारभार मोगलांचा !
काय चाललेय या शिवरायांच्या महाराष्ट्रात ? नाव शिवरायांचे आणि कारभार मोगलांचा. हुकूम अफझलखान आणि औरंगजेबाच्या पिलावळीचा. गणेशोत्सव विसर्जनाचा मोका साधून खानांच्या पिलावळीने सांगलीतील मिरजेपासून ते मुंबईतील मरोळपर्यंत जो नंगानाच घातला आहे, तो काळजाचा थरकाप उडविणारा आहे.
मरोळ आणि अमळनेर येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर मुस्लिमांनी दगडफेक केली. मशिदीवरून मिरवणूक जातांना वाद्ये वाजली म्हणून मशिदीतून दगडफेक झाली. मरोळ येथे या घटनेने वातावरण तापले. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. गणेशभक्‍तांनी संयम पाळला; पण शांतता प्रस्थापित होताच पोलिसांनी गणेशभक्‍तांना अटक करून खटले दाखल केले. हा कसला न्याय ? हे कुणाचे लांगुलचालन ? आणि कोणाच्या इशार्‍यावरून हे सर्व चालले आहे ? मशिदीतून श्रींच्या मूर्तीवर दगड भिरकावणारे हात मोकळेच आहेत. हिंदूंच्या बाबतीत `मारो-काटो’च्या बांगा देणारी थोबाडे त्यांच्या विखारी जिभांसह अद्यापी वळवळत आहेत. प्रश्‍न इतकाच आहे की, गणेशमूर्ती विसर्जनातील वाद्याने मशिदीतील अल्लास त्रास होतो, भावना दुखावतात. मग मशिदीवरील बेकायदा भोंग्यांवरून पहाटे चार वाजल्यापासून जी बांग दिली जाते ते तमाम हिंदू आणि मंदिरातील देव-देवतांसाठी अंगाई गीत असते काय ? तुमच्या भावना दुखावतात म्हणून तुम्ही हाती दगड आणि नंग्या तलवारी घेता कारण तुम्हाला अल्पसंख्याक म्हणून सरकारचे संरक्षण आहे; मात्र हिंदूंना स्वसंरक्षणासाठी आणि प्रतिकारासाठीही हात उचलण्याचा अधिकार नाही. प्रतिकारासाठी उचललेला त्याचा हात मुळापासून उखडला जातो हाच इथला मोगली कायदा आहे. जे मरोळला झाले, तेच अमळनेरला झाले आणि त्याहीपेक्षा भयंकर सांगली जिल्ह्यातील मिरजेत झाले. गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवरील `अफझलखान वधा’च्या चित्रावर काही धर्मांध मुस्लिमांनी आक्षेप घेतला. शहरातील पाच गणेशमूर्तींची विटंबना केली. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला हे चित्र आक्षेपार्ह, मुस्लिमांच्या भावना दुखावणारे आहे, असे ठरवून पोलिसांनी हे चित्रच जप्‍त केले आणि यानिमित्ताने प्रचंड दंडुकेशाही करून आपणही खानाच्या अवलादीचेच असल्याचे दाखवून दिले आहे. मोगलांनी मंदिराबाहेर मांस फेकले, मूर्ती तोडल्या, त्यांची विटंबना केली, हिंदूंच्या नावाने बोंबा ठोकल्या. शाहिस्तेखान आणि अफझलखानानेदेखील हे सर्व केले म्हणून शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे आणि अफझलखानाचा कोथळा काढण्याचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी केले. हा इतिहास आहे. महाराष्ट्राचे सरकार आणि त्यांचे पोलीस हा इतिहास कसा बदलणार ? अफझलखान हा स्वराज्याचा शत्रू होता म्हणून महाराजांनी त्यास मारले. शिवाजी राजे मोगली शत्रूंना फक्‍त पोकळ इशारे अन् धमक्या देत बसले नाहीत. हिंदुस्थानचे सरकार आज ज्याप्रमाणे पाकड्यांना इशारे देत दिवस काढते आहे, तसे शिवाजी राजांनी केले असते, तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत आल्या असत्या आणि आपल्यालाही `शिरकुर्मा’ तोडीत नमाज पढावा लागला असता. हिंदु धर्म आणि महाराष्ट्रावरील हल्लेखोरांचा कोथळा काढून महाराजांनी तुमच्या आमच्या पिढ्यान् पिढ्यांचे रक्षण केले आहे.
कॉ. डांगे यांनीही म्हटले आहे, `अफझलखान वधावर इतकी चर्चा का करता ? अरे, ही चर्चा कशाला पाहिजे ? मारला! स्वराज्यासाठी मारणे आवश्यक होते म्हणून मारला ! त्यात काय बिघडले ? `छत्रपती शिवाजी राजे कसलेले राजकारणी होते. त्यांचे चरित्र म्हणजे सर्वस्वी राजकारणच आहे!’ परंतु इतरांचा इतिहास आणि शिवाजी राजांचा इतिहास यात फरक आहे. इतरांचे इतिहास इतिहासजमा झाले, शिवरायांचा इतिहास अजून कामाला येतो! म्हणूनच आपण अद्यापी `शिवजयंती’ साजरी करतो आणि प्रेरणा यावी म्हणून `शिवाजी महाराज की जय’ म्हणतो. प्रतापगडाचेच उदाहरण घेतले, तर प्रतापगडाखालचे अफझलखानाचे थडगे अद्यापी अनेकांना सतावते हेही दिसते! इतरांचे इतिहास `इतिहासात असे घडले’ एवढेच सांगतात; पण शिवरायांचा इतिहास `असे घडायला पाहिजे आणि असे घडवा’ हे सांगतो. हेच त्याचे वैशिष्ट्य! म्हणून शिवरायांचा इतिहास हा जिवंत राजकारणाचा विषय आहे! अफझलखानाचा वध हे तर इतिहासातले धगधगते प्रकरण आहे. तो इतिहास कसा पुसणार ? या इतिहासाचे कितीही कोथळे काढले तरी तो इतिहास भावी पिढ्यान् पिढ्यासाठी प्रेरणाच देत राहील.

इतिहास बदलता येणार नाही
महाराष्ट्रातील जातीय `मराठा’ संघटना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नेहमीच टीकेचा विषय करीत असतात; पण बाबासाहेबांनी `राजा शिवछत्रपती’ या नावाने दहा खंड लिहून महाराष्ट्रावर उपकार केले आहेत. त्यांच्या तिसर्‍या खंडात अफझलखानाच्या कोथळ्याचे प्रकरण सर्व ऐतिहासिक पुराव्यानिशी मांडले आहे. मराठी स्वराज्याचा अंमल शिवछत्रपती महाराष्ट्रात जेव्हा झपाट्याने प्रस्थापित करू लागले, तेव्हा विजापूरच्या आदिलशाही राजवटीने शिवाजीचा नायनाट करण्यासाठी प्रचंड सैन्य आणि युद्ध साहित्य देऊन अफझलखानाची रवानगी केली. हर उपायाने मराठ्यांचा राजा शिवाजीला दगा करून ठार मारण्याचा हुकूम त्याला देण्यात आला. हा अफझलखान विजापुराहून निघाला तो तुळजापुरावर आला. तेथे मराठ्यांची जी कुलस्वामिनी तुळजाभवानी तिच्या मूर्तीवर घणाचे घाव घालून तिचा त्याने चुराडा केला. पंढरपुरातही देवस्थानाची त्याने अशीच नासधूस केली. अफझलखान स्वत:ला `मूर्ती आणि मूर्तिपूजकांचा विध्वंसक\’ म्हणवून घेत असे. शिवछत्रपतींच्या घराण्याचा तो मोठा द्वेष्टा होता. त्यांचे सख्खे थोरले भाऊ संभाजी राजे यांना कर्नाटकातील कटकगिरीच्या वेढ्यात अफझलखानाने कपटाने ठार मारविले होते. शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे यांना एकदा हाता-पायात बेड्या घालून विजापूरच्या रस्त्यातून अफझलखानाने अपमानास्पद रीतीने फिरविले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांना ठार मारण्याची ही कामगिरी अफझलखानाने मोठ्या उत्साहाने पत्करली. अशा अफझलखानाच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी काय करायला हवे होते ? `यावे यावे खानसाहेब, आपण महाराष्ट्रात आलात, तुळजाभवानीची मूर्ती तोडलीत, पंढरपूरचा विध्वंस केलात हे उपकारच झालेत. `मराठी’ जनतेच्या वतीने आम्ही तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करीत आहोत’, असे राजांनी सांगायला हवे होते काय ? अफझलखानास बरे वाटावे म्हणून महाराजांनी स्वत:चाच कोथळा काढून काँग्रेसच्या `व्होट बँके’स खूश करायला हवे होते काय ? खान हा स्वराज्याचा शत्रू होता म्हणून तो मारला. त्याला मारला नसता तर महाराष्ट्राच्या राजाला दगाफटका झाला असता, असे इतिहास सांगतो. इतिहास असा बदलता येणार नाही. समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांना जसे इतिहासात स्थान आहे तसे अफझलखानाच्या कोथळ्यासही आहे. शनिवारवाड्यासमोर आचार्य अत्रे यांनी एकदा सांगितले आहे. अफझलखानाचा वध करून शिवरायांनी एक महान संदेश या राष्ट्राला कायमचा देऊन ठेवलेला आहे. तो हा की, अफझलखानाप्रमाणे जेव्हा कोणतेही संकट या देशाच्या स्वातंत्र्यावर आणि हिंदु धर्मावर येईल तेव्हा त्या संकटाचा `कोथळा’ आपल्या प्रखर वाघनखांनी काढणे यातच या राष्ट्राच्या शिवशक्‍तीची खरी कृतार्थता आहे! मिरजेत जे घडले ते भयंकर आहे. शिवरायांचा अपमान आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा उभारण्याचे राजकीय नाटक करता आणि मिरजेत शिवरायांच्या इतिहासाचा कोथळा काढता ? अरबी समुद्रातील स्मारक दालनातही अफझलखान कोथळ्याचे चित्र लावावेच लागेल. आमचे तमाम शिवप्रेमींना आवाहन आहे, अफझलखान वधाच्या प्रतिकृती सर्वत्र लावा आणि शिवरायांचा इतिहास धगधगता ठेवा.

`दैनिक सामना’चे आवाहन
आमचे तमाम शिवप्रेमींना आवाहन आहे, अफझलखान वधाच्या प्रतिकृती सर्वत्र लावा आणि शिवरायांचा इतिहास धगधगता ठेवा.

मित्रांना पाठवा | छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत !

काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत !

नवी महाराष्ट्र विधानसभा घडवण्यासाठी १३ ऑक्टोबरला मतदान करतांना मराठी माणसाने ही काळजी घेतली पाहिजे की, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही. काँग्रेस उरलेल्या भारताचेही पाकिस्तान करण्याची धोरणे मनापासून राबवत असल्यामुळे तिला हिंदुहिताकडे लक्ष देण्यास मुळीच वेळ नाही. हिंदुहितावर घाला घालून मुसलमान संतुष्ट होणार असतील, तर तेही करण्यास काँग्रेस पूर्वी कचरली नाही, आज ती तेच करत आहे. पुन्हा सत्ता मिळाली, तर दुप्पट उत्साहाने ती इस्लामी अतिरेक्यांचे मार्ग मोकळे करणार आहे आणि हिंदूंवर खोटेनाटे आरोप लादून त्यांना ती गजाआड करणार आहे.

स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे झाली. एक अर्धे शतक आणि एक तप लोटले; पण भारताला महासत्ता बनवणे काँग्रेसला शक्य झाले नाही. ते काँग्रेसचे उद्दिष्टच नाही. स्वातंत्र्यप्राप्‍ती हे तेव्हाही काँग्रेसचे ध्येय नव्हते. भारताची प्रगती हे आजही काँग्रेसचे ध्येय नाही. काँग्रेसची ध्येयधोरणे खिशातून नोट काढतांना आपणाला ज्यांचे तोंड पहावे लागते त्या मोहनदास करमचंद गांधी यांनी आखून दिली आहेत. त्यानुसार काँग्रेसचे पहिले उद्दिष्ट `हिंदु-मुसलमान ऐक्य’ हे आहे. ते साधण्यासाठी मुसलमानांच्या मागण्या मान्य करणे आणि त्या करतांना हिंदूंनी आपल्या शक्‍तीपलीकडे जाऊन त्याग करणे, हे काँग्रेसचे मुख्य सूत्र आहे. या सूत्राच्या चौकटीत राहून जेवढी शक्य तेवढी प्रगती काँग्रेसचे शासन करते. हिंदु अल्पसंतुष्ट आणि राजकीयदृष्ट्या अर्धशिक्षित असल्यामुळे त्याला ती प्रगती मोठी वाटते. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा चालवतांना मुसलमानांचा स्वयंनिर्णयाचा म्हणजे भारतातून फुटून निघण्याचा हक्क काँग्रेसने अगदी रीतसर ठराव करून मान्य केला होता. काश्मीरचा प्रश्‍न नेहरू आणि काँग्रेसच्या अन्य शासनांनी ज्या पद्धतीने हाताळला त्यावरून भारतातून फुटून निघण्याचा मुसलमानांचा हक्क स्वतंत्र भारतातही काढून घेण्यात आला आहे, असे म्हणता येणार नाही. जर मुसलमान हे राष्ट्रीय आणि भाषिक अल्पसंख्यांक नसून ते केवळ धार्मिक अल्पसंख्यांक आहेत, हे काँग्रेसने मान्य केले आणि त्यांच्याकडे केवळ नागरिक म्हणून बघितले, तर काँग्रेसकडून सतत अवमानित झालेल्या हिंदूंची कोंडलेली ऊर्जा मोकळी होईल आणि पुढच्या १० वर्षांत भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा चमत्कार हिंदु करून दाखवतील; परंतु काँग्रेस हिंदूंची कोंडलेली ऊर्जा मोकळी करणार नाही. उलट सच्चर समिती नेमून तिच्या वतीने मनमोहन आणि सोनिया सरकारने असा आरोप केला आहे की, गेली ६२ वर्षे निष्पक्षपातीपणे वागून हिंदूंनी मुसलमानांची ऊर्जा कोंडून ठेवली आहे. त्यामुळे ते मागास राहिले आहेत. त्यामुळे मुसलमानांची तथाकथित कोंडलेली ऊर्जा मोकळी करणे, हा एकच एक कार्यक्रम काँग्रेस शासन यापुढे राबवणार आहे. शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, आबा पाटील, छगन भुजबळ, नारायण राणे, पतंगराव कदम, कृपाशंकर सिंह हे नेते हा कार्यक्रम राबवायला बाह्या सरसावून सज्ज आहेत. म्हणून त्यांना घरी बसवले पाहिजे. `काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत !’, `काँग्रेसला मत म्हणजे बांगलादेशाला मत !’, `काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानच्या नवनिर्मितीला मत !’ हे सर्व मराठी माणसांनी लक्षात ठेवले पाहिजे.
- सुघोष

मित्रांना पाठवा |   छापील प्रत

निगडीत वृत्त : शरसंधान

श्री गणेश पूजाविधी

श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !


कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव’ हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे’, या भावानेच सर्व उपचार करावेत.

१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.
१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम,
३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो,
६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग,
३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी
१ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली
१ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती
१ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग,
४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)

१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे
१ इ १. पूजास्थळाची शुद्धी
अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.
१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे
१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.’

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।’ हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे’, असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि’ असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा
।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:’ हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे.
१. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविंदाय नम: ।
पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: ।
२०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।।
पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.
देवतास्मरण
श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।
देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल’ म्हणावा.
श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा.
ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा.
`तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।।
संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.

श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.
ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा.
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो.
श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।
आवाहन : उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि’ म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.)
`श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।’
आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात.
श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि’ हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत.
श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.)
श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये
नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये
नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे.
प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप – वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ‘ या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे म्हणतात.)
हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.
श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं
समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी.
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।
अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने.
यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्’ हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे.
अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।
श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो’ म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।’ असे म्हणावे.

कलशपूजन
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.
शंखपूजा
शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.
घंटापूजा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।
अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो.
घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
दीपपूजा
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)
मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि’ या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे.
मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी
अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो.
पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.
पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा
प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप – प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.)
अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर `परमात्मने नम: ।’ असे १५ वेळा म्हणावे.
ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.

(टीप – हा मंत्र वेदोक्‍त आहे. )
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं
ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय
नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.
२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना देवांच्या चरणी वहा.
विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।
३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।
४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.

अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।।
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि’ म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा.
रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात.
राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर.
उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे.
श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर.
श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.)
श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)
१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.

अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो.
महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे.
श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: ।
तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.
श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ
पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर)
पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी.
श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं
समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा)
श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)
यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी.
वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: ।
आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।
भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: ।
अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप – वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।’ या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।’ असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.
नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।
फुलाला गंध लावून देवाला वहावे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
यानंतर आरती करून कापूरारती करावी.
पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प’ हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार’ या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.
नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी.
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
प्रदक्षिणां समर्पयामि ।।
दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)
दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे.
श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: ।
श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।।

नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक ।
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।।
श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.
अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता
प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.)
प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प’ हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार’ या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय ।
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् ।
विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।
यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।’ असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी’)

| मित्रांना पाठवा | 206 – वाच

धर्माभिमानी हिंदूंसमोर निभाव न लागलेल्या `आयबीएन् ७’ वृत्तवाहिनीने चर्चासत्र गुंडाळले !

केवळ हिंदूंवर तोंडसुख घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणार्‍या आणि हिंदूंची सत्य बाजू प्रबळपणे सामोरी आल्यानंतर पळ काढणार्‍या हिंदुद्रोही वृत्तवाहिन्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच !

इम्रान हाश्मी यांच्या मुंबईत घर न मिळाल्याच्या कांगाव्याचे प्रकरण

मिरज, ६ ऑगस्ट (वार्ता.) – नेहमी हिंदुत्वाच्या विरोधात वृत्ते प्रसारित करणार्‍या `आयबीएन् ७’ या हिंदी वृत्तवाहिनीला धर्माभिमानी हिंदूंचे प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांचा चांगलाच झटका बसला.

त्यामुळे या वाहिनीला तिने दूरचित्रवाणीवर आयोजित केलेला चर्चासत्राचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा तब्बल ६ मिनिटे अगोदर गुंडाळावा लागला. (यावरून सर्व वृत्तवाहिन्यांनी बोध घ्यावा आणि हिंदूंचे खच्चीकरण करणारी, त्यांना आतंकवादी ठरवणारी अन् त्यांच्या विरोधात दिशाभूल करणारी वृत्ते देणे बंद करावे ! – संपादक)इम्रान हाश्मी या चित्रपट अभिनेत्याने `मी मुसलमान असल्याने मला घर मिळत नाही’, असा कांगावा करून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला. याविषयी ऊहापोह करण्यासाठी `आयबीएन् ७’ या वृत्तवाहिनीने ५ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता `अजेंडा वुईथ आशुतोष’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात `…आणि जग शांत राहिले !’ या लघुपटाचे निर्माते श्री. अशोक पंडित, शिवसेनेचे खासदार श्री. भारतकुमार राऊत, हाश्मी आणि निर्माते महेश भट्ट यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे श्री. संजय बेडिया आणि प्रख्यात गायक श्री. अभिजित यांना बोलावण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि `आयबीएन् ७’चे व्यवस्थापकीय संपादक आशुतोष यांनी सुरुवातीला `सामना’तील अग्रलेखाच्या भाषेविषयी प्रश्‍न विचारला. तेव्हा श्री. राऊत यांनी `सामना’तील प्रतिक्रियेपेक्षा ज्यामुळे ती उमटली, त्या हाश्मी यांच्या कुकृत्याची जाणीव करून दिली. श्री. पंडित यांनी हाश्मी यांच्या चुकांचा वस्तूनिष्ठ आढावा मांडतांना म्हटले, “काश्मिरी हिंदूंविषयी मूग गिळून गप्प बसणार्‍या मुसलमानांना हाश्मीविषयी बोलण्याचा काय अधिकार ?” श्री. बेडिया यांनीदेखील हाश्मी आणि भट्ट हे सामाजिक स्वास्थ्य भंग करत असल्याचे प्रभावीपणे मांडले.त्यानंतर श्री. अभिजित यांनीही भट्ट यांची कृती अराष्ट्रीय असल्याचे ठामपणे सांगितले. सर्वच अतिथी हिंदुत्वाच्या बाजूने असल्याने अडचणीत आलेल्या आशुतोष यांनी वारंवार हाश्मी, भट्ट आणि मुसलमान यांची बाजू मांडण्याचा आटापिटा केला; मात्र त्यांचे काहीएक चालले नाही. परिणामी वारंवार घेत असलेल्या विश्रांतीची वेळ वाढवण्यात आली आणि शेवटी आयोजकांनी कोणतेही अनुमान सांगण्याचे कष्ट न घेता कार्यक्रम नियोजित वेळेच्या सहा मिनिटे अगोदर संपवला. (अशा प्रकारे केवळ हिंदूंवर तोंडसुख घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणार्‍या आणि हिंदूंची सत्य बाजू प्रबळपणे सामोरी आल्यानंतर पळ काढणार्‍या हिंदुद्रोही वृत्तवाहिन्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! – संपादक)


वृत्तवाहिनीच्या या मुसलमानधार्जिणेपणामुळे संतापलेले हिंदू पुढील पत्ता अथवा क्रमांक यांवर संपर्क साधून वाहिनीचा सनदशीर मार्गाने निषेध करत आहेत न्यू एरा सॉफ्टवेअर सर्व्हिसेस लिमिटेड, न्यू एरा हाऊस, मुगल लेन, माटुंगा (पश्चिम), मुंबई ४०००१६. दू.क्र. : (०२२) ६६१८४४०० संगणकीय पत्ता : josh18.in.com

मित्रांना पाठवा- वाचक संख्या 95 – वाचक संख्या |  छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदूंनो या धर्मद्रोह्यांना विसरू नका

भारत नोटा छापण्याचे कागद अन् शाई यांत परिवर्तन करणार

भारत नोटा छापण्याचे कागद अन् शाई यांत परिवर्तन करणार

पाक-निर्मित बनावट नोटांचे प्रकरण

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट (प्रे.ट्र.) – भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत करण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय नोटा बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने नोटा छापण्यासाठी वापरायचा कागद आणि शाई यांत परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(समस्येच्या मुळात जाऊन उपाय काढण्याऐवजी अर्थात बनावट नोटा निर्माण करणार्‍या पाकवर कारवाई करण्याऐवजी वरवरचे उपाय योजणारे केंद्रातील काँग्रेसचे शासन वैचारिक क्रांती अपरिहार्य करत ! – संपादक)सध्या नोटा छापण्यासाठी स्वित्झर्लंडची एक कंपनी भारताला शाई पुरवते, तर युरोपच्या सहा कंपन्या कागद पुरवतात. (गेल्या ६२ वर्षांत भारतीय चलन तयार करण्यासाठी लागणारा कागद आणि शाई यांचे उत्पादन करण्यात भारत स्वावलंबी न होणे, ही भारतीय लोकशाहीची अधोगती ! – संपादक) याच कंपन्यांकडून तसाच माल पाकिस्तानलाही मिळत असल्यामुळे बनावट भारतीय नोटा तयार करणे पाकला जमत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी भारताला नोटा छापण्यासाठी पुरवला जाणारा कच्चा माल पाकला पुरवणार नाही, असे आश्‍वासन देणार्‍या कंपनीकडूनच कागद आणि शाई यांची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. (गेली अनेक दशके देशाची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याचे षड्यंत्र चालू असतांना हे का लक्षात आले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍या राज्यकर्त्यांवर राष्ट्रप्रेमींचे शासन आल्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात येईल ! – संपादक) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती नोटा छापण्याचा कागद आणि शाई पुरवणार्‍या कंपन्या तसेच युरोपीय देशांचे शासन यांच्याशी चर्चा करणार आहे.

निगडीत वृत्त : भारताचे ढिसाळ आर्थिक धोरण

रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच रक्षाबंधनामागील शास्त्र व राख्यांचे महत्त्व

http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/shravan_pournima/

श्रावण पौर्णिमा विशेष – रक्षाबंधन

Rakshabandhan

अनुक्रमणिका


  • १. प्रस्तावना


  • २. रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच रक्षाबंधनामागील शास्त्र व राख्यांचे महत्त्व

  • १. उद्देश
    २. अर्थ व कारण
    ३. रक्षाबंधनामागील शास्त्र काय ? तसेच तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ?
    ४. राख्या कशा असाव्यात ?
    ५. सनातनने तयार केलेल्या राख्यांचे महत्त्व
    ६. राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसारामुळे होणारा फायदा
    ७. राखी बांधतांना पाटाच्या भोवती रांगोळी काढण्याचा उद्देश
    ८. राखी बांधल्यावर तुपाच्या निरांजनाने ओवाळणे
    ९. ओवाळायच्या ताटात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे कारण
    १०. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा
    ११. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व
    १२. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व
    १३. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व
    १४. पुढील काळात प्रत्येक जिवाने करावयाचे प्रयत्‍न


  • ३. `सनातन’ची राखी

  • अ. `सनातन’ राखीची उत्पत्ती
    आ. `सनातन’ राखीची वैशिष्ट्ये
    इ. राखीमुळे सगुण व निर्गुण स्तरावर होणारे लाभ
    ई. `सनातन’ राखीवर वाईट शक्‍तींचा हल्ला होण्याचे कारण
    उ. `सनातन’ राखीच्या संदर्भात अनुभूती


  • ४. वाचकांना विनंती

  • अ. साधिकांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी देवतांना (देवांना) राखी बांधा !
    आ. राखी पौर्णिमेदिवशी बांधलेली राखी नंतर नामपट्टीप्रमाणे वापरा अगर विसर्जित करा !


  • ५. रक्षाबंधनाच्या सणामध्ये शिरलेले गैरप्रकार व विरोध

  • अ. राख्यांवर `क्रिश’ व `प्रिन्स’ हिंदु धर्मातील सणांच्या व्यावसायिकरणाचा कळस !
    आ. राक्षस व भुते यांचे मुखवटे असलेल्या राख्यांची बाजारात विक्री
    इ. राखीद्वारे हनुमानाचे विडंबन थांबवणारा बालसाधक कु. सनत
    ई. मुसलमान युवतीची लाजिरवाणी प्रतिक्रिया
    उ. धर्मविषयक अज्ञानामुळे भयग्रस्त होऊन फोनाफोनी करणारे हिंदू
    ऊ. ख्रिश्चन मिशनरी शाळांचे हिंदुधर्माच्या विरोधातील कुटील कारस्थान
    ए. हिंदु विद्यार्थ्यांचे ख्रिस्तीकरण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्‍न


  • ६. एक हजारापेक्षा अधिक राख्यांचे वितरण करणार्‍या सनातनच्या साधिका व त्यांना आलेल्या अनुभूती


  • ७. रक्षाबंधनाच्या संदर्भातील साधकांना आलेल्या अनुभूती


  • ८. अधिक माहिती वाचा


प्रस्तावना

श्रावण (नारळी) पौर्णिमा व रक्षाबंधन

`पातळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावणपौर्णिमा होता.’ (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका `घनगर्जित’, वर्ष दुसरे, अंक ५.)

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. या दिवशी तांदुळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात् राखी तयार होते.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : महाबली व दानवेन्द्र असा जो बली राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे राखी, तू चलित होऊ नकोस.

राखी ही बहिणीने भावाच्या हातात बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे संरक्षण करावे ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून किंवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषत: तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन : सण, धार्मिक उत्सव व व्रते)

खरे सण, व्रते व उत्सव
ईश्‍वरी राज्याची स्थापना होईपर्यंत त्यासाठी अखंड प्रयत्‍न करणे, हे खरे व्रत; तर स्थापना झाल्यावर साजरे केले जातील ते खरे सण व उत्सव होत !

http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/shravan_pournima/

`सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्‍त विद्यमाने `श्री शंकरा’ वाहिनीवर प्रसारित धर्मसत्संगांची शतकपूर्ती !

छोटीशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती वाहिन्यांवरून धर्मशिक्षण देतात; बलाढ्य हिंदुत्ववादी काय करतात ?

११ दूरचित्रवाहिन्यांकडून धर्मसत्संगांची मागणी !

ईश्‍वराच्या कृपेने `सनातन संस्था’ आणि `हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्‍त विद्यमाने १०० धर्मसत्संगाची निर्मिती पूर्ण झाली आहे. दिवसेंदिवस या धर्मसत्संगांची लोकप्रियता वाढत आहे.

धर्मसत्संगांविषयी संपूर्ण भारतातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर `झी’ टी.व्ही. आणि `एफ्.एम्. फीवर’ यांच्या व्यतिरिक्‍त राष्ट्र, राज्य आणि प्रादेशिक स्तरांवर ९ वृत्तवाहिन्या आणि `केबल’चालक यांच्याकडूनही धर्मसत्संगांच्या मालिकांचे प्रसारण करण्यासाठी मागणी होत आहे.

या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अनेक दर्शकांना धर्मशिक्षण आणि प्रत्यक्ष साधना यांसंबंधी मार्गदर्शन मिळत आहे. तसेच त्यानुसार प्रत्यक्ष कृती केल्यावर अनेक दर्शकांना अनुभूतीही येत आहेत, उदा. पूर्वजांच्या अतृप्‍त आत्म्यांमुळे होणारे त्रास दूर व्हावे, यासाठी धर्मसत्संगात मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानंतर विविध आध्यात्मिक विधी करणे आणि आचारधर्मानुसार सात्त्विक वस्त्रे परिधान करणे यांमुळे अनेक दर्शकांच्या जीवनात सकारात्मक पालट (बदल) झाले आहेत. त्याचप्रमाणे बहुतांश दर्शकांनी धर्मसत्संगांचे पुन:प्रसारण करावे, तसेच या संदर्भात सविस्तर ज्ञान (माहिती) मिळण्यासाठी आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध व्हावे, अशी मागणीही केली आहे. काही जिज्ञासूंनी पुढील टप्प्याच्या साधनेसंबंधी प्रश्‍नही विचारले आहेत. एका वृत्तवाहिनीने ख्रिस्ती धर्मप्रसाराचा एक कार्यक्रम थांबवून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्यासंबंधी इच्छा व्यक्‍त केली आहे.

साधक, वाचक आणि हितचिंतक यांना आवाहन
आपल्याकडून आम्हाला पुढील सहकार्याची आवश्यकता आहे. हे सहकार्य तुम्ही सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून किंवा तुमच्या घरी राहूनही करू शकता. वाढत्या धर्मप्रसाराच्या कार्यात आपले योगदान अमूल्य असे असेल.
१. संहितालेखन (script writing)
२. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा, तसेच त्यासंबंधीचे व्याकरण यांचे ज्ञान असणारे
३. वरील भाषांतील लिखाणाचे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मळयाळम् या भाषांमध्ये भाषांतर करणारे
४. निवेदक (यांना आश्रमात रहावे लागेल.)
५. उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतातील काही धार्मिक प्रचलित रूढींविषयी अल्प किंवा सविस्तर ज्ञान असणारे
६. ध्वनीचित्रीकरण (video shooting),संकलन (video editing) आणि `फोटोशॉप’, `कोरल’ यांविषयीचे ज्ञान असणारे
७. `कला मंदिर’ (Recording studio) चे निर्माण-कार्य आणि इतर यांत्रिकी अन् आर्थिक साहाय्य
कृपया आपले नाव, निवासाचा पत्ता, संगणकीय पत्ता, संगणकीय ज्ञान, संगणकीय ज्ञान शिकण्याची सिद्धता (तयारी) या सेवांसाठी वेळेची उपलब्धता, पूर्वानुभव या माहितीसह रामनाथी आश्रमात श्री. अभिजित नाईक यांच्याशी संपर्क करावा.
भ्रमणभाष क्रमांक : ०९४२३८८१९०३
संगणकीय पत्ता : advgoa@gmail.com


धर्मसत्संगांना मिळणारा जिज्ञासूंचा प्रतिसाद !
`श्री शंकरा’ या धार्मिक दूरचित्रवाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्मशिक्षणवर्ग प्रसारित केले जातात. हे कार्यक्रम पहाणार्‍या जिज्ञासूंच्या निवडक प्रतिक्रिया, त्यांच्या सूचना आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद येथे देत आहोत.

जिज्ञासूंनी दूरभाष करून केलेली मागणी !
१. श्री. रघुराम : धार्मिक
कृतींविषयीचा आपला धर्मसत्संग मी नियमित पहातो. धार्मिक कृतींशी निगडित आपल्या धर्मसत्संगांच्या ध्वनीचित्र-चक्रीका हव्या आहेत.
२. श्री. व्यंकट राव : मी रांगोळीविषयक आपला धर्मसत्संग पाहिला. मला आपले सात्त्विक रांगोळीविषयीचे पुस्तक हवे आहे.
३. श्री. शरणप्पा : आपले अध्यात्मविषयक ग्रंथ आणि ध्वनीचित्र-चक्रीका हव्या आहेत.
४. श्री. के.एन्. तिवारी : `देवळात दर्शन कसे घ्यावे’, या विषयावरील धर्मसत्संग पाहिला. धर्मसत्संगातून विषय मांडण्याची आपली शैली विशेष आवडली. `देवळात दर्शन कसे घ्यावे’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ हवा आहे. हिंदी भाषेत प्रसिद्ध झालेली आपली धर्मशास्त्रविषयक अन्य प्रकाशनेही हवी आहेत.

जिज्ञासूने संगणकीय पत्राद्वारे पाठवलेली अनुभूती !
धर्मसत्संगातील सूक्ष्मचित्रे आणि दैवी किरणांचे विश्लेषण पहात असतांना स्वत:च्या शरिरातून किरणे जात असल्याचे जाणवणे : माझे नाव माणिकिरी रमेश बाबू असून माझे वय ५२ वर्षे आहे. मी केरळी असून व्यवसायाने मरीन अभियंता आहे. गेल्या दोन वर्षांपासून ओमान या देशात वास्तव्यास आहे. एक दिवस `श्री शंकरा’ दूरचित्रवाहिनीवरील सकाळचा धर्मसत्संग पहाण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम पहातांना एक चमत्कार घडला.मला माझ्या श्रीगुरूंनी (श्री. अशोक राव, उडुपी) मार्गदर्शन केल्यानंतरही बरीच वर्षे अशी अनुभूती आली नव्हती. मी प्रार्थना करत असतांना माझ्या शरिरातून किरण जात असल्याचे मला जाणवले. हे किरण काय होते, हे ओळखू शकत नव्हते. माझ्या गुरूंनी सांगितले होते की, आयुष्यात हळूहळू ते तुला कळेल. जेव्हा मी धर्मसत्संगातील सूक्ष्मचित्रे आणि दैवी किरणांचे विश्लेषण पहात होतो, तेव्हा ते मला अद्‌भूत वाटले. मी हा सत्संग पाहू शकणे, ही केवळ दैवी कृपा आहे. तुमचे धर्मसत्संग ध्वनीचित्र-चक्रीकांवर (सीडीवर) उपलब्ध आहेत का ? किंवा तुमच्या संकेतस्थळावरून ते घेता (डाऊनलोड) येतील का ? घेता येत असल्यास ते कसे घ्यायचे ? माझ्याकडे सकाळी वेळ नसल्याने मी आपल्या धर्मसत्संगास मुकतो. तुम्ही मला मदत करू शकता का ? पुष्कळ लोक या धर्मसत्संगांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा करतो. देवाची तुमच्यावर कृपा असो. – श्री. माणिकिरी बाबू

ठळक प्रतिसाद
१. श्री. शंकरा’ वाहिनीवरील धर्मसत्संग पहाणार्‍या अनेक जिज्ञासूंनी बेंगळुरू येथून सनातन-निमित ग्रंथ विकत घेतले आहेत.
२. अनेक जिज्ञासू धर्मसत्संग पाहिल्यानंतर कार्यक्रम खूप चांगला असल्याचे भ्रमणध्वनीवरून संपर्क करून कळवतात.
३. धर्मसत्संगांत सूक्ष्मचित्राद्वारे केले जाणारे विषयाचे सादरीकरण बर्‍याच प्रेक्षकांनी आवडल्याचे कळवले.
४. पाँडेचेरीहून वंशाने विदेशी असलेल्या एका प्रेक्षकाने पत्र पाठवून त्यांना कार्यक्रम खूप आवडल्याचे कळवले. त्यांनी अध्यात्मविषयक काही प्रश्‍नही त्या पत्रात विचारले आहेत.
५. काही प्रेक्षकांनी धर्मसत्संगातील `कपडे आध्यात्मिक दृष्टीने कसे असावेत’, हा विषय पाहून त्या ग्रंथांची मागणी केली. कपड्यांविषयीची धर्मसत्संग मालिका बर्‍याच प्रेक्षकांनी आवडल्याचे कळवले.

जिज्ञासूंनी केलेल्या सूचना
१. श्री. रंजन गणेश : जगाला ओळख नसलेल्या प्राचीन हिंदु मंदिरांचे प्रक्षेपण, मंदिरांचे वास्तूशास्त्र, तसेच पुराणशास्त्र या विषयांवरही धर्मसत्संगांमधून मार्गदर्शन करू शकता. तामिळनाडूमध्ये ही दूरचित्रवाहिनी उपलब्ध आहे का ? (ही दूरचित्रवाहिनी देशभर सर्वत्र स्थानिक केबलवाल्यांच्या माध्यमातून प्रक्षेपित होते. – संकलक)
२. श्री. कृष्णा : या धार्मिक कार्यक्रमांतून मूलभूत धार्मिक प्रश्‍नांशी निगडित मार्गदर्शन व्हावे. उदा. जन्म होण्यामागील कारणे, मनुष्यजन्माचे प्रयोजन वगैरे.
३. श्री. त्यागराजन : धर्मसत्संगांसारखे दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम इंटरनेटवर उपलब्ध झाल्यास जगभरातील जिज्ञासू त्याचा लाभ घेऊ शकतील.

निगडीत वृत्त : सनातनचे उपक्रम